बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: नितीश कुमारांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने
नमस्कार मंडळी,
कालच बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल आणि मतमोजणी ८ नोव्हेंबरला होईल.नेहमीप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवसभर मिपावर ऑनलाईन असणारच आहे.दरम्यानच्या काळात वेळ मिळेल त्याप्रमाणे बिहार निवडणुकांवर मिपावर लिहिणारच आहे.
या निवडणुकांसाठी दोन आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.पहिली आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस पक्ष यांची तर दुसरी आघाडी भाजप, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा भारतीय आवाम पक्ष तर उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष यांची आहे. या पहिल्या लेखामध्ये नितीश कुमार यांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने यांची चर्चा करणार आहे.
नितीश कुमार आघाडीची बलस्थाने
१. माझ्या मते नितीश कुमारांच्या आघाडीचे सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमारांसारखा चेहरा असणे हेच आहे.नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द नक्कीच चांगली राहिली आहे.विशेषत: लालू-राबडींनी त्यापूर्वी १५ वर्षे जो धुमाकूळ घातला होता त्यापासून नितीश कुमारांच्या राजवटीत बिहारची नक्कीच मुक्तता झाली. आजही नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच लोकप्रिय आहेत. त्यांच्या तोडीचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार भाजप आघाडीकडे नाही. बिहारची २००५ नंतर प्रगती झाली त्याचे श्रेय नितीश कुमार नक्कीच घेऊ शकतात.
२. कागदावर नितीश कुमारांची आघाडी ही भाजप आघाडीपेक्षा अधिक शक्तीशाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दल (संयुक्त) + राष्ट्रीय जनता दल + कॉंग्रेस आघाडीला ४५.१% मते तर भाजपप्रणित एन.डी.ए ला ३९.५% मते होती.
पण नितीश कुमारांनी काही अत्यंत गंभीर चुका केल्या त्या त्यांना महागात पडतील असे मला वाटते. त्या पुढीलप्रमाणे:
१. २०११ च्या सुरवातीपासून युपीए सरकार संकटात सापडल्यावर आणि भाजपकडेही केंद्रीय पातळीवर नेतृत्वासाठी सर्वमान्य चेहरा नव्हता. अशा वेळेस तिसऱ्या आघाडीचे सरकार येऊन कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन १९९६-९८ ची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचे चित्र उभे राहत होते.त्याचवेळी भाजपमध्ये नरेंद्र मोदींच्या नावालाही अंतर्गत विरोध होत होताच.अशा वेळी एन.डी.ए आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करेल अशी कदाचित नितीश कुमारांची अपेक्षा असावी.पण डिसेंबर २०१२ मध्ये गुजरातमध्ये तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींचे नाव अधिक प्रमाणात पुढे येऊ लागल्यानंतर आपले नाव जाहीर होणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले.त्याचवेळी भविष्यात तिसऱ्या आघाडीचे सरकार आल्यास आपला दावा प्रबळ असावा आणि असा दावा ठेवण्यासाठी अर्थातच २०१४ च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या साथीने लढविणे अडचणीचे ठरेल हे लक्षात घेऊन नितीश कुमारांनी जून २०१३ मध्ये भाजपशी १७ वर्षे जुनी युती तोडली. देशात २०१३ च्या उत्तरार्धापासून नरेंद्र मोदींची लाट आलीच होती. नेमक्या त्याचवेळी भाजपशी युती तोडणे ही त्यांची घोडचुक ठरली.बदलती परिस्थिती लक्षात घेऊन रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांनी भाजपशी जमवून घेतले.त्याचा परिणाम म्हणून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल (संयुक्त) चा धुव्वा उडाला.
जून २०१३ मध्ये भाजपशी युती तोडणे राज्य विधानसभा निवडणुकांसाठी नितीश कुमारांना कदाचित इतके महागात पडले नसते. कारण यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आपल्या पूर्वेतिहासाच्या जोरावर लोकांकडे मते मागूच शकले असते. पण त्यानंतर त्यांनी जी चूक केली त्यातून त्यांचा पाय आणखीच खोलात गेला.
२. लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर पराभवाची ’नैतिक जबाबदारी’ घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जीतनराम मांझींना मुख्यमंत्री बनविले.दरम्यानच्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल आणि त्याचवेळी मांझींसारखा फारशी महत्वाकांक्षा नसलेला मुख्यमंत्री बरा होईल असे गणित होते.असे गणित आखायचे आणि मग ते फसायचा इतिहास बराच जुना आहे. इंदिरा गांधींनाही नंतर कधीही कठपुतलीसारखे फिरवता येईल म्हणून १९६६ मध्ये सिंडिकेटने पंतप्रधान केले. केंद्रात राहून सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याच्या आड महाराष्ट्रावर लक्ष ठेवता येईल म्हणून शरद पवारांनी नाईकांना मुख्यमंत्री केले. पण ही दोन्ही गणिते फसली तसेच नितीश कुमारांचेही मांझींना मुख्यमंत्री करायचे गणित फसले. मांझी हे त्यापूर्वी फारशी महत्वाकांक्षा असलेले नेते नव्हते.पण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी नितीश कुमारांना दाद लागू दिली नाही आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून द्यायला सुरवात केली.त्यातच त्यांची भाजपशी सलगी वाढली आणि केसरीनाथ त्रिपाठींसारखा मुळातला भाजप नेता बिहारच्या राज्यपालपदी होता.या सगळयांनी मिळून नितीश कुमारांना जवळपास महिनाभर टोलवत ठेवले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर परतू दिले नाही. हे थोडेच झाले म्हणून की काय जीतनराम मांझी हे ’मुसहार’ या ’महादलित’ समाजातले. त्यांना अशाप्रकारे मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात मांझी यशस्वीही झाले. हाच महादलित समाज २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला होता.म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी परिस्थिती नितीश कुमारांची यामुळे झाली.पण मांझींना मुख्यमंत्री करून आपल्याच साठी खड्डा त्यांनी खणून ठेवला असे चित्र सध्या तरी नक्कीच आहे.
३. या दोन चुका कमीच झाल्या म्हणून की काय तर नितीश कुमारांनी लालूप्रसाद यादवांशी हातमिळवणी केली. २००५ आणि २०१० मध्ये लालूप्रसादांच्या ’जंगल राज’ च्या विरोधात रान उठवून नितीश कुमारांनी सत्ता हस्तगत केली.आता त्याच लालूप्रसादांबरोबर हातमिळवणी केल्यामुळे नितीश कुमारांसाठी पुढील धोके संबवतात--
अ. एका बाजूने मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि केलेली विकासकामे हे मुद्दे घेऊन लोकांपुढे मते मागायची त्याचवेळी लालूंच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करणे या दोन गोष्टी नक्कीच परस्परविरोधी आहेत.इतकी वर्षे ज्या जंगल राज साठी तुम्ही लालूंना टिकेचे लक्ष्य बनविलेत त्याच लालूंबरोबर परत हातमिळवणी कशी हा अडचणीचा प्रश्न त्यांची पाठ सोडणार नाहीच. यातून नितीश कुमारांना अन्यथा विकासासाठी मते ज्या मतदारांनी दिली असती ती त्यांच्याविरोधात जायची शक्यता नक्कीच आहे.
ब. कितीही काहीही म्हटले तरी बिहारमध्ये निवडणुकांसाठी जात हा काही प्रमाणात तरी महत्वाचा मुद्दा असतोच. लालूंच्या राज्यातील ’यादवीचा’ दलित आणि महादलित समाजातील अनेक जातींना त्रास होत होता आणि त्यापासून सुटका मिळावी म्हणून या समाजातील मतदारांनी पूर्वी नितीश कुमारांना मते दिली होती.त्याच लालूंशी हातमिळवणी करून ही सगळी मते आपल्यापासून दूर जातील ही तजवीज नितीश कुमारांनी करून ठेवली आहे असे मला वाटते.
क. नितीश आणि लालू १९९४ पासून एकमेकांचे राजकीय वैरी होते.त्यामुळे गाव पातळीवर जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात कितपत समन्वय आहे ही शंकाच आहे. शेवटी निवडणुकांसाठी केवळ उच्च पातळीवर युती होऊन चालत नाही.जर ती युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाली नाही तर ती युती एक लाएबिलीटी होईल असे मला वाटते.
ड. त्यातच ’मी हलाहल प्यायला पण तयार होईन’, ’चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी सापातले विष चंदनाच्या झाडात जात नाही’ अशा पध्दतीची वक्तव्ये नेत्यांकडून आली आहेत. यामधून नक्कीच प्रश्न उभा राहू शकतो की ही युती नक्की टिकणाऱ्यातली आहे का? भाजप आघाडीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि इतर त्यामानाने लहान पक्ष आहेत. पण नितीश कुमारांच्या आघाडीत त्यांचा आणि लालूंचा पक्ष दोन्ही बऱ्यापैकी तुल्यबळच आहेत.त्यामुळे कोणालाही माघार घेणे त्यामानाने कठिणच जाईल असे दिसते.
