Skip to main content

रोहीत वेमुला

लेखक shvinayakruti
सोमवार, 18/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली जाते, का ? तर दलित आहे म्हणून दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ? दलित आहेत म्हणून हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर तो आदिवासी आहे म्हणून म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला गेला असं म्हणता येणार नाही.

वाचने 25747
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? इथे संपूर्ण बातमी वाचा उगाच पराचा कावळा करतात , ह्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे शिका आणि स्वावलंबी व्हा हे सोडून याकुब मेनन च्या फाशीवर राजकारण करतात. आंबेडकर आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढले ह्यांनी त्यांचे अनुयायी आत्महत्या करतात. ह्या पत्रातून स्पष्ट कळून येते की टिपिकल आत्महत्या करण्याच्या अगोदर जे सामान्यतः लोकांचे विस्कटलेले विचार असतात .सैर भैर मानसिकता असते तशी ह्या तरुणाची होती , त्याने पत्रात लिहिले आहे माझ्या मृत्यूचे राजकारण करू नका पण टाळू वरील लोणी खाणार्या लोकांना धीर कुठे आहे आयती संधी चालून आली करा लेकहो राजकारण

पाच सहा दिवस मोगा यांचा गोंधळ चालू होता. त्याला विरोध करण्यासाठी मी धागा काढला तर दोन्ही धागे थोड्याच वेळात उडवले गेले. आज ही कोणतीतरी व्यक्ति पुन्हा धागा काढते. जाऊ दे लवकरच कळेल कोणाचा दुआईडी आहे.

प्रत्येक गावात /शहरात काही वजनदार व्यक्ती राजकारण करतात.यांच्याविरुद्ध आवाज उठवणं केवळ अशक्य होतं परंतू आता सोशल मिडिया-इंटरनेटमुळे वाचा फुटु लागली इतकेच.

मायावतींविरुद्ध भ्रष्टाचाराचे अारोप केले गेले तेव्हा त्यांनी 'दलित की बेटी ' असा शब्दप्रयोग केला होता त्याची आठवण झाली. शीतल साठेंच्या प्रकरणात - त्या आणि त्यांचे पती हे नक्षलवादी चळवळीमधून संबंधित होते आणि आपल्या कबीर कला मंच (चूभूद्याघ्या) या संस्थेचा वापर विद्यार्थ्यांमध्ये नक्षली विचारांचा प्रसार करण्यासाठी करत होते. त्यामुळे त्यांना अटकही झाली आणि सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत, जो त्यांना जात, धर्म, लिंग वगैरे कशाच्याही आधारावर मिळालेला नाही. नक्षलवादी संघटना आणि त्यांचे विचार हे सरळसरळ देशविरोधी आणि घटनाविरोधी आहेत. त्यांचा प्रचार करायचा आणि अंगाशी आलं की हमखास यशस्वी ठरणारं जातीय कार्ड वापरायचं हे आता मिपावरही सुरु होणार असेल तर ते वेळीच ठेचलं पाहिजे. नाहीतर जिथे खरोखरच दलितांवर अन्याय होत असेल अशा प्रकरणांच्या बाबतीतही अशा खोटारड्या लोकांमुळे लांडगा आला रे आला अशी गत होण्याची शक्यता आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तर या मुलाचा मोठाच प्राॅब्लेम होता. त्याच्यासह एकूण ५ जणांना विद्यापिठातल्या एका विद्यार्थी नेत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरुन निलंबित करण्यात आलं होतं, ते पण गेल्या वर्षी. तेव्हा त्याची बातमी वाचल्याचं आठवत नाही. आता मारहाण केल्याबद्दल खरं तर सत्कारच करायला हवा पण ठीक आहे. त्याने आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरु नये अशी मागणी केलेली आहे. म्हणजे शिस्तभंग तर करायचा पण कारवाई केली तर त्याविरूद्ध दलितविरोधी म्हणून आरडाओरडा करायचा असा प्रकार दिसतो आहे. अशाने ख-याखु-या दलितविरोधी कारवाया ज्या सूडबुद्धी आणि आकसाने केल्या जातात त्यांच्याकडे लक्षच न जाण्याचा आणि लांडगा आला रे आला च्या गोष्टीसारखं होण्याचा धोका आहे. रोहित वेमुलाला जर जाणीवपूर्वक target केलं असेल तर गोष्ट वेगळी पण त्याने मारहाण केल्याचा आरोप होता, जो गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. जर एखाद्याला आपल्याविरुद्ध झालेली कारवाई ही आकसापोटी झालेली आहे किंवा त्यात जातीचा मुद्दा आहे असा संशय आला तर तो कोर्टात जाऊन दाद मागू शकतो, पण जर राजकारण करुन धुरळा उडवून लोकांची दिशाभूलच करायची असेल, तर मग असल्या गोष्टी होतात.

In reply to by बोका-ए-आझम

मारहाण वगैरे "दबंगई" करणारा अन तथाकथित कायदा ज्याच्याबाजुने आहे (दलितविरोधी म्हणून आरडाओरडा फॅक्टर) असा विद्यार्थी सुसाइड करू शकेल ? ही एक शंका मनात आली, की त्याने दबंगई केली म्हणुन रिएक्शन म्हणुन त्याला इंस्टिट्यूशनल त्रास दिला गेला हा फॅक्टर असू शकेल? बातमी संकलन किंवा संदर्भ तर माहितगार साहेबांनी सुद्धा दिले आहेत, मागच्या दशकभराचा यूनिवर्सिटी रेकॉर्ड अन एकंदरित मी पाहिलेले तेलंगाना मधील आयुष्य हे काहीतरी वेगळे चित्र देते आहे, अर्थात ते तसेच असले पाहिजे असा काही माझा आग्रह नाही बस काही कंट्राडिक्टरी शक्यता तपासतोय इतकेच म्हणतो, तुम्ही म्हणल्या प्रमाणे हा "लांडगा आला रे आला" मधे दबलेला एखादा जेन्युइन इशू असू शकेल का? तुम्हाला काय वाटते ते सांगा! (एकंदरित तुमच्याशी चर्चा होऊ शकते ह्या विश्वासाने मुद्दे मांडले आहेत)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

इथे मुद्दा एका माणसाच्या आत्महत्येचा आहे. त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केलीय हे अजून गुलदस्त्यातच आहे, कारण त्याने आपल्या suicide note मध्ये याबद्दल कोणीही जबाबदार नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच्या आधीच्या परिस्थिती आणि मन:स्थितीवरुन लोक असा निष्कर्ष काढून मोकळे झालेले आहेत की त्याने शिष्यवृत्ती थांबवल्यामुळे आणि इतर आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केली आणि भाजप मंत्री आणि आमदार यातर २०१४ पासून favorite punching bags आहेतच. आणि आत्महत्या, मग ती कुणाचीही असो, दुर्दैवीच असते. अशा वेळी त्याच्या दलित असण्याचा उल्लेख करण्याची काय गरज होती हेच कळत नाही. याच्यामागे धुरळा उडवण्याखेरीज दुसरा हेतू दिसून येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

त्याची स्कॉलरशिप थांबवली होती असा काहीतरी लोक त्याच्या पत्रावरून निष्कर्ष काढतायत. पण ती तर पेंडिंग होती असं दिसतंय. २ वर्षांपासून सगळ्या सरकारी स्कॉलरशिप्स डायरेक्ट बॅंक ट्रांसफरने येत आहेत आणि वर्षभर विलम्ब हा जवळपास प्रत्येकाच्या बाबतीत होत आहे. त्यात विद्यापीठाचा संबंध नाही. आधी जेव्हा होता, तेव्हा ३ वर्ष वगैरे लागायची. पण आता त्यातल्यात्यात बरी आहे परिस्थिती. त्यामुळे त्याची स्कॉलरशिप विद्यापीठाने थांबवली यात काही तथ्य नसावे. अशी स्कॉलरशिप कुणी थांबवू शकत नाही.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या या बातमीनुसार हैदराबाद विद्यापिठात (उस्मानिया नव्हे) गेल्या दहा वर्षा ९ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे विश्लेषण कसे करावे माहित नाही. लहानवयातील मुलांसाठी स्थानिक पालक अशी काही कल्पना राबवता येऊ शकते पण विद्यापिठातले पोस्टग्रॅज्युएशन + विद्यार्थी यांच्या मानसिक (आर्थिक आधार तर शिष्यवृत्तीतून दिला जातोच) आधारासाठी स्थानिक प्रशासनातील दलित+दलितेतर उच्चपदस्थ काही पुढाकार घेतील तर काही फरक पडेल का ?

In reply to by माहितगार

या ९ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या इतका गवगवा झाल्याचे ऐकले नव्हते. मे २००४ ते मे २०१४ या काळात भारतात व आंध्रप्रदेशात कॉंग्रेसचेच सरकार होते त्यामुळे गवगवा झाला नसावा. आता मात्र प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपून ढेकर देणारे केजरीवाल, राहुल इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार रिंगणात उतरलेले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला सगळीकदे कोन्ग्रेस्स कसे दिसते? मुघल आहात ? त्यांना धनाजी आणि तुम्हाला कॉंग्रेस. बॅंदारू दत्तात्रेय यांचा हस्तक्षेप आणि इराणी यांच्या ministry ची पत्रे माहिती आहेत ना? ते कॉंग्रेसचे आहेत का?

In reply to by खंडेराव

अहो या विद्यापीठात गेल्या १० वर्षात रोहीत धरून ९ दलित मुलांनी आत्महत्या केल्याचे अनेक बातम्यात लिहिले आहे. याआधी झालेल्या ८ आत्महत्यांची कोठे कोपर्‍यात सुद्धा बातमी आलेली दिसली नाही. यावेळी मात्र काँग्रेस अगदी तावातावाने थेट दोषारोप करायला लागली आहे. प्रश्न हा आहे की आधीच्या ८ आत्महत्यांच्या वेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सलग १० वर्षे सरकार असताना ही मंडळी का गप्प होती?

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दाम करताय असे, कि तुम्हाला खरच कळाले नाहीये? कोन्ग्रेस्सचे मन्त्री अशी पत्रे लिहायचे, पोरे विद्यापिठातुन काढा म्हणुन? शिक्शनमन्त्री हे धन्दे करायचे?

In reply to by खंडेराव

गुरुजींवर आरोप करण्याआधी जरा विचार करा काय बोलताय त्याचा. काँग्रेसच्या काळातही असल्या गोष्टी झाल्या पण मिडियामध्ये बातमी आली नाही याचा अर्थ काँग्रेसवाल्यांनी असल्या गोष्टी केल्या नाहीत असं थोडंच आहे? तुम्ही लगेच काँग्रेसला क्लीन चिट देऊन मोकळे झालात. तुम्हाला सांगून करतात वाटतं ते या सगळ्या गोष्टी? आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायला केजरीवाल आणि काँग्रेस पुढे येतात यात चुकीचं काय आहे? केजरीवालांच्या दिल्लीतील सभेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हाचं केजरीवालांचं वर्तन पाहिलंत तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते समजेल. कुणीही आत्महत्या केल्यावर भाजप सरकारच्या नावाने गळे काढणं हे आता मिपावर पण सुरु झालेलं दिसतंय. ग्लिसरीनची घाऊक फॅक्टरी काढलीय सगळ्या केजरुच्या अाणि पप्पूच्या गुलामांनी!

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. सध्या देशात असे कोठेही काही झाले तरी सगळ्यात आधी प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपायला आणि मोदींना शिव्या द्यायला केजरीवाल आणि राहुल धावतधावत येतात. अर्थात माल्डातला हिंसाचार किंवा पठाणकोट अशा ठिकाणी जायला त्यांना अजिबात वेळ नसतो.

