मानसिक होरपळ -रुग्णाच्या नातेवाईकांची...
गेला महिनाभर मी एका वेगळ्या ताणामध्ये वावरतेय. त्यासाठी ठरवलं की आता इथेच या विषयाला तोड फोडूया आणि पाहू की रुग्णाची जवळची नातेवाईक म्हणून मी माझ्यात अजून काय सुधारणा करायला हव्यात? माझ्या हातून काही चुकतंय का? म्हणून हा प्रपंच.
त्याचं झालं असं : माझ्या बाबांना प्रोस्टेट कँसर झाल्याचं कळलं ही अचानकच म्हणजे अगदी आत्ता १ मे २०१५ च्या सुमारास आणि सगळ्या तपासण्यांमधून ऑपरेशन होईतो २ जून उजाडला. या काळात त्यांच्याच आग्रहामुळे मी कुणालाच- म्हणजे नातेवाईकांना हे कळू दिलं नाही. त्यांची चिडचिड नको म्हणून. त्यांच्याच कलाकलाने सगळं घेत होते/घेते आहे. पण या आजाराचं जेव्हा मला कळलं तेव्हा मी खरं सांगते, गेलेच हादरून. बाबांनाही डॉक्टरांनी पूर्ण कल्पना दिली आणि ते त्यांनी अत्यंत शांतपणे ऐकूनही घेतलं. पण हा आजार स्वीकारणं, तेही मनापासून इतकं सहज शक्य नाही याची पूर्ण कल्पना आहे मला. पण आता..
१. ते कधी नव्हे इतके चिडचिडे झालेत. त्यांना मला त्रास होतोय म्हणून, त्यांना स्वत:ला त्रास होतोय म्हणून, लोक येताहेत म्हणून असं होणं हे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाहीये. पण सध्या आम्हा दोघांचं बोलणं म्हणजे त्यांनी आक्रस्ताळेपणाने बोलणं आणि मी ते निमूट ऐकून घेउन एकटी असताना रडरड करणे एवढंच आहे की काय असं वाटतंय. त्यांना आम्ही दोघेच असताना मी सांगायचा खूप प्रयत्न केला, की बाबा, तुम्ही इतके छान आहात आणि आता असे का वागताय? तुम्हाला नेमकं काय होतंय? तुम्ही मला सांगा ना. आपण दोघं मिळून सगळं हँडल करू. लहानपणापासून मी तुम्हाला अगदी माय डॅडी स्ट्राँगेस्ट अशीच समजतेय आणि तुम्ही तसेच आहात. मला तसेच हवे आहात. मी आहे तुमच्याबरोबर. सतत. तर प्रतिक्रिया एवढीच-काही झालं नाहीये मला. तुला हवं तर तू जा तुझ्या घरी. अरे???????????? हा अर्थ निघतोय का माझ्या बोलण्यातून इथे?
२. घरी येणारे आगाउ पाहुणे- यात नातेवाईक- बाबांचे मित्र, माझे मित्र मैत्रिणी सगळे आले.
फार कमी लोक्स समजूतदार निघालेत. बाकीचे सगळे फुल्ल निगेटिव्हिटी घेउन येणारे/ तो अमक्याचा फलाणा असा गेला आणि त्या तमकीला असा त्रास झाला सॉर्ट ऑफ.हे लोक डोक्यात जाताहेत आणि हे बंद करू कसं ते कळत नाही. ही माणसं वाईट्ट आहेत असं नाही मला म्हणायचं पण असल्या गोष्टी बाबांच्या समोर त्यांनी बोलू नये असं जर मला वाटलं तर ते चूक आहे का? तसं एकदोघांना सांगायचा प्रयत्न केला तर त्या लोकांना राग आला. आता हे कसं काय जमवू मी? मी बाबांसमोर जर सगळं बळ एकवटून पॉझिटीव्ह रहाते आहे/निदान तसा प्रयत्न करतेय तर त्या हेतूलाच हरताळ फासला जातोय असं मला वाटतंय.
