आम्हाला फक्त विकास हवाय... !
एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी
मानले.
दुसरे वाक्य
याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही
अनेक पत्रकारांचे हे प्रातिनिधिक मत असू शकते त्यामुळे यावर गांभीर्याने विचार झाला पाहीजे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनात विचार आला की खरोखर तरुण मतदारांनी मोदींना मत का दिले.
विकास की राजनिती चालत असेल तर मग राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट आणि उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत दाखवतात तो टॅब का चालला नाही. धर्म वजा करून केलेला विकास आमच्या देशात स्वीकारला जातो का ! १६ मेपूर्वीचे वातावरण काय होते आठवून पहा. देशात २६/११ सारखे हल्ले होत होते. १३/०२ सारखे पुण्यात स्फोट होत होते. या हल्ल्यांमागे धर्माचे तत्त्वज्ञान
होतेच. शिक्षणासाठी धर्माच्या आधारावर स्कॉलरशिप, लोनची सुविधा. याच्या जाहीराती टिव्हीवर झळकत होत्या.
या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क .... त्या वेळच्या पंतप्रधानांचे हे वाक्य जनता विसरली नव्हती.
बाँबस्फोट झाल्यावर सत्ताधारी नेते अथवा त्यांचे सहकारी दहशतवाद्याच्या घरी जावून त्याच्या माता पित्याचे सांत्वन करीत. काही मदतही जाहीर करीत. जनतेच्या मनात त्यामुळे असुरक्षितता होती. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. ही गोष्ट जनता विसरली नव्हती.
कुठलाही विकास हा एका बाँबस्फोटाने ठप्प होतो. जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना देखील आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले. तेव्हाचे सरकारही त्यांना वाचवू शकले नाही. हे जनता पाहत होती.
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टँड् तसेच निरनिराळ्या पुलाच्या कडेला आणि पुलाखाली उभ्या राहीलेल्या अभारतीय वास्तू पहा. त्यांचा विस्तार वाढतो आहे. तिथे सर्व भारतीयांना आत जायला परवानगी आहे का ! सगळंच भीतीदायक आहे.
त्यामुळे अशा भितीदायक वातावरणात हिंदूत्त्व न टिकवता जर कोणी विकासाच्या गप्पा मारत असेल तर त्यावर जनता विश्वास कसा ठेवणार !
त्यामुळे दहशतवाद्यांना बाँबस्फोट करू द्या आपण आपला विकास करुया असे म्हणण्यातला फोलपणा जनता जाणते.
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
In reply to विकास हा हवाच आहे पण by नया है वह
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही. म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.बरं मग ? [ बादवे अगदी अति-अवांतर : "हे आणि असेच" मोदी आणि समर्थक निवडणुकीआधी बोलले असते तर जास्त बरं झालं असतं, नाही का ? उगी आपलं "देवालय से पहले शौचालय" अस्लं काहीबाही बोलत बसले आणि मग या असल्या अजाण पत्रकारांचा (आणि कदाचित अजाण मतदारांचापण) गोंधळ झाला बहुतेक.. तरी असोच. ] (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )
In reply to तात्पर्य - मोदींना तरुण by हाडक्या
In reply to ... by आशु जोग
हिंदू म्हणून या देशात आपले काही अस्तित्त्व राहील का... अशी भिती १६ मे पूर्वी नक्की होती. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे असे वातावरण बनत चालले होते."तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो आणि एकच विचारतो, "हिरवळ दाटे चोहिकडे" असे वातावरण बनत चालले होते तर मग काय आता भगवा पाऊस पडायला लागलाय काय ? मोदी निवडून आल्याने या बाबतीत असा काय बदल झालाय ? हिंदूंची प्रजनन क्षमता वाढलीय की अजून काही ? की मोदी सरकारने अशी कोणती पावले उचलली आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे ? तुम्हाला पण असे वाटते काय की हिंदूनी धर्मकर्तव्य म्हणून चार-चार मुलं जन्माला घालावीत ? (कोणी किती मुलांना जन्म द्यावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहेच तसा). क्लिंटन वगैरे सारखे विचार करणारे लोक जे समर्थन देतात (आणि आमच्यासारखे लोक काही इतर मुद्द्यावर विश्वास ठेवून देतात) ते असे नतदृष्ट लोक विपर्यास करून वापरतात म्हणून जास्त चीड येते आणि ही जर असल्या मते झेलावी लागणार असतील तर परत भाजपला मत आणि समर्थन देणे होणार नाही. विकासापेक्षा पण आम्ही दिलेल्या बहुमताचा विपर्यास नक्कीच विश्वास-घात असेल. राहता राहिला विषय हिंदुंच्या अस्तित्वाचा. तर त्यांना काही इतरांकडून धोका नाही लगेच. सध्या तुम्ही मराठी संस्कृतीची काळजी करायचे पहा, ती डोळ्यादेखत संपायच्या मार्गावर आहे (उपरोध आहे, समजावा म्हणून आधीच सांगतोय). देशाची काळजी असेल तर असली निरुपयोगी विद्वेषी मते पसरवून मोदींच्या मार्गात अडथळे आणायची जरी कामे नाही केली तरी मोठीच मदत होईल हो.
