Skip to main content

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/08/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? दुसरा एक भाग म्हणजे धार्मिक व्यक्तींची एक अपेक्षा असते की जी मला कायम दांभिक वाटते ती अशी की मी एक महान कार्य करीत आहे ध्येय्यासाठी जगत आहे तर आता तुमची म्हणजे सामान्य जनांची अशी जबाबदारी आहे की तुम्ही माझ्या सर्व्हायव्हल ची माझ्या लिव्हींग ची जबाबदारी घेतलीच पाहिजे नव्हे ते तुमचे नैतिक कर्तव्यच आहे. या सर्व्हायव्हल च्या अपेक्षेने परत स्वत:च इतरांशी बांधुन घेण येतच. याने असा माणुस संपुर्ण आयुष्याशी इंटीग्रेट राहण प्रामाणिक असण टाळतच असतो. माझा एक आयुष्याचा महत्वपुर्ण भाग भुमिका मी इतरांवर लादतो करवुन घेतो अशा अर्थाने. पण आयुष्य असे सोयिस्कर तुकड्यात तोडुन जबाबदारी व त्यापेक्षा भुमिका व त्या अनुषंगाने येणारे सर्व अनुभव आघात यांना सामोर जाण या पासुन एक दांभिक पलायन असा माणुस करत असतो अशा कुठल्याही माणसाला जीवनाच परीपुर्ण आकलन होण शक्य आहे का असत का ? इथे हिंदु धर्माच उदाहरण घेतलय पण हे सर्वच धर्माबाबत लागु होत, अजुन एक बाब अशी की अशा धर्माच्या संकल्पनांच्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याने निर्माण होणारी मानवी मनाची तीव्र कुचंबणा व ताण.व त्याने हतबल होणारा माणुस, अशी माणस आपली नैसर्गिक सहजता व संवेदनशीलता हरवुन बसतात. त्याहुन वाईट म्हणजे ते आपली मुलभुत प्रामाणिकता इंटेग्रीटी हरवुन दांभिक बनतात. विवेकानंद यांची हि पत्रे वाचुन माझ्या मनात वरील विचार चक्र सुरु झाले. त्यांचे हे पत्र पहा X To Mrs. G. W. Hale DETROIT, 20 February 1894. DEAR MOTHER, My lectures here are over. I have made some very good friends here, amongst them Mr. Palmer,* President of the late World's Fair. I am thoroughly disgusted with this Slayton* business and am trying hard to break loose. I have lost at least $5,000 by joining this man. Hope you are all well. Mrs. Bagley and her daughters are very kind to me. I hope to do some private lecturing here and then go to Ada and then back to Chicago. It is snowing here this morning. They are very nice people here, and the different clubs took a good deal of interest in me. It is rather wearisome, these constant receptions and dinners; and their horrible dinners — a hundred dinners concentrated into one — and when in a man's club, why, smoking on between the courses and then beginning afresh. I thought the Chinese alone make a dinner run through half a day with intervals of smoking!! However,they are very gentlemanly men and, strange to say, an Episcopal clergyman* and a Jewish rabbi* take great interest in me and eulogize me. Now the man who got up the lectures here got at least a thousand dollars. So in every place. And this is Slayton's duty to do for me. Instead, he, the liar, had told me often that he has agents everywhere and would advertise and do all that for me. And this is what he is doing. His will be done. I am going home. Seeing the liking the American people have for me, I could have, by this time, got a pretty large sum. But Jimmy Mills* and Slayton were sent by the Lord to stand in the way. His ways are inscrutable. However, this is a secret. President Palmer has gone to Chicago to try to get me loose from this liar of a Slayton. Pray that he may succeed. Several judges here have seen my contract, and they say it is a shameful fraud and can be broken any moment; but I am a monk — no self-defence. Therefore, I had better throw up the whole thing and go to India. My love to Harriets, Mary, Isabelle, Mother Temple, Mr. Matthews, Father Pope and you all.* Yours obediently, VIVEKANANDA. इथे विवेकानंद एक कुचंबणा अनुभवतात आणि एक दांभिकता दर्शवितात जी प्रातिनीधीक आहे. त्यांची हि पत्रे अशा माणसाची स्थिती दर्शवतात. यातले पहिले पत्र पहा यात एक पारंपारीक ट्विस्टेड नैतिक भुमिका विवेकानंद कशी घेतात ती दांभिकता बघण्यासारखी आहे. या पत्रात स्पष्टपणे असे दिसुन येते की विवेकानंदांनी स्लेटन या व्यक्तीबरोबर एक लिखीत करार केलेला होता ज्या अनुसार त्याने विवेकानंदांसाठी अमेरीकेत चांगल्या ठिकाणी सभांचे/व्याख्यानांचे आयोजन करावयाचे होते त्या सभांची चांगली अ‍ॅडव्हर्टाइज करणे व त्यांद्वारे चांगला निधी विवेकानंदांसाठी उभा करणे अपेक्षीत होते. या पत्रात विवेकानंद आपला राग व्यक्त करत आहेत की कसे त्यांना ५००० डॉलर चे नुकसान झालेय इ. व मी अधिक पैसा मिळवु शकलो असतो मात्र स्लेटन ने कराराप्रमाणे चांगले काम केले नाहि इ. तर करार करुन विवेकानंद पस्तावलेले दिसतात. यापुढच्या पत्रातील भागात विवेकानंद अत्यंत दांभिक भुमिका घेतांना दिसतात. ते म्हणतात त्यांचा नविन मित्र मि. पामर हा स्लेटन च्या करारा च्या प्रकरणातुन सुटका करण्यासाठी शिकागो ला गेलेला आहे व पुढे पामर मला वाचवण्यात यशस्वी होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना माझ्यासाठी कर असे हि ते पत्रात मिसेस हेल ला सांगतात. अजुन एकीकडे अनेक जजेस ना त्यांनी हे कॉट्रॆक्ट दाखवुन कायदेशीर सल्ला हि घेतलेला दिसतो असे पत्रावरुन दिसते. तर एकीकडे सल्ला घेण मित्राकरवी मदत घेण व ईश्वराला प्रार्थना करण हा करार भंग करण्यासाठी सर्व भौतिक प्रयत्न जोरात चालवलेले दिसतात. आणि त्याच बरोबर ते अत्यंत दांभिकतेने मिसेस हेल ला म्हणतात कि हे कंत्राट मोडता येउ शकते असा सल्ला जजेसने दिलेला आहे ( पण त्यांना तसे करण्याचे धाडस हि अर्थातच दिसुन येत नाही) म्हणुन ते म्हणतात की " पण मी तर एक संन्यासी आहे - नो सेल्फ़ डिफ़ेन्स तर मी स्वत:चा बचाव करणार नाही तर मग मी अ‍ॅज अ सन्यासी काय करेल ? मी संन्यासी आहे मी या फ़ंदात पडणार नाही असे सुचवत ते म्हणतात की देअरफ़ोर आय हॅड बेटर थ्रो अप द व्होल थिंग अ‍ॅंड गो टु इंडिया ( हे सर्व सोडुन मी सरळ हिंदुस्थानात निघुन जाईल) वादासाठी मान्य केले की करार कदाचित अन्यायकारक असेल एकतर्फ़ि असेल किंवा स्लेटन हा करार जसा अंमलात आणायला हवा तसा आणतही नसेल कदाचित. परंतु पहिल्यांदा मुळात लिखीत करार करावयाचा त्याची तयारी दर्शवायची त्यातुन निर्माण होणारा सर्व व्यावहारिक भौतिक फ़ायदा याची पुरेपुर अपेक्षा बाळगायची, तो अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात येत नसतांना दिसल्यावरच व अपेक्षीत पैशाच्या लाभाची शक्यता क्षीण झाल्यावर, एकिकडे तो करार मित्राकरवी भंग करण्याचे प्रयत्न करणे जजेस चे कायदेशीर सल्ले घेणे व सर्व प्रयत्न फ़ोल आहेत वाटल्यावर.मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते. दुसरी दोन पत्रे पहा CXXVIII Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri MATH BELUR 22 November 1898 YOUR HIGHNESS — Many thanks for your kind note and the Nimbarka Bhashya — reached through Jaga Mohan Lalji. I approach your Highness today on a most important business of mine,knowing well that I have not the least shame in opening my mind to you, and that I consider you as my only friend in this life. If the following appeals to you, good; if not, pardon my foolishness as a friend should. As you know already, I have been ailing since my return. In Calcutta your Highness assured me of your friendship and help for me personally and [advised me] not to be worried about this incurable malady. This disease has been caused by nervous excitement; and no amount of change can do me good, unless the worry and anxiety and excitement are taken off me. After trying these two years a different climate, I am getting worse every day and now almost at death's door. I appeal to your Highness's work, generosity and friendship. I have one great sin rankling always in my breast, and that is [in order] to do a service to the world, I have sadly neglected my mother. Again, since my second brother has gone away, she has become awfully worn-out with grief. Now my last desire is to make Sevâ [give service] and serve my mother, for some years at least. I want to live with my mother and get my younger brother married to prevent extinction of the family. This will certainly smoothen my last days as well as those of my mother. She lives now in a hovel. I want to build a little, decent home for her and make some provision for the youngest, as there is very little hope of his being a good earning man. Is it too much for a royal descendent of Ramchandra to do for one he loves and calls his friend? I do not know whom else to appeal to. The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs — I have exposed myself to your Highness, and none else shall know of it. I am tired, heartsick and dying. Do, I pray, this last great work of kindness to me, befitting your great and generous nature and [as] a crest to the numerous kindnesses you have shown me. And as your Highness will make my last days smooth and easy, may He whom I have tried to serve all my life ever shower His choicest blessings on you and yours. Ever yours in the Lord, VIVEKANANDA P.S. This is strictly private. Will you please drop a wire to me whether you will do it or not? Ever yours, VIVEKANANDA CXXIX To Maharaja Ajit Singh, the Raja of Khetri MATH BELOOR HOWRAH DISTRICT 1 December 1898 YOUR HIGHNESS — Your telegram has pleased me beyond description, and it is worthy of your noble self. I herewith give you the details of what I want. The lowest possible estimate of building a little home in Calcutta is at least ten thousand rupees. With that it is barely possible to buy or build a house in some out-of-the-way quarter of the town — a little house fit for four or five persons to live in. As for the expenses of living, the 100 Rs. a month your generosity is supplying my mother is enough for her. If another 100 Rs. a month be added to it for my lifetime for my expenses — which unfortunately this illness has increased, and which, I hope, will not be for long a source of trouble to you, as I expect only to live a few years at best — I will be perfectly happy. One thing more will I beg of you — if possible, the 100 Rs. a month for my mother be made permanent, so that even after my death it may regularly reach her. Or even if your Highness ever gets reasons to stop your love and kindness for me, my poor old mother may be provided [for], remembering the love you once had for a poor Sâdhu. This is all. Do this little work amongst the many other noble deeds you have done, knowing well whatever else can be proved or not, the power of Karma is self-evident to all. The blessings of this good Karma shall always follow you and yours. As for me, what shall I say — whatever I am in the world has been almost all through your help. You made it possible for me to get rid of a terrible anxiety and face the world and do some work. It may be that you are destined by the Lord to be the instrument again of helping yet grander work, by taking this load off my mind once more. But whether you do this or not, "once loved is always loved". Let all my love and blessings and prayers follow you and yours, day and night, for what I owe you already; and may the Mother, whose play is this universe and in whose hands we are mere instruments, always protect you from all evil. Ever yours in the Lord, VIVEKANANDA यात अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद खेत्री संस्थानचे महाराजा अजित सिंग यांच्याकडे आपल्या आईसाठी १०० रु महिना व स्वत:साठी १०० रुपये महिना आर्थिक मदत मागतांना दिसतात. हे अतिशय करुण उदास करणार अस पत्र आहे याने विवेकानंद यांची झालेली कुचंबणा दिसुन येते. जी खरोखर अनेक प्रश्न मनात उभे करते जे वरील परीच्छेदात उपस्थित केले होते की खरच माणुस आपले रीलेट होणे नातेसंबंध यांचा त्याग करु शकतो का ? व एकीकडे अमुर्त संकल्पना जीवनात उतरवतांना निर्माण होणारा ताण व कुचंबणा याने निर्माण होणारी ह्युमन सिच्युएशन हि पुन्हा गंभीरतेने अवलोकन करण्यासारखी आहे. यात ते अत्यंत प्रांजळ पणे कबुल करतात की जगाची सेवा करता करता आय हॅव सॅडली निगलेक्टेड माय मदर त्यात ते प्रामाणिकतेने म्हणता की आय हॅव एक्स्पोज्ड मायसेल्फ़ टु युवर हायनेस आणि इतर कोणालाही या संदर्भात काहीही कळणार नाही. ही मदतीची मागणी विवेकानंद अत्यंत कसोशीने गुप्त ठेवण्याचा इतरांपासुन लपवण्याचा प्रयत्न करत असलेले दिसतात पत्रा अखेरीस पोस्ट स्क्रीप्ट जोडुन पुन्हा धिस इज स्ट्रीक्टली प्रायव्हेट हे लिहायला ते विसरत नाहीत. यात अतिशय लाचारीने राजा ची स्तुती करणारे त्याला रामचंद्राचा वंशज म्हणणारे व इतकी छोटी मदत त्यांच्यासारख्या राजासाठी मोठी आहे का ? असे अजीजीने विचारणारे, त्याच बरोबर मिशन च्या कार्यासाठी जमवलेल्या पैशाचा विनीयोग स्वत:च्या वैयक्तीक गरजांसाठी इतक्या मजबुरीतही कमालीच्या प्रामाणिकपणे टाळणारे विवेकानंदही दिसतात. ते त्यांची कुचंबणा हि व्यक्त की एकीकडे ते त्यांनी कार्यासाठी उभारलेला पैसा व्यक्तीगत कारणासाठी वापरु शकत नाही व दुसरी कडे इतर कोणाला देखील ते भीक मागु शकत नाहीत. महाराजांनी देखील तत्काळ त्यांना ८ च दिवसात प्रतिसाद दिलेला आहे असे या दोन पत्रांवरुन दिसते. त्यांचा एक भाउ वारलेला आहे व दुसरा कोण जाणे कसा पण कमावण्याच्या लायकीचा नाही असे ते राजांना सांगतात व म्हणुन आईला मदतीची आवश्यकता कशी आहे हे ते सांगतात. त्यांच्या मनात पुढे मागे आपल्यावरील राजाचे प्रेम आटले तर मिळणारी मदत बंद होण्याची भीती ही दिसुन येते. त्या केसमध्ये किमान आईला मिळणारी मदत तरी बंद होउ नये अशी कळवळुन विनंती करणारा पुत्र विवेकानंद दिसतो. शिवाय ईश्वरानेच कदाचित तुम्हाला अशा महान कामात साधन बनण्याचे सौभाग्य दिलेले आहे की ज्यायोगे तुम्ही माझ्या मनावरचा मोठा भार कमी करत आहात हे जोडायलाही ते विसरत नाहीतच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23402
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे. एक लक्षात घ्या फार मोठ्या कामांसाठी पैसे आवश्यक असतातच. त्यांचे मुख्य जीवनकार्यच सनातन धर्मावर तुमच्यासारख्या मेंटॅलिटीच्या व्यक्तिंनी चालवलेली चिखलफेक थांबवून त्याला चोख प्रत्युत्तर देणे हेच होते. ते काम त्यांनी उत्तम पार पाडले. आज आपण ज्या दुगाण्या झाडल्या आहेत त्यावरून त्यांच्या कार्यामुळे आपणासारख्यांना किती मिरच्या झोंबतात यावरून ते स्पष्ट होते. आणि काय हो, त्यांनी स्वधर्हासाठी तरूण वयातच संन्यास घेतला, मग त्यांच्या म्हातार्या आईला सांभाळण्यासाठी त्यांनी राजाला विनंती केली तर काय चुकले. तुमच्या कुठल्या पूर्वजाकडे तर आले नव्हते नं पैसे मागायला? केवल विवेकानंद नाव वाचून आलो. आत असली विकृत मळमळ वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

