गंमत (भयगूढ कथा)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
म्हणजे उन्हाळ्याचा शेवट चालू होता .पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती . उन्हं कलू लागली होती . दिवसभर उन्हाच्या काहिलीनं वैताग आला होता .पण आता कसं गार वारं सुटल्या मुळं जीवाला बरं वाटत होतं .आभाळ जरा भरून आल्यासारखं वाटत होतं . दिवसभर फळं विकत बसलेली कमळी आता कंटाळली होती . तिच्या पाटीतला (टोपलीतला) शेवटचा द्राक्षाचा घड संपला .विक्री चांगली झाली होती . २-३ पेरू शिल्लक होते पण 'आता लई उशीर नगं करायला. न्हाईतर आई कावल' म्हणून तिनं ते जवळच्या कापडी पिशवीत घातले . जवळच्या बाटलीतलं पाणी बी दोन घोटंच उरलं होतं .ते संपवलं .लुगडं झटकून ती उठली . केस सोडून पुन्हा अंबाडा घातला . डोईवर पदर घेतला अन पाटी काखोटीला मारून ती रस्ता तुडवू लागली .
कमळी शेजारच्या गावातून तालुक्याला फळं विकायला यायची.तिचा बा तिच्या लहानपणीच वारला होता .बा गेल्यानंतर तिनं चौथीतून शाळा सोडली होती . घरची थोडीफार शेती होती . आई शेतीकड लक्ष द्यायची पण कमळीला काही शेतात राबायला आवडायचं नाही . ती आपली जायची फळांची पाटी घेवून तिच्या मैत्रिणीबरुबर .गाव तसं तालुक्यापासून जरा लांब होतं . कधी मधी गाडी मिळायची . पण कमळीला आपलं चालतच जायला आवडायचं .
दोघीजणी गप्पा मारत चालायच्या . गाडीचं पैसं वाचवून वाचवून तीनं नुकतंच चांदीचं पैंजण घेतलं होतं .
कमळी आसंल १७-१८ वर्षांची पोर . मोठं टपोरं डोळं , धारदार नाक अन नाजूक जीवणी सौंदर्यात भर घालायची त्यातून केसांच्या बटा कपाळावर कपाळावर भुरभूरायच्या . तिचं नाव 'गुलाब' असायला हवं होतं . पण आईबापानं कमळी ठेवलं होतं . तर अशी हि कमळी. आज तिची मैत्रीण तिच्या मावशीकड गेल्यामुळे कमळीला एकटच तालुक्याला जावं लागलं . अन त्यात उशीर झाल्यामुळं ती झपझप पाय टाकत चालली होती . 'तुझ्यासारख्या तरण्याताठ्या पोरीला लवकर घराकडं यायचं काळात नाय का टवळे SSS ' म्हणून गेल्याच आठवड्यात आई रागं भरली होती .आज पुन्हा बोलणी खावी लागणार म्हणून करत होती . अशीच स्वतःच्या विचारांत गुंग होवून चालत असताना . 'हुरर्र हय्या' म्हणून बैलगाडी हाकल्याचा आवाज आला . कमळीनं वळून बघितलं .
"कमळे . ये गाडीत बस . " - गाडीवाल्याचा आवाज आला
"कोण शिर्पा मामा ?" - कमळीनं विचारलं
"मामा नव्हं . चिरंजीव हैत त्यांचं "
"कोण गण्या ?"