तसं असतं तर उद्धवचा टॅब आणि राजचे व्हिजन डॉक्यूमेंट का नाही चालले.अपनी अकल लगाओ भौ. ते हरले (किंवा त्यांचे सरकार नाही आले) म्हणून उगी कायपण निष्कर्ष काढू नका (परत एकदा, "तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो). इत्यलम. तुमच्याशी अजून काही चर्चा करण्यात काही हशील नसणार हे स्पष्ट आहे. कारण तुमची मते दगडासारखी ठाम असणार आणि तुम्ही तीच तीच (अगदी वैदीक विमानांपासून गोडश्यांपर्यंत आणि हो नेहरु-खांग्रेसी इतिहास वगैरे वगैरे) आता घासून गुळगुळीत झालेली विधाने करण्यापूर्वीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्याकडून इथेच थांबतो. (सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेला )
In reply to हिंदू म्हणून या देशात आपले by हाडक्या
"तुम्ही डोक्यावर पडला आहात काय" असा प्रश्न वैयक्तिक होईल म्हणून विचारण्याचे टाळतो
सकल सामाजिक दांभिकतेची आत्यंतिक चीड असलेलाहा प्रश्न विचारला नसला तरी तुम्हाला तोच अध्यारूत आहे हे उघड आहे. तेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न वैयक्तीक होईल म्हणून विचारायचा नाही हाच दांभिकपणा आहे. तुमच्या स्वतःच्या दांभिकपणाची चीड येते की नाही?
In reply to "तुम्ही डोक्यावर पडला आहात by काळा पहाड
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
In reply to "जेथे हींदूत्व संपते तीथली by खटपट्या
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.या इतके इनोदी वाक्य गेल्या दहा हज्जार वर्षात लिहीले गेले नसेल दुबई , रीयाध ,आबुधाबी ,जेद्दाह , बंदार सेरी बगवान ( ब्रूनेई ) , मक्का ही शहरे कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी नाहीत. मुस्लीम बहूल किंबहुना पूर्णपणे मुस्लीम राष्ट्रातील शहरे आहेत. यांचा विकास कसा झाला हो. तिथे कुठे हिंदुत्व आले. पंढरपूर , जेजुरी , वाराणसी , प्रयाग, मथुरा , अयोध्या ही तर हिंदुंची तीर्थ क्षेत्रे. तुमच्या मते या शहरांचा संपूर्ण विकास व्हायला हवा होता. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन सिटी इतकी तरी विकसीत व्हायला हवी होती.