In reply to by अनुप ढेरे

पुन्हा नीट वाचा. देवकार्यासाठी, देशकार्यासाठी घरदार त्याग केलेल्या विवेकानंदांचे एखाद्या लालची लाचार माणसाप्रमाणे चित्र उभे केलेय. तुम्हाला यात काहीच चूक वाटत नाही? त्या निःस्वार्थ माणसाने अडीअडचणीच्या प्रसंगी, आपल्या कार्यासाठी, आपल्या दुर्लक्षित घरासाठी काही मदतीची प्रभावी व्यक्तींकडून अपेक्षा केल्यास चूक काय? तुम्ही त्यांचे चित्रण नक्की कसे उभे केलेय हे पुन्हा वाचा. तुम्हाला त्यात वावगं काही वाटत नसेल तर माझं काही म्हणणं नाही. माझा तर गुडबाय या धाग्यास!

In reply to by जडभरत

विवेकानंदांसारखी माणसे चोख उत्तरांप्रत्युत्तरांमध्ये फारशी रमत नसतात. ते त्यांचे एक आनुषंगिक कार्य असते. मुख्य कार्य हे की हिंदूंना त्यांच्या रूढिग्रस्ततेतून, कुंठितावस्थेतून बाहेर काढून प्रवाही बनवणे. धर्माचे मर्म उघड करणे. मानवतेचा संदेश देणे. बाकी असोच.

विवेकानंद ह्यांच्यासारख्या व्यक्ती वर याचनेची वेळ यावी ?? जो मनुष्य नि:स्वार्थ वृत्तीने आपल्या धर्म देशासाठी आयुष्य वेचतो, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय इतरांनी केलीच पाहिजे ... पण नाही ...आपल्याकडे त्यासाठी आसाराम हवेत ... दुसरे : विवेकानंदानचे काही विचार , नवीन तत्वे वगैरे सोडून त्यांच्या ह्या किंचित असहाय्यतेवर आवर्जून भाष्य करण्याची मुळीच गरज नव्हती... अर्थात पुलंनी एका गृहस्थाला म्हटले होते ते हि आठवते कि अवघे नाट्यगृह नारायण राव एकच प्यालातील सिंधूचे गाणे जीवाचा कान आणि डोळ्यात प्राण आणून बघत असतानंना तुम्ही बाजूच्या सिंधूच्या वडिलांचे तिथे काय काम असा प्रश्न घेऊन बसला होतात ...

मारवा...? कसे आहात..? तब्येतपाणी ठिक..? लयी दिसांनी आज...? बरं वाटलं बगा... येत जा असेच नेहमी.

