बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु वारंवार टीका झाल्याने प्रत्येक मुस्लिम नागरिकाला कमीपणा वाटू लागला. त्यातून आम्हालाच लक्ष्य केले जातेय, अशी त्यांची मानसिकता बनून गेली. याचा नेमका फायदा या धर्मातील मूलतत्त्ववाद्यांनी घेतला आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे प्रचंड वेगात बदलणाऱ्या परिस्थितीत चांगले काय, वाईट काय याचा विचारही करू न शकणाऱ्या कोवळ्या तरुणांच्या मनात विद्वेषाची ठिणगी टाकण्याचे काम हे मूलतत्त्ववादी करीत आहेत. मुस्लिमांवर होणाऱ्या (?) अत्याचाराच्या चित्रफिती त्यांना दाखविल्या जातात. जिहादचा "बारूद' त्यांच्या मनात ठासून भरला जातो. त्यांच्यातील विवेक मारून टाकला जातो आणि त्यातूनच सुशिक्षित म्हणा किंवा "हायटेक' दहशतवादी जन्माला घातला जातो. गेल्या काही महिन्यांतील बॉंबस्फोट पाहिले, तर वस्तुस्थिती लगेच लक्षात येईल की अनेक बॉंबस्फोटांचे मास्टरमाइंड हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय त्यांचे वार्षिक उत्पन्नही लाखो रुपये आहे. नोकरी आहे, पैसा आहे आणि ज्ञानही आहे. मग देशविघातक कारवाया करण्याची दुर्बुद्धी त्यांना का सुचते, असा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला असेल.
मीदेखील त्याच प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. ते शोधता शोधता मी बाबरी मशिदीपर्यंत येऊन पोचलो आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे "असं घडलं' नावाचे पुस्तक फार पूर्वी वाचले होते. त्यातील एका लेखात एका मुस्लिम गाइडची भावना त्यांनी उद्धृत केली होती. सय्यद नक्वी असे त्या गाईडचे नाव होते. ते म्हणाले होते की वादग्रस्त वास्तूमध्ये मुस्लिम लोक नमाज पढत नाहीत. या वास्तूवर हिंदूंनी दावा केला आहे, याला बहुसंख्य मुस्लिमांचा आक्षेप नाही. भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते.
मला वाटते प्रत्येक मुस्लिम नागरिकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असावी. असे असतानाही बाबरी पाडण्याचा अट्टहास का करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर झाले नाही, तर चालणार नाही का? बरं बांधायचेच होते, तर आतापर्यंत का बांधले गेले नाही. केवळ मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले? मंदिर तर झालेच नाही; पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
वाचने
18453
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख फार आवडला
सुंदर लेख
In reply to लेख फार आवडला by कोलबेर
याचाही विचार करा
In reply to लेख फार आवडला by कोलबेर
अब ये गलती नही करेंगे.
सुंदर लेख
सर्वच मुदे पटले.
का आणि कसे
एकल्व्यजी
In reply to का आणि कसे by एकलव्य
होय..
In reply to एकल्व्यजी by कोलबेर
रॅबल राउजिंग
In reply to होय.. by llपुण्याचे पेशवेll
फालतू आणि दिशाभूल करणारा लेख
अगदी हेच
In reply to फालतू आणि दिशाभूल करणारा लेख by विकास
फालतू दिशाभूल करणारा प्रतिसाद
In reply to फालतू आणि दिशाभूल करणारा लेख by विकास
फालतूच
In reply to फालतू दिशाभूल करणारा प्रतिसाद by कोलबेर
बाबरी मशीद
In reply to फालतूच by विकास
अस म्हणण बरोबर नाही
In reply to फालतू दिशाभूल करणारा प्रतिसाद by कोलबेर
जबाबदार
In reply to अस म्हणण बरोबर नाही by विकि
विकास साहेब
In reply to जबाबदार by विकास
मी तुमच्याबद्दल विचारत आहे...
In reply to विकास साहेब by विकि
>>>ह्याहुन
In reply to फालतू दिशाभूल करणारा प्रतिसाद by कोलबेर
लेख आवडला
In reply to फालतू आणि दिशाभूल करणारा लेख by विकास
बौद्धिक रॅबल राउजिंग
In reply to फालतू आणि दिशाभूल करणारा लेख by विकास
बाबररि मशिद आत्ता कुथे आलि ???
गोरख साहेब
In reply to बाबररि मशिद आत्ता कुथे आलि ??? by गोरख
हो का? बर बर..
In reply to गोरख साहेब by विकि
सध्याच्या
स्युडो सेक्युलर
In reply to सध्याच्या by अभिजीत
थेट संबंध
In reply to स्युडो सेक्युलर by ऋषिकेश
अवांतर
In reply to स्युडो सेक्युलर by ऋषिकेश
Survival Of The Fittest !!
निषेध
>>
In reply to निषेध by एकलव्य
एकांगी
आणखी एक विनोद
In reply to एकांगी by मुक्तसुनीत
अगदी योग्य
In reply to आणखी एक विनोद by भास्कर केन्डे
गंमत
In reply to अगदी योग्य by खरा डॉन
डॉनबा
In reply to अगदी योग्य by खरा डॉन
कीव करत राहा
In reply to डॉनबा by भास्कर केन्डे
खरच की
In reply to कीव करत राहा by धम्मकलाडू
पाञ्चजन्य सोडून इतर साहित्यही वाचत जा ;):)
In reply to खरच की by भास्कर केन्डे
काही विचार
In reply to कीव करत राहा by धम्मकलाडू
झाली सुरुवात
अन्वयार्थ
हिच शांतता जर
++अबु आजमी
माझे मत
मी एक
In reply to माझे मत by विनायक पाचलग
हे सांगायला कुणी 'महाराव' नको
इस्लाम संपवू आतंकवाद आपोआप संपेल
एक गोष्ट....
अप्रकाशीत
In reply to "कडवे हिंदू" म्हणणे शुध्द नालायकपणा by हर्षद आनंदी
अजून एक
In reply to "कडवे हिंदू" म्हणणे शुध्द नालायकपणा by हर्षद आनंदी
अजून एक
In reply to अजून एक by विकास
खरं तर चर्चेत धर्म येऊ नये
In reply to अप्रकाशीत by विकास
सदरील प्रतिसाद आम्ही संपादित न करता थेट उडवलेच असते.
In reply to खरं तर चर्चेत धर्म येऊ नये by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विरोधाभास
धन्यवाद!
चिरायु होवो होय?
In reply to धन्यवाद! by अन्वय
..
शब्द सांभाळून वापरावेत.
In reply to .. by अन्वय
मी
In reply to .. by अन्वय
संघाबद्दल
अनुभव?
In reply to संघाबद्दल by अन्वय
अन्वय तरुणा
भारताबाहेर
इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे.
आपले इतिहासाचे ज्ञान कच्चे
In reply to इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे. by केदार
Remember we all love INDIA
Hello!
In reply to Remember we all love INDIA by LALIT JAGTAP
हिन्दुनी