Skip to main content

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 09/02/2015 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल. ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे. (१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड (३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज (४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड (५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड (६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया (७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान (८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत (९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका (१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका (११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ? ________________________________________________________________________________ १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन ________________________________________________________________________________ २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ (डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण ________________________________________________________________________________ पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात. - ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे. - ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. - इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे. - पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता. - न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही. - १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो. - पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत. - कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा). - भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल. - मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे. - २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते. _________________________________________________________________________________ २०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. 'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश 'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती _________________________________________________________________________________ स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

प्राथमिक फेरीतील सामने

(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च (२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न (३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन (४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अ‍ॅडलेड (५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन (६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा (८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन (९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन (१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च (११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन (१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन (१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न (१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च (१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा (१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन (१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन (१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न (१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने (२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड (२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ (२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन (२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन (२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा (२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर (२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ (२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन (२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ (२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड (३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट (३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन (३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन (३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल _______________________________________________________________________________

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने (२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न (३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अ‍ॅडलेड (४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन ________________________________________________________________________________

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड (२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने ________________________________________________________________________________

अंतिम सामना

रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न ________________________________________________________________________________ २०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे - (१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. २०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्‍या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील. (२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे. २०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही. ________________________________________________________________________________

स्पर्धेतील संघ

(१) भारत महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते. भारताची फलंदाजी बर्‍यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत. या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता. भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (२) ऑस्ट्रेलिया मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते. ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (३) इंग्लंड ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे. (४) न्यूझीलँड ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अ‍ॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्‍यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय. न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे. (५) पाकिस्तान मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान या संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्‍याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते. अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे. (६) दक्षिण आफ्रिका एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते. या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे. (७) श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली. आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. (८) वेस्ट इंडीज जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्‍या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे. आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.

लिंबूटिंबू संघ

(९) बांगलादेश मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१०) आयर्लँड विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अ‍ॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (११) झिंबाब्वे एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१२) अफगाणिस्तान मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१३) स्कॉटलँड प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अ‍ॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. (१४) युनायटेड अरब अमिराती मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे. या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. ________________________________________________________________________________ लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल. (१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी) (२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी) (४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी) (५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.) (६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी) (७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी) (८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी) (११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत) (१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी) (१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी) २००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही. ________________________________________________________________________________

माझे अंदाज

१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही. याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार. यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्‍यापैकी फलंदाजी केली व दुसर्‍या सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो. हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते. माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील. अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल. न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल. ________________________________________________________________________________ विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.

वाचने 98819
प्रतिक्रिया 361

प्रतिक्रिया

पुढील सामने - ३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर न्यूझीलँड सहज जिंकेल. (३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने ऑस्ट्रेलिया जिंकेल. (३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड अत्यंत महत्त्वाचा सामना. या सामन्यातला विजेता 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ असेल. बांगलाला हा सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी चालेल. इंग्लंडला मात्र हा सामना जिंकायलाच हवा. (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन भारत जिंकेल.

श्रीलंकेने जबरदस्त झुंज दिली. श्रीलंकेला शेवटच्या १० षटकात १०५ धावा हव्या होत्या व फक्त ४ गडी बाद झाले होते. चंडीमल व मॅथ्यूज तुफान मारत होते. फक्त २४ चेंडूत नाबाद ५२ धावा करणार्‍या चंडीमलचा अचानक स्नायू दुखावला व त्यामुळे त्याला निवृत्त व्हावे लागले. तो आज जाताच लगेचच मॅथ्यूज व थिसारा परेरा बाद झाल्याने श्रीलंकेची झुंज संपली. आज श्रीलंका जिंकले असते तर 'अ' गटातून श्रीलंका २ र्‍या क्रमांकाने व ऑस्ट्रेलिया ३ र्‍या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत आले असते. अशा परिस्थितीत उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ 'ब' गटातील दुसर्‍या क्रमांकाच्या आफ्रिकेशी पडून दोघातला एक धारातिर्थी पडला असता. परंतु आता तसे होईल असे दिसत नाही. उपांत्य फेरीत बहुतेक न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व भारत हे देश असतील. भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूप अवघड आहे. जर ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला आपापल्या मायभूमीवर उपांत्य फेरीचा सामना खेळायला मिळाला नाही तरच विरूद्ध संघाला थोडी जास्त संधी आहे. 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका नक्की येणार. ४ था संघ इंग्लंड असेल की बांगलादेश याचे उत्तर उद्या मिळेल. बांगलाचे ४ सामन्यात ५ गुण आहेत तर इंग्लंडचे ४ सामन्यात २ गुण आहेत. बांगला आपला शेवटचा न्यूझीलँड बरोबरचा सामना नक्की हरणार व इंग्लंड आपला शेवटचा अफगाणिस्थान बरोबरचा सामना नक्की जिंकतील. त्यामुळे उद्याचा सामना इंग्लंडला जिंकावाच लागेल. बांगलादेशाला उद्याचा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने उद्याचा सामना 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ ठरवेल.

मिसळपाववरील कोणी Espncricinfo Fantansy League खेळत तर एक 'मिसळपाव' ग्रुप तयार करून एकत्र खेळु शकतो.

मी आहे cricinfo वर. वेगळा धागा काढायचा का? password आणि id साठी? पाच दहा लोक तरी पाहिजेत. दोघात मजा नाही येणार.

बांगलाने २७५ धावा करून बर्‍यापैकी आव्हान दिले आहे. इंग्लंडची फलंदाजी व बांगलाची गोलंदाजी बघता हे आव्हान इंग्लंडला फारसे अवघड नाही. १४ षटकात १ बाद ६७ धावा करून इंग्लंडने चांगली सुरूवात केली आहे. खराब फटके मारून बळी गमावले नाहीत तर इंग्लंड नक्की जिंकेल असं दिसतंय.

