Skip to main content

बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शनिवार, 07/11/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
बिहार विधानसभा निवडणुक-२०१५ ची मतमोजणी उद्या रविवार ८ नोव्हेंबर २०१५ रोजी होणार आहे.निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने चर्चा या धाग्यावर करावी ही विनंती. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. सव्वाआठपर्यंत पहिले कल हाती येतील अशी अपेक्षा आहे. गॅरी ट्रुमन

वाचने 52510
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

त्यांना मिपावर घ्या. राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते. संजय राऊत 'ये मोदी की हार है' म्हणून कांडका पाडलेत.

In reply to by प्यारे१

राममाधव, शाहनवाझ हुसैन वगैरे कोण कोण आहेत ते.
मिपावर त्यांच्यापेक्षा कडवे आहेत . फक्त मज्जा बघा

भाजपाचे बिहारमधे वस्त्रहरण झाले आहे. सत्ता हातात आल्यावर माणसांनी माकडांच्या बाबतीत केलेल्या सर्व म्हणी यांनी खर्‍या करुन दाखवल्या. आचरट विधाने करणार्‍यांना न रोखणे आणि प्रत्येक अप्रिय घटनेवर मोदींनी मौन बाळगणे, चांगलेच अंगाशी आले आहे. यातून धडा घेतील तर ते भाजपा कसले? भाजपाने सुवर्णसंंधी गमावली आहे.

एकंदरीत भाजपाने ही निवडणुक गमावली आणि बिहार पुन्हा पाच वर्षासाठी नितीशकुमार यांच्या हातात गेला. त्यातही नवीन बदल म्हणजे लालु यादवांच्या जागा नितीश पेक्षा जास्त दिसतात. अंतिम निकालानंतर हे नक्की होईल. पण आता पुन्हा निधर्मी, डावे आणि संघ, हिंदुत्ववादी यांच्यात टक्करी वाढतील. कारण हा बिहारचा विजय नितीश, लालु, काँग्रेस यांच्यासाठी सलाईनचे (मराठी शब्द ?) काम करणार. भावी काळ धामधुमीचा ठरणार.

लालूंची पार्टी ७२ जागी आघाडीवर एक क्रमा़काचा पक्ष नितीश यांच्या पार्टीच्या पुढे..

एका बलीप्रतिपदेला एका लबाड वामनाने सज्जन बळीराजाला जमिनीत गाडले होते. या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे. ...... गुर्जी लाडू खायला गेले वाटतं. .... भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले आणि सगळे कार्यकर्ते गुलाल झटकून आपापल्या घरी परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आता १०० किलोची ऑर्डर रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. आजचा मटा...

In reply to by मोगा

या बलीप्रतिपदेला लोक शहाणे झाले म्हणायचे.
लोक शहाणे होणे म्हणजे काय हो मोगा?हे लिहिताक्षणी महागठबंधन १५७ जागांवर आघाडीवर आहे त्यात राजद ७४ जागी आणि नितीश ६७ जागांवर आघाडीवर आहे. लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच नितीशमागे लपू नका.

In reply to by गॅरी ट्रुमन

लालूसारख्या हलकटाला निवडून देणे म्हणजे लोक शहाणे झाल्याचे लक्षण वाटत असेल तर ते सरळ लिहा की. उगीच नितीशमागे लपू नका.>>>>>>>>>>>>>>>>> >>>> लालू हलकट ,मग येडुयुरप्पा कोन, पक्षातून हाकलून दिलेला भ्रष्टाचारी परत भाजपात येतो ,पक्षाचा सरचिटणीस होतो, तेव्हा कुठे जाते चाल चरित्र???? लालूचे चाराघोटाळा प्रकरण आणि येडुयुरप्पाचे प्रकरण ,यात येडुयुरप्पाने कीतीतरी अधिक मोठा घोटाळा केला आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

लालूवर भ्रष्टाचाराचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन त्याला ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. येडीयुरप्पाची भ्रष्टाचार प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

आता अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सुरु होतील. एक बरं होईल. आता बिहारमध्ये दिवसाढवळ्या खून पडले तर भाजपवर खापर फुटणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

चष्मा काडा ओ साहेब. 'गिरे तो बी टांग उपर' चा काय उपयोग नाही आता! नितिशकुमारांच्या कार्यकाळात बिहार खूपच सुधारला आहे. त्यामुळे "अपहरण वगैरे कुटिरोद्योग परत सूरु होतील व खून पडतील" ही विधानं जरा तपासून पाहावीत असे सुचवतो.

In reply to by संदीप डांगे

त्यावेळी लालू नितिशकुमारांबरोबर नव्हते हे विसरता तुम्ही आणि गेली दोन वर्षे सोडली तर त्या आघाडीचा भाजपही घटक होता.

