आय आर बी आणि पुणे द्रुतगती महामार्ग
खरं तर काकु प्रांतात मी फारसा फिरकत नाही. तरीही आजच्या वर्तमानपत्रात हे वाचले आणि काही प्रश्न पडले.
१. दरड कोसळणे ही फक्त नैसर्गिक आपत्ती मानावी कां?
२. महामार्ग पोलीस दलाने सर्वेक्षण करुन माहीती देऊनही आय आर बी कंपनीने त्याची दखल घेतली नाही. हा अक्षम्य ढिसाळपणा होत नाही कां?
३. महामार्ग पोलीस ही सरकारी यंत्रणा आहे. त्यांनी आगाऊ धोक्याची सुचना देऊनही जर कंपनी त्याची दखल घेत नसेल तर हा गुन्हा होत नाही कां?
४. नुकत्याच झालेल्या अपघातात मनुष्यहानी झाली नाही म्हणून ही घटना गंभीर नाही असे सरकारचे मत आहे कां?
५. जर वरील प्रश्नांचे उत्तर सरकार नकारार्थी देत असेल तर या कंपनीवर ताबडतोब गुन्हा कां नाही दाखल झाला?
६. इतके होऊनही सामान्य जनतेने टोल दिलाच पाहीजे असं या कंपनीला वाटतंय, हे निर्ल्लजपणाचे वर्तन जनता कां खपवून घेतेय?
मला माहीत आहे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सर्वांना माहीत आहेत पण तरी आपण यावर भरीव असं काहीच करु शकत नाही. पण जे लोक अगर संस्था हे करु शकतात, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नाही असे समजावे कां?
प्रतिक्रिया
बंद झालेला हा रस्ता चालू झाला
आय आर बी
+१००
मग
आय आर बी
+१११...