Skip to main content

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 04/12/2015 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/963… मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

वाचने 66781
प्रतिक्रिया 384

प्रतिक्रिया

In reply to by प्रदीप

यात अमेरिकन, ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटीश व स्थानिक चिनी असे सर्वच-- हे नामकरण अधिकृत रीत्या झाल्यावर त्या शहरास नव्या नावाने संबोधू लागले. नामकरणाआधी देखील लुफ्तांसा एअरलाईनच्या नकाशात "बाँबे (मुंबई)" असे पाहीले होत आणि सुखद धक्का बसला होता. आत्ता देखील जुने मराठी मुंबईकर (त्यात पुण्यापर्यंतचा भाग आला ;) ) बर्‍याचदा सवयीने "बाँबे"च म्हणताना ऐकतो. तर बरेचसे महाराष्ट्राबाहेरील अमराठी हे मुंबई म्हणताना ऐकले आहेत. (अर्थात मर्यादीत विदा आहे!) पण त्याचेही मला इतके काही वाटत नाही. (जरी मला मुंबईच म्हणायला आवडत असले तरी) पण अमेरीकेतील भारतीय जेंव्हा शास्त्रीय अथवा इतर कुठल्याही लेक्चर/प्रेझेंटेशन मधे रिव्हर गंगा म्हणायच्या ऐवजी रिव्हर गँजीस म्हणतात तेंव्हा डोके फिरते.... असो.

In reply to by विकास

रिव्हर गंगा म्हणायच्या ऐवजी रिव्हर गँजीस म्हणतात तेंव्हा डोके फिरते
सहमत.

In reply to by विकास

स्लमडॉग मिलिनियेअर जेव्हा प्रसिध्द झाला त्यानंतर चित्रपटामधल्या कलाकार/दिग्दर्शक मंडळींची मुलाखत पाहीली होती. त्यात डॅनी बॉयल न चुकता नेहेमी मुंबई मुंबई असाच उल्लेख करत होता मात्र चित्रपटातील हिरोईन फ्रेडा पिंटो मात्र नेहेमी बॉम्बे असाच उल्लेख करत होती. ह्या इंटरव्यु नंतर फ्रेडा पिंटो कायमचीच डोक्यात गेली. माझ्या कंपनीतही एक गुजराथी स्त्री कलिग आहे. मुंबईत पार्ल्याला राहते. जेव्हा कधी मुंबईचा उल्लेख चर्चेत येतो तेव्हा न चुकता बॉम्बेच म्हणत राहते. पण मद्रास वगैरेचे मात्र व्यवस्थित चैनै असा उल्लेख करते. अश्या लोकांना मी हाय क्लास पिपल विथ थर्ड क्लास मेंटॅलिटी असे म्हणतो.

In reply to by प्रदीप

धन्यवाद प्रदीपजी! बघा, गोव्याच्या बाबतीत नसलं तरी कुठं ना कुठं तरी तुमचं आणि आमचं एकमत आहे!!! :)

In reply to by संदीप डांगे

बाकी काही असो, पण औरंगाबाद शहर औरंगजेबाने वसवले नाही तर फक्त रीनेम केलेले आहे- नाशिकचे गुलशनाबाद आणि मिरजेचे मूर्तजाबाद वगैरे. यादवकाळापासून ते शहर अस्तित्वात आहे. त्याचे जुने नाव खडकी असे होते. अन फक्त नामांतराने काही होत नसले तरी प्रत्येक पोलिटिकल पॉवर आपापल्या आयडिऑलॉजीप्रमाणे नावे बदलणे, भाषा बदलणे इ. करतच असते. त्यात विशेष ते काय?

In reply to by बॅटमॅन

तुमचे म्हणणे रास्तच आहे. ही शहरे अगदी पुराणकाळापासून असतील. पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ‍ॅडिशन करूनच नामकरण केले असेल ना? (म्हणजे केले की नाही ते माहित नाही मला,) कि नुस्ता आयत्या शहरावर नाव माझं असं केलं? माझ्या माहितीनुसार नाशिकची फुले त्याला आवडायची म्हणून त्याने नाशिकचे नाव गुलशनाबाद केले. नामकरण करण्याला माझा विरोध नाही पण ते तेव्हाच योग्य वाटतं जेव्हा तुम्ही त्या शहराचा, वास्तूचा, संस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकता. त्यावेळी आपण केलेल्या कष्टाचे प्रतिक म्हणून नाव देणे, बदलणे योग्य आहे. पण आपल्याकडे सत्तेत असलेली लोक फक्त नावं बदलायचे पराक्रम करतात ते अजिबात योग्य नाही. बेंग्लोर चे बंगरुळू झालं ते तीथे झालेल्या सॉफ्टक्रांतीमुळे बदललेल्या शहराला शोभतंही. पण कलकत्ता चे कोलकाता होऊनही गचाळपणा कायम राहत असेल तर उपयोग नाही. पॉलिटिकल आयडॉलोजी काय करायची तिथे. सारे जनमत भडकवण्याचे आणि केंद्रीकरणाचे उद्योग. जमीनी फायदा काहीच नाही.

