✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

म
मारवा यांनी
Mon, 08/17/2015 - 12:52  ·  लेख
लेख
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? दुसरा एक भाग म्हणजे धार्मिक व्यक्तींची एक अपेक्षा असते की जी मला कायम दांभिक वाटते ती अशी की मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे. या सर्व्हायव्हल च्या अपेक्षेने परत स्वत:च इतरांशी बांधुन घेण येतच. याने असा माणुस संपुर्ण आयुष्याशी इंटीग्रेट राहण प्रामाणिक असण टाळतच असतो. माझा एक आयुष्याचा महत्वपुर्ण भाग भुमिका मी इतरांवर लादतो करवुन घेतो अशा अर्थाने. पण आयुष्य असे सोयिस्कर तुकड्यात तोडुन जबाबदारी व त्यापेक्षा भुमिका व त्या अनुषंगाने येणारे सर्व अनुभव आघात यांना सामोर जाण या पासुन एक दांभिक पलायन असा माणुस करत असतो अशा कुठल्याही माणसाला जीवनाच परीपुर्ण आकलन होण शक्य आहे का असत का ? इथे हिंदु धर्माच उदाहरण घेतलय पण हे सर्वच धर्माबाबत लागु होत, अजुन एक बाब अशी की अशा धर्माच्या संकल्पनांच्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याने निर्माण होणारी मानवी मनाची तीव्र कुचंबणा व ताण.व त्याने हतबल होणारा माणुस, अशी माणस आपली नैसर्गिक सहजता व संवेदनशीलता हरवुन बसतात. त्याहुन वाईट म्हणजे ते आपली मुलभुत प्रामाणिकता इंटेग्रीटी हरवुन दांभिक बनतात. विवेकानंद यांची हि पत्रे वाचुन माझ्या मनात वरील विचार चक्र सुरु झाले. त्यांचे हे पत्र पहा X To Mrs. G. W. Hale DETROIT, 20 February 1894. DEAR MOTHER, My lectures here are over. I have made some very good friends here, amongst them Mr. Palmer,* President of the late World's Fair. I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose. I have lost at least $5,000 by joining this man. Hope you are all well. Mrs. Bagley and her daughters are very kind to me. I hope to do some private lecturing here and then go to Ada and then back to Chicago. It is snowing here this morning. They are very nice people here, and the different clubs took a good deal of interest in me. It is rather wearisome, these constant receptions and dinners; and their horrible dinners — a hundred dinners concentrated into one — and when in a man's club, why, smoking on between the courses and then beginning afresh. I thought the Chinese alone make a dinner run through half a day with intervals of smoking!! However,they are very gentlemanly men and, strange to say, an Episcopal clergyman* and a Jewish rabbi* take great interest in me and eulogize me. Now the man who got up the lectures here got at least a thousand dollars. So in every place. And this is Slayton's duty to do for me. Instead, he, the liar, had told me often that he has agents everywhere and would advertise and do all that for me. And this is what he is doing. His will be done. I am going home. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum. But Jimmy Mills* and Slayton were sent by the Lord to stand in the way. His ways are inscrutable. However, this is a secret. President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. Pray that he may succeed. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment; but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India. My love to Harriets, Mary, Isabelle, Mother Temple, Mr. Matthews, Father Pope and you all.* Yours obediently, VIVEKANANDA. इथे विवेकानंद एक कुचंबणा अनुभवतात आणि एक दांभिकता दर्शवितात जी प्रातिनीधीक आहे. त्यांची हि पत्रे अशा माणसाची स्थिती दर्शवतात. यातले पहिले पत्र पहा यात एक पारंपारीक ट्विस्टेड नैतिक भुमिका विवेकानंद कशी घेतात ती दांभिकता बघण्यासारखी आहे. या पत्रात स्पष्टपणे असे दिसुन येते की विवेकानंदांनी स्लेटन या व्यक्तीबरोबर एक लिखीत करार केलेला होता ज्या अनुसार त्याने विवेकानंदांसाठी अमेरीकेत चांगल्या ठिकाणी सभांचे/व्याख्यानांचे आयोजन करावयाचे होते त्या सभांची चांगली अ‍ॅडव्हर्टाइज करणे व त्यांद्वारे चांगला निधी विवेकानंदांसाठी उभा करणे अपेक्षीत होते. या पत्रात विवेकानंद आपला राग व्यक्त करत आहेत की कसे त्यांना ५००० डॉलर चे नुकसान झालेय इ. व मी अधिक पैसा मिळवु शकलो असतो मात्र स्लेटन ने कराराप्रमाणे चांगले काम केले नाहि इ. तर करार करुन विवेकानंद पस्तावलेले दिसतात. यापुढच्या पत्रातील भागात विवेकानंद अत्यंत दांभिक भुमिका घेतांना दिसतात. ते म्हणतात त्यांचा नविन मित्र मि. पामर हा स्लेटन च्या करारा च्या प्रकरणातुन सुटका करण्यासाठी शिकागो ला गेलेला आहे व पुढे पामर मला वाचवण्यात यशस्वी होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना माझ्यासाठी कर असे हि ते पत्रात मिसेस हेल ला सांगतात. अजुन एकीकडे अनेक जजेस ना त्यांनी हे कॉट्रॆक्ट दाखवुन कायदेशीर सल्ला हि घेतलेला दिसतो असे पत्रावरुन दिसते. तर एकीकडे सल्ला घेण मित्राकरवी मदत घेण व ईश्वराला प्रार्थना करण हा करार भंग करण्यासाठी सर्व भौतिक प्रयत्न जोरात चालवलेले दिसतात. आणि त्याच बरोबर ते अत्यंत दांभिकतेने मिसेस हेल ला म्हणतात कि हे कंत्राट मोडता येउ शकते असा सल्ला जजेसने दिलेला आहे ( पण त्यांना तसे करण्याचे धाडस हि अर्थातच दिसुन येत नाही) म्हणुन ते म्हणतात की " पण मी तर एक संन्यासी आहे - नो सेल्फ़ डिफ़ेन्स तर मी स्वत:चा बचाव करणार नाही तर मग मी अ‍ॅज अ सन्यासी काय करेल ? मी संन्यासी आहे मी या फ़ंदात पडणार नाही असे सुचवत ते म्हणतात की देअरफ़ोर आय हॅड बेटर थ्रो अप द व्होल थिंग अ‍ॅंड गो टु इंडिया ( हे सर्व सोडुन मी सरळ हिंदुस्थानात निघुन जाईल) वादासाठी मान्य केले की करार कदाचित अन्यायकारक असेल एकतर्फ़ि असेल किंवा स्लेटन हा करार जसा अंमलात आणायला हवा तसा आणतही नसेल कदाचित. परंतु पहिल्यांदा मुळात लिखीत करार करावयाचा त्याची तयारी दर्शवायची त्यातुन निर्माण होणारा सर्व व्यावहारिक भौतिक फ़ायदा याची पुरेपुर अपेक्षा बाळगायची, तो अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात येत नसतांना दिसल्यावरच व अपेक्षीत पैशाच्या लाभाची शक्यता क्षीण झाल्यावर, एकिकडे तो करार मित्राकरवी भंग करण्याचे प्रयत्न करणे जजेस चे कायदेशीर सल्ले घेणे व सर्व प्रयत्न फ़ोल आहेत वाटल्यावर.मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते. दुसरी दोन पत्रे पहा CXXVIII Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri MATH BELUR 22 November 1898 YOUR HIGHNESS — Many thanks for your kind note and the Nimbarka Bhashya — reached through Jaga Mohan Lalji. I approach your Highness today on a most important business of mine,knowing well that I have not the least shame in opening my mind to you, and that I consider you as my only friend in this life. If the following appeals to you, good; if not, pardon my foolishness as a friend should. As you know already, I have been ailing since my return. In Calcutta your Highness assured me of your friendship and help for me personally and [advised me] not to be worried about this incurable malady. This disease has been caused by nervous excitement; and no amount of change can do me good, unless the worry and anxiety and excitement are taken off me. After trying these two years a different climate, I am getting worse every day and now almost at death's door. I appeal to your Highness's work, generosity and friendship. I have one great sin rankling always in my breast, and that is [in order] to do a service to the world, I have sadly neglected my mother. Again, since my second brother has gone away, she has become awfully worn-out with grief. Now my last desire is to make Sevâ [give service] and serve my mother, for some years at least. I want to live with my mother and get my younger brother married to prevent extinction of the family. This will certainly smoothen my last days as well as those of my mother. She lives now in a hovel. I want to build a little, decent home for her and make some provision for the youngest, as there is very little hope of his being a good earning man. Is it too much for a royal descendent of Ramchandra to do for one he loves and calls his friend? I do not know whom else to appeal to. The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs — I have exposed myself to your Highness, and none else shall know of it. I am tired, heartsick and dying. Do, I pray, this last great work of kindness to me, befitting your great and generous nature and [as] a crest to the numerous kindnesses you have shown me. And as your Highness will make my last days smooth and easy, may He whom I have tried to serve all my life ever shower His choicest blessings on you and yours. Ever yours in the Lord, VIVEKANANDA P.S. This is strictly private. Will you please drop a wire to me whether you will do it or not? Ever yours, VIVEKANANDA CXXIX To Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri MATH BELOOR HOWRAH DISTRICT 1 December 1898 YOUR HIGHNESS — Your telegram has pleased me beyond description, and it is worthy of your noble self. I herewith give you the details of what I want. The lowest possible estimate of building a little home in Calcutta is at least ten thousand rupees. With that it is barely possible to buy or build a house in some out-of-the-way quarter of the town — a little house fit for four or five persons to live in. As for the expenses of living, the 100 Rs. a month your generosity is supplying my mother is enough for her. If another 100 Rs. a month be added to it for my lifetime for my expenses — which unfortunately this illness has increased, and which, I hope, will not be for long a source of trouble to you, as I expect only to live a few years at best — I will be perfectly happy. One thing more will I beg of you — if possible, the 100 Rs. a month for my mother be made permanent, so that even after my death it may regularly reach her. Or even if your Highness ever gets reasons to stop your love and kindness for me, my poor old mother may be provided [for], remembering the love you once had for a poor Sâdhu. This is all. Do this little work amongst the many other noble deeds you have done, knowing well whatever else can be proved or not, the power of Karma is self-evident to all. The blessings of this good Karma shall always follow you and yours. As for me, what shall I say — whatever I am in the world has been almost all through your help. You made it possible for me to get rid of a terrible anxiety and face the world and do some work. It may be that you are destined by the Lord to be the instrument again of helping yet grander work, by taking this load off my mind once more. But whether you do this or not, "once loved is always loved". Let all my love and blessings and prayers follow you and yours, day and night, for what I owe you already; and may the Mother, whose play is this universe and in whose hands we are mere instruments, always protect you from all evil. Ever yours in the Lord, VIVEKANANDA यात अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद खेत्री संस्थानचे महाराजा अजित सिंग यांच्याकडे आपल्या आईसाठी १०० रु महिना व स्वत:साठी १०० रुपये महिना आर्थिक मदत मागतांना दिसतात. हे अतिशय करुण उदास करणार अस पत्र आहे याने विवेकानंद यांची झालेली कुचंबणा दिसुन येते. जी खरोखर अनेक प्रश्न मनात उभे करते जे वरील परीच्छेदात उपस्थित केले होते की खरच माणुस आपले रीलेट होणे नातेसंबंध यांचा त्याग करु शकतो का ? व एकीकडे अमुर्त संकल्पना जीवनात उतरवतांना निर्माण होणारा ताण व कुचंबणा याने निर्माण होणारी ह्युमन सिच्युएशन हि पुन्हा गंभीरतेने अवलोकन करण्यासारखी आहे. यात ते अत्यंत प्रांजळ पणे कबुल करतात की जगाची सेवा करता करता आय हॅव सॅडली निगलेक्टेड माय मदर त्यात ते प्रामाणिकतेने म्हणता की आय हॅव एक्स्पोज्ड मायसेल्फ़ टु युवर हायनेस आणि इतर कोणालाही या संदर्भात काहीही कळणार नाही. ही मदतीची मागणी विवेकानंद अत्यंत कसोशीने गुप्त ठेवण्याचा इतरांपासुन लपवण्याचा प्रयत्न करत असलेले दिसतात पत्रा अखेरीस पोस्ट स्क्रीप्ट जोडुन पुन्हा धिस इज स्ट्रीक्टली प्रायव्हेट हे लिहायला ते विसरत नाहीत. यात अतिशय लाचारीने राजा ची स्तुती करणारे त्याला रामचंद्राचा वंशज म्हणणारे व इतकी छोटी मदत त्यांच्यासारख्या राजासाठी मोठी आहे का ? असे अजीजीने विचारणारे, त्याच बरोबर मिशन च्या कार्यासाठी जमवलेल्या पैशाचा विनीयोग स्वत:च्या वैयक्तीक गरजांसाठी इतक्या मजबुरीतही कमालीच्या प्रामाणिकपणे टाळणारे विवेकानंदही दिसतात. ते त्यांची कुचंबणा हि व्यक्त की एकीकडे ते त्यांनी कार्यासाठी उभारलेला पैसा व्यक्तीगत कारणासाठी वापरु शकत नाही व दुसरी कडे इतर कोणाला देखील ते भीक मागु शकत नाहीत. महाराजांनी देखील तत्काळ त्यांना ८ च दिवसात प्रतिसाद दिलेला आहे असे या दोन पत्रांवरुन दिसते. त्यांचा एक भाउ वारलेला आहे व दुसरा कोण जाणे कसा पण कमावण्याच्या लायकीचा नाही असे ते राजांना सांगतात व म्हणुन आईला मदतीची आवश्यकता कशी आहे हे ते सांगतात. त्यांच्या मनात पुढे मागे आपल्यावरील राजाचे प्रेम आटले तर मिळणारी मदत बंद होण्याची भीती ही दिसुन येते. त्या केसमध्ये किमान आईला मिळणारी मदत तरी बंद होउ नये अशी कळवळुन विनंती करणारा पुत्र विवेकानंद दिसतो. शिवाय ईश्वरानेच कदाचित तुम्हाला अशा महान कामात साधन बनण्याचे सौभाग्य दिलेले आहे की ज्यायोगे तुम्ही माझ्या मनावरचा मोठा भार कमी करत आहात हे जोडायलाही ते विसरत नाहीतच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
22986 वाचन