In reply to by संदीप डांगे

संदीप जी मी आनंदात आहे तुम्ही कसे आहात ? तुम्ही अगत्याने आठवण ठेवलीत मनापासुन धन्यवाद

विवेकानंदांविषयी अत्यंत कोत्या, पूर्वग्रहदूषित आणि अत्यंत गलिच्छ शब्दांत मनातली मळमळ बाहेर काढली आहे.>>>+११११११११११ ह्या माणसाचा विवेकानंदान्बद्दल , त्यांच्या विचारांबद्दल काडीचाही अभ्यास नाहीये हे दिसतंय . सडक्या डोक्यातून आलेले सडके विचार लेखात मांडले आहेत. सर्वसंगपरित्याग कशासाठी केला होता , विवेकानंद शिकागोला कशासाठी गेले होते , त्यांचं कार्य काय ह्याबद्दल ह्या माणसाला कसलीही माहिती नाही . सगळ्यात भयाण म्हणजे हा विवेकानंदांना अध्यात्मिक नव्हे तर धार्मिक व्यक्तीं म्हणतोय . इथेच ह्या माणसाच्या घोर अज्ञानाची ओळख होते

The money I got from Europe was for the "work", and every penny almost has been given over to that work. Nor can I beg of others for help for my own self. About my own family affairs विवेकानंदांनी हे इतके सुस्पष्ट लिहुनही ते तुम्हाला "अत्यंत लाचार झालेले हतबल असहाय्य अशा अवस्थेतले विवेकानंद " वगैरे वगैरे वाटतात ? कमाल आहे तुमची... जगात एका सरळमार्गी माणसाकडे कोणत्या नजरेने बघितले जाते हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

तुमचं मत काय असावं याबद्दल मी काय म्हणणार? मला मात्र 'पत्रं' वाचून विवेकानंद दांभिक किंवा हतबल वाटत नाहीत. असो.

In reply to by आतिवास

त्याअगोदर सर्व प्रयत्न कायदेशीर सल्ला वगैरे घेणे मित्राची मदत घेणे सर्व जमत नाहियेत पाहुन मग शेवटी स्वतःच जस्टीफिकेशन स्वतःच्या साधु असण्याचा पारलौकिक हक्का चा हवाला देते माझ्यावर काहिही लागु होत नाही कारण मी तर साधु आहे मला लौकिक लागुच होत नाही ( त्यातला फायदा मनासारखा झाल्यास मात्र मी लौकिक लिखीत करार नक्कीच पाळेन त्याच साठी मी असे लिखीत करार करेनही नव्हे केलाही फायद्यासाठी च होता पण मनासारखा झाला नाही नंतर मोडतांना पलायन करतांना माझं अध्यात्मिक स्टेटस मला मदत करणारच. केव्हा लौकिकात पाय ठेवायचा केव्हा अलौकिकात जायच इट डिपेन्ड्स, वुइच इज द बेस्ट मुव्ह या प्रश्नावर सीझन्ड चेस प्लेयर नवख्या ला सांगतो इट डिपेन्ड्स अपॉन सिच्युएशन ओफ गेम माझ्याकडे व्याख्या देखील तयार आहेत त्यासाठी उदा. आपदधर्म किंवा असो आणि हो मी महान धार्मीक कार्य करतोय तर मदत करण हा तुमच्या इछे अनिच्छेचा प्रश्न नाही हे तुमच धार्मिक कर्तव्य च आहे नाही का शिवाय अजुन एक तत्व तयार आहे गुप्तदान ! गुप्तदानाच महत्व मोठ आहे तुम्ही कदाचित विसरलात म्हणुन आठवण मला करुन द्यावी लागतेय पोस्ट स्क्रेप्ट टाकुन. नोबडी वुइल एव्हर नो अबाउट इट वुइ डोन्ट बिलीव्ह इन ट्रान्सपरन्सी वुइ लव्ह सीक्रसी गुरुमंत्र .हा कानातच सांगावा लागतो कुणालाही कळता कामा नये तुम्ही ayn rand ची ती एक कादंबरी वाचलीय का त्यातल्या एका प्रकरणाच नाव आहे sanction of victim असो

प्रत्येकाला स्वतःचं क्षितिज वेगळं दिसत असतं. वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळं. हे एकाच व्यक्तीबाबत. दोन किंवा चार व्यक्तींचा एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा प्रसंग यांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असणारच. त्यातलं नेमकं काय घ्यावं आणि काय दिसावं हा सुद्धा पुन्हा त्या त्या स्थितीनुसार बदलणारा विषय. संतांचं अथवा महात्म्यांचं एकदा दैवतीकरण झालं कि त्यांचा जयकार करण्याप लिकडे काही उरत नाही. नवीन उदाहरण (फक्त उदाहरण म्हणुन) म्हणजे बाहुबलि चं. १०० वेळा धबधबा वर चढून जाताना खाली पडतो, धडपडतो पण प्रयत्न सोडत नाही, अतर्क्य आणि अचाट चिवटपणानं पुन्हा पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करत राहतो. स्वामीजी अशा एका दोलायमान परिस्थितीमधून 'पुढे' गेलेले दिसतात. आपण तिथेच. कदाचित जास्त खाली घसरणं हे आपलं क्रियमाण. (हे सगळं वैयक्तिक मत आहे. महानुभावांनी क्षमा करावी)

In reply to by प्यारे१

ते पुढे गेले की नाही हा वेगळा विषय असु शकतो. पण माणसाच दोलायमान परिस्थीतुन जाण आणि त्यातला ताण वेदना स्वामींनी ज्या रीतीने सहन केली ती एक माणुस म्हणुन मला अधिक मोलाची वाटते. कारण आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे.

In reply to by मारवा

>>> आपण सर्व च इन्क्लुडिंग स्वामी स्खलनशील आहोत यावर माझा विश्वास आहे. सगळेच असले तरी नरेन्द्र विश्वनाथ दत्त तिथंच साचून राहिले नाहीत तर सगळ्याला मागं टाकून परम पदाला पोचले हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही जिथं संपतो त्याच्या कोसो दूर नंतरचे 'स्वामी विवेकानंद' सुरु होतात. आपण ते सुद्धा कसे स्खलनशील होते असं म्हणून स्वत:ला सवलत घेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना त्या कॅटॅगिरीमध्ये जाणीवपूर्वक बसवून 'हम्म, बघा!' असं तर करत नाही ना याचा विचार करावा लागेल.

जी गोष्ट हक्काने मागायची, तीदेखील मागताना संकोच वाटणे, हा स्वामीजींचा थोरपणा आहे. ज्याने हिंदूधर्मासाठी जीवनाचा क्षण क्षण उधळला, त्याला याचना करण्याची वेळ यावी हे आपल्या समाजाला दूषण आहे. बाकी, काहींना पांढऱ्या कागदाचा शुभ्रपणा न दिसता केवळ कोपऱ्यातला काळा ठिपकाच तेवढा दिसतो, हे शक्य आहे.

मला असं वाटतं; मला तसं वाटतं अशा म्हणण्याला फार महत्व नसतं. सदर लेखनातून दोनच गोष्टी डोकावतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरी म्हणजे आकस. बाकी चालूदे.

मारवा मुळात हि पत्र कुठून मिळाली ? ह्याचा सोर्स काय आहे ? कशावरून हि पत्र खरी आहेत ? ह्याचा तुम्ही कुठलाही आगापिछा सांगितलेला नाहीये

मारवा, निव्वळ २-३ पत्रे वाचून (आणि ती सुद्धा मागचेपुढचे संदर्भ न बघता) तुम्ही आपले मत बनविले आहे. विवेकानंदांनी अमेरिकेत असताना शेकडो पत्रे लिहिली आहेत. ती सर्व वाचली तर वरील पत्रांचे संदर्भ लक्षात येतील. स्वामी विवेकानंद अमेरिकेत कोणत्या कारणासाठी गेले होते, ते तिथे किती काळ राहिले, कोठे राहिले, कसे राहिले, त्या काळात त्यांनी आपला चरितार्थ कसा चालविला, त्या काळात ते अमेरिकेत नक्की काय करीत होते, तिथे त्यांचा कोणाशी परिचय झाला या सर्व गोष्टी माहिती करून घ्या. ते समजल्यानंतरच वरील पत्रांचे संदर्भ व त्यामागची त्यांची नक्की भूमिका कळेल. तोपर्यंत विवेकानंदांविषयी कोणतेही बरेवाईट मत बनवू नका.