In reply to by थॉर माणूस

ते तर लेखाच्या सुरुवातीलाच होऊन गेलेलं आहे....त्यांच्या मते भारत काही सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार नाही..!

In reply to by असंका

तसा सुरवातीला अंदाज होता कारण भारत 'ब' गटात २ र्‍या क्रमांकावर असेल असा अंदाज होता आणि त्यामुळे 'अ' गटातील ३ र्‍या संघाशी (श्रीलंका किंवा इंग्लंड) भारताची गाठ पडेल असे वाटत होते. भारतीय संघाची तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहिली तर भारत या दोघांविरूद्ध नक्की हरेल असे दिसत होते. पण प्रत्यक्षात भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही द. आफ्रिकेला अनपेक्षितपणे हरविले व त्यामुळे 'ब' गटातून भारत १ ल्या क्रमांकावर राहील व त्यामुळे अर्थातच 'अ' गटातील ४ थ्या संघाशी भारत उपांत्यपूर्व फेरी खेळेल. भारताच्या सुदैवाने इंग्लंड किंवा श्रीलंकेऐवजी बांगलादेश गटातून थ्या क्रमांकावर (बहुतेक) असेल. इंग्लंडची अत्यंत खालावलेली कामगिरी आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशाला पावसाच्या कृपेमुळे अत्यंत अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेला मोलाचा १ गुण. या १ गुणामुळे बांगला सतत इंग्लंडच्या पुढे राहिले व अंतिमतः त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. बांगलाशी उपांत्यपूर्व फेरीचा सामना असल्याने भारत तो सामना नक्कीच जिंकून उपांत्य फेरीत जाणार. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूपच अवघड दिसते. समजा तसे झाले तर निदान हे दोन्ही संघ आपापल्या मायदेशात न खेळता दुसर्‍या देशात खेळले तर भारत उपांत्य फेरी जिंकण्याची शक्यता वाढते. या दोघांव्यतिरिक्त द. आफ्रिकेशी किंवा श्रीलंकेशी गाठ पडली तरी अवघड आहे. जर उपांत्य फेरीत पाकडे किंवा विंडीज आले तर मात्र आपण आरामात जिंकू.

१६३- ६ अजून ११३ धावा हव्यात. बांग्लादेश ही मॅच जिंकून उप उपांत्य फेरीमधे आले तर आपल्यासाठी फार चांगले होइल

शी! बांगलासारख्या फालतू संघाकडून इंग्लंड हरले. बांगला उपांत्यपूर्व फेरीत आल्याने भारताची वाट सोपी झाली असली तरी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही. मोईन अली आणि नंतर जॉर्डन मुर्खासारखे धावबाद झाले. मॉर्गनला आल्याआल्या विकेट फेकायची काहीही गरज नव्हती. आपण बाद झालेल्या चेंडूवर कसे वेड्यासारखे खेळलो हे जेम्स टेलरला अजूनही समजलं नसेल. आज स्टीव्ह फिनला का बाहेर ठेवलं ते समजलं नाही. बोपाराला एकही सामना खेळविला नाही. विश्वचषक सुरू होण्याच्या तोंडावर कुकची हकालपट्टी करण्याची आणि केव्हिन पीटरसन् ला बाहेर ठेवण्याची किंमत इंग्लंडला मोजावी लागलेली आहे. १९९२ पर्यंत इंग्लंड विश्वचषकातला बर्‍यापैकी दादा देश होता. पहिल्या ५ स्पर्धात, ४ वेळा इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल झाले होते. त्यापैकी ३ वेळा त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. १९९६ पासून इंग्लंड कधीही उपांत्य फेरीत पोहोचले नाही. यावेळी तर प्राथमिक फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला आहे. 'अ' गटातून आता न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत आले आहेत. 'ब' गटातून उपांत्यपूर्व फेरीत फक्त भारताचा प्रवेश नक्की झाला आहे. पाकडे, द. आफ्रिका, विंडीज आणि आयर्लँड या ४ पैकी ३ देश उपांत्यपूर्व फेरीत येतील. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 'अ' गटातील ४ थ्या क्रमांकाच्या संघाशी म्हणजेच बहुतेक बांगला देशाशी होईल. काही अनपेक्षित निकाल लागले तर कदाचित श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाशीही गाठ पडू शकते.

In reply to by श्रीगुरुजी

>>>> उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही. आपल्यालाला इंग्लंड झेपलंच नसतं आणि बांगलाने आपल्याला एका विश्वचषकात पहिल्याफेरीतच घरचा रस्ता दाखवला होता हे विसरलात वाटतं. पण, तरीही बांगलादेश आपल्याला सोपं वाटतंय. मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण सध्याच्या इंग्लंडच्या संघाला नक्कीच हरवलं असतं. बांगलाने २००७ मध्ये आपल्याला हरविलं होतं तो एक अपवाद होता. एकदा कधीतरी हरवलं म्हणून कायमच बांगलाला घाबरण्याची गरज नाही. बांगलाला लगेचच २०११ च्या विश्वचषकात आपण मोठ्या फरकाने हरविले होते. त्यानंतर बांगलाने अजून एकदा भारताला हरविले होते (२०१२ च्या आशिया चषक स्पर्धेत). हे दोन प्रसंग वगळता बांगलाला भारताविरूद्ध फारसे काही करता आलेले नाही. काही महिन्यांपूर्वी भारताचा संघ बांगलाच्या दौर्‍यावर गेला होता. धोनी संघात नव्हता. ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. बांगलाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून २७० च्या आसपास धावा केल्यावर भारताने चांगली फलंदाजी करून नंतर पाऊस आल्याने डकवर्थ-लुईस च्या आकडेमोडीनुसार सामना जिंकला. दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत सर्वबाद १०४ अशी भीषण अवस्था झालेली असताना भारताने बांगलाला ५८ धावात बाद करून ४६ धावांनी सामना जिंकला (स्टुअर्ट बिन्नी ६ बळी आणि मोहीत शर्मा ४ बळी). तिसरा सामना पावसामुळे अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आला. >>> मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :) उद्या आपण हरलो तरी पाकडे लगेच बाहेर पडणार नाहीत. पाकडे बाहेर पडण्यासाठी त्यांना आयर्लँडने हरवावे लागेल आणि विंडिजने यूएई ला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. तरच पाकडे घरी जातील.