In reply to by संदीप डांगे

पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ‍ॅडिशन करूनच नामकरण केले असेल ना?
तसे तर काय दिसत नाय ब्वा. कुठे विदा असल्यास बघायला आवडेल. पण नामांतर करण्याचा घाट घातला की लगेच "नामांतर आणि प्रगती" ची लिंक लावणे याला कै अर्थ आहे? बहुतेकदा बदल खुपणारी लोक्सच या लिंकेआड दडून वार करू पाहतात. त्यांच्या जुन्या अस्मितेला धक्का पोचलेला चालत नाही त्यांना. अस्मितांचे युद्ध आणि बेसिक गव्हर्नन्स यांची गल्लत का करावी? जशी आपली अस्मिता आहे त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावा किंवा उदासीनही रहावे- चॉईस ज्याची त्याची. पण नामांतराला असा शालजोडी विरोध काही कामाचा नाही असे आपले माझे मत.

In reply to by बॅटमॅन

अहो मी प्रश्न विचारला आहे. उत्तर माहित असते तर विदाच दिला असता की. "नामांतर आणि प्रगती" अशी लिंक लावू पाहणार्‍यांच्या 'जुन्या अस्मिता असतात आणि त्यांना धक्का लागतो म्हणूनच विरोध होतो' हे कसे ठरले? नामांतरास विरोध असणारे न्युट्रल नसू शकतात काय? माझे मत: नामांतर वैगेरे चळवळी फक्त राजकिय अस्मितेवर आधारित आहेत. त्याने नक्की काय फायदा होतो हे कळत नाही. नुकसान होते हे मात्र कळते. मी सरसकट नामांतर विरोधात आहे असे ही नाही हे वरच्या प्रतिसादात दिलंय. बर्‍याच नामांतर चळवळीमध्ये हेकटपणा, जबरदस्ती, वैचारिक बैठक व इतिहासाचा शून्य अभ्यास असतो हे दिसून येते. ह्यास माझा विरोध आहे. नामांतराची निकड ज्यांना भासू लागते त्यांच्याकडे करण्यासारखी इतर काही विधायक कामे नाहीत असे वाटते. औरंगाबादचे संभाजीनगर करू नका असे मी म्हणणार नाही. करायचे असेल शहर मुळापासून बदलण्याच्या मोहिमेचा तो एक भाग असू द्यावा. नुसत्या खिंडारांवर संभाजीराजांचं नाव लावणे पटणेबल नाही. बाकी 'जुन्या अस्मितांना धक्का लागणे' हा शब्दप्रयोग आपण काय हेतुने केला ते कळले तर आभारी राहीन.

In reply to by संदीप डांगे

नामांतरास विरोध असणारे न्युट्रल नसू शकतात काय?
अगदी असू शकतात, नव्हे अनेकजण असतात. आणि तसे मी अगोदरच्या प्रतिसादात म्हटलेही आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करू नका असे मी म्हणणार नाही. करायचे असेल शहर मुळापासून बदलण्याच्या मोहिमेचा तो एक भाग असू द्यावा. नुसत्या खिंडारांवर संभाजीराजांचं नाव लावणे पटणेबल नाही.
सहमत.
बाकी 'जुन्या अस्मितांना धक्का लागणे' हा शब्दप्रयोग आपण काय हेतुने केला ते कळले तर आभारी राहीन.
एक उदाहरण- बाँबे ऐवजी मुंबई या नामांतरणामुळे कॉस्मॉपॉलिटन चेहरा हरवला, नैतर काय होतं बाँबे, सध्याची घाटी मुंबै, इ.इ. छाप गळे काढणारे लोक अधूनमधून आपले लेखरूपी पो टाकत असतात त्यातून याची झलक मिळावी. आपली कल्चरल सद्दी संपल्याचे दु:ख ज्यांना असते ते असे बोलतात. त्यांसंदर्भात हा शब्दप्रयोग केला होता.

In reply to by बॅटमॅन

अच्छा. आलं ध्यानात. तरी 'मुंबई'वर सूड उगवण्यासाठी त्यांनी 'सोबो' पक्षी 'साउथबॉम्बे' हा हुच्च्ब्रू प्रकार शोधून काढला.