गण्या सातवी पर्यंत शिकला होता . नंतर त्याचं काय मन रमंना शाळेत . आणि बाप बी काय त्याच्या अभ्यासाच्या मागं लागत नव्हता . घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे कुणी त्याला शाळेत जावून शिकंच असा काय आग्रह केला नव्हता . गण्या आसंल कमळीहून २-३ वर्षांनी मोठा .तरणाबांड .दिसायला बी झ्याक होता .पिळदार शरीराचा . दोघांना एकमेकांबद्दल मनातून कायतरी वाटत होतं . आत्ताच्या भाषेत बोलायचं तर दोघांचा एकमेकांवर क्रश होता .पण कुणी तसं स्पष्ट बोलून दाखवलं नव्हतं एकमेकांना . एकदा फक्त गण्याने "कमळी सोभंल बघा गणेशला" असं कमळीच्या आईनं गाण्याच्या बापाला म्हणल्याचं ऐकलं होतं .कमळीला सगळ्यात जास्त आवडायचा तो त्याचा निर्भीड स्वभाव . एकदा त्यानं आणि त्याच्या बापानं गुंडांशी चार हात करून त्यांना चांगलंच लोळवल होतं . आता गाडीत गण्या आहे म्हणल्यावर कमळीच्या काळजात जरा धडधड झालं . गण्याच्या काळजात आनंदानं लाह्या फुटल्या . पण ये म्हणल्यावर लगीच कशाला जायचं गाडीत म्हणून ती म्हणाली ,
"नको . मी जाते कि चालंत " - कमळी
"चालंत ? गाडी असताना ?" - गण्या
"व्हय . त्याला काय हुतंय ? रोज तर चालत जाते कि"
"आगं . पण रोज कुठं असतीया गाडी . आज आहे ना. आन उशीर झालाय . अंधार पडायला लागलाय . ये बघू ."
पण कमळी काय गाडीत बसली नाय . आरं काय न्हाय होत . येते मी चालत .
"अश्या एकट्या पोरीला बघून कुणी आडवलं तर ? ह्या रानात जंगली जनावरं बी येत्यात अंधार पडल्यावर ".
कमळी थोडी घाबरली . पण ती म्हणाली .
"तू हायस नव्ह . तू हळूहळू गाडी चालव कि. मी चालते गाडी बरुबर "
"बरं" म्हणून गण्या तिच्या स्पीडनं गाडी हाकू लागला . ५ मिनटान नंतर म्हणाला .
"छान . असं गेल्यावर गेल्यावर सकाळी कोंबड अरवायच्या येळंला पोचू . तुला यायचं नसलं तर जातो म्या . तू ये आपली चालत .अंधारतनं एकटीच . "
कमळीनं विचार केला . हा निघून गेला तर आता अंधारातून एकटीनं जावं लागलं . आन मग खरंच कुणी आडवलं , कोण जनावर आलं तर ?
"बरं बरं . येते . " म्हणून ती गाडीत चढली . गण्या सुखावला .कमळी पाय खाली सोडून एका हातानं गाडीच्या दांड्याला पकडून गाडीच्या कडेला बसली .दोन - चार मिनटानं गण्यांन मागं वळून बघितलं .
"ऑ . आगं अशी काय बसलीस . पार गाडीच्या टोकावर . आत सरक कि . अन पाय वर घिवून बस .आता रातचं साप निघ्त्यात . पाय बिय लागला तर काय घ्या ? "
"व्हय व्हय " म्हणत ती पाय वर घेवून आणि आत सरकून बसली . गण्यानं तिच्याकड हसरा कटाक्ष टाकला . तिनं उगं पदर लपेटून घेतला .
"काय गं . लई येळ केलास आज . अंधार पडला कि . "
"व्हय रं . दराक्ष लई दिवस राहत नाहीत . थोडी उरली होती . म्हणलं संपवूनच जावं . येळेचं भानच नाही राह्यलं बघ . अन तू कसा काय रं आज ह्या रस्त्यांनी ? '
"आबांनी तालुक्याला धाडलं होतं . बियाणं आणि खतं घेतली होती त्यांचं पैसं द्यायचं राह्यलं होतं थोडं . ते दिऊन आलो ".