एकूण ४९ सामन्यांपैकी ३३ म्हणजे दोन तृतीयांश सामने संपलेले आहेत. आगामी सामने - (३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन भारत जिंकेल. जर आयर्लँड जिंकले किंवा दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला तर आयर्लंडचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान नक्की होईल. (३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट श्रीलंका जिंकेल. चुकून लंकन्स हरले तर त्यांचा 'अ' गटातील २ र्‍या किंवा ३ र्‍या स्थानाचा दावा डळमळीत होईल. (३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन द. आफ्रिका जिंकेल. चुकून आफ्रिकन्स हरले तर त्यांचा 'ब' गटातील २ र्‍या किंवा ३ र्‍या स्थानाचा दावा डळमळीत होईल.

एक शब्द कळाला नाही. पाकडे म्हणजे काय ? वन डे सारखा हा क्रिकेटचा प्रकार आहे की मन्डे, ट्युसडे सारखा एखादा वार आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

पाकचे खेळाडु नेहमी वाकडे वागतात, म्हणून गुरुजी त्यांना पाकडे म्हणत असावेत.

In reply to by तिमा

बरीच वर्षे सामना पेपर वाचला नाही. बाकी काही असो, ह्या शब्दाचे निर्माते बहुतेक सेनाप्रमुखच असावेत असा अंदाज आहे. आणि हो उगाचाच सापाचा आणि नागाचा जोक आठवून गेला. :)

भारताने आयर्लँडला अगदी सहज हरविले. हा विजय अपेक्षितच होता. आता 'ब' गटात आयर्लॅडची अडचण झाली आहे. आयर्लँड (६ गुण), पाकडे (६ गुण) व विंडीजचा (४ गुण) प्रत्येकी १ सामना शिल्लक आहे. आयर्लँड व पाकडे एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत त्यामुळे त्यातला १ संघ ६ गुणांवरच थांबेल (अनपेक्षितपणे सामना रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांचे ७ गुण होऊन विंडीज घरी जातील), तर विंडीजची दुबळ्या यूएई बरोबर गाठ आहे. विंडीज हा सामना नक्की जिंकून ६ गुण मिळवतील. या सामन्यात विंडीजला १ किंवा ० गुण मिळाले तरी विंडीज घरी जातील. या दोनपैकी कोणताही सामना रद्द झाला नाही किंवा बरोबरीत सुटला नाही तर विंडीजचे ६ गुण असतील आणि पाकडे व आयर्लंड पैकी एकाचे ६ व दुसर्‍याचे ८ गुण असतील. ज्या २ संघांचे ६ गुण असतील त्यातल्या निव्वळ धावगती सरस असणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत जाईल. सध्या पाकडे (निव्वळ धावगती : -०.१९४), विंडीज (निव्वळ धावगती : -०.५११) आणि आयर्लँड (निव्वळ धावगती : -१.०१४) अशी आहे. पाकड्यांनी केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४८ धावांचा फरक आहे. विंडीजने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४० धावांचा फरक आहे. आयर्लंडने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात तब्बल १९३ धावांचा फरक आहे. समजा आयर्लंड हरले व विंडीज जिंकले तर आयर्लंड व विंडीजचे ६ गुण होतील आणी आयर्लंडची निव्वळ धावगती अजून कमी होईल व विंडीजची निव्वळ धावगती वाढेल, त्यामुळे आयर्लंड घरी जातील. समजा आयर्लंड जिंकले व विंडीजही जिंकले तर आयर्लंड उपांत्यपूर्व फेरीत जातील व पाकड्यांची निव्वळ धावगती आतापेक्षा कमी होईल. सध्या पाकडे व विंडीज यांच्या निव्वळ धावगतीत फारच थोडा फरक असल्याने विंडीजला ६०-७० धावांचा विजय पुरेसा होईल व पाकडे घरी जातील. त्यामुळे विंडीज आपला सामना साधारण ६०-७० धावांच्या फरकाने जिंकले तरी ते उपांत्यपूर्व फेरीत नक्की जातील व उपांत्यपूर्व फेरीतला शेवटचा संघ पाकडे व आयर्लंडमधील विजेता असेल.

संगकारा जबरदस्त फॉर्मात आहे. दिलशान आणि मॅथ्यूज सुद्धा फॉर्मात आहेत. आजच्या विजयामुळे श्रीलंकेचे 'अ' गटातील तिसरे स्थान जवळपास नक्की झाले आहे. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश बहुतेक दुसरा व चौथा क्रमांक घेतील. आपल्या सुदैवाने उपांत्यपूर्व फेरीत आपली गाठ इतर तीन देशांऐवजी बांगलाशी पडेल (बहुतेक). त्यामुळे उपांत्य फेरीत भारत जाणारच. द. आफ्रिका व श्रीलंका या दोन देशांपैकी १ देश उपांत्यपूर्व फेरीतच गारद होणार. परंतु उपांत्य फेरीत या दोन देशातील १ व त्याबरोबरीने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड असतील. त्यामुळे उपांत्य फेरी जिंकणे अवघड आहे.