In reply to by माहितगार

माहितगार साहेब मद्रास आय आय टी मध्ये २०१५ ऑक्टोबर च्या एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस कोणी राजकारणी तेथे पोहोचला नाही कारण त्यातील एकही दलित नव्हता. म्हणजे त्यात कोणता मतांचा किंवा राजकारणाचा फायदा दिसत नव्हता. वर म्हटल्याप्रमाणे गेल्या १० वर्षात ९ मुलांनी आत्महत्या केल्या त्यातील ८ आत्महत्यांच्या वेळेस कॉंग्रेसचे सरकार होते. त्या साडे आठ वर्षात कॉंग्रेस सरकारला असे वाटले नाही कि आपण दलितांसाठी काही करावे?तेंव्हा जर भाजपचे किंवा चंद्राबाबू नायडूंचे लोक राजकारण करायला पोहोचले असते तर या लोकानी दलितांच्या वेदनांचे राजकारण करतात म्हणून टाहो फोडला असता. आता एकदम कसा उमाळा आला? राजीव गांधी किंवा श्री केजरीवाल यांना पठाणकोटला किंवा तेथे हुतात्मा झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या घरी जावेसे वाटले नाही पण हैदराबादला मात्र ते लगेच पोहोचले. राजकारणी आपल्या साठी काय करत आहेत किंवा करणार आहेत हे सर्वसामान्य जनतेला समजेल तो सुदिन. जनतेचा उद्धार करता करता स्वतःचा उद्धार करतो तो राजकारणी हे साधे सरळ गणित लोकांना समजत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. एखाद्या तरुण माणसाने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे मी स्वतः चौकशी आयोगाचा सदस्य म्हणून आणि मनोविकार शास्त्रात काम करतानाहि प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे अशा आत्महत्यांचे राजकारण करणाऱ्या माणसांची मला मनापासून चीड येते. अर्थात आमच्यासारख्यांचा संताप नपुंसक असतो हेही माहिती आहे.

त्या मुलांची काहीतरी आंबेडकर स्डुडंट्स असोशिएशन होती.आणि त्यांनी याकुब मेमन फाशी प्रकरणावरून विरोध केला म्हणजे याकुबच्या फाशीला विरोध केला होता.तसेच 'मुजफ्फरनगर अभी बाकि है' अशी फिल्म होती म्हणे, फिल्मला विरोध करण्यार्या विरूद्ध आवाज उठवला होता.म्हणजे एकंदरीतच मुसलानांवर होणार्या अन्यायाबद्दल(त्यांच्या दृष्टीने) त्यांचे काम चालू होते,किंवा इतर बरेच काही. त्यामुळे युनिवर्सिटीमध्ये ही मुले देशविरोधी कार्य करत आहेत म्हणून बंडारू दत्तात्रेय(केंद्रीय कामगार मंत्री) यांनी स्मृती ईरानींना पत्र लिहले.एका स्थानिक नेत्यानेही पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मग कुलगूरूंनी समिती वगैरे स्थापून मुलांना निलंबित केले. माझे मत - ते विद्यार्थी दलित आहेत हा केवळ योगायोग आहे,दुसरे कोणी दलितेतर/मुस्लिमेतर विद्यार्थी असते तर एवढे राजकारण झाले नसते. . . अवांतर-बाकि मानव संसाधन/शिक्षण मंत्री या पदावर अयोग्य व्यक्ती आहे हे ही तितकेच खरे आहे,हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्रदीप साळुंखे

अगदी हि आत्महत्या होण्यापुर्वी हैदराबाद विद्यापिठात आत्महत्या झाल्या आहेत एवढेच नाही हैदराबादच्या उच्चन्यायालयाने सुमोटो म्हणजे स्वतःहून ह्याची दखल घेतली आणि विद्यापिठास सूचना केल्या असे जुन्या ऑनलाईन बातम्यांमधून दिसते. या आत्महत्यांच्या कारणांच्या मागे जाण्याचा एक चांगला प्रयत्न तेथिल सॉलिडॅरिटी नावाच्या एका न्युट्रलचमूने करुन हा एक उल्लेखनीय अहवालही (हा पिडीएफ अहवाल सर्वांनी जरूर वाचावा - प्रा.डॉ. सरांनी अहवालात महाराष्ट्रा संबंधाने काहीच नसले तरीही शैक्षणिक क्षेत्रातल्या एका नाजुक गोष्टीबद्दलचा अहवाल म्हणून दखल घ्यावी असे वाटते.) विद्यापीठास सादर केला होता असे दिसते. तरीही दुर्दैवाने हैदराबाद विद्यापीठासमोर अजून एका अत्महत्येचे भूत समोर येऊन उभे राहीले असे दिसते. इतर संदर्भ , ,

In reply to by कपिलमुनी

म्हैती नै ब्वॉ. मी तर कॉलेज मध्ये अभ्यास करतात असंच समजत होतो. बाकी आमच्या कॉलेज मध्ये पण असे धंदे करणारे लोक होते. पण ते बड्या बापाचे मुलगे कॉलेज मध्ये फक्त टाईम्पास करायला यायचे. लोकांना आत्महत्या करायला लावणारे. हे असं कर्जावू पैसे घेवून रिसर्च करायला येवून असे धंदे करणारे मी तर कधी पाहिले नाहीत. बाकी ब्रिटिश काळ वेगळा होता. विद्यापिठाकडूनच स्कॉलरशिप घेवून त्या पैशात रिसर्च करायचं सोडून एका बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या गुन्हेगाराच्या बाजूने प्रदर्शनं करणे, एका विरूद्ध विचारांच्या विद्यार्थ्याला मारहाण करणे असले आरोप यांच्यावर आहेत. यांची क्रांतीकारकांबरोबर बरोबरी करताय तुम्ही? आणि वर आत्महत्या ग्रँट थांबवल्यावर! काय चाल्लंय काय!! विद्यापीठानं काय सत्कार करायला हवा होता काय असले धंदे केल्याबद्दल?

In reply to by प्रदीप साळुंखे

नाशिकचा मुलीचा एकतर्फी खून , कोल्हापूरच ओनर किलींग यात कुणाला कळवळा आला नाही . धागा आला नाही कारण मरणारे दलीत किंवा मुस्लीम नव्हते

In reply to by कपिलमुनी

खरं सांगायचं तर बातमीपुढे दलीत, अल्पसंख्यांक असं लिहिलं कि कैवारी असल्याचा आव आणता येतो. "ओपन" कॅटेगरीतल्या लोकांवर अत्याचार म्हणजे अत्याचार नसतातच. त्यामुळे मिडीया काय किंवा मिपा काय अश्या घटनांवर धागे येणं दुरापास्तच.

In reply to by वेल्लाभट

प्रकरण मुळात लेखकाने वाचलेलेच दिसत नाही. देवा सगळ कर पण आधी अश्या धागा पिसाटांना फक्त अक्षर ओळख नको तर नीट आणि नेटके ( नेट वरचे नाही) वाचायला ( आणि समजायला) शिकव रे बाबा ! पाहिजे तर त्या करिता आरक्षण ठेव पण मिपाकरांचे रक्षण कर !!!! गेल्या आठवड्यातील "शिळ्या कढीला उत" वाले धाग्यांनी कावलेला नाखु अति अवांतर : सवंग लोकप्रियतेची आवर्तने मिपावर दर २-३ वर्षात येत असावीत असा जाणकारांचा अंदाज आहे. मिपासाहीत्य काल परवा आज उद्या आणि तेरवा मिपाबाह्य टीकाकरांच्या समीक्षेतील एक संतवचन

In reply to by नाखु

सगळ कर पण आधी अश्या धागा पिसाटांना फक्त अक्षर ओळख नको तर नीट आणि नेटके ( नेट वरचे नाही) वाचायला ( आणि समजायला) शिकव रे बाबा ! पाहिजे तर त्या करिता आरक्षण ठेव पण मिपाकरांचे रक्षण कर !!!!
सहमत

आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
आयआयटीने आपल्या संकेतस्थळावरील एक पान या संघटनेला वापरण्यासाठी दिले होते. अभ्यास, संशोधन इ. साठी संकेतस्थळ वापरले जावे असाच त्यामागे उद्देश होता. ते करण्याऐवजी या संघटनेने गोवंशबंदी विरोधाला विरोध (ही बंदी तामिळनाडूत नसून महाराष्ट्रात आली होती. पण आयआयटी तामिळनाडूत असताना सुद्धा यांनी विरोध सुरू केला), देशात आणिबाणी येउ घातली आहे अशा तर्‍हेचे निव्वळ राजकीय लेखन त्या पानावर करायला सुरूवात केली. संकेतस्थळाचा वापर राजकीय लेखन करण्यासाठी सुरू झाल्याने आयआयटीने या संघटनेला संकेतस्थळावरील पानावर लेखन करण्यास बंदी घातली होती. पूर्ण संघटनेवर बंदी घातली हा तद्दन खोटा प्रचार आहे. आयआयटीत अभ्यासाचा प्रचंड भार असतो. विद्यार्थी दिवसरात्र मान मोडून अभ्यास व संशोधन करीत असतात. त्यामुळे आयआयटीतील विद्यार्थ्यांनी अशा राजकीय मुद्द्यांवर वेळ घालविणे योग्य वाटत नाही. तसेच जे संकेतस्थळ शैक्षणिक कारणासाठी वापरावे अशी अपेक्षा आहे, ते राजकीय कारणांसाठी वापरणे सुद्धा चुकीचे वाटते.

काल सकाळपासून यावर वाचतेय. यासंदर्भात चळवळीत ऍक्टिव असणाऱ्या मैत्रिणी प्रत्येक बातमी शेयर करत चालल्यायत. त्यांनी शेयर केलेल्या पोस्ट्स वरून काही प्रोफाइल्स वर पोचले आणि काल दिवसभर हे राजकारण दोन्ही बाजूंनी किती विखारी आहे त्याची झलक दिसली. एक जीव गेला, त्याचं अक्षरश: कुणाला काही देणंघेणं नाही. मृत्यूनंतर काही तास लोटले नव्हते, तेवढ्यात त्याचं पत्र व्हायरल झालं होतं. अनेक ठिकाणी प्रोटेस्ट सुरू झाले होते. त्यावरचे काहीही संवेदना नसणारे शब्दांचे बुडबुडे अपेक्षित विद्यापीठांच्या संघटनांकडून आलेच. किती, किती एखाद्या मृत्यूचा फायदा करून घ्यायची चढ़ाओढ़..असो..

म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
यातल्या मुसलमान आहे म्हणून वगळता बाकी सगळ्याबद्दल वाईट वाटतंय. काये ना मुसलमान आहे म्हणून नख लागलं तर गावभर बभ्रा होतो आणि हिंदू आहे म्हणून कोणी ओरबाडून नेलं तरी कुत्रंदेखील विचारत नाही.

लिहिणार्‍या बर्‍याच मिपा कारांना हे प्रकरण नीट माहीत नाही असे दिसतेय. 1) आंध्रा मधे महाराष्ट्रपेक्षा जातीय दरी जास्त खोल आहे. विद्यापीठात अजूनही जास्त. गेल्या काही वर्षात 9 विद्यार्थांनी आत्महत्त्या केलीय या सगळ्यात. 2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली विश्वविद्यालयात अभविप कार्यकर्त्यांनी, मुझफ्फरनगर बाकी है या डोक्‍यू सिनेमाचे आयोजन करणार्‍या मॉंतेज फिल्म सोसायटी च्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या विरोधात ASA आणि इतर विद्यार्थी संघटनांनी हैदराबाद विद्यापीठात मोर्चा काढाला . सुशीक्ल कुमार, जो अभविपचा नेता आहे, त्याने फेसबुकवर ASA विद्यार्थ्यांना गुंड असे संबोधले. त्याचा जाब विचारला गेला असता त्याने माफीनामा लिहून दिला. यावेळी विद्यापीठ सुरक्षा समितीचे मुख्य उपस्थित होते. दुसर्या दिवशी, सुशील कुमार रुग्णालयात भरती झाला. त्याने आरोप केला की 30-40 लोकांनी त्याला मारहाण केली. 3) विद्यापीठाच्या proctorial board या घटनेची शहानिशा केली. त्यांचा अहवाल असे म्हणतो - The board could not get any hard evidence of beating of Mr. Susheel kumar either from Mr Krishna Chaitanya or from the reports submitted by Dr. Anupama. Dr. Anupama’s reports also could not link or suggest that the surgery of the Susheel Kumar is the direct result of the beating.” 4) यानंतर जो फायनल रिपोर्ट आला त्यात रोहित आणि इतर चार विद्यार्थ्यांना दोषी मानून विद्यापीथातून suspend करण्यात आले. या रिपोर्ट च्या विरोधात विद्यार्थी कुलगुरू शर्मा याना भेटले. त्यांनी suspension काढले आणि सांगितले की एक नवीन समिती या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल. 5) तेवढ्यात आपाराव हे नवीन vc आले. त्यांनी या विद्यार्थांना कुठलीही चौकशी न करता, suspend केले. 6) यात बॅंदारू दत्तात्रेया यांचा काय संबध? त्यांनी स्मृती इराणी यांना पत्र लिहिले की ASA विद्यार्थ्यांवर कार्यवाही व्हाही. हे पत्र HRD मंत्रालयाने वियायपी तक्रार असा शेरा देऊन विद्यापीठाला पाठवले. पुढील काही दिवसात, मन्तरलायाकडून केलेल्या कारवाईची माहिती पाठवा अशी 2 पत्रे व 4 email विद्यापीठाला पाठविली. 6) यानंतर विद्यापीठ प्रशासनाने रोहित आणि इतर चार विद्यार्थी यांना जवळ जवळ वाळीत टाकले. ही मुले विद्यापीठासमोर मोकळ्या जागेत तंबू टाकून रहात होती.

