Skip to main content

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी गुरुवार, 04/06/2015 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

वाचने 58128
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

ज्यांना विवाह विषयात अधिक "मेंदू" खर्च करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खाली खुराक देउन ठेवतो:- मनुस्मॄति :- अध्यात तिसरा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

अशा चर्चा फक्त मराठी लोकांतच होऊ शकतात. तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू.

In reply to by तिमा

तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू. Haryana’s crisis: Bridegrooms all decked up, but no one to marry

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे ! १. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!! २. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!! ३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच. भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच. ====== हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्‍या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली. नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अ‍ॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्‍यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्‍यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अ‍ॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अ‍ॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे. (अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्‍या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना आणि (आ) एक मानववंश दुसर्‍या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही; गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे. ====== जनुकशास्त्रिय सत्ये... १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. २. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो. ३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो. ====== "लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये... १. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत ! २. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्‍या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ? ३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्‍यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्‍यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते. समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्रे देवा म्हणजे इतकावेळ चाललेली चर्चा फुकाचीच म्हणायची का? आम्ही निघालो होतो एका नविन जनुकीय संरचनेच्या निर्मितीत आणि हा खोडा आला. आता कशी काय सुदृढ जनुके तयार होणार? आंतर्जालीय, आंतर्धर्मीय, आंतरदेशीय, आंतरबीस्टीय वगैर वगैरे विवाहांना चालना देउन काहीच का उपयोग नाही म्हणजे? महत्तम कार्यात नसते खोडे घालणार्‍या तुमच्यासारख्या लोकांमुळेच पृथ्वी रसातळाला चालली आहे असे नमूद करु इच्छितो.

In reply to by मृत्युन्जय

१. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. अर्र..... ते ५ आणि ७ पण चुकलं का काय? त्यानन्तर ०*०, ०/०, undefined, अनंत अशी बरीच मोठी आकडेमोड झाली ना भौ. ती पण चुकलीच बहुतेक :) ५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे आता ते "बलिदान" पण चुकलं का काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेब तुम्ही तर लोकांच्या चड्डीलाच हात घालता एकदम !!! हे म्हणजे ग्रेट थिंकर सिक्सर मारायला गेले आणी तुम्ही मागून त्यांना यष्टीचीत( STUMPED OUT) केलेत कि हो

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्कासाहेबांना दंडवत, यापेक्षा अचूक काहीच असू शकत नाही. लेख प्रचंड गंडलेला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. (आणि हो, आम्ही लेख कुणी लिहिला यापेक्षा काय लिहिलंय यालाच महत्त्व देतो बरंका..)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शास्त्रोक्त प्रतिसाद एक्का काका ! विषयच संपला असे म्हणायचे.. लेखक महाशय पुढचे काहीदिवस तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या लिंका शोधतील हे निश्चित

