आपल्या भावना चांगल्या आहेत. योग्य विचार आहेत. पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......
बरं ते जाउ दे. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो?
http://kalekapil.blogspot.com/
"पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......"
- त्या वेळची ची तशी गरज होती.
तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो?
- नाही, पण त्याचे कथासूत्र माहीत आहे. अर्थात माझे हे रिक्षा प्रकरण त्या पूर्वीचे आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
तसाही आम्ही रिक्षाप्रवास तिन मित्र असलो तरीही चार वेळा विचार करूनच केलेला, आणि कधी आठाणे जास्त दिले नाहीत. पुणे मध्यवर्ती भागात रिक्षावाले मिटर प्रमाणे पैसे घेतात, पिं-ची मधे असा प्रकार नसावा.
बाकी एकदा आमच्या पायावरून एकाने रिक्षा घातलेली तेंव्हा त्याची रिक्षा रोडमधेच पलटी केल्याचं आठवतंय .. :)
- टारझन
लै भारी रे चेतन . साले आपल्या निगडीचे रिक्षावाले असेच हरामखोर आहेत. बिग इंडियापासुन आकुर्डी रेल्वे स्टेशनचे २० रुपये घेतात.
तु निगडीत कुठे रहातोस?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक) सेक्टर २६ प्लॉट १४९
चेतन भाऊ,
असा फोन नंबर आणी पत्ता जालावर देणे बरे नव्हे.
मि पा चे सभासद जरी सभ्य असले तरी बाकी कुणी कसे असेल सांगता येत नाही.
तुम्ही बर्याच बदमाश रिक्षाचालकांशी पंगा घेतला आहे म्हणुन - जरा काळजी घ्या.
- नेत्रेश
रिक्षावाल्यांशी आपण जे केलेत ते चांगलेच.
एक प्रसंग : मी एकदा माझ्या आई बरोबर रात्री दहाच्या सुमारास घरी परतलो. रिक्षावाल्याने होणार्या भाड्याच्या साधारण दिडपट रक्कम सांगीतली. मी त्याला सांगीतले की जाताना अमुक एक रक्कम झाली होती, त्यावेळी रस्त्यात गर्दी आणि सिग्नल होते. आता त्यापौकी काहिच नसताना भाडे तेवढेच वा कमी झाले पाहिजे. आणि मी जाताना जेवढे भाडे झाले होते तवढेच त्याच्या हातावर ठेवले. बराच वाद झाला आणि त्याने ते पैसे माझ्या हातात कोंबले म्हणाला मला पूर्ण भाडे द्या.. मी म्हटले की तुम्ही मी दिलेले पैसे स्विकारत नसाल तर मी चाललो.. फुकट आणून सोडल्याबद्दल आभारी आहे :).. मग त्याने तणतणत पैसे घेतले आणि गेला.
खरेतर आसपासच्या लोकांनी अश्या वेळेला ठामपणे आपली बाजू घ्यायला पाहिजे. पण वाद नकोत, आरडाओरडा नको म्हणून लोक सामोपचाराची भूमिका घेतात. (आणि अनेकदा प्रश्न पाचदहा रुपयांचा असल्याने भांडण नको म्हणून आपणही सोडुन देतो.)
-- लिखाळ.
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत.
वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही.
ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का?
तामीळ्नाडूतही (विशेषतः चेन्नई मध्येही ) पिं.चिं. सारखेच रिक्षाचालकांचे चीड आणणारे अनुभव येतात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत.
वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही.
ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का?
>>>>>>>
माझा अनुभव देखील फारसा चांगला नाही.
मीटर आणि टेरिफ कार्ड हा प्रकार रिक्शावाले वापरतच नाहीत.
आकुर्डी ते भेळ चौक ह्या साठी एका रिक्शावाल्याने माझ्याकडुन ३५ कि ४० रु घेतले होते.
कारण काय तर म्हणे की मी रिक्षा स्टॉप पासुन तुमच्या कॉलनीत येणार त्याचेच १५ होतील आणि इथुन भेळ चौक २५.
त्यावेळी पत्नीला दवाखान्यात ऍडमीट करण्यासाठी जायच होत म्हणून वाद घालुच शकत नव्हतो.
चेतन तुमचा उपाय ठिक आहे. पण निगडीच्या वाहनतळावरुन काहि वाहन मध्ये चोरीला गेली होती. त्यामुळे देवाच्या भरोश्यावर वाहन तिथे लावु नका (दुचाकी असेल तर)
जर पे आणि पार्क असेल तर मग चिन्ता नाही. पण तिथे पे आणि पार्क सुरु झाली आहे??