In reply to by खंडेराव

असं काही नसतं हो ! "ते" उगाच दलित कार्ड खेळतात!! ही लाइन फिक्स!! बाकी काही नाही विषय संबंधित अवांतर वरती काही कॉमेंट्स मधे ओपन केटेगरी सोबत काही झाल्यास आरडाओरडा होत नाही असा काहीसा सुर लागला, किती ओपन केटेगरी वर झालेल्या गुन्ह्यात आरोपी हे दलित असतात अन दलित हत्यांमधे किती ओपन केटेगरीचे आरोपी असतात हे मागील काही वर्षांचे आकड़े पाहून स्पष्ट व्हावे (सद्धया हाती आकड़े नाहीत क्षमस्व) अर्थात बीजेपी सत्तेत आल्यापासुन विरोधी गटाला सुद्धा एक वेगळाच विखार चढलेला स्पष्ट दिसतो आहे हे मागील काही दिवसातल्या तथाकथित लिबरल्स मुळे स्पष्ट होतेच आहे तरीही ह्या तथाकथित लिबरल्स अन उजव्यांच्या साठमारीत कोण्या एका खरेच जातिभेदाचा विखार सोसणाऱ्या मग तो दलित असो वा सवर्ण सोबत अन्याय होऊ नये हेच वाटते

In reply to by खंडेराव

2) ऑगस्ट 2015 मधे दिल्ली विश्वविद्यालयात अभविप कार्यकर्त्यांनी, मुझफ्फरनगर बाकी है या डोक्‍यू सिनेमाचे आयोजन करणार्‍या मॉंतेज फिल्म सोसायटी च्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्या विरोधात ASA आणि इतर विद्यार्थी संघटनांनी हैदराबाद विद्यापीठात मोर्चा काढाला . सुशीक्ल कुमार, जो अभविपचा नेता आहे, त्याने फेसबुकवर ASA विद्यार्थ्यांना गुंड असे संबोधले. त्याचा जाब विचारला गेला असता त्याने माफीनामा लिहून दिला. यावेळी विद्यापीठ सुरक्षा समितीचे मुख्य उपस्थित होते. दुसर्या दिवशी, सुशील कुमार रुग्णालयात भरती झाला. त्याने आरोप केला की 30-40 लोकांनी त्याला मारहाण केली.
यात अजून बरेच आहे. या डॉक्युमेंटरीच्या आधी याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधात रोहीत व ASA च्या इतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करून "तुम्ही जितक्या याकूबना फाशी द्याल, तितके प्रत्येक घरातून नवीन याकूब तयार होतील" अशा अर्थाचे प्रक्षोभक विधान केले होते. त्यानंतर अभाविप व ASA च्या विद्यार्थ्यांची मारामारी झाली होती. आजच एका वाहिनीवर रोहीतची एक चित्रफीत दाखवित होते. विद्यापीठात अभाविपने लावलेले बॅनर्स रोहीत व त्याच्या सहकार्‍यांनी फाडून टाकल्यावर अभाविपचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेल्यावर तो म्हणाला की "जे जे हिंदू, अभाविप, भगवे असे आहे ते ते मी फाडून टाकणार". यावर "का फाडणार?" असे विचारल्यावर "माझी मर्जी" असे त्याने उत्तर दिले होते. हे सर्व या चित्रफीतीत आहे. रोहीतची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु तो विद्यापीठात राहून अभाविप/हिंदू विरोधी राजकारणात सक्रीय असावा असे दिसते. विद्यार्थ्यांनी कोणत्याच राजकीय संघटनेच्या मागे न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे असे माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

चित्रफित कुठे आली? लिन्क द्यावी.
त्यानंतर अभाविप व ASA च्या विद्यार्थ्यांची मारामारी झाली होती.
मारामारी झाली का? मग अभाविपच्या एकाही विद्यार्थ्यावर का कारवाइ झाली नाही? ते अभाविपचे आहेत म्हनुन?
रोहीतची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु तो विद्यापीठात राहून अभाविप/हिंदू विरोधी राजकारणात सक्रीय असावा असे दिसते.
हे धन्दे बन्द करा हो. मी हिन्दु आहे. या अभाविप वाल्याना कोणी ठेका दिलाय हिन्दुन्चा? मी नाही. अभाविपला विरोध म्हनजे हिन्दु विरोध मानने हे डोक्यावर पडल्याचे लक्शन आहे. आनि काय हिन्दु विरोध होता हे विस्कटुन सान्गा जरा.

In reply to by खंडेराव

(१) चित्रफीत एनडीटीव्ही/आजतक/झी न्यूज यापैकी एका हिंदी वाहिनीवर संध्याकाळी ६:३० च्या सुमाराला दाखविली होती. त्याची लिंक मिळाल्यास देतो. (२) ही झटापट डॉक्युमेंटरी दाखविण्याच्या वेळी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंपैकी कोणावरही कारवाई झाली नव्हती. नंतर सुशीलकुमारने फेसबुकवर कॉमेंट टाकल्यावर रोहीत व इतरांनी त्याला त्याच्या खोलीत मारहाण केली असा आरोप आहे. (३) अभाविपवाल्यांनी कोणीच हिंदुंचा ठेका दिलेला नाही. त्यांना विरोध म्हणजे हिंदु विरोध असा अर्थ नाही. जे जे हिंदु, भगवे, अभाविपचे आहे ते ते मी फाडणार असे त्या चित्रफितीत रोहीतच म्हणताना दिसतो. त्यावर का असे विचारल्यावर माझी मर्जी असे तो उत्तर देतो.

In reply to by श्रीगुरुजी

स्त्रोत चुकिचे आहेत. १) मीही शोधतो. २) नाही. डॉक्युमेंटरी दिल्लीत दाखवली होती. ३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे
जे जे हिंदु, भगवे,
हे मानने कठीण आहे.

In reply to by खंडेराव

चित्रफीत मी ही पाहिली आहे. यूट्यूब वर ती तेलुगू मध्ये आहे. आज रात्री पर्यंत झी किंवा एबीपी ट्रान्स्लेटेड टेक्स्टसकट यूट्यूब वर अपलोड करतीलच. लगेच लिंक पाठवेन.

In reply to by खंडेराव

ही घ्या: https://www.youtube.com/watch?v=GkWtVVC6sm4 अर्थात एक गोष्ट ही लिंक पहाताना जाणवते. ती ही, की या माणसाला मनोविकारतज्ञाची आवश्यकता होती. जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता, तर अशी उत्तरे देणं हा कदाचित एका दुबळ्या आणि अस्वस्थ माणसाचा रिव्होल्ट चा प्रयत्न असावा. ही लिंक पहाताना त्याच्याबद्दल हिंदूंबद्दल असं बोलत असताना सुद्धा राग येण्याऐवजी वाईट वाटत राहतं.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड. १) झी न्युझ बद्दल प्रतिमा, ते भाजपच्या दावणीला बान्धलेली **** आहेत अशी होती, आणि ते लगेचच रोहित हा वेडा कसा आहे हे दाखवायला सक्रिय झाले असणार ( रात्री साहेबचा फोन आला असेल परवा) अशी अपेक्शा ही होती. २) हे घ्या भाषाण्तर..झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले. ३) टwo or three ABVP members (off camera) are confronting Rohith about why he tore down the ABVP banner (during campaigning for student elections, I'm assuming). Rohith says, "[inaudible phrases] could see. If Hindutva, or Hindus, or using the Hindu name, anyone coming onto minorities, or onto Dalits, if I see them, I will..." ABVP guys interject, "Hello. Why did you tear the banner? Why?" One of the ABVP guy says, "I'm a Dalit. You tell me, why did you tear the banner down?" Another ABVP guy says, "Did you tear the banner?" Rohith replies, "Yes, I tore it." The ABVP guy asks, "Why did you tear it?" Rohith replies, "I saw it. I tore it down. I saw ABVP I tore it down." Rohith continues, "I got angry, and tore it down." The ABVP guys say, "You tore it down because you saw us in its vicinity." Rohith replies, "It has nothing to do with you. I saw the saffron banner and tore it down." Rohith continues, "I saw the saffron color. I saw the Hindutva color. I saw the RSS color. I tore it down." The Dalit ABVP guy asks, "Tomorrow morning (during daily rituals), even in your house, it will have saffron colors. Will you tear it down too?" Rohith replies, "Yes, I will tear it down in my house." The Dalit ABVP guy continues, "Saris will be there (in saffron color), will you tear them?" Rohith replies, "In my house, I will tear them down." The Dalit ABVP guy reiterates, "(Saffron) saris will be there, will you tear them down?" Rohith replies, "Yes, yes. I will tear it down." The other ABVP guy says to the Dalit ABVP guy, "He says he'll tear it down. Why are we having this pointless conversation with him." Rohith interjects, "In my house, I'll tear them down." One ABVP guy to another, "Ok, Ok. Let him be." ABVP guy tells Rohith, "Whatever you didn't like, you tore it down. If we tear down what we don't like, not one (banner) will remain. Understand?" Rohith nods and replies, "Tear it down, tear it down." One ABVP guy to another, "Hey, don't tear (any banners)." Another ABVP guy continues with Rohith, "We don't have the need to tear them down. We put up our banners without making any inconvenient fuss." One ABVP guy to another, "This man doesn't have any common sense," referring to Rohith. The other ABVP guy says to Rohith, "Ok, so you, you said you'll see, right. Ok, fine. Go. We shall see." 4) आणि आता, अवान्तर -
" अर्थात एक गोष्ट ही लिंक पहाताना जाणवते. ती ही, की या माणसाला मनोविकारतज्ञाची आवश्यकता होती. जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता, तर अशी उत्तरे देणं हा कदाचित एका दुबळ्या आणि अस्वस्थ माणसाचा रिव्होल्ट चा प्रयत्न असावा. ही लिंक पहाताना त्याच्याबद्दल हिंदूंबद्दल असं बोलत असताना सुद्धा राग येण्याऐवजी वाईट वाटत राहतं"
इतके सगळे जाणवले तुम्हाला भाषा न येत असताना? तुम्ही तरुण आहात/ होता कधी, भडकपणे बोलला नाहित कधी? एका २५-२६ वर्षाच्या मुलाच्या, तुम्हाला न येणार्या भाषेत घडलेल्या सम्भाषणावरुन इतके ठोकताळे? याला चरित्र खन्डन म्हणतात. Call him mad, and then kill him. 5) अति, अति अवांतर .
जर हा गरीब घरातून आणि अशा समाजातून आला होता
खरच कौतुक आहे आपले. जर हा
अशा
समाजाचा भाग असेल, तर त्याने या समाजाला फाट्यावर मारण्यात काय चुकिचे? ६) सामान्य ज्ञान - हिन्दुत्वा आणि हिन्दु असणे या वेगळ्या गोष्टी आहेत.

In reply to by खंडेराव

विद्यार्थी दशेत मुळात राजकारणात पडणार असाल तर खुशाल पडा मात्र देशात राजकारण कसे होते कोणत्या पातळीवर केले जाते ह्याचा अनुभव आला कि दोन पर्याय असतात एकतर त्यातून निवृत्त होऊन सरळमार्गी जगा. नाहीतर राजकारणात आरपार घुसा , शासन व्यवस्थेला तोंड द्या मेघां पाटकर सारखी किती उदाहरणे आहेत अजूनही झुंझत आहेत . आमच्या परिचयाचे अनेक सुशिक्षित तरुण आभासी जगतात केजू चा झेंडा घेऊन मिरवत होते पण गेल्या वर्षभरात त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली त्यांची आभसी जगातील राजकीय वाटचाल काजव्यां सारखी चमकून थंड झाली हीच गात हजारे समर्थकांची झाली , तस्मात स्वतः शिका संघटीत व्हा समाजाला आपल्या परीने चांगले परत द्या आत्महत्या हा काही उपाय नाही. अभाविप च्या नेता सुशील ने काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

In reply to by खंडेराव

रोहितचा विद्यापिठातील प्रवेश हा मेरीट थ्रु होता, आरक्शणातुन नाही.