In reply to by ग्रेटथिंकर

लेखातला पहिला संदर्भ टिव्ही न्युज आयटेमवर आहे आणि दुसरा National Gardening Association चा आहे (म्हणजे झाड्यापाल्यावरचे अनुभव तुम्ही माणसांच्या "सर्वांगिण विकासात" एक्स्ट्रॉपोलेट करू पाहता आहात) ! जर हा विषय मानववंशशास्त्रात इतका महत्वाचा नसता तर कोणताही हे दोन संदर्भ सबळ जनुकशास्त्रिय पुरावे आहेत हे मत मी विनोदी म्हणुन सोडून दिले असते ! :) १. टिव्ही न्युज आयटेमच्या धाग्यातले हे वाक्य परत वाचा... Dr Prasad travels to Brazil, a country where mixed-raced children have been born since the colonization of the country around 500 years ago and account for 86 per cent of the population. हे उदाहरण, संकराने किती विकास होऊ शकतो, याचा विचार केला की नेहमीच पुढे येते. तथाकथित उत्तम कॉकेशियन जनुके आणि तथाकथित कमी प्रतिची अमेरिकन मूलवासी इंडियन जनुके यांचा गेली ५०० वर्षे सतत संकर चालू आहे. तुमचे म्हणणे खरे धरले तर आज ब्राझील हा देश जगातल्या सर्वोत्तम विकसित जमातीचे वस्तिस्थान असायला हवा होता !!! २. दुसर्‍या जेनतेम पानभर लांबीच्या "त्रोटक" धाग्यावरून डायव्हर्सिटी/युनिफॉर्मिटीची पूर्ण संकल्पना आणि त्यावरून गंभीर मानववंशशास्त्रीय विधाने करणे म्हणजे दुसरीचे गणिताचे पाठ्यपुस्तक वाचून मंगळावर पाठवायच्या रॉकेटची गणिते मांडल्यासारखे होईल !!! महत्वाचे... कोणत्याही महत्वाच्या शास्त्रिय दाव्यासाठी पियर रिव्ह्युव्हड जर्नल्समधले अनेक कोरॉबोरोटिव्ह पुरावे असले तरच तो दावा त्याविरुद्ध शास्त्रिय पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत आणि तोपर्यंतच विश्वासू समजावा असा दंडक आहे. वरच्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर तुमचे संदर्भदुवे आणि तुमचा लेख परत वाचल्यास बर्‍याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात, तुम्ही ते सगळे दुवे वाचलेत. तुमच्या सहनशीलतेला सलाम करावा की त्या दुव्यांमधून खरोखरच काही निघेल या आशावादाला याचा विचार करतोय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस पॉप्युलेशन जेनेटीकली जास्त फीट आहे, असेही लिहले आहे ,ते वाचलेले दिसत नाही. सध्याच्या काळात अमेरिका हा देश mixed population असलेला प्रगत देश आहे.स्पॅनीश ईटालियन फ्रेंच अँग्लोसॅक्सन यांचा एक मिक्सड रेस अमेरिकेत तयार झाला आहे व तो देश जगातला सर्वात प्रगत देश आहे.

In reply to by टवाळ कार्टा

परवाच कट्ट्यावर या विषयावर चर्चा झाली,भारत आणि इटलीच्या संकरातून निर्माण झालेल्या एका अद्वितीय बुद्धीमत्ता,अतुलनीय कर्तुत्व असलेल्या मुलाविषयी.. मी ,ब्याट्या न धन्या खो खो हसलो हो..

In reply to by ग्रेटथिंकर

भारताबद्दल आपले काय मत आहे? कारण आंतरजातीय/धर्मीय विवाह होण्यास भारतात खूप म्हणजे खूपच विरोध आहे हो. भारतात वंश-मिश्रण झालेले नाही असे आपले मत आहे का?

In reply to by ग्रेटथिंकर

भारतामध्ये वांशिक मिश्रण झालेले नाही. वाचन वाढवा ! थिंकिंग ग्रेट करा !! अनेकानेक शुभेच्छांचा स्विकार करा !!!

In reply to by ग्रेटथिंकर

त्या दुव्याच्या (नसलेल्या) एकंदर शस्त्रिय पात्रतेबद्दल वर लिहीलेले वाचायला विसरलेले दिसताय ! अमेरिका हा देश प्रगत आहे, पण त्याचे कारण तो "लॅड ऑफ ऑपॉर्चुनिटीज" आहे हे आहे... अमेरिकेत लोक संधीच्या मागे जातात... संकरासाठी नाही... असे अमेरिका धरून सगळ्या जगाचे मत आहे. तुम्हाला काही नविन शोध लागले असल्यास जरूर एखाद्या मान्यवर शास्त्रिय जर्नलमध्ये पाठवा, छापून आल्यास तेवढे एकच कारण तुम्ही ग्रेट थिंकर आहात हे सिद्ध करून जाईल. माहीत नसल्यास अजून एक सत्य समजाऊन घ्या : जालावरची सर्व माहिती सत्य / विश्वासू नसते. त्या लेखांची शास्त्रिय पात्रता ठरवायला सारासार विवेक आणि काही अधिक सबळ शास्त्रिय पुरावे (कोणते तेही वर लिहीले आहेच) लागतात. तसेही, ग्रेट कल्पनाविलासालाही आमचा विरोध नाही. फक्त अश्या गोष्टी विनोद (कधी कधी काळा विनोद उर्फ ब्लॅक कॉमेडी) म्हणून ठीक आहेत, शास्त्रिय दावा म्हणून खपवू नका, इतकेच माझे म्हणणे आहे. बाकी आमच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ग्रेट थिंकर साहेब केविलवाणे समर्थन मग आपल्या तर्क शास्त्राप्रमाणे चीन किंवा जपान किंवा जर्मनी पूर्णपणे मागासलेले असायला पाहिजेत. चीन मध्ये ९६ % लोक एकाच वंशाचे आहेत तशीच परिस्थिती जर्मनी किंवा जपान मध्ये आहे. पण मग तिथे तसे का होत नाही. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावणे सोडून द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेब आम्ही लष्करी माणसे आम्हाला ग्रेट तर सोडाच थिंकिंग सुद्धा करता येत नाही. पण विरोधाभास मात्र जाणवतो.

