Skip to main content

खरीच गरज आहे का?

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 29/12/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज. प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.

वाचने 26453
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

Money is not everything. But make sure you have loads of it before saying this. असं वॉरन बफेने म्हटल्याचं ऐकलं आहे.

बहुधा मानव जन्मात मनात जेव्हा वरील ही भावना जोपासली जाईल तेव्हा क्षणिक आनंद, भौतिक सुख व निरंतर समाधान यांचा फरक अनुभवतील, तोवर आहेच उर फुटेस्तोवर धावणे.

चैन वगैरे गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. एखाद्या फुटपाथ वर राहणार्या माणसाला झोपडीत राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते, झोपडीत राहणार्या माणसाच्या दृष्टीने चाळीत राहणारा, चाळीत राहणार्याच्या दृष्टीने flat मध्ये राहणारा, तर flat वाल्याना बंगल्यामध्ये राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते. प्रत्येक माणसाने आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावे असे मला वाटते. फक्त त्यासाठी लागणारा पैसा प्रामाणिकपणे कमवावा. चोऱ्या माऱ्या करून, भ्रष्टाचार करून न्हवे. प्रामाणिकपणे पैसा कमवून प्रत्येकाने antilia सारखे घर बांधले तरी चालेल.

धागा आणि प्रतिक्रिया वाचून दमले. वेळ कमी असल्याने मिपावर येणे ही आज चैन आहे. खरे तर ती जीवनावश्यक गरज म्हटली पाहिजे.

अतिशय फालतू विषयावरचा तेवढाच फालतू लेख आणि पब्लिक चढ ओढीने उत्तरे देत आहे झुंजी लावून श्री श्री रा रा रा लाटकर काकासो ( बघा , नीट पूर्ण नाव लिहिले आहे लेखकाच्या विनन्तिनुसार) चला सगळे, आता कुठे तरी दुसर्या धाग्य वर जाऊ वि सु : हि प्रतिक्रिया सर्व लिखाणा साठी blanket प्रतिक्रिया आहे (कुणाच्या लिखाण ला? असे कोण म्हणते आहे?)