In reply to by बॅटमॅन

तरी प्रत्येक पोलिटिकल पॉवर आपापल्या आयडिऑलॉजीप्रमाणे नावे बदलणे, भाषा बदलणे इ. करतच असते. त्यात विशेष ते काय?
गोव्यात 'ती' पोलिटिकल पॉवर आजवर अनेक वर्षे पर्रीकरांच्या रूपात होती. त्यांनी हे उद्योगधंदे केले नाहीत. ते खरे गोवेकर आहेत. आता ते दिल्लीत गेल्यावर हे बाहेरचे लोकं हे उद्योग करताहेत. उद्या जर कानडी लोकांनी पुण्यातल्या कॅम्पाचं 'चामुंडरायनगर' म्हणून नामकरण करा अशी मागणी केली तर दैनिक सकाळ मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराची काय अवस्था होईल? =))

In reply to by पिवळा डांबिस

उद्या जर कानडी लोकांनी पुण्यातल्या कॅम्पाचं 'चामुंडरायनगर' म्हणून नामकरण करा अशी मागणी केली तर दैनिक सकाळ मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराची काय अवस्था होईल?
बेळगाव परिसरार यळ्ळूर नामक एक गाव आहे. कर्नाटकात असूनही ग्रामस्थ "महाराष्ट्र राज्य" अशीच पाटी लावतात कायम. =)) तितके चिवट असतील तर म्हणतीलही, नैतर काय? =)) बाकी मिरजेचे नामांतरण मूर्तजाबाद असे केले जात नाही तोवर आम्हांला नामांतराची तादृश चिन्ता नाही हे खरेच. ;) तरी एक कल्चरल सिंबॉल म्हणून हे केले जाते आणि त्यात वाईट काही नाही असे माझे मत आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

बेळगाव परिसरार यळ्ळूर नामक एक गाव आहे.
तो वेगळा विषय आहे. सीमाभागातल्या जनतेने त्यांचं कर्नाटकात घातलं जाणं अजूनही मान्य केलेलं नाहिये. ते स्वतःला अजूनही महाराष्ट्राचाच भाग मानतात. त्या लोकांविषयी अतीव म्हणजे अतीव आदर आहे. गोव्याचं तसं नाहिये. गोवेकरांनी बहुसंख्येने महाराष्ट्रात सामील न होता त्यांचं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखायाचा मतदानातर्फे निर्णय घेतलाय. तेंव्हा आता गोव्याच्या बाहेरच्यांनी त्या मतदानाचा आदर राखून गोवेकरांना जे काही हवंय ते केलं पाहिजे.

In reply to by पिवळा डांबिस

त्याना रेशन , शाळा , वीज , पाणी कोण पुरवतं ? महाराष्ञ्र की कर्नाटक ? जर त्यांच्या गरजा कर्नाटक पुरवत असेल तर पोसणारा नवरा एक आणि बाई नवरा बोलते दुसर्‍यालाच , असं त्या संत मीराबैसारखं का करायचं म्हणे ?

In reply to by मोगा

है शाबास आम्हाला वाटलं तुमचा आय डी उडाला काय? बाकी -- त्यांना महाराष्ट्रात घ्या त्यांचं रेशन पाणी वीज शाळा कॉलेज महाराष्ट्र बघेलच हो. म्हशीची शिंगं म्हशीला जड नसतात. काळजी नसावी. आपलीच माणसं आहेत.

In reply to by सुबोध खरे

आधी महाराष्ट्रात घ्या . मग बोर्ड लावा की. अपली शिंगं दुसर्‍याच्या डोक्यावर बसवुन शिंगाने व म्हशीने एकमेकांवर कसं प्रेम करायचं बुवा ?

In reply to by मोगा

विनोदाचा प्रयत्न इतकासा बरा नव्हता ! "रेशन , शाळा , वीज , पाणी, हे दान म्हणून मिळते की विकत घेतले जाते ?" हा प्रश्न बहुदा तुम्हाला गैरवाजवी वाटला असेलच नाही का ??? =))

In reply to by मोगा

माझा प्रतिसाद ध्यानात आला नाही की ध्यानात आणून घ्यायचा नाही ?! बहुदा दुसरेच ! त्यामुळे चालुद्या तुमचं आत्मकुंथन ! असे विनोद फार कमी लोकांना करता येतात =))

In reply to by मोगा

क्या मिया कितना खयाली पुलाव पकाते! दस सालासे तो दस अल्लग अल्लग आयडी से दस अल्लग अल्लग धागे डाले कि नयी मुंबई मे इधर फ्लॅट लेउ कि उधर लेउ....और कहा तुम सल्तनक कि बाता करते...वैसे वो फोटो डाला था ना लास्ट टाईम खुदका वो देखके बहोत बुरा लगा मेरे को, मिया जहा रोज खुद कि बेईज्ज्ती करा लेते हो वहा पर अ‍ॅट्लीस्ट अपने फॅमिलि का फोटो नहि देना चाहिये, तुम्हारे तरफ देखते हि पता चल्ता है मिया एक नंबर के चींधी चोरा है तुम्..