३. मलाच किती जण असा लूक देताहेत की कसं बापडी सहन करतेय हे सगळं?आडून आडून विचारतात की काय म्हणतात डॉ.? किती असेल आयुष्य? बघ बाई तू किती करायचं ते. तुलाही तुझं आयुष्य आहे. कसं गं बाई तुझ्या नशिबाला आलं. काही जण तर सरळ विचारतात देखील. अरे का या पंचायती? मला माझे बाबा हवेत. मला माहीत आहे ते व्हीलन नाहीयेत. मला पण येतोय राग त्यांचा. पण मला त्यांची मानसिक अवस्था कळतेय. पण या लोकांकडे जातेय का मी मदत मागायला? तेवढी जवळीक असेल आमच्यात तर विचारा ना. काहीही चाललेलं असतं. अक्षरश: संताप होतोय माझा. हॉस्पिटल मधे माझ्या बाबांचाच एक लांबचा भाउ आलेला. तिथे मला विचारतोय - बाबांनी विल केलंय का गं? केलं असेल तर बरच आहे. आता तुम्हाला वाटेल माझी काळजी की काय या काकाला. तर तसलं काही नाही. तू सगळं मॅनेज केलं आहेस दादाचं. तर तुझ्या हिश्शातले लाखभर मला देउ शकशील तर बरं होईल असं म्हणाला. आता विल च विचारावं पण जागा आणि वेळ चुकली असं नाही वाटत?????? मुद्दा चूक आहे असं म्हणतच नाहीये मी.
४. अनेक सल्ले. हे कर आणि ते कर. या डॉ.कडे जा आणि ही पॅथी घे - अमका अमका चक्क ३ महिन्यात बरा झाला वगैरे. आता याबाबत मी सरळ सांगतेय की मी डॉ. च्या व्यवस्थित संपर्कात आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मी सगळं करतेय. मग मी आता आगाउ ठरतेय. आवडत नाही लोकांना असं. आता मी एकटीच कुठे कुठे धावू? मुळात आमचे डॉ. चांगले आहेत, अनुभवी आहेत. मी त्यांनाच जाऊन म्हणाले की जी काय स्पष्ट कल्पना द्यायची आहे ती मला द्या. शिवाय मी एकटी आहे. त्यामुळे कुणीही काही सांगावं आणि त्यामागे फ़िरावं यापेक्षा मी नेमकं काय केलं पाहिजे ते तुम्ही मला सांगा, मी ते करेन आणि करते पण आहे. पण नाहीच हे पटत लोकांना. अपमान वाटतो त्यांना.
५. सगळ्यात धम्माल आमचा हीरोच. बाबा. त्यांना मी प्रत्येक आल्यागेल्याची खाण्यापिण्यापासून सरबराई केलीच्च पाहीजे असं वाटतंय आणि हे मला सगळ्यात अवघड जातय. फक्त किचन जॉब. आणि हाईट म्हणजे लोक मला फर्माईश करताहेत की अगं आज इकडे यायचं ना तर ठरवूनच आलो, आज हिच्या हातची मूग भजी खाउ???????? ही अशी मोठी माणसं?? मी खाणावळ उघडल्यासारखी किचन मुक्कामी असते हल्ली. आणि मला ते अजिबात आवडत नाहीये. पार कंबरडं मोडतय माझं. आणि आमचे बाप्पू म्हणतात, माझ्यासाठी येताहेत ते. तुला केलंच पाहीजे. त्यांचा लोकसंग्रह अफ़ाट आहे आणि मी कुणाची मदत घेणार नाही असला खाक्या पहिल्यापासून आहे. सुदैवाने त्यांना कधी तशी ती घ्यावी लागलीही नाही. त्यामुळेच कुणाला नाही सांगायचं. आपण दोघे बघून घेऊ हेच होतं.
६. आता याला कॉन्ट्रॅडिक्शन - जर कुणी म्हणालं की सविता आहे म्हणून किती बरंय तुम्हाला. ती किती व्यवस्थित करतेय सगळं.. तर बाबांचा रिप्लाय - हो. ती सध्या आलीये ना इथे? म्हणून. तिचे सासरे आजारी म्हणून आमचे जावई तिकडे आहेत, मग मी म्हणालो, तू ये तोवर इकडे.तिला हवं तेव्हा ती जाउ शकते सहज. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. आता हे काय नवीन?? यांना चहा पण येत नाही करता. ऑपरेशन झालंय. आजार हा असला. पुढची ट्रीट्मेंट अजून ठरायचीये. मग मुलगी माझ्याकरता आली आहे हे मानसिक दृष्ट्या का नाही स्वीकारत? कोणता कमीपणा आहे यात? मला खरच कळेनासं झालंय.
