कांखेत कळसा एक ,मजेशीर अनुभव
लेखनविषय (Tags)
नारळाची झावळी दुपारी वीजेच्या तारावर पडली.वीज गेली.स्थानीक केंद्राला लगेच फोन केला.पाहातो म्हणाले. मी निवांत.
संध्याकाळी पुन्हा फोन. काँल सेंटरला करा म्हणाले.११ आंकडी नंबर दिला.लगेच फोन लावला.या खेपेला लागेच ना.रेंजचा
प्राँब्लेम बहुधा. कोपर्यावर आलो.चहाच्या टपरीजवळ. तिथं रेंज येते.तिथं दोन बांकडी टाकलेली.कांहींचा नाष्टा पण चालू होता.मला पण एक चहा सांगीतला.
दोन प्रयत्नानंतर फोन लागला.पलिकडून ग्राहक क्रमांक विचारला,पुन्हा घरी तंगडतोड.पुन्हा फोन लागायचे वांधे.कंम्लेट नंबर
लिहून घ्या,म्हणाले. माझा आवाज चढलाच,दुपारी दोन वाजता पहिला फोन केलाय,संध्याकाळचे सात वाजायला आलेत, अंधार पडलाय,.
टपरीवरची माणसं माझ्याकडं बघायला लागली.कामगार वर्ग दिसत हेता सगळा. एस्. एम्. एस्. केलाय.वायरमनला.तो तुम्हाला काँटँक्ट
करेल,काँल सेंटर वाले बोलले.
कामगारांचं चहापाणी आटपलं होतं. बिलात मोडीचे वांदे झाले होते.एका मिशावाल्या कामगाराला मीच सुटे दिले. ते गेले. कँल सेंटरला पुन्हा फोन केला.अर्धा
तास वाट बघा म्हणाले.कुठून बोलताय विचारल्यावर रास्ता पेठ पुणे म्हणाले, मी उडालोच , आहो मी कोल्हापूरहून तक्रार करतोय ,असूदे बोलले.
हे काय नवीन झंगट? मी मनातल्या मनात.
निदान या सगळ्या प्रकरणात अर्धा पाऊण तास गेला होता.कामाला हे पुण्याहून माणसं पाठवणार कि काय,मी मनाशीच म्हणालो.एव्डयात मिसेस् चा
फोन आला, वायरमन आलेत म्हणून,मी हुश्श केलं .लगेच घरी आलो. समोर तो मगाचा मिशावाला आणि त्याचा तो जोडीदार.तुम्ही? मी एकदम ऊद्गारलो.
आम्ही वायरमन या भागासाठी,काम नसेल तेव्हां बसतो टपरीवर चहा ढोशीत.
मी पुणे रास्ता पेठेशी नजर लाऊन बसले होतो, आणि हे तर माझ्या अस्तनीत निघाले होते.एक मजेशीर अनुभव होता.
प्रतिक्रिया
एमेसीबीच्या कॉलसेंटरला शक्यतो
एमेसीबी ला दंडवत ! घर
इतकी खटपट करून दिवाकरांच्या
सेम अनुभव
आहो, एम एस ई बी च्या विद्युत
एमेसिबिवाल्या ताईंची आठवण आली