In reply to by संदीप डांगे

यांच्यासाठी लालू आणि राजद हे विरोधक होते साहेब. आता तर सत्तेत सहभागी असणार आहेत. तेही सर्वात मोठा पक्ष म्हणून. बिघडलेली गोष्ट सुधरायला वेळ लागतो. सुधारलेली बिघडायला वेळ लागत नाही. आणि रच्याकने २०१३, म्हणजे नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारमधले गुन्हेगारीचे आकडे बघा.

In reply to by बोका-ए-आझम

कसे हो कसे ? काल पर्यंत नितिशकुमार बरोबर भाजप सत्तेत होता तेव्हा नितिश्कुमार ' विकासपुरुष होते, आज पुन्हा तेच नितिशकुमार सत्तेत बसणार आहेत, तर लगेच बिहारमध्ये गुंडाराज आले का? लालुला ज्या जागा आल्या आहेत त्या नितिश्कुमारच्या स्वच्छ प्रतिमेमुळे मिळाल्या अहेत, आणि लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

लालूला वेसन घालणे नितिशला सहजशक्य आहे.
चला या निमित्ताने लालू हा वेसण घालण्याजोगा माणूस आहे हे तुम्ही मान्य केलेत हे पण काही कमी नाही. खरं तर लालू हा मोदीविरोधी म्हणजे सद्गुणांचा पुतळा असायला हवा तुमच्यासारख्यांच्या मते.

In reply to by काकासाहेब केंजळे

जर इतकी स्वच्छ होती तर लालूंबरोबर युती केलीच का? एकट्याच्या बळावर विजय मिळवणं शक्य नाही हे समजल्यामुळेच ना? बरं, केली तर कुणाबरोबर? ज्याला संपविण्यासाठी गेली २० वर्षे प्रयत्न केले त्यांच्याचबरोबर. लालूला वेसण घालणे नितीशकुमारांसाठी कठीण नाही, तर अशक्य आहे. इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय. शिवाय भाजपची साथ नितीशकुमारनी सोडली. ज्याचा त्यांना तात्पुरता फायदा झालेला दिसतो आहे पण आपल्या शत्रूला मोठं करण्याची किंमत त्यांना या ना त्या प्रकारे चुकवावीच लागेल. बिहारमध्ये राजदला जास्त जागा मिळणं याचा तोच अर्थ आहे. उलट नितीशकुमारांच्या जागा कमी आहेत याचा अर्थ त्यांचं विकासाचं माॅडेलही लोकांना पसंत पडलेलं नाही आणि ती एकदम छान गोष्ट झालेली आहे.

In reply to by बोका-ए-आझम

इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून. तुम्ही तर बिहारबद्दल बोलताय.
पोट धरधरून गडाबडा लोळत हसायची स्मायली आहे का कोणाकडे?

In reply to by बोका-ए-आझम

इथे मिपावर डू आयडींना संपादक वेसण नाही घालू शकले अजून.
बोकाजी, हे उदाहरण चुकीचे वाटते. :)

नितिश्कुमारांच्या प्रतिमेमु़ळे? मग लालुंच्या जागा जास्त आणि नितिशकुमारांच्या कमी हे कसे?

In reply to by लाल टोपी

लालू भ्रष्टाचारी आहे ,पण मिडीयाने त्याला अति बदनाम केले आहे .लालूने जंगलराज आणले तो काळ वेगळा होता ,आज त्यातले पप्पू यादव वगैरे कुणीच लालू बरोबर नाही,केंद्रातही लालूला पाठीशी घालणारे नाहीत.त्यामुळे लालू परत चुगली करायची शक्यता नाही ,तसे त्याने केले तर त्याच्याशी नितिशकुमार संबंध तोडायला पुढे मागे बघणार नाहीत. आज बिहार इलेक्शान एमाआयमला आणि पप्पू यादवला रसद पुरवनारे भाजपचेच लोक आहेत हे उघड सत्य आहे.सेक्युलर वोट खातात तर ओवैसीला आणि पप्पू यादवकडे दुर्लक्ष करा ही भाजपची नीती लपून राहीलेली नाही.

लालूसारख्या हलकटाला निवडून देणे
त्यांनी काही घोटाळे असतील तसेच त्यांच्या बोलण्यातून मस्तीची कैफ दिसत असली तरी त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.

In reply to by याॅर्कर

त्यांना का निवडून दिले ते प्रत्येक्षात बिहारमध्ये जाऊन दलित,महादलित,यादव यांना विचारा म्हणजे कळेल.
हे १९९० च्या दशकाविषयी बोलत असाल तर मुद्दा पूर्ण मान्य. पण त्याच लालूंना त्याच मतदारांनी गेली १० वर्षे घरी बसवलेच होते की. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दोनपैकी एका मतदारसंघात खुद्द लालूंचाही पराभव झाला होता. मग मधल्या काळात दलित, महादलित लोक लालूंनी त्यांच्यासाठी केलेले विसरले म्हणायचे का? जितनराम मांझींना बरोबर घेऊन महादलित व्होटबँक आपल्याकडे खेचायचे भाजपचे डावपेच चांगलेच होते.पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?