💬 प्रतिसाद (116)

प्रतिक्रिया

श्री गुरुजी

मारवा
Tue, 08/18/2015 - 20:31 नवीन
माझ्याकडे कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद यांचे एकुन ९ खंड इंग्रजी भाषेतले आहेत. त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. त्या व्यतिरीक्त इतरांनी केलेली त्यांच्या वरील भाष्ये व रामकृष्ण परमहंस संबधित साहित्य माझ्या व्यक्तीगत संग्रहात आहेत. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते. तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. ९ खंडा व्यतिरीक्त यात काहि नविन मिळाल्यास आनंदच होइल पण प्रामाणिकपणे वाटते की ९ खंडात स्वामीजींचे स्वतःचे साहित्य पुर्ण कव्हर होते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( अशक्य नाही )अशीही काही बाब नाही. ते पृष्ठसंख्येच्या तुलनेने सहज पुर्ण वाचता येते. द माँक अ‍ॅज अ मॅन हे द अननोन लाइफ ऑफ स्वामी विवेकानंदा हे भाष्य आपण एकदा वाचुन पहा असे मी हि आपल्याला सुचवतो. अर्थात भाष्य हे भाष्य च असते मग ते कुणीही का केलेले असो नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे मी ही तेच मानतो म्हणुन भाष्य जरी रोचक वाटली तरी मुळ लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का सतत इव्हॉल्व होत राहण्याचा केलेला प्रयत्न व त्यातुन घेतलेला स्वतःचा शोध मला अधिक मोलाचा वाटतो असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यात माझ्या अल्प

जडभरत
Tue, 08/18/2015 - 22:32 नवीन
त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. हं अल्पज्ञान तर दिसतंच आहे. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते मग तुम्ही कशाला केलंत फालतू भाष्य!!! तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. लिंक अगोदरच वाचली असती तर असले फालतू चित्रण केलेच नसते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( हं ते पूर्ण कव्हर केलेलं नाही हे तुमच्या मुक्ताफळांवरून दिसतंच आहे. नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे नरहर कुरुंदकर ही फायनल ऑथोरिटी आहे हे सिद्ध करा!!! लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का आपल्या स्वचिंतनाचा उजेड काय आहे तो दिसतोच आहे. चालू देत. फुकट आहेत शब्द!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे

सुबोध खरे
Tue, 08/18/2015 - 21:02 नवीन
मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे वाचले आहे. परंतु येथे हा लेख टाकण्याचे प्रयोजन काय आहे हे मला कळले नाही. येथे माझ्या सारखे सामान्य वाचक येतात ज्यांना स्वामीजींवर अतीव आदर आहे त्यांना स्वामीजींचे चांगले विचार सांगण्याऐवजी त्यांच्या चुकाच दाखवण्याचे प्रयोजन कळले नाही. जर हा लेख स्वामीजींबद्दल समग्र लेखनातील एक भाग असता तरीही मान्य केले असते.जर हा लेख त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी असला तर त्याचे येथे प्रयोजन काय? हे म्हणजे मी क्षकिरण शास्त्रातील त्रुटी वर एक लेख मिपावर लिहिण्या सारखे आहे. येथे त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे फार तर एक किंवा दोन लोक असतील. स्वामीजी हे सुद्धा माणूसच होते. त्यांच्या जीवनातील काही चुका चव्हाट्यावर मांडण्याचा नक्की फायदा किंवा प्रयोजन काय? उद्या मी रतन टाटा किंवा डॉ अब्दुल कलाम यांच्या लैंगिक जीवनावर ( दोघांनी लग्न केले नव्हते आणि दोघांबद्दल मला आणि लोकांना अतीव आदर आहे म्हणून केवळ उदाहरण दिले आहे) लेख टाकला तर त्याचा उहापोह करण्याने काय निष्पन्न होणार आहे. किंवा भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या दोन लग्ने करण्यावर आणि त्यांनी पहिल्या बायकोवर कसा अन्याय केला याबद्दल चिखलफेक करण्याने काय निष्पन्न होईल? कारण त्यात काहीतरी खोडी काढण्यासारखे तुम्हाला मिळेलच. माझ्या मताने हा लेख अप्रस्तुत आणि छिद्रान्वेशी आहे. खरं तर त्यावर भाष्य करावे असेही मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद खरेजी! मला पण हेच

जडभरत
Tue, 08/18/2015 - 21:14 नवीन
धन्यवाद खरेजी! मला पण हेच म्हणायचे होते. ऐन तारुण्यात ज्या माणसाने देश व धर्मासाठी आपल्या गुरुच्या सांगण्यावरून प्रपंच सोडला त्याच्यावर हा लेख खूप अन्याय करतो. त्या माणसाला आपली उपेक्षित आई व भावासाठी प्रभावशाली व्यक्तिंनी काही करू वाटले तर बिघडले कुठे? आपण तर काहीच करायचे नाही, दुसर्या कुणी केले तर छिद्रान्वेषी वृत्तीने त्याच्या अडचणीच्या प्रसंगाकडे बोट दाखवायचे हा प्रकार खूप चीड आणणारा! बाकी हा लेख टाकण्याचे प्रयोजन त्या विभूतीवर राळ उडवणेच हा आहे. पण जागरूक मिपाकरांमुळे सदर लेखाच्या बुडाला सुरुंग लागला आहे. इतकी टीका होऊनही लेखकाला आपल्या चुकाची जाणीव न होणे म्हणजे त्यांचे बोलवते धनी कुठल्या विचार(?)धारेचे आहेत हे वेगळे सांगणे न लागे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परत विनंती करतो.