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
रिक्षा वाल्यांना चोपणे आणि रस्त्यामधे रिक्षा लाऊन उभे असतील तर त्यांना बाईक मागून ठोकणे हा आमच्या कट्ट्यावरच्या मुलांचा आवडता छंद आहे. आमच्या ग्रुप मधे २ बुलेट आहेत. त्यांचा उपयोग आम्ही रिक्षांवर घालायचा रणगाडा म्हणून करतो.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहाबाहेर रोज रात्री शेवटचं नाटक सुटलं की रिक्षावाल्यांची मग्रुरी अनुभवायला मिळत असे. म्हातारी माणसं, स्त्रीया, मुलं असा भेदभाव न करता जवळच्या भाड्याला सरळ नकार देणे असे उद्योग सुरु असायचे. कुणी आवाज चढवला तर ४-५ रिक्षावाले एकत्र येऊन उलट दमदाटी करायचे. आमचाच कट्टा असल्याने आम्ही त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. रोज ठरवून रात्री ११:१५ ते ११:४५ आम्ही ११-१२ जणं कट्ट्यावर असायचो. जवळ जवळ महिनाभर रोज एकातरी रिक्षावाल्याला कानफटवायचो. एकानी खाल्ली की बाकिचे सुतासारखे सरळ व्हायचे. स्ट्रॅटेजी अशी होती की जो पहिल्यांदा नाही म्हणेल त्याच्याशी वाद न घालता सरळ एक पेटवायची. मगच पुढे बोलायचं. अगदीच म्हातारी माणसं असतील तर आमच्यातले दोन जण गुपचूप रि़क्षामागे बाईक घेऊन जात. मधेच उतरवलं अथवा तिथे जाऊन दमदाटी व्हायला नको म्हणून.
बराच फायदा झाला त्याचा. पुढे पुढे आम्हाला काही करायची गरज पडत नसे. आमच्यातले २-३ जण जरी तिकडे असले तरी शांतता असे.
>>>>>साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते.
कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो?
रेवती खरे आहे तु़झे,
मी ही एकदा मुंबंई हुन पुण्याला आले होते, आणि स्वारगेट वरून रिक्षा केली मी आणि मा़झा लेक दोघेच होतो, वेळ रात्रीचे ८.३० ते ९.०० च्या दरम्यान, स्वारगेट वरून जराच पुढे गेल्यावर रिक्षावाल्याचा एक मित्र रिक्षात रिक्षावाल्याच्या शेजारी बसायला लागला , तेव्हा मी त्या रिक्षा वाल्याला सांगितले हे जर बसणार असतील तर मी रिक्षातुन उतरणार , त्यावर ते दोघे रिक्षावाले मा़झ्याशी वाद घालु लागले, तो दुसरा बसणारा रिक्षावाला बोलु लागला मी ही येथील रिक्षावाला आहे, तुम्ही घाबरू नका, पण मी ठाम होते, मी माझा राग पाहुन त्या रिक्षावाल्याने दुसर्याला घेतले नाही, आणी मी घराच्या जरा अलीकडेच रिक्षा थांबवुन, रिक्षावाला त्या रोड वरून दुर गेल्याची खातर जमा करून घेतली आणि मग घरी गेले. :)
अहो साहेब पिंपरी च्या रीक्षावाल्यांकडे टेरीफ कार्ड वगैरे तर सोडा,
ड्रायव्हींग लायसंस आहे का ह्याचा शोध घ्या आधी ...
शिवाय वहातूकीचे नियम ह्यांच्या साठी नसतातच मुळी...
निगडी -प्राधीकरण तर ठीकाये ,पण इकडे काळेवाडी,थेरगाव वगिरे भागात अक्षरशः आंधळा कारभार आहे..
आणी रीक्षा म्हणजे विमान आहे असा ह्या लोकाचा समज असतो..
तुम्ही केलेला उपाय आम्ही ऑलरेडी ब-याचदा केलाये... ;) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
रिक्शा ने प्रवास करणार्या प्रवाशांची एक संघटना करायची वेळ आली आहे वाटते !!) (जशी पीएमपीएल प्रवाशांची एक आहे तशी )
माझा एक अनुभव - आधी जेव्हा कमीत कमी भाडे ८ होते तेव्हाचा - स्थान - शिवाजीनगर
मीटर मध्ये १ च झाला होता, म्हणजे रू ८ भाडं झालं होतं. मी दहाची नोट दिली तर म्हणे दहाच झाले, आम्ही "लोकल" (म्हणजे कमीत कमी भाडे) चे १० च घेतो. मी परत रिक्षात बसले त्याला म्हटले, १० होईपर्यंत रिक्शा चालवत रहा म्हणजे तोपर्यंत पुढचा चौक येइल आणि पोलिस पण भेटतील !! मग २ रु परत दिले आणि वर जाताना म्हणे, पैसे नसतात तर रिक्शात बसता कशाला ??? !!!
प्रतिक्रिया
भावना
तशी गरज होती
वा !
टारझना,
शक्तीप्रदर्शन
लै भारी रे
माझा पत्ता
पत्ता
पिम्प्रि
नक्कीच करावा.
छान
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक...
पिंपरी
.
अश्या माजलेक्या रिक्षाचालकांविरुध्द
मानल राव!
रिक्षावाले
रेवतीच्या मताशी सहमत.
हाबीनंदन गूगळे साहेब !!
संघटना ??