In reply to by खंडेराव

२) हे घ्या भाषाण्तर..झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले.
जरा नीट फॉर्मॅटिंग करून हेच भाषांतर खालील प्रमाणे - टwo or three ABVP members (off camera) are confronting Rohith about why he tore down the ABVP banner (during campaigning for student elections, I'm assuming). Rohith says, "[inaudible phrases] could see. If Hindutva, or Hindus, or using the Hindu name, anyone coming onto minorities, or onto Dalits, if I see them, I will..." ABVP guys interject, "Hello. Why did you tear the banner? Why?" One of the ABVP guy says, "I'm a Dalit. You tell me, why did you tear the banner down?" Another ABVP guy says, "Did you tear the banner?" Rohith replies, "Yes, I tore it." The ABVP guy asks, "Why did you tear it?" Rohith replies, "I saw it. I tore it down. I saw ABVP I tore it down." Rohith continues, "I got angry, and tore it down." The ABVP guys say, "You tore it down because you saw us in its vicinity." Rohith replies, "It has nothing to do with you. I saw the saffron banner and tore it down." Rohith continues, "I saw the saffron color. I saw the Hindutva color. I saw the RSS color. I tore it down." The Dalit ABVP guy asks, "Tomorrow morning (during daily rituals), even in your house, it will have saffron colors. Will you tear it down too?" Rohith replies, "Yes, I will tear it down in my house." The Dalit ABVP guy continues, "Saris will be there (in saffron color), will you tear them?" Rohith replies, "In my house, I will tear them down." The Dalit ABVP guy reiterates, "(Saffron) saris will be there, will you tear them down?" Rohith replies, "Yes, yes. I will tear it down." The other ABVP guy says to the Dalit ABVP guy, "He says he'll tear it down. Why are we having this pointless conversation with him." Rohith interjects, "In my house, I'll tear them down." One ABVP guy to another, "Ok, Ok. Let him be." ABVP guy tells Rohith, "Whatever you didn't like, you tore it down. If we tear down what we don't like, not one (banner) will remain. Understand?" Rohith nods and replies, "Tear it down, tear it down." One ABVP guy to another, "Hey, don't tear (any banners)." Another ABVP guy continues with Rohith, "We don't have the need to tear them down. We put up our banners without making any inconvenient fuss." One ABVP guy to another, "This man doesn't have any common sense," referring to Rohith. The other ABVP guy says to Rohith, "Ok, so you, you said you'll see, right. Ok, fine. Go. We shall see." वरील संभाषण नीट वाचले आणि झी-न्यूज ने दाखविलेले फूटेज पाहिले तर झी ने एकही महत्त्वाचा मुद्दा गाळल्याचे दिसत नाही. संपूर्ण संभाषणात असे दिसून येते की अभाविपचे कार्यकर्ते रोहीत ने पोस्टर्स का फाडली हे विचारत आहेत. त्यांनी संपूर्ण संभाषणात एकदा सुद्धा रोहीत बद्दल वावगे शब्द उच्चारल्याचे दिसत नाही किंवा त्याला धमकी दिल्याचे दिसत नाही. याउलट रोहीतच उर्मटासारखा उत्तरे देताना दिसतो. एकंदरीत रोहीतचा हिंदू, अभाविप, भगवा रंग, संघ इ. वर प्रचंड राग दिसतो. जे जे भगवे दिसेल ते ते मी फाडून टाकीन, घरातल्या भगव्या साड्यासुद्धा मी फाडून टाकीन ... अशा उत्तरामधून काहीशी मानसिक समस्या वाटते.

In reply to by खंडेराव

३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे
आता कसं. म्हणजे तुमचं मत हे पूर्वग्रहदूषित आहे हे तुम्हीच मान्य केलंत. आता तुमच्या मतांना गंभीरपणे कसं घ्यायचं ग्लिसरीन फॅक्टरी?

In reply to by बोका-ए-आझम

त्या चित्रफितित काय आहे ते लिहिलय मी, वाचता येत असेल तर वाचा जरा. झी वाल्यांनी त्यांना पाहिजे तेच लिहिलेय..पुर्न ट्रान्सस्क्रिप्त आहे माझ्या पोस्ट मधे..

In reply to by श्रीगुरुजी

याचा अर्थ होतो, तेलुगु शिका. लिन्क चे काय करणार तुम्ही? तुमच्याकडे आहे त्या लिन्क मधले पुर्ण संवाद एखादा तेलुगु मित्र बरोबर घेउन ऐका. झी ने आख्या ५० ओळीतले एक वाक्य टाकलेय. तेलुगु मित्र नसेल तर, తెలుగు తెలుసుకోండి

In reply to by खंडेराव

त्या चित्रफीतीतलं बोलणं आहे त्याप्रमाणे तुमचं english transcript आहे. मी व्हिडिओ बघून मगच लिहितो आहे. मग .झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले. -- काय गाळलं आहे? हेच सगळं त्या झी च्या युट्युब मध्ये आहे. मग काय सोयीने गाळलं आहे. आणि transcript मध्ये मी मला पाहिजे ते करणार - जिथे रंग दिसेल तिथे फाडणार याव्यतिरिक्त काय आहे. ज्या माध्यमांना भाजपाला आरोपी करायचं आहे ते सरळ निर्णय करून मोकळे झाले आहेत. ज्यांना भाजप बद्दल पूर्ण खात्री आहे आणि अभाविप ने गुंडगिरी केली असेल यावर ज्यांना विश्वासच ठेवायचा नाहीये ते रोहितला नालायक ठरवत आहेत. माझे दोन पैसे: ABVP काही १००% सरळ नाही हे सगळ्यांनाच माहित आहे आणि ASA ने पण बरेच उद्योग केले आहेत. पण मग या अर्धवट माहितीवर सगळेजण न्यायनिवाडा करून कसे मोकळे होतात? ज्यांना दलितांबद्दल आस्था किंवा victim feeling आहे ते ताबडतोब निष्कर्ष काढून मनुवादी, बामण इ. मध्ये शिरतात, किंवा संघद्वेषामध्ये. जे कट्टर अभाविप आहेत ते एक तरूण मुलगा जिवानिशी गेला याचा विचार करायच्या आधी तो कसा नालायक होता हे सिद्ध करायला पाहतात. २. दोन विद्यार्थी संघटनांच्या भांडणात एका मुलाने आत्महत्या केली हा संपूर्ण देशाच्या वादाचा विषय का होतो? बंडारू दत्तात्रेय सिकंदराबादचे खासदार आहेत. अभाविप वाल्यांनी तक्रारी केल्या की आमच्या मुलांना मारतात, याकुब साठी प्रार्थना करतात वगैरे. वेळेला हेच त्यांचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं. पण केंद्रीय मंत्र्यांनी दोन विद्यार्थी गटातल्या भांडणासाठी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना लिहिणं हे अतिच नाही का? त्यांनी विद्यापीठ कुलगुरुंना का नाही लिहिलं. त्यांचं भाजपामधलं वजन आणि पद यामुळे केंद्रातून पत्र गेलं. एकदा समजू शकतो, पण सहा महिन्यात पाच पत्रं का? आणि गेली तर विद्यापीठाने त्याला जे काही असेल ते उत्तर का कळवलं नाही? याची स्पष्ट माहिती नाही. ३. आता राजीनामा देणारे दलित प्राध्यापक मागचे दहा वर्ष आणि त्याहून महत्त्वाचं जो एक महिना ही पाच मुलं तंबूत राह्त होती तेव्हा काय करत होते. त्यांनी कुलगुरुंची भेट घेतली का/ पत्रं लिहिली का? कारण तेव्हा अन्याय होत होता. कोणाचा जीव जाईपर्यंत भारतात कुठलीही कृती का होत नाही? ४. सुशील कुमार अभाविप कार्यकर्ता हा मारहाणीमुळे रुग्णालयात गेलाच नव्हता असा अहवाल आला आहे. खरा खोटा माहित नाही. हा भयंकर प्रकार आहे. म्हणजे तक्रार खोटी होती ज्यासाठी या मुलांना सस्पेंड केले गेले. पण त्यांचे बॅनर फाडले, हॉस्टेल मध्ये येऊन ASA ने धमक्या दिल्या हे खरे आहे. आणि कशासाठी तर सुशील कुमारने बॅनर फाडणार्‍या मुलांना फेसबुक वर Goons म्हटलं - त्यावर भांडणं झाली. गुंड म्हटलं म्हणजे शिव्या दिल्या, अपशब्द वापरले वगैरे सोयीची माहिती बर्‍याच माध्यमांनी दिली. ५. रोहित वेमुला हा पीएचडी विद्यार्थी होता. म्हणजे किमान चांगली बुद्धिमत्ता, अभ्यास अपेक्षित आहे. तरी तो इतका वेळ फक्त संघटनेचंच काम करत का होता? त्याचं फेसबुक आणि ट्विटर धक्कादायक आहे. विवेकानंदांबद्दलचे उद्गार अशक्य आहेत. त्याचबरोबर तो २६/११ च्या मृतांबद्दल तळमळीने लिहित होता. दुसरीकडे - "तुम कितने याकुब मारोगे, हर घर से याकुब निकलेंगे" असंही लिहून मोर्चा काढत होता. एकूण confusion आहे. ५. काही वेळा असं वाटतं की दलितांना victimization मधून बाहेर यायची तीव्र इच्छाच नाहीये. पण त्याच बरोबर इतर जातीय आणि दलितांना कटाक्षाने टाळणारे / बाजूला करणारे कर्मठही कमी नाहीत. आणि मिळाली संधी की कर राजकारण याचा तर वैताग नाही संताप आला आहे. डेरेक ओब्रायन, केजरीवाल, राहुल गांधी यांची कृती ही गिधाड वृत्ती आहे. एकूणात काहीतरी खराब वातावरण होतं हे तर दिसतंच आहे. एकूण अनुभवातून निराशेपोटी त्याने आत्महत्या केली. त्याचा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा करणे वगैरे अती आहे. पण आता दोन्हीही वाईट घडून गेलं आहे तर त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. जातीय विद्वेष वाढवण्यापेक्षा दलितांना समान वागणूक कशी मिळेल याचा विचार व्हायला हवा. बामसेफी भयंकर द्वेषातून देशासाठी आणि समाजासाठी काहीही साध्य होत नाही.

In reply to by खंडेराव

३) मी हि चित्रफित पाहिले नाही. आपल्यावर विश्वास ठेवने अवघड आहे ( पुर्वानुभव ) . त्यामुळे जे जे हिंदु, भगवे, हे मानने कठीण आहे.
तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. मला फरक पडत नाही.

In reply to by खंडेराव

1) आंध्रा मधे महाराष्ट्रपेक्षा जातीय दरी जास्त खोल आहे. विद्यापीठात अजूनही जास्त. गेल्या काही वर्षात 9 विद्यार्थांनी आत्महत्त्या केलीय या सगळ्यात.
आंध्रप्रदेशमध्ये १९४७ ते २०१६ या ६८ वर्षात सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हा योगायोग असावा काय? महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड जातीयवाद आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हाही योगायोग असावा काय?

In reply to by खंडेराव

जातीयवाद हा मुख्य विषय आहे आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी यत्किंचितही प्रयत्न न करता तो जिवंत राहून वाढावा व त्यामुळे आपली राजकीय पोळी भाजून घेता येईल असे ज्यांनी गेल्या ६८ वर्षात केले त्यांचे नाव घेतले तर राग कशाला मानता?

राजकारण करु नका म्हणण्यामागे आम्ही तुमच्यावर उपकार करतोय, मिळतंय ते घेऊन मुकाट बसा असा अर्थ असतो. हा जो बेमुर्वतपणा इथेही दिसतोय तो कधीही जाणार नाही. ह्या लोकांना पिढ्यानपिढ्या अपमान सहन करणे, डोल्यावरुन मैला वाहणे, देवदासी म्हणून भोगदासी होणे, पारधी होऊन रानोमाळ भटकणे म्हणजे काय हे कधीही कळणार नाही. तेवढी त्यांची बौद्धिक कुवतच नाही. उच्चवर्णियांनी हजारो वर्षे छळ केलेला चालतो पण आता खालचा एखादा माणूस त्रासदायक झाला तर लगेच सरसकटीकरण करून पुन्हा गळचेपी करायला एका पायावर तयार. हेच लोक परत भारत सहिष्णु आहे म्हणून बोंबा मारायला पुढे. =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राजकारण कोणाही विद्यार्थ्याने करायला नको. अभाविपनेसुद्धा नाही. पण बर्‍याच लोकांचा सूर तसा नसतो. याकूब मेमनची बाजू घेणे पटत नसेल तरीही त्यांना तो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. तो हक्क दडपशाही करुन मारता कामा नये. वर कोल्हापूरच्या ऑनर-किलींगचा उल्लेख आला आहे. त्यात मारणारेही सवर्ण आणि मरणारेही सवर्ण. आपल्या जातीचा अभिमान बाळगणार्‍यांनाच त्याची झळ पोचायला लागली आहे. त्याचा ठपका इतरांवर ठेवून काहीही होणार नाही.