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by विजुभाऊ
In reply to @. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन by अत्रुप्त आत्मा
In reply to गुर्जी...तुम्ही स्वतःची by टवाळ कार्टा
In reply to गुर्जी...तुम्ही स्वतःची by टवाळ कार्टा
In reply to अच्छा म्हणजे सगळं काही by हाडक्या
In reply to सध्या जे आहेत ते बदलायला तयार by टवाळ कार्टा
In reply to आणि त्यांना समाजाने by हाडक्या
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
In reply to टका रिलॅक्स. गुरुजींनी असा by बॅटमॅन
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाही
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्याIn reply to ... by आशु जोग
In reply to ... by आशु जोग
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या>>> जोगबाबा...,काहिही वाटत नसेल नै...अश्या कॉमेंट द्यायला??? खरच. तुमच्यासारख्यांमुळेच तर या देशाला हिंदुत्वाची भव्य आणि भली पहाट दिसणार आहे एक दिवस. __/\__
In reply to @यावरून हाडक्या आणि त्याचे by अत्रुप्त आत्मा
In reply to ... by आशु जोग
यावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्याजोग भौ.. आम्ही तुम्हाला काही अवघड वाटणारे प्रतिसाद दिले (ज्यांची तुम्ही उत्तरेपण देऊ शकला नाहीत, पण ते असो) तर तुम्ही आम्हाला जोखायला निघालात.? अरेरे. आणि या प्रतिसादातले ध्वनित अर्थ पाहून तर तुमची अजूनच शरम वाटतेय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण. आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण. तुम्ही उगी आमच्या नामाभिधानावरून आणि (इथे उदाहरणार्थ समोर आलेल्या) मित्रांवरून आम्हाला judge करु धजू नका. (जाती-पातीची प्रचंड घृणा असलेला हाडक्या) *nea* असो, किमान गुर्जींनी प्रतिक्रिया दिली आहेच त्यामुळे त्याबद्दल काहीही जास्त बोलत नाही.
अहो पण त्याला तेच सांगायचंय आणि त्यांच्या मित्राचे पाव्हणे असतील ज्यांच काही म्हणणं असेलतुम्ही आम्हाला "अरे तुरे" करायला आपली ओळख नाही त्यामुळे नाव "हाडक्या" घेतले (अगदी "देवेंद्र फडणवीस" घेतले असते तर तुम्ही काही नमस्कार घातला असता जणु) म्हणून तुम्ही माझ्याशी सौजन्य सोडून बोलायची गरज नाही. मुद्द्याशी गाठ घाला आणि "काय" बोलतोय यावर आणि यावरच बोला, "कोण" बोलतोय त्यावरुन बोलू नका.
In reply to यावरून हाडक्या आणि त्याचे by हाडक्या
त्यांच्या मित्राचे पाव्हणे अरे तुरे कुठाय
त्याला तेच सांगायचंय यामुळे फार दुखावला असाल तर त्यांना तेच सांगायचंय असं म्हणेन म्हणजे तेवढ्याच एका खुंटीला झोके घेत बसायला नको.
In reply to यावरून हाडक्या आणि त्याचे by हाडक्या
आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पण
टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो
आम्ही स्वतः (इच्छा असेल तेव्हा) पठण पण करतो आणि पक्षी-तीर्थप्राशन पण.जरा हेही पहा
In reply to ... by आशु जोग
टाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतोअहो, आम्ही मित्रांच्यात आणि इतर कोणातही कसल्याच कॅटेगर्या करत नाही ( तुम्ही मात्र (तुमच्या तथाकथित हिदुत्वाच्या) आडपडद्याने जातिविषयक, धर्मविषयक बरेच काही बोलला आहात आधीच). हे तुम्ही सुरु केलेत, आणि प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगितले वर कित्ती कित्ती तो मानभावीपणाचा आव.. आणि आम्ही तुमच्या संज्ञेतलेदेखील "पुढारलेले" आहोत असा कोणताही दावा केलेला नाही (त्याचा तुमच्याबाबतीत व्यत्यास करावा की काय असा विचार करतोय, पण असोच) उगी काहीही अवांतर बोलून विषय भरकटवणे (की स्वतःच्या धाग्याला ट्यार्पी देणे) हाच तुमचा उद्देश दिसतोय त्यामुळे इथून पुढे आमचा पास. बादवे त्या दारुवरच्या धाग्यातला सोत्रिंचा प्रतिसाद (आणि इतरपण दारुबद्दलचे धागे