In reply to by गॅरी ट्रुमन

पण मोहन भागवतांनी गाढवासारखे आरक्षणविरोधी वक्तव्य केले त्यामुळे हे मतदार परत लालूंकडे वळले असे दिसते. एकंदरीत संघाला कोणी डोईजड झालेला चालत नाहीसे दिसते. मोदी बरेच मोठे झाले आहेत आणि ते असेच मोठे राहिले तर नंतर आपल्याला जुमानणार नाहीत म्हणून अपशकुन करण्यासाठी भागवतांनी ते वक्तव्य केले असायची शक्यता आहेच. एकूणच भारतीयांची खेकड्यांची मनोवृत्ती आहेच. मग भारतीय जनता पक्षात खेकडे नाहीत असे कसे होईल?

आपल्या संस्कृतीत दोन फार मोठी असत्यं प्रस्थापित झालेली आहेत १) आपले ज्यांच्याशी पटत नाही किंव मतभेद आहेत त्यांचा द्वेष केला पाहिजे किंवा त्यांचा बागुलबुवा उभा केला पाहीजे २) आपल्याला जो आवडतो त्याच्याशी संपूर्ण सहमत झाले पाहिजे किंवा त्यांच्या प्रत्येक कृत्याचे समर्थन केले पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

ही असत्य नसून मान्यता आहेत. हेही खरं की ह्या मान्यता आता फार घट्ट रूतून बसल्यात.

In reply to by सुबोध खरे

अगदी!! आणि जो या दोन प्रकारात येत नाही त्याला दोन्हीकडचे लोक 'दुसर्या पार्टीचा' घोषित करून शिव्या घालतात!

राळहोतित भाजपचा सत्ता मिळविण्यात दारूण अपयश आलेले आहे. आता पुढील बरेच दिवस भाजपचे नक्की काय चुकले याच्यावर काथ्याकूट होत राहील. बिहारमधील जनतेने जातीयवादाला नाकारले, धर्मनिरपेक्षतेला मत दिले, मग्रूरीला नाकारले इ. निष्कर्ष काढले जातील. मोहन भागवतांचे वक्तव्य, इतर वाचाळवीरांची वक्तव्ये, दादरी प्रकरण, महागाई इ. कारणांमुळे भाजपचा पराभव झाला असे ठासून सांगितले जाईल. परंतु मी वरील कारणांशी सहमत नाही. वरील कारणांचा मतदानावर व निकालावर फारसा फरक पडलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहिले तर असे दिसते की त्यावेळी भाजप+ आघाडीला ३५% च्या आसपास मते होती व ४० पैकी ३१ जागा मिळालेल्या होत्या. राजद (१८%) व काँग्रेस (८%) यांना एकत्रित अंदाजे २६% मते होती व ६ जागा मिळाल्या होत्या आणि संजदला अंदाजे १६% मते होती व २ जागा मिळाल्या होत्या. ३५% वि. २६% वि. १६% या तिरंगी लढतील सर्वाधिक ३१ जागा ३५% मते मिळविणार्‍या आघाडीला होत्या. आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत. गेले दिड-दोन महिने दादरी, पुरस्कार परत करणारे साहित्यिक, महागाई, वाचाळवीरांची वक्तव्ये इ. अनेक मुद्दे विरोधात असूनसुद्धा भाजप+ आघाडीला आपली २०१४ मधील मते टिकविण्यात यश आलेले आहे. इतर विरोधी पक्षांची मते देखील टिकली आहेत. परंतु त्यांची मते एकत्रित झाल्याने व दुरंगी लढत झाल्याने त्यांना जागांचा प्रचंड फायदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर इ. मुळे व नागरिकांनी जातीयवादाविरूद्ध मत दिल्याने भाजपला खूप कमी जागा मिळाल्या असे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत. विरोधी पक्षांची मते एकवटल्याने सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्याची भूतकाळात अनेक उदाहरणे आहेत. १९६७-६८ मध्ये लोहियांनी बडी आघाडी स्थापन करून त्यात समाजवादी, जनसंघ, लोकदल इ. पक्षांनी युती करून निवडणुक लढविल्यावर त्यांना ८ राज्यात सत्ता मिळाली होती. नंतर वर्षभरात त्यांच्यात फाटाफूट झाल्यावर १९७१ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ३५३ जागा मिळाल्या होत्या. १९७७ ला ५ विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केल्यावर सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता. याचीच पुनरावृत्ती १९८९ मध्ये झाली होती. नंतर आघाड्यांचे राजकारण सुरू होऊन ज्या आघाडीत सर्वाधिक व प्रबळ पक्ष ती आघाडी जिंकण्याची परंपरा १९९८ पासून सुरू झाली ती आजतगायत. तस्मात भाजपच्या पराभवामागे मोहन भागवत, दादरी, पुरस्कार वापसी, महागाई, वाचाळवीर, नितीशकुमारांचे विकास मॉडेल इ. कारणे नसून विरोधी मते एकवटल्यामुळेच भाजपला खूप कमी जागा मिळत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपा हारला नाहीये ! फक्त जागा कमी निवडून आल्यात .