In reply to by नगरीनिरंजन

++११११११ "राजकारण कुठल्याही विद्यार्थ्याने करू नये अगदी एबीव्हीपी ने सुद्धा" +१११११११

In reply to by नगरीनिरंजन

ननि, तुम्ही लोकशाहीचा हक्क म्हणता तर मग सोबत कर्तव्येही येणारंच. आत्महत्या करणे हे कुठल्या कर्तव्यात बसते? आ.न., -गा.पै.

In reply to by नगरीनिरंजन

विद्यार्थ्यांनी राजकारण करु नये असं म्हणून कसं चालेल हो? आमच्या 'बुद्दू' विद्यार्थ्याने काय करायचं मग?

In reply to by नगरीनिरंजन

राजकारण कोणाही विद्यार्थ्याने करायला नको. अभाविपनेसुद्धा नाही. पण बर्‍याच लोकांचा सूर तसा नसतो. याकूब मेमनची बाजू घेणे पटत नसेल तरीही त्यांना तो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. तो हक्क दडपशाही करुन मारता कामा नये.
शिक्षणसंस्था हे शिक्षण घेण्याचे, देण्याचे, संशोधनाचे स्थान आहे. ती राजकारण करण्याची जागा नाही. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संबंधित असे प्रश्न असतील तर त्यात विद्यार्थ्यांनी जरूर भाग घ्यावा. परंतु विद्यापीठाशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षणाशी अजिबात संबंध नसलेले विषय (उदा. याकूब मेममची फाशी, मुजफ्फरपूरची दंगल, महाराष्ट्रातील बीफबंदी) विद्यापीठात आणून आंदोलन सुरू केल्याव त्यावर विरोधी गटाकडून राजकीय उत्तर येणारच. एकदा राजकारण आले की अशांतता निर्माण होते व त्यात फक्त राजकारण्यांचा फायदा होऊन सर्वसामान्यांचा बळी जातो. या प्रकरणातही तसेच झालेले दिसते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आपल्याशी संबंधित नसलेले प्रश्न न आणता अभ्यासावर व संशोधनवार लक्ष केंद्रीत करावे व अभाविप सकट इतर कोणत्याही विद्यार्थी संघटनेला विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून इतर प्रश्नात लक्ष घालण्यास बंदी करावी असे माझे मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही वर उल्लेखलेले प्रॉब्लम राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र ह्या विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या विषयांच्या केस स्टडी असतात असे वाटते त्यामुळे हे प्रॉब्लम बाहेर ठेऊन नुसते पुस्तकी शिक्षण घ्या म्हणणे तितकेसे पटले नाही.

In reply to by नगरीनिरंजन

यांच्य विरोधातला प्रत्येक जन देशद्रोही कसा होतो? कॉंग्रेस वाला कसा बनतो? रोहित देशद्रोही होता, हे दत्तात्रेय यांनी कसे ठरवले?

In reply to by खंडेराव

आता ह्याला उत्तर म्हणून कोणीतरी जुने प्रत्यय देणार की अमुक अमुक विद्यापीठात काँग्रेसच्या मंत्र्याने असे तसे केले होते अन ऑल, मुळात ते येड़े होते म्हणूनच ह्यांना निवडून दिले होते न जनतेने? शिवाय सोशल मीडिया प्रचार करुन निवडणुका जिंकायला म्हणून आवडतो इम्प्लीमेंट करता येतो तर ती दुधारी तलवार आहे हे कसे विसरता येईल, तुम्ही इकडे तिकडे इतकेसे केले तरी विरोधक रान उठवणार फेसबुक अन ट्विटर वर, तेव्हा हे सगळे मुळात करूच नये असे मनःपूर्वक वाटते मला.

In reply to by खंडेराव

दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत स्वताचे मत असण्याचे स्वातंत्र्य आहे , त्यांनी ते मत स्मृती इराणी ह्यांच्या खात्यात पत्र लिहून कळवले ह्यावर पुढे त्यांनी विद्यापीठात चौकशी केली अंतिम निर्णय कुलगुरू ह्याचा आहे ह्यात वावगे असे काहीच नाही आहे डाव्या विद्यार्थी संघटना बंगाल व केरळ मधील विद्यापीठात वर्चस्व हे राजकीय आशीर्वादाने इतकी वर्ष टिकवून आहेत आणि हैद्राबाद विद्यापीठात देशद्रोही व्यक्तीचा अड्डा हा आरोप दिल्ली विद्यापीठाबाबत सुद्धा झाला होता आता आरोप करण्याचा मक्ता फक्त केजू चा आहे का भाजपा नेत्यांनी करू नये का आणि भाजप नेत्यांनी नियमा विरुद्ध केले तर हाय कोर्टात हि केस आहे निर्णय लागेल

In reply to by निनाद मुक्काम …

वर ते मुघल एक, ज्यांना जळी स्थळी पाषाणी कोण्ग्रेस दिसते आणि तुम्हाला युगपुरुष! अवघड केलेय ना केजरीने :-) सविस्तर लिहितोच नंतर, पण, दत्तात्रेय यान्चे मत व्यक्त करणे नाहीये, त्याला प्रक्रियेत ढवळाढवळ म्हणतात. विद्यापिठाच्या कुलगुरुने या मुलांना सोडल्यावरही इराणी यांनी ४ स्मरणपत्रे पाठवली. देशद्रोही व्यक्तिंचा अड्दा? हे असले हवाबाज आरोप नका करु. तुमच्याच पोष्ट चा आधार घेतला तर,
आणि भाजप नेत्यांनी नियमा विरुद्ध केले तर हाय कोर्टात हि केस आहे निर्णय लागेल
काय निर्णय लागलाय एखाद्या केसचा का ही विद्यापिठे देशड्रोह्याचा अड्डा आहेत म्हनुण? मी खाली कुठेतरी लिहिलेय, हे सगळे सर्तिफिकेट वाटायलाच बसलेत, कोण देशद्रोही आणि कोण भक्त..समिकरण आहे का, भक्त्=देशभक्त, बाकी देशद्रोही?

अर्थात शीतल साठे प्रकरण अन आंबेडकर पेरियार प्रकरण उल्लेख पाहून धागा लेखकांचे विचार सुद्धा एकांगीच असल्याचे स्पष्ट दिसुन येते आहे इतके नोंदवतो

दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी . मग ते दलीत(हा शब्दही मला लिहावासा वाटत नाही.) असोत , सवर्ण असोत, की मुस्लिम असोत. आपण किती दिवस तेच तेच करणार आहोत? हा उच्च हा निच्च बास ना भाऊ ! कसला उच्च आणि कसला नीच सब बराबर सब बराबर !!

In reply to by उगा काहितरीच

अरे न्यायालाही जात, धर्म कशाला लावतात? एखादा गुन्हेगार दलित अथवा मुस्लिम असेल तर सोडून द्यायचा का?

In reply to by DEADPOOL

साहेब, एकदा माझा प्रतिसाद पुन्हा वाचा ही विनंती . गुन्हेगार कुठल्याही जाती, धर्माचा , पंथाचा असो शिक्षा ही समान व्हायलाच पाहिजे . किंबहुना दोषी व्यक्तीचा जात , धर्म हा पाहण्यात काहीच अर्थ नाही. त्याहीपुढे जाऊन असे म्हणेल की जाती, धर्म (religion या अर्थाने धर्म ! धर्म, अर्थ , काम, मोक्ष मधील धर्म या अर्थाने नव्हे) या कंसेप्ट नामशेष व्हायला हव्यात . मग कदाचित जगात शांतता नांदेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्महत्या न केलेली तमाम माणसं शूर, धैर्यवान, विचारी वगैरे असतात... साभार फेसबुक

उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या मूर्खांनो, आरक्षण वगैरे मध्ये आणून, तुमची आरक्षणाबद्दलची चीड मांडून, तुम्ही फक्त विषय भरकटवताय. तुमची मतं ही वैचारिक तर दूरच, पण नुसतं आग टाकण्याचं काम करतायेत. तुमचा हेतू तोच असेल तर, मग बाकीच्यांनी तर अशांकडे दुर्लक्ष करायला हवं.

In reply to by राँर्बट

आरक्षण गरजेचे आहे! हे मत मी तथाकथित उच्च जातीचा असुन सुद्धा आहे माझे! इम्प्लीमेंटेशन नीट हवे!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सध्याचे आरक्षण चुलीत घालावे! आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण लागू करावे!

In reply to by जव्हेरगंज

दलित - आदिवासींचा विषय निघाला की , यांना त्यांचे आरक्षण दिसते . यावेळी दलितेरांना दलितांपेक्षा अधिक आरक्षण आहे हे मात्र दिसत नाही . आरक्षणाला इतके वर्ष विरोध करणारे आता आरक्षणासाठी रुसून बसले आहेत .

In reply to by जव्हेरगंज

आर्थिक आधारावर आरक्षण हे परमानेंट असेल, अन तेव्हा ते खऱ्या अर्थाने कुबड्या हे स्वरुप धारण करेल. तस्मात् बंद होण्याची विंडो एक शक्यता म्हणुन ओपन असलेली जातीअंतर्गत आरक्षण व्यवस्थाच उत्तम वाटते, तसेच एक बघा, कमी मार्क्स मधे प्रवेश ते पदोन्नती मिळायला सधन लोक सुद्धा आरक्षण मिळवयच्या मागे लागतात पण त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागते जे मिळवायला आजही भ्रष्टाचार होतो, आता विचार करा जर आरक्षण आर्थिक निकष लावुन दिले तर खोटे उत्पन्नाचे दाखले बनवायला म्हणुन किती भ्रष्टाचार होणार? (कारण थोड्या इन्वेस्टमेंट मधे मिळते आहे म्हणून कोणीच ती संधी सोडणार नाही), आज मुठभर सधन दलितांनी आरक्षण घेतले (क्रीमी लेयर चे ढीले इम्प्लीमेंटेशन) तर "होतकरु सीट्स जातात अगदी ओपनच्या सुद्धा अन केटेगरीच्या सुद्धा" हे आपण म्हणत असतो उद्या जर आरक्षण आर्थिक केले तर नाही टाटा बिरला तर गावातले समुच्च मारवाड़ी, गुजराती , मामलेदार, कारकुन, वकील, अभियंते प्रथम कामधंद्यातुन उत्पन्न कमी दाखवून दाखले काढून घेणारच, नुसत्या उत्पन्नच्या दाखल्याला इतकी डिमांड आली म्हणजे त्याच्यात टेबलाखालुन भाव वाढणार, म्हणजे एकुण ज्यांना खरेच कमी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे अन जे हुशार आहेत परत एकदा ते सोडुन सगळ्यांना एडमिशन मिळणार. झाले एक , दूसरे म्हणजे सहज प्राप्य असे काही दिसले की पुढे जायची इच्छा संपते हा जातीय आरक्षणावर एक पेटेंट आरोप असतो, जर ५०० रु देऊन मिळवलेल्या इनकम सर्टिफिकेट वर सहज एडमिशन मिळायला लागल्या अन हा वरचा आरोप खरा मानला तरी आर्थिक आरक्षण घेणार लोकांस सुद्धा तो लागु होईल अन कथित क्वालिटीचा ह्रास होणारच, कसे? ह्याऊपर आर्थिक निकष हे कॉन्स्टंट असणार आहेत कारण कितीही पैसा समाजात आला तरी सापेक्षतेनुसार कोणी एक गरीब राहील कोण कोणी श्रीमंत, अश्यात क्वालिटी परमानेंट डेमेज होईल अन तेव्हा झालेल्या अराजकाला कोणीच वाली नसेल, हे झाले तात्विक विचारावर , लोकशाही मधील प्रॅक्टिकल आस्पेक्ट चा विचार करता सद्धया अनारक्षित असलेले लोक हे एकुण भारतीय लोकसंख्येच्या 5-8% च्या मधे आहे अन त्यांच्यात राजकीय एकवाक्यता सुद्धा नाही तस्मात् आर्थिक आरक्षण ही मागणी रेटायची म्हणली तरी न अनारक्षित गटाकड़े पुरेसे संख्याबल आहे न राजकीय एकवाक्यता अन वर संगीतलेल्या लोकशाही मधील अनारक्षित जातींची टक्केवारी पाहता कुठल्याच राजकीय पक्षाला त्यात रस असण्याचे कारण ही नाही, जात आधारीत आरक्षण हे वाईट म्हणले तरी तुर्तास इट्स द बेस्ट अवेलेबल वाईट इन द सिस्टम!ह्यशिवाय पॉलिसी वाईट नसते तर त्याचे "इम्प्लीमेंटेशन" वाईट असते जातिनिहाय आरक्षण पॉलिसीचे इम्प्लीमेंटेशन नीट करता बरेच प्रॉब्लेम सुटू शकतात पण परत राजकीय इच्छाशक्ति इज द की!!! असे काहीसे माझे वैयक्तिक मत आहे :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खूपच मस्त मुद्देसूद प्रतिसाद. आता कुणी आर्थिक आरक्षण विषय काढला की त्यावर हे उत्तर असेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आरक्षण असावे पण या गोष्टीला कुठे तरी सीमा असावी. या बाबतीत असे करता येईल. ज्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ शिक्षण/नोकरी मिळवण्यासाठी घेतला आहे, त्याच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला (भाऊ/बहीण्/मुले) पुढे घेता येऊ नये. हळूहळू आरक्षणाचा विषय आपोआपच संपून जाईल.

