Skip to main content

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

लेखक चेक आणि मेट यांनी गुरुवार, 11/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59636
प्रतिक्रिया 331

प्रतिक्रिया

In reply to by एस

हेडलीचा प्रकरण आताच उकरून काढण्यामागे मोदींचा डाव आहे. त्यांच्या इतक्या अमेरिका दौर्‍याचा मागे हेच षडयंत्र होता. इतके दिवस साक्ष द्यायला नकार देणारी अमेरिका अचानक हेडलीच्या साक्षीला तयार होते. आणी ठरवून तेच प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे पढवलेली आहेत. यावरून हेच सिद्ध होते की हा सरळ सरळ एक कट आहे. या डबल एजंटची साक्ष कोर्ट ग्राह्य धरणार आहे का ? आणि ती कितपत विश्वासार्ह आहे ? पण देशांर्तगत पुरावे सापडले नाहीत म्हणून हा फार्स उभा केलेला आहे. देशामधल्या (वेमुलासारख्या)अंर्तगत समस्यांवरून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे.

In reply to by वेल्लाभट

अगदी, देशात राहायची भीती वाटते म्हणणार्‍यांना एव्हाना, "बाबा रे, कोणत्या देशात जायचंय सांग" असं विचारुन पार्श्वभागावर रट्टा मारुन हाकलून द्यायला हवं होतं.

In reply to by सूड

हल्ली माझा जेन्युइन आणि सारकास्टिक प्रतिसादांमधे गोंधळ उडायला लागलेला आहे. डोकं तपासुन घ्यायला हवं :(!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हेच्च बोल्तो. काल एका धाग्यावर मृत्युंजयरावांनी डांगे सायबांना दिलेल्या एका प्रतिसादाबद्दल शंका उत्पन्न झाली म्हणून तसं विचारलं. खाली धुळवड दिसल्यावर कळाल काय ते.

सेक्युलरखाजाड्या
ह्यो शब्द काळजाला भिडला बर का!

JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. अतिशय अस्वस्थ करणारं आहे हे...

In reply to by संदीप डांगे

ओ साहेब, मुद्दे गंभीर आहेत,पाॅपकाॅर्न काय मागताय?? मी काय या जिल्ब्या टाकलेल्या नाहीत.

In reply to by संदीप डांगे

मग तुमचे अनमोल मत मांडा कि राव! नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता?? (तुमचे मत केव्हा कुठे मांडायचे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच)

In reply to by चेक आणि मेट

माफ़ करा मला, खरेतर हा मुद्दा तुमच्या अन डांगे साहेबांच्या मधला आहे त्यामुळे मी बोलणे उचीत ठरणार नाही तरीही एक निरिक्षण आगाऊपणे नोंदवतो, ते म्हणजे तुम्ही डांगे ह्यांना स्टीरियोटाइप केलेले दिसते आहे! त्यांचा प्रतिसाद काय असेल अन कसा असेल असे आडाखे जर तुमच्या मनात पक्के असतील तर डांगे काहीही बोलो तुम्हाला वाकडेच लागेल! तस्मात् ते बोलत नाहियेत तेच बरे असे मत पड़ते आहे नथिंग पर्सनल जस्ट एन ऑब्जरवेशन हे वरील ठळक वाक्यांतुन जाणवले नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता??

In reply to by चेक आणि मेट

नेमकं या आशयाच्या विरूद्ध धागा असता!तर बेंबीच्या देठापासून, आतडी पिळवटून, पोटतिडकिने मुद्दे मांडले असते तुम्ही!काय म्हणता?? केव्हाचं काय म्हाइत नै पण आता तरी एवढंच म्हणतो की चड्डीत र्‍हा ना भाऊ. भाषा जपून वापरा माझ्याबद्दल, माझ्यासोबत. ही पहिली आणि शेवटची सूचना.

In reply to by संदीप डांगे

डांगेसाहेब, ओघाच्या भरात थोडं जास्तीच बोल्लो,त्याबद्दल क्षमस्व. . . पण हा पाॅपकाॅर्न चघळत बसण्याचा धागा आहे का?? हे कृपया सांगावे. तुम्ही पाॅपकाॅर्न हा शब्द वापरल्यामुळे राग आला. बाकि आम्ही चड्डी एका विशिष्ट वेळेलाच काढतो.एरवी चड्डीतच असतो. बोलणं लागलं असेल तर परत एकदा I AM SORRY.

In reply to by चेक आणि मेट

इट्स ओके नाऊ. राग बाजुला ठेवा. त्याचा इथे मिसळपाववर काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा तर्क, विचार आणि मुद्दा ह्यातून प्रतिपक्षाला बेजार करण्यात प्राविण्य मिळवा. राग प्रतिपक्षाला यायला हवा, तुम्हाला नाही. राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही लिहा ना विस्तृतपणे. बर्‍याचदा धाग्यांपेक्षा तुमचे प्रतिसाद अजुन विस्तृत असतात. बर्‍याच गोष्टी कळत जातात त्यामुळे.