स्वामी विवेकानंदासंबंधी असलेल्या अनेक हजारो पानांच्या ग्रंथसंपदेतून शोधून काढलेली, ही केवळ तीन पत्रे खरी असावित हे गृहीतक जमेस धरूनही, माझ्या मते खालील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत... प्रथम वरील पत्रांतील मजकूरासंबंधी... १. स्वामी विवेकानंद या माणसाने (माझ्या मते सगळे 'खरे' स्वामी / संत / साधू हे सुद्धा माणसेच असतात) भारत, हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीसाठी असामान्य कार्य केलेले आहे. याबाबत कोणाचेच दुमत नाही आणि लेखकाचेही नसावे. २. अश्या असामान्य माणसाला त्याच्या कामात अनेकांनी सढळ हातांनी मदत केली हा इतिहास आहे. त्या मदतीतली काही जरूरीपुरती रक्कम त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या माणसांच्या शेवटच्या काळासाठी (लिव्हिंग एक्सपेन्सेस) ठेवले असते तर ते फार चुकीचे झाले नसते. तरी विवेकानंदांनी ते केले नाही हे या पत्रांवरून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळेच, त्यांना अगोदर मदतीचे वचन दिलेल्या त्यांच्या एका सधन मित्राकडे मदत मागावी लागली असे दिसते. नाईलाजाने मागितलेली मदत उघड होऊ नये ही एका मनस्वी माणसाची इच्छा समजण्यासारखी आहे, त्यात काही आकाश कोसळले नाही असेच वाटते. ३. मदत मागताना 'तो माझा अधिकार आहे' अशी गुर्मीची भाषा न वापरता विनयपूर्ण भाषा वापरणे हे भारतीय संस्कृतीत कृतज्ञतेचे लक्षण समजले जाते, मिंधेपणाचे नाही. आता, या पत्रांतल्या वस्तूस्थितीमागचे कटू सत्य... १. ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत, धर्म चालवणार्‍या आणि त्याचा प्रसार करणार्‍या केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांच्याच नव्हे सर्व स्तरांच्या व्यक्तींचा कर्मकाळच नाही तर आयुष्याचा शेवटचा काळही आर्थिक स्थैर्याने जावा याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यासाठी त्यांच्या धार्मिक संस्थांचे जागतिक स्तरावर केले जाणारे व्यवस्थापन आणि त्याच्या आर्थिक बाबींत त्या त्या धर्माच्या सर्वसामान्य लोकांचे योगदान आश्चर्यचकित करणारे असते. म्हणूनच त्यांच्या धार्मिक संस्थांत काम करणारी माणसे त्यांच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक हलाखीत असणे विरळात विरळा दिसते. याविरुद्ध... २. कोणत्याही स्तराच्या व्यवस्थापनाचा हिंदू धर्मात केवळ अभावच नाही तर एकूण व्यवस्थापनाबद्दलच विस्कळीत असलेल्या धार्मिक संस्थांत आणि समाजात पूर्ण अनास्था आहे. सामाजिक / राजकीय / धार्मिक कामाच्या आडून जनतेची फसवणूक करून स्वतःच्या अनेक पिढ्यांची व्यवस्था होऊन उरेल इतके धन जोडणार्‍या माणसांबद्दल आपल्यातल्या अनेकांच्या मनात "त्याने करोडोचे धन जमवून फार मोठे काम केले" अशी कौतुकमिश्रित आदराची भावना असते. त्याचे गुणगान गाण्यासाठी हितसंबंधी लोकांची मांदियाळी उभी राहते. हे आजूबाजूला सतत दिसत असते. ३. याउलट, धर्माचे / समाजाचे कर्तव्य करताना जो माणूस स्वतःची किमान पर्वाही न करता आपले जीवन झोकून देतो त्याची शेवटच्या दिवसात काळजी घेण्याची मानसिकात हिंदू संस्थांत/समाजात नाही हे वारंवार दिसते. हा हिंदू धर्मातला फार मोठा दोषच नाही तर सामाजिक कृतघ्नपणा आहे. ४. म्हणून, 'खर्‍या' धर्म/समाजसेवकांनी नि:स्वार्थीपणे काम करताना स्वतःच्या शेवटच्या दिवसांकरिता धन साठवले नाही म्हणून त्यांना कोणाकडे मदत मागावी लागणे याची समाजाला शरम वाटली पाहिजे. तसे न वाटता, वस्तुस्थितीचा विपर्यास करून खुसपटे काढण्याच्या प्रवृत्तीबद्दल वेगळे काही लिहिण्याने फक्त त्या शब्दांचाच उपमर्द होईल, नाही का ? चांगल्या गोष्टीतल्या असलेल्या नसलेल्या व्यंगाची मोहरी काकदृष्टीने शोधून काढून त्याचा एव्हरेस्ट बनवू शकणार्‍यांच्या बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटून घ्यावे की तिची कीव करावी हा ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. इतकेच !

किती मारामारी चालली आहे धाग्यावर. पण मला कळलच नाहि इतकं घमासान का चाललं आहे ते. अंग्रेजीके मामलेमे अपना हाथ थोडा तंग है. म्हणुन वाटलं कुणी रसग्रहण वगैरे करेल धाग्याचं. पण इथे तर वस्त्रहरण प्रकार सुरु आहे.

In reply to by अर्धवटराव

कायतरीच काय, अर्धवटराव ! नंगानाच करणार्‍याचं वस्त्रहरण कसं काय करायचं ब्वा ???!!! =)) =)) =))

विवेकानंदांचं चारित्र्यहनन करण्यासाठी लिहिलेला आहे असं मला नाही वाटलं. का, तेही सांगतो. (इथे ही पत्रं विश्वासार्ह आहेत हे गृहीत धरलेलं आहे, आणि तेही मारवा यांचं पूर्वीचं लिखाण वाचलेलं आहे म्हणून. ते जर तसं नसेल, तर प्रश्नच मिटला.) कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. या लेखात विवेकानंद हे vulnerable अशा अवस्थेत दिसतात आणि ते लेखकाच्या मनात त्यांची जी प्रतिमा आहे त्याला विसंगत आहे, म्हणून हे विचार लेखकाच्या मनात आले आणि ते त्याने इथे मांडलेले आहेत. इथे ज्या काही टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही अशाच प्रतिमाभंजनावर किंवा त्याच्या तथाकथित (मत या अर्थाने) प्रयत्नावर प्रतिक्रिया म्हणून आलेले आहेत. स्वामीजी विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात निवर्तले. म्हणजे तुम्ही - आम्ही कोणीही त्यांना प्रत्यक्ष भेटलेलं नाही. जे आपल्याला माहित आहे ते त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेलं आहे, किंवा त्यांचे स्वतःचे विचार आहेत, त्यावरून आपण बनवलेली एक प्रतिमा आहे. त्याला कोणीही हात लावायची हिंमत केली तर आपल्याला त्रास होतो. पण अशा अंधभक्तीचा स्वतः स्वामी विवेकानंदांनी निषेध केलेला आहे. लेखकाचं मत न पटणं आणि त्यावर आपलं मत व्यक्त करणं हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, पण अशी व्यक्तिगत टीका व्हायला नको होती. अर्थात, तिच्या मागचं कारण समजल्यामुळे त्याचं आश्चर्य वाटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोकोबा आपण हे सर्व वाद मिटवायला करताय हे दिसतंय!!! त्याबद्दल आभार!!! पण लेखक हा स्वतःच व्हल्नरेबल अवस्थेत गेलाय स्वतःच्या पायाने!!! आणि आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!! म्हणून वरील विचार माझ्या मनात आले व ते मी मांडले!!! ;) ;) ;) गंमतीत घ्या बोकोबा!!!

In reply to by जडभरत

आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!!
तुमची आमच्या मनात जि प्रतिमा आहे त्याच्याशी तुम्हीदेखील विसंगत वागला आहात.. म्हणून मला खालचा प्रतिसाद द्यावा लागला. त्याबद्दल क्षमस्व. आणि आपल्या नावाप्रमाणे यापुढे आपण संयम दाखवाल अशी आशा आहे. (ह. घ्या). आता धाग्याबद्दल - माझे व्यक्तिशः असे मत आहे की महात्म्यांच्या कोणत्याही छोट्याश्या कृतीचेदेखील उचित मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांच्या कृतींमध्ये बर्‍याच वेळेस खोल अर्थ दडलेला असतो. त्या कृतींची चिकित्सा/ मंथन केल्याशिवाय त्यातून जे मिळायला हवे ते मिळणार नाही. त्यामुळे टीकाकारांचे देखील आपण स्वागत केले पाहिजे कारण त्यातूनच आपल्याला त्यांच्या कृतीबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळते. न जाणो या मंथनातून आतापर्यंत न समजलेला या विषयाचा वेगळाच पैलू समोर येईल.

In reply to by आनन्दा

हो तर. सदरहू धागा लेखक अन्य मुख्य मुख्य धर्मातील महात्म्यांचे श्रद्धास्थानांचे देखील असेच मूल्यमापन करून त्यांचे वेगवेगळे पैलू जगासमोर आणण्याचे धाडस दाखवोत! हिंदू श्रद्धास्थानांवर कुणीही चिखलफेक करा. त्यानं मात्र गप्पच बसायचं!

In reply to by जडभरत

तुम्ही एक तरी प्रतिसाद शांतपणे आणि लेखात माडलेल्या मुद्द्यांना धरुन लिहीणार का? तुम्हाला जे पटलं नाही, ते का पटलं नाही हे तरी लिहा.. ह्या धाग्यावर तुम्ही किती प्रतिक्रिया दिल्या आहेत, सगळ्या जरी एकत्र गोळा केल्या तरी त्यातुन काहीही अर्थपुर्ण बाहेर पडतय का? नाही, पडावंच असा माझा काही आग्रह नाहीये, पण किती दंगा कराल? हिंदु आम्हीही आहोत. पण प्रत्येक गोष्ट काहीतरी "अजेंडा" घेउनच लिहीली आहे असंच समजुन वागायचं असेल तर फक्त गदारोळच होऊ शकतो, चर्चा नाही. तुम्हाला नक्की काय करायचय?

In reply to by पिलीयन रायडर

माझे पहिले २ मुद्द्यांत मी माझं म्हणणं मांडलं आहेच. ते वाचा. दुसरे म्हणजे लेखक महोदयांनी आपली सर्वधर्मसमभावी दृष्टी अन्य धर्मांकडे वळवून त्याच्या श्रद्धास्थानांचे पण असेच मूल्यमापन करावे. हेच माझे म्हणणे आता.