अर्धवटराव
Tue, 08/18/2015 - 21:10 नवीन
या पत्रांचं सुलभ मराठी भाषांतर मिळेल काय ?
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त श्री

जेपी
Tue, 08/18/2015 - 21:15 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.मारवा यांचा सत्कार एक फायबरचा पत्रा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम टिनपाट कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments

माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग

रामपुरी
Tue, 08/18/2015 - 22:09 नवीन
माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? या पहिल्या परिच्छेदावर चर्चा न होता सगळ्या प्रतिसादांचा रोख विवेकानंदांच्या उदाहरणाकडे दिसतो. विवेकानंदांच्या जागी "मदर तेरेसा" हे नाव टाकले तर यावर काही चर्चा शक्य आहे काय? संन्यास/सर्वसंग परित्याग या कल्पना खरोखरच शक्य आहेत काय?
  • Log in or register to post comments

अगदी रामपुरी चालवलेला आहे.

संदीप डांगे
Tue, 08/18/2015 - 22:32 नवीन
अगदी रामपुरी चालवलेला आहे. एकच घाव. छान प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

येस. अगदी

राही
Wed, 08/19/2015 - 14:40 नवीन
+१०० अगदी असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

@जडभरत, आवरा. लेखापेक्षा

संदीप डांगे
Tue, 08/18/2015 - 23:01 नवीन
@जडभरत, आवरा. लेखापेक्षा तुमचेच प्रतिसाद कैक पटीने जास्त हीन होत जात आहेत. तुम्हाला फारच आक्षेप असेल तर संपादकांकडे तक्रार करा. पण माझ्यामते झाली तेवढी आदळाआपट पुरे आहे आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. पिराताईंनी म्हटल्याप्रमाणे मुद्देसूद व अभ्यासपूर्ण प्रतिवादाची गरज आहे. खालच्या दर्जाची भाषा ही वापरणार्‍याचीच पातळी दर्शवते, ज्याच्या विरूद्ध वापरली जात आहे त्याची नाही.
  • Log in or register to post comments

ओहो! खूप राग आला वाटतं!!!

जडभरत
Tue, 08/18/2015 - 23:15 नवीन
ओहो! खूप राग आला वाटतं!!! धागाकर्त्याच्या पातळीला अगदी जवळ जात प्रतिसाद दिलात! त्याबद्दल काही बोलणे नाही! खालच्यादर्जाची भाषा तुमच्या लाडक्या लेखकानेच दाखवलीय! तुम्हाला विवेकानंदांविषयी भले काही घेणदणं नसो. आम्हाला तर आहेच. अन लेखकाचा सत्कार बरोबरच आहे. असो. तुमच्या पातळि विषयी काय बोलणे नाही.
  • Log in or register to post comments

महापुरुषांना डोक्यावर घेऊन

संदीप डांगे
Tue, 08/18/2015 - 23:57 नवीन
महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचतांना अनुयायांच्या लक्षात येत नसते की प्रत्यक्षात ते महापुरूषांचे विचार पायदळी तुडवत आहेत. महापुरूषांएवजी त्यांचे विचार डोक्यावर घेतले असतील तर नाचायची गरज पडत नाही.
  • Log in or register to post comments

हो पण प्रत्यक्षात

जडभरत
Wed, 08/19/2015 - 00:03 नवीन
हो पण प्रत्यक्षात महापुरुषांचे चरित्रहनन करणार्यांचं काय मग? ते असंच सहन करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुमचे आणि इतरांचे प्रतिसाद

संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 01:36 नवीन
तुमचे आणि इतरांचे प्रतिसाद वाचा आणि विरोध कसा करायचा ते ठरवा. इथे सभ्य लोक येतात असं माझं मत आहे. हे चेपु नाही. मारवा यांनी संयत शब्दात त्यांचे म्हणणे मांडले, विरोधी मत असणार्‍या सदस्यांनीही संयत शब्दात प्रतिवाद केला. तुमचे प्रतिसाद यात कुठे बसतात? तुमच्या सर्व प्रतिसादांतून मिपासदस्य म्हणुन मला वाचनिय वा मननीय एकही वाटला नाही. शेवटचा तर अगदी कहर होता. थेट शब्दात अपमानकारक आहे. अशी भाषा चेपुवर शोभून दिसते. इथे मिपापीठावर नाही. अतिशय हीन पातळीचे लेखन असले तरी त्यावर प्रतिवाद उच्च अभिरूचीचाच असावा असं माझं मत आहे. त्यातूनच आपली संस्कृती आणि संस्कार कळतात. इतर असंस्कृत वागत आहेत असे आपल्याला वाटतंय म्हणून आपणही असंस्कृत वागावं हे सर्वथा अयोग्य आहे. असो. माझी या लेखावरची प्रतिक्रिया एवढीच आहे की हिंदू संस्कृतीत सगळ्यांनाच चिकित्सेचा अधिकार आहे. ह्या मूळ अधिकारामुळेच हिंदू धर्म जगात वेगळा आहे. जे हा अधिकार अमान्य करतात ते माझ्या मते हिंदूच नाहीत. मारवा यांनी ह्याच अधिकाराखाली विवेकानंदांची चिकित्सा केली ती त्यांना त्यांच्या अल्पबुद्धीने वा कसेही जसे दिसले असेल त्याप्रमाणे. त्यावर एक सभ्य गृहस्थ म्हणून कुणाही हिंदूस विरोध करायचा असेल तर त्यांचे संपूर्ण म्हणणे आणि विचार योग्य अभ्यासपूर्ण प्रतिवादाने खोडून काढावे. माणसांना देव्हार्‍यात नेऊन ठेवणे निर्बुद्धांचे आवडते कार्य आहे म्हणून महापुरूषांचे लौकिकत्व चिकित्सेच्या परिघापासून दूरच ठेवावे असा त्यांचा आग्रह असतो. पण त्याने धर्म, संस्कृती एक साचलेलं डबकं होईल. व पुढे दुसरा कुणी विवेकानंद निपजायला परिस्थितीच उपलब्ध नसेल. स्वतः विवेकानंदांचे जेवढे साहित्य किंवा चरित्र मला माहीती आहे त्यावरून तरी ते चिकित्सकच होते असे दिसून येते. नुसते आंधळे अनुयायी बनून राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यामुळेच ते महापुरूष पदाला पोचले. इतिहास साक्षी आहे की सगळे महापुरुष हे मूळतः चिकित्सकच होते. प्राप्त परिस्थितीविरूद्ध त्यांनी प्रश्न विचारले. तशीच चिकित्सा विवेकानंदांच्या ही वागणूकीवर झाली तर आज जर ते हयात असते तर त्यांनाही वाईट वाटले नसते. कारण अशा फुटकळ अग्निपरि़क्षेला अस्सल सोने घाबरत नसते. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून आध्यात्मिक जगतात हिंदू फार पुढे आहेत. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून अनेक ढोंगी साधू-संत आज गजाआड आहेत. तसंच अशी चिकित्सा करत नाहीत म्हणूनच असल्या ढोंगी साधु-संतांचे फावते हेही लक्षात असू द्यावे. आमच्या पूज्य आणि आदरणीय महापुरूषांवर कसलेही प्रश्न उपस्थित करू नका असा अट्टाहासी कट्टर आग्रह इस्लाम धर्मात बघितला आहे आणि याचे परिणामही आपण जगभर बघत आहोत. अशाने काही गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे महापुरुषांवर उठलेल्या राळेविरूद्ध आपण काहीच प्रतिवाद करू शकणार नाही हे अनुयायांच्या लक्षात येतं कारण खुद्द अनुयायांनी तेवढा गंभीर अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे प्रश्नकर्त्यांवरच उलट आगपाखड करायचे धोरण आखले जाते. तेच कसे प्रश्न विचारण्यास लायक नाहीत असे दाखवले जाते. दुसरा म्हणजे अनुयायी महापुरुषांचा अपमान हा आपला व्यक्तिगत अपमान समजून अहंकारास सतत फुंकत बसलेले असतात. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणार्‍यांचा उलट अपमान केल्या जातो. तिसरं असं की महापुरुषांच्या स्वघोषित प्रतिमेला असे काही कवटाळून बसलेले असतात जसे की प्राणवायूच. ती प्रतिमा भंगण्याचा प्रयत्न कुणी केला तर जणू जीवावरच बेतणार आहे (नक्की कुणाच्या? महापुरुष तर गेले) अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात. यापैकी आपण नेमकं काय करतो याचा ज्याचा त्याने योग्य तो विचार करावा आणि आपली पातळी ओळखावी. तुम्ही च्यारित्रहनन हा शब्द फार सहज वापरून गेलात. पण त्याचा अर्थ काय? ज्यांची च्यारित्र्ये खोट्या प्रतिष्ठेतून बाहेरून चिकटवली जातात त्यांचे ते कमावलेले बुरखे फाडण्याला च्यारित्रहनन म्हणतात. म्हणजे असे लोक जे सामान्य जनतेत एक रुप घेऊन, एक प्रतिमा घेऊन वावरतात पण प्रत्यक्षात वेगळेच असतात. अशा ढोंगी लोकांचे च्यारित्रहनन होत असते. जे अशा प्रतिमांच्या आभासी जगापासून दूर असतात त्यांचे काय च्यारित्रहनन होणार? अर्थातच जे सर्वथा नागडे (याचा योग्य अर्थ घ्यावा) आहेत त्यांना अजून कोण आणि कसं नागडं करणार? ज्यांनी चरित्रबंधनेच नाकारली आहेत अशांची खिल्ली उडवणार्‍याचीच फजिती होईल की नाही? तुम्हाला माझा मुद्दा आणि रोख कळला असेल असे समजतो. ते "आवरा" हे तुमच्या उथळ आणि असभ्य होत चाललेल्या प्रतिसादांना उद्देशून होते. तुमची पातळी आणखी घसरू नये व तुमचेच हसे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा होती त्यात. तुमचा अनादर करण्याचा हेतू नव्हता तर मित्रत्वाचा सल्ला होता. मित्राने वाहवत जाऊ नये म्हणून योग्य ते सांगावे लागतेच. बाकी तुमची मर्जी. एक शेवटचे: आयडी सांभाळा. बॅन होऊ शकतो. मग असे कितीही लेख इथे मिपावर आले तर भंगार काय आणि संयत काय कुठलेच प्रतिसाद देता यायचे नाहीत. तरीही इथलं वाचत असाल तर मनातल्या मनात जळफळाट होण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. असो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

