कपिल... कल्पना विस्तार चांगला जमलाय.. लेख वाचतानाच गेल्या आठवड्याभरातल्या वेगवेगळ्या बातम्या डोक्यात फ्लॅस्ग होत होत्या.
'हत्यार चालवणारे' पकडले जाणं महत्वाचे आहेच पण त्याहून महत्वाचे आहे 'हत्यार चालवायला उद्युक्त करणारे' पकडले जाणं !!
आपणच ( माणुस) कसे आपले सुंदर आयुष्य नरकासारखे करतो ना? कोणीतरी कोणाचे बाहुले करतो आणि स्वताची पोळी भाजून घेतो.
सर्वच तरुणानी वाचावे आणि अंतर्मुख व्ह्यावे असा लेख.
काळे साहेब,
तुमचे सगळे लेख आणि प्रतिसाद मला आवडतात..(डाव्या लोकांवर केलेला हल्ला तर मनापासून आवडला..पण आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने तो ले़ख तुम्हाला काढावा लागला..)
पण हा नाही आवडला.. या लेखामुळे तुम्ही त्या अतिरेक्याविषयी सहानभुती निर्माण व्हावी असे वातावरण तयार करत आहात...आहो समजा हे सगळे खरे जरी असले तरी अशा वेळी हा लेख नको येथे... अशा वेळी म्हणजे आपल्या सर्वांच्या मनात त्या पाकड्यांविषयी आग धुमासत असताना हा लेख म्हणजे आगीत बर्फ टाकल्या सारखे आहे. उगाच मानवाधिकार(Human Rights), निधर्मी (so called secular) वगैरे लोकांच्या हातात कोलित देत आहात.
कदाचित महेश भट वगैरे निधर्मी लोकांना चित्रपटाची कथा म्हणुन हा लेख सुरेखच...(पण महेश भट या कथेत हिंदूनी अत्याचार केला म्हणून तो अतिरेकी झाला असे दाखवेल आणि मौलवी लोकांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला असे ही दाखवेल..)
समजा आपल्या समाजातील लोकांवर अशी वेळ आली तर आपण असे अतिरेकी बनू? मला नाही वाटत... तसे असले तर आ़ज या जगात बरेचसे हिंदू अतिरेकी निर्माण झाले असते...कारण आपल्या देशात ही प्रचंड उपासमार आहे.
खादाडमाऊ.
असे मी धम्मकलाडूला दिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे. ही कथा दहशतवादाचे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे. पण मला जे सांगायचे आहे ते वरती संदीप चित्र्यांनी बोलून दाखवले आहे.
फक्त दहशतवादी पकडून किंवा मारुन उपयोग नाही. आता १० मेले तर उदया १०० येतील.
त्यासाठी दहशतवादी पैदा( तयार!) करणारी एक नियोजनपूर्वक चालणारी जी यंत्रणा आहे ते उद्ध्वस्थ करायला हवी. नाहीतर दहशतवादी बनवण्याचा कारखाना सुरुच राहिल. मग ही यंत्रणा नाहिशी करायला अगदी युद्ध करावे लागले तरी हरकत नाही. ते करायला हवे.
माझ्या लेखनात दाखवल्याप्रमाणे गरीबी तसेच शिक्षणाचा अभाव ह्यामुळे पैसे मिळवण्यासाठी तरुण दहशतवादाकडे खेचला जातो.
यावर उपाययोजना करायला हवी. हेच समोर आणण्यासाठी मी हे लेखन केले.
लिहिल्यानंतर मला सुद्धा ते धम्मकलाडू किंवा तुमच्या सारखे दहशतवादाचे उदात्तीकरण वाटले. किंवा तुम्ही म्हणता तशी ही महेश भट्टच्या सिनेमाची कथा वाटते. पण त्याला माझा नाइलाज आहे. ह्यातून सूचित करण्याचा अर्थ समजून घ्या .
माझ्या प्रतिसादानंतर तो अजूनही उघड होइल असे वाटते.
<<समजा आपल्या समाजातील लोकांवर अशी वेळ आली तर आपण असे अतिरेकी बनू? मला नाही वाटत... तसे असले तर आ़ज या जगात बरेचसे हिंदू अतिरेकी निर्माण झाले असते...कारण आपल्या देशात ही प्रचंड उपासमार आहे.>>
नाही हिंदू अतिरेकी निर्माण होणार नाहीत अश्या परिस्थितीत , ह्याला कारण म्हणजे आपल्याकडे उपल्ब्ध असलेले शिक्षण. आपल्या शेजारी तसेच भारतातील मुस्लीम समाजात अजूनही शिक्षणाचा प्रसार म्हणावा तेवढा झालेला नाही. तसेच धर्मावरील श्रद्धेचा गैरफायदा घेणारी साखळी आहेच. त्यामुळे ते अतिरेकाकडे सहज झुकतात. हिंदू झुकत नाहीत.
मला वाटतं की मी लेखनामागचा माझा उद्देश स्पष्ट केला आहे. कळत - नकळत मी कोणाही वाचकाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा.
अजून एक
साहेब म्हणू नका. म्हातारा झालो असं वाटतं
http://kalekapil.blogspot.com/
आहो कपिल भाऊ,
मला हि हे कळतेच की तुमचा प्रयत्न आणि ह्या लेखनामागचा उद्देश हा दहशतवादाचे उदात्तीकरण हा नाही. पण एक सेकंद का होइना.. आपल्याला थोडी सहानभुती वाटतेच...जास्त चित्रपट पाहिल्याचा परिणाम...
माझे म्हणणे एवढेच की आत्ता अशा वेळी हा लेख नको होता..तुम्हाला जे सुचित करायचे आहे ते बहुतेक करून सर्वाना माहित आहे.
आता साहेब नाही पण भाऊ म्हणतोय..कारण नकारत्मक प्रतिसादही चांगला हाताळत आहात.
खादाडमाऊ
कपीलजी !!
कल्पना विस्तार जमलाये खरं ...
पण तरीही माझ्या सारख्या बैलाला ह्या लोकाची कीव नाय येत हो...
रागच येतोये...
आणी आम्ही रागात एखाद दुसराच जरी शब्द बोललो तरी गहजब होउन जाइन ...
तुर्तास इतकेच की ' लेखन म्हणुन छान आहे..'
सत्य वेगळे ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
(एन्काउन्टर पेशालीस्ट)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आवडले लिखाण .तुम्ही म्हणता ते ठिक आहे गरिब मुसलमानाना पैशाचे लालुच दाखवुन ते दहशतवादी कारवायाना उद्युक्त करत असावेत. परंतु हे सर्व थांबवायला भारतसरकार ने काही तरी करायला हवे ना? आता ती वेळ आली आहे . बघु आपले बोटचेपे सरकार ह्यावर काय निर्णय घेते ते.
वेताळ
एक कथा म्हणून लेखन चांगले आहे. तुम्हीच दिलेल्या दुव्यांचा एक कल्पनारम्य विस्तार असे म्हणता येईल.
पण ते दुवेही ज्या माहितीवर अवलंबून आहेत ती माहिती देणाराच कितपत खरे बोलत आहे याबद्दल शंका आहे.
त्यामुळे सत्यरंजित कथा असेही म्हणत नाही.
प्रतिक्रिया
उत्तम लेख
डोक्क सुन्न झाल.
मन सुन्न करणारा लेख.
नाही आवडला हा लेख..
हे ग्लोरिफिकेशन नाही
मला ही हे कळतेच हो..
हम्म!!
छान कल्पना विस्तार केला आहे.
कथा