In reply to by मोगा

जे काश्मिरी लोक इथलं खातात आणि नापाकिस्तान, इसिस चे झेंडे फडकवतात त्यामगचा त्यांचा आणि तुमचा विचार सारखाच वाटतो सर.

In reply to by सुबोध खरे

एका घरावर पाकिस्तान लिहुन काय होणार ? आमचा नथुराम म्हणायचा तीन्ही मिळून अखंड हिंदुस्तान व्हावा ! ... अखंड हिंदुस्तानवादी ब्यारिस्टर मोगा

In reply to by मोगा

एकडाव तुमची मते काय ती सपस्ट मांडा , एक धागा च् टाका. तेव्हा मग जब तक सूरज चाँद रहेगा तबतक तुम्हारा ये धागा रहेगा। तुमचे महणने न कल्लेला. योक अडाणी.

In reply to by बॅटमॅन

यादवकाळापासून ते शहर अस्तित्वात आहे. त्याचे जुने नाव खडकी असे होते.
खडकी नावाची व्युत्पत्ती मोठी मजेदार आहे. हे नाव 'कटक' ह्या शब्दावरुन आले आहे. कटक म्हणजे सैन्याचा तळ. वेरूळच्या दशावतार लेण्यातील राष्ट्रकूट सम्प्राट दंतिदुर्गाच्या शिलालेखात कटकाचा उल्लेख आहे. तदनंतर लीळाचरित्रात कटकाचे कित्येक उल्लेख आहेत. कण्हदेवो कटकी आला संगे महादेव धाकुटा होता. ह्यातील कण्हदेव म्हणजे महापराक्रमी सिंघण (दुसरा) ह्याचा पुत्र आणि रामदेवरायाचा पिता कृष्णदेव. तर महादेव म्हणजे ह्या कृष्णाचा धाकटा भाउ. कटकचे कटकी आणि कटकीचे खडकी.

In reply to by प्रचेतस

आणि मग पुण्याची खडकी? तिच्या नावाची उत्पत्ती आणि तिथला मिल्ट्री एरिया यांचा काही संबंध आहे का? खडकी या नावाने आजुन बक्कळ गावे आहेत महाराष्ट्रात त्या प्रत्येक ठिकाणी सैनिकी तळ असावा का? गावांची नावे हा खुप माहीतीदायक विषय होईल, कारण प्रत्येक नावामागे थोडा का होईना इतिहास लपलेला असेल.

In reply to by संदीप डांगे

आपल्याला हा नामकरण प्रकारच पटत नाय बॉ. वीटीचे सीएसटी केले,
मी अजुनही व्हीटीच म्हणतो आणि मद्रास पण.

गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा ह्यांचे मत जाणुन घ्यायला आवडेल ! https://en.wikipedia.org/wiki/Goa_Inquisition बाकी आम्ही नामांतर चळवळीचे कट्टर समर्थक आहोत ! वास्को दा गामा ह्यांचे खरेच काही भव्य दिव्य योगदान असले तर त्यांच्घे नाव जरुर ठेवावे , (पण किमान आमच्या माहीतीत तरी तसे काही नाही), तस्मात नामांतर जरुर व्हावे ! संभाजी नगरच असा हट्ट नाही , अगदीच जुने नाव माहीत असल्यास जुने नाव द्या अन्यथा कोणत्याही सुप्रसिध्द गोवेकर्‍याचे नाव द्या :) आणि कृपया ह्या नामांतरला हिंदु विरुध्द खिर्श्चन असा रंग देवु नये, मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे ! काही लोकांना वाटते की नावे बदलुन काय होणार आहे ? पण नावाचा इम्पॅक्ट खुप खोलवर असतो , एखादी गोष्ट सतत बिंबवत गेल्याने तीच मनावर ठासली जाते साधे सोप्पे मानसशात्रीय अनुमान आहे हे !