जडभरत

बोका-ए-आझम
Wed, 08/19/2015 - 00:39 नवीन
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे असा अर्थ अभिप्रेत असतो. मग अशा लोकांचा अपमान कसा काय होऊ शकतो? माफ करा पण तुमचं हे विधान तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या मनात जी विसंगती आणि वैचारिक गोंधळ असतो तोच दाखवतंय. एकीकडे ते म्हणतात, की भारतीय संस्कृती महान आहे, आणि दुसरीकडे Valentine's Day साजरा करण्याने भारतीय संस्कृतीला धोका आहे असंही त्यांचं मत असतं. जी संस्कृती एवढी महान आहे, ती एक दिवस साजरा करण्याने नष्ट होण्याएवढी लेचीपेची आहे का हा साधा प्रश्नही ते स्वतःला विचारत नाहीत. तुम्ही तेच करताय. एका मराठी संस्थळावर एका लेखकाने टोपणनावानं लिहिलेल्या एका लेखाने चारित्र्यहनन होण्याएवढे स्वामी विवेकानंद छोटे आणि खुजे आहेत का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. मला वाटतं, संदीप डांग्यांनी मांडलेला -अनुयायी विचार डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी महात्म्यालाच घेऊन नाचतात आणि त्याच्या विचारांचा पराभव करतात - हा प्रतिसादही त्याच संदर्भात आहे.
  • Log in or register to post comments

बोका जी, सभेत गोंधळ माजला तरच

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 01:29 नवीन
बोका जी, सभेत गोंधळ माजला तरच सभा गाजली म्हणतात का ???? ऑफ़ स्टंप च्या बाहेरच्या बॉल ला बॅट लावायची गरज नसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

इंग्लीश विंग्लीश !!

अर्धवटराव
Wed, 08/19/2015 - 01:26 नवीन
इतक्या विनंत्या करुनही इंग्रजी उतार्‍यांचा मराठी अनुवाद नाहि म्हणजे नाहि केला कुणी. सर्व विद्वज्जनांचा निषेध :P आता स्वतःच थोडा प्रयत्न करुन पाहिला... पण पूर्ण अर्थ काहि लागला नाहि. असो. धाग्यात चर्चेचा विषय अपूर्ण मांडलाय असं वाटतं. संन्यासी/सर्वसंग परित्याग विषयाची आपली ट्रॅडीशनल कल्पना आणि त्याची शक्याशक्यता समाजमान्य, ऑलरेडी प्रूव्हन अशा विवेकानंद नामक संन्याशाच्या उदाहरणावरुन तपासायला घेणे असा काहिसा धाग्याचा विषय वाटतोय. विवेकानंदांची उल्लेखीत पत्रं सबूत के तौर पर पेश केली आहेत. सर्वसंग परित्याग अशक्य आहे म्हणुन तो स्वामीजींना जमला नाहि, कि काहि कारणास्तव स्वामिजी तो करु शकले नाहि... नेमका प्रश्न काय हे मला व्यवस्थीत कळलं नाहि. पण एक मात्र नक्की कि सदर पत्रं वा घटनांवरुन काहि निश्कर्ष काढण्यापूर्वी एकुणच सर्वसंग परित्याग व तो धारण केल्याचा दावा करणारे स्वामिजी या दोन्ही घटकांबद्दल काहि मूलभूत बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?
सर्वसंग परित्याग एक साधन म्हणुन बघितलं तर क्रमाक्रमाने शारीरीक आणि मानसीक गरजा आकुंचीत करणे असं त्याचं स्वरुप आहे. "सर्वसंग" मधील "सर्व" ही फार मोठी झोळी आहे. त्यातल्या एक एक वस्तु विसर्जीत करणे व रिकाम्या झालेल्या जागी आपली साध्य वस्तु भरणे अशी ति प्रोसेस आहे. विसर्जन करता करता शेवटी फक्त झोळीची खोळ उरणे व शेवटी तिचंची विसर्जन करणे हा या साधनेचा अंतीम पाडाव. नरेंद्र त्याच्या गुरुच्या दृष्टीने अलौकीक पुरुष होता. या गुरु-शिष्याचे नाते संबंध कळणं कठीण आहे. गुरुने शिष्याला आपल्या पंखाखाली घ्यावं व गंतव्य गाठेस्तो त्याला मदत करावी असा सरळ्धोप कारभार इथे दिसत नाहि. लौकीक अर्थाने नास्तीक नरेंद्रला ठाकुरजींनी त्यांना आवष्यक वाटलेल्या सर्व आध्यात्मीक अनुभुतींनी परिपूर्ण केलं. स्वामिजींनी सगुण भक्तीची पराकाष्ठा अनुभवली. निर्गुण-निर्बीज समाधी अनुभवली. शरीराची लक्तरं फेकुन द्यावी असं वैराग्य अनुभवलं. आणि फुल स्टॉप येण्यापुर्वी त्यांच्या आयुष्याने १८० अंशाने टर्न घेतला. अजाणतेपणी नाहि तर अगदी प्लॅन केल्यासारखा. जी झोळी रिकामी करायला त्यांनी आत्यंतीक कष्ट उपजले, तिच झोळी पुन्हा खांद्यावर घेऊन, विसर्जीत केलेल्या वस्तु परत झोळीत भरत हा मनुष्य संसार सागरात परतला. केवळ परतला नाहि तर पारंपारीक भारतीय समाजापासुन अत्यंत भीन्न अशा पाश्चात्य आणि अति पौरात्य देशांत त्याने कार्य केलं. स्वामीजींच्या बाबतीत जाणवणार्‍या सर्व विरोधाभासांची गंगोत्री इथे आहे. ठाकुरजींनी याची पुर्वतयारी करुन घेतलेली दिसते. स्वामिजी मांसाहार करत. मुखशुद्धी करता शोप खाणे वगैरे संन्याशाला वर्ज्य असे प्रकार करत. तत्कालीन संन्यासी परंपरेला साजेसे निवृत्ती तत्वज्ञान त्यांच्या भाषणात नसे. उद्योग, बलोपासना, कला अभिरुची यासारख्या लौकीक गोष्टींचा ते हिरीरीने पुरस्कार करत. या सर्व काँट्रॅडीक्शनबद्दल त्यांच्याजवळ अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. किंबहुना हे सर्व करता करता आपली ध्यानशक्ती क्षीण होत चालली आहे याबद्द्ल ते हळहळ व्यक्त करत. पण हे सगळं घडुनही आपल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुभुतींबद्दल त्यांना कधीच शंका आली नाहि. आणि वेळ येताच आपल्या झोळीची खोळ उतरवायचं कार्य त्यांनी क्षणाचा विलंबही न करता सहजपणे केलं. तात्पर्य काय, कि सर्वसंग परित्यागाची साधना खोटी नाहि. स्वामीजींचं सिद्धत्व देखील खरं आहे. त्यांच्या जीवनात खीर आणि सरबताचं जे कॉकटेल निर्माण झालं ( कि त्यांनी मुद्दाम केलं ) त्यावरुन साधना व साधकाच्या सच्चेपणात बाधा येत नाहि.
  • Log in or register to post comments

__/\___ खणखणीत.

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 01:35 नवीन
__/\___ खणखणीत. थोडी addition. सर्व'संग'त्याग असा शब्द आहे. सर्व'वस्तु'त्याग असा नाही. संसारात मी असायला काही हरकत नसते. माझ्या 'आत' संसार असला की गडबड असते. बहुतांश सगळे तसेच आत संसार घेऊन असतो. (आम्ही जास्त आहोत हे जगप्रसिद्ध आहे. इतरांनी असू नये ही सदिच्छा आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुम्हाला पण एक खणखणीत _/\_

संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 01:54 नवीन
तुम्हाला पण एक खणखणीत _/\_ 'आतल्या' संसाराला 'बाहेरचा' रस्ता दाखवणे ह्यालाच 'सर्वसंगपरित्याग' म्हणतात हे खरेच आहे. पण जनसामान्यांनी त्याचा उलटा अर्थ प्रचलित केला तिथे घोळ झालाय. महापुरुषांनी सांगितलं की अटॅचमेंट सोडा, वस्तू नाही. वस्तू असली काय आणि नसली काय, अटॅचमेंट असेल तर नसलेली वस्तूही मनात 'घर करून' बसलेली असते. आणि अटॅचमेंट नसेल तर असलेल्या वस्तूचे अस्तित्व शून्य असते. लोकांना एवढं हायफाय झेपत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्जे ब्बात

रामपुरी
Wed, 08/19/2015 - 03:47 नवीन
अर्धवटरावानी शेवटी 'पूर्ण' उत्तर दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अर्धवटराव,

दत्ता जोशी
Wed, 08/19/2015 - 08:57 नवीन
सुरेख. चर्चा सर्व संग परीत्यागाची करायची असती तर प्रश्नकर्त्याला तसा नेमका प्रश्न विचारून थांबता आला असतं. पण फोकस स्वामीजींच्या दम्भिक्पणवर होता असा मला वाटते. म्हणूनच बर्याच लोकांना चीड आली. मी अश्या "टिक्का" टिपणीवर चीड चीड करणे सोडून दिले आहे. बाकी सर्व"संग"परित्याग या विषय नक्कीच खोल आहे पण अनाकलनीय नाही. असो. स्वामीजी हे माझेही श्रद्धास्थान आहे. ज्या सर्व लोकांनी "विवेकानंद" वाचले आहेत त्या लोकांच्या आयुष्यावर एक सुंदर परिणाम झालेला असतोच असा माझा अनुभव आहे. कोणत्याही कारणांनी एका चांगल्या विषयाची चर्चा होत आहे हि नक्कीच जमेची बाजू.
  • Log in or register to post comments

कॉग्नीटीव्ह डिसोनन्स

मारवा
Wed, 08/19/2015 - 10:45 नवीन
People tend to seek consistency in their beliefs and perceptions. So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. http://psychology.about.com/od/cognitivepsychology/f/dissonance.htm
  • Log in or register to post comments

Consistency in beliefs and perceptions...

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/19/2015 - 23:07 नवीन
मिपावर मराठी सोडून इतर भाषेत लिहिणे मी सर्वसाधारणपणे टाळतो. परंतू, लेखकाच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्याने स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचे आणि वरच्या प्रतिसादातले मानवी स्वभावासंबंधीचे वाचन मुख्यतः इंग्लिशमधून केले आहे असे दिसते. विशेषतः वरचा प्रतिसाद इंग्लिशमध्ये असल्याने त्याबाबतचे माझे म्हणणे इंग्लिशमध्ये देणे जास्त उपयोगी होईल असे वाटले, याकरिता हा खालचा प्रयत्न... Cognitive dissonance is one of the most important human failings, based on the characteristics of ego and superego (which is one of the major characteristics that differentiate human being from other members of the animal kingdom !) People tend to seek consistency in their beliefs and perceptions. Seeking consistency in beliefs and perceptions at a particular point of time, is the right thing to do. However, seeking consistency in beliefs and / or perceptions over a period of time is usually not a right thing to do. Not being able to understand and digest this fact of life, is one of the main human failings. Simply because, it is a fact that NO ONE IS BORN WITH KNOWLEDGE OF THE ULTIMATE TRUTH, not even souls that are recognized, in their later life or after their death, as the greatest of souls that ever existed. With passage of time, one acquires additional inputs of facts and insights that (a) may not necessarily be in line with one’s previous beliefs and (b) may, in fact, be quite divergent from them. To remain steadfast with old beliefs in the light of new evidences amounts to dishonesty and stubbornness. Honesty demands that one should accept the newly acquired facts (including the realized mistakes of the past) and bring about changes in self in line with them. Only hindrance to this progressive attitude is the human ego, which makes it difficult to accept change, fearing loss of face, in front of the others and oneself. When this is done in case of self, it is indeed a human failing. However, when it is done while evaluating others, the failing smacks of hypocrisy as well ! So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs. Such discomfort is absent in only those individuals who have successfully conquered their ego. They do not find it inconvenient or discomforting to accept change based on newly found facts. Because, they consider “continuous search for truth and its acceptance” to be above all the valueless egoistic ideas of self-honor and self-respect. It is indeed rare to achieve this level of honesty. This achievement is impossible or utterly difficult to ordinary mortals while is only the second nature to the truly great souls who are in continuous search for truth. Therefore, great souls may do it effortlessly or they may even struggle to do so at the start; but ultimately accept the newly found truth and effect the change. Simply because, that is THE RIGHT THING TO DO. When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance. Continuously evolving oneself (in other words, continuously effecting changes in oneself) in the light of new facts that get discovered, is the only way to achieve higher and higher self-realization and self-actualization. Those who can do it, succeed in achieving inner peace; and may be even, higher spiritual experience and spiritual existence. Those who fail to do so, remain in a constant state of dissonance and dissatisfaction. Such people, more often than not, tend to disbelieve those who could change and; consciously or unconsciously, tend to find fault with those who have changed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/19/2015 - 23:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

चला आता थोडे कामाचे बोलू -

आनन्दा
Wed, 08/19/2015 - 11:30 नवीन
चला आता थोडे कामाचे बोलू -
मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते.
एक एक मुद्दे घेऊ. १. नो सेल्फ डिफेन्स - बर्‍याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये संन्यासी/ साधू समोरच्यावर आघात करत नाहीत (प्रत्यक्ष). सन्याशाचे कामच मुळात हे आहे की त्याने समाजाला जागृत करून कार्यप्रवण करावे. त्यामुळे विवेकानंद स्वतः त्या कराराची बदनामी करून तो मोडतील अशी अपेक्षा ठेवणे कदाचित जास्त होईल. दुसरी गोष्ट अशी की ते त्या देशात परके होते. अश्या वेळेस त्यांनी या वादात पडणे हे त्यांनी घेतलेल्या कार्यास हानी पोचवणारे झाले असते. त्यामुळे ते प्रत्यक्ष त्या वादात पडू इच्छित नव्हते असे म्हणू शकतो. परंतु त्यांचे हितचिंतक त्यांना यातून बाहेर काढण्यास समर्थ होते. त्याप्रमाणे ते वागत देखील होते. अगदी आपण त्यांना अवतार जरी मानले तरी अश्या गोष्टींसाठी ते आपली आध्यात्मिक शक्ती पणाला लावून त्या स्टेलरला जन्माची अद्दल घडवतील असे आपल्याला वाटत असले तरी तो भ्रम आहे. त्यामुळे स्वामीजींनी आत्मसंरक्षण म्हणजे नेमके काय करावे असे आपले मत आहे ते आधी सांगा. मग आपण त्यावर चर्चा करू. आता मुद्दा राहिला पळपुटेपणाचा - माझ्या अल्पमतीनुसार स्वामीजींनी ३ वर्षे अमुक अमुक व्याख्याने देईन असे काँंट्रॅक्ट बहुधा केलेले नव्हते. त्यामुळे ते कोंट्रॅक्ट तोडून पळून जाणार होते असे समजणे चुकीचे आहे. हा त्यांनी काढलेला तोडगा असावा. मीच जर इथून निघून गेलो तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. असा मामला असेल. आणि तसेही स्वामीजी ज्या कार्यासाठी अमेरिकेत गेले होते - भारतातील कार्यासाठी पैसे गोळा करणे हे जर त्या प्रमाणात साध्य होत नसेल तर मग त्यामध्ये शक्ती खर्च का करावी असे त्यांना वाटत असणे सहाजिक आहे. आणि अश्या परिस्थितीत जर त्त्यांनी अशी भूमिका घेतली असेल की जाऊदे जर नियतीची हे कार्य व्हावे अशी इच्छा नसेल तर मी परत जातो तर त्यात गैर काही नाही. जाता जाता - महात्मे हे नेहमीच ईश्वरी प्रेरणेने कार्य करत असतात. त्यांच्यावर मानवी भावभावना आपण चिकटवत असतो. बर्‍याच वेळेस त्यांच्या बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप दूरगामी परिणाम होत असतो. पण तरीही ठीक आहे.. आपल्याला जर त्यांना महात्मे मानायचे नसेल तर किमान माणूस तरी माना.. सार्‍याच मोठ्या लोकांच्या चरित्रात असा विरोधाभास दिसून येतो. बहुतांश वेळा आपल्याला संदर्भ माहीत नसल्यामुळे आपण त्यातून काहीतरी भलतेच अर्थ काढून बसतो. असो. इत्यलम. कामाची वेळ झाली. परत वेळ मिळाला की आणखीन लिहेन.
  • Log in or register to post comments

आनंदा जी जरा फोकस करुन स्टेप बाय स्टेप मुद्दा मांडतो.