आहेत लचे, तुमचे मिपा-वय पाहता तुम्हाला माहित असेलच) तुम्ही वाचला नसेलच, कारण तुमच्या सोईचे वाचून बाकीचे गाळणे हाच तुमची पद्धत दिसतेय. असो, दारुवर आता इथे तुम्हाला चर्चा अपेक्षित दिसतेय (स्वगत : कित्ती तो शतकाचा अट्टाहास? काही झाले तरी वधु-वर सोडा, या धाग्याचे काश्मीरदेखील होत नाही हो इथे), तिकडे पुरेशी चर्चा झाल्याने आणि त्यानेही तुमच्या मनात कमीत कमी किमान सहिष्णुता ही निर्माण न होऊ शकल्याने अजून चर्चा निरर्थक आहे. चर्चा अशांशी होते जे विचार मांडतात, दुसर्याने मांडलेले विचार विचारात घेतात (वरती विकासभौंचे प्रतिसाद पहा त्यासाठी), तुम्ही विचार मांडण्यात अथवा विचारात घेण्यात काडीचे इच्छूक नाही आहात असे दिसतेय वरून सवंग धागा-प्रसिद्धीसाठी अवांतरावर अवांतरे करताय. त्यामुळे आता याही तुमच्या नवीन उपचर्चा विषयावर आमचा पास. आत्मुबुवांच्या इथल्या प्रतिक्रियांशी सहमती दर्शवून तुम्हाला भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा.. :)
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही असे नाही पण फक्त गुर्जींकडून अपेक्षा करून भागणार नाही हे निदर्शित करायचे होते.+++१११ मी केलेला प्रयत्न अत्यंत छोटा आणि अल्पकाळासाठिचा होता. शिवाय मी पाठशाळा उघडू शकेन..असं कोणत्याच स्वरुपाचं बळ माझ्याकडे नाही. कुणि मदत केली..तरी वर हाडक्या म्हणतो ..., तसं असल्या पुरोहितांना समाज किती स्विकारेल ही शंका आहेच. अर्थात स्विकारेलंही..पण वेळ बराच लागेल. दुसरे असे,की आमच्या भटजींपैकी अनेकांना स्पर्धेचं आकर्षण वाटण्या ऐवजी भय वाटतं. गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ? असा व्यावसायिक विचारंही अनेक जण करतात. पण यामुळे विषमेतेच्या मार्गातला एक अडथळा दूर होइल.याच्याशी त्यांना काहिही घेणं देणं नसतं. सगळे धंदाच करायला उतरलेले असल्यामुळे, शालेय विद्यार्थ्यांना सोडणार्या रिक्षावाल्यांप्रमाणे...,ते ही नविन येणार्या (धंदा खाणार्या) स्कूलबस/व्हॅन सारख्या पर्यायांना भितात/जळतात..इत्यादी सर्व काहि. आणि सगळ्यात जास्त राग असतो,तो मोनोपॉली गेल्याचा! भैय्ये इस्त्रीच्या धंद्यात पडले,अधिक नम्र आणि प्रामाणिक सेवा देऊ लागले..मग आपल्या माजोरड्या इस्त्रीवाल्यांचं पित्त खवळलं. पूर्वी गिर्हाइक म्हणजे अत्यंत भि*&^#@ गोष्ट होती..आता स्पर्धा वाढल्यामुळे..त्यांना हवी-ती सर्व्हिस द्यायची वेळ आली. आपलं माजोरिपणा करायचे हक्काचे दिवस संपले...ही जशी खंत त्यांना सतावते आहे...तसलच भय आमच्याही लोकांना वाटतं.
In reply to पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही by अत्रुप्त आत्मा
बरेच तरुण गुर्जी लोक बिनधास्त कानाला मोबाइल लावून गाडी चालवतात. या मर्त्य मानवाच्या जगातले कोणतेच नियम त्यांना लागू होत नाहीत .
गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ?
त्यामुळे बरेच गुर्जी लोक प्रचंड स्पीडमधे गाड्या चालवतात. जणू पटकन पोचलं नाही तर गेलेल्या माणसाचा पुनर्जन्मच होइल आणि धंदा हातचा जाइल
In reply to ... by आशु जोग
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
In reply to व्यत्यास by विकास
हिंदूत्व या शब्दाचा अर्थ अनेकदा त्याच्या समर्थकांना देखील समजत नाही तर त्याच्या विरोधकांना अथवा जे कशातच नाहीत त्यांना कसा समजणार?मान्य. पण तो या निवडणूकीचा मुद्दा होता का ? नाही. मग आता कोणी असा दावा का करावा ? ही शुद्ध फसवणूक झाली. वरुन जर कोणी हसत बसणार असेल "कसे फसवले" म्हणून तर त्यांनी लक्षात ठेवावे ही काही शेवटची निवडणूक नाही. मला वाटते असल्या दांभिकतेमुळेच नाकर्ते असले तरी काँग्रेससारख्या पक्षांना परत परत यायची संधी मिळते. भाजपला उजवा पक्ष म्हणताना त्यांची ही बाजू नेहमीच त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणते असं वाटतं.