In reply to by सुबोध खरे

अगदी अगदी. ग्रेट साहेबांचे थिंकींग नसलेले प्रतिसाद अधिकाधिक विनोदी होत चालले आहेत. समस्या अशी आहे की त्यावर हसावे की रडावे याबद्दल आमची जनुकं जरा संभ्रमात आहेत.

In reply to by सुबोध खरे

चीन जपान जर्मनीमध्ये जातीपाती नाहीत, त्यामुळे त्यांचा जीन पूल आपल्यापेक्षा डायवर्स आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

ग्रेटथिंकर, तुम्ही आधी एक नक्की करा. जातींमुळे जीनपूल मर्यादीत होतो याला काय आधार आहे ते पुरावा, उदाहरणासकट मांडा. मग काय पुढे बोलता येईल. खरं तर बोलतीच बंद होईल.

In reply to by ग्रेटथिंकर

मांडलेले नीटच वाचले. जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात कुठे आहे हे संशोधन? आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. कुठे आहे पुरावा? जनुके जातीनुसार विभागली जातात याला आधारच काय? फारतर भौगोलिक किंवा वांशिक रित्या जनुकं विभागली जातात पण जाती/धर्म? जरा जास्त नाही होत आहे हे? ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत. असं तुम्हाला कशावरून वाटलं? जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर कुठल्या जाती-धर्मात अशी जनुकीय दुर्बलता आली आहे? की तुम्ही म्हटलं म्हणून इतरांनी मान डोलावून हो म्हणायचं? इतकी बौद्धीक दुर्बलता अजून आमच्या जनुकांत आलेली नाही. 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. तो अलरेडी आहेच. दादा, समस्या सामाजिक आहे. तुम्ही त्यावर नैसर्गिक उपाय करू पाहताय. म्हणजे स्वतः शाकाहारी आहेत म्हणून घरच्या पाळलेल्या कुत्र्या-मा़ंजरींना दूध-भातच खाऊ घालणार्‍या अमानुष लोकांसारखे आहे ते. अजून काही नीट वाचायचे राहीले असेल तर सांगा.

In reply to by ग्रेटथिंकर

जर्मनी जपान चीनमध्ये जातीव्यवस्थानाहीच.तसे मी मुळीच म्हणालेलो नाही. उलट चीन मध्ये ९६ % एकाच वंशाचे आहेत.जपान मध्ये तर ९८.५% लोक एकाच वंशाचे आहेत. (जर्मनीत ८० टक्क्याच्या आसपास आहेत) म्हणूनच तेथील जीन पूल आपल्यापेक्षा डायव्हर्स नाही. तेंव्हा आपलेच म्हणणे खरे ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न सोडून द्या आणि अशा बौद्धिक कोलांट्या मारणे सोडून द्या.

वरील लेख व प्रतिसाद वाचून आईनस्टाईन व एक सुंदर असलेली पण साधारण बुद्धिमत्ता असलेली अभिनेत्री यांच्याविषयी प्रचलित असलेली एक दंतकथा आठवली.

लग्नाच्या धाग्यावर यमगर्निकरांचा प्रतिसाद फाउल नाही का हो?;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचे लग्न झाले म्हणून तुम्ही रस्त्यावरुन जाताना समोरुन येनार्‍या स्त्रीकडे बघनार हि नाहि का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणे लक्श्मण सीतेला ओळखत असे, असे म्हणतात. त्यावरील प्रतीक्रिया : "काय पोहोचलेल असेल ना?" ह.घ्या.हे.वे.सां.न.

