मी असा त्या बासरीचा सूर होतो
व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे.
सुरेश भट
मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!
प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो!
राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता...
मी घरोब्याचे जुने काहूर होतो!
तू किती केलास भेटीचा अचंबा..
भूतकाळाचा जणू मी धूर होतो!
मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!
तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!
मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात.
म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता,
आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात
मग 3री ओळ,
मग 2री ओळ,
शेवटी पहीली ओळ लिहीत असावेत.
मी पध्दतशीर यमके जमा केली.
स्फूर्ती वगैरे किही नाही.
ठणठणीत जुळवाजुळवी.
आतुर होतो
मजबूर होतो
भरपूर
मगरूर
ढाराढूर होतो
नुपूर
मजकूर
शूर
हूरहूर
माझे जोडकाम/शालू ला ठिगळ-काम
स्पर्श तो मखमली कधी मी मागतो?
ये तुझ्या पायीचा मी नुपूर होतो
वाहुनी गेले अता नये वाचता
नजरेतल्या पत्रातला मी मजकूर होतो
बोललेले अर्थ ना मी जाणतो
शब्द तुझा या कानी तर होतो संतूर होतो
भेट ती स्वप्नातली पुन्हा कधी ना पाहतो
काळ मजसाठी किती निष्ठूर होतो
प्रीती चा ना इजहार केला,
जाणते तू मी कधी इतका शूर होतो
हासुनी तू पाहता दुसरीकडे,
जीव हा नुसता असा हुरहूर होतो
मालक...
पहिली गोष्ट तुम्ही जिला कविता म्हणताहात ती गजल आहे.
खरं तर असं लिहून तुम्ही सुरेश