इ. २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पक्षाने १४० जागी निवडणुक लढवली होती.तसेच लालूंच्या पक्षाने १७५ जागी निवडणुक लढवली होती. यावेळी त्यांच्या वाट्याला १०० जागाच आल्या आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका संभवतो.
नितीश कुमार या चुकांमुळे बॅकफूटवर जातील असे मला वाटते. प्रत्यक्षात काय होईल, भाजप आघाडीमध्ये काय चित्र आहे, प्रत्यक्ष मतदानापर्यंत परिस्थिती कशी बदलते हे बघणे रोचक ठरेल.३० ऑगस्टला पाटण्यातील गांधी मैदानावरील सभेला फारशी गर्दी झाली नव्हती आणि लोकांना आकृष्ट करायला नृत्याचे कार्यक्रम ठेवले होते अशा बातम्या आल्या आहेत.ही या ’महागठबंधन’ साठी फारशी उत्साहवर्धक बातमी नाही.त्या सभेनंतर या ’महागठबंधन’ मधून समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडले.या पक्षांची बिहारमध्ये फार ताकद आहे अशातला भाग नाही.पण हे ’महागठबंधन’ कितपत स्थिर राहणार हा प्रश्न नक्कीच उभा केला जाऊ शकेल अशा या घटना आहेत.
हा लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहाविशी वाटते.खरं तर हा मुद्दा मी कमकुवत स्थानांमध्ये पहिल्यांदा ३ (फ) म्हणून लिहिणार होतो.पण हा मुद्दा वेगळा लिहित आहे. गोष्ट आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांनी लिहिलेली. ते १९९० मध्ये लालू पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर बिहारमध्ये गेले होते तेव्हा जातीपातीच्या उतरंडीतील तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये सीटवर बसून प्रवास करायला मिळणे हीच मोठी अप्रूप गोष्ट होती.त्यावेळी लालू म्हणाले होते--"मै आपको स्वर्ग तो नही दे सकता लेकीन स्वर तो जरूर दुंगा". ते त्या काळात चालून गेले. पुढे कुबेर २०१४ मध्ये बिहारला गेले असताना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये मांडीला मांडी लावून बसता येणे ही तर गृहित धरायची गोष्ट झाली होती--त्याचे अप्रूप वाटायचे दिवस बरेच मागे पडले होते.आता लोकांच्या महत्वाकांक्षा होत्या--चांगला नोकरी-व्यवसाय, चांगले शिक्षण, राहायला चांगले घर इत्यादी. तेव्हा या बदललेल्या महत्वाकांक्षेच्या काळात लालूंचे जुनाट मुद्दे लोकांना पूर्वी इतके प्रभावित करू शकतील अशी परिस्थिती राहिली नाही. पूर्वी यादव मतदार एकगठ्ठा लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदान करत असे. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यादव समाजातीलही काही प्रमाणात मते भाजपला विकासाच्या मुद्द्यावरून गेली होती अशा बातम्या आहेत.
एकूणच काय की एकदा एखादी गोष्ट मिळाली की त्या गोष्टीचे अप्रूप वाटेनासे होते आणि त्यापेक्षा मोठ्या गोष्टी हव्याशा वाटायला लागतात. त्यामुळे त्या अर्थी ’अच्छे दिन’ आले असे फारच थोडे लोक म्हणू शकतात.बहुतांश लोकांसाठी ’अच्छे दिन’ म्हणजे मृगजळासारखी दूर पळणारी संकल्पना ठरते. मोदी आणि भाजपने २०१९ पर्यंत या महत्वाचा गोष्टीचा विसर पडू न देणे हे श्रेयस्कर. असो. यापुढच्या लेखात भाजप आघाडीविषयी भाष्य करेन.
वर्गीकरण
वाचने
51693
वाचनखूण
प्रतिक्रिया
124
क्लिंटन
In reply to क्लिंटन by बोका-ए-आझम
+ १ असेच म्हणते . नेहमीसारखाच
नक्कीच
अजुन काही ताजा कलम जोडू
In reply to अजुन काही ताजा कलम जोडू by कैलासवासी सोन्याबापु
२. २७ जुलै ला राष्ट्रिय जनता
काही खरे नाही
लेख आवडला.
त्या आघाडीला महागठबंधन
In reply to त्या आघाडीला महागठबंधन by अनुप ढेरे
लालू प्रसाद ह्यांची साथ सोडता
In reply to त्या आघाडीला महागठबंधन by अनुप ढेरे
सहमत, एण्डीए बहुधा येणार नाय
In reply to सहमत, एण्डीए बहुधा येणार नाय by बॅटमॅन
हेच. अगदी असेच दिल्ली
In reply to हेच. अगदी असेच दिल्ली by मृत्युन्जय
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
ओवेसी उतरला मैदानात...