In reply to by कपिलमुनी

=)

In reply to by कपिलमुनी

"तो पडला" हे "हिज़ व्हर्टिकॅलिटी टर्न्ड इण्टु हिज़ होरिझाँटलिटी" अशा भाषेत सांगणार्‍या इंग्रजी वाक्याची, झालेच तर औरंगजेब लंगडू लागला हे "खाविंदांच्या पूज्य पूर्वजांप्रमाणे (तैमूरलंग) होण्याचे भाग्य खाविंदांना लाभले" असे लिहिणार्‍या मुघल बखरकारांची आठवण झाली. =)) =))

In reply to by श्रीगुरुजी

याला म्हणतात निर्लज्जपणाचा कळस. तोंड फुटले तरी माझ्या तोंडात दातच नव्हते म्हणत हसायचे. धर्मांध प्रवृत्तींना बिहारमधे गाडले हेच सर्वकालिन सत्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

याइतका हास्यास्पद प्रतिसाद बघितला नव्हता. भाजपाला एकुण सर्व जागांची मते मिळून ३१% मते मिळाली आहेत. इतर पक्षांनी मुळात तेवढ्या जागाच लढवल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची आणि भाजपाला मिळालेल्या मतांशी थेट तुलनाच शक्य /,ही. (अधिकस्पष्ट करण्यासाठी काल्पनिक आकडे घेतो. विदा आता हाताशी नाही. म्हणजे भाजपाला ५० मतदारसंघात १०० पैकी २६ मतदारांनी मतदान केले आहे. राजद व जदयुने केवळ प्रत्येकी २५ मतदारसंघच लढवले असले तर त्यांना मिळालेली मते भाजपापेक्षा कमीच असणार.) तेव्हा भाजपा आघाडी विरूद्ध महाआघाडी अशीच टक्केवारी बघावी लागेल. नी त्यात लालुअत्तसतो तसा भाजपाचा 'सुपडा साफ'आहे. बाकी, भाजपेयंंनी वाळूतच तोंड खुपसायचं ठरवलं असेल तर नाईलाज आहे! कमॉन, बी अ स्पोर्ट!

In reply to by ऋषिकेश

तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. जे मी उत्तरप्रदेश/दिल्लीत पाहिले तेच इथे पण पाहतोय - दुरंगी लढतीत भाजपा विरोधकांची सारी मते एकवटात. किंबहुना कोणत्याही ठिकाणी एक प्रबळ पक्ष विरुद्ध इतर सगळे असा मामला असतो तेव्हा तो कितीही प्रबळ असला तरी त्याने हरणे क्रमप्राप्तच असते. बिहारमध्ये देखील हेच झाले. पूर्वी लालू विरूद्ध सगळे असा सामना असायचा, आता भाजपा विरुद्ध सगळे असा सामना होतोय. परंतु याव्यतिरिक्त, अजून एक गोष्ट मला दिसत आहे ती अशी - भाजपा हळूहळू काँग्रेसची जागा घेताना दिसतोय, बिहारच्या निकालांनी देखील हेच अधोरेखित केले. आता याबद्दल -
भाजपाला एकुण सर्व जागांची मते मिळून ३१% मते मिळाली आहेत. इतर पक्षांनी मुळात तेवढ्या जागाच लढवल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या मतांची आणि भाजपाला मिळालेल्या मतांशी थेट तुलनाच शक्य /,ही.
इतर पक्षांनी जरी तेव्हढ्या जागा लढवल्या नसल्या तरी त्यांनी आपली मते आपल्या सहयोगी पार्टीच्या पारड्यात टाकेली होतीच की.

In reply to by आनन्दा

अजून एक गोष्ट मला दिसत आहे ती अशी - भाजपा हळूहळू काँग्रेसची जागा घेताना दिसतोय, बिहारच्या निकालांनी देखील हेच अधोरेखित केले.
अर्थातसमहहमत आहे. मात्र यात नवे अथवा धक्कादायक काही नाही. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीच नेमका हाच आक्षेप मी मोदींबद्दल व्यक्त केला होता. ते आले की भाजपाचे व्यक्तीकेंद्रीत काँग्रेस होणार

In reply to by ऋषिकेश

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरून खालील आकडे घेतलेले आहेत (Last Updated at 19:22 On 08/11/2015). भाजप २४.५% + लोजप ४.८% + हम २.२% + बीएलएसपी २.६% = एकूण ३४.१% राजद १८.४% + संजद १६.७% + काँग्रेस ६.७% = एकूण ४१.८% एकूण फरक - ७.७% मे २०१४ मध्ये वरील दोन आघाड्यातील एकूण मतांचा फरक ७.३% इतका होता. दीड वर्षानंतर दोन्ही आघाड्यातील मतांचा फरक जवळपास तेवढाच राहिला आहे. त्यामुळे संजद+ आघाडीने भाजप+ आघाडीची मते खेचून घेतली, दादरी/मोहन भागवत/महागाई इ. मुद्द्यांमुळे भाजपने मते गमाविली व ती मते संजद+ कडे गेली यात तथ्य नाही हे वरील आकडेवारीवरून दिसून येते.