इथे हल्ली जातीतल्या जातीत पोरे लग्न करायला नक्को म्हणतात, आणि यांना आन्तर्जातीय लग्नसोहाळे सुचतायत! ही अशी लग्न कुठल्या पद्धतीनी करायचे हे ठरवता ठरवताच ९९% लग्न मोडतील, असे भाकित करून ठेवते. ;-)

जनुकीय गरज जर असेलच तर भारतातल्या भारतात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करून काहीही साधणार नाही!!! त्यासाठी आंतर वंशीय विवाह केले पाहिजेत! म्हणजे दक्षिण आशियायी (भारतीय +पाकिस्तानी+ बांगलादेशी + श्रीलंकन) व्हर्सेस कॉकेशियन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, चायनिज (मंगोलियन) वगैरे......

In reply to by ग्रेटथिंकर

कसा काय? भारतात हजारो जाती आहेत. पण राजस्थानी, गुजराती. सौथ इंडीयन, पंजाबी, पूर्वोत्तर अशी माणसांची वर्गवारी केल्या जाऊ शकते. म्हणजे चेहर्‍यावरून माणसाची जात ओळखू शकत नाही पण प्रांताचा अंदाज लावू शकतो. मग जीनपूल जातींमुळे मर्यादित होतो याला काय आधार? का जीनपूलच्या नावाखाली काही वेगळे मांडायचे आहे?

In reply to by संदीप डांगे

आमच्याच जातीत (कुठली ती सांगणार नाहीच) पार घारे डोळे पिवळ्या त्वचा वाल्यांपासून काळी कभिन्न बुटकी माणसेही आहेत. एकाच घराण्यातल्या तिसर्‍या पिढीतल्या तीन चुलतभावांची मुले पार वेगवेगळी दिसतात. एकाच फॅमिली फोटोमध्ये जगातले सगळे जीन्स आपआपल्या गुणवैशिष्ट्यांसह अवतरलेले दिसतात. कुठे मर्यादित होतोय जीनपूल? मला जरा विदा द्याल का?

In reply to by संदीप डांगे

जातींमुळे जीन पूल मर्यादित होईल का हा अभ्यासाचा मुद्दा असू शकतो. अगदीच टुकार मुद्दा नाही मांडलेला त्यांनी! मेंडेलच्या थेअरी नुसार एक उदाहरण देतो, (चुका असतील तर जाणकारांनी कृपया सांगाव्यात) आता पहा एखाद्या बेटावर एक प्रजाती राहाते असे मानूया. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे ब्रीडिंगसुद्धा त्याच लोकांपुरते मर्यादित राहणार. आता उदाहरणासाठी असा विचार केला कि तिथल्या सर्वांचे केस काळे आहेत तर सोनेरी केस असलेले अपत्य होण्याची शक्यता किती? काळ्या केसांसाठी B जीन पकडू (जी डोमीनंट आहे) सोनेरी केसांसाठी b (जी रीसेसिव आहे) आता पुरुष आणि स्त्री दोघेही हेटरोझाय्गस असतील तर, पुरुष - Bb आणि स्त्री- Bb यांची पुढील combination होतील - Bb /bB /BB /bb म्हणजे ३:१ शक्यता सोनेरी केस असण्याची, त्यातूनही पालकांपैकी कोणी होमोझाय्गस (BB) असेल तर पुढची पिढी हि फक्त काळे केस असलेलीच होणार. पण जर पालकांपैकी कोणी एक व्यक्ती सोनेरी केस असणारी असेल तर हि अपत्याला सोनेरी केस असण्याची शक्यता ५०% होईल. म्हणजेच बेटा बाहेरील कोणाबरोबर जर ब्रीडिंग झाला तर नवी लक्षणे दिसण्याची (चांगली/वाईट ) शक्यता वाढू शकेल. जनुके फक्त दिसणेच नियंत्रित करत नाहीत. वरच्या उदाहरणात केसांऐवजी एखादा जनुकीय आजारसुद्धा असू शकतो. आपल्या इथे जातीसुद्धा बेटा प्रमाणेच आहेत, आपल्या जातीबाहेर लग्न लावली जात नाहीत(हल्लीचे अपवाद वगळता) त्यामुळे जीनपूल मर्यादित राहण्याची शक्यता असूही शकते आणि या गोष्टीचा अभ्यास होऊ शकतो. आता हे चांगले कि वाईट हा पुढचा मुद्दा होईल.

