खरोखरच विषण्ण झालो. मी वाचेपर्यंत २३ वाचने झालेली आहेत. आणि एकहि प्रतिक्रिया नाही. अमीरखानच्या 'तारे' वरील लेखाला उदंड प्रतिक्रिया आहेत. पूर्वी लोकलमध्ये चढतांना स्त्रिया मुले व वृद्धांना मदत केली जात असे. आता त्यांना बाजूला ढकलून लोक जातात. न्यायमूर्तीना सवाई गंधर्व रजनी गेल्या वर्षी आक्षेपार्ह वाटला. पण गरब्याला परवानगी देतांना संस्कृति आठवली. अग्निपंखाची कोण पत्रास? समाज कुठे जात आहे?
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्गारेल,
"इथे अग्निपंख फुलले होते'...
वावा!!!! अप्रतिम लेख!!! मांडलंय ते सत्य आणि केवळ सत्य आहेच पण अतिशय परिणामकारक शैलीत मांडले आहे. अजून येऊ द्यात..
आगाऊ सल्ला: कोणत्यातरी उत्तम वृत्तपत्राला पाठवून बघा
(प्रभावित) ऋषिकेश
सुंदर लेख.
आपली प्रगती ही खरंच प्रगती आहे? का थोडं थांबून मागं वळून बघणं जरुरीचं आहे?
वेग थोडा कमी करून, लालसा सोडून, साधं आयुष्यं जगणं गरजेचं आहे?
पैशांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणं आवश्यक आहे?
प्रश्नच प्रश्न.
मला अमेरिकेत हे रोज जाणवत रहाते. प्रचंड संपत्ती, गाड्या, बंगले आणी त्यात "विझलेली" माणसे असं जागोजाग दिसतं.
इथल्या माणसांच्या दैनंदिन जीवनात असलेले नैराश्य बघितले की आपणही काही वर्षांनी "प्रगती" करुन इथे येऊन पोचू की काय असे वाटून अंग शहारते!
दुर्दैवाने इकडच्या माणसांना बदलाची वाटही नाहीये, कारण त्यांना आपल्यासारखी पार्श्वभूमी नाहीये.
इकडे बघून आपल्याला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे, काय चुका करायच्या नाहीत ह्याच्याबद्दल!
आपल्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपली मुळे खरी कुठे आहेत ती शोधणं, आपल्याआत बघणं, स्वचा शोध चालू ठेवणं, पाश्चात्यांचे अंधानुकरण न करणं हेच उपाय आहेत.
कालाय तस्मै नमः!
चतुरंग
प्रतिक्रिया
२३ वाचने संवेदनाहीन काय्? प्रतिसाद नाही.
मस्त!
हेच खरे!
अतिशय सुंदर...
अग्निपंख!