मारवा
Wed, 08/19/2015 - 14:23 नवीन
१- सर्वप्रथम स्वामींनी स्लेटन शी लिखीत करार केलेला आहे हे पत्रावरुन स्पष्ट होते. तो करार स्वतःच्या कार्यासाठी पैसा उभा करण्यासाठी होता. त्यात महान कार्यासाठी / कारणासाठी असेल एक उघड व्यावहारीक आर्थिक स्वार्थ (परम अर्थाने समजल तरी चालेल) अंतर्भुत होता. तो एक भौतिक जगातला च सर्वसामान्य असा करार होता. २- या करारात तरी पुर्ण निस्वार्थ भावनेने प्राचीन भारतीय तत्वज्ञान व अध्यात्मा च्या ज्ञानाचे दान करणे वा प्रसार करणे बदल्यात कशाचीहि अपेक्षा न ठेवणे आदि निष्काम कर्मयोगी भावना नव्हत्या. ३- या कराराकडुन स्वामींच्या स्वछ स्पष्ट आर्थिक अपेक्षा होत्या ज्या पुर्ण न झाल्याचा विषाद पत्रात स्पष्टपणे व्यक्त होतो. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum या वाक्यात मी स्वतः या कराराविना अधिक मोठी रक्कम मिळवु शकलो असतो ( व मिळवु शकलो नाही यांची खंत सुस्पष्ट आहे ) ४- अपेक्षीत आर्थिक लाभ कराराने न झाल्याचा राग व त्यानंतर मी हा करारा पासुन सुटका करुन घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे हि कबुली या शब्दात दिसते I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose ५- हा प्रयत्न दोन मार्गांनी केलेला पत्रांतुन स्पष्ट होते पहिला मार्ग प्रेसीडेंट पामर या मित्रामार्फत चालवलेला आहे ते President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. या वाक्यातुन स्पष्ट होते. दुसरा मार्ग तेथील कायदेपंडींतांना जजेसना हा करार दाखवुन त्यांच्या कडुन कायदेशीर सल्ला घेण्यात आलेला आहे. ते या वाक्यातुन स्पष्ट होते. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment. ६- परंतु हार्ड ट्राय करुनही सुटका अवघड आहे असे जाणवतेय सर्व प्रयत्न करुन झाल्यावर ते शक्य दिसत नाही असे स्पष्ट झाल्यावर विवेकानंद शेवटचा माझा उपाय काय असेल ते जाहीर करतात त्यांची अखेरची स्टेप काय असेल ते म्हणतात but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India. मी हे सर्व सरळ सोडुन हिंदुस्थानात निघुन जाईल कारण मी साधु आहे म्हणुन नो सेल्फ डिफेन्स. ७- However, this is a secret अस हि ते नमुद करायला विसरत नाहीत. आनंदा इथेच अनेक मुलभुत नैतिक प्रश्न निर्माण होतात हा पलायन- क्षण अत्यंत बोलका आहे. १- कराराने जर स्वामींना अपेक्षीत आर्थिक फायदा मिळवुन दिला असता तर त्यांनी असे पलायन केले असते का ? २- करार करतांना तो मी साधु आहे या भुमिकेतुन न करता सर्वसामान्य जगाचे कायदे पाळणारा माणुस या भुमिकेतुन केला होता अन्यथा कराराची गरजच काय होती? ३- तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत. ४- मी भारतात निघुन जाईन मी इथे राहणार नाही मी करार पाळणार नाही माझा त्यात अपेक्षीत आर्थिक फायदा झाला नाही. मी सनदशीर मार्ग करुन बघतोय पण जमेलस वाटत नाही म्हणुन आता मी माझ आध्यात्मिक स्टेटस साधु असण्याच कार्ड वापरणार. जर स्लेटन ने चांगला आर्थिक फायदा करुन दिला असता तर मग मी लौकीक माणसासारखाच करार पुर्ण करुन दिला असता हे ही निश्चीत. ५- ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस? ६- विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा ( ती छावा पाण्यात स्वतःच तोंड बघतो त्याला स्व-सामर्थ्याचा साक्षात्कार होतो इ.इ.) अर्जुन रणांगणावरुन पलायन न करता स्वकीयांशी कसा निर्धाराने लढला इ. इ. हि सर्व शिकवण त्यांच्या स्वतःकडुन अनेक अनेक दा सांगितली जाते. आता ते स्वतः काय करीत आहेत? ते सीक्रेट का ठेवत आहेत त्यांना भीती वाटत आहे का कायदेशीर कारवाइची ? अमेरीकेच्या न्यायव्यवस्थीची ते दोन हात का करत नाहीत व्यवस्थेशी व्हाय हि इज नॉट अ‍ॅक्टींग ऑन हिज ग्रँड प्रिन्सीपल्स व्हेन सच अ टेस्टींग मोमेंट इज अरायजींग इन हिज ओन लाइफ ? ७-त्यांच्यावर जर अन्याय झालेला आहे त्यांच्या मते तर ते त्या विरोधात स्पष्ट भुमिका घेण का टाळताहेत त्या अनुषंगाने येणारे आघात आदिंपासुन ते स्वतःचा बचाव का करत आहेत ? ८- अशी काहि कायदेशीर लढाई सुरु झाली तर त्याने स्वतःची प्रतिमा मलिन होण्याची भीती त्यांना वाटते का ? सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही त्या माणसाला त्याहुन उद्दात्त नैतिक तत्वे शिकवावीशी वाटतात त्यात काहिच विसंगती जाणवत नाही. जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा ज्या दांभिक रीतीने ते भुमिका बदलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ज्या विशिष्ट ३ पत्रांवरून

श्रीगुरुजी
Wed, 08/19/2015 - 14:40 नवीन
ज्या विशिष्ट ३ पत्रांवरून तुम्ही स्वतःचे मत ठरविले आहे. त्या पत्रापूर्वीची व नंतरची पत्रे वाचलीत तर सर्व काही स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

१. विवेकानंद भोंदू आहेत हे

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 14:45 नवीन
१. विवेकानंद भोंदू आहेत हे नक्की आहे. २. तुम्ही आम्हाला आत्यंतिक कष्ट घेऊन हे सांगितलं. ३. आम्हाला आपलं म्हणणं पटलेलं आहे. ४. आपले शतश: आभार. ५. वन्दे मातरम! ६. चहा आणि अल्पोपहार (आपापल्या खर्चाने करुन) घरी जाऊया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सर्वात महत्वाच जो माणुस एका

आनन्दा
Wed, 08/19/2015 - 16:29 नवीन
सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाही
मुळात करार नैतिक होता का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. तो करार नेमका काय होता हे तुम्हाला किंवा मला काहीच माहित नाही. पण उपलब्ध साधनांवरून असे दिसते की ३ वर्षांचा करार ४ महिन्यांत संपला, तेव्हा तो अनैतिक असावा असे मानण्यास हरकत नसावी.
विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हा
विवेकानंद पलायन करत होते हा शोध आपण कशाच्या आधारावर लावलात?
ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस?
असेही असू शकते की स्टेलन ने करार करताना जी तोंडी आश्वासने दिलेली असतील ती त्याने करारात अंतर्भूत केली नसतील, किंवा ती आश्वासने पाळण्याची टाळाटाळ तो करत असेल ज्यामुळे स्वामीजींना त्याला खोटारडा म्हणणे भाग पडले असेल.
तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत.
मुळात स्वामीजींनी अशी भूमिका कुठे घेतली? ते असे म्हणातात मी साधू आहे त्यामुळे मी माझा बचाव करणार नाही. तर जे नियतीला अभिप्रेत असेल ते होऊ देईन. जर तो करार मोडता आला नाही तर मी सरळ मायदेशी निघून जाईन. मी साधू आहे त्यामुळे माझ्यामागे माझ्या कार्याचे काय होईल वगैरेची चिंता करण्याची मला गरज नाही. ते पाहण्यास नियती समर्थ आहे. डेस्टिनीला हवे असेल तर मी मी इथे राहीन नाहीतर परत जाईन. आपण भारतात परत जाणार आहोत असे उघड न करण्यामागे पलायनवादी दृष्टीकोनच आहे असे म्हणणे कठीण आहे. कदाचित त्यांनी हे जाहीर केले असते तर स्लेटनची नाचक्की झाली असती, जे त्यांना कदाचित नको होते. कदाचित त्यांच्या कार्याचे नुकसानही झाले असते. जे त्यांना नको होते. परंतु त्यांनी असा विचार नक्कीच केला असेल, की जर इथे ३ वर्षे राहून काहीच साध्य होत नसेल तर सरळ इथून निघून जाण्यातच आपले हित आहे. जर समोरच्या अनैतिक करार कायद्याच्या चौकटीत राहून केला असेल तर तो मोडणे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. पण त्याच वेळेस असा अन्यायकारक करार स्वामीजींनी सहन करायला हवा होता असे म्हणणे देखील अन्यायकारक होते. बाकी स्वामीजी भारतात पळून(?) जाऊन "कराराचा भंग" करणार होते हे आपण कश्याच्या आधारावर ठरवलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तुडतुडी,

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 12:29 नवीन
तुडतुडी, संतांचा साधनाकाल हा जाणीवपूर्वक विसरून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. वेगळा विषय आहे आणि मोठा आहे. या अडथळ्यांना पार करून च सामान्य असलेले अनेक जण पोचले आहेत. सगळे सचिन बनू शकत नसले तरी सचिन सारख्या आदर्श ठेवून अनेक कोहली, धोनी, सेहवाग निर्माण होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

तुडतुडी, गली चुकले काय ओ?