In reply to by श्रीगुरुजी

आकडेवारी वगैरे सर्व ठिक आहे.पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात का? नितीशकुमारांनी २००५ आणि २०१० मध्ये सत्ता लालूंच्या जंगलराजविरूध्द रान उठवून मिळवली होती. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडल्या काळापर्यंत लालू आणि नितीश यांच्यातून विस्तवही जात नव्हता.मी हलाहल प्यायला तयार होईन, चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी झाडात विष पसरत नाही वगैरे वक्तव्ये नितीशकुमारांनी कोणाला उद्देशून दिली होती हे उघड होते.अगदी २०१४ मध्येही लालूंनी नितीशकुमारांवर टिका केलीच होती. तेव्हा लालू आणि नितीश यांचे मतदार परस्परविरोधी होते. उद्या आदित्यनाथ किंवा साक्षी महाराज आणि ओवेसी यांच्यात युती झाली आणि तरीही दोघांना स्वतंत्रपणे मिळत असलेल्या मतांइतकीच मते या युतीने मिळवली तर त्या मतदारांच्या अपरिपक्वपणाबरोबरच या युतीपासून मते खेचून आणण्यात विरोधकांचे अपयश नाही का? माझी अशी अपेक्षा होती की नितीशकुमार परत मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणारे पण लालू अजिबात न आवडणारे मतदार भाजप आपल्याकडे खेचून आणू शकेल.आणि तसे होण्यासाठी परिस्थिती अनुकूलही होती.तरीही तसे करण्यात भाजपला यश का आले नाही? हे भाजपचे अपयश नाही का?

In reply to by गॅरी ट्रुमन

माझी अशी अपेक्षा होती की नितीशकुमार परत मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणारे पण लालू अजिबात न आवडणारे मतदार भाजप आपल्याकडे खेचून आणू शकेल.आणि तसे होण्यासाठी परिस्थिती अनुकूलही होती.तरीही तसे करण्यात भाजपला यश का आले नाही? हे भाजपचे अपयश नाही का?
भाजप त्याबाबतीत अपयशी ठरला त्याचे मुख्य कारण म्हणजे लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दिलेली जाहीर मान्यता. निवडणुकीपूर्वीच लालूने जाहीररित्या सांगितले की मतमोजणीनंतर नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार. जरी राजदला जास्त जागा मिळाल्या तरी राजद मुख्यमंत्रीपदावर दावा न करता नितीशकुमारांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणार. कोणत्याही परिस्थितीत नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याने संजदचे मतदार निश्चिंत झाले व त्यामुळे लालू आवडत नसणार्‍या संजदच्या मतदारांनी सुद्धा राजद उमेदवारांना मते दिली. सर्वाधिक जागा मिळविणार्‍या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे जर ठरले असते, तर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले असते. परंतु मुख्यमंत्री कोण हे सर्वांनी आधीच मान्य केल्याने पाडापाडी टळली. असे जरी असले तरी लालूसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी व कारस्थानी माणूस अजिबात गप्प राहणार नाही. आपण सर्वाधिक मोठा पक्ष आहोत हे सिद्ध झाल्याने तो फोडाफोडी करून बहुमत जमविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्की करणार. सध्या लालू + कॉंग्रेस यांचे एकूण १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त १५ आमदारांची गरज आहे. भाजप व संजद वगळता उर्वरीत आमदारांची संख्या १२ आहे. म्हणजे लालूला उर्वरीत आमदार आपल्या बाजूला वळविल्यावर फक्त ३ आमदारांची गरज भासेल. सध्याच्या पक्षांतरबंदी कायद्यामुळे भाजप फोडायला किमान ३६ आमदार फोडावे लागतील व संजद फोडायला किमान ४८ आमदार फोडावे लागतील. परंतु पक्षांतरबंदी कायद्याला टांग मारण्यासाठी लालूच्या पक्षाकडे सभापतीपद असले तरी पुरेसे आहे. आमदारांची फूट (आमदारांची संख्या कितीही असली तरी) ही कायदेशीर आहे का नाही हा निर्णय सभापतीचा असतो व सभापती आपल्या पक्षाबाबतीत नेहमीच पक्षपातीपणा करून कमी आमदारांची फूट सुद्धा कायदेशीर ठरवितो हा इतिहास आहे (उदा. १९९७ मध्ये उ.प्र. मध्ये सप, बसप आणि काँग्रेस मध्ये पडलेली फूट कमी आमदार असूनसुद्धा भाजपचे सभापती केदारनाथ त्रिपाठी यांनी आपल्या अधिकारात कायदेशीर ठरवून कल्याणसिंग सरकारला जीवदान देऊन ५ वर्षे निर्वेध कारभार करून दिला होता.). त्यामुळे सभापतीपदासाठी लालू आग्रह धरणार हे नक्की. तसेच आपल्या दोन मुलांना मंत्रीपदी बसवून पर्यायी नेतेपदाची सोय करून ठेवणार. नितीशकुमार नक्कीच हे ओळखून असणार व ते सभापतीपद लालूकडे न जाण्यासाठी प्रयत्न करणार. कदाचित तडजोड म्हणून काँग्रेसचा सभापती असेल. परंतु जर लालूच्या पक्षाचा सभापती झाला तर मात्र नितीशकुमारांसाठी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप महाराष्ट्रातही युती करूनच निवडून आले. NDA चे १३ राज्यामध्ये सरकार आहे त्यात माझ्यामते पाचच राज्यात भाजप कोणाशी युती न करता निवडून आला आहे.(चूक असेल तर दुरुस्ती सांगावी) मग इथे पण असेच म्हणावे का कि भाजप एकट्याने निवडून येउच शकत नाही? युतीचे राजकारण हे आता सामान्यपणे सगळीकडेच झाले आहे बिहार मध्येही काही अपवाद नव्हता. मग जर भाजपला हे आधीपासूनच माहित होते तर कि विरोधक एकवटले आहेत तर मग निवडणुका लढवायच्या कशाला ना? मतदारांनी भाजपला नाकारले आहे हि वस्तुस्थिती आहे ती मान्य करून उपाय शोधायचे कि, आमच काहीच चुकल नाही असे म्हणून खापर जनतेच्याच माथी फोडायचे हे त्यांनीच ठरवावे...