In reply to by शब्दबम्बाळ

आपल्या इथे जातीसुद्धा बेटा प्रमाणेच आहेत, आपल्या जातीबाहेर लग्न लावली जात नाहीत.
त्या उदाहरणातल्या बेटांचा आणि प्रत्यक्ष समाजजीवनातल्या जातींचा तसा काही संबंध लावता येणार नाही. कारण लग्नाशिवाय झालेला/होणारा वर्णसंकर इथे लक्षात घेतलेला नाही. खरंच जाती बेटांप्रमाणे असत्या तर एकाच जातीत विविध शारिरिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्ये सापडली नसती. यात अपवाद नाहीत. सर्व जातींत हे वर्णसंकर झाले आहेत. लेखात म्हटलेले जर तार्किक म्हणायचे असेल तर आधी वर्णसंकर अजिबात झालेला नाही आणि प्रत्येक जातीने 'आपले रक्त शुद्ध ठेवले आहे' हे सिद्ध करायला लागेल. (उदा.: पाटलांची ठेवलेली स्त्रीपात्रे, त्यांची संतती, त्या संततीने केलेले शारिरिक व्यवहार, इत्यादी इत्यादी हा फक्त एक भाग आहे हजारो पद्धतीच्या वर्णसंकराचा.) हे कुणीही सिद्ध करून दाखवावे, प्रस्तुत लेखाचा मी स्वतः पुरस्कार आणि प्रचार करीन. जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आता भूतकाळात जमा झाली आहेत. घार्‍या डोळ्यांचा गोरी त्वचा असलेला कोब्राच असेल असं नाही तसेच काळा कभिन्न बुटका दलित जातीतला असेल असंही ठामपणे म्हणू शकत नाही. बौद्धीक किंवा शारिरिक क्षमतांचा जातिनिहाय असा गट नाही. शतकानुशतके सुयोग्य जोडीदार निवडले जात आहेत असेही नाही. वयानुरुप, रंगरुपानुसार एकमेकांना पूरक जोडीदार फार अपवादाने आढळतात. अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही. एखाद्या जातीत किंवा धर्मात जनुकिय आजाराचा प्रादुर्भाव आढळल्याचा काही पुरावा आहे काय? केवळ 'असू शकतो' असे म्हणून अवैज्ञानिक कल्पनाविलास योग्य नाही. जातीचे संस्कार हे रक्तात असतात हा भ्रम आहे. ते समाजाच्या, कुटूंबाच्या वागणुकीतून अजाण बालकाच्या कोर्‍या पाटीवर कायमचे रेखाटले जातात. त्यामुळे आंतरजातीय/धर्मीय विवाहाने जीनपूल वैगेरे समृद्ध होईल हे ताकाला जाऊन भांडे लपवणे प्रकार आहे. कारण जाती/धर्म अनैसर्गिक आहेत. जीनपूलावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आणि जुरासिक पार्क मधे म्हटल्याप्रमाणे