In reply to by shvinayakruti

ओ नीट बोला जरा! तुम्हांला जर विरोधी मते पचत नसतील तर येथे येऊच नका! आणि ज्या व्यक्तींना तुम्ही मूर्ख म्हणालात त्यानी तुमच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त पाहिलेत मिपावर! आणि आता मीच म्हणतो तुमच्यासारख्या मूर्खाना मिपावर बंदीच आणायला हवी!

बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर तोल ठेवावा असे सुचवतो! अर्थात ही फ़क्त सूचना आहे एक , बाकी ज्याचात्याचा वकुब अन स्वभाव!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे, भाषेवरचा तोल गेल्याने चर्चेत फायद्या एवजी नुकसानच अधिक होत असावे. एखादा विषय खूप गरम असेल तर तोल जाणार्‍यांनी सहसा दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा असे माझे व्यक्तिगत मत असते - म्हणजे मी तसा तो घेत असतो. दुसर्‍या बाजूस अनावश्य्क वाचाळ विरताही दिसते आहे. काही अपवाद वगळता, आजच्या काळात जुन्या काळा एवढे जातीयवादी कुणीच नसेल. मतांतरे असतात कठोरतेने टिका करतानाही असभ्यता टाळली पाहिजे. ज्यांना रुची असेल त्यांना मिपावरील कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? हि धागा चर्चा अभ्यासता येईल.

Hyderabad Central Uuniversity – 18/01/2016 The propaganda machine is back. As mark Twain said - Before the truth comes out and wears the shoes, the false hood must have traveled across half of the world. This is the truth about the latest incidents in Hyderabad Central University. Some elements inimical to the Nationalistic school of thought and have ulterior agenda are using the name and banner of Ambedkar Students Association to malign the image of other organisations and black out any other version or school of thought. The main accused in serial Bombay blasts of 1993, Mr.YakubMenon was found guilty on several counts. The death sentence imposed upon him by the trial court was confirmed by the Supreme Court. After that he was hanged. Some persons under the banner of ASA had protested against this hanging. They are entitled to. This meeting was held in University campus with many new unknown faces participating in it. It was claimed that from every house another Yakub will emerge. “Tum KitneYakub Mar denge, HarGhar se YakubNikalege– ASA. UOH”. The English translation reads as follows: “How many Yakubs you kill! From every house one Yakub Will be generated”. This was on 3-8-2015 One Susheel Kumar ( office bearer of local unit of AkhilBharatiyaParishad, ABVP) protested at this. He put up his comment on face book commenting about the aggressive behavior. Does he have right to comment on this protest? Or Not? On the same day, at mid night 30 persons barged into hostel room of Susheel and dragged him out of the room. The police came and left. He was beaten in the presence of two constables. The ASA volunteers beat up susheel badly and dragged him to the main security gate. He was forced to open the face book account at the Security room and forced to write a note of apology. The Security officer was witness to all this and he counter signed on the note written by Susheel. He was rushed to Hospital , and he underwent treatment in hospital, operated upon etc., This was attack on one student by 30 persons. This is not denied by anyone. There was no scuffle or a fight. As usual, the police and the University administration colluded with the attackers. There were complaints and mother of Susheel was abused when she visited the campus in the presence of senior officers of the University. She went to court and sought a direction to the management of the university to check such incidents. The university had constituted a committee to go into all this. After full-fledged inquiry, it was recommended that five students be rusticated from the university. This means that the students will lose the academic career scholar ships etc., There was huge outcry that the Dalit students are being sent out of the campus. Violent protests and confinement of in charge VC Mr. Sharma took place. The implementation of the final decision was kept in abeyance. After the new Vice Chancellor took charge, the issue was pursued and the mild punishment of keeping these erring students out of Hostel alone was imposed. Their Monthly fellowships were not affected and they are allowed to pursue their studies. These students approached the High Court in December 2015 and the case is to come up for hearing on third week of January 2016. In meanwhile ASA students protested. The High Court is to reopen on 18-1-2016. On 17 January 2016 a research scholar and one among the five who were given punishment Mr. Rohit committed suicide. This is most unfortunate. The legal battle was on. Now the story is spread that the Dalit boy was targeted. The spin story which is doing rounds is that there was a clash on Muzafarpur riots and Rohit is punished. Muzafurpur issue is regarding communal incident between Muslims and Hindu Jats in that area. The issue here in University was hanging of YakubMenon. The issue was whether 30 persons can go to room of a student and beat him up for two to three hours. This was failure of police who left the scene and university administration. The dean of Students Welfare was told (prior to the attack) by ASA that they are going to Susheels room. Should he not take steps prevent further escalation. He was instrumental in attack on Susheel. It has nothing to do with DALIT boy etc., Why Dalit card is used to protect the image of YAKUB Menon? What has Ambedkar got to do with hanging of YakubMenon.Yakub was not a champion of dalits!! The usual demands of resignation of new VC , central ministers etc., is on. The university Administration and irresponsible local police will do lot of explanation. The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.

संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ? आपण शांततेने साध्या शब्दांच्या मदतीने हळु आवाजात बोलु शकतो असो.

In reply to by मारवा

आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.

In reply to by खंडेराव

लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. हा प्रकार कोण करतय ईथे ?

In reply to by मारवा

आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.

In reply to by खंडेराव

असे पूर्वीही झाले आहे शासन निर्णय घेते त्याला विरोध करणारे आत्महत्या सारखा मार्ग निवडतात त्यातून त्या मुद्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. मंडळ आयोगाच्या वेळी अश्याच एका तरुणाचा बळी गेला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

आता पुढच्या बातमीत काही राजकीय्+सामाजीक पोळी भाजण्याचे मूल्य नसल्याने आणि म्रुत व्यक्ती अगदीच गरीबाघरची असल्याने ना दांडी मिडीयाला त्याचे सोयरेसुतक नाही की सजग मिपाकरांना (आणि हो अपराधी लोकांबद्दल बोलल्लात तर खबरदार) हे आरोपी १०००% निर्दोष सुटतील याबाबत मी पक्की खात्री बाळगून आहे संबधीत बातमी मटा आणि पुढारी याबरोबरच सकाळमध्ये आली आहे
पेटवून दिलेल्या तरुणाचा ससून रुग्णालयात मृत्यू - - शनिवार, 16 जानेवारी 2016 - 03:45 AM IST Tags: crime, thief, burn, police, kasba peth, pune पुणे - चोरीच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावन धर्मा राठोड (वय 17, रा. करमाळा, सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. इब्राहिम मेहबूब शेख (वय 35, रा. 726, कसबा पेठ), जुबेर इकबाल तांबोळी (वय 29) आणि इमरान इकबाल तांबोळी (वय 30, दोघेही रा. फातिमानगर) या तिघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. सावन राठोड हा मूळचा करमाळा (जि. सोलापूर) येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील वीटभट्टीवर काम करतात. घरी भांडण झाल्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी तो रागाने पुण्यात आला होता. कचरा आणि भंगार जमा करून त्याची उपजीविका चालली होती. असेच काम करणाऱ्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली होती. पुण्यात कोणी नातेवाईक नसल्यामुळे पदपथ हेच त्याचे घर होते. बुधवारी दुपारी कसबा पेठेतील पवळे चौक ते फडके हौद चौकादरम्यान तो भंगार जमा करत असताना आरोपींनी चोरीच्या संशयावरून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल पाजून काही पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले. सुमारे 70 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक भाजल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.
सकाळ दि १६ जानेवारी २०१६

In reply to by खंडेराव

हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. रोचक आहे. एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.

In reply to by खंडेराव

मग गेल्या ११ महिन्यांमध्ये जोशी/कुलकर्णींवर अत्याचार झालेच नाहीत का? कोल्हापूरची घटना ताजी आहे.

In reply to by मोदक

मोदक दादा, अहो कोल्हापुर मधे belligerent parties ह्या दोन्ही सवर्ण होत्या की हो! जातीच्या फुकट अन वृथा अभिमानातून घडलेली ती घटना आहे खाप पंचायत टाइप हॉरर किलिंगची, त्याच्यात दलित-सवर्ण किवा वाईस वर्सा एंगल कुठे आहे? बरं तुम्ही म्हणता तशी एक केस अमरावती मधे काही वर्षं मागे झाली होती, ज्यात एका दलित मुलाने कुळकर्णी मुलीला एकतर्फी प्रेमातुन घरात शिरून खलास केले होते, अन माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा पुर्ण सहानुभूति (मीडिया कोर्ट प्रशासन) ही पीड़ित कुळकर्णी च्या बाजुने होती. मग कसे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब हा हिशेब चुकला पहा. उद्या अगदी एखाद्या उच्च कुळातील राजघराण्यातील मुलाने अगदी गरीब मुसलमान मुलीला जर एकतर्फी प्रेमातून जीवे मारले तर अगदी कट्टर हिंदुत्व्वादिसुद्धा त्या मुलीची बाजुच घेतील. येथे कुणीही कुणाला मारले नसून आत्महत्या आहे आणि तिला दलित विरुद्ध उच्च असा राजकीय रंग मुद्दाम भरला जात आहे.

In reply to by सुबोध खरे

बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे कोल्हापुर केस बद्दल म्हणत होते मी त्याच्यावर बोललो, प्रॉपर हुकला का पॉइंट माझा?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे बापू तुमचे.. मला इतकेच म्हणायचे आहे की खंडेनाना विसंगती विसंगती म्हणताना स्वत: एखादी विसंगती दाखवायचे विसरले काय?

The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.
+ १

अत्यंत तोकड्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे लिहिलेला लेख . रोहित वेमुला चा इतिहास बघता त्याच्या आत्महत्येच निव्वळ राजकारण केलं जात आहे . याकुब मेनन च्या फाशीला विरोध करणारा , अभाविप च्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात सामील झालेला असल्यामुळे त्याला होस्टेल मधून निलंबित करण्यात आले होते . त्याने त्याची वर्तणूक सुधारण्या ऐवजी आत्महत्या केली . आता आत्महत्या कोणत्याही जातीचा , कोणत्याही धर्माचा माणूस करू शकतो . पण त्याचं दलित असणं हे काही फेक्युलर लोकांनी उचलून धरलं. लेखामध्ये गोमांस खाल्याचा संशयावरून मारण्याचा उल्लेख केलाय पण ब्याटरी चोरण्याच्या संशयावरून पेट्रोल पाजून पेटवून दिल्याच्या , मालदा घटनेचा , टिपू सुलतानच्या जयंती वादात 'शांतताप्रिय' धर्मियांनी ३ हिंदूंना मारल्याचा उल्लेख नाहीये . प्रसारमाध्यमे अश्या गोष्टींना महत्व देत नाहीत कारण त्यावरून राजकारण करता येत नाही ना.