In reply to by शब्दबम्बाळ

भाजप अनेक राज्यात सध्या व यापूर्वी सुद्धा स्वबळावर निवडून आलेला आहे. काही राज्यात भाजपचे बळ कमी असल्याने भाजप काही पक्षांशी युती करतो. मी वरील एका प्रतिसादात आकडेवारी दिली आहे. जितक्या मतदारांनी मे २०१४ मध्ये भाजप+ आघाडीला मते दिली होती, जवळपास तितक्याच मतदारांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये भाजप+ आघाडीला पुन्हा एकदा मते दिली आहेत. परंतु यावेळी राजद्+काँग्रेस या आघाडीत संजद सामील होऊन त्यात त्यांनी आपल्या १६-१७% मतांची भर घातल्याने इतका एकतर्फी निकाल लागलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ओ गुर्जी हारलो तर हरलो म्हणा कि कशाला एवढी लांबड तुम्हाला क्रिकेट आवडत ना मॅच १ run ने हारली काय आणि १०० runs ने हारली काय पराभव हा पराभव आहे मान्य करा आणि लागा कामाला भाजप जिंकायला हव अस वाटणारा

In reply to by धनावडे

भाजप हरलेला आहेच ना. ते कोण नाकारतंय. परंतु मोहन भागवतांचे विधान, भाजप नेत्यांचा तथाकथित उर्मटपणा, दादरी, तथाकथित असहिष्णुता इ. मुळे भाजप हरला ही कारणे खरी नसल्याने प्रतिसाद दिला.

In reply to by श्रीगुरुजी

काल एबीपी माझावर भाजपचा अतुल भातखळकर आला होता,इतका उर्मट बोलत होता ,शेवटी ॲँकरने त्याला चूप केला ,हुसैन दलवाई,समीर खडस सर्वांनाच उर्मट उत्तरे देत होता.

In reply to by काकासाहेब केंजळे

हुसेन दलवाई, समर खडस अशांसारख्या निष्पक्षपाती, मुद्देसूद बोलणार्‍या व नम्र व्यक्तींना उर्मटपणे बोलणे हे चूकच आहे.

आजच्या निकालात आतापर्यंत आलेल्या टक्केवारीनुसार भाजप+ आघाडीला जवळपास तेवढीच म्हणजे ३५% मते मिळाल्याचे दिसत आहे तर राजद, संजद व काँग्रेस एकत्रित असलेल्या आघाडीला एकमेकांची मते मिळून ४२-४३% मते मिळाल्याचे दिसत आहे. लोकसभेला वेगवेगळे लढणारे हे तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधी मतांची एकजूट होऊन ३५% वि. ४२% या सरळ लढतीत ४२% ला ७०% जागा मिळताना दिसत आहेत. मतांची अधिकृत टक्केवारी अजून कळलेली नाही. तरीही हे आकडे खरे आहेत हे गृहित धरले तरी काही मुद्दे आहेत: १. नितीश आणि लालूंची आघाडी परस्परविरोधी मतदारांची होती. मुळात नितीशकुमार जनता दलातून बाहेर पडले त्यामागे १९९४ मध्ये त्यांनी आयोजित केलेली कुर्मी रॅली आणि लालूंच्या राज्यात सगळा फायदा यादवांचा होत होता आणि कुर्मी-कोयरींना काहीच मिळत नव्हते हे कारण होते. गेल्या २० वर्षांमध्ये ही दरी अजून वाढली होती.या निवडणुकांमध्ये यादवांनी मते महागठबंधनला दिली हे समजू शकते. पण कुर्मी-कोयरी मतदारांनी मात्र आपल्या नेत्याने त्याच यादवांशी हातमिळवणी केली याचा बॅकलॅश मात्र दिसून कसा आला नाही? २. जितनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे महादलित समाजातील मते भाजपकडे यायला हवी होती.ते होताना का दिसले नाही? मान्य आहे की मांझी हे पूर्वी मोठे नेते नव्हते.पण मुख्यमंत्रीपदावरून हटविले गेल्यानंतर मात्र आपल्याला हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान हे चित्र उभे करण्यात यशस्वी झालेच होते.त्यामुळे ती मते भाजप आघाडीला मिळायला हवी होती.ते का झाले नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