In reply to by संदीप डांगे

आपण एकदम डिनायल मोड मध्येच जाताय. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णतः सिद्ध होत नाही तोपर्यंत विज्ञानदेखील तसे असण्याची शक्यता नाकारत नाही. आपल्या प्रतिक्रियेमध्ये शास्त्रीय पुरावा किवा आकडेवारी काहीही नाही तरीपण तुम्ही तुमचे मत शास्त्रीय समजत आहात आणि लेखकाला मात्र आकडेवारी मागत आहात! हे पटत नाही. आणि हो एका प्रजातीत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असू शकतातच, कारण शरीरात हजारो जनुके आहेत आणि त्यांची वेगवेगळी combination होऊन अपत्य जन्माला येणार! पण काही ठराविक वैशिष्ट्ये काही ठराविक समूहामध्ये आढळणारी देखील असू शकतात. आता आपण म्हणालात वर्ण संकर! पूर्वी हे मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये भूतकाळात जमा झाली, असे मत आपण मांडले आहे. १. म्हणजे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आधी अस्तित्वात होती हे आपले मत आहे का? तसे असेल तर आपण स्वतःच जातीनिहाय जनुकीय विभागणीला एक प्रकारे मान्य करताय. मी अजूनही तसे असू शकण्याची फक्त शक्यता व्यक्त करतोय. २. आपल्या मते पूर्वी सर्व जातीत वर्णसंकर झाले म्हणजे लोकांनी दुसर्या जातीतल्या लोकांशी संबंध ठेऊन अपत्यप्राप्ती साधली(त्यांचे लग्न हा मुद्दा बहुधा इथे गौण आहे) आणि त्यामुळे भेद नाहीसा झाला. मग हे आत्ता का होऊ शकत नाही असे तुमचे मत आहे? आपला पुढचा मुद्दा: "अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही." याचा आपल्याकडे काय पुरावा आहे. पालकांच्याच जीन्स त्यांच्या अपत्यामध्ये येतात त्यामुळे त्यांच्या असण्याचा/दिसण्याचा प्रभाव मुलांवर असतोच. आपले मत : "जातीचे संस्कार हे रक्तात असतात हा भ्रम आहे" हे असे मी कुठंच म्हणालो नाहीये. संस्कार वगैरे कुठून आले इथे? काहीच लॉजीक लागलं नाही!! तुम्ही लेखकाचा उद्देश काय आहे या विचाराने लिहिताय पण मला त्यांच्या उद्देशात रस नाही. त्यांच्या कल्पनेला मी विरोध जरी केला असला तरी जातीनिहाय जनुकीय पूल असूच शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण त्यालाही पुरावे लागतील. आणि उदाहरण म्हणून hollywood चित्रपटाचे व्हिडिओ दिल्यावर काय बोलणार! :) त्या उक्ती नुसार जगातील सगळ्या मानवांनी ब्रीडिंग बंद केलं तरीही लोकसंख्या येन केन प्रकारेण वाढत राहीलच! कशाला मग इतकी झंझट!! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुम्ही हा धागा किंवा धाग्यावरची सर्व चर्चा काळजीपूर्वक वाचलेली दिसत नाही. नाही तर आता इतके प्रतिसाद येऊन गेल्यावर हे प्रश्न विचारले नसते कदाचित. लेखाच्या मथळ्यातच हा लेख सपशेल अवैज्ञानिक आहे असं स्पष्ट दिसत असतांना त्याची भलामण करण्याचा आपला उद्देश कळला नाही. आधी जाती-धर्म आधारित जनुकीय विभागणी असते का ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. बाकीचे पुढे बघू. असो. आपल्या प्रतिक्रियेमध्ये शास्त्रीय पुरावा किवा आकडेवारी काहीही नाही तरीपण तुम्ही तुमचे मत शास्त्रीय समजत आहात आणि लेखकाला मात्र आकडेवारी मागत आहात! हे पटत नाही. > लेखकमहोदय जातीय/धार्मिक निकषांवर विवाहाचा प्रस्ताव मांडत आहेत. त्याला आधार म्हणून वैज्ञानिक संदर्भ देत आहेत. जर जात/धर्म हे विज्ञान असेल तर प्रश्नच मिटला. एका अवैज्ञानिक गोष्टीसाठी दुसर्‍या वैज्ञानिक गोष्टीचा संदर्भ कितपत योग्य आहे तुमच्यामते? आणि हो एका प्रजातीत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असू शकतातच, कारण शरीरात हजारो जनुके आहेत आणि त्यांची वेगवेगळी combination होऊन अपत्य जन्माला येणार! पण काही ठराविक वैशिष्ट्ये काही ठराविक समूहामध्ये आढळणारी देखील असू शकतात. >> एखाद्या प्रजातीत असू शकतात. मी कुठे नाही म्हणतो. पण माणसांचा ठराविक समूह म्हणजे शास्त्रिय दृष्ट्या काय? जाती/धर्म आधारित समूह हे कृत्रिम आहेत. नैसर्गिक नाहीत. उदा. लेखकाने ब्राहमण हुशारच आणि दलित रेम्याडोक्याचेच असतात असं काही गृहित धरले आहे काय? आता आपण म्हणालात वर्ण संकर! पूर्वी हे मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यामुळे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये भूतकाळात जमा झाली, असे मत आपण मांडले आहे. १. म्हणजे जातीनिहाय गुणवैशिष्ट्ये आधी अस्तित्वात होती हे आपले मत आहे का? तसे असेल तर आपण स्वतःच जातीनिहाय जनुकीय विभागणीला एक प्रकारे मान्य करताय. मी अजूनही तसे असू शकण्याची फक्त शक्यता व्यक्त करतोय. >> आता असं बघा. सन २००० ते २०१५ या वर्षांमधे झालेले आंतरखंडीय्/वंशीय विवाहांची संख्या सन ०००० ते ००१५ मधे झालेल्या आंतरखंडीय/वंशीय विवाहांच्या तुलनेत प्रचंड जास्त