नाईलाज म्हणून लिहितोय.. यापूर्वी वाटली नसेल एव्हढी आज मला इथले काही प्रतिसाद वाचताना वाटत आहे आता.. हे स्कोर सेटलिंग आहे का?

In reply to by आनन्दा

आनंदाजी विथ ड्यू रिस्पेक्ट, लेखकाने विवेकानंदांचे रंगवलेले चित्रण वाचून आपल्याला काहीच कसे वाटले नाही? असलं हिणकस चित्रण त्यांच्या तत्कालीन विरोधकांनीदेखील केलं नव्हतं. प्रत्येक भारतीयानं नम्र व्हावं असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामीजी. त्यांच्याविषयी असं विकृत वर्णन केलं तर मी तरी नाही खपवून घेणार. आणि हो, मी अद्वैतवादाचा पुरस्कर्ता असलो तरी तुकोबाप्रमाणे नाठाळाचे माथी काठी हाणणारच!!! मग कुणाला काही वाटो.

स्वामीजींच्या शेकडो पत्रे प्रसिद्ध आहेत तसेच स्वामीजींची प्रवचने/ व्याख्याने, संवाद इ. साहित्य उपलब्ध आहे. जे वाचून अनेक तरुणांचे जीवन बदलून गेले. त्यातील निवडक पत्रे इथे टाकली आहेत. आणि एक मत बनवण्याचा खटाटोप केलेला आहे. मुळात हि पत्रे वाचण्याआधी स्वामीजींचे चरित्र वाचले असेल तर अशा गोष्टींवर वेगळा प्रकाश पडतो. हे लक्षात घ्या स्वामीजी स्वतः तरुण असतांना परमेश्वरावर विश्वास ठेवत नव्हते. " तुम्ही परमेश्वर पहिला आहे काय? मग मी हि गतो पाहू शकतो का?' हाच प्रश्न स्वामीजी प्रत्येक साधू आणि संतांना विचारीत. इंग्रज कालीन सुशिक्षित स्वामींना उदरनिर्वाहा साठी कोणावर अवलंबून राहावे लागले नसते. गोंधळ बरेच दिसत आहेत. सुरवात सर्वसंगपरित्याग या मुद्द्यावरून झाली आणि शेवट स्वामीजी दांभिक आहेत असा शिक्का मोर्तब करण्यात झाली. आपण त्रोटक माहिती बघू. १. सर्वसंगपरित्याग शक्य आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिक अध्यात्मिक बैठक फार कठीण आहे. सर्व संग परित्याग कशासाठी करायचा? याचा उहापोह भगवान बुद्द्धांनी चांगला केला आहे. आपण सर्वसामान्य संसारी माणसे अशा गोष्टींकडे फक्त अचंब्यानेच पाहू शकतो किंवा त्याची तर उडवून दांभिक वगैरे ठरवू शकतो. पण जयस अध्यात्मिक व्यक्तीला परमेश्वर प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती ( बौद्ध-निब्बाण) करून घ्यावयाची आहे अशी व्यक्तीच असा विचार करू शकतात. सर्व संग परीत्यागातून मोह, माया, असूया, द्वेष इ. बंधनातून मुक्ती मिळवणे हे उद्दिष्ट. अशी व्यक्ती कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आपली सर्व काळजी परमेश्वरावर सोडून देतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हा अहंकार नाहीसा होण्यासाठी केला जातो. (श्री. गौतम बुद्ध स्वतः राजे असून त्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या त्या केवळ अंतिम ज्ञान प्राप्तीसाठीच) २. आता असा सर्व संग परित्याग केलेला माणूस समाजात परत का येतो? सर्वसामान्य साधकाचे उद्दिष्ट फक्त मोक्ष किंवा निब्बाण हेच असल्याने त्या प्राप्तीनंतर त्याचे कार्य संपते. पण ज्या विभूती विशेष कार्यासाठी जन्म घेतात तेच अंतिम ज्ञान प्राप्ती नंतर शरीरावर राहून समाज त्यांना नियतीने नेमून दिलेल्या कार्यासाठी समाजात परत येतात. उदा. गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम,राम कृष्ण परमहंस आणि इतर संत मंडळी. स्वामीजी हे या दुसर्या प्रकारातील असल्याने ते त्यांचे कार्य करण्यासाठी अहोरात्र झटले. त्या कार्यासाठी निधी जमवला. त्या कामातील त्यांची तळमळ, निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या चरित्रात आणि साहित्यात ठाईठाई दिसून येतो. तो पहावा. शेवटच्या दिवसात आपल्या मातेची होणारी परवड दूर करणे हे कोणत्याही पुत्राचे कर्तव्य आहेच. मनात आले असते तर पाशाची कोणतीही तजवीज त्यांच्या 'मिशन" मधून करणे त्यांना काय अशक्य होते? पण ते तसे न करून त्यांनी किती मोठा आदर्श घालून दिला आहे. आणि इथेच त्यांचे मोठेपण आहे. राहिला प्रश्न राजा अजित सिंगांचा. अजितसिंगांचे स्वामींवर अत्यंत प्रेम होते. खरेतर स्वामीजींना " विवेकानंद" हे नाव अजित सिंग यांनीच दिले. स्वामीजींचे संन्यासी नाम " विविदिशानंद" असे होते. या गोष्टी पाहतांना आपला दृष्टीकोन कसा आहे त्यावरहि बरेच अवलंबून असते. स्वामीजींचे चरित्र असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषाचे. भाग्वाद गीता असो, पुराणे कि वेद आपली दृष्टी कोणत्याही कारणाने कलुषित झाली, कि मग आपल्याला हवे तसे अर्थ निघू शकतात, आपल्या सारखाच विचार करणारी मंडळीच आपल्याला भेटतात आणि असेच साहित्य आपल्याला वाचायला मिळते. तेव्हा सावध! एक उत्तम उदाहरण मध्यंतरी वाचनात आले- जसे एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. तसेच काहीसे तत्वज्ञानाचे पण आहे. स्वामीजींची पत्रे वाचून बराच कळ लोटला. तुम्ही दिलेली पत्रे नक्की कुठे संग्रहित आहेत हे वेळ मिळाला कि तपासून पाहतो.

In reply to by दत्ता जोशी

अत्यंत उत्तम प्रतिसाद! एखाद्याच्या मताला विरोध करायचा असेल तर तो किती संयतपणे, मुद्देसुद आणि परिणामकारक करता येतो ह्याचे उदाहरण म्हणुन बघावा. स्वामी विवेकानंदांच्या १-२ पत्रांवरुन, संदर्भ ने बघता, थोडे अतिरेकी निष्कर्ष काढले आहेत हे खरे आहे. पण त्यासाठी इतक्या आक्रस्ताळेपणे इथे काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि नुसताच आक्रस्ताळेपणाच.. त्यात लेखात मांडलेल्या मुद्यांचे खंडन, आपल्या मतांच्या समर्थनार्थ काही चार ओळी तरी लिहाव्यात ना.. नुसताच थयथयाट.. कृपया सदस्यांनी विरोध जरुर दाखवावा.. पण नळावरच्या भांडणासारखं "अहाहाहाहाहा... आलीच मोठी शहाणी.." असा सुर पकडु नये..

In reply to by पिलीयन रायडर

पिराजी वर दिलेला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे यात दुमत नाही. पण म्हणून असली हिंदूद्वेष्टी मानसिकता या गोग्गोड बोलण्याने सुधारणार नाही. तिथे तुकोबाची काठीच पाहिजे. बायद्वे, आपलेच लोक आपल्या लोकांचे पाय पहिले खेचतात. मग त्यांना आपण कुणीतरी सेक्युलर विचारवंत वगैरे झाल्यासारखं वाटतं. तुमचा प्रतिसाद त्याच पठडीतला!!!

In reply to by जडभरत

"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी. तुम्हाला काय ते नीट सांगितलय मी, अजुन वाद घालायची इच्छा नाही. तरीही कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणुन शेवटंच सांगतेय विरोध जरुर करा, पण मुद्द्यांना.. दत्ता जोशींनीही विरोधच केला आहे. पण त्यांना नक्की काय आक्षेपार्ह वाटलं ते त्यांनी एकही वावगा शब्द न वापरता लिहीलं आहे. तुमच्या इतक्या प्रतिसादानंतर तुम्ही विवेकानंदांचे साहित्य कोळुन प्याले आहात असेच वाटते आहे. तुम्हाला तसा प्रतिवाद करणे अवघड नसावेच, नाही का? माझ्याकडुन आपल्याशी संवाद इथेच संपवत आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

In reply to by पिलीयन रायडर

१. आपलेच लोक हे विधान जनरली घ्या. २. तुमच्या पाठींबा मी कधी मागितला? वादात यायला तुम्हाला नाही आमंत्रण दिलं. ३. मी विवेकानंदांचं साहित्य कोळून प्यायलो आहे. पण असली दूषित मानसिकता ठीक करायला त्याचा दुर्दैवाने उपयोग होत नाही. त्याला तसलेच उतारे लागतात. ४. जय हिंद! जय महाराष्ट्र!!!

In reply to by पिलीयन रायडर

"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी.
दुर्दैवाने अशाच लोकांची चलती आहे सध्या. :( नजीकच्या भविष्यात तरी यातून कै मार्ग दिसत नाही.