बांगलादेश आज जिंकला तर ३ र्या नंबर वर जाईल आणि आपल्याला श्रीलंकेसोबत उपउपांत्यफेरी खेळावी लागेल.

In reply to by कपिलमुनी

हुश्श! बांगला हरले. बांगलाने किवीजच्या तोंडाला फेस आणला होता आणि किवीज हरतील की काय या भीतिने भारतियांना फेस आला असावा. आज बांगला जिंकले असते तर 'अ' गटात ते दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर गेले असते व श्रीलंका निर्विवादपणे ४ थ्या क्रमांकावर राहिली असती. श्रीलंका संघात सध्या दिलशान, संगक्कारा आणि मॅथ्यूज अत्यंत भरात आहेत. अशा संघाशी उपांत्यपूर्व फेरी अवघड गेली असती. आता बांगलादेशासारखा तुलनेने सोपा संघ उपांत्यपूर्व फेरीत आपल्याविरूद्ध लढेल. बांगला सध्या जोरदार लढत देताहेत. न डगमगता ठराविक अंतराने प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना बाद करून दडपण कायम ठेवण्यात ते यशस्वी होताहेत. आपल्याला त्यांच्याविरूद्धची लढत वाटते तितकी सोपी जाणार नाही. आपण नक्की जिंकणार पण सामना एकतर्फी होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बांगलाचा मनोबल सध्या जबरदस्त वाढले आहे. भारतीय संघाला पूर्ण ताकदीने खेळावा लागणार आहे. तासी १४० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजे करणारे २ गोलंदाज, २ स्पिनर , २ इन फॉर्म बॅट्समन आणि ऑल राउम्डर यामुळे बांगलाची टीम चांगलीच भरात आहे.

In reply to by कपिलमुनी

बरोबर. स्पिनर्स फक्त २ नाहीत. बरेच जण फिरकी टाकतात. शकीब, तैजुल, नासिर होसेन हे मुख्य आणि सौम्य सरकार, साबिर, महंमदुल्ला असे अनेक फिरकी गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरील झेलही अचूक टिपत आहेत. बांगलाची कामगिरी बरीच सुधारली आहे.

उद्याचे सामने - (३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड (४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट भारत किंवा झिंबाब्वेच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. भारत अगदी सहज जिंकेल. त्याचप्रमाणे स्कॉटलँडच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. परंतु ऑस्ट्रेलियासाठी सामन्याचा निर्णय फरक पाडू शकतो. ऑस्ट्रेलिया सामना जिंकला तर गटात दुसर्‍या क्रमांकावर येतील, १ गुण मिळाला तर श्रीलंकेइतकेच गुण होऊन गटातील क्रमांक (२ रा किंवा ३ रा) निव्वळ धावगतीवर ठरेल. आणि सामना हरला तर बांगलादेशाइतके गुण होऊन ३ रा किंवा ४ था क्रमांक निव्वळ धावगतीवर ठरेल. अर्थात ऑस्ट्रेलिया हा सामना अगदी सहज जिंकेल, त्यामुळे फारशी चिंता नाही.

जिंकलो एकदाचे. हरलो असतो तरी स्पर्धेच्या दृष्टीने काही फरक पडला नसता. पण लिंबूटिंबू संघाकडून हरल्यामुळे उगाच नाचक्की झाली असती. ४ बाद ९२ असताना पाल चुकचुकायला लागली होती. परंतु नंतर रैना व धोनी जबरदस्त खेळले. रैना बराच नशीबवान ठरला. बर्‍याचदा झेल उडाले. एक सोपा झेल सुटला. परंतु शेवटी भारत जिंकलाच. भारताने लागोपाठ सहाव्या सामन्यात प्रतिपक्षाचे सर्व १० गडी बाद केले. हा एक नवीन विक्रम असावा. धवन, कोहली, रहाणे, रैना, धोनी इ. पैकी १-२ जण अपयशी ठरले तरी आळीपाळीने उरलेले खेळतातच. त्यामुळेच लागोपाठ ६ सामने जिंकता आले. मात्र रोहीत शर्माचं अपयश चिंताजनक आहे. ६ सामन्यात तो ४ सामने अपयशी ठरलाय व उर्वरीत २ सामन्यात लिंबूटिंबू संघासमोर अर्धशतके केलीत. पण त्याला पर्याय आहे कोठे? रायडू, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर आणि अक्षर पटेल हे चारच खेळाडू राखीव आहेत. रोहीत शर्माच्या जागी त्यातला फार तर रायडू आत येऊ शकतो. परंतु धोनी पुढील सामन्याकरीता संघात बदल करेल असे वाटत नाही. हाच संघ उर्वरीत सामने खेळेल हे नक्की. चला. आता पुढचा निर्णायक सामना गुरूवारी १९ मार्चला सकाळी ९ वाजता बांगला विरूद्ध मेलबोर्नमध्ये. उद्याचे २ सामने महत्त्वाचे आहेत. (४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर (४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल वेस्ट इंडिज, पाकिस्तान व आयर्लँड या तीन संघांपैकी नक्की कोणते २ संघ व कोणत्या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत येतील ते उद्या ठरेल. या दोन सामन्यांपैकी कोणताही एक सामना बरोबरीत सुटला, रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर वेस्ट इंडीजची वाट बंद होऊन आयर्लँड व पाकिस्तान बाद फेरीत जातील. वेस्ट इंडीज यूएईला अगदी सहज हरवेल असा अंदाज आहे. ते जितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवितील, तितकी जास्त संधी त्यांना गटात तिसरा क्रमांक मिळविण्यासाठी मिळेल. आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे अशी इच्छा आहे. परंतु पाकडे थोड्या फरकाने जिंकतील असं वाटतंय. सध्या तरी पाकिस्तान व वेस्ट इंडीज बाद फेरीत येतील असं वाटतंय. आयर्लंडला बाद फेरीत येण्यासाठी पाकड्यांवर साधा विजय मिळविला तरी चालेल. पाकड्यांची निव्वळ धावगती इतर दोघांपेक्षा सरस असल्याने ते सामना हरूनसुद्धा बाद फेरीत येण्याची बरीच शक्यता आहे. आयर्लंडने पाकड्यांवर मोठा विजय मिळविला व विंडीजने यूएईला मोठ्या फरकाने हरविले तर मात्र पाकडे बाहेर जातील.

आजचा झिंबाब्वे वरचा विजय तसा निर्भेळ वाटला नाही. रैनाच्या सुटलेल्या झेलाने सामना फिरला. टेलरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. बिचार्‍याला सोडतानाही पराभव पत्करावा लागला.

वेस्ट इंडीजसाठी वाईट बातमी - उद्याच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय यायची शक्यता आहे. There should be plenty of runs on offer from the surface but mitigating circumstances overhead could make it difficult. A cloudy day is forecast as tropical Cyclone Pam makes its way towards New Zealand. The major rains should only arrive on Monday but some showers are forecast for game day as well. पावसाने किंवा इतर कोणत्याही कारणाने सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तर विंडीजला एकूण ५ गुण मिळून विंडीज गटात ५ व्या क्रमांकावर राहिल्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही. निव्वळ धावगती व गुण : पाकिस्तान = -०.१९४, ६ गुण, वेस्ट इंडीज = -०.५११, ४ गुण, आयर्लंड = -१.०१४, ६ गुण ______________________________________________________________________________ पाकिस्तानची निव्वळ धावगती इतरांच्या तुलनेत चांगली असल्याने आयर्लंडबरोबर हरले तरी त्यांना बरीच संधी आहे. समजा विंडीजने यूएई विरूद्ध ३०० धावा करून ५० धावांनी विजय मिळविला आणि पाकड्यांविरूद्ध आयर्लंडने ३०० धावा केल्या तर पाकड्यांना विंडीजच्यापेक्षा जास्त निव्वळ धावगती राखण्यासाठी किमान २७४ धावा कराव्या लागतील. समजा विंडीजने यूएईविरूद्ध २५१ धावांचे लक्ष्य ४० षटकांत पूर्ण केले आणि पाकड्यांनी आयर्लंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले तर आयर्लंडला ते लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानने आयर्लंडला किमान ४६ षटके तरी खेळवायला हवे. समजा विंडीजने यूएईवर किमान ७५ धावांनी विजय मिळविला किंवा यूएईने ठेवलेले लक्ष्य किमान ८१ चेंडू राखून पार केले तर मात्र पाकड्यांना आयर्लंडला हरवावेच लागेल किंवा किमान १ गुण मिळवावाच लागेल. ______________________________________________________________________________ विंडीजने यूएईला हरविले तर कोणत्याही परिस्थितीत आयर्लंडला पाकिस्तानला हरवावेच लागेल. अन्यथा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही. ______________________________________________________________________________ एकंदरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची सर्वात कमी शक्यता आयर्लंडची आहे व सर्वात जास्त शक्यता पाकड्यांची आहे. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे हे दोन्ही संघ तिसर्‍या/चौथ्या क्रमांकावर असल्याने त्यांची पुढील फेरीत ऑस्ट्रेलिया/न्यूझीलँड या तगड्या संघांशी पडेल व ते सामने यांना फारच भारी जातील. असो. बघूया उद्या काय होतंय ते. आयर्लंडने पाकड्यांना हरवावे व विंडीजने यूएईवर मोठा विजय मिळवून पाकड्यांना घरी पाठवावे अशी मनोमन इच्छा आहे. विंडीज यूएईला नक्की हरवेल, परंतु पाकडे आयर्लंडवर निसटता विजय मिळवतील असा अंदाज आहे.

पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं. बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल!

In reply to by बहुगुणी

>>> शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं. पाकडे १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत जसे खेळले तसेच या स्पर्धेत खेळत आहेत अशी शंका यायला लागली आहे. १९९२ मध्ये प्रत्येक संघाला प्राथमिक फेरीत ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यानंतर पाकड्यांच्या खात्यात फक्त १ गुण जमा होता (इंग्लंडविरूद्ध सर्वबाद ८३ धावा होऊनसुद्धा पावसामुळे पुढे खेळ न झाल्याने पाकड्यांना १ गुणाचा बोनस मिळाला होता.). नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकून धावगतीच्या जोरावर पाकडे उपांत्य फेरीत पोहोचले आणि नंतर अंतिम फेरी जिंकून विश्वचषक जिंकला. योगायोगाने ही स्पर्धाही ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये आहे. या स्पर्धेतही प्राथमिक फेरीतील पहिल्या ६ सामन्यांपैकी पहिले २ सामने पाकडे हरले होते. परंतु उर्वरीत चारही सामने जिंकून पाकडे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अर्थात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीत हरविणे ही पाकड्यांच्या दृष्टीने अत्यंत अवघड गोष्ट आहे. तो सामना बहुतेक पाकडे हरतीलच. >>> बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल! बांगलाला भारत नक्कीच हरवेल. परंतु उपांत्य फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल. तो सामना जिंकणे भारताला खूप अवघड आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांच्या निकालांचे अंदाज - पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground चुरशीची लढत होईल. या स्पर्धेत द. आफ्रिका २ सामने हरलेले आहेत व दोन्ही पराभव धावांचा पाठलाग करताना आशियायी संघाकडून झाले आहेत. आता पुन्हा एकदा आशियायी संघाशी लढत आहे. आफ्रिकन्स धावांचा पाठलाग करताना दडपणाखाली गडबडतात. त्यामुळे आफ्रिकन्सना जिंकायचे असेल तर प्रथम फलंदाजी करावी लागेल. या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो जिंकेल. दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground भारत जिंकणार तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval ऑस्ट्रेलिया जिंकणार चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington न्यूझीलँड सहज जिंकेल.

चला संपत आलं धाग्याचं आयुष्य.....अजून बारा दिवस फक्त. त्यात भारत आधीच बाहेर पडला धाग्याकर्त्याच्या अंदाजानुसार तर आणखीन आधी संपेल.

In reply to by बाळ सप्रे

चोक होऊ नयेत अशी इच्छा आहे. आफ्रिका धावांचा पाठलाग करताना डगमगतात हे लक्षात घेता, प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आफ्रिकेचे पारडे श्रीलंकेच्या तुलनेत किंचित जड आहे. आफ्रिकन्स जिंकावेत हीच मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पण संगकाराचा फ़ॉर्म सध्या जबरदस्त आहे. सोबत महेला जयवर्धने चालला तर मग डायरेक्ट डबल बार ची बंदूक चालेल श्रीलंकेची. ह्या उलट अफ्रिकेची फलंदाजी AB वर आहे. फ़क्त आफ्रिकेचा बॉलींग अटेक श्रीलंकेपेक्षा निदान कागदावर तरी जोरदार आहे. पण भारताने आणि दुबळ्या झिम्बाब्वेनेही त्यांची काढलेली लक्तरं पहाता अफ़्रिकेचं थोड बेभरवश्याच वाटतं पण काहीही झालं तरी उद्याचा सामना रंगत आणणार हे नक्की So guys Be ready to experience the thrill of 'SUDDEN DEATH'

श्रीलंकेने उप्-उपांत्य फेरीत परेराला सलामी पाठवायचा धाडसी निर्णय घेतला, कदाचित त्याला फटकेबाजी करण्याच्यासुध्दा सुचना दिल्या त्याचा फटका संघाला बसलेला दिसतोय. लंका ८९/४, २६ षटके. संगकारा शेवट्पर्यंत टिकला नाही तर अवघड आहे. थरंगालासुध्दा या सामन्यासाठी बाहेर बसवला आहे. एकंदरीत सध्या तरी आफ्रिकेची परिस्थिती मजबुत आहे.

लंकन्स अगदीच सादळलेला फटाका निघाले. लंकेची सर्वबाद १३३ अशी भीषण अवस्था होईल अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. भारताप्रमाणेच फिरकी गोलंदाजी खेळणारे सर्वोत्तम फलंदाज ज्या संघात आहेत, त्या संघाविरुद्ध एका पार्टटाईम फिरकी गोलंदाज हॅटट्रिक घेतो आणि १० पैकी ७ फलंदाज फिरकी गोलंदाजासमोर बाद होतात यावर विश्वास बसणे अवघड आहे. आफ्रिकेने उत्तम गोलंदाजी केली यात शंकाच नाही. थिरीमन्नेला खाली ठेवून कुसल परेराला सलामीला पाठविण्यामागची योजना समजलीच नाही. कुसल परेरा पहिल्या चेंडूपासून ऑफस्टंपाबाहेरील चेंडूंचा पाठलाग करत होता. दोन वेळा स्लिपच्या डोक्यावरून फटका गेलां. शेवटी एका उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. संगक्कारा आज इतका नांगर टाकून का खेळला हे एक गूढच आहे. आता ६.२ षटकांत नाबाद ४० धावा करणारे आफ्रिकन्स उपांत्य फेरीत पोहोचल्यासारखेच आहेत. दुर्दैवाने त्यांना उपांत्य फेरीत बहुतेक न्यूझीलँडशी खेळावे लागेल व या दोनपैकी एका संघाला गाशा गुंडाळावा लागणार. दोनही संघ यापूर्वी अनेकवेळा उपांत्य फेरीत पोहोचून हरलेले आहेत. यावेळी यातला एक संघ नक्की अंतिम फेरीत असेल व दुसर्‍याला इतिहासाची पुनरावृत्ती करत उपांत्यफेरीत पुन्हा एकदा हरावे लागणार. दोनही संघ आवडते असल्याने कोण हरावे आणि कोण जिंकावे याचा विचारच करवत नाहीय्ये.

मध्यंतरी येथे नव्हतो .. पण मजा आली क्रिकेट पाहुन. विशेषता, बांग्ला आणि इंग्लंड मॅच. अफ्रिका जिंकली.. टॉस हारुन ही जिंकली .. मस्त वाटले. पुढील मॅचेस प्रेडिक्टेबल असल्या थोड्याफार प्रमाणार तरी मला वेस्ट इण्डिज जिंकतील असे वाटते आहे. दक्षिण अफ्रिका इंडिया ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज असे संघ सेमी ला येतील असे वाटते. पाहुया काय होते ते. --- उद्याच्या मॅच मध्ये धवन, कोहली आणि मुशफिकर रहिम चांगले खेळतील असे वाटते. (कालच्या मॅच ला डीकॉक लावला होता मी मोस्ट रन साठी मिळाले पॉईंट सगळे)

माहेला जयवर्देना आणि कुमार संगक्कारा या दोन महान श्रीलंकन खेळाडूंचा हा कारकिर्दीतला शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यानंतर हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. दुर्दैवाने त्यांची निवृत्ती संस्मरणीय ठरली नाही. श्रीलंका सामना हरले आणि दोघांचीही फलंदाजी चांगली झाली नाही आणि श्रीलंका स्पर्धेतून बाद झाले अशी सर्व दृष्टीने वाईट अशी त्यांची निवृत्ती ठरली. जयवर्देना फक्त ४ धावांवर बाद झाला तर संगक्काराने जरी ४५ धावा केल्या तरी त्या त्याने अत्यंत संथ खेळून दडपणाखाली केल्या. थिरिमन्नेऐवजी कुशल परेराला सलामीला पाठवायचा श्रीलंकेचा निर्णय पूर्ण चुकला. तरीसुद्धा २ बाद ४ अशा धावसंख्येवर खेळायला आलेल्या थिरीमन्नेने चांगली सुरूवात केली होती. आल्याआल्या अ‍ॅबॉटला दोन उत्कृष्ट चौकार मारून त्याने दडपण नाहीसे करायचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने संगक्कारा आपला नेहमीचा खेळ विसरून विनाकारण दडपण घेऊन खेळत होता. खाते उघडायला त्याने तब्बल १६ चेंडू घेतले. थिरीमन्नेने ३० चेंडूत ३० धावा केल्या असताना संगक्काराच्या नावावर ३८ चेंडूत फक्त ५ धावा होत्या. संगक्काराने १-१ धाव घेऊन वेगात खेळत असलेल्या थिरीमन्नेला जास्तीत जास्त चेंडू खेळायची संधी दिली असती तर कदाचित चित्र वेगळेच दिसले असते. संगक्कारामुळे श्रीलंकेची धावगती वाढलीच नाही. पहिल्या १० षटकांत २ बाद ३५, २० व्या षटकानंतर ३ बाद ७२, ३० व्या षटकानंतर ४ बाद १०५ ... पहिल्या षटकापासून ३० व्या षटकापर्यंत श्रीलंकेच्या डावाची गती प्रतिषटक ३.५० च्या आसपासच राहिली. त्यात घट/वाढ झालीच नाही. एकाच गतीने श्रीलंकन फलंदाजांनी धावा केल्या व त्याला मुख्यत्वेकरून कारणीभूत होता संथ खेळणारा संगक्कारा. अगदी शेवटी संगक्काराने धडपड केली. ९० चेंडूत नाबाद ३४ अशी केविलवाणी फलंदाजी करणार्‍या संगक्काराने मग एकदम आक्रमक पवित्रा घेतला. पण तेव्हा खूपच उशीर झाला होता. तोपर्यंत श्रीलंकेचे ८ फलंदाज बाद झाले होते आणि धावसंख्या होती ८ बाद ११६. शेवटच्या ८ चेंडूत ११ धावा करून शेवटी संगक्कारा ९६ चेंडूत ४५ अशी फारशी स्पृहणीय कामगिरी न करता आपल्या कारकीर्दीतल्या शेवटच्या डावात बाद झाला. जरी जयवर्देना व संगक्कारा आजच्या सामन्यात फारसे काही करू शकले नाहीत तरी त्यांची कारकीर्द असामान्यच राहील. विशेषतः अत्यंत शैलीदार व मैदानावर अत्यंत सभ्य असलेला जयवर्देना हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. आज तो निवृत्त झाल्याने जरा उदास वाटत आहे. ३७ वर्षीय संगक्काराने ४०४ एकदिवसीय सामन्यात १४,२३४ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने लागोपाठ ४ सामन्यात शतके केली आहेत. १९९७ मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणार्‍या ३८ वर्षीय जयवर्देनाने १४९ कसोटी सामन्यात ११,८१४ धावा व ४४८ एकदिवसीय सामन्यात १२,६५० धावा केल्या आहेत. जयवर्देना कसोटी सामन्यातून काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाला. संगक्कारा कसोटी सामन्यातून जुलै-ऑगस्ट मध्ये निवृत्त होणार आहे. या दोघांच्या पाठोपाठ ३८ वर्षीय दिलशानही लवकरच निवृत्त होईल. कुलसेकरा व हेराथ आपली शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत. एकंदरीत २०१५ मध्ये श्रीलंका संघाला मोठे भगदाड पडणार आहे. अनेक महाण खेळाडू निवृत्त होत असून त्यांची जागा भरायला तितकेच तोलामोलाचे खेळाडू अजूनतरी मिळताना दिसत नाहीत.

उद्याचा सामना भारत सहज जिंकेल. बांगलाने नाणेफेक जिंकली तर बहुतेक ते प्रथम फलंदाजी करतील. प्रथम फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, भारत सामना जिंकणार.

फायनल ऑस्ट्रेलिया आणि न्युजिलंड मध्ये होईल आणि न्युजिलंड विश्वकप जिंकेल

काय खेळतोय रोहित!!! अर्र् प्रतिसाद द्यायच्या आतच बदलायला लागणार वाक्य-- काय खेळला रोहित!!

बांगला ९०/४, जिंकणार आपण शामीचा दुसरा स्पेल मस्तच पडला. बाकी बांगला गोलंदांजांनी आपले फलंदाज बाद केल्यावर २-३ वेळा अगदी हिडीस सेलेब्रेशन केले. कोहली, जडेजा वगैरे याची सव्याज परतफेड त्यांचे गोलंदाज फलंदाजीला आले की करतीलच

Seven matches, seven teams, seventy wickets. Seven Victories!!!

त्यांची फिल्डिंग महाभिकार होती आणि खेळाडुंची देहबोलीही. हरण्याच्याच लायकीचे होते.

बांगलाविरूद्ध अगदी आरामात जिंकलो. जिंकणारच होतो. भारत जिंकणार याविषयी मनात कणभरही शंका नव्हती. बांगलादेश फारच माजलेल्या अवस्थेत होता. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला म्हणजे स्वर्गातल्या ७२ कुमारिका अप्सरा मिळाल्यासारखे त्यांचे वर्तन होते. भारताची "मौका" ही जाहीरात कॉपी करून त्यांनी विनाकारण आपले हसे करून घेतले. आजच्या सामन्यापूर्वी भारत व बांगलादेश एकमेकांशी एकूण २८ एकदिवसीय सामने खेळले होते. बांगलाला त्यातले फक्त ३ जिंकता आले आहेत. "मौका" जाहीरात कॉपी करून त्यात २००७ मधल्या विश्वचषक स्पर्धेत व नंतर २०१२ च्या आशियायी चषक स्पर्धेत बांगलाने भारतावर विजय मिळविल्याची क्लिप दाखवित होते. कधीतरी मिळालेल्या विजयांचा आनंद अजून किती वर्षे साजरा करणार? ४-५ महिन्यांपूर्वी बांगलादेशात भारताच्या दुय्यम संघाने सर्वबाद १०३ धावा केल्यावर बांगलाच्या मुख्य संघाला ५८ धावात गुंडाळून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आणली होती हे जाहीरातकर्ते विसरलेले दिसतात. भारतापुढे आपली लायकी किती हा विचार जाहिरात बनविणार्‍याने केलेला दिसत नाही. बांगलाचे खेळाडूही माजलेले दिसत होते. कोहलीला बाद केल्यावर रुबेल होसेनचे आविर्भाव अत्यंत चीड आणणारे होते. भारताने बांगलासारखा बालिशपणा न दाखविता शांतपणे आपल्या खेळातून उत्तर दिले. सामना फारच एकतर्फी झाला. शेवटी रूबेल होसेन खेळायला आल्यावर धोनीने कोहलीला गोलंदाजीला आणावे अशी माझी इच्छा होती. असो. भारत उपांत्य फेरीत दाखल झाला याचा अतिशय आनंद झाला आहे. भारत उपांत्यपूर्व फेरीतच हरेल असे स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी मला वाटले होते. सुदैवाने माझा अंदाज खोटा ठरला. आता उपांत्य फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलियाशीच गाठ पडेल. तो सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे, परंतु नव्याने भरात आलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर हरवू शकेल असा आत्मविश्वास वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>>> कोहलीला बाद केल्यावर रुबेल होसेनचे आविर्भाव अत्यंत चीड आणणारे होते. लै मस्तीचं सिलेब्रेशन होतं ते. पण, अशी मस्ती दिसलीच पाहिजे. बाकी, सुरुवातीच्या विकेटा गेल्यावर आज बांगला अडीचशे तरी करु देतं की नै असा विचार चमकुन गेला होता. बाय द वे, गुरुजी आता फक्त एकाच सामन्यापुरते उरणार का आपण ? ऑस्ट्रेलियाशी खेळायचं म्हटलं की खेळाडुंचं माहिती नै पण माझेच हातपाय ढिले पडतात. जिकंण्याची संधी चाळीस टक्के भारतीय तर साठ टक्के ऑष्ट्रेलिया. -दिलीप बिरुटे

>>> बाकी, सुरुवातीच्या विकेटा गेल्यावर आज बांगला अडीचशे तरी करु देतं की नै असा विचार चमकुन गेला होता. तसं काही वेळ वाटलं होतं खरं. भारत १० षटकांत नाबाद ५१, ३० षटकांत ३ बाद १२६ (मधल्या २० षटकांत फक्त ७५ धावा) आणि नंतर ३५ षटकांत ३ बाद १५५ (म्हणजे १० षटकानंतरच्या २५ षटकात फक्त १०४ धावा) अशी अवस्था पाहिल्यावर २७५ सुद्धा जरा अवघड वाटत होते. परंतु फक्त ३ गडीच बाद होते, त्यामुळे नंतर टॉप गिअरमध्ये येतील अशी खात्री होती. समजा भारताला २६० चा आकडा सुद्धा पार करता आला नसता तरी काळजी नव्हती कारण त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत आहे हे दिसले असते व आपल्या गोलंदाजांसमोर बांगला हरलेच असते. >>> बाय द वे, गुरुजी आता फक्त एकाच सामन्यापुरते उरणार का आपण ? ऑस्ट्रेलियाशी खेळायचं म्हटलं की खेळाडुंचं माहिती नै पण माझेच हातपाय ढिले पडतात. ऑस्ट्रेलियाशी खेळायची भीतिच वाटतेय. परंतु सांघिक कामगिरीच्या जोरावर आपण ऑस्ट्रेलियाला नमवू शकतो असं वाटतंय. ऑस्ट्रेलियाविरूद्ध शक्यतो पहिली फलंदाजी केल्यास उत्तम. >>> जिकंण्याची संधी चाळीस टक्के भारतीय तर साठ टक्के ऑष्ट्रेलिया. आज माझेही हेच मत.

ऑस्ट्रेलिया जिंकणारच. स्टीव स्मिथ आणिक स्टार्क चांगले खेळतील असे वाटते. मला फॅन्टसी लीग कशी अ‍ॅड करायची सांगताल काय कोणी ?

In reply to by गणेशा

आता लई उशीर केलात राव , आमी कवापासून खेळतोय. मागे तुम्ही याच धाग्यावर "कालच्या मॅच ला डीकॉक लावला होता मी मोस्ट रन साठी मिळाले पॉईंट सगळे" अशी कमेंट केली होती त्यामुळे मला वाटले तुम्ही fantasy league खेळत आहात. असो. हे घ्या दुवा देतो. http://games.espncricinfo.com/Fantasy/Login तुमच्या fb,twitter किंवा google + च्या account ने लोगिन व्हा अथवा cricinfo वर register व्हा. आत आल्यावर उजव्या कोपर्यातील tutorial तुम्हाला मार्गदर्शन करेल. खेळाचे सर्व नियम वाचा कसे pts मिळतात वगैरे. तुमची team बनवा. मिसळपाव league join करण्यासाठी : leagues option > Join league> Private League> League name: misalpav, password: misalpav

आज ऑस्ट्रेलिया जिंकावं की पाकीस्तान? म्हणजे भारताच्या जिंकण्याची शक्यता पाकिस्तानविरुद्ध अधिक असेल की ऑस्ट्रेलियाविरुद्ध...?