आनन्दा
Wed, 08/19/2015 - 14:07 नवीन
तुडतुडी,
गली चुकले काय ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

टुड्टूडी प्रतिसाद ऊडउडी झालाय

संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 14:08 नवीन
टुड्टूडी प्रतिसाद ऊडउडी झालाय म्हणून तुमच्या इथं पोस्ट झालंय भौतेक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

गल्ली बराबर छे. घर तुडवानु

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 14:14 नवीन
गल्ली बराबर छे. घर तुडवानु गयो -धेडगुजरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हा धागा आणि धागालेखकाचे

संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 15:19 नवीन
हा धागा आणि धागालेखकाचे स्पष्टीकरण वाचून काय बोलावं खरंच सुचत नाही काही. हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments

:)

माहितगार
Wed, 08/19/2015 - 16:47 नवीन
हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरेचसे अवांतर

राही
Wed, 08/19/2015 - 15:20 नवीन
सर्व प्रतिसाद वाचले. अद्वातद्वा लिहिणार्‍यांच्या बाबतीत असे जाणवले की जणू हा लेख आमच्यावर, पक्षी हिंदु धर्मावर हल्ला आहे असे त्यांचे मत आहे. प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे. किंबहुना स्वामीजींसारख्या थोर माणसाला हाय्जॅक केले गेले आहे आणि त्यांच्यावर हिंदुत्वाचे लेबल चिकटवले गेले आहे. वास्तवात ते हिंदूंमधल्या त्याज्य गोष्टींविरोधात लढत होते, त्यासाठी हिंदूंना फटकारत होते. तुकारामांनी 'तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा' असे म्हटले, म्हणून तुकाराममहाराज योद्धे किंवा हिंसेचा मार्ग आवडणारे ठरतात का? ते तर मेणाहूनि मऊ असे विष्णुदास होते आणि वज्रासही आपल्या प्रेमवर्षावाने भेदू शकणारे होते. संतांना सर्वांप्रति तळमळ आणि प्रेम असते. सर्वांचे कल्याण व्हावे, ही ती तळमळ. आईच्या सर्व मुलांत एखादे मूल गरीब, अशक्त, मागे राहाणारे असेल तर आईचे लक्ष अशा मुलाकडे अधिक असते. तद्वतच त्या काळात हिंदू अज्ञानी, कर्मकांडात, भेदाभेदात गुंतलेले, प्रवाहपतित, गतानुगतिक असे होते, (आजही काही प्रमाणात आहेत.) त्यांना जागे करण्यासाठी, आत्मसन्मान आणि आत्मभानयुक्त करण्यासाठी स्वामींनी जिवाचे रान केले. इतर धर्मांतले लोकही त्यांचे शिष्य होते, त्यांचेही कल्याण त्यांनी केले. परधर्मी म्हणून त्यांना दूर लोटले नाही. संत हा सर्वांचाच असतो. त्यांना आमचे तुमचे असे काही नसते. "तृषार्ताची तृष्णा हरूं, व्याघ्रा विष होवुनि मारूं, ऐसें नेणेंचि बा करूं, तोय जैसें." आपण मात्र आपापल्या चष्म्यानुसार त्यांना पाहातो आणि त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा संकोचही करतो.
  • Log in or register to post comments

प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी

आनन्दा
Wed, 08/19/2015 - 16:47 नवीन
प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे.
बनवली गेली नसून ते तसे होते म्हणूनच ती तशी बनली आहे. अन्यथा जेव्हा सारे जग हिंदू धर्माची आणि भारताची गारूड्यांचा देश वगैरे हेटाळणी करत होता. सर्व धर्मपरिषदेतदेखील जर त्यांना फक्त ३ मिनिटे बोलावयास दिली होती, ते ही जवळजवळ शेवटी. आणि अश्या परिस्थितीत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनरागमन करून हिंदू धर्माकडे पाहण्याचा पाश्चत्यांचा दृष्टीकोन बदलणे हे केवळ एक योद्धाच करू शकतो. अर्थात योद्धा म्हणजे तलवारबाज नव्हे, पण कणखर मन, प्रखर कौशल्य, दुर्दम्य साहस आणि विजिगिषु वृत्त्ती म्हणजे योद्धा असे अभिप्रेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

बोका-ए-आझम

तुडतुडी
Wed, 08/19/2015 - 15:45 नवीन
बोका-ए-आझम तुम्ही कोण ? तुमची अध्यात्मिक योग्यता सांगितली तर बरं होईल . तुमच्या आमच्या योग्यतेचं जावूद्या हो .आपण संतांच्या योग्यतेचे असतो का ? त्यांच्यासारख योगसामर्थ्य , वैराग्य , कनवाळूपणा , अध्यात्मिक उंची आपल्याकडे असते का ? तुकाराम महाराज 'आपणासारखे करिती तत्काळ ' म्हणतात तेव्हा ते सद्गुरु शिष्याला आपणासारखे तत्काळ करीत असतात . हि क्षमता तुकारामांची असते . सामान्य माणसांची नव्हे . तेव्हा संत आपल्यासारखे भाव भावनेच्या आहारी गेलेले असतात असं म्हणणं चूक आहे मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .
  • Log in or register to post comments

मुळात जेव्हा आपण एखाद्याला

आनन्दा
Wed, 08/19/2015 - 16:40 नवीन
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .
पण त्याच वेळेस हे ही लक्षात घ्या की याच भावभावनांचा लोकसंग्रहास्तव त्यांना पुन्हा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे मानवी भावनांच्या आरोपांतून तुम्ही त्यांना वाचवू शकत नाही. श्रीरामांच्या बाबतीत साक्षात पार्वतीदेवी फसल्या, तर मग आम्हा सामान्यांची काय गत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

संतांची योग्यता

बोका-ए-आझम
Wed, 08/19/2015 - 19:47 नवीन
तुडतुडी, संतांची योग्यता आपणच ठरवतो. समाज. आपण त्यांची योग्यता नाही ठरवणार तर कोण ठरवेल? ज्यांच्या बाबतीत समाज अशी बुद्धी वापरत नाही, त्यांनाच भोंदू म्हणतो ना आपण? संत हे isolation मध्ये नसतात. तेही समाजाचा भाग असतात. त्यांना संत ही पदवी समाजच देतो. संत हे आपल्यासारखे भाव-भावनांच्या आहारी गेलेले असतात असं समजणं चूक आहे >>> मी असं म्हटलेलंच नाही. माझा प्रतिसाद नीट वाचा. मी म्हटलंय - संतांनाही भावभावना असतात. त्यांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोन भिन्न असतो. ते भावनांच्या आहारी गेलेले असतात असं मी म्हटलेलंच नाही. हा तुम्ही लावलेला शोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

मारवा,

पिलीयन रायडर
Wed, 08/19/2015 - 16:41 नवीन
मारवा, तुमचं असं झालय की काहीतरी बारिकशा मुद्द्यावर तुम्ही ठाम मत बनवलय आणि विवेकानंदांना दांभिक ठरवुन टाकलेलंच आहे. अशावेळी चर्चा कशी होणार? माझा काही विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास वगैरे नाही, पण त्या वेळची परिस्थिती केवळ ३ पत्र उचलुन, त्याचा संदर्भ न पहाता विवेकांनदांचे संपुर्ण व्यक्तिमत्व ठरवायला वापरली जात असतील तर ते चुक आहे, हे मला समजतं. त्यामुळे इथे जे लोक भल्या बुर्‍या शब्दात तुम्हाला विरोध करत आहेत त्यांचे सायको-अ‍ॅनेलिसिस करुन तुम्ही त्यांच्या मताची वासलात लावु नकात. लोकांच्या श्रद्धेला धक्का बसला म्हणुन ते असं वागत आहेत वगैरे निष्कर्ष काढण्याआधी तुमचा तर्कही चुकतोय असं वाटत नाही का? जी शक्ती तुम्ही ह्या ३ पत्रांना घेऊन विवेकानंदांचे दोष काढण्यात घालवली आहेत (ज्याचा खरं तर काहीच उपयोग नाही) तीच तुम्ही त्यांच्या आयुष्याचे इतर पैलु लोकांसमोर आणण्यात घालवली असती तर ते विधायक तरी ठरलं असतं. की विवेकानंद हे अगदीच टाकाऊ आहेत असं तुमचं ठरलय?
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Wed, 08/19/2015 - 16:45 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिलीयन रायडर जी

