नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
लेखनप्रकार
नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
प्रा अद्वयानंद गळतगे
अशा रितीने ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत नसेल तर नाडी ग्रंथात त्यांची शांती-पुजा करण्यास का सांगितले जाते? (वरील प्रश्नातील दुसरा मुद्दा ) त्या पूजेचा काय उपयोग? ( तिसरा मुद्दा) असे साहजिकच प्रश्न निर्माण होतात. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते. त्या शांती-पुजेचा त्या व्यक्तीला आपले कर्म सुसह्य करण्यासाठीच उपयोग होतो. कर्म तीव्र वा बलवत्तर असेल तर ते त्याच्या शांती-पुजेमुळे सुसह्य होते;आणि सौम्य असेल तर शांती-पुजेच्या रूपाने ( नाडीग्रंथात सांगितलेला खर्च करून) भोगले जाते. पण कर्म भोग भोगलाच पाहिजे, त्या पासून सुटका नाही. आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे. ही गोष्ट एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल. समजा आपल्याला विद्या प्राप्त व्हावी म्हणून आपण विद्या देवतेच्या किंवा गुरूच्या प्रतिमेची पूजा केली, तर त्या पुजेमुळे आपल्याला विद्या मिळेल काय? पण एकलव्याला द्रोणाचार्य या गुरूच्या प्रतिमेची पुजा केल्यामुळे धनुर्विद्या प्राप्त झाल्याची महाभारतात कथा आहे. पण प्रत्यक्षात एकलव्याला केवळ द्रोणाचार्यांच्या प्रतिमेच्या पुजेमुळे ती विद्या प्राप्त झालेली नसून स्वत:च्या धनुर्विद्येच्या अभ्यासामुळे - म्हणजे स्वत :च्या कर्मामुळे - ती त्याला प्राप्त झाली, ही वस्तुस्थिती आहे. द्रोणाचार्यांची प्रतिमा हे एक निमित्त आहे. धनुर्विद्येचे ते एक प्रतीक आहे. एकलव्याचे कर्म - धनुर्विद्येचा अभ्यास- हेच त्याला ती विद्या प्राप्त होण्यासाठी प्रत्यक्षात कारणीभूत ठरले. एकलव्याला याच जन्मातील कर्मामुळे फळ मिळाले, नाडी भविष्य पाहणाऱ्या व्यक्तीला पुर्व जन्मातील कर्मामुळे शांती-पुजेचे फळ मिळत असते, हा कर्म सिद्धांत शांती पूजेच्या रुपाने सांगितला आहे. किंबहुना नाडीग्रंथ लिहिण्याचा मह्रषिंचा उद्देशच कर्म सिद्धांत सांगणे हा आहे. अंतिम भाग 3 मधे वाचा .... गॉकलाँ कोण? जन्मकुंडल्या – संख्याशास्त्रीय प्रयोग - सिझेरियन
वाचने
10626
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
ओह अच्च जाल्ल्ल तल
वाह काय लिहीलंय!! पण काय
नवग्रह शांती...जर केली आणि
In reply to नवग्रह शांती...जर केली आणि by खटपट्या
फार खटपट्या स्वभाव बाॅ तुमचा
In reply to फार खटपट्या स्वभाव बाॅ तुमचा by स्पा
मी तर म्हणेन सर्व कर्मकांडे
In reply to मी तर म्हणेन सर्व कर्मकांडे by खटपट्या
भारी ऐड्या!
In reply to मी तर म्हणेन सर्व कर्मकांडे by खटपट्या
जर अशा पुजेची रितसर पावती
In reply to जर अशा पुजेची रितसर पावती by द-बाहुबली
त्या पावतीत बाsssरीक अक्षरात
In reply to जर अशा पुजेची रितसर पावती by द-बाहुबली
सर्व्हिस टॅक्सही लावता येईल.
सगळ्या पूजा ग्रहशांती निव्वळ
In reply to सगळ्या पूजा ग्रहशांती निव्वळ by संदीप डांगे
अधिक माहितीकरता व्यनि करा.
