Skip to main content

कोकणी भुते

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 06/05/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस ७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या १२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा. १ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो. २ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला. ३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही. ४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो. ५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. ६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे. ७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो. ८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. ९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते. १० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते. 11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते . 12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते 13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते 14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही .... संग्राहित / संपादित *

वाचने 75987
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

म्हणजे मिपावरची उपद्रवी भूते जेव्हा गायब होतात तेव्हा त्यांना मांत्रिकाकरवी बाटलीत भरले जाते तर.

In reply to by पैसा

नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.
"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?

In reply to by सतिश गावडे

"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?
आपली पुस्तके पुण्यातलेच लोक नेण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने ते परत करणार नाहीतच हे गृहीत धरलं असावं त्यांनी!! आणि मेलेल्याला आणखी का मारा म्हणून क्लॉज मुद्दाम वगळला असेल.

In reply to by यशोधरा

ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की कोकणी असे विचारल्यावर "आम्ही मिपाकर" असे सांगितलेत. आणि पुणेरी स्पष्टवक्तेपणा वापरण्याच्या गोष्टी करुन तुम्ही पुणेकर असल्याचे सिद्ध करताय. हे चिटिंग आहे.

कोकणात स्त्रीभूतांपेक्षा पुरुषभूते जास्त आहेत तर! स्त्रीभूतात आसरा आणि सटवाई हे प्रकार नाहीत का?

In reply to by रोहन अजय संसारे

भुतान पन जात आसते इकुन माझा आलि भुताला पण मोकलाया दाही दिशा..

भयानक जंगल, ओसाड पडलेल्या वाड्या, निर्मनुष्य रस्ते,आणि एकाकी सडे त्यामुळे कोकणात भूतांचा जन्म झाला नसेल तर नवलच माझ्या वडलांनी सांगितलेला एक किस्सा आठवला आमच्या गावाहून साधारण ७, ८ किलोमीटर वर बाबांची शाळा होती,सड्यावरून एक पाउल वाट जायची. एकदा शाळेत कुठलेसे नाटक लागलेले होते,म्हणून सर्व मित्र मंडळी रात्री उशिरा पर्यंत थांबली. येताना साधारण मध्यरात्र उलटून गेलेली होती.श्रावणातली रात्र होते, हलक्या सरींचा खेळ सुरु होता, या सर्वांकडे खोळी होत्या, सड्यावर आल्यावर अचानक वारा पडला, वातावरण गरम व्हायला लागले.समोर लांब घरंगळत गेलेला रस्ता अस्पष्ट व्हायला लागला. आणि अचानक बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे, माळांचे , चाकांचे आवाज यायला लागले. मागे पुढे कोणीही नव्हत. मशालींच्या धुराचा कळपट वास यायला लागला,खाण्याच्या पदार्थांचा घमघमाट सुटला, अस्पष्ट कुजबुज, खसखस ऐकायला यायला लागली हे सर्व प्रकार बघून सर्वांचीच तंतरली, आधी लांबवरून येणारे आवाज जवळ जवळ यायला लागले. त्यातला एक जरा अनुभवी मुलगा होता, त्याने सर्वांना बाजूला माळरानात उड्या मारायला सांगितल्या, सगळे डोक्यावरून खोळी घेऊन निपचित पडून राहिले, बराच वेळ तो आवाज, ते वास येतच होते. हळू हळू वातावरण पूर्ववत झाले तरी कोणाचीच उठायची इच्छा नव्हती, सगळ्यांनी रामरक्षा म्हणत अजून दोन तास तिकडेच काढले आणि साधारण तीन च्या दरम्यान उठून चालते झाले . :)

In reply to by स्पा

वेताळाची पालखी!! हे नुसत वर्णनच नाही तर त्या वेळी एकच जागी गच्च झालेली बैलगाडी आणि त्या सगळ्यात मला एकट्याला ते दिसत होतं अस सांगणारे आत्याचे मिस्टर सहा वर्षापूर्वी वारले. मुंबईत सरकारी सर्विसमध्ये होते. कधी कोणत्या गोश्टीत फार गुंतलले पाहिले नाहीत. ना ही देवधर्म ना कोणता कुळाचार, पूजा अर्चा, ना ही नैवेद्य!! अश्या माणसाच्या तोंडुन ऐकलेले हे वर्णन आश्चर्यचकित करुन गेलं होतं.

जल्ल सगळी भुताटकी..साला हाफ्शेंच्युरी झाली कोण सत्कार केला नाय ..कस होणार..ह्याच. (पिंपळावरचा मुंजा) जेपी

In reply to by जेपी

दोनचार कवट्या ,साताआठ हाडे आणि स्मशानातील राख उधळून सत्कार करनेत येत आहे! भुतेच्छुक :- अतृप्त आत्मेश्वर, आणि भूत ग्यांग, जुन्या स्मशाना जवळ , पिंपळ नं 10... ! :P

In reply to by प्रचेतस

पण अजूनही कधी कधी तो आत्मा अत्रुप्तांच्यात प्रवेश करतो. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्यावरसुद्धा जात नाही...! ;)

In reply to by प्रचेतस

@पण अता आत्मा गायब होऊन नुसताच अत्रुप्त उरलाय ना?>>> :-/ आत्मा गायब झालाय्,संपलेला नाही!!! असाहि तो संपत नसतोच्च! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif दू...दू... स्नेहातै! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png

