काय तात्काळ होणे महत्वाचे आपल्याला व्यक्तिगत वाटत होते आणि वास्तवात काय होत आहे?
विस्तृत प्रतिसाद नंतर देईन पण आता चटकन जे आठवले ते लिहीत आहे.
चार दिवसांपूर्वीच भारतात परतलो. अपेक्षा ही होती की तपासणी अत्यंत कडक असेल आणि बाहेर येण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. कस्टम ऑफीसरचे लक्ष कोणी किती बाटल्या आणल्यात ह्याकडेच होते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
महिना झाल्यानंतर अजुन ही काही ठिकाणी निषेध सभा आयोजित केल्या जात आहेत.( उदा. - कालच पुणे इथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.)
नवीन मुख्यमंत्री , केंद्रीय गृहमंत्री आल्यापासून सामान्य मुंबईकरांच्या जिवनात काहीही फरक पडलेला नाही. अजुन ही जीव मुठीत धरुन आम्ही सकाळी बाहेर पडतो.
जन पळभर म्हणतील हाय हाय अशीच अवस्था वाटावी अशी परीस्थिती परत आली.
दुर्दैवाने असेच घडत आहे.
सामान्य मुंबईकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रतिक्रिया
भ्रमनिरास
महिना