In reply to सगळ्या पूजा ग्रहशांती निव्वळ by संदीप डांगे
याबाबतीत अत्रुप्त यांचे मत
In reply to याबाबतीत अत्रुप्त यांचे मत by खटपट्या
(No subject)
In reply to (No subject) by सतिश गावडे
किती हसताय =))=))
In reply to किती हसताय =))=)) by अजया
आपल्याला हसून हसून पोटात
In reply to आपल्याला हसून हसून पोटात by अत्रुप्त आत्मा
तसं नाही हो.
In reply to तसं नाही हो. by सतिश गावडे
तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख,
In reply to तसं नाही हो. by सतिश गावडे
@तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख
In reply to @तुम्हाला व्यक्तीची जन्मतारीख by अत्रुप्त आत्मा
"आपणास मुद्दा कळलेला नाही" =)
In reply to "आपणास मुद्दा कळलेला नाही" =) by सूड
होय. त्यांना मुद्दा कळलेलाच
In reply to होय. त्यांना मुद्दा कळलेलाच by सतिश गावडे
सहमत...
In reply to होय. त्यांना मुद्दा कळलेलाच by सतिश गावडे
@ मुद्दा कळलेलाच नाही. =))>>
In reply to @ मुद्दा कळलेलाच नाही. =))>> by अत्रुप्त आत्मा
हे स्वमतांध दांभिकतेचे
In reply to हे स्वमतांध दांभिकतेचे by सूड
व्हेरी गुड! चालु द्या....
In reply to व्हेरी गुड! चालु द्या.... by अत्रुप्त आत्मा
आमचे येथे चालू वैगरे काही
In reply to आमचे येथे चालू वैगरे काही by सूड
:)
In reply to याबाबतीत अत्रुप्त यांचे मत by खटपट्या
@ अत्रुप्त यांचे मत जाणून
In reply to @ अत्रुप्त यांचे मत जाणून by अत्रुप्त आत्मा
आता धर्मा शिवाय असलेली
In reply to आता धर्मा शिवाय असलेली by अत्रुप्त आत्मा
तुमच्या स्पष्टीकरणाने माझे
In reply to आता धर्मा शिवाय असलेली by अत्रुप्त आत्मा
देवलसीकर्मकांडिपणा
In reply to देवलसीकर्मकांडिपणा by संदीप डांगे
ती मी जाणिवपूर्वक निर्माण
In reply to आता धर्मा शिवाय असलेली by अत्रुप्त आत्मा
_/\_बुवा.
In reply to आता धर्मा शिवाय असलेली by अत्रुप्त आत्मा
,जो ह्यातलं आणि त्यातलं काहीच
In reply to ,जो ह्यातलं आणि त्यातलं काहीच by प्रसाद गोडबोले
स्वसंपादन
“नाडी/ अध्यात्म/पौरोहित्य तज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
=))In reply to @ अत्रुप्त यांचे मत जाणून by अत्रुप्त आत्मा
देव ... ही माणसाच्या
देव ... ही माणसाच्या अंतर्मनात "तयार होणारी" मूलभूत श्रद्धा सोडली, तर बाकीचे सारे कर्मकांड थोतांड आहे.हे एक नंबर ! लोकांचे माना पिळून मग पूजा घालून अथवा देवळांच्या देणगीपेटीत रग्गड रक्कम टाकून पापमुक्तीचे समाधान करून घ्यायचे आणि त्यानंतर परत मोठ्या हुरुपाने नविन माना पिरगळायला तयार ! याला श्रद्धा तरी कसे म्हणायचे ???... याला फरफार तर भ्रामक व्यक्तीगत मनोचिकित्सा (डिल्युजनल सेल्फ-सायकोथेरपी) किंवा स्वतःची हेतुपुर्रसर केलेली दिशाभूल असे म्हणू शकू.In reply to सगळ्या पूजा ग्रहशांती निव्वळ by संदीप डांगे
कारण कर्माचे भोग कुणालाच चुकत
In reply to कारण कर्माचे भोग कुणालाच चुकत by द-बाहुबली
हरी भजणे मोक्षाकडे जाणार्या
कारण कर्माचे भोग कुणालाच चुकत नाहीत. तुम्ही काहीही करा.
योगविवेकभौ, तुम्ही नाडी
नाडी शास्त्र
योग्य मार्गदर्शन