विरोधी पक्षांनी राजकारण करावयाचे आणि परिस्थीतीनुसार सत्ताधारींनी राजकीय बचाव करावयाचा या चाकोरी पलिकडे राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक कितपत जाऊ शकतील याची सांशकताच वाटते. दलितांना राजकीय दृष्ट्या सामिलकरून घेण्यासाठी सारेच पक्ष धडपडताना दिसतात, पण सामाजिक स्तरवरील अभिसरणाच्या बाबतीतल राजकीय नेते फारसे कृतीशील दिसत नाहीत. -नाही म्हणावयास, उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापिठातील प्रस्तुत घटने बाबत अगदी संसदीय समिती मार्फत चौकशी पर्यंत सोपस्कार होऊ शकतील- वस्तुतः आरक्षणावरूनची मनातली अढी दलितांना सर्वांसोबत सहभागी करून घेण्याच्या आड येणार नाही ह्या दृष्टीने आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करणे, हि राजकीय नेत्यांची नैतीक जबाबदारी असावी पण राजकीय नेते हि जबाबदारी निभावताना दिसत नाही. आंदोलनांना रचनात्मक दिशा देऊ शकेल असे दलितांमधूनही राष्ट्रीय स्तरावरील स्विकार्य आणि जबाबदार नेतृत्व आकार घेताना दिसत नाही. आंध्र आणि तेलंगाणातील द्लित विद्यार्थी चळवळी - सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद विद्यापीठाची धरून- ह्या मुख्यत्वे डाव्या कम्यूनीस्ट पक्षांच्या विद्यार्थी चळवळींशी संलग्न आहेत आणि बाकी भारतातील दलित चळवळीतील नेत्यांचा त्यांच्यावर सरळ प्रभाव कमी असेल असे गृहीत धरले तरीही, राजकारणात एखादी अडचणीची जागा असते तेथे संवादाची मागचे दरवाजे उघडे असावे लागतात हैदराबाद विद्यापीठ प्रसंगाबाबत भाजपाचे राजकारणी या बाबत असे प्रयत्न न करून अयशस्वी झाले का? हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी चळवळी सोबत होत असलेल्या संघर्षाने भाजपाचे मान्यवर नेते अस्वस्थ झाले असतील त्यांनी मंत्रालयामार्फत अधिकृत कागदी घोडे नाचवले, मंत्रालयातील बाबूलोकांनी विद्यापीठातील बाबू लोकांनीही कागदी घोडे नाचवून आपापली कर्तव्ये पारपाडली हे ठिक परंतु राजकीय प्रश्नांची सोडवणूक राजकीय पद्धतीने करण्यासाठी काही -परोक्ष-अपरोक्ष- राजकीय संवादाचे प्रयत्न करून पहाण्यात भाजपाचे आंध्र आणि तेलंगाणातील मान्यवर नेते कमी पडले का ? तळे राखी तो पाणि चाखी हे समजता येते, सत्ता बदलल्या नंतर सर्व ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार लावणार हे समजता येते. पण काही जागा संवेदनशील असतात, बाकी भारतास हैदराबाद विद्यापीठातील जातीय संघर्षांचा इतिहास माहित नसेल म्हणजे त्यांच्या आंध्र आणि तेलंगाणातील नेत्यांना माहित नसेल असे नसावे; त्यांच्या नेत्यांना जर स्थानिक माहिती असेल तर दलित विद्यार्थ्यांशी संघर्षाची जुनी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती (भले मग त्यांची समजा जुन्या घटनांमध्ये चुक नसेलही) उपकुलगुरू म्हणून कशी काय निवडली जाऊ शकते ? उपकुलगुरू म्हणून संवेदनशील ठिकाणी नेमण्याकरता तुमच्या कडे तुमच्या गटाची दुसरी एकही व्यक्ती नसते का ?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाय पटले बुआ कप्तान साहेब! अजिबात नाही पटले! असो! आता काय बोलणार... एका फोटोवर "स्कॉलरशिप"वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांस हीनपणे जोखणे वाटले मला होनेस्टली अधिक उणे माफ़ी पण अजिबातच आवडले नाही

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्यंत आभारी आहे कप्तान साहेब! तुम्हास विचार करता येतो ह्या विश्वासाने खुल्यामनाने बोललो होतो, तुम्ही आमच्या मैत्रीचा मान राखलात आनंद वाटला ____/\_____

१) अनुपमा राव, सिनियर वैद्यकिय अधिकारी - सुशील ला मारहाण झाल्याचे मी जेव्हा त्याला तपासले तेव्हा वाटले नाही. तारिख - ८ ओगस्त २) डो. चेन्ना रेड्डी, अर्चना हॉस्पिटल जिथे सुशील दाखल होता - USG abdomen taken on August 7 show acute appendicitis. PAC and surgical profile done, patient taken up for surgery. Diagnostic Lap and Appendectomy done under GA on August 7. Patient improved well and discharged with stable vitals - ३) डिएसओ दिलिप सिन्ग - सेक्युरिटि अधिकारी- मी असा च्या विद्यारथ्यांना सुशिल ला मारताना बघितले नाही. मी पोहोचलो तेव्हा ते ( सुशील आणि असा ) बोलत होते. सुशीलला अपेन्दिक्स होता, आनि त्याने त्याचे ओपरेशन करुन असा वाल्या विद्यर्थ्यांना अडकवण्यासाठी हा उद्योग केला. हे झाल्यानंतर, रोहित आणि सुशिल यांना, डो. राव आणि सिन्ग यान्च्या साक्षि ग्राह्य धरुन, समज देउन सोडण्यात आले. नंतर, HRD आणि दत्तत्रया बान्देरु यान्च्या दबावामुळे ५ जनांचे निलंबन झाले. अधिक माहितीसाठी - http://indianexpress.com/article/india/india-news-india/hyderabad-stude…

ही अजून एक नवीन धक्कादायक माहिती - Former chairman of the University Grants Commission (UGC) and chairman of Indian Council of Social Science Research (ICSSR) Professor Sukhadeo Thorat said that the issue should be looked in a wider context. "In Hyderabad University, there were two suicides, one was in 2008 and now in 2016. But in Hyderabad city itself there were nine suicides. If we come to northern India, then two suicides were reported in AIIMS, 14 suicides reported from Lucknow, Kanpur, Roorkee and Chandigarh. The issue is why is that the proportion of suicide much higher among the Dalits. The 23 cases that I mentioned, one is Muslim and one tribal and rest of them were Dalits. It means there are problems as far as the stay of Dalits in universities is concerned," Thorat said. गेल्या काही वर्षात निरनिराळ्या विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली हे आजच समजले. बरोबर आहे. तेव्हा केंद्रात व राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार असल्याने या आत्महत्या देखील धर्मनिरपेक्ष समजल्या गेल्या असाव्यात.

In reply to by श्रीगुरुजी

यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात . मेरी कमीज उस्से सफेद है ! जिथे राजकीय कारणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्या त्या सगळ्या कॉंग्रेसशासित , सप शासित , आप शासित राज्यांचा , मंत्र्यांचा निषेध !! आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ? २. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?

In reply to by कपिलमुनी

सगळ निट बाहेर येतेय, कि कसा सुशिल आणि बान्देरु यांनी बनाव केला असा वाल्यांना अडकवण्यासाठी, तर हे आता भुत़काळात पोहोचायला लागलेत. यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
चार लाडु खाल्यानंतर
लाडु चवदार होते. त्यांनी तब्येत सुधारली पाकिस्तान घाबरले. इत्यादि इत्यादि

In reply to by खंडेराव

तेवढे तुम्ही महत्वाचे नाही आणि तुमची मतं वाचल्यावर तर तुम्हाला महत्व देण्याची गरज नाही हेही समजतंच आहे. काॅग्रेसने आधी जे केलं ते तर दाखवावंच लागेल, कारण जर ते चुकीचं असेल आणि त्यामुळे काँग्रेसवाले करुन सवरुन नामानिराळे राहात असतील तर भाजपवाल्यांना एक न्याय आणि काँग्रेसवाल्यांना दुसरा असं म्हणायचंय का तुम्हाला?
यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
असली लाचारी हे काँग्रेसी लांगुलचालक करतात. इथे मिपावरही त्यांची कमी नाहीच आहे. तुम्ही त्यातले नसाल असा अंदाज आहे, पण तो खोटा ठरला तर आश्चर्य वाटणार नाही. मुळात रोहितने आत्महत्या ही बंडारू दत्तात्रेय यांच्या पत्रामुळे झालेल्या तथाकथित कारवाईमुळे केली हे कोर्टात सिद्ध करुन दाखवणं आणि इथे त्यावरून गळा काढणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यावरून तुम्हाला मिपावरील रुदाली असा किताब का देण्यात येऊ नये?

In reply to by कपिलमुनी

यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात .
हे मी दिलेले नाही. एका आधीच्या वेगळ्या सदस्याने दिलेल्या प्रतिसादातील हा परिच्छेद आहे.
आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ?
मुळात या आत्महत्येच्या बातम्यांना इतके दिवस प्रसिद्धीच देण्यात आली नव्हती. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येनंतर हे प्रसिद्ध झाले आहे. एकंदरीत या आत्महत्यांच्या बातम्या दडपून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यामागे जी काय कारणे असतील ती यापुढे बाहेर येतील.
२. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?
कशासाठी?

केंद्रातील सरकारला स्वत:लाच उर्वरीत राज्यातील निवडणूका जिंकत जाणे आणि राज्यसभेतील सध्याची कमकुवतस्थिती हि मोठी आव्हाने आहेत की ज्यामुळे मोदीसरकारकडून एकीकडून स्वपक्षीयांचा बचाव केला जातानाच दुसरीकडून -स्वतःच्या सरकारची प्रतिमा पॉलीटीकली करेक्ट ठेवण्यासाठी- संसदीय समित्या आणि इतर वरीष्ठ स्तरीय चौकशांचे सोपस्कार पार पाडण्याची तारेवरची कसरत करावी लागेल. या चौकशी समित्यांपुढे कोणत्या गोष्टी येऊ शकतील १) ज्या सुशिलकुमारांना दुखापत केली गेल्याचे आक्षेप आहेत ते आक्षेप तपासले जाऊ शकतील २) मानवसंसाधन मंत्रालयातील बाबू लोकांनी नाचवलेले कागदी घोडे खरेच सुविहित प्रक्रीयेचा भाग होते का हे तपासले जाऊ शकेल ३) हैदराबाद विद्यापिठाची निर्णय घेणार्‍या काऊंसील सदस्य ज्यांना ऑदरवाई़ज गोपनियतेच्या आड रहाता येते त्यांच्या भूमिका तपासून योग्यायोग्यतेची खात्री केली जाऊ शकेल. ४) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास झालेल्या विलंबाची कारणे; पण यातील निसटणारी बाजू म्हणजे विद्यार्थ्यांच हॉस्टेलमधून निलंबन ऐन हिवाळ्यात केले गेले, आणि ऐन थंडीत बाहेर टेंट टाकून झोपण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, आणि निलंबीत केलेल्या विद्यार्थ्यांशी समोरून कडकपणाचा आव आणला तरी दुसरा पाठीवर ठेवणारा हात हवा, हा हात देण्यात विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व दोन्हीही आपापल्या परीने कमी पडले नाही का ? हे कोणत्याही चौकशी अहवालातून पुढे येणे अवघड असेल याच्यासाठी माणसात माणूसकीचा धर्म शिल्लक असावा लागतो. हजारे सारख्या गांधीवाद्यांचा एक गुण असा की आंदोलन केव्हा थांबवायच याचा अंदाज यावा लागतो अथवा महाराष्ट्रातील दलित चळवळीप्रमाणे अधिकतम किती ताणता येईल याचा तरी अंदाज नेतृत्वास हवा. मला मुंबईच्या गिरणीकामगारांचा संप आठवतो, कुठे थांबायच आणि जनतेची सहानुभूती कशी जपायची हे माहित नसणे, हा योगायोग आहे का की डाव्या चळवळींची सर्वसाधारण शोकांतीका असते ? हि सर्व चौकशी जेव्हा व्हावयाची तेव्हा होईल ती पूर्ण होऊन कुणी चांगला अहवाल तयार करून काही रचनात्मक सूचना केल्यातरी विवाद्य भागाचे चर्वितचर्वण आणि घ्यावयाच्या रचनात्मक स्टेप्सकडे दुर्लक्ष असे न होण्यासाठी भारतासारख्या देशात नशिबच चांगले असावे लागते. गमतीचा भाग असा कि चौकशी अहवाल कसेही आले तरीही दुखवलेल्या जनतेचा विश्वास बसू नये एवढे राजकारण लगोलग केले गेले आहे. हैदराबाद-तेलंगणाच्या भाजपा नेत्यांनी मानवसंसाधन मंत्र्यांना दिलेली आणि मानव संसाधन मंत्र्यांनी विद्यापिठाला दिलेली सर्वच पत्रे मी वाचलेली नाहीत पण प्रथम दर्शनी कायदेशीरदृष्ट्या त्या पत्रांमध्ये काही वावगे नसावे, परंतु तेलंगणाच्या पोलीस, मिडीया सर्वांनी असा भ्रम निर्माण करून ठेवला आहे की हि दोन तीन मंडळी अगदी केवळ त्या पत्रांच्या भरोशावर कायदेशीर दृष्ट्याही बहुधा दोषी असावीत, आणि बहुधा अशी आरोपबाजी सहजपणे चौकशी आयोगांसमोर आणि न्यायालयासमोर टिकणे कठीण असू शकेल. त्यामुळे चौकशी अहवाल काही आले तरीही दुखावलेले लोकांना विश्वास ठेवणे कठीण जाईल हे चित्र आजच दिसते आहे. रोहीतची बातमी आली तेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी अद्वातद्वा आरोपबाजीत मश्गुल होती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री जे स्वत: कायद्याचे अभ्यासक आहेत ते शॉपींगकरण्यात व्यस्त होते ह्या टाईम्स ऑफ इंडीया बातमीचे आजीबात नवल वाटले नाही. दुखावलेल्या विद्यार्थ्यांनी काही राजकारण्यांना त्यांच्या कंप्लेटमध्ये आरोप लावणे आणि विद्यार्थ्यांचा राग शांत व्हावा म्हणून पोलीसांनी अशी कंप्लेंट नोंदवून घेणे -मग राजकारण्यांचे राजकारण- हा क्रम समजून घेता येतो परंतु या सर्वातून निसटणारी बाजू म्हणजे स्थानिक पोलीसांनी रोहीतच्या मृत्यूच्या इतर सर्व शक्यता तपासून पहाण्याचे कर्तव्य कितपत चोखपणे बजावले ह्याची बातम्यांमधून माहिती मिळतच नाही उलटपक्षी शंकाच अधिक वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे समाज घटकांचे एक्मेका प्रति विश्वास संपादन, अभिसरण आणि समरसता हे उद्दीष्ट बाजूस राहून नित्या प्रमाणे राजकारणाचीच शक्यता अधिक; जी बाजू निसटावयास नको ती नेमकी निसटत राहते.

