सभोवताली सध्या होत असलेले बदल आणि त्यांचा वेग भल्याभल्यांना भ्रमित करून टाकणारा आहे. संस्कृतीचा अर्थही कडवेपणा, कर्मठपणा असा घेतला जातो. दहाबारा वर्षांपूर्वी दिसत नव्हती इतकी गर्दी मंदिरांच्या रांगांमध्ये आज दिसते. प्रत्येक दिवशी टीव्हीवर दिसणारी दृष्ये, वर्तमानपत्रातल्या बातम्या, रस्त्यावर ऐकलेले काही यामुळे अचंबित व्हायला होते.
या सर्वापासून दूर पळून जावे आणि तिथे काही चांगली पुस्तके घेऊन बसावे असे खरेच वाटते.
(संभ्रमित) आजानुकर्ण
या विषयावरील चर्चा मात्र वाचायला आवडेल.
(उत्सुक) आजानुकर्ण.
हे थोपवायचे मार्ग शोधण्याआधी हे थोपवणे आवश्यक आहे का आणि थोपवायचे कशासाठी या प्रश्नांची उत्तरे मला शोधावी लागतील. :)
जर ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हेच हवे असेल तर उरलेल्यांनी निमूटपणे पाहणे हेच योग्य ठरते. (आठवा विदूषक मधील कावळे आणि राजहंसाची कथा. :))
(निरुत्तर) आजानुकर्ण
विसूनाना,
आपले स्वगत आवडले. पण, वरील मंड्ळी म्हणतात तसे काळाला सामोरे जावेच लागेल आणि त्याच्या परिणामांनाही !!!
हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे.
बाकी,आपल्या स्वगतवजा चिंतनातील वेगवेगळ्या संदर्भांबरोबर केलेली मांडणी तितकीच आवडली.
पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही.
हाहाहा:))))
इतकी ओळ कॉपी करुन टाका रे कोणीतरी त्या तिकडे, एकदम पलिकडे ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वगत खूप आवडले!
हो, त्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे उत्तर म्हणाल तर आहे तितके आपण सांभाळावे आणि नाहीच जमले तर आपणही त्या संस्कृतीचा एक भाग व्हावे, इतकेच आपल्या हातात असावे.
मनातलं बोललात डॉ.साहेब. पु.ल. म्हणायचे तसं.. "समोरचा रेडियो कितीही ठणाणा करत असला तरी ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजावं निदान त्रास तरी कमी होतो :)"
-ऋषिकेश
आपला लेख वाचला, अतिशय उत्तम मांडणी आहे.
पण मला अजून एका आयामाचा उल्लेख करू वाटतो तो म्हणजे आपापसातील संबंध. असे पाहिले तर नव्या युगाबरोबरच अनेक प्रकारची प्रगत दळणवळण व संवादाची साधने आली. पण प्रश्न असा आहे की आपण त्याचा खरच योग्य वापर केला का? आपल्यामधिल संमंध व संवाद तेवेढे खरच समॄध्ध झाले का ? का आपण कुठल्या आभासी अशा "मायाजाला" त वावरत आहे , की जेथे आपणाला जे काही चांगले व प्रगत वाटत आहे तो प्रत्येक्षात एक भ्रम आहे
यानिमित्ताने नेटवर एक मस्त उतारा मिळाला..... या विषयाला समर्पकच आहे .....आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. त्याप्रमाणे बरेच काही बदलले आहे आणिअसेच बदलत राहील. जे चांगले आहे ते नक्कीच टिकून राहील बाकीचे नामशेष होईल. उदा. विजेचे दिवे आले तरी अजूनही वेळप्रसंगी मेणबत्या,कंदिल लागतातच. हाताने वारा घालायचे पंखे लागतातच. त्यांचे महत्व कमी झाले असले तरी ते नामशेष झालेले नाही. असेच भाषेचे अथवा इतर अनेक गोष्टींचे आहे.
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बदलत्या रुपात स्वीकारून आपण त्या प्रमाणे आपल्यात बदल केल्यास हे जास्त जड जाणार नाही असे वाटते.
"बदल ही एकमेव न बदलणारी गोष्ट आहे". बर्याच गोष्टींची सुरुवात घरातूनच होते. अगदी मराठी माध्यमात जावे की इंग्लिश, इथून सुरुवात होते.
आपण आपल्या तत्वांशी ठाम असणे अतिशय गरजेचे आहे. आपण जर मराठीला योग्य महत्व दिले तर आपल्यापुरती सुरुवात झाली.
असाच विचार जेवढे लोक करतील तेवढी भाषा टिकेल. शेवटी भाषा म्हणजे विचार आणी संवाद.
मी गेली ६ वर्षे अमेरिकेत आहे. मी व माझी पत्नी दोघेही आमच्या मुलाशी मराठीतून बोलतो. तो उत्तम मराठी बोलतो - चतकोर, करंगळी सारखे शब्द व्यवस्थित वापरतो.
मराठी गाणी, पुस्तके, सिनेमे इत्यादींचा चांगला संग्रह जवळ बाळगून आहोत. त्याच्याही नजरेला ते पडत असते व त्याचा परिणाम होतोच.
समोरचा माणूस मराठी आहे असे कळले की मी मराठीतूनच संवाद साधतो. आपला न्यूनगंडच भाषेला मारायला कारणीभूत होतो. आपण तसे होऊ दिले नाही म्हणजे झाले.
चतुरंग
प्रतिक्रिया
वेगवान
हे थोपवायला -
थोपवणे
नानासहेब,
आवडले !!!
बरोब्बर
नव्या युगाची नांदी : सत्य की भ्रम ????
बदल हा स्थायीभाव आहे!
प्रमोद देवांशी सहमत.