लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लग्ना करुन ठेवलेले शाररिक
सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी
काका.. सनीबाइ जे करत होत्या
गंमतीचा भाग म्हणजे सनीबाईंनी
पि रा ताई
मुलं जन्माला येतातच, औरसत्व
एका इंग्रजी पुस्तकात वाचलं
त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला
माझ्या मते
काही लग्न बिग्न नको. पार्टनर
मुलेबाळे, त्यांच्या शाळा,
सांगायचा उद्देश हा की ह्योच
सांगायचा उद्देश हा की ह्योच
मस्त ज्योक आहे !
असं कसं चिमणेश! तक्रारी करणे
असं कसं? काढाचं ओ तुम्ही धागा
आज मुली उच्चशिक्षित आणि
भारतात अमेरिकन संस्कृती येत
-१०००
लट्टू काका , तुम्ही टनाटन
वास्तविक लिव्ह इन रिलेशन हे फक्त लिट्मस टेस्ट म्हनु शकता
लिव्ह इन मध्ये पुर्ण आयुष्य निघत नाहि आणि ते कढु हि नये.
काय दादा कसे आहात? फार वेळ
:-)
अगदी सिनेमा
+१
नवरा - बायकोचे भांडण - चिंतन
नवरा - बायकोचे भांडण - चिंतन:
+१००००००...
नवरा - बायकोचे भांडण - चिंतन:
न विचारलेलो सल्लो
योग्य सल्ला
मांगके साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार !
विठाकाका...
पण लग्न न करता एकत्र राहुन जर
विठाकाका, हेलाकाका, मोगा मौसि
आमची एक लांबची आत्या स्त्री
एकूण काय ...
लग्न हा केव्हाही दोन्ही पक्षी
थोडासा गैरसमज होतोय.. आणि खरं
तुम्हाला अनुमोदन
पिरा, उत्तम प्रतिसाद.
अगदी नेमकं लिहीलंत. लग्न करा
पिरा ताई
सही!
असं नाही !
१००% सहमत
पण जिथे सामाजिक गरज म्हणुन
+१
इथली चर्चा वाचूनच बहुधा