In reply to by प्रसाद गोडबोले

काही लोकांना वाटते की नावे बदलुन काय होणार आहे ? पण नावाचा इम्पॅक्ट खुप खोलवर असतो , एखादी गोष्ट सतत बिंबवत गेल्याने तीच मनावर ठासली जाते साधे सोप्पे मानसशात्रीय अनुमान आहे हे !
केवळ नामांतरामुळे इम्पॅक्ट झालेली अशी काही उदाहरणे देऊ शकाल काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

इन्क्विझिशनबद्दल मी काय मत देणार? ते झालं होतं हे खरं आहे. खुद्द माझ्या पूर्वजांना त्याची झळ बसलेली आहे. पण ते इन्क्विझिशन करणारे पाद्री/ राज्यकर्ते आता गोव्यात हजर नाहियेत की त्यांचे डायरेक्ट वंशजही. हे आहेत ते आपलेच भारतीय रक्ताचे लोक आहेत. त्यांचा धर्म वेगळा असला तरी संस्कृती भारतीयच आहे. सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला असेल पण बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे. ते दिवाळी साजरी करत नसतील पण ख्रिसमसला करंज्या, कडबोळी आणि चकल्याच करतात! त्यांच्याशी प्रेमानं वागायचं की वाद का उकरून काढायचा?
आणि कृपया ह्या नामांतरला हिंदु विरुध्द खिर्श्चन असा रंग देवु नये
तो रंग मनात ठेवूनच तर हा वाद् उकरला जातोय. नाहीतर गोव्यातल्या एखाद्या गावाला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याचे नांव सुचवायची गरजच काय? लोकं काय दुधखुळी आहेत काय? बाय द वे, हापुस (अल्फान्सो) आंब्याचंसुद्धा आता राघोबाआंबा असं नामकरण करा!!! :) कारण ते ही नांव अल्फान्सो द अल्बुकर्क ह्या गोव्याच्या गव्हर्नराच्या नांवावरून ठेवलं गेलेलं आहे!!

In reply to by पिवळा डांबिस

बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे.
ओके . ही खरेच वस्तुस्थिती आहे की नाही , त्या संबंधी काही पुरावे आहेत की नाही हे मला माहीत नाही , ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही पण आधी महाराष्ट्र विरुध्द गोवा => हिंदु विरुध्द खिर्श्चन => सवर्ण विरुध्द इतरेजन ( आता आणि ह्या नंतर = > ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर ) हा चर्चेचा लॉजिकल प्रवाह मी ओळखुन आहे :)
बाय द वे, हापुस (अल्फान्सो) आंब्याचंसुद्धा आता राघोबाआंबा असं नामकरण करा!!! :) कारण ते ही नांव अल्फान्सो द अल्बुकर्क ह्या गोव्याच्या गव्हर्नराच्या नांवावरून ठेवलं गेलेलं आहे!!
सर्वप्रथम अल्फान्सो चे हापुस केले इतके पुरेसे आहे , शिवाय अल्फान्सो द अल्बुकर्क च्या आधी हा आंबा नव्हताच काय ? ह्या माणसाचे काय योगदान ? त्याने विकसीत केली का ही आंब्याची प्रजाती ? तुम्ही आज जे नांमांतर होते त्याला आक्षेप नोंदवता मग इतिहासात जे नामांतर झाले त्याला आक्षेप का बरे नोंदवत नाही ? बाकी संदीपजींनी विचारले की नामांतराने असा काय फरक पडतो उदाहरणे द्या : मला एक उदाहरण आठवते की १९५५ साली बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यावर कित्येकांन्नी नामांतरही केले आणि त्याचा बहुतेक चांगला परिणाम झाला . सातार्‍यातही कित्येक मुलींची नावे "नकोशी" असे होते , अत्ता नुकतेच त्या मुलींची नावे बदलली गेली . शिवाजी महाराजांनी भाषाशुध्दी करता राज्यव्यवहारकोष बनवला त्यातही अनेक फारसी नामे बदलुन पर्यायी मराठी नावे सुचवली गेली , असे का बरे केले असेल महाराजांन्नी ? असो , आमच्या मते आपण मानसिक गुलामगिरीतुन बाहेर पडणे गरजेचे आहे आणि ह्याची सुरुवात नामांतराने होवु शकते ! वास्कोला हिंदु मराठी सवर्णाचे नाव द्यायचे नसेल तर ज्या कोणी ख्रिश्चन माणसाने लोकांच्या भल्याचे काम केले असेल त्याचे नाव द्या , वाटल्यास ख्रिस्तपुर नाव द्या ... काही हरकत नाही :) असो ह्या विषयावर आपला जास्त अभ्यास नाही म्हणुन तुर्तास थांबतो ... पुढील चर्चेला शुभेच्छा ! अवांतर : बाकी कंपुबाज लोकहो , ते सनबर्न फेस्टीव्हल ला जायचे काय झाले राव ?

