Skip to main content

आज कार्तिकी एकादशी

लेखक राजेश कुलकर्णी यांनी रविवार, 22/11/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कार्तिकी एकादशी . सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती. १) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही. २) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे? तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात. अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.

वाचने 13655
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

लेखकसाहेब तुमच्यात मिपा गाजवायचं जबरदस्त पॉटेन्शीअल हाये. फक्त... तुम्ही स्वतःला बदलले पाहिजे, तुमीच्य हो तुमारे जिवन का शिल्पकार. काळ काम आणी वेग याच सुत्र जर तुमी शिकाल तर उतक्रुश्ट मिपासदस्य वाल. असो, नुसतेच कौतुक करणे योग्य नाही काही खड्डे बोलही सुनायला हवेतच नाही तर पोरं शेफारुन जायची भिती असते. तर जरा कठोर होउन इतकेच सुनावेन की शान्या मानसा परमानं लिवायला शिका की राव, का उगा ब्वॉर करालाय ?

भंडारा डोंगरावर कट्टा झालाच पाहिजेल. हेल्मेट सक्तीचे आहे.नाठाळ समजून माथ्यावर काठी पडू शकते.सर्व जबाबदाय्रांतून आयोजक मुक्त आहेत. देहूच्या पुढे इक्सप्रेसवे झालाच पाहिजे.

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम 'वार'करी कार्तकर्ते.

In reply to by जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.राकुचां सत्कार पुढील आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुरचा विशेष दर्शन पास देऊन करण्यात येत आहे.
अहो खुद्द तेहतीस कोटी ज्यांच्या दर्शनाला ताटकळत असतात त्यांना कसले विशेष दर्शन घडवताय? डोंबलाचे? राकु माझा 'लेखु'रवाळा...

In reply to by जेपी

विशेष पास दर्शन ला घाईघाईत चुकून विषप्राशन वाचले, म्हटले जेपीची संपादकिय कार्किर्द सुरू झाली का का...?

प्रतिसाद लवकर द्या, मंजी सेंचुरी जाली की अजुन लाइनीत उभे असलेले एकनाथ, सावता माळी, बहिणाबाई, रवीन्द्रनाथ टागोर, जनार्दन डम्बवनेकर उर्फ़ जमदग्नि(भुरंडीवाडी बुद्रुक) यांचा नंबर आहे. जमदग्नि यांचे "मी सूर्याला गिळून टाकले" हां काव्यसग्रह लई फेमस हाई. कापी पाहिजे असल्यास भेटावे. ते राकुचे सांगू नका आम्हाले, त्याच्याकडे समद हाय ०

एकादशीनिमित्त मटण खायचे सोडून लेख काय पाडताय राकुशेठ? एकादशीला मटण खाल्ल्याने निधर्मधर्म पाळला जातो हे माहिती नाही काय?

पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात ओक्के... म्हणजे तुम्हाला पण अखिलयुवारत्न राहुल गांधी पंप्र हवे आहेत म्हणून इतका खटाटोप सुरू आहे का?

मिपावर एक नवी फॅशन आली आहे. आधी फालतु लेख टाकायचे ,त्यावर तशाच प्रतिक्रीया आल्या की,मिपा टवाळखोरांचा अड्डा आहे.अश्या शिव्या घालत निघुन जायच. राकु तुम्ही पण फॅशनेबल आहात का ?

लेख समजला पटला असे काही म्हणवत नाही. पण असो. सर्वांना वेगळी मते ठेवायचा अधिकार आहे आणी त्याचा मी आदरच करतो. आनंद एवढाच की पुर्वी संक्षीचे धागे वाचुन काहिच कळायचे नाही. आता काय लिहिले आहे ते तरी कळते आहे किमान. पुलेशु लिहायची खूप इच्छा होती पण तुम्हाला त्याची गरज आहे असे वाटत नाही. तुम्ही कुणाच्याही विरोधाला न जुमानता लेख पाडत राहणार याची खात्री आहे.

In reply to by मृत्युन्जय

सदर लेखकाची तुलना संक्षींशी होऊच शकत नाही. वर देखील एका सदस्येनं संक्षींचा अपरोक्ष उल्लेख केलायं. चाकोरीबद्ध जगणार्‍या सदस्यांची स्वच्छंद जगणार्‍या बद्दलची आसूया आणि इथली कंपूबाजी हे माझ्या मते तो आयडी ब्लॉक होण्याचं खरं कारण आहे.

सुरुवातीला कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते नंतर इतर जण कोणत्या कुलकर्ण्यांची? जाऊ द्या उगाच डोक्याला शॉट. तेंव्हा कुलकर्णी साहेब( सर्व कुलकर्णी यांना ) तुम्ही लिहित राहा/ टीका करीत राहा/ जिलब्या पाडीत राहा.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी विरुद्ध कुलकर्णी असा तिरंगी सामना चालला होता. ते वाचताना गोंधळ झाला. कोणते कुलकर्णी कोणत्या कुलकर्ण्यांची चंपी करताहेत ते समजत नव्हते ही, इंद्राणी मुखर्जीपेक्षाही, खतरनाक समस्या आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेबांना पण खाली उतरवलेत तुम्ही राकु साहेब. असे प्रतिसाद कधी बघितले नव्हते त्यांच्याकडुन.

In reply to by सतिश पाटील

हागणदरी आणि मिसळपाव यांचा एकत्र उल्लेख पाहून, मला एक मिपाकर म्हणून शरम वै …….

In reply to by पगला गजोधर

तो प्रतिसाद नीट वाचा गजोधर मिसळपावची तुलना गावाशी केली आहे. ते चष्म्याचा नंबर ज़रा चेक करून घ्या बघू.

In reply to by विशाल कुलकर्णी

चिडु नका असे
हागणदरी आणि मिसळपाव यांचा एकत्र उल्लेख पाहून
असे आहे. 'तुलना केलिय' असे लिहिलेले नाहि.

In reply to by जेपी

ही घे सत्काराची वस्तू अगदी फिल्मसहीत.यथोचीत सत्कार वस्तू तुला थोडा वेळासाठी साधू बनावे लागेल प्लीज नाही म्हणू नको सदस्य सत्कार समीती

कारवाई झाली तर! . . . . . . . कंपूबाजांचा विजय असो