In reply to सहमत, एण्डीए बहुधा येणार नाय by बॅटमॅन
आज मोदींना फक्त लोकसभेत बहुमत
In reply to आज मोदींना फक्त लोकसभेत बहुमत by डॉ सुहास म्हात्रे
काँग्रेसने केवळ भाजपला श्रेय
In reply to काँग्रेसने केवळ भाजपला श्रेय by असंका
हाहाहा
In reply to काँग्रेसने केवळ भाजपला श्रेय by असंका
:)
In reply to काँग्रेसने केवळ भाजपला श्रेय by असंका
संपुआ ने आणलेल्या जीएसटी
In reply to संपुआ ने आणलेल्या जीएसटी by श्रीगुरुजी
पेट्रोलियम उत्पादने आणि
In reply to काँग्रेसने केवळ भाजपला श्रेय by असंका
लोकसभेतल्या बिलांच्या
लेख आवडला.
वाटच बघत होतो लेखाची.
मुद्देसूद
होय वाट पहातच होतो
- मोदींनी व्य्क्तीशः जास्त लक्ष्य घालणे ठीक आहे का?
- शत्रुघ्न सिन्हा कितपत उप्द्र्वमूल्य बाळगून आहेत ?
- केंड्रात केलेल्या चांगल्या कामाचा(राज्या संबधीत) कितपत प्रभाव पडेल.?
नाखु वाच्कांची पत्रेवालाIn reply to होय वाट पहातच होतो by नाखु
मोदींनी व्य्क्तीशः जास्त
In reply to मोदींनी व्य्क्तीशः जास्त by कैलासवासी सोन्याबापु
आण्खी
In reply to आण्खी by नाखु
थोडे आशादायी चित्र
आता नोव्हेंबर पर्यंत मजा आहे.
नेहमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण
नितीसकुमार जीतेगा| भाजपा के
नेहमीप्रमाणेच अतिशय छान विश्लेषण !
फारच छान लेख
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख!
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
>>> सध्या तरी काटेका टक्कर
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! by श्रीगुरुजी
इंडिय टीव्ही - सी व्होटर च्या
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर मतदान सर्वेक्षणांवरील श्रद्धा डळमळी
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर मतदान सर्वेक्षणांवरील श्रद्धा डळमळी by होबासराव
कांटे कि टक्कर
In reply to कांटे कि टक्कर by कपिलमुनी
मजा आ जायेगा..
मुनिवर्य
१६% टक्के मते या वेळी
In reply to १६% टक्के मते या वेळी by विवेकपटाईत
थोडे आकडे
In reply to थोडे आकडे by गॅरी ट्रुमन
धन्यवाद गॅरी !
बिहार मध्ये मुसलमान मतदार
In reply to बिहार मध्ये मुसलमान मतदार by मृत्युन्जय
त्रिशंकू कसं होइल? इथे दोनच
राजकारणात अजिबात रस नसल्याने आमचा पास....
नितीश कुमारांचे वैशिष्ट्य
In reply to नितीश कुमारांचे वैशिष्ट्य by रमेश आठवले
इतर उमेदवारांच्या प्रचारास
In reply to इतर उमेदवारांच्या प्रचारास by गॅरी ट्रुमन
विचित्र वागणूक
In reply to विचित्र वागणूक by रमेश आठवले
नितीश कुमार हे मतदारांचा कौल
In reply to नितीश कुमार हे मतदारांचा कौल by गॅरी ट्रुमन
२०१५ मध्ये ही नाही
In reply to विचित्र वागणूक by रमेश आठवले
पृथ्वीराज चव्हाण पण
In reply to पृथ्वीराज चव्हाण पण by दुश्यन्त
तात्पुरती व्यवस्था
सेक्युलर नितीश
प्रतिसादांसाठी धन्यवाद
गॅरी , एक गट्ठा मुस्लीम
ओवेसी फॅक्टर
In reply to ओवेसी फॅक्टर by बोका-ए-आझम
ओवेसींने उडी घेतलीय म्हणे.
छान अभ्यासपुर्ण लेख...
In reply to छान अभ्यासपुर्ण लेख... by योगी९००
ओवेसी
In reply to ओवेसी by गॅरी ट्रुमन
ओवेसी
In reply to ओवेसी by बोका-ए-आझम
ओवेसी मोठा व्हायला नको
In reply to ओवेसी मोठा व्हायला नको by गॅरी ट्रुमन
ओवेसीपेक्षा लालूही परवडला.
अभ्यासपूर्ण लेख
अभ्यासपूर्ण लेख
आत्ताच एन.डी.ए. ची जागावाटणी झाल्याची बातमी आहे.