परत परत तेच धोरण..... आपल्याकडे रूजलेलं राजकीय हस्तक्षेपाचं, द्वेषाचं आणि दुहीचं विष काही केल्या जाणं जवळ जवळ अशक्य आहे हे दाखवणारी उदाहरणं परत परत घडताना दिसतायत. सगळेच आपापला बाब्या निवडून बाकी कारटी ठरवून मोकळे झालेत. चूकीपेक्षा कोणी केली ह्यावर शिरा ताणून जास्त चर्चा होते आणि तीच खरी पोटदूखी आहे असं वाटतं. भाजपायींच्या कुठल्याही चुकीने बाकीच्यांच्या मनाचे मोर थुई थुई नाचू लागतात तर भाजपाई रामशास्त्री लगेच मागचा हिशोब मांडू लागतात आणि चुकीचं समर्थन करायचा प्रयत्न करतात...मग अजून काहीतरी वाद विवाद....ह्यात आत्ता करणारे चुकीचे आहेत असं हिरीरीने सांगणारे मागचं सोयीने बाजूला सारतात.....वाद वाढत वाढत भक्त वि विरोधक असा होतो. आता राजकीय नेतॄत्व काय परिपक्वता दाखवते ते पहाणे आले. दोषींवर (कुणी असल्यास) त्वरीत करवाई होऊन न्याय मिळावाअ ही सदिच्छा!!!!

मद्रास आय आय टी मध्ये २०१५ ऑक्टोबर च्या एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या
ह्या डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या माहीतीवर सर्वच मुग गिळुन गप्प आहेत. नक्कीच ते सवर्ण असतील त्यात सुद्धा ब्राह्मण. आणि ३ टक्क्याच्या व्होटबँकेसाठी कोण आंदोलन वगैरे करणार? किंवा मिपावर लेख पाडणार? त्यात, ही ३ टक्के व्होटबँक सुद्धा विभाजीत.

रोहितला हिंदू/हिंदूत्व/भगवा याबद्दल प्रचंड संताप होता. साहजिक आहे,विद्रोही साहित्य फार वाचलं कि असं होतं.आणि संताप येण्यामागे तथ्यही आहेच,ते नाकारता येत नाही. पण त्याने लढा चालू ठेवायला हवा होता. भाजप/संघ/हिंदूत्ववादी इत्यादिंनीही विद्रोही/आंबेडकरी साहित्य वाचलं तर थोडं बरं होईल.

कुणाच्याही मृत्यूची अशी चर्चा होणे हे खरेच खूप दुर्दैवी आहे. रोहितच्या मृत्यूला तो दलित असणे आणि केवळ त्यामुळेच त्याला अपमानास्पद वागणूक मिळणे आणि त्यामुळे त्याला नैराश्य येणे हेच एक आणि एकमेव कारण होते काय? तसे असेल तरच 'दलित विद्यार्थ्याची आत्महत्या' हे शीर्षक योग्य ठरेल असे माझे मत आहे. असे नसेल तर वारंवार तसा उल्लेख करून सर्वसामान्य लोकांचा समूह म्हणून आपणात फूट पाडण्याच्या सोयीस्कर राजकारणाला आपण बळी पडत आहोत असे वाटते.तसेच रोहितच्या आत्मघाताशी दैनंदिन आयुष्यासंदर्भात त्याच्या दलितत्वाचा संबंध नसेल तर तटस्थ निरीक्षक म्हणून पाहता माझ्यादृष्टीने हे प्रकरण व त्यावरची चर्चा ही निव्वळ राजकीय ठरते. तसेच एका कायदेशीर बाबीची माहितीही कुणाकडे असेल तर शेअर करावी.(माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरही ही माहिती महत्वाची आहे) आंतरजातीय विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींना आपली जात(एकतर वडीलांची किंवा आईची)अशी 'ठरवण्या'चा अधिकार आहे का? या बातमीतून तरी तसेच ध्वनित होते. तीत लेखक म्हणतो-
Rohith was a Dalit, he chose to take up his mother's caste since his father had deserted them.
अवांतर:जातीची चर्चा केलेली मला आवडत नाही.पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते.

In reply to by ए ए वाघमारे

पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते. जातीचे संदर्भ बाजूला पडतात. संमिश्र कॉस्मो वातावरणात अजूनच. पण सरकारी गोष्टीत सगळीकडे जात टोचत येतेच. यावर long term उपाय काढणे गरजेचे आहे. रोहीत वेमुलाची आई दलित तर वडील इतर मागासवर्गीय होते. पण ते सोडून गेल्यामुळे तो आईबरोबर आणि त्या वातावरणात / समाजात वाढला. आजच्या हिंदूच्या बातमी प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने अशा परिस्थितीत जात ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आणि आईची जात लावणे योग्य समजले गेले आहे. आपल्या कायद्याप्रमाणे वडिलांची जात लावली जाते. http://www.thehindu.com/news/national/rohit-vemula-supreme-court-verdic… जातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक त्यातच बुडत आहोत. feel frustrated with opportunists everywhere.

येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या मेजर निवडणूका आहेत का? बिहार निवडणूकीच्या आधी दादरी प्रकरण घडलं (की घडवून आणलं?), त्यात बीफवरुन बोंबाबोंब करण्यात आली, पुरस्कार वापसीची नाटकं यशस्वीपणे राबवण्यात आली आणि बिहारची माठ जनता त्याला नंदीबैलासारखी भुलली. अर्थात बिहारमध्ये असलेल्या जातीय समीकरणांना आणि त्याप्रमाणे चाललेल्या राजकारणाला तर कुठेच तोड नाही म्हणा! कम्युनिस्टांचं शिरकाण करण्यासाठी हर्मान गोअरींगने आपल्या हस्तकांकरवी जर्मन पार्लमेंट - राईशस्टॅग जाळली होती. त्याच धर्तीवर आगामी काळातल्या निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून रोहीतची आत्महत्या 'घडवून' तर आणण्यात आली नाही ना?

In reply to by राँर्बट

भारतात दरवर्षी कोणत्यातरी राज्यात निवडणुक असतेच. २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल व आसाम मध्ये विधानसभा निवडणुक आहे. २०१७ मध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये निवडणुक आहे. २०१८ मध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान मध्ये निवडणुक आहे. २०१९ मध्ये लोकसभा व अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. दादरीसारख्या हत्या किंवा रोहित सारख्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखी प्रकरणे गेली अनेक वर्षे घडत आहेत. परंतु आता मोदी, भाजप इ. दलितविरोधी, असहिष्णु, हुकुमशहा इ. ठरविण्यासाठी त्यांच्यावर झुंडीने हल्ले होते आहेत. रोहीतच्या आत्महत्येनंतर तिथले काही दलित प्राध्यापक राजीनामा देणार आहेत म्हणे. याच विद्यापीठात गेल्या १० वर्षात इतर ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तेव्हा माध्यमांनी किंवा या प्राध्यापकांनी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. परंतु आता सगळ्यांना अचानक कंठ फुटला आहे. यामागचे कारण उघड आहे.

खालील लेख / निरीक्षण महत्वाचे वाटले. http://www.indianexponent.com/2016/01/the-real-truth-of-rohith-vemula-s… त्यात म्हणल्याप्रमाणे रोहीथ हा सुरवातीस इतर कुठल्याही तरूण विद्यार्थ्यासारखा होता... (मी नंतर चेपूवरील माहितीची खातरजमा करून घेतली) त्याची म्हणून मते होती आणि आवडी-निवडी देखील होत्या. धार्मिक नव्हता पण विवेकानंदांचा फोटो खोलीत ठेवत होता. भारताबद्दलचा अभिमान दिसत होता, सैनिकांचे दिवाळीच्या वेळचे फोटो देखील होते. निर्भयाप्रकरणाच्या वेळेस फाशीच्या शिक्षेचे कडक समर्थन करण्यात पुढे होता. अगदी सुब्रम्हण्यम स्वामींचे वक्तव्य देखील त्याला मान्य होते (जरी तो कुठेही भाजपाच्या अथवा हिंदूत्वाच्या जवळ नव्हता तरी). हैद्राबाद विद्यापिठावर खूष असल्याची काही वक्तव्ये, फोटो देखील दिसतात. पण त्याच सुमारास एक गडबड झाली. अण्णा हजार्‍यांनी लोकपाल निमित्त जनजागृती केली आणि केजरीवाल म्हणून एक राजकीय तारा दिवसाकाठी देखील लोकांच्या डोळ्यात चमकू लागला. या तार्‍याचा प्रभाव पडलेला नंतरच्या काळात दिसू लागला. पुढे अचानक सगळेच चुकीचे वाटू लागले. त्यात विवेकानंद चुकीचे होते हे देखील आले आणि याकूब मेमनची (त्या आधी अफझलची देखील) फाशी कशी चूक होती ते आले... जे झाले ते अत्यंत दुर्दवी आहे. त्याच्या मृत्यूचा ज्याप्रकारे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तो भाग "...टाळूवरील लोणी खाणे" या एकाच पद्धतीत बसू शकेल असा आहे. त्याच्या पत्रातील आंबेडकर स्टूडंट युनियन बद्दलची नाराजी/अपेक्षाभंग संदर्भातील खोडलेला भाग आता प्रकाशात आला आहे. आणि ते पत्र मिळायला ६ तास का वेळ लागला, त्याला ६ तासात कोणी शोधायला कसे गेले नाही, मित्राच्या खोलीत तो एकटा कसा होता वगैरे प्रश्न पण धूळ बसत असताना पडू लागले आहेत. अजून एक महत्वाचा प्रश्न वाचनात आला की त्याने काहीकाळ आधी कुलगुरूंना लिहीलेल्या एका पत्राची प्रत मिळाली, त्याने ते पाठवले का हे सिद्ध झालेले नाही. पण ते जर पाठवले असले तर त्यात त्याच्या मानसीक हताशपणाची कल्पना येते. जर ते पत्र पाठवल्यावर त्याचे (मानसीक अवस्थेचे) गांभिर्य लक्षात घेतले गेले नसले तर ते चूकच आहे, कारण काही असुंदेत...या संदर्भात सर्वच विद्यापिठांमधे कुलगुरू, पिन्सिपॉल, प्राध्यापकांना शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटते. असो.

लोकहो, ही घोषणा बघा : तुम कितने याकूब मारोगे? हर घरसे याकूब निकलेगा https://pbs.twimg.com/media/CZDdYbEUEAAGQbP.jpg:large कित्ती सुंदर घोषणा आहे, नाही? आवडली का? रोहित वेमुला कोणाच्या संगतीत होता ते कळतं. आ.न., -गा.पै. प्रश्न : वरील फलक हाती घेतलेल्या दोघांपैकी एक रोहितच आहे का?