उत्कृष्ट विषय !
माझे मत असे, की मानवी अधिकारांना मोडीत काढण्यासारखे कुठलेच संकट नसते.
परंतु, ह्या चाचण्या करण्याने मानवी अधिकारांचे उल्लंघन होतेच, असे नाही.
ह्या चाचण्यांचा योग्य वापर केला नाही, तर मूलभूत हक्कांचा भंग होतो.
कायदे बनवण्याच्या पद्धतींत नवीन तंत्रज्ञानाला सामोरे जाण्याचे पुरेसे बळ नाही. हे बळ येणे आवश्यक आहे. नार्को चाचण्यांच्या आधीही असत्यनिदान चाचणी हा एक प्रकार होऊन गेला (लाय डिटेक्टर टेस्ट). चाचणीची विश्वासार्हता १०० टक्क्याच्या जवळ पोहोचली तरीही, कायदा त्या चाचणीला मान्यता द्यायला अनेक वर्षे तयार नव्हता.
नार्को चाचण्यांचेही तसेच.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
धन्यवाद,
पण तुमचे नेमके मत कळले नाही.
जर जवळजवळ १००% बिनचूक पद्धत निघाली; तर तिचा वापर योग्य आहे, आणि ती वापरल्याने मूलभूत मानवी अधिकारांचे उल्लंघन (स्वतःविरूद्ध साक्ष न देण्याच्या) होत नाही, असे आपण म्हणता का? (असत्यनिदान चाचणीच्या वेळी आरोपी शुद्धीत असतो.)
आणि दुसरा मुद्दा म्हणजे, अशा प्रक्रिया कुठवर योग्य म्हणणार? मी वर ज्योतिष, डीएनए वगैरे चाचण्यांची उदाहरणे दिली आहेत
-रामशास्त्री
की, ज्या चाचण्यांना शास्त्रीय मान्यता असेल, त्या चाचण्या कायद्याच्या दृष्टीकोनातून स्वीकार्य व्हाव्यात.
हे कायदे करणार्यांनी लक्षात घ्यायला हवे, तुम्ही आणि मी नाही.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
लेख विचार करायला लावणारा आहे. पण माझी शंका अशी आहे की समजा एखाद्या देशद्रोही अतिरेक्याकडून माहिती मिळत नसेल तर त्याला ही हाच न्याय लावणार का ? जो माणसे मारण्याचे काम करतो ,अशा अमानुष नराधमाला या मानवी अधिकाराचा फायदा का मिळावा ?
मानवी मेंदूवर संशोधन बाल्यावस्थेत आहे. नार्को टेस्ट ही तपासाला पुढची दिशा मिळण्याकरिता वापरली जाते. त्याचा पुरावा म्हणुन वापर करणे अशक्य. शिक्षेसाठी जर का तो पुरावा म्हणुन वापरला तो दिवस मानवी समाजातला सर्वात काळा दिवस असेल.
नार्को चाचणी ला किती महत्व द्यायचे हे आता ठरवायला हवे. अजुन तरी कायदा नार्को चाचणीला मान्यता देत नाही.लायडिटेक्टर चाचणी जितकी साधीसरळ आहे त्यापेक्षा नार्को मानवाला धोकादायक आहे.अजुनही त्याबद्दल संशोधान पुर्ण पणे झाले नसल्यामुळे आता त्याचा जो वापर चालु आहे तो योग्य नाही. तसेच नार्को टेस्ट कधी,कोणाची घ्यावी ह्याचे पण भान ठेवायला हवे.परवा दयानंद पांडेची नार्को टेस्ट घेताना ती त्याच्या जीवावर बेतली होती.त्याचे दुष्परिणाम खुप आहेत. आजकाल ह्या चाचण्या राजकारण्यांचे एक हत्यार झाल्या आहेत.
वेताळ
प्रतिक्रिया
सर्वप्रथम
तुमचे नेमके मत कळले नाही
माझे म्हणणे एवढेच
शास्त्रीब
हाच न्याय त्यांना ?
येस्स...! हाह
नार्को टेस्ट
सहमत