संकल्पनाकोश - लेखक - सुरेश वाघे .. खंड २ - मानवी शरीर व जीवनावस्था हा माझ्या वडिलांचा ५ खंडी ग्रंथ आहे. त्यात पान 6 - 75 पासून ६-७ पाने भुते tyanche वर्गीकारौ / प्रकार यावर आहेत. तसेच भाग १.५१ - ते भाग १.५४ मध्ये ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , क्षुद्र यांच्या भूतांचे उल्लेख आहेत ;)

यातलं "बायंगी" आमच्या गावात विकत आणलं होतं एका घराने. अर्थात अस म्हंटल जात होतं. ते घरच असल्या प्रकारांच असल्याने काहीही करु शकत होते. जाताना घरातला कणन कण खरवडुन नेते आणि घरातली मुलगी घेउन जाते अस काहीस ऐकल होतं. अन निदान मुलगी गेलेली तरी माहित आहे.

In reply to by स्पंदना

हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे. बायंगी. अजून माहिती असल्यास सांगावी. या क्रेडिट कार्डावर मिळतात काय?

In reply to by वेल्लाभट

काय माहित नाही हो. ती भरा भरा आलेली भरभराट पण पाह्यली, ती लिव्हर सिरॉसीस ने वारलेली मुलगीही पाह्यली त्या दरम्यान आणि मग सगळ उजाड झालेलंही पाह्यलं. आता अजून उजाडच आहे. कशाला विषाची परिक्षा घ्यावी? आणि कुणी? जसा देवा, बाबाजी वर दुरुन नमस्कार तसाच या सगळ्यालाही जरा लांबुनच पहावं. फार खोलात शिरु नये या मताची आहे मी.

In reply to by स्पंदना

हो हो; मी आपलं गमतीने म्हणतोय. मला काही स्वारस्य नाही. :) कशाला हवंय असलं काही, चायला.

In reply to by वेल्लाभट

मला माहितीये. रत्नांग्रीस आमची आत्या होती कैक वर्षे तेव्हा तिथे राहिलेलो आहे. साळवी स्टॉप येथे त्यांचे घर होते, थिबा राजाच्या थडग्यापासून जवळच एकदम. तेव्हा मानकाप्याची ष्टुरी ऐकलेली आहे. अवांतरः रत्नागिरी लक्षात रहायची काही कारणे: १. मिरजेसनं रत्नागिरीला अंबा घाटमार्गे जावं लागतं, तेव्हा कायम फुशारक्या मारूनसुद्धा हमखास दरवेळेस घाटात ओकायचो म्हणजे ओकायचोच. २. एकदा आईबाबांसोबत रत्नागिरीस आलो असताना पावस, गणपतीपुळे, डेरवण, इ.इ. ठिकाणे बघायला म्हणून समस्त नातेवाईक एका सुमोत कोंबून फिरत होतो. तिथे कुंबळे नामक एका गावानजीक काय चकवा लागला काय माहिती, सुमो त्याच त्या पट्ट्यात तासभर तरी फिरत होती. फलकही नव्हते, काय कळतच नव्हतं काय झालं ते. प्री-मोबाईल जमाना तो, सगळ्यांचीच फाटलेली, संध्याकाळचे ६-७ तरी वाजले असतील. शेवटी कसा कोण जाणे पण मार्ग मिळाला आणि आम्ही मार्गस्थ झालो. ३. आमच्या आतेभावाशी कायम मारामारी करायचो. दोन वर्षे सीनियर असल्याने बिचार्‍याला लय मारलेला आहे तेव्हा. :( सर्व भावंडांत सर्वांत सालस तोच अन त्याच्याच नशिबी आमच्यासारखे लोक यावेत? अर्थात आम्हांलाही इतर भाऊ पिडत तेव्हा तसा राग निघायचा. =)) ४. तासन्तास ब्रिक गेम खेळत असू. ५.हापूस आंबा. ६.प्रथमावताराचे प्रथम भक्षण. वॉज़ नॉट अ‍ॅट ऑल इम्प्रेस्ड.

In reply to by सतिश गावडे

नीट आठवत नाय, पण ते एक भूत रातच्याला लोकांना ठार मारत सुटतं. त्याला स्वतःला डोकं नसतं, समथिंग लाईक प्रभुदेवा इन दॅट मुक्काला मुक्काबला साँग. बाकी एलेमेंट्स वेल्लाभट साहेब सांगतील.

In reply to by बॅटमॅन

नाउ दॅट यु हॅव कॉल्ड मी, मला माहित असलेली श्टोरी अशी.... हे मानकाप्या भूत जयस्तंभाजवळ असतं. तिथून रात्री कुणी एकटं जात असलं की हे आपले दोनही हात खांद्याच्या रेशेत जमिनीला समांतर फिरवत येतं आणि त्याची मान कापतं. डोकं धडापासून वेगळं करतं. म्हणून मानकाप्या.

१००

आम्हाला रहायला जागा आहे हे नशीब! की त्यांच्यापैकीच माहित नसलेला प्रकार आहे कोण जाणे! या जयस्तंभावरच्या भुताबद्दल मागे एकदा इथेच वाचले होते, पण अजून दिसले नाही कधी.

असतील शिते तर जमतील भुते ही म्हण कोकणातल्या भातखाऊ भुतांवरूनच आली असावी काय? देशावरची असती तर असता ज्वारी, भुते खूप सारी अशी काहीशी म्हण आली असती. किंवा असता नाचणी, येती भुते साजणी, वगैरे.