In reply to हिंदुत्व या मुद्यावर भाजपा by 'पिंक' पॅंथर्न
In reply to ... by आशु जोग
In reply to वास्त्ववात by विकास
In reply to आरे ला कारे करण्याची नक्कीच by पिंपातला उंदीर
In reply to उंदरानी जीवावर उठलेल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मजा असेल तर ठीक आहे . नसेल by पिंपातला उंदीर
In reply to आरे ला कारे करण्याची नक्कीच by पिंपातला उंदीर
In reply to सिंपल उत्तर by विकास
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्वाचेच दुसरे नाव हिंदूत्व म्हणून त्या अर्थाने(च) ते देखील समर्थनीयच आहे.हे वाक्य सुद्धा दु:खदायीच आहे. पण असो. चालायचेच!
In reply to आरेला कारे म्हणताना तुम्ही by ऋषिकेश
In reply to आरेला कारे म्हणताना तुम्ही by ऋषिकेश
In reply to balderdash by प्रदीप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो.तुम्ही ज्या देशात राहता तेथील संस्कृतीशी मिळून मिसळून राहण्याचे, तेथील स्थानीक संस्कृतीचा आदर करण्याचे महत्व आहे ते मी मुळीच नाकारत नाही. कष्ट करून जगणार्यांना केवळ हुलिया वरून परस्पर पाकिस्तानी ठरवणे, जराशी खटकणारी बाब आहे. आज आफ्रिका, युरोप, आमेरीका, ऑस्ट्रेलीआ सिंगापोर मलेशीया इंडोनेशीया, फिजी, मयन्मार, अशा अनेक खंड आणि देशातून मूळचे भारतीय वंशाचे लोक पिढ्यान पिढ्या राहतात ते आता तेथील नागरीक आहेत. हिंदू परंपरा वेश्भूषा सांभाळून त्यांच्या स्वतःच्या देशावरच प्रेम करतात. त्या देशातील स्थानिक बहुसंख्यकांनी केवळ कुणी भारतीय वेषभूषा करते परंपरा पाळते म्हणून त्यांना देशद्रोही समजून वंशवादी वागणूक द्यावी हे योग्य होईल का ? अधून मधून इतर देशात भारतीय वंशाच्या नागरीकांना वंशवादाचा सामना करावा लागल्याच्या बातम्या येतात त्यांचाच कित्ता आपण भारतात गिरवणे कित्पत उचीत आहे ?अलिकडे आमेरीकेत सुरेशभाई पटेल नावाच्या माणसावर हुलीया पाहून तेथील पोलिसांनी जखमी केले हे आदर्श आहे का ? भारतात नेपाळी आणि नैऋत्य भारतातील भारतीय नागरीकांना हुलीया आणि धर्म पाहून वेगळेपणाची वागणूक देणे योग्य होईल का ? गुन्ह्याबद्दल कायदे करा, कायदे मोडणार्यांना जरूर शासन करा. जे इमाने इतबारे कष्ट करून खातात त्यांच्या हुलीयावरून नाहक संशय हि परस्पर अनावश्यक अविश्वास निर्माणकरणारी भूमीका म्हणून धागाकर्त्याने आपली भूमीका पुन्हा एकदा तपासून पहावी असे वाटते.
In reply to कष्टकर्यांबद्दल खटकणारी भूमीका by माहितगार
In reply to वाद विवाद करताना कायम आक्रमक by पिंपातला उंदीर
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by हाडक्या
In reply to वाद विवाद करताना कायम आक्रमक by पिंपातला उंदीर
In reply to ... by आशु जोग
In reply to @तात्पर्य - मोदींना तरुण by अत्रुप्त आत्मा
हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाहीअशा विधानांनी खूप करमणूक झाली..
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to +१ .. हे तर ते आधीच म्हणत by हाडक्या
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ज्यांनी मत दिले त्यांनी आपण by खटासि खट
In reply to खटासि खट, तू बावला हो गया by खटासि खट
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
प्रभारी नेतृत्वास का प्रभावी !In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
In reply to अहो, तुम्हाला काहीच माहीती by खटासि खट
विकास हा हवाच आहे पण