मारवा
Wed, 08/19/2015 - 20:13 नवीन
सर्वप्रथम अगदी प्रामाणिकपणे सांगतो माझी विवेकानंद यांच्या संदर्भात माझी काळी किंवा पांढरी अशी ठाम मते नाहीत. कुणाहि बद्दल तशी असु नयेत मी तसे करणे कटाक्षाने टाळतो. तुम्ही लक्षात घ्या माझी मते फार थोडी व्यक्त झालेली आहेत तुम्हाला असे वाटण्याचे कारण कदाचित माझ्या धाग्या विरोधात जी मते चालत आहेत त्याच्या विरोधी बाजुला मी उभा आहे असे वाटत असेल.मुळात धाग्यात एकापेक्षा अधिक मते आणि बाजु आलेल्या आहेत परंतु इन्स्टंट प्रतिक्रीयांचा धबधबा व त्याचा आवाज हा एक ढोबळ भुमिका घेतो ज्याने धागालेखक विरोधी गटात असावा असा काहिसा समज होतो. माझी मते मिश्र आहेत वेगवेगळ्या पैलुं ची सरमिसळ त्यात आहे. पण धागा एकाच बाजुने पाहणे सोपे व सोयिचे बरेचदा असते त्या शिवाय प्रतिक्रीया त्वरीत देता येत नाहीत. मी तो प्रतिसाद मी कुणीतरी फार मार्मिक सायको अ‍ॅनालिसीस करतोय या भावनेतुन नक्कीच नव्हता ती एक वास्तुस्थिती देखील आहे स्वतःच्या अनेक वर्ष कवटाळलेल्या मतांविरोधात व्यक्तीपुजे विरोधात काहिही समोर आले तर सर्वसाधारण पहिली प्रतिक्रीया हि तिव्रतम विरोधाची असणे अगदिच मानवी आहे त्यात आश्चर्य काय ? मला तो कॉग्नीटीव्ह डिसोनन्स चा त्या संकल्पने चा इतका उत्तम अनुभव वाटला म्हणुन तो निदर्शनास आणुन दिला इतकच. कुठल्याही विषयातल्या अमुर्त संकल्पनांची इतकी झणझणीत प्रचीती क्वचितच येत असते. एरवी संकल्पना कृत्रिम वाटतात बोरींग लाइफलेस वाटतात. एक मुद्दामहुन परत सांगतोय माझ्या कडचे कंप्लीट वर्क्स चे ९ खंड मी पुर्ण वाचलेले आहेत काहि भाग दोनदा ही वाचलेला आहे. आता तुम्हाला वाटतेय की त्यातली ३ च का उचलली व त्यावरच का फोकस. आता थोड लक्षात घ्या एखादा माणुस समजा अत्यंत संवेदनशील निसर्ग कवि असेल आपले बालकवी च घ्या आता त्यांच्या अनेक सुंदर एकसारख्या एकामागोमाग एक निसर्ग कविता आहेत. मध्येच क्वचितच अचानक पारव्यास सारखी किंवा औदुंबर सारखी अत्यंत वेगळी विज चमकावी अशी कविता येते. तुम्ही तिच्यावर लक्ष केंद्रित केल त्याच्या डिप मध्ये जाउ लागला तर बालकवि एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला अधिक समजतील आकलनात येतील की नाही ? व्यक्तीचा एकच एक स्वभाव व त्या अंतरंगात असलेला आणखी एक आतला पापुद्रा जो क्वचितच बाहेर येतो तो अधिक माहिती त्या व्यक्ती विषयी देणार की त्याची रोजची नेहमीची रचना. मग कुठेतरी तुम्हाला इतक्या संवेदनशील व्यक्तीस भादली रेल्वे ट्रॅक कडे का जावेसे वाटले असेल ते कळेल. माणुस जोपर्यंत एखाद्या विलक्षण सिच्युएशन मध्ये येत नाही तोपर्यंत तो त्याच्या अंतरंगातील इतर पैलु उघडे करत नाही. हा एक शोध आहे बघा माणुस शोधायचा प्रयास आहे. सकारात्मक च का नाही हा प्रश्न उलटा फिरवण सोप आहे नकारात्मक का नाही पण त्याला अर्थ नाही निव्वळ सकारात्मकता वा निव्वळ नकारात्मकता हे दुष्टीकोण अत्यंत मर्यादित च आहेत. ते कुठल्याही सत्याच व्यक्तीच यथार्थाच पुर्ण आकलन करु शकत नाही. आधुनिक पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचा जनक माइक सेलीगमन स्वतः हे सांगतो फ्लेक्जीबल ऑप्टीमिझम वरील त्याचे सुंदर विचार चिंतन आपण वेळ मिळाल्यास जरुर वाचा. अजुन एक समजा एक मोठा अनेक पैलु असलेला विषय आहे. समजा एक जंगल आहे. त्याचा अनेक अंगाने अभ्यास करता येतो. म्हणजे बोटॅनिकल झुलॉजिकल इकॉलॉजिकल अनेक पॉइंट ऑफ व्ह्यु ने याने काय होते एकेकाला एकेक तुकडा सत्याचा एकेक तुकडा लक्षात येतो. पुर्ण नाही म्हणुन काय आपण असे म्हणतो का कि तुम्ही काय नुसत्या वनस्पतीच बघताय जंगलातल्या थोडा प्राण्यांचाही अभ्यास करा नाहितर जंगल काय चीज आहे तुम्हाला पुर्ण कधीच कळणार नाही. तर आपण एकेके पैलु घेउन फोकस करत असतो. मी आता एका पैलु वर फोकस केलय त्यावर तुम्ही तो पैलु का नाहि दाखवत यावर मी म्हणेन की माझ्या रीतीने त्या माणसाला समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय व सध्या माझ्या समोर हा पैलु आहे मला तो महत्वाचा रीव्हीलींग वाटतो या निर्णायक सिच्युएशन मध्ये हा माणुस कसा रीअ‍ॅक्ट होतो त्याचे मला व्यक्तीगत कुतुहल वाटते माझ्या एका शोधाचा तो भाग असु शकतो. कुणालाही असा आग्रह का असावा ? तुम्ही जीए चा पत्रसंग्रह वाचलाय का किंवा जे एम कोएटजी व त्याच्या मित्राचा हिअर अँड नाउ कोएटजी ने फारच कमी इंटर्व्हु दिलेले आहेत मात्र त्याच्या पत्रांत तो अगदि वेगळा दिसतो. अत्यंत आश्चर्य चकीत करणारी त्याची पत्रे आहेत. माणसाच्या रोजमर्रा की जींदगी ज्याला आपण म्हणतो त्यात क्वचितच तो कधीतरी अगदि टोकावर येतो व असामान्य भुमिका घेत असतो. त्यामुळे ते क्षण महत्वाचे ठरतात. वरील पत्रे मला तशा अर्थाने महत्वाची वाटली दुसर अस समजा मी एखादा अनपेक्षीत तुम्हाला सकारात्मक असा वाटु शकणारा पैलु दाखवला असता तर तुम्ही अस म्हणाला असता का हा एक छोटासा भाग आहे. माझ्या धाग्याव्यतिरीक्त मी आनंदा जी यांना एकच असा प्रतिसाद दिलेला आहे की ज्याने मी माझी मांडणी सुरु केली केवळ पहिलाच पॉइंट आहे तो पण एकंदरीत शेअरींग होण्यासारख आदान प्रदान होण्यासारख वातावरण दिसत नाही मला अर्थातच त्याचा खेद वाटतो असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रदीर्घ प्रतिसाद वाचला. आपला

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 21:43 नवीन
प्रदीर्घ प्रतिसाद वाचला. आपला लेख वाचल्यावर वेगळा विचार म्हणून आपण आता म्हणत असलात तरी आधीचे दोषारोपण करण्याची काय गरज होती? तुमचे निरीक्षण आहे म्हणत असताना निष्कर्ष आधीच का काढता? निरीक्षण वेगळां असायला हवं की! निष्कर्ष सोडा लोकांवर.... तसं न केल्यानं हेतूविषयी शंका येतेच. आता वातावरण मोकलं नाही वगैरे गोष्टी त्यामुलंच अमान्य आहेत.(खारिज)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

हम्म

मूकवाचक
Wed, 08/19/2015 - 23:10 नवीन
Too little, too late ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

एकंदरीत शेअरींग होण्यासारख

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/19/2015 - 23:26 नवीन
एकंदरीत शेअरींग होण्यासारख आदान प्रदान होण्यासारख वातावरण दिसत नाही मला अर्थातच त्याचा खेद वाटतो लेख परत वाचलात तर त्याचा रोख "समजुतीने काही समजून घेण्यासाठी विचारलेले प्रश्न" असा नव्हे तर केलेले निर्णय सांगणारा (जजमेंटल) होता हे समजून येईल. एकदा निर्णय पक्का केल्यावर त्यावर चर्चा न होता त्याचे खंडन होते हे सांगायला पाहिजेच असे नाही. तरीसुद्धा तुमच्या संभ्रमाबद्दल मी खालच्या प्रतिसादांत काही खरडले आहे तिकडे शक्य झाल्यास नजर टाका... http://www.misalpav.com/comment/731818#comment-731818 http://www.misalpav.com/comment/731823#comment-731823
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मुख्य म्हणजे सर्वसंगपरित्याग

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/19/2015 - 23:38 नवीन
मुख्य म्हणजे सर्वसंगपरित्याग केलेल्या माणसाने सर्वच ऐहीक गोष्टींचा आणि भावनांचा परित्याग करावा असे म्हटले तर... त्याने अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मानवी जीवनाला आवश्यक मूलभूत गरजांकडे आणि सर्व भावनांकडेही दुर्लक्ष करायला हवे... म्हणजे त्याने सरळ समाधीच घ्यायला हवी. ...या गृहितकावर तर मग पृथ्वीतलावर होऊन गेलेल्या कोणत्याच महान व्यक्तीने सर्वसंगपरित्याग केलेला नाही. इतकेच काय तर त्या महामानवांची इतर मानवांच्या प्रती असलेली आस्थासुद्धा अस्थायी ठरते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खुप काही लिहीलय तुम्ही पण

पिलीयन रायडर
Wed, 08/19/2015 - 23:37 नवीन
खुप काही लिहीलय तुम्ही पण मुदलात "असंही असु शकतं का?" असा रोख नाहीचे तुमच्या लेखाचा. तुम्ही ठरवुन टाकलय की उत्तर काय आहे.
पण एकंदरीत शेअरींग होण्यासारख आदान प्रदान होण्यासारख वातावरण दिसत नाही मला अर्थातच त्याचा खेद वाटतो असो
ज्या पद्धतीने तुम्ही मांडत आहात त्या पद्धतीने तर नक्कीच विचारांचे आदान प्रदान होऊ शकत नाही. आणि मला ते अयोग्यही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

वेळ वाया

दत्ता जोशी
Wed, 08/19/2015 - 17:31 नवीन
स्वामीजींना योद्धा संन्यासी का म्हटलंय, त्यांनी काय काय आव्हाने समर्थपणे स्वीकारली, किती आणि काय कष्ट घेतले हे समजण्यासाठी त्यांचे चरित्र वाचणे गरजेचे आहे. जमल्यास वाचा. बाकी आपण आपल्या अजेंडावर उघडपणे उतरलात त्याबद्दल धन्यवाद. या विषयावर समजवण्यासाठी अजून काही लिहिणे हा वेळेचा अपव्यय आहे.
  • Log in or register to post comments

माझी वरील प्रतिक्रिया

दत्ता जोशी
Wed, 08/19/2015 - 18:10 नवीन
माझी वरील प्रतिक्रिया हि श्री मारवा यांना उद्देशून होती. योध्दा संन्यासी हा मुद्दा वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा