गाभा:
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ?
काय खरे काय खोटे ?
त्यात आणखीन हि एक क्लिप
ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ??
हे अजून एक भयकारी काही जीवघेणे
...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...
प्रतिक्रिया
11 Apr 2015 - 11:32 am | माईसाहेब कुरसूंदीकर
त्यात नेहरूंचे नाव आल्याने कुजबूज आघाडीची पुढच्या २/४ वर्षांची सोय झाली म्हणायची.
11 Apr 2015 - 10:11 pm | विनोद१८
@ माईसाहेब, वरच्या प्रतिक्रियेवर उत्तर दे अन्यथा असल्या फालतू प्रतिक्रिया देणे बंद कर
11 Apr 2015 - 10:51 pm | hitesh
माई मोड ऑन....
अरे विनोदा , स्वातंत्र्यासाठी काठ्या कुणी खाल्ल्या अन स्वातंत्र्यानंतर अखंड कुजबुज जप कुठल्या सनातन्यांनी मांडला हे तर सर्वंनाच ठाऊक आहे..
आझाद हिंद सेनेसाठी छातीचा कोट केलेल्या नेहरुंच्या गादीवर , नऊलाखी कोट घालणारे विराजमान झाले अन या राष्ट्रीय कुजबुज संघाचा वाल्युम अजुनच लाऊड झालाय.
आमचे हे तर बोलत होते , नव्या राजवटीत या कुजबुजीतुन साक्षात साईबाबा सुटले नाहीत तिथे चाचाजी किस झाड की पत्ती !
माई मोड ऑफ.
.....
कोट कोट या कोटीचे क्रेडिट मायबोलीवरील सचिन पगारे यांना जाते.
11 Apr 2015 - 8:05 pm | hitesh
Shah Nawaz Khan, Gurbakhsh Singh Dhillon and Prem K. Sehgal were, as a test case, put on trial in open court in the Red Fort at Delhi.
They were charged with treason and with waging war against the King. This aroused India wide sympathy for them. The trial began on 5 November 1945.Eminent lawyers and public men such as Tej Bahadur Sapru, Bhulabhai Desai and Jawaharlal Nehru defended the accused in court.
There were riots in their favour in several places between 21 and 24 November. The court on 31 December 1945 sentenced all the three to transportation for life. The government, however, yielded to the outburst of popular sympathy and the British commander in chief, Sir Claude Auchinleck, quashed the sentence on review.
आझाद हिंद सेनेच्या लोकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली सजा दिली तेंव्हा तेजबहाद्दूर सप्रू , भुलाभाई देसाई व चाचा नेहरु यांनी केस लढवली. अखेर ब्रिटिश सरकार नम्ले.
ते लंडनवरुन ब्यारिस्टरकी करुन आलेले आणखी एक वकील होते. पण माफीपत्रे लिहुन दिल्याने ते बहुदा शब्दात अडकले होते. म्हणुन केस लढण्यात ' ते' सहभागी नव्हते की काय ! कट्टर जहाल लोकांच्या केसेस लढायला नेहरु गेले ! छ्याछ्या ! चाचा ! 'जहाल'-भक्त मंडळी , वाचताय ना हा इतिहास ?
http://www.thesikhencyclopedia.com/historical-events/the-british-and-sik...
11 Apr 2015 - 8:26 pm | पॉइंट ब्लँक
बर्र. मग, ईथ ह्याचा काय संबध?
11 Apr 2015 - 8:41 pm | पॉइंट ब्लँक
ह्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृत्यावर कसली टिका करता येत नाही अस सुचवायचं आहे का तुम्हाला?
11 Apr 2015 - 8:48 pm | अत्रन्गि पाउस
अहो पुढच्या पंतप्रधानकी साठी हे असले आवश्यक होतेच ...
बाकी त्यांची बलिष्टरी देशाला किती उपयोगी पडली हे तपासणे रोचक ठरावे ...
आणि त्या 'आणखी एका' वकिलांनी पुढचे अनेक वर्षे देशाला वारंवार सल्ले दिले ...बहुतेक सल्ले धूडकावल्यावर ..काळाने चपराक लावल्यावर सुद्धा हे वरचे बलिष्टर सुधारले नव्हते ...
12 Apr 2015 - 4:23 am | hitesh
देशाची इतकी चिंता होती तर राष्ट्रपती, पं प्र ... महापौर , ... किमान आर्मीतला सार्जंट वगैरे होऊन आपले सल्ले प्रत्यक्ष्यात आचरणात आणुन दाखवायचे की.
12 Apr 2015 - 6:35 am | अत्रन्गि पाउस
कळले आपले म्हणणे ...
12 Apr 2015 - 9:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लंडनवरुन बॅरिस्टरकी करुन आलेल्या खर्या स्वातंत्र्यवीरांचं नाव ऐकलं की खांग्रेसमनोवृत्तीच्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आपली पापं उघडकीला येतील अशी भिती वाटायला लागते. त्या पक्षाच्या उदो उदो होणार्या प्रेषितांचं ढोंग उघड पडेल अशी शंका आली रे आली की हे लोकं "आआप" ला लाजवेल असा थयथयाट करायला लागतात.
+३२८९४७२३९८४७२३९८४७२३
13 Apr 2015 - 2:09 pm | चिनार
ते लंडनवरुन ब्यारिस्टरकी करुन आलेले आणखी एक वकील होते.
"स्वातंत्रवीर सावरकर " असं नाव लिहायला घाबरतात की काय आता नेहरू - गांधीच्या घरात चाकरी करणारे !
अच्छा हैं !अच्छा हैं ! ये डर होना चाहिये ... ये डर मुझे अच्छा लगा!
-- एक सावरकर भक्त !
11 Apr 2015 - 8:40 pm | डँबिस००७
केस लढवली म्हणुन २० वर्ष जासुसी करायची परवानगी मिळाली की काय ?
11 Apr 2015 - 8:54 pm | डँबिस००७
म्हणे आझाद हिंद सेनेच्या केसेस लढायला गेले होते.
Most of the INA. soldiers were set free after cashiering and forfeiture of pay and allowance.[6] On the recommendation of Lord Mountbatten of Burma, and agreed by Nehru, as a precondition for Independence the INA soldiers were not reinducted into the Indian Army.
http://en.wikipedia.org/wiki/Indian_National_Army_trials
11 Apr 2015 - 9:02 pm | डँबिस००७
काँग्रेस ब्रिगेड नेहरुंना लार्जर दॅन लाईफ बनव वाय चा प्रयन्त चालवलाय,
ब्रिटीशां बरोबर देश्याच्या स्वातंत्रासाठी सौदा केला म्हणुनच लाखो लोकांच बलिदान ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी मातीमोल करुन टाकल,
२० वर्षे नेताजीवर पाळत ठेउन होते, कारण कदाचीत ब्रिटीश परत येउन स्वातंत्र हिसकाहुन घेतील की काय अशी भीती होती की काय ?
12 Apr 2015 - 3:48 am | hitesh
आणि कुजबुज संघाचा प्रॉब्लेम हा आहे की लार्जर दॅन लाइफ करावीत अशी माणसेच त्यांच्या पार्टीत नाहीत.
12 Apr 2015 - 6:36 am | पॉइंट ब्लँक
होय एकदम बरोबर, राहुल गांधीसारखे नमुने नसल्याचं फार दु:ख होत असेल नाही संघाला? ;)
12 Apr 2015 - 9:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्वॉर्र!!! का माहिते का? कारण तिथे हातपक्षीय चाटुगिरी आणि व्यक्तीपुजेला अगदी आत्ता आत्ता पर्यंत महत्त्व दिलं जातं नव्हतं. ह्या निवडणुकीमधे नमो नमो केलं आणि ही व्यक्तीपुजेची पहिली आणि शेवटची वेळ असावी ही आशा.
13 Apr 2015 - 3:16 pm | निनाद जोशी
अ
13 Apr 2015 - 3:21 pm | काळा पहाड
अतिशय प्रबुद्ध आणि गूढ विचारांनी भरलेला प्रतिसाद. एक महाकाव्य लिहिता येईल याच्यावर. जगाचं सारं तत्वज्ञान या एका प्रतिसादात सामावलं आहे.
13 Apr 2015 - 9:46 pm | टवाळ कार्टा
ञ
12 Apr 2015 - 12:45 pm | डँबिस००७
ह्यांनी भगत सींगच्या कुटुंबावरही आय बी कडुन पाळत ठेवली होती अस आता समोर आल आहे ! भगत सींगच्या कुटुंबा कडुन ह्या काँग्रेसला काय धोका होता ?
12 Apr 2015 - 2:29 pm | प्रतापराव
हितेश,, नेहरूंनी आझाद हिंद्सेनेसाठी वकिली केली हि नवीन माहिती आहे. धन्यवाद . नेहरू बद्दल असलेला आदर अजूनच वाढला
13 Apr 2015 - 2:02 am | hitesh
मलाही ही माहिती नव्यानेच समजली होती. कुणी काही बोलु लिहु देत , पण नेहरु गांधी हे सदासर्वकालस्मरणीय आहेत.
13 Apr 2015 - 12:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
विनोदा, अरे थोडा मोठा हो रे.
१९४७ ते १९६८ ह्या काळात किती गृहमंत्री झाले ते येथे बघ.(http://en.wikipedia.org/wiki/Minister_of_Home_Affairs_%28India%29)
सी.राजगोपालाचारी,नंदा,यशवंतराव,गोविंद वल्लभ पंत.. तुझे वय ठाउक नाही पण ह्या लोकांचे स्वतःचे राजकीय वजन होते.ही मंडळी नेहरू भक्त नव्हती.
कुठल्याही व्यक्तीवर पाळत ठेवायची तर गृहखात्याची मंजूरी लागते,तेव्हा ह्या निर्णयात गृहमंत्री,गृहसचिव महत्वाची भूमिका बजावतात..'नेहरूंनी फर्मान काढले...' हे सनातन प्रभातमध्ये वाचायला ठीक आहे.पण नोकरशाहीत तसे नसते. तेव्हा पाळत ठेवली असेल तर वरील गृहंमंत्र्यांच्या परवानगीशिवाय ते अशक्य आहे.
कुजबूज आघाडीचे लक्ष्य फक्त नेहरू असल्याने वरील मंडळींवर ते टिका करायला धजावणार नाहीत. त्या फायलींमध्ये खरोखरच पाळत ठेवली होती असे असेल तर नरेंद्र,राजनाथने टी.व्ही.वर येऊन तसे सांगावे की.पण ते तसे करणार नाहीत.
वॉट्स अॅप,ट्वीटर्,इंट्ररनेट्च्या माध्यमातून अशा दुर्गंधीयुक्त फुसक्या सोडायच्या,जनमत आजमावायचे व न आवडणारी व्यक्तीमत्वे मलीन करायची.प्रकरण अगदीच अंगाशी आले की मग 'आम्हाला नेहरूंबद्दल आदर आहेच.." असे म्हणून काढता पाय घ्यायचा.
13 Apr 2015 - 1:33 pm | अनुप ढेरे
सहमत आहे.
13 Apr 2015 - 8:26 pm | hitesh
याच विषयावर धागा काढणारे इथले महोदय जाहीर माफी मागुन मोकळेही झालेत.
http://www.maayboli.com/node/53464
15 Apr 2015 - 8:03 am | अनिरुद्ध.वैद्य
तर डायरेक्ट पंतप्रधानांना रिपोर्ट करायची न? मग त्यांना काही करायचे असल्यास ते इतक्यांच्या परवानग्या घेण्यापेक्षा डायरेक्ट पंडितजींचीच घेतील का?
13 Apr 2015 - 12:50 pm | मृत्युन्जय
राष्ट्रीय संरक्षणाच्या अनुषंगाने, त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी अथवा इतर महत्वाच्या कारणासाठी कुठल्याही व्यक्तीवर जर पाळत ठेवली जात असेल तर मला त्यात काहीच चुकीचे वाटत नाही.
पाळत ठेवले जाण्यासारखी कुठली गोष्ट बोस कुटुंबानी केली होती ते माहिती नाही कदाचित असे असावे की सुभाषबाबु जिवंत आहेत अशी सरकारची खात्री असावी आणि सुभाषबाबु तेव्हा दुसर्या महायुद्धाच्या गुन्हेगारांच्या यादीत असल्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवली जाण्याची भारत सरकारला गरज वाटली असावी. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यक्तींवर सरकार पाळत ठेवत असते. त्यात गैर वाटण्याजोगे काही नाही.
हा ते गुजरात सरकारने कुठल्यातरी मुलीवर तिच्या सुरक्षेसाठी पाळत ठेवली होती म्हणुन काही मुर्खांनी मोदी सरकारवर टीका केली होती म्हणून आज भाजपा सरकारने नेहरुंवर टीका केलीच पाहिजे असे काही नाही.
14 Apr 2015 - 11:03 pm | खंडेराव
होरा हाच आहे. +१
15 Apr 2015 - 10:20 am | अनिरुद्ध.वैद्य
युद्धकैदी असल्यामुळे कदाचित त्यांना गुप्तजागी ठेवले असावे. दुसरे म्हणजे आमचे स्वामी म्हणतात तस त्यांस स्टालिननी फाशी दिली असावी. आज सकाळमध्ये त्यांच्या ड्रायव्हरचे मत आले आहे. तोही हेच म्हणत आहे.
13 Apr 2015 - 1:07 pm | लॉर्ड फॉकलन्ड
New document shows the Intelligence Bureau informed the British spy agency about Subhas Chandra Bose family snooping
http://indiatoday.intoday.in/story/nehru-snoop-subhash-chandra-bose-fami...
13 Apr 2015 - 1:29 pm | विनोद१८
... आणि काय नेहरुंना पावलोपावली गृहखात्याची मंजूरी घ्यावी लागे ??? बरेच अज्ञान गेले हो माझे माई.
13 Apr 2015 - 3:11 pm | टिनटिन
एक धूर्त चाल आहे. मोदीन्चे नेताजीन्च्या वारसाना germany ला भेटणे आणि त्याच वेळी हा रिपोर्ट येणे.
13 Apr 2015 - 3:23 pm | काळा पहाड
धूर्त नक्कीच आहे. पण प्रत्येक धूर्त चाल स्वार्थी नसते. (आणि प्रत्येक समाजवादी विचार हा समाजाच्या हिताचा नसतो.)
13 Apr 2015 - 3:25 pm | विनोद१८
...खरे सत्य काय ते जाणुन घेण्याचा जनतेला अधिकार आहे. ज्याचे अगोदर राजकारण झाले त्याचे नंतरही राजकारण होणारच.
13 Apr 2015 - 3:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी बरोब्बर बोललास रे टिनटिन्या.
http://www.ndtv.com/india-news/subhas-chandra-boses-grandnephew-to-meet-...
अगदी ठरवल्याप्रमाणे होतेय असे ह्यांचेही मत.
13 Apr 2015 - 4:10 pm | चिनार
सुभाष बाबूंच्या मृत्यू विषयीचा वाद काही वेळ विसरून जाऊ. पण आता संधी मिळालीच आहे तर कट्टर कॉंग्रेजींना काही प्रश्न विचारतो.
१. एकेकाळी कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) चे अध्यक्ष असलेले सुभाष बाबू कॉंग्रेस सोडून का गेले ? अशी कुठली परिस्थिती उदभवली होती ? बंर त्यांना थांबवण्याचे प्रयत्न का करण्यात आले नाही ?
२. आज राहुल गांधीसारख्याचे नेतृत्व मान्य असलेल्या कॉंग्रेजींना सुभाष बाबूंचे नेतृत्व का आवडले नाही ?
३. लोकमान्य टिळकांचा जहालमतवादी दृष्टीकोन कॉंग्रेजींना का पटला नाही ?
४. राष्ट्रीय सभेच्या जास्तीत जास्त राज्यस्तरीय नेत्यांचे मत वल्लभभाई पटेलांच्या बाजूने असताना चाचा नेहरू पंतप्रधान का झाले ?
या प्रश्नांची उत्तरे द्या . अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत !
13 Apr 2015 - 4:25 pm | काळा पहाड
जर काँग्रेजींना सुभाष बाबूंचं नेतृत्व आवडलं नसतं तर ते निवडूनच आले नसते. त्या काळी काँग्रेसमध्ये निवडणुका व्हायच्या आणि सुभाष बाबू तर महात्माजींच्या विरोधाला न जुमानता निवडून आले होते. सुभाष बाबूंचे खरे विरोधक (किंवा खरं सांगायचं तर प्रतिस्पर्धी) महात्माजी होते, नेहरू नव्हते. नेहरू तर त्यांच्या पेक्षा खालच्या फळीतील नेते होते.
13 Apr 2015 - 4:35 pm | चिनार
काळा पहाड
तुम्हाला प्रश्नाचा रोख कळला नसावा . अध्यक्ष झाल्यावर सुभाष बाबूंनी कॉंग्रेस सोडली याला अंतर्गत कलह कारणीभूत असावा. याचाच अर्थ सुभाषबाबूंचे विरोधक सुद्धा कॉंग्रेस पक्षात होते. ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ?
13 Apr 2015 - 4:52 pm | काळा पहाड
नाही, याला महात्माजींचा "मीच एकटा नेता" हा हेखेकोर पणा कारणीभूत होता.
http://www.quora.com/What-was-the-relationship-like-between-Mahatma-Gand...
Gandhi nominated Pattabi Sitaramayya, and suggested to Bose that he withdraw from the election so that Pattabhi can win uncontested. Bose however refused and this almost led to a split in the Congress.
...
Bose won the election. Gandhi however took a personal stand and declared that the loss of Pattabhi was his loss and Bose, saddened by this, submitted his resignation and formed the All India Forward Block, with Thevar and some of his supporters joining him.
'ही' काँग्रेस 'ती' काँग्रेस नाहीये.
13 Apr 2015 - 5:54 pm | hitesh
बोसांची मते ही युद्ध्ह आक्रमण वगैरे कोंग्रेसच्या विचाराविरुद्ध होती. कुणी अध्यक्ष झाला म्हणुन संघटनेFCC ए मूळ विचारच बदलू शकतनाही. म्हणुन बोसांना काँग्रेस सोडावी लागली.
काँग्रेसच्या लोकानी जरी बोसाना निवडले होते तरी बोस वेगळे झाल्हावर त्यांच्यामागे कुणीही काँग्र्द्सवाले गेले नाहीत. बोसाना स्वतंत्र संघट्ना बांधावी लागली.
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले.
सनातनवाले संघवाले हे सांगत नाहीत. कारण त्यांच्या अल्पबुद्धीची इतकी कुवत नाही.
13 Apr 2015 - 7:12 pm | रमेश आठवले
जर
"सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते - ."
तर
भारताची सर्वात मोठी डोके दुखी म्हणजे काश्मीर समस्या. नेहरुना ही समस्या निर्माण करता आली नसती .
17 Apr 2015 - 11:12 am | क्लिंटन
मी स्वतः भाजप समर्थकच आहे.पण मी भाजप समर्थक आहे म्हणून काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टींना नावे ठेवायलाच पाहिजेत किंवा नेहरूंना प्रत्येक गोष्टीमध्ये शिव्या घालायलाच पाहिजेत असे मला तरी वाटत नाही.
अनेकदा श्रेय द्यायची वेळ आली तर ते पटेलांचे आणि दोष द्यायची वेळ आली तर तो नेहरूंचा अशी सोयीस्कर विभागणी आधीच केलेली असते.सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न उभा राहिला नसता हे म्हणणे त्याचेच एक उदाहरण आहे. १ जानेवारी १९४९ रोजी भारताने काश्मीरात अगदी गीलगीट-मुझप्फराबादपर्यंतचा भाग जिंकून न घेता युध्दबंदी केली आणि म्हणून काश्मीरमध्ये नेहरूंनी घाण घातली हा नेहरू विरोधकांचा अगदी आवडता सिध्दांत असतो.पण त्याचवेळी सरदार पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जी हे दोघेही नेहरूंच्याच मंत्रीमंडळात मंत्री होते ही गोष्ट असे म्हणणारे लोक विसरतात.या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर नेहरूंबरोबर मतभेद असतील तर त्यांनी राजीनामा का दिला नाही? तोपर्यंत हैद्राबादचा कटकटा प्रश्न सुटला होता.इतर संस्थानांचेही विलीनीकरण झाले होते.देशातील दंगलीही थांबल्या होत्या. मग सरदार पटेलांसाठी काश्मीरपेक्षा मोठा प्रश्न सोडवायचा राहिला आहे म्हणून ते मंत्रीमंडळात राहणे गरजेचे होते अशी परिस्थिती होती का?तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही.तसेच शामाप्रसाद मुखर्जींनी नंतर एप्रिल १९५० मध्ये नेहरू-लियाकत अली खान कराराविरोधात राजीनामा दिला.म्हणजे ते स्वतंत्र बाण्याचे होते हे नक्कीच पण तरीही काश्मीरात युद्धबंदी करायच्या निर्णयाविरूध्द त्यांना राजीनामा द्यावा वाटला नाही.म्हणजे या निर्णयाला सरदार पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जी या दोघांचीही संमती होती असा अर्थ घेतला तर त्यात काय चुकले? आणि पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामे देण्याचे प्रकार कधी झाले नव्हते असेही नाही.
काश्मीरात युध्द ऑक्टोबर १९४७ ते डिसेंबर १९४८ असे १४ महिने चालू होते.सुरवातीला घुसखोर अगदी श्रीनगर विमानतळापर्यंत पोहोचले होते.विमानतळ जर त्यांच्या ताब्यात गेले असते तर काश्मीर वाचवणे भारताला जवळपास अशक्य झाले असते हे सर्वमान्य आहे. या १४ महिन्यांच्या काळात पाकड्यांना श्रीनगरपासून ७०-८० किलोमीटर्सपेक्षा जास्त मागे रेटता आले नव्हते.याची कारणे २०१५ मध्ये मुंबई-पुण्यात बसून भारतीय सैन्याने काय करायला पाहिजे होते असे बोलणार्यांपेक्षा नेहरू-पटेल-शामाप्रसाद यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे माहित होती याविषयी शंका नाही. माझ्या मते याची कारणे होती--
काश्मीर पाकिस्तानच्या बाजूने जास्त अॅक्सेसिबल होते.त्यामुळे दळणवळण, रसद यासाठी पाकड्यांना जास्त सोयीचे गेले. पण भारताच्या बाजूने या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रतिकूल होत्या. तसेच पाकड्यांना ते अधिक उंचीवर असल्याचाही फायदा होता.१९४७ मधील फाळणी, दंगली आणि मोठ्या प्रमाणावर आलेले निर्वासित यामुळे भारताला काश्मीरमधील युध्द अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणे शक्य नव्हते.
काही लोक असे म्हणतात की १९६५ मध्ये शास्त्रीजींनी केले तसे १९४७-४८ मध्ये भारताने करायला हवे होते. म्हणजे काश्मीरात जड जाते म्हणून पंजाबमधून आघाडी उघडून लाहोरला धडक मारायला हवी होती.त्यावेळी महासत्तांचा पाठिंबा पाकिस्तानला होता आणि भारताचे सैन्य प्रचंड प्रबळ असते/होते असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षातल्या मर्यादा राज्यकर्त्यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक होत्या.भारताने पाकिस्तानवर हल्ला केला म्हणून समजा अमेरिका-इंग्लंडचे सैन्य प्रत्यक्ष आपल्याविरूध्द आले असते (तसे व्हायची शक्यता होती की नव्हती हे २०१५ मध्ये मला जितके माहित आहे त्यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरू-पटेल आणि शामाप्रसाद मुखर्जींना जास्त माहित होते हे नक्की) तर आपल्याला पार्श्वभागाला पाय लावून पळत यावे लागले असते हे नक्कीच. आणि मग नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य धोक्यात आणले हा उलटा दोषही नेहरूंच्याच कपाळी आला असता. राज्यकर्त्यांना असे धसमुसळ्याप्रमाणे मनात आले म्हणून भावनेच्या भरात जाऊन हवे ते करता येत नाही.तर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि नक्की काय परिणाम होतील हे ध्यानात घेऊनच उचलावे लागते.
आता या परिस्थितीत सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्न सुटला असता म्हणजे नक्की काय झाले असते असे तुम्हाला म्हणायचे आहे?
तुम्ही नेहरूंच्या ३७० कलम, शेख अब्दुल्ला प्रकरण, चीन प्रकरणीचे धोरण इत्यादींवर टिका करत असाल तर मी सहमत आहेच.पण नेहरूंवर टिका करायची म्हणून प्रत्येक गोष्टीवर टिका केलीच पाहिजे हे काही मला पटत नाही.
17 Apr 2015 - 10:00 pm | अर्धवटराव
सैन्य शक्तीने आक्रमण करुन केवळ काश्मीरच नव्हे तर अक्खा पाकिस्तान जिंकायचा प्लॅन पटेलांकडे तयार होता पण त्याला नेहरुंनी हरकत घेतली. अन्यथा आज अखंड भारत अस्तीत्वात असता :D
17 Apr 2015 - 10:12 pm | संदीप डांगे
पटेलांना कुणी लहानपणी कॉम्प्लॅन पाजले नसेल त्यामुळे प्लॅन गुंडाळून ठेवावा लागला. काय पण लोक एकएक अफवा उकळत असतात.
क्लिंटनसाहेबांशी शंभर टक्के सहमत. त्या काळातल्या परिस्थितीचा अंदाज त्याकाळात त्या दालनात बसलेल्या लोकांना जास्त असेल. त्यांच्याकडे असलेली-नसलेली माहितीची उपलब्धता त्यांना माहिती. आपले निर्णय चुकले हे काळ 'नंतर' सांगतो. सर्वोच्च नेते झाले म्हणजे ते देव नव्हेत. आज ७० वर्षांनी हजार लोकांनी पुर्ण माहिती नसलेल्या विषयावर आपआपली मते मांडून आवडत्या नावडत्या नेत्यांना पाठीशी घालणे-टार्गेट करणे हे प्रकार म्हणजे करमणूकीशिवाय दुसरे काही नाही. ब्रेनवॉशिंग झालेली लोकं जेव्हा तावातावाने भांडतात तेव्हा हसावे का रडावे कळत नाही.
20 Apr 2015 - 11:27 am | रमेश आठवले
"याची कारणे २०१५ मध्ये मुंबई-पुण्यात बसून भारतीय सैन्याने काय करायला पाहिजे होते असे बोलणार्यांपेक्षा नेहरू-पटेल-शामाप्रसाद यांना नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे माहित होती याविषयी शंका नाही”
-माझ्या विधानाशी श्यामाप्रसाद यांचा सम्बन्ध नाही. त्यांना तुम्ही येथे का आणता आहात ?-
क्लिंटन साहेब , मी मुंबई-पुण्यात रहात नाही आणि भा ज पा चा सदस्य नाही.
आपण आपल्या मिसळपाव वर घेतलेल्या टोपण नावावरून अमेरिका वासी आहात असे वाटते .-
१. जो पर्यंत महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या कागदावर सही केली नव्हती तोपर्यंत भारत तेथे सैन्य पाठवू शकत नव्ह्ता. त्यांनी २६ ऑक्टोबर १९४७ ला सही केल्यावर तत्काळ पहिली सैन्य तुकडी विमानाने पाठविण्यात आली. पण तोपर्यंत कबायली श्रीनगर च्या जवळ पोचले होते .
२. कॉंग्रेस प्रादेशिक समित्यांनी पटेलांची निवड पंत प्रधान पदासाठी केली असताना , बहुमताला डावलून गांधींनी नेहरूंची निवड केली व सरदार पटेलांनी ती निमूट पणे स्वीकारली. तेच पटेल गांधीच्या संमती विना राजीनामा द्यायला तयार झाले असते का ?
३. संस्थानांच्या विलीनीकरणा बाबत अगदी सुरवातीला नेहरूंनी काश्मीरची केस स्वत:कडे राखून ठेवली. बाकी सर्व राज्यांचे विलीनीकरण पटेलांनी साम,दाम, दंड, भेद वापरून किती कुशल पणे केली हे सर्वाना माहित आहे. फक्त काश्मीरची बाब नेहरूंनी बिघडवली हे प्रत्यक्ष उदाहरणांनी पटण्यासारखे आहे.
४. नेहरूंनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी रेडिओवर केलेल्या भाषणात, पटेलांचा तीव्र विरोध असताना, काश्मीरमध्ये Plebiscite ला मान्यता दिली .
५ जवळपास ५०० संस्थानाने विलीन करण्याचे काम पटेल यांनी कौशल्याने आणि अल्पावधीत पूर्ण केले. या वरून काश्मीरचा प्रश्न पटेलांनी नेहरू पेक्षा पटेलांनी जास्त चांगला हाताळला असता आणि निकालात काढला असता असे माझे मत झाले आहे. क्लिंटन साहेबा सरख्या राजकारणाच्या गाढ्या अभ्यासकाला ते पटेल असा विश्वास मी व्यक्त करतो .
20 Apr 2015 - 7:03 pm | क्लिंटन
याविषयी मागे एका चर्चेत या प्रतिसादापासून नंतर लिहिलेल्या २-३ प्रतिसादांमध्ये सगळे मुद्दे मांडले आहेत. याउपर नवीन लिहिण्यासारखे काही नसल्यामुळे जुन्याच प्रतिसादाचा दुवा देत आहे.
20 Apr 2015 - 8:00 pm | हाडक्या
क्लिंटन भौ. याच्याशी १००% बाडीस. :) निम्मे जरी भाजपा समर्थक हा दृष्टीकोन स्वीकारायला तयार झाले तर आमच्यासारखे नोटा-मतदार तिकडे वळू शकतील ( आमच्या सातार्यात त्याचा शष्प फरक पडत नै तरी पण.. :))
एक मुद्दा निसटतोय तुमच्या ध्यानातून, तो म्हणजे तेव्हाचे भारत आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख हे ब्रिटीश होते आणि त्यांना दोन्ही देशाचे नवे प्रमुख "प्रथम आज्ञा" देऊ शकत नव्हते. ती खूप मोठी अडचण होती म्हणून तर पाकीस्तानने घुसखोर वगैरे वापरले (कारगील प्रमाणेच) आणि त्यांचे नंतरचे अत्याचार पाहून भारतास अधिकृत युद्ध सुरु करणे यासाठी गवर्नरास मान्यता द्यायला भाग पाडता आले (त्यावेळी पटेल व इतर मंत्रीपण हजर होते).
काश्मीर प्रश्नी एकंदरीतपणे असे म्हणता येईल की सुरुवातीस अखिल भारतीय नेतृत्व परराष्ट्र धोरणात्मक चातुर्यात कमी पडले तर पाकिस्तानने सुरुवातीस ते चातुर्य देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तमपणे दाखवले.
(इंग्रज नेहमीप्रमाणे "whats there for me in this" ह्या त्यांच्या नीतीने चालत राहिले असेच दिसते.)
13 Apr 2015 - 10:56 pm | काळा पहाड
इतिहास तसं सांगत नाही. तसं असणं कितीही अडचणीचं असलं तरीही. उगीच एका राष्ट्रीय मानकावर माहीत नसताना आघात करू नका.
१) आणि काँग्रेस संघटनेचा मूळ विचार तरी स्वराज्याबद्दल होता काय?
विकीमधूनः
The Congress was founded by Indian and British members of the Theosophical Society movement, most notably Scotsman, A.O. Hume.
The Congress was founded in 1885, claiming that it had the objective of obtaining a greater share in government for educated Indians and to create a platform for civic and political dialogue of educated Indians with the British Raj.
काँग्रेसचे विचार बदलत गेले होते आणि आहेत. तेव्हा 'मूळ विचार' वगैरे पोपटपंची सध्याच्या काँग्रेसच्या लोटांगणवाल्या कार्यकर्त्यांसमोर ठीक आहे. त्यात तसं ऐतिहासिक सत्य काही नाही.
२) १९२३ मध्ये बोस यूथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९३८ मध्ये ते काँग्रेस प्रेसिडेंट झालेत. मधला काळ पण ते वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या कार्यात अॅक्टीव्ह होते (http://en.wikipedia.org/wiki/Subhas_Chandra_Bose#With_Indian_National_Co...). अचानक कट केल्यासारखे ते प्रेसिडेंट झाले नाहीत आणि 'अचानक' त्यांनी राजीनामा पण दिलेला नाही. त्यांच्यासाठी जे घडलंय ते विचार पूर्वक. बोस हे आमचे हीरो आहेत. आणि राहतील. जसे भगतसिंग आहेत तसेच. तेव्हा उगीच त्यांच्याविषयी गरळ ओकू नका.
काँग्रेस एस काढायला हवी होती का त्यांनी? आणि मग निवडणुकीच्या काळात पुन्हा काँग्रेस बरोबर युती करायची? माफ करा, पण त्या वेळचे काँग्रेस नेते (आणि त्यांचे अनुयायी) वेश्यावृत्तीचे नव्हते.
बर मग?
तर मग काय?
हे असलं फालतू गरळ माझ्या प्रतिसादाला ओकू नका. नाही तर प्रतिसाद नाही लिहिला तरी चालेल.
14 Apr 2015 - 8:11 am | hitesh
बोस हे देशाचे हिरो आहेत. त्यांचे व काँग्रेसचे मार्ग भिन्न असल्याची परिणती त्यांच्या बाहेर पडण्यात झाली व इतर समविचारी लोक गोळा करुन त्यांनी स्वतंत्र संघटना बांधली. इतकेच मी लिहिले.
सत्तेत सहभाग ते संपुर्ण स्वराज्य असा काँग्र्सचा टार्गेटबदल झाला तरी सशस्त्र युद्ध वगैरे मार्ग मुख्यत्वेकरुन आधीही नव्हता व नंतरही नव्हता.
..............
अमुक तमुक यानी अमुक बाबांना देव मानु नये. तमुक धर्माच्या लोकाना मतदानाचा हक्क प्रदान करु नये. अमुकतमुक यानी प्रतिसाद लिहु नये......
भाजपे सरकारात आल्यापासुन कुणी काय करु नये हे सोमेगोमेही सांगू लागलेत नै.. त्यामुळे प्रतिसाद लिहावा का , कसा लिहावा याचे आमचे हक्क आम्ही आमच्याकडेच ठेवलेत . ते तुम्हाला दिलेले नाहीत.
14 Apr 2015 - 7:10 am | पॉइंट ब्लँक
अरेरे, अच्च झालं होय. उगी उगी!
14 Apr 2015 - 8:12 am | hitesh
..
14 Apr 2015 - 9:01 am | चिनार
ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ?
हितेश भाऊ !
जर वरील प्रश्नावर पण उत्तर द्या की हो
14 Apr 2015 - 9:18 am | hitesh
हो का ? मग तुमच्या पार्टीत आलेत ते मनेका आणि वरुण कोण आहेत ? आमचे तेवढे रावण आणि तुमचे मात्र बिभिषण का ?
14 Apr 2015 - 9:28 am | चिनार
कोण रावण ..कोण बिभीषण ?
प्रश्नाच उत्तर द्या हो...नाहीतर पास म्हणा ..
14 Apr 2015 - 9:47 am | कहर
का विचारताय चिनार भाऊ? राहुल गांधी सारख्या (स्त्री ) सक्षम नेतृत्वाने कार्यकर्त्यांना बोलायला तोंड ठेवलेच कुठे? Please let me answer your question about Mr Bose. cosider we bring RTI, we should focus on women empowerment, and we should look youth, My ancestors drop blood on the ground for nation bla bla bla......
sorry what is your question ?
14 Apr 2015 - 9:33 am | चिनार
आणि आमची पार्टी तुम्ही ठरवू नका !
जेवढं नरेंद्र मोदींना मानतो तेव्हढंच स्व. नरसिंह रावांना सुद्धा मानतो.
प्रश्नाचं उत्तर द्या फक्त
14 Apr 2015 - 9:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यांना जमणारे का उत्तर द्यायला? नाही म्हणजे ते युवराजांच्या डायनामिक ट्रेनिंग दिलेल्या स्पेशल टास्क फोर्समधले वाटतात इथे मला अर्णब गोस्वामी आणि रा.गां.ची मुलाखत आणि त्यातली उत्तरं आठवली आणि ड्वॉळे पाणावले.
14 Apr 2015 - 9:38 am | चिनार
अग्ग बाबो !.. नका हो ते आठवू
अर्णब बरेच दिवस त्या धक्क्यातून सावरला नव्हता म्हणे ! :-) :-)
14 Apr 2015 - 9:51 am | खंडेराव
आहे हो. गावागावात कॉन्ग्रेस्स आहे, नेहरु-गांधी परिवाराच्या पुढेही शिल्लक राहील. राहुल गांधी थोडे शहाणे होऊन परत आले तर बरे होईल. एक विरोधी पक्ष असावाच तगडा.
14 Apr 2015 - 10:23 am | hitesh
त्यांचा भारत फक्त फेसबुक , आयटी . मॉल , टोलनाका , मी गोडसेबोलतोय , गोहत्याबंदी , अयोध्या येवढ्यातच आहे.
14 Apr 2015 - 10:34 am | चिनार
हितेश भाऊ ...बरोबर !
फेसबुक , आयटी . मॉल -- ही सगळी प्रगती कोन्ग्रेस च्या राजवटीतचं तर झाली ! लोकसभा निवडणुकीच्या वेळेची जाहिरात आठवली (हर हात शक्ती ...हर हात प्रगती !) :-) :-)
बरं ते प्रश्नाच उत्तर पोष्टानी पाठवताय का ? नाही...पत्ता व्यनी करतो तसं असेल तर
14 Apr 2015 - 10:49 am | कहर
कॉंग्रेस चा आधुनिक भारत काय १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यावर १९४८ ला एका वर्षात आभाळातून पडला काय?
आणि चल तुमचे म्हणणे चूक असले तरी खरे माणू २ सेकंदासाठी. याच्या भारतात निदान एवढेतरी आहे जे सोशल आहे सामान्य जनतेचे आहे … तुमच्या भारतात साखर सम्राट, शिक्षण सम्राट, हवाला सम्राट, बोफोर्स सम्राट आणि घोटाळा सम्राट सोडून काय होते ते तरी सांगा. (चारा सम्राट विसरलो ).
14 Apr 2015 - 10:57 am | खंडेराव
एक यादी करा, या सर्व सम्राटांची. बघा एखादा पक्ष सुटतो का.
हो, आणि मप्र, कर्नाटक या राज्यात भाजप च्या कारकिर्दीत काय कमी घोळ झालेत का? सम्राट आणि घोटाळे हे काय डिफ्फरनटिएटर नाहीत.
14 Apr 2015 - 11:09 am | कहर
अहो ते घोटाळे कॉंग्रेसच्या राज्यात भाजपाच्या लोकांनी केले म्हणून जास्त उचलले गेले…. खरे खोटे त्यांचे त्यांना माहित… पण मी ज्या घोटाळ्यांचे बोललो ते कॉंग्रेसच्याच राज्यात कॉंग्रेसच्याच लोकांनी केले… म्हणजे दाबून टाकायचा प्रयत्न होऊनही एवढे वर दिसतायत तर हिमनगाचा फक्त १/७ भाग वर दिसतो तसे अजून खाली किती गहन असतील काय माहित
14 Apr 2015 - 11:30 am | खंडेराव
समजुन सांगा जरा. कॉंग्रेसचे राज्य? बंगारु लक्ष्मण आठवतात का?
15 Apr 2015 - 8:37 am | अनिरुद्ध.वैद्य
कायी झाल की बंगारुच ;) पण त्येंच प्रकरण लैच छोत्तुस होत वाटते. आपली कॉंग्रेसी लोकांची प्रकरणांची लिष्ट काढली त काय पैल्या पाचात तरी येईल का नी माहिती नाही.
15 Apr 2015 - 10:30 am | खंडेराव
किती वर्स सत्ता होती कॉंग्रेस ची? हिशोब कसला करताय?
जेवढे घोळ कॉंग्रेसने ३०-४०-५० वर्षात घातले तेवढे बिजेपी ने ५-७ वर्षात घालायची अपेक्शा होती कि काय तुमची :-) ?
मी आधीही लिहिले आहे, भ्रष्टाचार हा डिफरनटिअटर नसावा या दोघांमध्ये
14 Apr 2015 - 10:28 am | चिनार
खंडेराव !
खेड्यापाड्यात कोन्ग्रेस म्हणजे इंदिरामायची कंपनी अशीच ओळख आजही आहे. सोनिया गांधीला ते लोकं इंदिरामायची ववळि (ववळि म्हणजे ग्रामीण भाषेत सून!) असंच ओळखतात . आधार कार्ड योजना जेंव्हा सुरु झाली तेंव्हा पहिले आधार कार्ड नंदुरबार जिल्ह्यातील एका खेडेगावातल्या महिलेला सोनिया गांधींच्या हस्ते देण्यात आले. त्याच गावातल्या लोकांना सोनिया गांधींची ही ओळख आहे .
14 Apr 2015 - 10:42 am | खंडेराव
अहो, गेल्या साठ वर्षात जे काय भले बुरे झाले, त्यात हाताचा हात होताच.
खेड्यात लोक वेडे असतात, आणि इंदिरामायच्या नावावर सत्ता येत राहीली, असे समजने पुर्ण चुकीचे आहे. तळागाळापर्यंत सत्ता पोहोचली ६० वर्षात.
१९४० च्या दशकात किती देशांना स्वातंत्र मिळाले? आज ते कुठे आहेत? तुलना बघावी.
एक येवढा अवाढ्व्य देश, विविधतेने भरलेला, चालवणे, हे काय कमी नाही.
काय आहेना, चु़कींबद्दल अवश्य टोकावे,सत्ता काढुन घ्यावी, पण सतत कॉन्ग्रेसला शिव्या देणे बरोबर नाही.
14 Apr 2015 - 10:59 am | चिनार
खंडेराव ,
१०० टक्के सहमत..
देशाच्या झालेल्या प्रगतीत हाताचा हात नक्कीच आहे. पण परिस्थिती हाताबाहेर चालली होती हो. गेल्या दहा वर्षात तर देश जागच्या जागी उभा आहे. सोनिया गांधीच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या चौकडीने वाटोळ केलं की हो देशाचं. त्यांना फक्त गांधीचं नाव हव आहे. बाकी काही नको. हाच गांधींच्या स्वप्नातला भारत आहे का ? मला तरी वाटत नाही. आणि असेल तर गांधींच ते स्वप्न आम्हाला मान्य नाही.
14 Apr 2015 - 11:32 pm | खंडेराव
आहे, पण सोयीच्या हिशोबाला विरोध आहे चिनार..
बाकी गांधीच्या स्वप्नातला भारत मोदीजी आणतायेत. त्यांना शुभेछ्चा देउयात, आणि पुढे जाउयात..
14 Apr 2015 - 11:03 am | कहर
जयदेव मार्तंडा … तुम्ही देशाचे geographical स्थान बघा. उपलब्ध Resources बघा … काहीही नसताना जपान, कोरिया आणि जर्मनी सारखे देश कोठे पोचले. त्यामानाने अजून किती प्रगती व्ह्यायला हवी होती तोही विचार करा न … शाळा कॉलेज हॉस्पीटल आणि इतर basic facilities कॉंग्रेस सरकार ने दिल्या पण त्याचा गवगवा म्हणजे तेवढेही द्यायची इच्छा नव्हती कि काय ?
14 Apr 2015 - 11:23 am | खंडेराव
अहो खायची मारामार होती हरितक्रांती होइपर्यंत. कोणते रिसोर्सेस सांगताय? भिकेवर जगायचो आपण दुष्काळात.
येवढ्या मोठ्या देशाला जगवने हे ही कामच होते. जरा समजुन घ्या कि आपण जगाच्या तुलनेत कुठे होतो.
१०-१५% लोकसंख्या सुशिक्शित असेल १९४० ला.
जपान, जर्मनी, कोरिया या तुलना योग्य नाहीत. ५-१५ कोटी लोकसंखेचे देश हे. त्यात जपानी/जर्मन लोकांचे कौतुक कि महायुद्धानंतर सावरले. तंत्रज्ञानातील प्रगतीत हे दोन्ही कधीपासुनच आपल्या पुढे होते. आणि, हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे,
हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन.
थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत?
14 Apr 2015 - 11:32 am | अत्रन्गि पाउस
हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे,हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन.
+१००
थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत?
त्यांच्याशी तुलना नकोच...
प्रोब्लेम राज्यकर्त्यांमध्ये होता पण आपली समाजरचना / राष्ट्र्भान वगैरे चिंत्य प्रकार होते (अजूनही आहेत)...
14 Apr 2015 - 11:42 am | कहर
अहो पण स्वातंत्र्य मिळवण्यासारख्या उदात्त राष्ट्र्भावानेने प्रेरित असलेल्या लोकांच्या मनात स्वताच्याच राज्यकर्त्यांबद्दल एवढी घृणा निर्माण होण्याचे कारण काय हो… जर प्रगती दिसत होती तर राष्ट्रभावना आणि अभिमान वाढायला हवा होता… काहीतरी असे झाले असेलच ना ज्यामुळे जी राष्ट्रभावना जपान आणि कोरियाने जपली ती आपल्याला जपता जोपासता आली नाही देशात सर्वत्र समान प्रगती करून सर्व राज्यसमभाव, सर्व धर्मसमभाव जोपासत आला असता. मुंबईचा विकास साधताना नागालॅंडचा एवढा विसर पडला कि ते राज्य भारतात आहे हेही लोक विसरले. मुस्लिम मतांसाठी दलित मतांसाठी त्यांच्या कलाने कायदे केले कि इतर धर्म जातीत जन्माला येणे लोकांना पाप वाटावे. अशी विषमता पसरवली गेली याची जबाबदारी कोण घेणार.? मी मान्य करतो कि पहिली ५-६ वर्षे कोन्ग्रेस ने केलेही असेल समाजकारण पण नंतर फक्त आणि फक्त राजकारण आणि अर्थकारणच केले याला कोणी नाकारू शकते का ?
14 Apr 2015 - 11:27 pm | खंडेराव
ही घृणा तुम्च्या मनात आहे, माझ्या मनात आहे, पण देशाच्या मनात नाहीये. फार जनरलायझेशन होतय आपल्या भावनांचे.
२०१४ सार्वत्रिक निवडणुकात भाजपाला ३१ आणि कॉ.ला १९ ट्क्के मिळालीत मते.
किती विरोधाभास एकाच वाक्यात :-) अहो, एकीकडे समान विकासाची कथा सांगताय, आणि दुसरीकडे हे.
माहीतीसाठी २ आकडे - सेक्रेटरीलेवल ( सेंट्रल गव. सर्वोच्च ) १४० अधिकार्यात एकही दलित नाही, भाप्रसे मधे ३% जास्त मुस्लीम पास होत नाहीत.
भारतिय लोकसंख्येत १३.४% मुस्लिम आहेत आणि १६.६% दलित. किती वाटा दिलाय बघा आपण.
( आरक्षण नसलेला आरक्षण समर्थक )
खंडेराव
15 Apr 2015 - 9:52 am | कहर
अहो तुम्ही समजला नाहीत. मी सर्वांचा समान विकासाबाद्दलाच बोल्तोय. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे झाली तरी मनुष्य जन्माधिष्टीत म्हणजे जातीवर आधारित कायदे आणि आरक्षणे हवीच कशाला ? म्हणजे लायकी नसून आरक्षित लोकांनी पुढे जावे आणि अनारक्षित लोकांनी भविष्य काळात मागासवर्गीय व्हावे असेच ना ? जास्त टक्केवारी असून जागा उपलब्ध नसल्याने शिक्षण घेत न आलेले आणि ४५% ने पास होऊन रडत खडत engineer होऊन पुन्हा सरकारी नोकरीवर आरूढ झालेले अशी किती उदाहरणे आहेत. मी मुंबई आणि नागालॅंड म्हणलो म्हणजे जेव्हा आपण मुंबईचा विकास करत गेलो त्याच्या सोबतच नागलंडचा विकास व्ह्यायला हवा होता. एकावेळी एकाला झुकते माप देणे म्हणजे 'बोका माकड आणि लोण्याचा गोळा' या गोष्टीसारखे होईल
(समान नागरी कायद्याचा पुरस्कर्ता )
कहर
15 Apr 2015 - 8:48 am | अनिरुद्ध.वैद्य
कॉंग्रेस स्वातंत्र्यानंतर असलेली राष्ट्रभावना टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरली असे म्हणायचे आहे का? जवळपास ३० वर्षे कॉंग्रेस सत्तेत होती, तरीही असे आपण लिहित असाल तर कॉंग्रेस प्रचंड अयशस्वी झाली आणि फक्त पैसे खाण्यात त्यांना रस उरला असे जे विरोधक म्हणतात ते खरे मानावे का?
15 Apr 2015 - 8:39 am | अनिरुद्ध.वैद्य
सहमत!
14 Apr 2015 - 9:44 am | चिनार
याच गांधींना नेहरूंचा सत्तापिपासू रोग लक्षात आला नाही का हो ?
बरं स्वातंत्र्य मिळाल्यावर "राष्ट्रीय सभा " विलीन करा अशी गांधीजींची इच्छा होती म्हणे ...६० वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून ..नाही म्हटलं "शुभस्य शीघ्रम!"
14 Apr 2015 - 11:07 am | चिनार
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले.
च्याआयला हे बरंय ! वाटेल तेंव्हा एखाद्या माणसाचा आजार शोधायचा. जेवढे २-३ वर्ष ते जगले तेव्हढ्या काळात पूर्ण भारत संस्थान मुक्त केला त्यांनी. नेहरूंनी कमीत कमी स्वत: च्या पक्षातली घराणेशाही तरी संपवायची होती
14 Apr 2015 - 12:07 pm | मृत्युन्जय
गांधी नेहरुंच्या पलीकडे कॉग्रेसचे अस्तित्व काँग्रेसींनाच सहन होत नाही. त्यांना स्वतःवर नेहमीच एक गांधी नेहरु लागत. सध्यातरी राहुल गांधी ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. त्याला एकाएकी बाजूला करता येणार नाही. त्याच्या ऐवजी कदाचित प्रियांकाताईंचा करिष्मा त्यांना वाचवु शकतो पण त्यासाठी ताईंचीच मानसिक तयारी नसावी असे दिसते. शिवाय जावईबाप्पू पण सध्या बर्याच प्रकरणात अडकले आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होउ शकत नसावे.
14 Apr 2015 - 11:00 am | मृत्युन्जय
बाकीचे प्रश्न राहु देत बाजुला. तुम्हाला जी सुभाष बाबू आणि गांधीजींची काँग्रेस अपेक्षित आहे ती आज अस्तित्वात आहे कुठे? तीच जर नसेल तर बाकीचे प्रश्नच गैरलागू आहेत.
13 Apr 2015 - 4:20 pm | होबासराव
ग्रेट्थुंकर,टॉ.गी.फी,नाना,हितेसभाय्,सचिन आणि माई..... and counting
13 Apr 2015 - 4:49 pm | नाखु
यांची लक्षणे येथे नमूद आहेत वर्गवारी (क्रमांक १,२,७,१० आणि १४)सवडीने वाचा आणि नंतर तुम्हीच ठरवा काय ते
13 Apr 2015 - 8:01 pm | डँबिस००७
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
सरदार पटेलांची लाईफ एक्स्पेक्टंसी कमी होती हे समजले होते की ठरवले होते ? एव्हढा मोठा नेता हॉस्पिटल मध्ये जाण्या ऐवजी निसर्गोपचार केंद्रात उपचार का घेत होता ? का तस ठरवल होत ?
गांधीनी चालवलेली निसर्गोपचार केंद्र संस्था काय श्वसन विकारावर उपचार करणारी अधिकृत संस्था होती ?
लाल बहादुर शास्त्रीही अल्प वयीन ठरले त्या मागे ही असेच तर्क आहेत काय ?
13 Apr 2015 - 8:16 pm | hitesh
निसर्गोपचार अधिकृत आहेत.
http://nisargopcharashram.org/
http://nisargopcharashram.org/aboutus.html
13 Apr 2015 - 8:06 pm | डँबिस००७
सुभाष चंद्र बोसना काँग्रेसमध्ये वर आणण म्हणजे गांधींजीच्या अहिंसे मुळे भारताला स्वातंत्र मिळाल ह्या मुळ संकल्पनेलाच धक्का बसला असता. आणि म्हणुनच ++ Gandhi however took a personal stand and declared that the loss of Pattabhi was his loss ++
14 Apr 2015 - 6:40 am | आनन्दिता
नेताजींच्या कुटूंबावर पाळत ठेवण्याचा वारसा सांगणारा गांधी/नेहरु परिवार आता आपल्या कुटुंबाचा कुलदिपक अधिवेशन सोडून मध्येच कुठे गायब होतो हे सांगु शकत नाही. काय हा विरोधाभास.. !!
छ्या छ्या कुळाचं नाक कापलं अगदी. :)
14 Apr 2015 - 9:42 am | खंडेराव
सवरता इसम कारणे सांगु शकेल का पाळतीची, कि उगाच पाळत पाळत म्हणुन गोळीबार चालु आहे?
अवांतर. माहीतीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Japanese_occupation_of_the_Andaman_Islands
14 Apr 2015 - 12:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य प्रश्न विचारलास रे खंडेरावा.
बोस ह्यांच्या नातेवाईकांच्या खांद्यांवर बंदूका ठेऊन नेहरूंवर गोळीबार चालु आहे असे ह्यांचे मत.
15 Apr 2015 - 2:00 am | काळा पहाड
मै,
कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कुणावर गोळीबर करत आहे यात आम्हा सामान्यांना स्वारस्य नाही. शाळेपासून बोस आम्हा भारतीयांचे आवडते हीरो आहेत. जर असं समजलं की नेहरूंचा नेताजींच्या स्टालीनकडून होणार्या अटकेत सहभाग होता आणि / किंवा स्टालीननं त्यांना अटक करून यातना दिल्या, तर मी एक भविष्यवाणी करतो. न भूतो न भविष्यती अशी दंगल उसळेल आणि गांधी नेहरू परिवार आणि त्यांचे चमचे त्यात होणार्या रक्तपातात बुडवून टाकले जातील.
15 Apr 2015 - 6:45 am | hitesh
दंगल घडवायची वाटच बघत बसलाय की ! तुमच्या वरुण आणि मनेकांचं काय करणार ?
नेहरु सत्तेत असताना , नेहरुंचा खुनात सहभाग असल्याचा पुरावा असणार्या फायली म्हणे नेहरुच वीस वर्षे गुप्तपणे सांभाळत बसले होते. ! अब्बास मस्तान किंवा जावेद अख्तारही इतकी ढिसाळ
रहस्यकथा लिहित नसतील.
http://en.m.wikipedia.org/wiki/Death_of_Subhas_Chandra_Bose
नेताजी गुप्तपणॅ जात होते.. नेहरुनी स्टालेनला आधीच कसे कळवले ?
15 Apr 2015 - 8:45 am | काळा पहाड
हितेशभौ, मराठी शब्दांचा अभ्यास वाढवा. 'भविष्यवाणी' हा शब्द 'योजना' या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. बाकी ते वरूण आणि मनेका 'आमचे' नाहीयेत. बीजेपीचे आहेत. ते तुमचे आणि आमचे तुम्ही चालू ठेवा. मला त्यात ओढू नका.
नसतील बुवा. जो माणूस शिवाजी महाराजांना 'लुटारू बंडखोर' संबोधतो, महाराष्ट्राच्या बाळगळ्याला नख लावण्याचा विचार करतो, आपल्या जावयाला गांधी आडनाव फक्त राजकारणी विचारांसाठी घ्यायला बाध्य करतो, काश्मीर मध्ये सार्व मत घेण्याची घोषणा करून भारताला काश्मीर प्रश्नात लंगडं करतो, धोरणबंधुता नावाच्या फालतू विचारांतून चीनवर अकारण भरवसा ठेवून युद्ध ओढवून घेतो आणि ते हरतो आणि मग एवढं नुकसान करून मरून जातो त्या माणसाबद्दल मला ना आदर आहे, ना काही विश्वास. तो माणूस काहीही करू शकतो.
तुम्ही थोडा इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला आहे. अशा वाक्यांतून तुमचा बालिशपणा दिसतो. सध्या एवढंच.
15 Apr 2015 - 1:44 am | काळा पहाड
15 Apr 2015 - 10:38 am | खंडेराव
भारीच आहे :-)
अशी पत्रे नेहरु लिहित असतील :-) हा हा हा!
हे पुस्तक कोणते आणि लेखक कोण पहाडसाहेब?
15 Apr 2015 - 12:24 pm | काळा पहाड
श्याम लाल जैन हे नेहरूंचे स्टेनोग्राफर होते. नेताजींच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यासाठी आत्तापर्यंत ४ समित्या नेमल्या गेल्या. १९७० मध्ये जी खोसला कमिशन नं चौकशी केली त्यापुढे श्याम लाल जैन यांनी शपथेवर साक्ष दिली आहे की हे पत्र त्यांनी टाईप केलं आणि जे नेहरूंनी स्टालीनला १९४५ मध्ये पाठवलं. या पत्रानुसार २ गोष्टी सिद्ध होतात: १. नेहरूंना बोस पकडले गेलेत, त्यांचा मृत्यू झालेला नाही आणि ते रशियाच्या कैदेत आहेत हे माहिती होतं. २. नेहरू नेताजींबद्दल अतिशय तिरस्काराने लिहितायत - "तुमचा युद्ध गुन्हेगार" असं ते ब्रिटिश पंतप्रधानांना लिहिताहेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी. नेहरूंच्या पूर्व स्टेनोग्राफर नं १९७० मध्ये अशी साक्ष देण्यात जर ती खोटी असेल तर त्या स्टेनोग्राफर्चा काय फायदा असावा? बरं ही साक्ष शपथेवर एका कमिशन समोर दिलेली आहे. हा एखादं पुस्तक खपवण्यासाठी उगीचच केलेला सेन्सेशनल क्लेम नाहीये.
या पुस्तकात ही माहिती फक्त उधृत केलेली आहे. आणि हा मुद्दा मला हसण्यावारी नेण्यासारखा वाटत नाहीय.
15 Apr 2015 - 12:37 pm | खंडेराव
भाषा बघुन पत्र अगदी गंडलेले वाटले. जो माणुस आयुष्यभर युरोपियन चालिरिती पाळत राहिला तो काय असे लिहिणार नाही.
मी माहिती मिळवतो अजुन..
पुस्तकाचे नाव सांगता येइल का?
15 Apr 2015 - 2:08 pm | काळा पहाड
हे पुस्तकातलं आधीचं पानः हे "रिप्रॉडक्शन फ्रॉम मेमरी" आहे. त्यांना साधारण २५ वर्षांनंतर जसं आठवलं तसं ते सांगतायत.
15 Apr 2015 - 12:55 pm | खंडेराव
आणि सर्व conspiracy theories वाल्यांचे कौतुक वाटले. सादर प्रणाम!
पहिली कमिटी - नेमली नेहरुंनी.
कोण होते कमीटीत ?
शाह नवाझ खान - ( Khan led the army into North Eastern India, seizing Kohima and Imphal which were held briefly by the INA under the authority of the Japanese.[1] In December 1944 Shah Nawaz was appointed as Commander of the No. 1 Division at Mandalay ) नेताजींचे अगदी जवळचे सहकारी. यांना फाशीची शिक्शा झाली होती INA खटल्यात.
सुरेशचंद्र बोस - नेताजींचे मोठे भाऊ.
एस एन मैत्रा - हे ICS अधिकारी होते.
आता, नेहरुंनी नेताजींना गायब केले, ते दोषी आहेत या प्रकरणात, हे माननार्यांनो, ही अशी कमिटी कशाला बनवली असती त्यांनी?
जसे जसे अजुन कळेल तसे लिहिलच..
15 Apr 2015 - 1:49 am | काळा पहाड
15 Apr 2015 - 1:53 am | काळा पहाड
Bose, Not Gandhi, Ended British Rule In India: Ambedkar
http://swarajyamag.com/politics/bose-not-gandhi-ended-british-rule-in-in...
15 Apr 2015 - 6:50 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बाबा रे काळ्या पहाडा, अनेक कहाण्या आहेत अशा. विश्वास पाटील ह्यांच्या 'महानायक'मध्ये काय म्हंटले आहे ?
हे "sources said" वगैरे ठीक असते पण ठोस पुरावे लागतात की नाही?ह्या sources ना जनतेपुढे,जगापुढे येऊन सरळ बोलायला काय प्रॉब्लेम होता/आहे? नेहरू फाशी देणार होते?
अपघात झालाच नाही (जर झाला असलाच तर हात नेहरूंचा!),ते रशियाला गेले...वेश करून भारतात फिरता आहेत... चालु द्या..
गांधी,काँगेसचे नेताजींबरोबर मतभेद जाहीर होते.म्हणूनच त्यांनी कॉन्ग्रेस सोडली.कट करून कोणी कोणाला संपवण्याचे राजकारण ते नव्हते.
15 Apr 2015 - 12:37 pm | काळा पहाड
माई, निदान नेहरूंनी बोस आणि भगतसिंग कुटुंबियांवर पाळत ठेवली हे तर खरं आहे की नाही? पुरावे असते तर आपण इथं बोलत बसलोच नसतो. पण या फाईल्स डिक्लासिफाय झाल्या नसत्या तर नेहरू हे असं करू शकतात हे सुद्धा तू हास्यास्पद ठरवलं असतंस. नेहरू अशी पाळत ठेवू शकत नाहीत'च' असं बोलली असतीस. आता सांग नेहरू (ज्यांच्याबरोबर नेताजींचे फक्त 'मतभेद' होते) त्यांच्या बाबतीत असं कसं करू शकतात?
15 Apr 2015 - 2:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बरे मला सांग काळ्या पहाडा, पाळत ठेऊन नक्की त्यांना काय फायदा आहे?नेताजीनी कॉन्ग्रेस सोडली तेव्हा कॉन्ग्रेसमधले काहीजणच त्यांच्याबरोबर गेले.सगळी कॉन्ग्रेस गेली नाही.तेव्हा नेहरूंना राजकीय पाठिंबा हा बराच होता.अगदी १९६४ पर्यंत.
बोस ह्यांना हिरो म्हणताना ईतरांना व्हिलन केलेच पाहिजे असे नाही.असे ह्यांचे मत.
15 Apr 2015 - 3:14 pm | विनोद१८
तु विचारलेस काळ्या पहाड्याला, ते असे :-
तुला जर ह्या प्रश्णाचे खरेखुरे उत्तर हवे असेल किंवा खरी वस्तुस्थिती जाणुन घ्यायची असेल तर त्यासाठी तुला तुझ्या लाडक्या मयत चाचांकडे वरच्या लोकात जावे लागेल. माझ्या मते तु तसेच करावेस, तिकडे जावेस, चाचांची मुलाखत घ्यावीस व सगळा व्रूत्तांत यालोकी मिपावर मेलवर पाठवावास. म्हणजे आम्हा सर्वांचे अज्ञान दुर होइल शिवाय असे केल्याचे कधी नव्हे ते पुण्य तुला लागेल ते निराळेच.
15 Apr 2015 - 4:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बाबा रे विनोदा, उत्तर कुजबुज आघाडीला ह्वे आहे.नरेंद्र परतला की तूच का नाही रे गळ घालत राजनाथ्ला,नरेंद्रला?
त्या ज्या काही फाईल्स आहेत त्या घेऊनच ये म्हणावे टी.व्ही.वर.
15 Apr 2015 - 4:44 pm | काळा पहाड
माई, या आयबीच्या फाईल्स डिक्लासिफाय 'झाल्या' आहेत. याच्यात राजनाथ आणि नरेंद्रांचा काही संबंध नाही.
Two recently declassified Intelligence Bureau (IB) files have revealed that the Jawaharlal Nehru government spied on the kin of Netaji Subhas Chandra Bose for nearly two decades.
The files, which have since been moved to the National Archives, show unprecedented surveillance on Bose's family members between 1948 and 1968. Nehru was the prime minister for 16 of the 20 years and the IB reported directly to him.
http://indiatoday.intoday.in/story/jawaharlal-nehru-netaji-subash-chandr...
15 Apr 2015 - 6:40 pm | hitesh
मग पुढची चार वर्षे पाळत कोण आणि का ठेवत होते ?
मुळात या इंग्रजी वाक्यांमध्ये सर्वेलन्स आणि स्पायिंग असे दोन शब्द आहेत.
आमच्या मेडिसिनच्या भाषेतही सर्वेलन्स हा शब्द येतो. पaण ते एखाद्याच्या किंवा समाजाच्या भल्यासाठी असते.
स्पायिंग हे गुप्तपणे करतात.
15 Apr 2015 - 5:25 pm | काळा पहाड
मग त्यांनी पाळत का ठेवली होती? माई, तुला असं वाटतंय का की त्यांनी पाळत ठेवली होती ही 'कुजबूज' आहे? काँग्रेजींच्या दुर्दैवाने तसं नाहीये. ती डॉक्युमेंटस डिक्लासिफाय झालीयत. आय बी ने पाळत ठेवली गेली होती असं ही डॉक्युमेंट्स सांगतात.
नॅशनल हीरो च्या घरच्यांच्या वर पाळत ठेवणारा माणूस काय लायकीचा असावा मग?
बर मग यानं काय सिद्ध होतं?
15 Apr 2015 - 8:08 am | अनिरुद्ध.वैद्य
हे पुरावा होऊ शकत नाही. ह्यांनी जे छापलंय त्या पत्र्यांच्या दुसर्या प्रती कोण्या दुसऱ्या स्रोताकडे मिळू शकतील काय?
15 Apr 2015 - 8:32 am | काळा पहाड
अर्थातच नाही. तो पुरावा असता तर काय हवं होतं. पण या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच आम्ही पहातोय. असंही बोललं जातंय की इंदिरा गांधी सरकारनं यातल्या महत्वाच्या पुराव्याच्या फाईल्स कोणतीही कॉपी न सोडता नष्ट केल्या. याच्या कॉपीज कदाचित इंग्लंड मध्ये सुद्धा बहुधा नष्ट केल्या गेल्यात. तरी सुद्धा सध्या ज्या फाईल्स गुप्ततेत ठेवल्या गेल्यात त्या संशोधकांसाठी उघड केल्या जायलाच हव्यात. त्यातून काही धागेदोरे हाती लागतीलही कदाचित. मुळात एका राष्ट्रीय हीरो बद्दल अशा फाईल्स गुप्त ठेवणं हाच एक कट आहे.
15 Apr 2015 - 8:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या फाईल्स उघड झाल्या तर एका विशिष्ट पक्षाचं दुकान बंद होईल की.
15 Apr 2015 - 8:45 am | अनिरुद्ध.वैद्य
आत्तापर्यंत जळल्या असतील त्या.
15 Apr 2015 - 9:43 am | hitesh
तुला गवत खाणार्या गायीचे चित्र काढायला लावले होते ना ? गवत कुठे आहे?
.... गायीने खाल्ले .
अआणि गाय कुठे आहे ?
... गाय पळून गेली.
...,......................
नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ?
नेहरुंच्या फायलीत.
फायली कुठे आहेत ?
आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या.
...........
गोमाता की जय !
15 Apr 2015 - 4:50 pm | होबासराव
A government panel is likely to decide tomorrow on whether to declassify more files on Netaji Subhas Chandra Bose. There are about 58 files linked to Netaji with the Prime Minister's Office and about 25 with the External Affairs Ministry.
http://www.ndtv.com/india-news/will-more-netaji-files-be-made-public-gov...
तुमच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने जर या फाईल्स डीक्लासीफाय झाल्या तर मग तुम्हाला गाय, गवत आणि त्या सोबत गाई ने टाकलेला पौटा हि दिसेल्.. मग बघुया.
15 Apr 2015 - 1:29 pm | होबासराव
कि एकच व्यक्ति प्रत्येक वेळेला अशा धाग्यांवर किति डु आय डि वापरुन प्रतिसाद देत असते. पण त्यांचा प्रॉब्लेम हा आहे जो कोणि दुसरी बाजु मांडायचा प्रयत्न करतो तो त्यांच्या लेखि भाजपा चा समर्थक असतो.
15 Apr 2015 - 2:15 pm | अत्रन्गि पाउस
आता हे फारच स्पष्ट होऊ लागलेय ..
15 Apr 2015 - 2:33 pm | विनोद१८
..नुसते भाजपाचे समर्थक म्हटले तर समजु शकते हो, परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचा कायम असलेला परकोटीचा 'हिंदुद्वेष्टेपणा' अगदी सुपारी घेउनच आल्यासारखे. त्यांच्या आजवरच्या प्रतिसादाने लक्षात येते कि ते हिंदु नाहीतच, हे हिंदु रक्त नव्हेच. ते नक्कीच गैरर्हिंदु असावेत हिंदु नावांचा आधार घेतलेले 'डु.आय्.डी' इथे असे बरेच 'शिखंडी' असावेत.
15 Apr 2015 - 5:14 pm | होबासराव
"सहमत. लबाडी हा हिंदु धर्माचा स्थायीभाव आहे." हा प्रतिसाद हजरत हितेसभाय बुखारी (विखारी) आणि कं.
ह्याचा आहे, गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक ) ह्या धाग्यावर.
15 Apr 2015 - 2:51 pm | होबासराव
१ नंबर बोललात... राजकिय विरोधि पक्ष जसे नावाला जागतात म्हणजे प्रत्येक गोष्टी ला विरोध केलाच पाहिजे.
15 Apr 2015 - 3:33 pm | डँबिस००७
नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ?
नेहरुंच्या फायलीत.
फायली कुठे आहेत ?
आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या.
तरी सुद्धा नेहरु हे भारताचे भाग्य विधाता ठरले कसे ? हे काँग्रेसचे कारस्थानच !!
15 Apr 2015 - 7:16 pm | खंडेराव
चित्ताने खालिल उतारा वाचा.
संदर्ब - श्री. अभिराम दिक्षित यांचे लिखाण ( फेसबुक )
नेहरू द्वेष्ट्यांचे बोस प्रेम
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या घरावर पाळत ठेवल्याची बातमी अनेकांसाठी उन्माद्कारक आहे. देशभक्ती ची व्याख्या बंदुक अशी केली कि बोस हिरो ठरतात आणी आपोपाप गांधी नेहरू शेळपट ठरत असतात . शेळपटांना शेळपट म्हणुन राजकारणात काम भागत नाही . त्याना नीच आणि कपटि देखील सिद्ध करावे लागते. मग बोस यांच्या घरावर पाळत ठेवणे हा कपटिपणाचा पुरावा म्हणून दाखवता येतो . पाळत ठेवणे हे अनेकदा त्यांच्या संरक्षणासाठी असू शकते, किंवा तो एका रुटिन प्रोसेस चा भाग असू शकतो हे ध्यानात घेण्याची काही आवश्यकता उरलेली नसते . देशाचे सरकार हे संस्थात्मक रीतीने राज्यकारभार पाहते . वेगवेगळी कार्यालये स्वायत्तपणे काम करतात . सरकारी कार्यालयांचे काही नियम असतात . त्यातले सर्व नियम पंतप्रधान बनवत नाही .
१९४८ ते १९६८ दरम्यान संपूर्ण बोस कुटूंबावर आयबी अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवल्या गेल्याचं बातमीत म्हटले आहे . या २० वर्षांच्या कालावधीतील १६ वर्ष स्वत: जवाहरलाल नेहरु देशाचे पंतंप्रधान होते. उरलेली चार वर्ष कोण होते ? १९६४ ते ६६ या काळात लाल बद्दूर शास्त्री देशाचे प्रधान मंत्रि होते . लाल बहाद्दूर शास्त्री तर देशभक्त होते ना ? पाकिस्तानला धडा शिकवणारे होते ना ? त्यांच्या कार्यकालात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवणे का चालू राहिले ? याचा विचार करण्याची नेहरू द्वेष्ट्याना काहीच गरज नसते .
भारतीय सैन्य हि एका संस्था - ऑर्गनायझेशन आहे . त्याच्या काही डॉटेड रिपोर्टिंग लाइन्स आयबी पर्यंत जातात. आयबी हि गुप्तचर संस्था अतिशय कार्यक्षम आणि कर्तुत्व वान म्हणून नावाजलेली आहे . बांग्लादेश युद्धात मुक्तीबाहिनी नावाची संस्था उभारून त्यांनी पाक सरकारविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळून दिला होता . हि आयबी का बरे नेताजिंच्या घरावर पाळत ठेवेल ? याचा विचार करायची गरज नाही . नेहरुना देशद्रोही ठरवायला - विचाराचे इंद्रिय शट डाउनच करावे लागते .
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय सैन्यात बंड घडवून आणले होते . सैन्यातले बंड हा प्रकार अतिशय सिरीसायली हाताळला जात असतो - कारण तिथे प्रश्न देशाच्या सार्वभौमत्वाचा येतो. भारतीय सैन्यदल ब्रिटिश काळा पासून आहे . सैन्यात दाखल होताना सैन्य आणि कमाडिंग ऑफिसर यांच्याशी एकनिष्ठ रहायची शपथ घ्यायची असते . कमाडिंग ऑफिसरच्या आदेशावर जीव द्यायचा आणि घ्यायचा असतो . सैन्यात विचारवंताला स्थान नाही . तिथे आदेश आणि शपथ याचे महत्व अधिक आहे . सैन्याला जी कामे दिली आहेत ते पाहता हे योग्यही आहे.
आझाद हिंद सेनेतील जवानांना भारतीय सैन्याच्या सेवेत पुन्हा घेतले गेले नाही . एकदा शपथ मोडणारा पुन्हा मोडू शकतो हा विचार त्यामागे आहे . नेताजी डाव्या विचारांचे होते . त्यांचा फोर्वर्ड ब्लोक हा जहाल डाव्या विचाराचा पक्ष होता . आझाद हिंद सेनेतले सैनिक डाव्या विचारासाठी पुन्हा बंड करून सत्ता हस्तगत करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. एकदा शपथ मोडली कि सैन्यात पुन्हा स्थान नाही . आणी जो सैन्यात बंड करेल त्यावर कित्येक दशके पाळत ठेवणे हे सैन्याचे आणि गुप्तचर संस्थांचे काम आहे. ते काम त्यांनी नेहरू काळात केले - लाल बहाद्दूर शास्त्रींच्या काळात केले आणि इंदिरेच्या काळातही केले . हा सरळ साधा प्रोटोकोल आहे . प्रत्येक देशाचे सैन्य तो पाळते .
तात्पर्य :
१) सुभाष बाबुंवर आयबी ची पाळत होती . ती नेहरू - लाल बहाद्दूर शास्त्री - इंदिरा या तीनही प्रधान मंत्र्यांच्या काळात होती
२) सैन्यात झालेले बंड काळजीपूर्वक हाताळाले जाते . त्याच्या प्रोटोकोल चे पालन सैन्य आणि आयबी ने केले
३) नेहरू विरोधकांना सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते हे माहित नाही . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते
सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे."
जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
16 Apr 2015 - 12:22 am | अर्धवटराव
आपापल्या मनातील अ/सकारण द्वेष आणि प्रेम फेकायला इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या नावाचा वापर करण्याची हौस भागवायला पब्लीक काय काय चर्चा करतील काहि भरोसा नाहि.
15 Apr 2015 - 11:36 pm | hitesh
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच.
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे
16 Apr 2015 - 9:24 am | चिनार
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे
हितेश भाऊ !
गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय
"गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!"
वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती.
तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.
15 Apr 2015 - 11:50 pm | hitesh
सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते.
http://m.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarati-Muslim-gave-Rs-1-crore...
17 Apr 2015 - 8:17 am | अनिरुद्ध.वैद्य
जोपर्यंत का हेरगिरी केली गेली ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आपल्या तर्कांना काहीही अर्थ नाही. सो, का म्हणून ठेवली पाळत, हे जाहीर होण महत्वाच. बाकी उघड झालेल्या फाईल्समधून जर निर्णय पंडितजींच्या बाजूने लागला तर त्यांना नाहक बडवणाऱ्या लोकांचे चेहरे पाहण्यासारखे असतील!
मुद्यांकडे:
दीक्षित भले म्हणत आहेत की सैन्य प्रोटोकॉल पाळते आणि म्हणूनच त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. खरेतर ११ ते १२ हजार आझाद हिंद सैनिकांवर कोर्टमार्शल झालेच होते, त्यांना परत भारतीय फौजेत देखील घेतले गेले नाही, ह्याच कारणामुळे. पेन्शनवगरे सगळ नाकारल्या गेल होत.
ह्याचं म्हणण की आयबी सैन्याच्या अखत्यारीत येते, हे ही भारी, आयबी सैन्यात येत नाही आणि तिचा कारभार वेगळा असतो. रॉ अजून वेगळी, जीनी बांगलादेश निर्मितीत सहभाग घेतला होता. दीक्षितांनी सरळ सरळ रॉच क्रेडीट आयबीला देऊन टाकल. आयबी पंतप्रधान कार्यालयाच्या आणि गृहखात्याच्या आधीन येते. तिथे सिव्हिलिअन सरकार निर्णय घेत, आर्मी नाही. म्हणून सैन्यांनी पाळत ठेवायला लावली हे पटण्यासारख नाही.
15 Apr 2015 - 8:56 pm | डँबिस००७
खंडॅराव ,
ला ब शास्त्री हे देशभक्त होते म्हणुनच ताश्कंद येथे त्यांचा संयास्पद परिस्थीतीत खुन झाला, जे आपल्या मार्गातले काटे होते ते असेच दुर केले गेले. ते कोणी हे विचारु नका ?
देन्ही बोस आणि शास्त्री केसेस मधिल सत्य कधीच बाहेर आले नाही.
15 Apr 2015 - 11:51 pm | hitesh
आमचे नेहरु तर तेंव्हा नव्हते.
15 Apr 2015 - 9:02 pm | डँबिस००७
भगत सिंगच्या नातेवाईंकावर ही पाळत ठेवली होती ते कस काय समर्थनीय होत ?
अशी जासुसी करताना असा कुठला धोका त्यांना दिसला होता ? का भगतसींगचेच नातेवाईक ते डोक फिरल तर सरळ येउन
गोळ्या घालतील अशी भिती काँग्रेसच्या नेत्यांना होती,
15 May 2015 - 10:42 pm | काळा पहाड
http://indiatoday.intoday.in/story/netaji-subash-chandra-bose-wealth-los...