In reply to आत्ताच एन.डी.ए. ची जागावाटणी झाल्याची बातमी आहे. by बोका-ए-आझम
अरे हेच पोस्ट करायला आलो होतो
एकंदरीत माझ्या अंदाजानुसार
Times of India नुसार
नितीश कुमार यांचे आतंकवादा बाबतचे धोरण
According to today's ABP News
ओवैसी असर
अजून एका टाईम्स आॅफ इंडिया मध्ये आलेल्या बातमीनुसार
झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला
In reply to झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला by श्रीगुरुजी
झी न्यूज़ हे चॅनल सुद्धा
In reply to झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला by श्रीगुरुजी
पण गुरूजी
In reply to पण गुरूजी by बोका-ए-आझम
२०१० बिहार विधानसभा निवडणुक -
In reply to पण गुरूजी by बोका-ए-आझम
माझ्या जुन्या धाग्यांची जाहिरात
In reply to झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला by श्रीगुरुजी
झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला
In reply to झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला by श्रीगुरुजी
लिंकची जागा चुकली.
In reply to झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला by श्रीगुरुजी
अमेरिकेतील अनुभव
धन्यवाद गुरुजी. आता अजून एक शंका.
In reply to धन्यवाद गुरुजी. आता अजून एक शंका. by बोका-ए-आझम
माझ्या मते कारण
धन्यवाद गुरुजी. आता अजून एक शंका.
In reply to धन्यवाद गुरुजी. आता अजून एक शंका. by बोका-ए-आझम
बिहारमध्ये समाजवादी पक्ष आणि
शिवसेनेचा प्रभाव
In reply to शिवसेनेचा प्रभाव by रमेश आठवले
त्यांचा कडाडून विरोध फक्त
In reply to त्यांचा कडाडून विरोध फक्त by खेडूत
निव्वळ भावनेच्या भरात ?? नाय वो..
In reply to शिवसेनेचा प्रभाव by रमेश आठवले
महाराष्ट्राबाहेर शिवसेना
In reply to महाराष्ट्राबाहेर शिवसेना by गॅरी ट्रुमन
राष्ट्रीय पक्षवाला
In reply to राष्ट्रीय पक्षवाला by अनुप ढेरे
शिवसेना?
राजकारण
सर्वांना धन्यवाद
आतुरतेने वाट पाहत आहे. :-)
बिहार विजन डॉक्युमेंट
In reply to बिहार विजन डॉक्युमेंट by दत्ता जोशी
फुकटात द्यायचे आश्वासन
१२५ लाख कोटी
In reply to १२५ लाख कोटी by दत्ता जोशी
परत चुक ;)
१२५ लाख कोटी?
अर्धवटरावांना माहिती आहे बघा नक्की. ;-)
In reply to अर्धवटरावांना माहिती आहे बघा नक्की. ;-) by दत्ता जोशी
बिहार पॅकेजचा आकडा १,२५,०००
In reply to बिहार पॅकेजचा आकडा १,२५,००० by डॉ सुहास म्हात्रे
हा आकडा बिहारच्या २०१५ च्या
बिहारी तरुणाची मते...
In reply to बिहारी तरुणाची मते... by chetanlakhs
चोखंदळपणा
In reply to चोखंदळपणा by गॅरी ट्रुमन
भाजपावर गुंडांना तिकिटं
In reply to भाजपावर गुंडांना तिकिटं by अनुप ढेरे
बाहुबली
In reply to बाहुबली by गॅरी ट्रुमन
ज्यांना जंगलराजची भीती आहे ते
खरं आहे.
In reply to खरं आहे. by दत्ता जोशी
समर्थनीय नक्कीच नाही
In reply to समर्थनीय नक्कीच नाही by गॅरी ट्रुमन
राजकारणात
पहले स्कूटी अब मुफ़्त पेट्रोल
In reply to पहले स्कूटी अब मुफ़्त पेट्रोल by नांदेडीअन
फुकट पाणी, फुकट वायफाय, २५
अभ्यासपूर्ण लेख,आवडला
मोदी प्रभाव
एक राहिलेला मुद्दा
महागठबंधनचा प्रचार
कालच्या सोनिया गांधींच्या सभेतही
गेल्या ३ निवडणुकात (२०१०
ही एक interesting link आहे -
खालील वृत्तानुसार ---
एबीपी न्यूज - नेल्सन च्या १५
In reply to एबीपी न्यूज - नेल्सन च्या १५ by श्रीगुरुजी
थोडी गफलत वाटते
चारच जागा अधिक हे चुकीचे
भाजप व एनडीए साठी आज वाईट