सगळं सगळं ओरबडुन घेऊन
रात्र कणाकणाने वाढते
जोश, उर्मी......नष्ट करून !
चूरगळलेले भडक ओठ
आक्रसलेला पावडरच्या पुटांचा
चेहरा... ओळख नसलेला...निनावी....
परतीच्या वाटेला लागतो
परतण्यासाठी
मेलेल्या शरीराला वेसण घालून
मन ओढत नेते
जगण्याच्या शर्यतीतील भाग म्हणून !
गुरकावलेल्या अंडील पाड्यानी
कुस्करलेले शरीर प्रेताप्रमाणे
चालायला लागते......
लाल दिवेही शरमेने काळे पडतात
आधीच काळी असलेली निर्लज्ज रात्र
भेसूर हसते
रोजची मरणे बघून.....
कळापातून सुटलेल्या गाया
कसाईखान्यातून बाहेर पडतात
जिथे त्यांची रोज कत्तल होते.........
सगळेच बाटगे गोमास भक्षण करतात
आणि सकाळी धर्म पाळतात.....
गाया मात्र रात्री परत वळतात
कसाईखान्याकडे
रोजच्या कत्तलीसाठी !
विजयकुमार कणसे........
१७.०७.२००८
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1463
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
Asha goshtinaa dharm asato?
In reply to .. by मोगा
नाही हो!
In reply to .. by मोगा
नवलेखकांना प्रोत्साहन
नवलेखकांना प्रोत्साहन
कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली.
त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल.
इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.