(१) लालूने निवडणुकीआधीच नितीशकुमार मुख्यमंत्री होणार हे मान्य केले होते. त्यामुळे आपला मुख्यमंत्री होणार या भावनेने लालूबरोबर युती असूनसुद्धा आपली मते युतीच्याच पारड्यात टाकली. (२) जीतनराम मांझी हे बिहारमधील फारसे प्रबळ पुढारी नाहीत. त्यांच्यामागे फारशी मते नाहीत. त्यांचे हे दुर्बलस्थान ओळखूनच नितीशकुमारांनी त्यांना आपल्या जागी बसविले होते. परंतु नंतर ते नख्या बाहेर काढायला लागल्यावर नितीशकुमारांनी त्यांना हाकलले. भाजपने त्यांच्या पक्षाला अंदाजे २० जागा दिल्या परंतु त्यातील निम्म्या जागांवर त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे करायला भाजपनेच आपले उमेदवार दिले होते. त्यांच्या पक्षाचा मतांची टक्केवारी वाढायला भाजपला फारच किरकोळ फायदा झाला असावा कारण ते स्वतः महादलितातील एका जातीतील असले तरी त्यांच्यामागे फारशी मते नाहीत.

एकंदरीत फक्त अ‍ॅक्सिसचा एक्झिट पोल (अ‍ॅक्सिस : भाजप+ ६४, संजद+ १७६) निकालांच्या अगदी जवळ आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते वाहिन्यांवर आनंद व्यक्त करीत होते. त्यांना नक्की कशाचा आनंद झालाय तेच समजत नाही कारण बिहारमध्ये दोघांनाही भोपळा मिळालेला आहे. राजदला संजदपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे नितीशकुमारांची झोप उडणार आहे. फक्त काँग्रेसला बरोबर घेऊनसुद्धा संजदचा आकडा ९० च्या पुढे जात नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संजदला राजदची मदत लागणारच आहे. लालू आपल्या पाठिंब्याची व सर्वाधिक मोठा पक्ष असल्याची जबरदस्त किंमत वसूल करणार. आधीच्या विधानसभेत संजदकडे स्वबळावर बहुमत असल्याने नितीशकुमारांना मुक्तहस्त होता, आता मात्र त्यांची लालूबरोबर तीन पायांची शर्यत होणार आहे. मोदी सत्तेवर आल्याने हिंदुत्ववादी संघटनांना जोर चढला आहे असे बोलले जाते. त्याच न्यायाने आता लालू सत्तेत आल्याने बिहारमधील गुन्हेगार, अपहरणकर्ते, भ्रष्टाचारी यांना जोर चढणार हे नक्की. बहुमत नसल्याने व मुख्यमंत्रीपद पूर्णपणे लालूवर अवलंबून असल्याने नितीशकुमारांना ही कृत्ये निव्वळ हताश होऊन सहन करावी लागणार. राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भविष्यात नितीश पुन्हा रालोआ मध्ये आले तरी देखील मला आश्चर्य वाटणार नाही, एव्हढा दणका नितीशना या निवडणूकीने दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आता लालू सत्तेत आल्याने बिहारमधील गुन्हेगार, अपहरणकर्ते, भ्रष्टाचारी यांना जोर चढणार हे नक्की
→→खी खी खी खी... . . . जय पराजय तर होणारच,दुखी होऊ नका

In reply to by श्रीगुरुजी

सगळे शिवसेना -- आणि भाजपा यांच्या युतीसारखेच असतात असे दिवास्वप्न पाहणे बंद कर रे. महाराष्ट्रात तर हे एकमेकांची इतकी लायकी काढतात कि विरोधीपक्षांची गरजच भासत नाही. तुम्ही आधी महाराष्ट्राकडे लक्ष द्या मग बिहारकडे बघा तिथे नितिश समर्थ आहे. जो भाजपासारख्या ध्रर्माचे राजकारण करंणार्‍यांना देखील टाचेखाली चेचून ठेवतो तो लालू सारख्याला देखील सांभाळेल.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही आणि गैरी ह्यांनी नितीशनी लालुशी युती करायला नको होती असे वारंवार म्हटले आहे. त्यातल्या काही मुद्द्यात तथ्य असले तरी आता नितीशकडे दुसरा राजकीय पर्याय काय होता ह्याबद्दल विवेचन आवडेल.