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही पण आधी महाराष्ट्र विरुध्द गोवा => हिंदु विरुध्द खिर्श्चन => सवर्ण विरुध्द इतरेजन ( आता आणि ह्या नंतर = > ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर ) हा चर्चेचा लॉजिकल प्रवाह मी ओळखुन आहे
एकीकडे अभ्यास नाही म्हणता आणि दुसरीकडे ओळखून आहे म्हणता. तुमचं खरं काय ते तुम्हालाच माहिती!!! :)
शिवाय अल्फान्सो द अल्बुकर्क च्या आधी हा आंबा नव्हताच काय ?
तुमच्या माहितीसाठी... पोर्तुगीजांच्या पूर्वी हा आंबा भारतात नव्हता अशी माहिती आहे. पोर्तुगीजांनी हे कलम ब्राझीलमधून (जी सुद्धा पोर्तुगीजांचीच वसाहत होती) भारतात आणलं आणि भारतातल्या स्थानिक (बहुदा रायवळ) आंब्यावर त्याचं कलम केलं. ज्या काळात ही गोष्ट घडली त्या काळात अल्फान्सो द अल्बुकर्क हा गोव्याचा गव्हर्नर होता. म्हणून बहुदा त्याचं नांव ह्या नव्या कलमाला दिलं गेलं असावं. आजही ब्राझिलमधून ही जात एक्सपोर्ट होते, अमेरिकेत तिला केन्ट मॅन्गो हे नांव आहे. आपल्या हापुससारखाच पण आकाराने हापुसच्या जवळजवळ तिप्पट असा आंबा असतो. चव तीच पण त्याला हापुससारखा वास नसतो. तो वासाचा गुणधर्म बहुदा आपल्या स्थानिक रायवळ आंब्याकडून आला असावा....

In reply to by पिवळा डांबिस

हा आंबा भलेही पोर्तुगिजानि आणला असेल पण त्याची उत्तम जात कोकणात देवगड भागात जोपासलि गेली. इथे जात म्हटले तर परत आक्षेप येतील कारण कलम तेच पण चवित पुष्कळ फ़रक. कोकणात पार अलीबाग पासून बाँदया पर्यन्त हापुसचि लागवड होते. मात्र देवगड़ हापुस सर्वश्रेष्ठ मानला जातो. देवगड़ भागात असलेल्या खाडिच्या आसपासच्या डोंगरावर कातळात लावलेला हापुस चवित उत्तम असतो. चवीबद्दल कोणाला वाद घालयचा असेल तर त्यांनी ह्या भागात फिरून खरा आंबा खावा. कारण या देवगड़ भागातील हापुस मुंबई पुण्यात अपवादाने मिळतो. सर्व माल गल्फ , यूरोपला जातो. पुणेकर ,मुंबईकर खातात ते रत्नागिरी ,चिपळून चा हापुस. जो जास्त गोड असतो पण ज्याला मधुरपणा म्हणतात (देवगड़ हपुससारखा) तो नसतो. असो हे अवांतर झाले. बाकी चर्चा छान जमुन राहिली आहे. बैटमन ,पिंडा, ट्रूमैन. च्या मारी कोणत्या बोटित बसु तेच कळेना झालय

In reply to by भंकस बाबा

मात्र देवगड़ हापुस सर्वश्रेष्ठ मानला जातो. देवगड़ भागात असलेल्या खाडिच्या आसपासच्या डोंगरावर कातळात लावलेला हापुस चवित उत्तम असतो.
सहमत. 'देवगडचा हापुस, सगळ्या हापुसचा बापुस!' :)
कारण या देवगड़ भागातील हापुस मुंबई पुण्यात अपवादाने मिळतो. सर्व माल गल्फ , यूरोपला जातो.
ह्याच्याशीही सहमत. ज्यांच्या कडे 'घरची' टोपली/पेटी येते त्यांनाच हा आस्वाद माहिती. आणि घमघमाट कसला! घरात पेटी आली की सगळ्या बिल्डींगला पत्ता लागे की, 'ह्यांच्याकडे आंबे आले!' मग पुढील काही दिवस शेजार्‍यांची काहीना काही निमित्त काढून घरी रीघ लागे!!! (कशाला जुन्या आठवणी काढायला लावता?) :(