गण्याची बैलगाडी नेहमीच्या कमळीच्या रस्त्यानं नव्हती चालली . कारण कमळी जायची ती पायवाट होती . आता गाडीनं जायचं म्हणजे गाडी जावू शकेल अश्याच रस्त्यानं जाणं भाग होतं . थोडा वेळ शांततेत गेला . आता अंधार वाढला होता .गण्या मुद्दामच बैलगाडी हळूहळू चालवत होता . त्याने रस्ता दिसण्यासाठी कंदील पेटवून बैलांच्या जू च्या मधोमध लावला .त्या उजेडात सावल्या हलत होत्या .बैलांच्या गळ्यात घुंगरं बिंग्र नव्हती . पण चाकाचा करकर आवाज त्या शांततेला चिरत होता .रातकिड्यांची किरकिर चालली होती . मधूनच रातपारवे उडत होते . दूर कुठूनतरी कुत्राच्या केकाटण्याचा आणि मग विव्हळण्याचा आवाज आला . कमळी तशी घाबरट नव्हती पण आता रात्रीच्या अंधारात , एका पुरुषाबरोबर आन ते बी अश्या रानात . आता मात्र तिला भीती वाटू लागली .
"गण्या हान कि गाडी बिगीबिगी . किती दमानं चालायलास "
"बिगीबिगी हाकायला आता काय दिस हाय व्हय ? आगं रातीची बैल हळूहळू चालत्यात . तू म्हणत अस्चील तर हाणतो जोरात . पण कुठं खड्याबिड्यात बैलं गेली तर दोघांनाबी हतंच राहावं लागल रातीचं . राहशील न्हवं माज्या बरुबर ? " गण्याचा स्वर मिस्किल होता .
"नगं नगं . चालव आपली हळूहळू ".
गाडी आपली हळूहळू चालली होती . थोड्या वेळाने गण्याने चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकला . कमळी घाबरली आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं . तो गालातल्या गालात हसला . मग म्हणाला,
"कमळे काय गं घाबरलीस का ? "
कमळी गप्प .
"आगं एवढ्या लांब का बसलीस ? आता तुझ्याशी बोलायचं तर सारखं मागं वळून बघावं लागतंय . मगाचपासनं सारखं मागं वळून मान दुखायला लागली बघ . हितं यीवून बस कि जरा . हतं शेजारी बस .म्हणजे निट बोलता
यील ".
कमळीला ते पटलं ती त्याच्या शेजारी जर अवघडून बसली . गण्या आता लई खुष झाला . परत इकडच्या तिकडच्या काहीतरी गप्पा झाल्या . मग पुन्हा थोडा वेळ शांततेत गेला . गण्याला आता कमळीला अजून थोडं आपल्याकड खेचायची हुक्की आली . त्यानं तिची गंमत करायची ठरवली .
"काय गं कमळे तुला ठावं हाय का ? "
"काय रं ?"
" पुढं जखीनीचा माळ हाय. "
"जखीनीचा माळ? " कमळीनं चमकून विचारलं
"व्हय .लई वर्सांपुर्वी सुंदरा नावाची म्हातारी होती . तिला म्हनं कसला रोग झाला होता .तिचं करायला बी कोनी नव्हतं . विधवा होती . पोर नव्हतं तिला . मग गावकर्यांनी हाकलून दिली तिला गावाबाहेर . ती तिथं रानात भलंमोठं वडाचं झाड हाय ना, त्याच्या खाली बसून राहायची . मग तिथंच मेली बघ . बिचारी .पण ती जखिन
हून लोकांना धरती बघ . "
कमळीचा चेहरा भीतीनं पांढराफटक पडला . अन नि मागचा पुढचा विचार न करता सरळ जावून गाण्याला धरून त्याला खेटून बसली .
प्रतिक्रिया
एक होतं गाव. त्यात होतं पोष्ट
;) मजेशीर आहे. भयकथेपेक्षा
जखिणीचा माळ
लय आवडली गोष्ट!
+१
दोन फुलं तरी आनायची एकमेकाला
चित्रा थेटरला लैच सौदिंडियन
नाय. पैला 'हेन्रीज रोमान्स'
गेलं ते सर्व रे! मातीमोल झाला
असो!
९० च्या दशकातला मराठी चित्रपट
क्रमश: लिहायचं राहिलं . थोडी