कोल्हापूर स्थित "अजब " प्रकाशक ,यानी गेल्या कांहि वर्षापासून
५० रु.यात कोणतेही पुस्तक असा फंडा काढला आहे,अर्थात त्यांच्या
प्रकाशना खालील कोणतेही पुस्तक.साधारणपणे निदान ही ४००/५००
टायटल असावित .गावोगावी प्रदर्शनं भरवुन ते पुस्तक विक्री करित असतात.
बहुतेक पुस्तके, ही रॉयल्टी संपलेली असतात.निदान ५०/६० वर्षा पूर्वी प्रथम
प्रकाशित झालेली असतात .राम गणेश गडकरी, श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकर,
साने गुरूजी,नाथ माधव, ह.ना.आपटे,वि.दा.सावरकर,इ.जूने नामवंत लेखक
त्यात आहेत .अलिकडील कांही लेखकहि उदा. गिरीजा कीर,श्रीकांत मुंदारगी,यात आहेत.
१००पानांपासून३००/३५० पानांची चांगल्या छपाईची ही पुस्तकं असतात.मी अनेक
वेळेला या प्रदर्शनात गेलो आहे,अनेक पुस्तके घेतलेलीहि आहेत. तशी पुस्तके घेण्याची ,
संग्रहीत करण्याची माझी आवड ,तसं गेल्या जन्मापासूनच आहे ,म्हटलं तर चालेल.
विनोदाचा भाग जाउ दे.
पुस्तकाचे कोणतेहि प्रदर्शन कधी माझ्याकडून चूकविले जात नाही. साहित्य संमेलनात
कधी गेलोच तर फक्त पुस्ताकासाठी .
सांगण्याचा मुद्दा हा की इथंहि पुस्तंकांच्या किंमती१०/२० टक्कायाहुन अधिक कमी नसतात.
कां असाव्यात? मात्र अजब वाल्याचं कामच अजब आहे, कोइबि चीज उठाओ ५० रु.साधारणपणे
पुस्तकाचा व्यवसाय ३० ते४० टक्के कमिशन वर चालतो.म्हणून मी या विषयावर धागा काढू इच्छितो की?
१)ह्याना हे कसे परवडते?३०० पानाची कोरी वही ५०रु. ला मिळत नाही.
२)इतिहास जमा पुस्तके लोकं विकत घेतात कां?
३) कां घेतात?
४)वाचतात कां?
५)छापिल किंमत अव्वाच्या सव्वा असते,हे गौड बंगाल काय आहे?
६)अलिकडील दर्जेदार /नवीन पुस्तके अजून थोड्या जास्त उदा.१०० रु.किंमतींत प्रकाशक कां आणता नाही?
७)वाचन संस्क्रुती याने व्रुंधिगत होता असेल तर महाराष्ट्र सरकारने असे उपक्रम कां राबवू नयेत?
वर्गीकरण
वाचने
4301
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुकानदारी
माझ्या माहितीप्रमाणे
ही पुस्तके बघितली आहेत चांगला
मागे एकदा त्यांच्या