In reply to by पिवळा डांबिस

सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला असेल पण बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे. ते दिवाळी साजरी करत नसतील पण ख्रिसमसला करंज्या, कडबोळी आणि चकल्याच करतात! त्यांच्याशी प्रेमानं वागायचं की वाद का उकरून काढायचा?
सहमत!! नुसती नामांतरं करुन परिस्थिती बदलणार आहे का? आणि तसं बघायला झालं तर इन्क्विझिशन्स करणारे गेले निघून, आता ऊर बडवून काय उपयोग? आणि त्याला कारणही आपलेच लोक होते की! गोर्‍यांनी शिवलं, बाटला!! गोर्‍यांच्या हातचं काही खाल्लं, बाटला!! आणि अशा सो कॉल्ड बाटग्याला आपलेच लोक गावाबाहेर काढत असत. इन्क्विझिशन्स सोपे करुन दिले आपल्याच लोकांनी, अरे एवढीच चाड होती तर एखाद्या पादर्‍याला जानवं घालून आता तू हिंदू झालास असं का नाही ठणकावलं च्यायला!!

In reply to by सूड

बाकी मांडोवी आणि झुआरी नद्यांमध्ये गंगेचे पाणि आणि गोमुत्र शिंपडल्याने हे काम अधिक सहज होईल का :) ? ((ह.घ्या.)

In reply to by सूड

आम्ही स्विकारतोच हो तुम्ही जानव्याचा विषय काढला म्हणून त्या पेक्षा सोपा उपाय सांगितला, पण जसे आहे तसे स्विकारणे सर्वाधिक चांगले आणि सोपे य बद्दल सहमत. भारतात राहता म्हणून तुम्ही आमचे, विवीध गोष्टी मनोभावे करता म्हणुन तुम्ही आमचे. हे सोपे आणि चांगलेच

In reply to by माहितगार

ते मी ते लोक इन्क्विझिशन्स करत होते तेव्हाचं म्हणतोय. तेव्हा आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना बाटगे म्हणून बाहेर काढलं त्याबद्दल बोलतोय. आताचं म्हणाल तर कोणाचा धर्म काय आहे त्याच्याशी मला शष्प देणं घेणं नाही.

In reply to by सूड

सहमत आहे. भारतीय भाषांसाठी भारतीय लिपी शिवाय इतर लिपी वापरण्यासारखे जाणीवपुर्वक उद्योग जरा खूपतात बाकी काही देणे घेणे नाही.

In reply to by माहितगार

इन्क्विझिशन्स च्या काळात ज्यांनी धर्मांतराला नकार दिला त्यांना फाशी दिले जात असे या फाशी देण्याचा हुक आमच्या वास्कोच्या नौदलाच्या जीवन्ति रुग्णालयाच्या एका वडाच्या झाडाला अजून दिसतो. (हि जागा अगोदर पोर्तुगीजांच्या तळा ची होती). झाड रुंद झाल्याने हुक लावलेली लोखंडी साखळी झाडात रुतून बसलेली हि दिसते. प्रत्येक वेळेस ते पाहताना माझ्या हृदयात कालवा कालव होत असे. या कारणांसाठीच तेथील गुलामगिरी आणी अत्याचाराच्या आठवणी पुसल्या पाहिजेत.यात त्यांची नावे हि येतात.

In reply to by पिवळा डांबिस

बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे
नाही हो.. असली काही आमिषं दाखवायचं शहाणपण पोर्तुगीजांनी दाखवलं असेल असं काही वाटत नाही. त्यांच्या एकूणच पॉलिसीमधे 'सवर्णांचं धर्मान्तरण' यालाच जास्त महत्व दिल्याचं दिसतं. दुसरं, गोव्यातील ख्रिश्चन लोक अगदी नीट जाती पाळतात. धर्म बदलला म्हणून जात हा फॅक्टर संपला असं कधी झालंच नाही. अगदी पोर्तुगिजाळलेले लोकसुद्धा जातीच्या बाबतीत कट्टर असतात हे कायम दिसणारं चित्र आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदीच जुने नाव माहीत असल्यास जुने नाव द्या
हे शहरच मुदलात पोर्तुगिजांनी १६ व्या शतकात वसवले आणि त्याला वास्को द गामाचे नाव दिले (हे त्यांच्या दृष्टीने ठीकच). तेव्हा त्याला जुने नाव काहीही नाही. तसे वसवा एखादे (स्मार्ट) शहर आणि द्या त्याला हवे ते नाव. काऽऽऽही हरकत नाही!!! नामांतराचा उपद्व्याप नको. बाकी संभाजी महाराजांचे गोव्यात यथोचित स्मारक फोंड्याजवळील फर्मागुढी येथे आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे ! १९१० साली सेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या नावाने त्यांच्या वारसांनी रुपये बारा लाख (फक्त) हे वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी दिले. तेंव्हा सोन्याचा भाव ७ रुपये तोळा (१२ग्राम) होता.आजच्या भावाने हि रक्कम जवळ जवळ ५०० कोटी इतकी होईल त्याला कोणत्या तरी नतद्रष्ट राजकारण्याचे( ज्याचा वैद्यकीय क्षेत्राशी काडीचाही संबंध नव्हता) नाव देण्याचे घाट घातले जात होते. त्याला तेथील आजी आणी माजी विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला आणी म्हणून ते नामांतर टळले.