असेलच. लोकसंख्येचे गुणोत्तर सोडा. एका भूभागातून शेकडो मैल दुसर्‍या भूभागात विवाह होणे तेही दुसर्‍या जातीत हे अनेक कारणांमुळे अशक्य होते. त्यामुळे विवाह, विवाहबाह्य संबंध आणि संतती त्याच भूभागात होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. म्हणून एका भूभागातल्या माणसांची चेहरेपट्टी, देहयष्टी एकसारखी असल्याचे आढळून येते. यात जाती/धर्माचा संबंध नाही. पण सांप्रत समाजाला 'असं वाटतं' की जातीनिहाय असे गुण असतात. जातीनिहायच काय देशनिहायही काही विशिष्ट गुण असतातच असंही लोकांना वाटत असतं. पण हे सर्व गुण जातनिहाय नसून भौगोलिक परिस्थिती, समाजजीवन, संसाधनांची उपलब्धता यावर अवलंबून असतात. ज्यांच्या पिढ्यांपिढ्या अभावात जगल्या त्यांच्या अंगी काटकसर येणारच. ती जातिनिहाय कशी असू शकेल? तेच विपुलतेत आयुष्य काढलेल्या लोकांचं. नाच, गाणे, मजा करणे हा काही प्रांतांचा स्वभाव आहे. तो जाती-धर्म आधारित आहे असे मानणे अवैज्ञानिक, अशास्त्रिय नाही का? युद्ध, देशांतर, व्यापारा-उदिमामुळे स्थलांतर यामुळे देशात बर्‍याच प्रमाणात लोकसंख्या आपली मूळ निवासस्थाने सोडून कायमची विस्थापित झालेली दिसून येतात. तरीपण त्यांच्यावर त्यांच्या भूभागाचे, सामाजिक संस्कारांचे छाप आहेत. जाती-धर्माचे नाहीत. एका मारवाड्या-गुजरात्याचा आय-क्यू एका वेदशास्त्रसंपन्न पंडिताएवढा असेल तरी दोहोंच्या सामाजिक, कौटूंबिक परिस्थितीत बदल असल्याने स्वभावगुण वेगवेगळे दिसून येतात. म्हणून जनुकं वेगळी असतील असं आहे का? आता अशा दोन घरांमधे विवाह झाल्यावर जनुकांची सरमिसळ झाली की सामाजिकतेची? जनुक विज्ञान काय आहे नेमकं जर मलाच कळलं नसेल तर जरूर सांगा. पण ते मानवनिर्मित जातीनिहाय नाही असे माझे मत आहे आणि ते अवैज्ञानिक आहे असे मला वाटत नाही. जाणकार अधिक सांगू शकतील. २. आपल्या मते पूर्वी सर्व जातीत वर्णसंकर झाले म्हणजे लोकांनी दुसर्या जातीतल्या लोकांशी संबंध ठेऊन अपत्यप्राप्ती साधली(त्यांचे लग्न हा मुद्दा बहुधा इथे गौण आहे) आणि त्यामुळे भेद नाहीसा झाला. मग हे आत्ता का होऊ शकत नाही असे तुमचे मत आहे? >> होण्याचे थांबले आहे असं कुठं म्हटलंय. आंतरजातीय/धर्मीय्/प्रांतीय्/वंशीय प्रेमविवाह होतच आहेत. विवाहाशिवायही संतती निर्माण होतच आहेत. पण कुणाला प्रयोग करायचे म्हणून असे अरेंज्ड विवाह शक्य आहेत का? आपला पुढचा मुद्दा: "अनुरुप किंवा विरुप अशा जोड्यांच्या संयोगातून चांगली किंवा वाईट संतती जन्मास येते असा काहीही पुरावा नाही." याचा आपल्याकडे काय पुरावा आहे. पालकांच्याच जीन्स त्यांच्या अपत्यामध्ये येतात त्यामुळे त्यांच्या असण्याचा/दिसण्याचा प्रभाव मुलांवर असतोच. >> या धाग्यावर इथल्या सन्माननीय डॉक्टरांनी याबद्दल पुरेसं स्पष्टीकरण दिले आहे. विधानाचा अर्थ एवढाच की दोन जीवांपासून नेहमी अपेक्षीत संतती निर्माण होईल याची कोणतीही खात्री कोणताही वैज्ञानिक देणार नाही. जातीनिहाय जनुकीय पूल असूच शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही कारण त्यालाही पुरावे लागतील. >> मी काय म्हणतो. हे इतके नैसर्गिकरित्या स्पष्ट सत्य डोळ्यांना दिसत असतांना प्रयोगशाळेत जाऊन जनुक जनुक खेळण्यात काय हशील आहे? लेखकाने पुढे केलेली परिस्थिती मान्य केली तर असे म्हणता येईल की माणसांमधे पशूंसारखे वर्गीकरण झाले आहे. म्हणजे घोडा, झेब्रा, गाढव. तेव्हा घोड्याचे जीन्स खचितच गाढवापेक्षा वेगळे आहेत हे सिद्ध करायला प्रयोगशाळेत जायची काहीच गरज नाही. पण असे नाही आहे ना. दोन माणसांबद्दल असं ठामपणे प्रयोगशाळादेखील म्हणू शकणार नाही. त्यांचे जनुकीय प्रयोग करायची काय गरज आहे? त्यासाठी आंतरजातीय्/धर्मीय वैगेरे विवाहांची काय गरज आहे? आणि उदाहरण म्हणून hollywood चित्रपटाचे व्हिडिओ दिल्यावर काय बोलणार! :) त्या उक्ती नुसार जगातील सगळ्या मानवांनी ब्रीडिंग बंद केलं तरीही लोकसंख्या येन केन प्रकारेण वाढत राहीलच! कशाला मग इतकी झंझट!! :) >> देअर यु आर...! मी पण हेच म्हणतोय केव्हापासून. कशाला मग इतकी झंझट. लाखो वर्ष माणूस उत्क्रांत होत आलाय. होत राहील. हे जाती धर्माचं प्रकरण मागच्या काही हजार वर्षात उपटलं असेल. अजून काही हजार वर्ष राहील. जनुकीय अभिसरण थांबलंय का? नाही. कारण ती अविरत चालणारी प्रक्रिया आहे. हेच त्या चित्रपटातही सांगितलंय. असं सांगणारा चित्रपट भोजपुरी असता तर त्याची लिंक दिली असती. पण बहुधा भोजपुरी लोकांमधे असले चित्रपट काढायला लागणारे बौद्धिक जनुकं नसतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पेपे ची की लेव्हाईज? इथे लेखकाच्या म्हणण्यानुसार पेव्हाईज ची जीन्स महाग असेल कारण ती स्ट्राँग वगैरे वगैरे असायला हवी.

