Skip to main content

कोण कोणास म्हणाले?????

लेखक shawshanky यांनी गुरुवार, 26/11/2015 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घरासमोर जर फ्लायओव्हर बांधला तर मी दुबईत राहायला जाईन... कोण कोणास म्हणाले होते?

वाचने 8257
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

पेडर रोडवर फ्लाय ओवर बांधण्याबाबत अशा काही बातम्या वर्तमानपत्रात वाचनात अाल्या होत्या.

एकोळी धाग्यास मिपाधोरणानुसार बंदी आहे. हा धागा उडवला जाईलच. धागाकर्त्यास विनंती की असे एकोळी रिमार्क्स योग्य अशा धाग्यात प्रतिसाद स्वरुपात टाकावे. मेन बोर्डावरची बरीच रीअलइस्टेट एक धागा खातो, त्यामुळे त्यात मटेरीयल असेल तरच धागा टाकावा. अन्यथा असे धागे सदस्यांना अडचणीचे ठरतात.

तसे लता मंगेशकर व आशा भोसले म्हणाल्या होत्या. त्यांनाही लोकांनी "जायचे असले तर जा दुबईत" असे सांगितले होते. त्यासंबंधात मिडियात "चहातल्या पेल्यातले वादळ" झाले होते, पण कोणा राष्ट्रीय स्तराच्या नेत्याने वक्तव्य करून त्याचे राजकारण केले नव्हते. १. जनतेची विकासाची कामे आणि देशाच्या अस्मितेपेक्षा कोणी एक व्यक्ती मोठी असू शकत नाही. २. जेव्हा कोणी चांगले काम करते तेव्हा जनता त्याला डोक्यावर घेते आणि ते ठीकच आहे... त्याच माणसाने चूक केली किंवा देशाच्या अस्मितेला धोका पोहोचवला तर त्या व्यक्तीने खिलाडूपणे आपली चूक स्विकारून पडणार्‍या चपला प्रामाणिकपणाने व खिलाडूपणे स्विकारल्या पाहिजे... त्यावेळेस पिडीत मानसिकता (व्हिक्टिंग मेंटॅलिटी) दाखवण्याला शुध्द मराठीत कांगावाखोरपणा म्हणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तीनोळी धाग्याला तब्बल नौओळी उत्तर ??? ..ए ना चोलबे बाबा !

>> युती सरकारच्या काळात प्रस्ताव >> लता मंगेशकर यांचा प्रखर विरोध, फ्लायओव्हरचे काम सुरू केल्यास रस्त्यात खुर्ची टाकून बसण्याचा इशारा, पेडररोडवासियांचा विरोध एकवटला >> तत्कालीन विलासराव देशमुख सरकार बॅकफूटवर >> २०११ साली फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय >> या निर्णयाविरोधात राज ठाकरे मैदानात, मुंबईत कोठेही फ्लायओव्हर बांधू न देण्याचा पवित्रा >> सरकारने जे वाट्टेल ते करावे-उद्विग्न होऊन लता मंगेशकर यांचे वक्तव्य >> मधला काही काळ शांततेत गेल्यानंतर २०१२ पासून फ्लायओव्हर बांधण्याच्या हालचाली सुरू; परंतु वाहतूक विभागाची आडकाठी >> २०१४ सीआरझेडची मंजुरी >> वाहतूक विभाग परवानगी देत नसल्याने अखेर नवा आराखडा तयार

In reply to by गॅरी ट्रुमन

खानाच्या भेटीला निघालेल्या महाराजांना कृष्णाजी बंककरानं सांगितलं.

In reply to by बाजीप्रभू

बरोबर (एकेकाळी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीची पारायणे केलेला) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

सील हा शब्द मराठी आहे की प्राकृत..? सिरीयसली विचारला आहे कारण राजा शिवछत्रपती वाचताना याच शब्दापाशी अडखळलो होतो.

In reply to by बाजीप्रभू

"महाराज तुम्ही व्हा पुढे. गनिमाला की खिंडीतच थोपवतो." असे कोण महाराजांस म्हणाले?

In reply to by बबन ताम्बे

"महाराज तुम्ही व्हा पुढे. तुम्हाला मीच खिंडीतच अडकवतो ." गनिमाला कस थोपवायचं ते नंतर बघु जमलं तर !!! ===== उधोजी फर्जद देवेन्द्रास सगळ्याच अधिवेशनात आणी अधिवेषणाबाहेरही. "शिवशाही ते शिव्याशाही" या लेखातून साभार.

पण आता तेथे फ्लाय-ओव्हर झाला आहे की नाही रे शॉशॅन्क्या? प्रभूकुंजच्या जवळून एक फ्लाय-ओव्हर आधीपासूनच होता असे वाटते.

आम्हालाही उत्तम चखना मिळाला असता तर आम्हीही उच्चभ्रू मद्यपी झालो असतो ? -दिलीप बिरुटे

उन्हें उतरली बाई सांजपरतीच्या वाटा आयाबायांशी बोलता उगा होईल बोभाटा -दिलीप बिरुटे

किती आवरू सावरू डोईच्या ग S पदराला गाढ झोपला पाहुणा त्याच्या अंगावर शाल मी ग S टाकली कशाला ? -दिलीप बिरुटे

वेणीच येईना फुले माळल्या जाईना रांगोळीच्या अक्षरांचे शब्द बांधल्या जाईना -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

ब्याटरी शिल्लक १०% आहे नैतर आज लै कविता पेष्टवल्या असत्या ? का टाकू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार ? पुरुषांचे टी शर्ट नव्या फ्याशन सहीत कुठे मिळतात ? जिन्स प्यांटचा नवा ट्रेंड काय आहे ? मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ? -दिलीप बिरुटे

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ चालुद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन! तो तुमचा भ्रम आहे. तो तुमचा समज आहे. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी अहात.

मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ? -दिलीप बिरुटे
मिशा असाव्यात,तेवढा एकच भेदाचा पाॅईंट राहिलाय हल्ली. नायतर काय बी वळखत नाही