In reply to by संदीप डांगे

राहिला पॉपकॉर्नचा प्रश्न तर असं आहे की तुमचा धागा विस्तृतपणे काहीही सांगत नाही. म्हणजे प्रतिसादांमधूनच घटना, पार्श्वभूमी, कारणे, परिणाम उलगडत जाणार. त्यासोबत लोकांचे बायस उघडे पडत जातील आता ते वाचायचे म्हणजे पॉपकॉर्न लागतीलच. काय म्हणता?
मी धाग्यातच लिहलयं,कि पहिल्यांदा लिहतोय म्हणून. घटना,पार्श्वभूमी,कारणे इ सर्व सांगत बसणे म्हणजे मिपाकरांच्या ज्ञानावर संशय घेण्यासारखे आहे. आणि राहिला मुद्दा पाॅपकाॅर्नचा,जे लिहले आहे ते थोडके आणि वास्तव आहे,नेहमी फाफटपसारा करून लिहूनसुद्धा त्यातून काही साध्य होत नसतं कैकवेळा. तुम्हाला पाॅपकाॅर्न लागणार असतील,तर याहून अधिक ते काय बोलणे,काय म्हणता?

(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??) +१०००००००००००० म्हणतो मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नेहरुंच्या नावाची युनिव्हर्सिटी बंद करण्याची या देशात कुणाची टाप लागुन राहिली आहे? सोन्याबापू यु टु ना...

In reply to by मृत्युन्जय

ह्या बाबतीत ही यूनिवर्सिटी साक्षात् नेहरूंच्याच् "वोकेशन बेस्ड एजुकेशन" ला सुरुंग लावते आहे मृत्युंजय भाऊ!! मागे एकदा डोक्यात हिस्ट्री मधे पीएचडी करायचे खुळ घुसले होते तेव्हा जेएनयु जवळून पाहिली आहे! कम्युनिस्ट यूटोपिया ची अशक्य स्वप्ने पाहात अन दाखवत ही यूनिवर्सिटी राख झाली आहे! च्यु** लोकं आहेत नुसती, धनुष अन सोनम कपूर च्या रांझणा चित्रपटात जी गत दाखवली आहे जेएनयुची ती शतप्रतिशत बरोबर आहे!! अन त्याच्यामुळे त्यांचा ताबा सुटला आहे!! मरू दे!! भिकार** साले

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

DU आहे ना. DU चं Department of History तर जबरदस्त आहे. JNU चा International Relations Course चांगला आहे. बस - JNU च्या फक्त या कोर्सबद्दल जरा चार चांगले शब्द ऐकलेले आहेत. बाकी तो since inception कम्युनिस्टोंका अड्डा था और अभीभी है!

In reply to by बोका-ए-आझम

हो डीयु उत्तम आहे म्हणून तर जेएनयु चा नाद सोडला (सुदैव माझे) पण मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा इतकी कल्पना नव्हती, त्याकाळी होता डोक्यात कीड़ा! आता पुर्ण बिस्किट मुरले!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जे एन यू वाले एक नंबर भिकारचोट आणि तितकेच येडझवे आहेत. त्यांना लाथाच घातल्या पाहिजेत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी सहसा टोकाच्या भूमिका घेणे टाळतो पण माझ्यामते जे एन यु आपल्या स्थापनेमागे असलेला एकही विचार साध्य करत नाहिये! ही यूनिवर्सिटी बंद करुन टाकायला हवी आहे !!!
मला वाटते घटनात्मकदृष्ट्या शिक्षण हा संघराज्य (संघराज्य=केवळ युनियन गव्हर्नमेंट अर्थाने -हे आजकाल स्पष्ट करणं गरजेच झालय ;) ) आणि राज्यसरकार यांच्या जॉईंट लिस्ट मधला विषय असला तरीही संघराज्य (केंद्रसरकारची) भूमिका सहसा युजीसी पर्यंत मर्यादीत असावयास हवी, सर्वसाधारणपणे राज्यस्तरावरील विद्यापिठे जे करू शकतात त्यासाठी केंद्रीय विद्यापिठांची आणि संघराज्याच्या सरळ भूमिकेची गरज आहे का ? आणि खासकरून राष्ट्रीय एकात्मतेचे तत्वज्ञान रुजवता येत नसेल तर राष्ट्रीय विद्यापिठास काय भूमिका आहे ? ज्या बादात जे एन युचे आले आहे त्या वादात बहुधा काश्मिर विद्यापिठाचेही नाव आले नसेल. आणि आलेतरी बातमीत येण्याची शक्यता कमी, जे एन युत असे उद्योग करण्याचा उद्देश जागतीक स्तरावरील बातम्यात विषय आणून भारताची बदनामी साधण्याचा असू शकेल का अशी साशंकता वाटते
(सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??).
सहमत आहे, ढोंगी सेक्यलरपणामुळे खर्‍या सेक्युलॅरीझमचे आणि खर्‍या उदारमतवादाचे खूपमोठे नुकसान होते.

