मला वाटते नाही.
कारण आजकाल एकूण नितीमूल्ये (आंतरराष्ट्रीय स्तरावरसुध्दा ) बदललेली आहेत. त्यामुळे गोळीला गोळी हेच उत्तर आहे. मला वाचलेली दोन वाक्ये आवडतात, कि जी खरोखरच आत्ताच्या परिस्थितीला लागू होतात, ती अशी :
१. "गांधीच्या रक्षणासाठीसुध्दा देशाला शिवाजीची गरज आहे " - स्वातंत्र्यवीर सावरकर.
२. 'ह्या देशाला शांतता हवी आहे' हे देखील युध्द करुन सांगावे लागेल - व. पु. काळे
अहो, इथे आता गांधीवादाचेच निर्मूलन करण्याची वेळ येऊन ठेपलीय आणि गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन कसले करताय? तुम्हाला काय वाटलं गांधींचे उपास आणि सत्याग्रह यांनी क्षणार्धात कालच्या अतिरेक्यांचे मतपरिवर्तन झाले असते? ह्या भ्रमात राहू नका! आता हा दहशतवाद ठेचणे हाच एकमात्र मार्ग आहे.
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? -१
माझं मत आहे - नाही येणार ! त्याला अतिशय कणखर भाषेत उत्तर दिले पाहिजे.
आतंकवादाच्या कौलात विकासरावांनी वरील तीन पर्याय दिलेत काही येथील संदर्भातसुध्दा लागू होतात.
"ज्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या आक्रमणाला हिंसेने उत्तर देऊ नये, तर खुशाल मरणाला कवटाळावे, असे करून तुम्ही शत्रुच्या ह्रुदयातील मानुसकीला हात घालाल. तुम्ही जरी मेलात तरी स्वर्गात तुमचे स्थान अटळ आहे." - माझा राष्ट्रपीता. :(
गांधींचं योगदान आणि त्यांचा नेहमी वादात असलेला वाद हे सगळं जाणून घेण्यासाठी कलंत्री साहेबांच्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.
नीलकांत
प्रतिक्रिया
पुढील
जे खरच
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का?
आता बस्स झाले
नाही !
मत