७ दुसरीकडे मला माझं आणि नवर्याचं काही काम असलं की मुंबई गाठायला लागतेय. मग एक दिवसभर तडतड. तेव्हा माझा काका थांबतो त्यांच्याजवळ. पहाटे ५ वाजता एकटीने रिक्षाने नको जायला म्हणून काकाला जबरदस्तीने माझ्याबरोबर पाठवलं परवा स्टेशनवर. तो पण म्हणाला की मी येतो. दादा काळजी करेल. पण स्टेशनवर आल्यावर मी त्याला म्हणाले नको उगीच प्लॅटफॉर्म तिकिट काढूस. मी जाते. घरी गेल्यावर त्याच्यावर इतकं रेशन घेतलं बाबांनी की कशावरून ती नीट गेली? काका हादरला त्या दिवशी. म्हणाला मी दादाला एवढा निगेटीव्ह कधी पाहिला नाही. आज का असा वागला?
८. त्यांना फक्त घरातलंच अन्न दे, विकतचं आणि प्रोसेस्ड फूड अजिबात नको असं सांगितलंय डॉ. नी. त्यामुळे मी घरीच वेगवेगळं करतेय. तर हे येणारे पाहुणे आपल्या अकला चालवतायत. हे घेतलं तरी चालेल आणि ते घेतलं तरी काही होत नाही. आणि याबाबत मी बोलायचा प्रयत्न जरी करायचा म्हटलं तर माझ्याच बाबांना माझा चक्क राग येतोय. मग मी गप्प. माझ्याकडे असतात एरवी बाबा. त्यामुळे पुण्यातलं घर एरवी बंद असतं. तर जरूरीपुरतं सामान आणलंय मी इथे. आणि लागेल तसं आणतेय. तर हे हॉल मधून फर्माईश करतात, तो अमुक ढमुक आलाय, तर आता सगळ्यांकरताच कर पोहे/उपमा/जे काही असेल ते. त्यांना म्हणाले बाहेरून काय सांगता? कधीकधी यांनी बाहेरून सांगितलं आणि नसलं तर कसं दिसेल ते? पण पटायचं नाव नको.
९. इतका चिकटपणा दाखवून लोक तासंतास बसतात की त्यांना हे पण भान नसतं की आपण एका पेशंट ला पहायला आलोय. फारसा वाईटपणा न घेता सांगू तरी कसं ? इथे फक्त नातेवाईक च नाहीत तर सोसयटीतले कुणीही आहेत. बरं माझ्यापेक्षा सगळेच मोठे आणि सगळ्यातलं सगळं कळणारे. कहर वागताहेत. परवा आमच्या सोसायटीतलंच एक कपल आलं बाबांना भेटायला. गप्पाटप्पा झाल्यावर त्या दोघांनी बाबांना अगदी खाली वाकून नमस्कार केला. मला जरा विचित्र वाटलं. तर त्या काकू आत येउन मला म्हणाल्या, काये ना सविता , तू करतेच आहेस सगळं. होतीलही ते बरे. पण नाही झाले तर? म्हणून आधीच नमस्कार केला. हे असलं वागू शकतात लोक? माझी जाम रडारड होतेय मग. पण बाबांसमोर नाही. नाहीच. अंथरुणात घुसून. असल्या लोकांना हाकलून पण देता येत नाहीये मला.
आता तुमच्यापैकी कुणी या किंवा अशा प्रसंगांना जर तोंड दिलं असेल तर कसे गेलात सामोरे सांगाल का? की जेणेकरून माझे अतिप्रेमळ बाबा परत तसे होतील/ व्हायला मदत होईल आणि मला थोडतरी पॉझिटिव्ह रहाता येइल?
कष्ट करायला काहीच हरकत नाही. पण सतत कारण नसतानाचे टोमणे, नकारात्मक भावना सहन होत नाहीये मला. मी न जाणो काही बोलून गेले आणि ते दुखावले तर? या भावनेने गप्प रहातेय खूप. पण आता मीच फुटेन की काय असं वाटतंय.
मला सतत अस वाटतं की माझ्या बाबांसाठी मी सदासर्वकाळ असलंच पाहिजे आणि तशी मी आहेपण. पण इतर लल्लू पंजू लोकांसाठी का?
मला यातून जे म्हणायचं ते फक्त इतकंच आहे की रुग्णाला त्याचा आजार असतो. त्रास असतो. त्याचा त्या माणसाला ताण येणारच आहे.