मी दमलो, रात्रीचे साडेबारा वाजून गेले. आता मी झोपतो. तुम्ही तुमचं चालू द्या.... श्री. उडन खटोला, तुमच्यावर आमचा वैयक्तिक रागलोभ वगैरे नाही. तुमच्या धाग्यातलं जे खटकलं ते तुमच्या नजरेसमोर आणायचा प्रयत्न केला. आणि मग हे रामायण घडलं!!!! :) तरी चूभूद्या घ्या...

एकुण धाग्याचा सूर असा आहे की संभाजी सारख्या बाहेरच्या माणसाचे नाव द्यायच्या ऐवजी गोव्याच्य भूमीतील सुपुत्राचे नाव द्यायला हवे. त्यामुळे वास्को शहराचे नाव बदलुन ते "मनोहरनगर" करावे असा प्रस्ताव मी मिपामंडळासमोर मांडतो. आपण मोठ्या संख्येने अनुमोदन करुन हा प्रस्ताव तडीस न्यावा आणि सरकारवर दबाव टाकावा अशी सर्व मिपाकरांना आणी नीलकांतला णम्र विणंती.

नामांतरामुळे नक्की काय साधणार आहे. औ बाद चे संभाजीनगर करणे वगैरे मुळे लोकाम्च्या पुढे चघळायला कडबा याशिवाय काहीच पदरात पडत नाही. बाँबे चे मुंबै झाल्यामुळे असा काय फरक पडला आहे?

पोर्तुगीजांच्या जुलूमी राजवटीच्या संदर्भात कै. तांबे ह्यांनी इथे वसईबद्दल एक लेख लिहीलेला होता. त्याचा दुवा कुणी कृपया देईल काय?

In reply to by मालोजीराव

अस काही नाहीये. मुळात नामांतर झाल नाही तरी काहीही फरक पडत नाही. पण ज्या संभाजीराजांनी इथे राज्य नाही केल त्यांच नाव द्यायचा अट्टाहास का?

In reply to by प्रीत-मोहर

बायदवे वास्को द गामाने तरी गोव्यावर राज्य केलं का कधी? त्याला मानणार्‍या पोर्तुगीजांनी त्याच्या स्मरणार्थ शहराचे नाव ठेवले. सध्याची मागणीही तीच आहे. संभाजीराजांना मानणारे लोक त्यांचे नाव ठेवा अशी मागणी करताहेत.

In reply to by बॅटमॅन

इथले प्रतिसाद वाच, संभाजीराजांना काय काय नावाने हिणवलंय बघ.एकंदर नामांतर झालं तर "काहीही फरक पडणार नाही " अस म्हणता येणार नाही Backdoor move to rename Vasco after Maratha king?

In reply to by मालोजीराव

अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये अशी कीडही कार्यरत आहे हे पाहून रोचक वाटले. फक्त छत्रपतीच नव्हे तर एकुणात मराठी माणसाचाही द्वेष कसा मस्त ठासून भरलाय.

In reply to by बॅटमॅन

तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे रोचक प्रकार असेल. त्या शिवाय डेमोग्राफीक बदलात फुलं न फुलाची पाकळी बदल करणे हाच कोणत्याही घेटोवर उपाय असू शकतो असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

फक्त मराठी नाही तर तिथे भारतीय लोकांबद्दल द्वेष आहे. अजूनही तिथले काही लोक मनाने पोर्तुगीज आहेत. आणि कित्येक हॉटेल्समधे फक्त परदेशी लोकानाच प्रवेश असतो.

In reply to by कपिलमुनी

कित्येक हॉटेल्समधे फक्त परदेशी लोकानाच प्रवेश असतो.
हे नक्की का? बाकी मनाने पोर्तुगीज असलेले लोक असणे यात कै आश्चर्य नाही. अजूनही भारतात जन्मल्याची लाज वाटणारे लोक अनेक आहेत आपल्याकडे. खरे मेकॉलेपुत्र.