व्रिंदा करात यांनी उद्घाटन केलेलं याचं २०११मध्ये. a

आणि हा कालच्या प्रोटेस्टचा व्हीडो. शब्द हे आहेत. कश्मीर की आजादीतक जंग रहेगी, जंग रहेगी भारतकी बरबादीतक जंग रहेगी, जंग रहेगी

In reply to by अनुप ढेरे

हा कार्यक्रम (क्लिप) जेएनयुचा आहे का हे डिस्प्यूटेड आहे जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती असे खुद्द तिथल्या ओपन लर्निंग सेण्टर मधे शिकणाऱ्या ऐकाने मला सांगितले होते, तसेच ही क्लिप कश्मीर मधली आहे असे एक जम्मू कश्मीर पोलिस मधील मित्राने सांगितले होते खखोदेजा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शेवटच्या भागात जे एन यु व लाल सलाम इ. शब्द ऐकू येतात..त्यावरुन ही क्लिप जे एन यु मधीलच असावी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू क्लिप त्या दिवसाची नसेल हि . किंवा आणखी कुठलीही असेल . पण त्याने काही फरक पडतो का ? मुद्दा हाच कि त्या लोकांनी देश विरोधी घोषणा दिल्या .

In reply to by अद्द्या

जेएनयु चा कार्यक्रम दिवसाउजेडी झाला होता अन ह्यपेक्षा कट्टर भाषा होती हा मुद्दा आहे माझा मेन, म्हणजे जितके वाटते त्यापेक्षा इंटेंस अन राष्ट्रद्रोही प्रकरण आहे हे (सिस्टेमेटिक राष्ट्रद्रोह) असे म्हणायचे आहे मला. जेएनयु तसेही बर्बाद आहे राजे. थोडक्यात तुम्ही म्हणता आहात तेच मी पण म्हणतोय

▶इशरत मेल्यावर तिचा फोटो लष्करच्या वेबसाईटवरही शहीद म्हणून झळकला होता.यातच सगळं आलं. पण इशरतची बहीण ती निर्दोष होती असे म्हणते. याकुब मेमन बाबतही हेच चाललं होतं,तो निर्दोष होता म्हणे?मग न्यायालयाने फाशीची शिक्षा का दिली? काय टिवल्याबावल्याचा खेळ चालू आहे??

In reply to by चेक आणि मेट

एक इशरत जहां अन दूसरी बेस्ट बेकरी वाली ज़हिरा शेख का कोण होती त्या दोघींनी लैच वैताग आणला होता, ज़हिरा ने तर इतके स्टेटमेंट्स बदलले की शेवटी बहुतेक न्यायालयानेच तिला दंड ठोठावला अन तिची साक्ष अग्राह्य ठरवली होती असे वाचल्याचे स्मरते

हेडली रॉ चा माणुस आहे ! इती :- हरामी कांगावाखोर पाकडे ! इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ? २६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction


In reply to by मदनबाण

इशरत जहां अतिरेकी होती असं सिद्ध झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते, तसे असेल तर तिच्या नावाने शिमगा करणारे तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? तांत्रिक (कायदेशीर दृष्ट्या) माहीती नाही पण भावनिक दृष्ट्या होय ते सगळे अव्वल देशद्रोही आहेत असे म्हणावे वाटते देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ? पोटा टाडा मकोका सारखे कायदे पुनर्जीवित करून अधिक बलशाली करणे, अध्यादेश काढून एनसीटीसी त्वरीत स्थापन करणे हे एकदम लकाकलेले दोन मुद्दे आहेत डोक्यात. २६/११ च्या आधी १ वर्ष देखील असाच प्लान आखण्यात आला होता त्याची माहिती आपल्याला होती का ? इंटेलिजेंस चं मॅटर आहे मला कल्पना नाही

In reply to by मदनबाण

ही पाकिस्तानची कायमची बोंब आहे,काही झालं कि RAW ला मध्ये आणायचं. काही बाबतीत RAW कूटनितीचे डाव टाकत असते,पण हे असलं नीच काम करेल का??
तिला सपोर्ट करणारे देशद्रोही ठरतात का ? देशद्रोही लोकांना / अतिरेक्यांना सपोर्ट करणार्‍या आणि त्यांच्या अंत्ययात्रेला "अलोट गर्दी " करणार्‍यांना नक्की कोणत्या प्रकारे वठणीवर आणता येइल ?
यांना सामुहिक समुपदेशनाची गरज आहे. वठणीवर येत नसतील तर नाईलाज आहे,मग एक जहाल पर्याय आहे तो सर्वस्वी निंदनीय ठरेल. →क्या सोच रहे हो पार्थ,उठाओ धनुष्य.