In reply to by काळा पहाड

ह्यावरुन एक झॅक विनोद आठवला. पण इथे नको. =)) स्ट्राँग म्हणजे किती स्ट्राँग. आपल्याला स्ट्राँगपेक्षा मळखाउ पाहिजे. तीन-चार महिने धुतली नै तरी चालेल अशी पाहिजे =))

उत्तम चर्चा.
म्हणजे दक्षिण आशियायी (भारतीय +पाकिस्तानी+ बांगलादेशी + श्रीलंकन) व्हर्सेस कॉकेशियन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, चायनिज (मंगोलियन) वगैरे...
दक्षिण आशियायी एका पायावर तयार होतील पण गोरे लोकही तयार झाले पाहिजेत हो. असे झाले तर मग दीपाली अँडर्सन,प्राजक्ता हॅरिसन,कॅथरीन कुलकर्णी,क्रिस्तिना पवार,अँजेला चितळे,जॅकलीन खोब्रागडे अशी नामावली तयार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, नावाचे संकर तर लय जुने आहेत. पण तुमच्या वयापेक्षा जुने नाहीत. तरी तुम्ही असली विधानं करता? आश्चर्य आहे.

In reply to by नाखु

आशिष विन्स्टन् झैदी या नावाचा एक मध्यमगती गोलंदाज उत्तरप्रदेशच्या रणजी संघातून अनेक वर्षे खेळत होता. http://www.espncricinfo.com/india/content/player/36137.html

In reply to by ग्रेटथिंकर

५-६ वेळा वाचला. मुद्दा सापडला नाही. एकदा दाखवाल का म्हणजे पुढच्या वेळी पटकन सापडेल.