In reply to by संपत

तुम्ही आणि गैरी ह्यांनी नितीशनी लालुशी युती करायला नको होती असे वारंवार म्हटले आहे. त्यातल्या काही मुद्द्यात तथ्य असले तरी आता नितीशकडे दुसरा राजकीय पर्याय काय होता ह्याबद्दल विवेचन आवडेल.
नितीशकुमारांकडे दुसरा पर्याय 'संजद + काँग्रेस + राष्ट्रवादी + सपा + डावे पक्ष' असा असू शकला असता. संजदने स्वतःकडे सर्वाधिक म्हणजे किमान १६०-१७० जागा ठेवून इतरांना उर्वरीत जागा दिल्या असत्या तर कदाचित या पर्यायाला १८० इतके मोठे नसले तरी किमान साधे बहुमत मिळून त्यात संजदचा सिंहाचा वाटा राहिला असता. अर्थात या जर-तर ला आता शून्य महत्त्व आहे. आता लालूबरोबर संसार करताना बिहारमध्ये विकास करताकरता लालूच्या पक्षाला वेसण घालण्याची दुहेरी कसरत नितीशकुमारांना करावी लागणार आहे. या सरकारचे स्थैर्य संपूर्णपणे लालूवरच अवलंबून असल्याने ही कसरत खूपच अवघड असणार आहे. १९९९ मध्ये लालूच्या मिसा या मुलीच्या लग्नाच्या वेळी राजद कार्यकर्त्यांनी टाटा मोटर्स व अनेक फर्निचर च्या शोरूम्स फोडून आतील महागड्या गाड्या व फर्निचर लग्नासाठी पळविले होते. माध्यमातून त्यावर खूप आरडाओरडा झाल्यावर लग्नानंतर काही दिवसांनी फर्निचर व गाड्या गुपचुप फुटपाथवर सोडून देण्यात आल्या. या गुन्ह्याची कोठेही नोंद केली गेली नाही. आता पुन्हा असाच प्रकार झाला तर नितीशकुमारांना गप्प बसून रहावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर, पण राजद हा आता बिहारमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे बघता वरील समीकरण यशस्वी झाले असते असे वाटत नाही. कदाचित चाणाक्ष नितीशकुमारांनी राजदचा वाढलेला पाठींबा ओळखूनच कॉंग्रेसच्या गठबंधनसंबंधी प्रयत्नाला साथ द्यायचे ठरवले असावे.

या क्षणी महागठबंधनला १७१ जागांवर आघाडी आहे. राजद ७८,संजद ७० तर काँग्रेस २३ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे काँग्रेसला बिहारमध्ये सुगीचे दिवस आले म्हणायचे तर. भाजप आघाडीला या क्षणी ६५ जागांवर आघाडी आहे. भाजप ५७, लोजप ३, रालोसपला ३ आणि जितनराम मांझींच्या हामला २ जागा आहेत. रामविलास पासवानांच्या लोजपला २०१० मध्ये लालूंबरोबर ४ जागा मिळाल्या होत्या.यावेळी मात्र तीनच जागा मिळताना दिसत आहेत. एकूणच सगळे ठोकताळे उलटेपालटे झालेले दिसत आहेत.

संजदचे अजून एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा पक्ष एकट्याच्या बळावर काहीही करू शकत नाही हे या पक्षाच्या जन्मापासून दिसून आले आहे. या पक्षाचा आधीचा अवतार म्हणजे समता पक्ष. हा पक्ष जोपर्यंत एकटा लढत होता तोपर्यंत त्याला अजिबात यश मिळाले नव्हते. भाजपबरोबर युती केल्यावर त्यांचा प्रचंड फायदा झाला. २०१४ मध्ये एकट्याने लढल्यावर फक्त २ जागा मिळाल्या. तर आता काँग्रेस व राजदबरोबर युती केल्याचा फायदा झाला. म्हणजे या पक्षाला कायम कोणतातरी दुसरा पक्ष बरोबर लागतो.

राजदसारख्या पूर्ण गाळात गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची व लालूसारख्या क्षीण झालेल्या भस्मासुराला पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनविण्याच्या चुकीची पूर्ण किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.>>>>>>>>>>>लालू भस्मासूर असता तर बिहारच्या जनतेने त्याला निवडून दिले असते का? याचा अर्थ श्रीगुरुजी बिहरच्या जनतेला मुर्ख समजत आहेत.... जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.

In reply to by काकासाहेब केंजळे

जंगलराज आले तरी चालेल पण मोदी नको ,असे जनतेला जेव्हा वाटते तेव्हा मोदींची नीती जंगलराजपेक्षा वाईट आहे असाच त्याचा अर्थ होतो.
असे काहीही नाही. हा सरळसरळ नंबर गेम आहे. आणि यामध्ये पूर्वी कोंग्रेसला असलेले स्थान मिळवायला भाजपाला अजून बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. बाकी लालू नितीशचे पुढे काय हे बघणे अधिक रोचक ठरेल.