In reply to by दत्ता जोशी

>>> एक सुंदर रंगीबेरंगी भरतकाम केलेली नक्षी जर विरुद्ध दिशेने पहिली तर अत्यंत कुरूप दिसते. आम्ही याला पिसारा फुलवलेला मोर म्हणतो. बघायचं काय? पिसारा की उघडं पडलेलं ढुं**?

अवघड आहे , खरेच अवघड आहे ! हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ? स्वतःच्याच प्रेरणास्थांनांचा भंग केलेले हे असले सत्वहीन लोकं आयसिस च्या वादळापुढे किती टिकतील ? कुठे गेले आमचे स्वयंघोषित (तथाकथित) धर्मसुधारक ? धर्माच्या श्रध्दा स्थानांवर एकांगी दृष्टीकोनातुन होणारी चिखलफेक त्यांना दिसत नाही का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ?
दत्ता जोशींनी केला तसा.

कितीही महान असले तरी संत हे माणसंच असतात. त्यांना त्या भावभावना चुकत नाहीत किंवा त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. >>> ह्यावरून संत म्हणजे काय तुम्हाला समजलेलं दिसत नाहीये .अश्या अज्ञानातून किवा अर्धवट ज्ञानातूनच मग भोंदू निर्माण होतात . हि सामान्य माणसंच असतील आणि भावभाव्नेत अडकत असतील किवा त्यांना त्यापासून मुक्त होता येत नसेल तर त्यांना संत म्हणण्याचं कारणच काय आहे ? अहो ते ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त असतात म्हणूनच संतपदाला पोचलेले असतात ना . केवळ भगवे कपडे घातले आणि घरदार सोडून फिरत बसलेत त्यांना संत म्हणत नाहीत . ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करू नका . आधी विवेकानंदांच चरित्र वाचा . जमल्यास रामकृष्ण परमहंसांच चरित्र वाचा . त्यांचे विचार , त्यांचं कार्य , त्यांची राजयोगावरची भाष्यं वाचा .आधी राजयोग म्हणजे काय हे समजून घ्या . विवेकानंद ज्या सामाजिक , धार्मिक , अध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते समजेल .केवळ विवेकानंदांचे भगवे कपडे आणि सर्वसंगपरित्याग ह्या पलीकडचे विवेकानंद जाणून घ्यायचा प्रयत्न करा . मग तुमची हि विधानं चुकीची आहेत हे तुम्हाला आढळून येईल . @प्यारे १ अगदी योग्य प्रतिसाद संपादित

In reply to by तुडतुडी

ते आपल्यासारखे आहेत असं म्हणून त्यांचा अपमान करु नका >>>> यात अपमान कुठे आला? एखादा संत आपल्याला आपल्यासारखा वाटणं हे अपमानाचं लक्षण कशावरून? तुम्ही मानता म्हणून? तुम्ही कोण? तुमची आध्यात्मिक योग्यता काय? ' आपणासारिखे करिती तात्काळ ' हे जे तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हटलेलं आहे, ते हा प्रतिसाद लिहिण्याआधी वाचलं असतंत तर जरा प्रतिसाद लिहायचे श्रम वाचले असते. आधी विवेकानंदांचं चरित्र वाचा. जमल्यास रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचा >>> हे मी वाचलेलं नाही किंवा नसावं हा साक्षात्कार तुम्हाला कसा काय झाला बुवा? विवेकानंद ज्या सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक उंचीवर पोचले होते हे कळलं तर माणूसपणापासून ते किती पुढे, किती उंचीवर गेले होते ते कळेल>>> तुम्हाला इथे मुद्दाच कळलेला नाही. त्याच्याबद्दल मी प्रतिसाद लिहिला नव्हताच मुळी. मारवा यांचा लेख मला आक्षेपार्ह का वाटत नाही यावर माझा प्रतिसाद होता. विवेकानंद हे त्या उंचीवर गेले होते हे अमान्य केलेलंच नाही, पण म्हणजे त्यांना सामान्य माणसांना असणारे आजार, तहानभूक यासारख्या गोष्टी, मृत्यू - हे सगळं नव्हतं? या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सामान्य माणसापेक्षा वेगळा होता पण ते माणूसच होते, अगदी शंभर टक्के - हे मी सांगत होतो. त्यामुळे असा प्रतिसाद लिहिण्याआधी तुम्हीच तुमचा दृष्टिकोन बदला. नाही बदललात, तरी मला काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच.

मारवा, खालील संकेतस्थळावर स्वामी विवेकानंदांनी १८८८-१९०२ या कालखंडात लिहिलेली शेकडो पत्रे दिलेली आहेत. तुम्ही जी ३ पत्रे दिली आहेत त्याच्या आधीची आणि नंतरची काही पत्रे वाचा आणि नंतरच तुम्ही दिलेल्या पत्रातील संदर्भ तुम्हाला कळतील व सर्व गैरसमज दूर होतील. http://www.vivekananda.net/knownletters/1888_92.html

In reply to by श्रीगुरुजी

आभार्स. गुरुजींना एक अमर्यादित थाळी... ;)

In reply to by श्रीगुरुजी

माझ्याकडे कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद यांचे एकुन ९ खंड इंग्रजी भाषेतले आहेत. त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. त्या व्यतिरीक्त इतरांनी केलेली त्यांच्या वरील भाष्ये व रामकृष्ण परमहंस संबधित साहित्य माझ्या व्यक्तीगत संग्रहात आहेत. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते. तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. ९ खंडा व्यतिरीक्त यात काहि नविन मिळाल्यास आनंदच होइल पण प्रामाणिकपणे वाटते की ९ खंडात स्वामीजींचे स्वतःचे साहित्य पुर्ण कव्हर होते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( अशक्य नाही )अशीही काही बाब नाही. ते पृष्ठसंख्येच्या तुलनेने सहज पुर्ण वाचता येते. द माँक अ‍ॅज अ मॅन हे द अननोन लाइफ ऑफ स्वामी विवेकानंदा हे भाष्य आपण एकदा वाचुन पहा असे मी हि आपल्याला सुचवतो. अर्थात भाष्य हे भाष्य च असते मग ते कुणीही का केलेले असो नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे मी ही तेच मानतो म्हणुन भाष्य जरी रोचक वाटली तरी मुळ लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का सतत इव्हॉल्व होत राहण्याचा केलेला प्रयत्न व त्यातुन घेतलेला स्वतःचा शोध मला अधिक मोलाचा वाटतो असो

In reply to by मारवा

त्यात माझ्या अल्प माहितीप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच स्वतः च सेल्फ व्याख्याने पत्रव्यव्हार कविता इ. पुर्ण साहित्य समाविष्ट आहे. हं अल्पज्ञान तर दिसतंच आहे. इतरांनी केलेल्या भाष्यापेक्षा त्यांची स्वतःची अभिव्यक्ती असलेले कंप्लीट वर्क्स मला अधिक मोलाचे वाटते मग तुम्ही कशाला केलंत फालतू भाष्य!!! तरीही आपण अगत्याने लिंक दिल्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद. लिंक अगोदरच वाचली असती तर असले फालतू चित्रण केलेच नसते. स्वामींचे साहित्य हे ओशो किंवा जे कृष्णमुर्ति यांच्या इतके असंख्य पृष्ठांत आहे की जे पुर्ण कव्हर करणे अवघड होते ( हं ते पूर्ण कव्हर केलेलं नाही हे तुमच्या मुक्ताफळांवरून दिसतंच आहे. नरहर कुरुंदकर म्हणत असत कि बादरायणाचे ब्रह्मसुत्र वाचण्यासाठी शंकराचार्याचे गाइड कशाला हवे नरहर कुरुंदकर ही फायनल ऑथोरिटी आहे हे सिद्ध करा!!! लेखकाची मुळ रचना व त्यावर आपण लावलेला स्वानुभवाचा वा स्व चिंतनाचा कस व कुठल्या का निन्मत्तम पातळी वर असोना का आपल्या स्वचिंतनाचा उजेड काय आहे तो दिसतोच आहे. चालू देत. फुकट आहेत शब्द!!!

मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे वाचले आहे. परंतु येथे हा लेख टाकण्याचे प्रयोजन काय आहे हे मला कळले नाही. येथे माझ्या सारखे सामान्य वाचक येतात ज्यांना स्वामीजींवर अतीव आदर आहे त्यांना स्वामीजींचे चांगले विचार सांगण्याऐवजी त्यांच्या चुकाच दाखवण्याचे प्रयोजन कळले नाही. जर हा लेख स्वामीजींबद्दल समग्र लेखनातील एक भाग असता तरीही मान्य केले असते.जर हा लेख त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी असला तर त्याचे येथे प्रयोजन काय? हे म्हणजे मी क्षकिरण शास्त्रातील त्रुटी वर एक लेख मिपावर लिहिण्या सारखे आहे. येथे त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे फार तर एक किंवा दोन लोक असतील. स्वामीजी हे सुद्धा माणूसच होते. त्यांच्या जीवनातील काही चुका चव्हाट्यावर मांडण्याचा नक्की फायदा किंवा प्रयोजन काय? उद्या मी रतन टाटा किंवा डॉ अब्दुल कलाम यांच्या लैंगिक जीवनावर ( दोघांनी लग्न केले नव्हते आणि दोघांबद्दल मला आणि लोकांना अतीव आदर आहे म्हणून केवळ उदाहरण दिले आहे) लेख टाकला तर त्याचा उहापोह करण्याने काय निष्पन्न होणार आहे. किंवा भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या दोन लग्ने करण्यावर आणि त्यांनी पहिल्या बायकोवर कसा अन्याय केला याबद्दल चिखलफेक करण्याने काय निष्पन्न होईल? कारण त्यात काहीतरी खोडी काढण्यासारखे तुम्हाला मिळेलच. माझ्या मताने हा लेख अप्रस्तुत आणि छिद्रान्वेशी आहे. खरं तर त्यावर भाष्य करावे असेही मला वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद खरेजी! मला पण हेच म्हणायचे होते. ऐन तारुण्यात ज्या माणसाने देश व धर्मासाठी आपल्या गुरुच्या सांगण्यावरून प्रपंच सोडला त्याच्यावर हा लेख खूप अन्याय करतो. त्या माणसाला आपली उपेक्षित आई व भावासाठी प्रभावशाली व्यक्तिंनी काही करू वाटले तर बिघडले कुठे? आपण तर काहीच करायचे नाही, दुसर्या कुणी केले तर छिद्रान्वेषी वृत्तीने त्याच्या अडचणीच्या प्रसंगाकडे बोट दाखवायचे हा प्रकार खूप चीड आणणारा! बाकी हा लेख टाकण्याचे प्रयोजन त्या विभूतीवर राळ उडवणेच हा आहे. पण जागरूक मिपाकरांमुळे सदर लेखाच्या बुडाला सुरुंग लागला आहे. इतकी टीका होऊनही लेखकाला आपल्या चुकाची जाणीव न होणे म्हणजे त्यांचे बोलवते धनी कुठल्या विचार(?)धारेचे आहेत हे वेगळे सांगणे न लागे!

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.मारवा यांचा सत्कार एक फायबरचा पत्रा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम टिनपाट कार्यकर्ते.

माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ? या पहिल्या परिच्छेदावर चर्चा न होता सगळ्या प्रतिसादांचा रोख विवेकानंदांच्या उदाहरणाकडे दिसतो. विवेकानंदांच्या जागी "मदर तेरेसा" हे नाव टाकले तर यावर काही चर्चा शक्य आहे काय? संन्यास/सर्वसंग परित्याग या कल्पना खरोखरच शक्य आहेत काय?

@जडभरत, आवरा. लेखापेक्षा तुमचेच प्रतिसाद कैक पटीने जास्त हीन होत जात आहेत. तुम्हाला फारच आक्षेप असेल तर संपादकांकडे तक्रार करा. पण माझ्यामते झाली तेवढी आदळाआपट पुरे आहे आणि त्यातून निष्पन्न काहीच नाही. पिराताईंनी म्हटल्याप्रमाणे मुद्देसूद व अभ्यासपूर्ण प्रतिवादाची गरज आहे. खालच्या दर्जाची भाषा ही वापरणार्‍याचीच पातळी दर्शवते, ज्याच्या विरूद्ध वापरली जात आहे त्याची नाही.

ओहो! खूप राग आला वाटतं!!! धागाकर्त्याच्या पातळीला अगदी जवळ जात प्रतिसाद दिलात! त्याबद्दल काही बोलणे नाही! खालच्यादर्जाची भाषा तुमच्या लाडक्या लेखकानेच दाखवलीय! तुम्हाला विवेकानंदांविषयी भले काही घेणदणं नसो. आम्हाला तर आहेच. अन लेखकाचा सत्कार बरोबरच आहे. असो. तुमच्या पातळि विषयी काय बोलणे नाही.

महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचतांना अनुयायांच्या लक्षात येत नसते की प्रत्यक्षात ते महापुरूषांचे विचार पायदळी तुडवत आहेत. महापुरूषांएवजी त्यांचे विचार डोक्यावर घेतले असतील तर नाचायची गरज पडत नाही.

In reply to by जडभरत

तुमचे आणि इतरांचे प्रतिसाद वाचा आणि विरोध कसा करायचा ते ठरवा. इथे सभ्य लोक येतात असं माझं मत आहे. हे चेपु नाही. मारवा यांनी संयत शब्दात त्यांचे म्हणणे मांडले, विरोधी मत असणार्‍या सदस्यांनीही संयत शब्दात प्रतिवाद केला. तुमचे प्रतिसाद यात कुठे बसतात? तुमच्या सर्व प्रतिसादांतून मिपासदस्य म्हणुन मला वाचनिय वा मननीय एकही वाटला नाही. शेवटचा तर अगदी कहर होता. थेट शब्दात अपमानकारक आहे. अशी भाषा चेपुवर शोभून दिसते. इथे मिपापीठावर नाही. अतिशय हीन पातळीचे लेखन असले तरी त्यावर प्रतिवाद उच्च अभिरूचीचाच असावा असं माझं मत आहे. त्यातूनच आपली संस्कृती आणि संस्कार कळतात. इतर असंस्कृत वागत आहेत असे आपल्याला वाटतंय म्हणून आपणही असंस्कृत वागावं हे सर्वथा अयोग्य आहे. असो. माझी या लेखावरची प्रतिक्रिया एवढीच आहे की हिंदू संस्कृतीत सगळ्यांनाच चिकित्सेचा अधिकार आहे. ह्या मूळ अधिकारामुळेच हिंदू धर्म जगात वेगळा आहे. जे हा अधिकार अमान्य करतात ते माझ्या मते हिंदूच नाहीत. मारवा यांनी ह्याच अधिकाराखाली विवेकानंदांची चिकित्सा केली ती त्यांना त्यांच्या अल्पबुद्धीने वा कसेही जसे दिसले असेल त्याप्रमाणे. त्यावर एक सभ्य गृहस्थ म्हणून कुणाही हिंदूस विरोध करायचा असेल तर त्यांचे संपूर्ण म्हणणे आणि विचार योग्य अभ्यासपूर्ण प्रतिवादाने खोडून काढावे. माणसांना देव्हार्‍यात नेऊन ठेवणे निर्बुद्धांचे आवडते कार्य आहे म्हणून महापुरूषांचे लौकिकत्व चिकित्सेच्या परिघापासून दूरच ठेवावे असा त्यांचा आग्रह असतो. पण त्याने धर्म, संस्कृती एक साचलेलं डबकं होईल. व पुढे दुसरा कुणी विवेकानंद निपजायला परिस्थितीच उपलब्ध नसेल. स्वतः विवेकानंदांचे जेवढे साहित्य किंवा चरित्र मला माहीती आहे त्यावरून तरी ते चिकित्सकच होते असे दिसून येते. नुसते आंधळे अनुयायी बनून राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यामुळेच ते महापुरूष पदाला पोचले. इतिहास साक्षी आहे की सगळे महापुरुष हे मूळतः चिकित्सकच होते. प्राप्त परिस्थितीविरूद्ध त्यांनी प्रश्न विचारले. तशीच चिकित्सा विवेकानंदांच्या ही वागणूकीवर झाली तर आज जर ते हयात असते तर त्यांनाही वाईट वाटले नसते. कारण अशा फुटकळ अग्निपरि़क्षेला अस्सल सोने घाबरत नसते. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून आध्यात्मिक जगतात हिंदू फार पुढे आहेत. अशा चिकित्सेची सोय आहे म्हणून अनेक ढोंगी साधू-संत आज गजाआड आहेत. तसंच अशी चिकित्सा करत नाहीत म्हणूनच असल्या ढोंगी साधु-संतांचे फावते हेही लक्षात असू द्यावे. आमच्या पूज्य आणि आदरणीय महापुरूषांवर कसलेही प्रश्न उपस्थित करू नका असा अट्टाहासी कट्टर आग्रह इस्लाम धर्मात बघितला आहे आणि याचे परिणामही आपण जगभर बघत आहोत. अशाने काही गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे महापुरुषांवर उठलेल्या राळेविरूद्ध आपण काहीच प्रतिवाद करू शकणार नाही हे अनुयायांच्या लक्षात येतं कारण खुद्द अनुयायांनी तेवढा गंभीर अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे प्रश्नकर्त्यांवरच उलट आगपाखड करायचे धोरण आखले जाते. तेच कसे प्रश्न विचारण्यास लायक नाहीत असे दाखवले जाते. दुसरा म्हणजे अनुयायी महापुरुषांचा अपमान हा आपला व्यक्तिगत अपमान समजून अहंकारास सतत फुंकत बसलेले असतात. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणार्‍यांचा उलट अपमान केल्या जातो. तिसरं असं की महापुरुषांच्या स्वघोषित प्रतिमेला असे काही कवटाळून बसलेले असतात जसे की प्राणवायूच. ती प्रतिमा भंगण्याचा प्रयत्न कुणी केला तर जणू जीवावरच बेतणार आहे (नक्की कुणाच्या? महापुरुष तर गेले) अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात. यापैकी आपण नेमकं काय करतो याचा ज्याचा त्याने योग्य तो विचार करावा आणि आपली पातळी ओळखावी. तुम्ही च्यारित्रहनन हा शब्द फार सहज वापरून गेलात. पण त्याचा अर्थ काय? ज्यांची च्यारित्र्ये खोट्या प्रतिष्ठेतून बाहेरून चिकटवली जातात त्यांचे ते कमावलेले बुरखे फाडण्याला च्यारित्रहनन म्हणतात. म्हणजे असे लोक जे सामान्य जनतेत एक रुप घेऊन, एक प्रतिमा घेऊन वावरतात पण प्रत्यक्षात वेगळेच असतात. अशा ढोंगी लोकांचे च्यारित्रहनन होत असते. जे अशा प्रतिमांच्या आभासी जगापासून दूर असतात त्यांचे काय च्यारित्रहनन होणार? अर्थातच जे सर्वथा नागडे (याचा योग्य अर्थ घ्यावा) आहेत त्यांना अजून कोण आणि कसं नागडं करणार? ज्यांनी चरित्रबंधनेच नाकारली आहेत अशांची खिल्ली उडवणार्‍याचीच फजिती होईल की नाही? तुम्हाला माझा मुद्दा आणि रोख कळला असेल असे समजतो. ते "आवरा" हे तुमच्या उथळ आणि असभ्य होत चाललेल्या प्रतिसादांना उद्देशून होते. तुमची पातळी आणखी घसरू नये व तुमचेच हसे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा होती त्यात. तुमचा अनादर करण्याचा हेतू नव्हता तर मित्रत्वाचा सल्ला होता. मित्राने वाहवत जाऊ नये म्हणून योग्य ते सांगावे लागतेच. बाकी तुमची मर्जी. एक शेवटचे: आयडी सांभाळा. बॅन होऊ शकतो. मग असे कितीही लेख इथे मिपावर आले तर भंगार काय आणि संयत काय कुठलेच प्रतिसाद देता यायचे नाहीत. तरीही इथलं वाचत असाल तर मनातल्या मनात जळफळाट होण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. असो. धन्यवाद!

मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे असा अर्थ अभिप्रेत असतो. मग अशा लोकांचा अपमान कसा काय होऊ शकतो? माफ करा पण तुमचं हे विधान तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या मनात जी विसंगती आणि वैचारिक गोंधळ असतो तोच दाखवतंय. एकीकडे ते म्हणतात, की भारतीय संस्कृती महान आहे, आणि दुसरीकडे Valentine's Day साजरा करण्याने भारतीय संस्कृतीला धोका आहे असंही त्यांचं मत असतं. जी संस्कृती एवढी महान आहे, ती एक दिवस साजरा करण्याने नष्ट होण्याएवढी लेचीपेची आहे का हा साधा प्रश्नही ते स्वतःला विचारत नाहीत. तुम्ही तेच करताय. एका मराठी संस्थळावर एका लेखकाने टोपणनावानं लिहिलेल्या एका लेखाने चारित्र्यहनन होण्याएवढे स्वामी विवेकानंद छोटे आणि खुजे आहेत का, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. मला वाटतं, संदीप डांग्यांनी मांडलेला -अनुयायी विचार डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी महात्म्यालाच घेऊन नाचतात आणि त्याच्या विचारांचा पराभव करतात - हा प्रतिसादही त्याच संदर्भात आहे.

In reply to by बोका-ए-आझम

बोका जी, सभेत गोंधळ माजला तरच सभा गाजली म्हणतात का ???? ऑफ़ स्टंप च्या बाहेरच्या बॉल ला बॅट लावायची गरज नसते. ;)

इतक्या विनंत्या करुनही इंग्रजी उतार्‍यांचा मराठी अनुवाद नाहि म्हणजे नाहि केला कुणी. सर्व विद्वज्जनांचा निषेध :P आता स्वतःच थोडा प्रयत्न करुन पाहिला... पण पूर्ण अर्थ काहि लागला नाहि. असो. धाग्यात चर्चेचा विषय अपूर्ण मांडलाय असं वाटतं. संन्यासी/सर्वसंग परित्याग विषयाची आपली ट्रॅडीशनल कल्पना आणि त्याची शक्याशक्यता समाजमान्य, ऑलरेडी प्रूव्हन अशा विवेकानंद नामक संन्याशाच्या उदाहरणावरुन तपासायला घेणे असा काहिसा धाग्याचा विषय वाटतोय. विवेकानंदांची उल्लेखीत पत्रं सबूत के तौर पर पेश केली आहेत. सर्वसंग परित्याग अशक्य आहे म्हणुन तो स्वामीजींना जमला नाहि, कि काहि कारणास्तव स्वामिजी तो करु शकले नाहि... नेमका प्रश्न काय हे मला व्यवस्थीत कळलं नाहि. पण एक मात्र नक्की कि सदर पत्रं वा घटनांवरुन काहि निश्कर्ष काढण्यापूर्वी एकुणच सर्वसंग परित्याग व तो धारण केल्याचा दावा करणारे स्वामिजी या दोन्ही घटकांबद्दल काहि मूलभूत बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?
सर्वसंग परित्याग एक साधन म्हणुन बघितलं तर क्रमाक्रमाने शारीरीक आणि मानसीक गरजा आकुंचीत करणे असं त्याचं स्वरुप आहे. "सर्वसंग" मधील "सर्व" ही फार मोठी झोळी आहे. त्यातल्या एक एक वस्तु विसर्जीत करणे व रिकाम्या झालेल्या जागी आपली साध्य वस्तु भरणे अशी ति प्रोसेस आहे. विसर्जन करता करता शेवटी फक्त झोळीची खोळ उरणे व शेवटी तिचंची विसर्जन करणे हा या साधनेचा अंतीम पाडाव. नरेंद्र त्याच्या गुरुच्या दृष्टीने अलौकीक पुरुष होता. या गुरु-शिष्याचे नाते संबंध कळणं कठीण आहे. गुरुने शिष्याला आपल्या पंखाखाली घ्यावं व गंतव्य गाठेस्तो त्याला मदत करावी असा सरळ्धोप कारभार इथे दिसत नाहि. लौकीक अर्थाने नास्तीक नरेंद्रला ठाकुरजींनी त्यांना आवष्यक वाटलेल्या सर्व आध्यात्मीक अनुभुतींनी परिपूर्ण केलं. स्वामिजींनी सगुण भक्तीची पराकाष्ठा अनुभवली. निर्गुण-निर्बीज समाधी अनुभवली. शरीराची लक्तरं फेकुन द्यावी असं वैराग्य अनुभवलं. आणि फुल स्टॉप येण्यापुर्वी त्यांच्या आयुष्याने १८० अंशाने टर्न घेतला. अजाणतेपणी नाहि तर अगदी प्लॅन केल्यासारखा. जी झोळी रिकामी करायला त्यांनी आत्यंतीक कष्ट उपजले, तिच झोळी पुन्हा खांद्यावर घेऊन, विसर्जीत केलेल्या वस्तु परत झोळीत भरत हा मनुष्य संसार सागरात परतला. केवळ परतला नाहि तर पारंपारीक भारतीय समाजापासुन अत्यंत भीन्न अशा पाश्चात्य आणि अति पौरात्य देशांत त्याने कार्य केलं. स्वामीजींच्या बाबतीत जाणवणार्‍या सर्व विरोधाभासांची गंगोत्री इथे आहे. ठाकुरजींनी याची पुर्वतयारी करुन घेतलेली दिसते. स्वामिजी मांसाहार करत. मुखशुद्धी करता शोप खाणे वगैरे संन्याशाला वर्ज्य असे प्रकार करत. तत्कालीन संन्यासी परंपरेला साजेसे निवृत्ती तत्वज्ञान त्यांच्या भाषणात नसे. उद्योग, बलोपासना, कला अभिरुची यासारख्या लौकीक गोष्टींचा ते हिरीरीने पुरस्कार करत. या सर्व काँट्रॅडीक्शनबद्दल त्यांच्याजवळ अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. किंबहुना हे सर्व करता करता आपली ध्यानशक्ती क्षीण होत चालली आहे याबद्द्ल ते हळहळ व्यक्त करत. पण हे सगळं घडुनही आपल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुभुतींबद्दल त्यांना कधीच शंका आली नाहि. आणि वेळ येताच आपल्या झोळीची खोळ उतरवायचं कार्य त्यांनी क्षणाचा विलंबही न करता सहजपणे केलं. तात्पर्य काय, कि सर्वसंग परित्यागाची साधना खोटी नाहि. स्वामीजींचं सिद्धत्व देखील खरं आहे. त्यांच्या जीवनात खीर आणि सरबताचं जे कॉकटेल निर्माण झालं ( कि त्यांनी मुद्दाम केलं ) त्यावरुन साधना व साधकाच्या सच्चेपणात बाधा येत नाहि.

In reply to by अर्धवटराव

__/\___ खणखणीत. थोडी addition. सर्व'संग'त्याग असा शब्द आहे. सर्व'वस्तु'त्याग असा नाही. संसारात मी असायला काही हरकत नसते. माझ्या 'आत' संसार असला की गडबड असते. बहुतांश सगळे तसेच आत संसार घेऊन असतो. (आम्ही जास्त आहोत हे जगप्रसिद्ध आहे. इतरांनी असू नये ही सदिच्छा आहे)

In reply to by प्यारे१

तुम्हाला पण एक खणखणीत _/\_ 'आतल्या' संसाराला 'बाहेरचा' रस्ता दाखवणे ह्यालाच 'सर्वसंगपरित्याग' म्हणतात हे खरेच आहे. पण जनसामान्यांनी त्याचा उलटा अर्थ प्रचलित केला तिथे घोळ झालाय. महापुरुषांनी सांगितलं की अटॅचमेंट सोडा, वस्तू नाही. वस्तू असली काय आणि नसली काय, अटॅचमेंट असेल तर नसलेली वस्तूही मनात 'घर करून' बसलेली असते. आणि अटॅचमेंट नसेल तर असलेल्या वस्तूचे अस्तित्व शून्य असते. लोकांना एवढं हायफाय झेपत नाय.