In reply to by चेक आणि मेट

महासत्तेचे लोभस अन हवेहवेसे स्वप्न पाहताना एकदम जाणवते की "सामूहिकरीत्या धनुष्य उचलणे" हे परवडण्यासारखे नाहिये!! समुपदेशन अन घेटो तोडणे हे काही अंशी ठीक आहे पण जे ऑलरेडी डोकी फिरून वाया गेले आहेत त्यांचे समुपदेशन म्हणजे "गाढ़वापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता" प्रकार ठरेल! एकंदरित अवघड जागचे दुखणे आहे!!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बघुया आता सरकार हे सगळं कसं हँडल करतयं. या अशा केसेस मुळे रोहित वेमुलाबाबत असणारी सहानुभूती किंचित कमी झाली राव!

tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet.

In reply to by viraj thale

tya awhad la Facebook var jaam shivya padat ahet. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते? संदर्भ :- रोखठोक : महाराष्ट्र कोण बुडवत आहे?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction


In reply to by मदनबाण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘तोयबा’ची अतिरेकी इशरत जहां ही ‘साध्वी’ वाटते व तिच्यासाठी ते ढसाढसा रडतात, पण तेच आव्हाड शिवशाहीर पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतात, हे शरद पवारांना कसे चालते?
हे असलेच पवारांना चालते. दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती. आव्हाडच्या आधी राष्ट्रवादीच्याच वसंत डावखरेंनी सुरवातीला तिच्या कुटुंबियांना १ लाखाची मदत दिली होती. ती मुलगी मध्यरात्री मुंब्र्यापासून खूप दूर गुजरातमध्ये एका कारमध्ये आपला धर्मांतरीत नवरा व इतर दोन पाकिस्तानी तरूण यांच्याबरोबर नक्की काय करत होती हा प्रश्न ना तिच्या घरच्यांना पडला ना या अतिरेक्यांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीच्या नालायकांना? एनकाऊंटरमध्ये ते चौघे मारले गेल्यावर त्या दोन पाकड्यांची प्रेते न्यायला सुद्धा कोणीही फिरकले नव्हते. या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात. http://www.ndtv.com/india-news/ishrat-jahan-innocent-muslims-cant-be-bl… बादवे, आता वागळेही अपेक्षेप्रमाणे हेडलीवर विश्वास कसा ठेवायचा असे ट्विट करून अजूनही इशरत जहा निर्दोष असल्याच्या भूमिकेला चिकटून आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आता सगळेच मोंदींना चर्चेत / किंवा इतर ठिकाणी खेचुन टिआरपी खेचत आहेत, तर मी देखील एक प्रयत्न करुन बघतो ! ;) दस्तुरखुद्द पवारांनीच इशरत जहाला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले होते व तिची भलामण केली होती.या असल्या मुलीकरता हे राष्ट्रवादीचे नालायक सुतक पाळतात. मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction


In reply to by मदनबाण

मोदी साहेब तर म्हणतात की पवार साहेब त्यांचे चांगले मित्र आहेत, ते अधुन मधुन त्यांचा सल्ला घेत असतात. यालाच राजकारण म्हणतात काय ?
आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखाद्याच्या सत्कारसमारंभाला उपस्थित असलो किंवा आपण एखाद्याबरोबर एकाच व्यासपीठावर असलो तर त्या व्यक्तीबद्दल चार शब्द बरे बोलणे हा शिष्टाचार आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नसतं. त्यामुळे मोदी किंवा जेटली किंवा अलिकडे सोनिया गांधींसकट अनेकांनी पवारांवर जी स्तुतीसुमने उधळली त्यात शिष्टाचार यापलिकडे फारसे काही नाही. आता सल्ल्याचं म्हणाल तर, मोदी असा कोणाचा सल्ला घेत असतील आणि तेसुद्धा पक्षाबाहेरील एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेत असतील अशी शक्यता कितपत आहे? पवारांकडे असे कोणते गुण आहेत जे मोदींकडे नाहीत व त्यासाठी ते पवारांचा सल्ला घेतात? पवारांना राष्ट्रीय राजकारणात शुल्लक महत्त्व आहे. महाराष्ट्रात त्यांना आपल्या पक्षाला कधीही सत्तेवर आणता आले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचा पक्ष वाढला नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला कधीही एक चतुर्थांश जागा सुद्धा मिळालेल्या नाहीत. केंद्रात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कायम एक आकडीच राहिली. त्यामुळे अशा व्यक्तीचा मोदी कशासाठी सल्ला घेतील? मी त्यांचा सल्ला घेतो असे म्हणणे हा केवळ शिष्टाचार होता. त्यापलिकडे त्यात काहीही गम्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

लोकसत्तेची जाहिरात व त्यांचा जोक्स सध्या जालावर फिरत आहे त्यात सुळे ताई म्हणतात की माझ्या बाबांना विचारा , त्यांना सगळे माहिती आहे

डिस्क्लेमरः- ह्या विषयांवर जास्त माहिती अथवा वाचन नाही. भारतात जर कुणी भारतविरोधी भाषणे अथवा नारे देत असेल तर त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करता येते का?

In reply to by पिलीयन रायडर

ताई राजकीय इच्छाशक्ति असल्यास अन सत्ताधारी पार्टीला प्रॅक्टिकली शक्य असल्यास तर मागील उदाहरण लाहता व्यंग्यचित्रकार असलेल्या असीम त्रिवेदी वर सुद्धा देशद्रोह केल्याचे कलम लावले गेले होते! तेव्हा
"केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे"
हे सत्य वाटते,

In reply to by पिलीयन रायडर

अटक कशाला? थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर! भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही. मग ते काश्मिरी नालायक कार्टी असो वा फेसबुकचा हरामखोर अ‍ॅण्डरसन. चुकीला माफी नाही हेच धोरण असावे.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय सर, तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात. भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे? आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला? तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे. प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की. तुम्ही मला कदाचित अजूनही खरोखर ओळखलं नाही म्हणून असा प्रतिसाद दिलात. तुम्हाला ओळखायला मी तुम्हाला ना कधी भेटलो ना मिपा व्यतिरिक्त कधी चर्चा केली. पण तुम्हाला ओळखण्याचा आणि या धाग्याचा कहिही संबंध नसताना तुम्ही असे प्रतिसाद देत आहात हे बघुन थोडा थोडा ओळखायला लागलो आहे. भारतविरोधी घोषणा, कारवाया, विचार, प्रचार, कृती हे अजिबात सहन न करणे व तसं मत व्यक्त करणे ह्यात 'नक्की का' विचारण्यासारखे काय आहे? तुम्ही अर्धवट वाचता आणि उत्तर देता याचा हा अजुन एक जिवंत पुरावा मिळाला. तुमच्या प्रतिसादातच्या "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर" या वाक्याला बोल्ड करुन मी तो प्रशन विचारला होता. "भारतविरोधी नारे कु ठ ल्या ही परिस्थितीत स्विकारार्ह नाही.". या वाक्यावर मी कुठलाही प्रश्न विचारला नव्हता. तुम्ही उतावीळपणे प्रतिसाद करताना बरोब्बर ज्या वाक्यावर प्रश्न विचारला नाही त्याच वाक्याचा संदर्भ घेता आहात आणि ज्या वाक्यावर प्रश्न विचारला त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात. सिलेक्टिव्ह रिडींग आणि दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे हे. किती तो आक्रस्ताळेपणा. आपले राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी. एक भारतीय म्हणून मी असले चाळे सहन करु शकत नाही, ह्यात प्रश्न करण्यासारखे नक्की काय आढळले तुम्हाला? तुम्ही चाळे सहन करण्याबद्दल मी काहिच लिहिलेले नाही प्रशन कशावर केला आहे ते बघा तर जरा. आणि एकीकडे तुम्ही "राजकिय विचार, तात्त्विक मतभिन्नता आपल्या ठिकाणी" वगैरे भारी भारी वाक्ये लिहिता आणी गरज नसताना मोदी वगैरेना मध्ये आणता यातच् तुमचा वैचारिक गोंधळ दिसुन येतो. तुम्हाला नक्कीच 'मोदीविरोधकफोबिया' झाला आहे असे जाणवतंय. इतकी की कोणी (तुमच्यामते मोदीविरोधक) अस्सलपणे देशप्रेम व्यक्त करतोय तिथेही तुम्ही त्यावर शंका घेताय. मला कुठला फोबिया आहे की नाही ते माहिती नाही पण तुम्हाला नक्कीच मोदीफोबिया झाला आहे. इतका की एखादा माणूस कवठे महांकाळ मधल्या सांडपाण्याची समस्या आणि उंदराचा सुळ सुळाट या विषयावर बोलु लागला तरी तुमचा मोदी विरोध जागृत होतो. मी मोदी, मोदी विरोध याबाबत काहितरी बो ललो होतो का? मोदी विरोधक म्हणजे देशद्रोही असे कही बोललो का? मोदी विरोधी तर सोन्याबापू पण आहेत. परवाच धाग्यता जाहीरपणे मी त्यांच आद्दर करतो म्हणुन लिहुन आलो. इथे मोदी वि रोधाचा आणि देशप्रेमाचा संबंध काय? तुम्ही च उगाच पराचा कावळा करत आहात. इथे तर परा पण नही. तुमचे असे वागणे अपमानजनक आहे असे माझे मत आहे. माझे कसे वागणे आणी कोन्णला अपमानजनक आहे तेच कळाले नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अपमान वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आह. त्याला मी करु शकतो? भारत = भारतीय सरकार = नरेंद्र मोदी हे समिकरण तुम्ही बनवून टाकलंय. असे मत तुम्ही का बनवले देव जाणे. मी असे विधान कधीही केलेले नाही. कावीळ झालेल्या माणसाला सगळे जग पिवळे दिसते तसे तुमचे झालेले आहे. तुम्हाला सगळीकडे मोदी द्वेष दिसतो. उद्य एखाद माणूस मोदीं जॅकेट चांगले अहे असे म्हणाले तर तो मा णूस तुमच्या मते मोदी भक्त होइल आणि टीकेस पात्र होइल. जरा विवेकी सरासर विचार करुन मत प्रदर्शन करा की. धागा का य तुम्ही बोलता का? धगाक्कर्त्याने म्हटल्याप्रमाणे विषयावर बोलायचे सोडुन तुम्ही मोदींना मध्ये आणले आणि चर्चा भरकटवली. मूळ मुद्दा राहिला बाजूलच. अश्याने धागाकर्त्याचे तुमच्याबद्दलचे मत (की उलट्या वि षयांवर धागा असला असता तर तुम्ही कंठशोष करुन गिगाबायटी विरोधी प्रतिसाद दिले असते) अजुन पक्केच होइल. तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही धाग्याला अनुषंगुन चर्चा करा, आपले चुकीचे म्हणणे रेटु नका , एकतर्फी वाद घालु नका, नसलेले वाद उकरुन काढु नका, नीट वाचुन प्रतिसाद द्या, दुसर्‍यावर विनकारण अरोप लावु नका. पण कुणाही भारतीयाच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी तुमच्या देशप्रेमाबद्दल कुठलीही शंका घेतलेली नसताना तुम्ही असली विधाने करणे दुर्दैवी आहे. तुम्ही तुमची वाक्ये माझ्या तोंडात कोंबत आहे हे नक्कीच खेदजनक आहे. एक मिपाकर म्हणुन आज मला शरम वाटली. अर्रे कुठे नेउन ठेवलाय मिपा माझा. हे कधी सगळे चष्मे काढून, 'शुद्ध विवेक' ठेवून विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल. चष्मे काढण्याची गरज तुम्हाल असताना, सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला चष्मे बदलायल सांगणे आणि विवेकाने विचार करयाला सांगणे म्हणजे हिटलरने गांधीजींना अहिंसेचा उपदेश देण्यासारखे आहे. धन्यवाद. अर्रे आणी हो तुम्हाला न समजलेल्या किंव तुम्ही समजुन न समजल्यासारखे केलेल्या वक्याबद्दल : तुम्ही म्हणत होता "थेट रणगाडे चालवले ह्या हरामखोरांवर तरी बेहत्तर " . मागे तुम्हीच म्हणाला होता ना की हातपाय कापणे वगैरे अघोरी मध्ययुगीन प्रथा आहेत म्हणुन? मग रणगाडे फिरवणे काय आहे? लोकशाहीभिमुख भारतीय न्यायव्यस्थेला, भारतीय नागरि,, मग ते कितीही चुकीचे वागले तरी युद्धस्थिती नसताना त्यांच्यावर रणगाडे फिरवणे मान्य नाही. तुम्ही आधी तुम्हीच घेतलेल्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले म्हणुन मी गंमतीने तुम्हाला एक प्रशन विचारला तर तुम्ही इतका कांगावा केलात ? कदाचित तुमची स्वतःचीचे वक्तव्ये तुम्हाला आठवत नसावीत किंवा तुमच्या दोने वक्तव्यातली विसंगती तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसतच नसावी किंवा तुमची मते बदलली असावीत. काहिह्ही असु शकेल पण मग त्याला संयतपणे प्रतिसाद द्या ना? नसत्या गोष्टी कशाला मध्ये घुसडता आणि उगाच आक्रस्ताळेपणा कशाला करता ? त्रिवार धन्यवाद

In reply to by मृत्युन्जय

तुम्ही नब्नन वाचता आणी विचार न करता प्रतिसाद कसे देता याचे उत्तम उदाहरण आहे हे. हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-) प्रत्येक प्रतिसादात तुम्हाल मोदी दिसतात,, काहिही करुन मोदींना मध्ये आणुन राळ कशी उडवायची याच्यासाठीच तुमचे प्रयत्न चालु असतात की काय असे वाटायला लागले आहे. मी मोदी, भारत सरकार, तुमचा मोदी विरोध याबद्दल काहिही बोललेलो नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी मध्ये आणला याचा अर्थ तुम्हाला तरी किमान "मोदी फोबिया" झाला आहे हे नक्की. सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते. कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते. बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही. बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद. एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते. तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर? यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते. अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा.

In reply to by संदीप डांगे

हा हा. दोन शब्दात खोचकपणे मारलेल्या टोमण्यात नक्की काय वाचायचं आणि किती विचार करायचा ह्याची तुमच्याकडे शिकवणी लावावी म्हणतो. :-) लावाच. पण त्याहुन जास्त शब्दांचे अर्थ समजुन घेण्याची शिकवणी लावायची तुम्हाला गरज आहे. सदर विषयावर आपल्या नेहमीच झालेल्या चर्चेवरुन प्रस्तुत वर्णन तर मला तुमचेच आहे की काय असे वाटते. मी सदर विषयावर चर्चा करतो तेव्हा सदर विषयावरच चर्चा करतो. नॉर्मंडीच्या लढाईचा विषय चालु असताना गुजरातच्या दंगलीमधल्या मोदींच्या भूमिकेवर चर्चा करण्याचा नतद्रष्टपणा मला जमत नाही. या धाग्यावर तुम्हीच मोदी उकरुन काढलेत. मी तर त्या प्रश्नात मोदींचा म देखील लिहिला नव्हता. "न" चा "मो" करण्याच्या तुमच्या वृत्तीला आणि तद्नंतरच्या कांगावखोरपणाला आम्ही काय बोलणार? आणी वर तुम्ही मलाच मोदी उकरुन काढले म्हणताय होय? कारण जिथे नको तिथेही मोदी तुम्हीच उकरुन काढले होते असे स्मरते. तुम्ही माझ्या कुठल्या प्रतिसादांना अनुसरुन असली भडकाऊ विधाने करत आहात आणि तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि असे विचित्र बडबडताय आणि तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का ? हा प्रश्न आता तुम्हाला विचारु का डांगे काका? तुम्ही काहिही स्मरुन प्रतिसाद द्याल हो. तो माझ्या विचारसरणीला अनुसरुन असेल तर गोष्ट वेगळी. पण इथे तर तुम्ही कश्यात काय आण्बि फाटक्यात पाय अशी अवस्था करुन घेतली. मुळात मी जिथे तिथे मोदी आणत नाही. असे असताना तुम्ही असले इनोदी प्रतिसाद देताय. हसुही येत नाही. जरा सारासार विचार करुन लिहा की. बरे या प्रतिसादाचा आणि मोदींचा लांबलांब संबंध नाही. तुम्हाला झेपले नसेल तर विचारावे. तुम्हाला डायरेक्ट मोदी आठवले म्हणजे एक तर तुम्हाला मोदींच्या नावची कावीळ झाली असावी किंवा विनाकारण वाद उकरुन काढण्याची तुम्हाला हौस असावी किंवा मुळातच तुम्ही कुठल्याही गोष्टीचा उलटा अर्थ लावत असावात. यापैकी काय ते मला माहिती नाही पण उगा काड्यासारु प्रतिसाद द्यायचे म्हणजे हद्द झाली. ४ शब्दांच्या निरागस प्रतिसादा वर तुम्ही किती आक्रस्ताळेपणा केलात तो. किती तो कांगावा. मूळ मुद्दा पडला बाजूल्लाच आणि मोदी मध्ये आणलेत. हद्द झाली राव. तुम्ही माझी कोणकोणती विधाने लक्षात ठेवताय आणि कुत्सितपणे टोमणे मारतांना तुमच्या डोक्यात काय चाललंय हे मला समजायला तुमचा मेंदु काय बीएसई सेन्सेक्स आहे असे तुम्हाला वाटलं का मृत्यूंजय सर? मी विधाने नाही तर विचार लक्षात ठेवतो. उपयोगी पडतात. विधाने अनुषंगाने येतातच मग. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रतिसादात तुम्हाला टोमणा कुठे दिसला ? बर दिसला तर दिसला, असतो एकेकाचा स्वभाव म्हणुन सोडुनही दिले असते पण माझ्या मागच्याच प्रतिसादात तुम्हाला कळाले नाही किंवा जाणुन घ्यायची इच्छा नाही म्हणुन तुम्हाला मी योग्य मुद्द्यावर आणायचा प्रयत्नही केला पण तुम्ही आंगणच वाकडे म्हणुन धरुन बसला आहात त्याला मी काय करावे? तुम्हाला सगळीकडे टोमणे का दिसतात? बाकी, राळ उडवायचीच असेल तर त्यासाठी मला मोदींची तरी गरज नाही. ते कळाले आहेच आत्तापाबेतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरुन राळ उडवु शकता. पण त्यामुळे नक्की काय साध्य होते हो? कंटाळा येत नाही का रोज रोज असले काही करुन? बाकीच्या प्रतिसादाबद्द्लः नेहमीच्या पद्धतीने कोलांट्यामारू प्रतिसाद. कसल्या कोलांट्या मारल्या ब्वॉ? तुम्हाल कळत नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडता ? तुम्ही सिलेक्टिव्ह रिडींग तुम्ही करत असताना, चुकीचे अर्थ तुम्ही काढत असतामी, मी जे लिहिलेच नाही ते लिहिले आहे असे तुम्ही भासवत असताना, अर्थाचा अनर्थ तुम्ही काढत असताना, अर्थ न समजता तुम्ही लिहित असताना, पराचा कावळ तुम्ही करत असतना, आक्रस्ताळेपणा तुम्ही करत असतान, एकतर्फी आरो प तुम्ही करत असताना तुम्ही मला कोलांट्या उड्या मारतो असे म्हणणे म्हणजे रिकी पाँटिंगने राहुल द्रविडला वाचाळ म्हणण्यासारखे आहे. एवढा मेगाबायटी लिहिण्यापेक्षा आधीच तुम्हाला अपेक्षित दोन ओळी लिहिल्या असत्या तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असते. मी चार शब्दच लिहिले होते. मेगाबायटी प्रतिसाद तुम्ही दिला. आणि वर मलाच विचारताय होय? चोर त चोर वर शिरजोर. यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढंच नीट प्रतिसादात लिहायचे कष्ट घ्याल तर बरे होइल असे वाटते. मी तेच करतो. यापुढे प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद दिलात तर खुप उपकार होतील (स्वतःवरच) अन्यथा गरज नाही हो असल्या टुकार टोमण्यांची. तुमच्याकडेच ठेवा. मला तर तुमच्या इथल्या अस्तित्वाचीच गरज नाही हो . मी तुमच्या आरत्या ओवाळाल्या तरी तुम्हाला तो टोमणेच वाटतील (अर्थात तुमच्या आरत्या ओवाळण्याचा नत द्र ष्टपणा मी करणार नाही ही गोष्ट वेगळी) असे वाटते. तुम्हाला काय टोमणे मा रायचे आणि? काहिही हा डांगेश्री.

In reply to by मृत्युन्जय

तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादात किती व्यक्तिगत झाला आहात ते तुम्हीच नीट एकदा वाचुन आणि जमत असेल तर समजून घ्या. (तुम्हाला आठवत नसेल, ट्रुमन यांच्या जोकवर मी केलेला विनोद मोदींसंबंधी नव्हता तरी त्या एका साध्या वाक्यावरुन तुम्ही मोदी आणून राळ उडवली होती, तिथे तुम्हाला "प्रतिसाद देताना सिलेक्टिव्ह रिडींग न करता , चुकीचे अर्थ न काढता, वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न न करता, दुसर्‍याचे म्हणणे नीट वाचुन, अर्थाचा अनर्थ न करता, अर्थ न समजता प्रतिसाद न देता, राईचा पर्वत न करता, आक्रस्ताळेपणा बाजुला ठेउन, कांगावखोर पणा न करता, प्रत्येक ठिकाणी मोदींना मध्ये न आणता, समंजसपणे प्रतिसाद " हे आठवले नव्हते.) बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही.

In reply to by संदीप डांगे

व्यक्तिगत प्रतिसादाला तुम्हीच पहिल्यांदा सुरुवात केली डांगे अण्णा. मी नाही. तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेली. कुठल्याही माणसाला संताप येण्या सारखीच गोष्ट आहे ती. पण तरीही संयम राखुन प्रतिसाद दिले आहेत. तिथेही (ट्रुमन चा धागा)आणि इथे तर नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टींचे नक्कीच चुकीच्चे अर्थ काढले आहेत आणि वर कांगावखोरपणे प्रतिसाद दिलेत. तरीही तिथे मी वाद संपवला होता. तेव्हाही मीच वाद संपवला होता हे कदाचित तुम्हाला आठन्सेसेल. ४ शब्दांमागे तुम्हाला पुर्ण ब्रह्मांडांचे अर्थ दिसायला लागले तर तो माझा दोष नाही. आणि तरीही वादही तुम्हीच वाढवत आहात तो दोष देखील माझा नाही. बाकी शुभेच्छा. अशा फालतू चर्चांमधे मला काडीमात्र स्वारस्य नाही. मला तर कधीच नव्हता, तुम्ही फालतू आरोप करुन काड्या सारल्या नसत्या तर उगा कळफलक बडवायला लागलाच नसता. असल्या चर्चा करायला मला स्वारस्यही नाही आणि वेळ तर नाहिच नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

असेच म्हणतो. संदीप डांगे सरांच्या लिखाणाला अप्पर ऐवजी लोवर लिमिट असावी बहुधा.

अजुन २ महिन्यांनी हेडली जेव्हा "मी दबावाखाली असे (खोटे) विधान केले होते आणि असे (खोटे) विधान करण्यासाठी माझ्यावर भारतीय सरकारकडुन दबाव आला होता (डायरेक्टली अँड / ऑर इनडायरेक्टली)" असे म्हणेल तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया कश्या असतील?

In reply to by मृत्युन्जय

काही दिवसांनी पाक , आयएसआय सुद्धा रॉ एजेंट असल्याचे बोंबलत फिरेल ह्याची गारंटी आहेच! तस्मात् ही शक्यता विचारात घ्यायला हरकत नसावी असे सुचवतो :D :D