तुझा हात माझ्या हाती,
शब्द फिके अशा एकांती,
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती...
किनारा असा फेसाळलेला,
आसमंत सारा गंधाळलेला,
बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा
तुझ्याच डोळ्यांत सामावलेला...
होई अचानक तुझा स्पर्श वेडा,
हर्षीलाच जाई जीव हा बापडा,
चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की
बने राजवर्खी हा ऋतू कोरडा...
किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी,
हिंडो कुठेही, विसावा किनारी,
असला दुरावा जरा काळ तरीही,
प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी...
- हृषीकेश
बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात.....
बाडिस देवानू !अनुभव नाही त्याचा..आणि घ्यायची इच्छाही नाही:D
खयाल अपना अपना ......
तुम्ही (स्व्)देशी वाले दिसता !
ठ्ठो!!! तुम्ही इथले माहितगार दिसता इथल्या आयड्यांची माहिती असायला.
छे हो, एकदम नया हूँ मय!
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती..
ज्या बिंबाच्या प्रतिबिंबावरही आपण एवढे खूष असतो, त्या बिंबाचा कालांतराने बंब होतो.
त्या बिंबाचा कालांतराने बंब होतोतो लग्ना नंतरचा भाग आहे!
तेव्हा त्या बंबावर करु की दुसरी कविता:P
+१
दर सॅटर्डे नाईटला , आमची अशीच स्थिती होते.....