पण त्याच्याबरोबर जो माणूस त्याची काळजी घ्यायला असतो तो तर त्यापेक्षाही जास्त होरपळतो. मला माहीत नाही इथे किती जणांना हे म्हणणं पटेल. पण मला खरच असं वाट्तं. फक्त या काळजीवाहू माणसालाही जरा विश्रांतीची गरज असू शकते, त्याच्यापाशी आपल्याला पॉझिटिव्ह काही बोलता येणार नसेल तर निदान नकारार्थी तरी बोलू नये इतकंपण या माणसांना का कळत नाही?
सगळ्यात महत्त्वाचं हे की असा काही सुतकी चेहरा करून येतात ना भेटायला की मला खरच भीती वाटते. कितीतरी माणसं ७० व्या वयात घरात पडतात. पार बेड रिडन होतात. तेव्हा आपण असे चेहरे करतो का त्यांना भेटताना? मग हा आजार ऐकल्यावर असे का येतात हे? आणि मी हे टाळू कसं? डोक्यात जाणारी बाब म्हणजे आता संपलं बहुतेक सगळं असे मला मिळणारे लुक्स. आय हेट धिस!
बाबा तर माझे मलाच ओळखू येत नाहीयेत. इतका स्ट्राँग, पहाडासारखा माणूस एका महिन्यात पार अंतर्बाह्य बदलूनच गेलाय. मी समजू शकतेय पण समजावता येत नाहीये त्यांना. कारण त्यांनीच स्वतःला पार बंद केलंय एका कोषात. कधी उगीच आरडाओरड न करणारे माझे बाबा सध्या फक्त आणि फक्त तेच करताहेत.आणि मी दर दिवशी वेगळ्या अर्थाने कोसळतेय.
होरपळ असेल तर ती माझी पण आहे. शारिरिक पण आणि मानसिक पण.अगदी माझ्या बाबांएवढीच.
मी काय करू किंवा माझं काही चुकतंय का हे सगळंच सांगा. सगळे प्रयत्न नक्की करेन.
यात माझं कौतुक नकोय मला. मी जे करतेय त्यात माझाच स्वार्थ आहे. माझेच बाबा मला हवेत. पण त्यांनी कदाचित मनातून हा आजार स्वीकारला नसावा असं लक्षात घेउनही जड जातय मला. हेल्प मी आउट प्लीज.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
समदु:खी
ताई , तुमच्यापेक्षा, मी अनुभवाने आणि ज्ञानाने लहान आहे....
मुवि
ताई....
नकोशी माणसं घरी येणं बंद करा
सविता - तुला खरड पाठवली आहे,
मी स्वतः
वा! वा! वा!!
ताई....
सविता तिच्या बाबांची तिच्या
शांत, गदाधारी भीम शांत!
हे असेच जवळ-जवळ आमच्या सासूबाईंनी पण सहन केले.
@स्पदंना ताई,
मुवि? आपल्यात सॉरी कधीपासून
ना ते वाईकांव
र आहे.तू आणि बाबा असे दोघेही
सगळ्यात आधी patient ची
माझेच बाबा मला हवेत.
सविता ताई
एकदम चपखल प्रतिसाद....
प्रतिसाद खूप सकारात्मक.
डॉक्टर साहेब
सवि , मला मेडिकली काही कळत
हा पण प्रतिसाद मस्त....
+१
स्रुजा यांचा प्रतिसाद पटला.
भेटीस येणार्यांच्यात तारतम्याचा अभाव...
धीर सोडू नका
मनापासून शुभेच्छा!
तुमची व्यथा समजू शकते … यावर उपाय एक च
तुमच्या बाबांच्या प्रक्रुतीला
सविता ताई
सुंदर प्रतिसाद.
समर्पक.
आमच्या शेजारच्या सोसायटितील
जाणकार, अनुभवी मिपाकरांनी
आत्ताच्या परिस्थितीमध्ये घरात
सविता,या सगळ्यात तू
नमस्कार
खूप खूप आभार
थोडेसे धिराने घ्या सगळे ठीक होईल...
अवघड प्रसंगी नातेवाइकांना पण
कंफ्युज्ड अकौंटंट
अशा वेळी रुग्ण बरोबरच त्याच्या जवळच्यांची कसोटी असते.
दत्ता जोशी
वा..
+१
+१
आमच्याकडचे straight forward व्यवस्थापन
हे छान आहे.
सविता,तुही खूप धीराने घेतलंस