Skip to main content

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 11/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

वाचने 123833
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

In reply to by निनाद मुक्काम …

आपल्या धर्माशी संबंधित कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे काढू नयेत असे मुस्लिमांना वाटत असेल तर त्यांनी इतर धर्माशी संबंधित कोणाचीही कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे/बीभत्स चित्रे काढता नयेत. जर आपल्या धर्माबद्दल इतर धर्मियांनी आदरभाव बाळगावा असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्माबद्दल आदर बाळगला पाहिजे. आपल्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे म्हणून इतर कोणत्याच धर्मातल्या लोकांनी मूर्तीपूजा करायची नाही व जिथे संधी मिळेल तिथे आम्ही मूर्ती, देवळे वगैरे तोडून टाकणार असे वर्तन केले तर इतर धर्मीय सुद्धा संधी मिळताच तसाच प्रतिसाद देतील. सौदी अरेबिया, मालदीव इ. देशातले मुस्लिम इतर कोणत्याही देशात गेले तरी तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज, ईद वगैरे करतात. परंतु त्यांच्या स्वतःच्या देशात इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे पालन करायची बंदी आहे. हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार? आपल्याशी इतर धर्मियांनी जसे वागावे अशी मुस्लिमांची इच्छा असेल तसेच वर्तन त्यांनी इतर धर्मियांशी केले पाहिजे. अन्यथा इतर धर्मीय संधी मिळताच यांच्याविरूद्ध वागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या बायकोने हा प्रश्न आबू धाबी मध्ये एका शेखला विचारला आमच्या देशात तुम्ही तुमचे धार्मिक स्वातंत्र्य मागतात तुमच्या देशात का देत नाही ह्यावर त्याचे उत्तर होते तुमच्या देशातील लोकशाही आम्हाला आमच्या मागण्या मागायच्या हक्क देते तो आम्ही का सोडू आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे पेरिस मध्ये बुरखा बंदी केली तशी भारतात मोदी मनात असून आणू शकत नाही तुमची आणि माझी इच्छा असली तरी

In reply to by निनाद मुक्काम …

चला निदान एक मुद्दा तरी मान्य आहे तुम्हाला. मग आता मी विचारते, १० वर्षापुर्वी ऑस्ट्रीलियात सिडनी येथील एका बीचजवळ या लोकांची वस्ती वाढली. मग त्यांनी हळुहळु त्या बीचवर येणार्‍अ‍ॅया ऑस्सीजना हटकायला सुरवात केली.येथे स्त्रीयांनी पूर्ण कपडे घालुन फिरल पाहिजे, या बिचवर तुमच वर्तन इस्लाम विरोधी नसल पाहिजे. आमच्या धार्मिक भावना दुखावताहेत वगैरे वगैरे. या बातमिचे मेसेजेस सगळीकडे फिरले आणि हजारोने ऑस्सीज एका दिवशी तेथे जमले. अर्थात तरुण पोरं. राडा झाला. कोण जबाबदार? तुमच्या देशात तुम्हाला खायला प्यायला नाही, सुरक्षा नाही म्हणुन तुम्ही बोटी भरुन भरुन येथे निर्वासित म्हणुन येता. य्थले सरकार तुम्हाला इंग्लीश शिकवण्यापासून घरादारातल्या सगळ्या गोष्ती देउन तुमच पुनर्वसन करते आणि मग तुम्ही तुमचा धर्म काढता..काय म्हणायच? अगदी हीच परिस्थीती एका डोक्युमेंट्रीत मी इंग्लंड जवळच्या गावात पाहिली. हे लोक तेथे रहायला गेले. यांची जनसंख्या वाढली. आणि आज अशी परिस्थीती आहे की इंग्लीश बायकांना "यु आर अलमोस्ट नेकेड, मला तुझी लाज वाटते" अस सुनावल जाऊ लागलं. प्रसंगी बळाचा वापर सुरु झाला. जी मुलगी ही डॉक्युमेंटरी तयार करत होती, ती स्व्तः या गावात जन्मलेली. तू येथे आलीसच कशी असा प्रश्न तीला विचारला गेला. येथे यायच असेल तर माझ्या धर्माचा आदर राख अस सुनावलं गेलं. काय म्हणन आहे तुमच यावर? आणि आता या सगळ्यावर कडी म्हणजे कालची सौदी मधुन आलेली भारतिय आणि पाकिस्तानी मुस्लिमांना "स्वतःला उगा अरब समजू नका" अशी खडसावणी!! ब्राव्हो!!

In reply to by स्पंदना

चला, आत्ता या क्षणी मी तुमची बाजू, तुमचे मत शंभर टक्के मान्य करतो. चर्चा या वळणावर आली आहे कि मुस्लिमधर्मीय शांतीप्रिय नाहीत हे सिद्ध होत आहे. पुढे काय? नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका? प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे? माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे? त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते. गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले? मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही. माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे? दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे.

In reply to by संदीप डांगे

>>> नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका? या लोकांच्या कालबाह्य व बेकायदेशीर रूढींना विरोध करायचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता इ.) व त्यांचे फाजील लाड बंद करायचे. बहुतेक अमुस्लिम देशात हे असले फाजील लाड केले जात नाहीत. मुस्लिमांना तिथल्या कायद्यानुसारच वागावे लागते. आमचा शरियतचा वेगळा कायदा असले चाळे तिथे खपवून घेतले जात नाहीत. दुर्दैवाने भारतात निधर्मांध यांच्या असल्या कृत्यांना पाठिंबा देतात आणि तुमच्यासारखे देखील त्यांच्या दहशतीचे समर्थन करतात. >>> प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे? धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध करणे म्हणजे खोड्या काढणे नव्हे. >>> माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे? हाच तो निधर्मांधांचा प्रोपागंडा. आजवर निधर्मांध हाच प्रोपागंडा करून मिरवत आले आहेत. >>> त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते. पुन्हा एकदा प्रोपागंडा >>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता. >>> हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले? त्यांनी काय करायला हवे? >>> मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही. त्यात काय मूर्खपणा आहे? मुले ही मुलेच असतात. ती कोणत्याही देशातील असली तरी ती मुलेच असतात. दुर्दैवाने तुम्हाला इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या हत्या योग्य वाटतात आणि तुमच्या आणि इस्लामी अतिरेक्यांच्या दृष्टीने धर्म हा निष्पापांच्या जीवापेक्षा जास्त मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला ही भावना कळणार नाही. >>> माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे? अत्यंत हास्यास्पद वाक्ये! >>> दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे. तुम्हाला या धर्माचे व त्यांच्या दहशतवादाचे कौतुक आहे. तुम्ही जसे वागता तसे इतर वागतीलच असे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता.
आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय? बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे? आता बाबू बजरंगी स्वत:च सांगत आहेत म्हणून बरे नाहीतर असे काही झालेच नाही असे तुम्ही म्हणाल.

In reply to by संदीप डांगे

>>> आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? गुजरातमध्ये जे झाले ते इतरत्र का नाही झाले या तुमच्या प्रश्नावर मी कारणमीमांसा दिलेली होती. त्यावरून लगेच गुजरात दंगलीला माझे समर्थन आहे हा स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे पण झालात! >>> ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? तुमचा इतर सर्व गोष्टींप्रमाणे इतिहासाचा अभ्यास सुद्धा खूप कच्चा आहे. गुजरात दंगलीत जे गेले त्यात अनेक हिंदू सुद्धा होते. गुजरात दंगलीत दोन प्रकारे माणसे गेली. काही जण जमावाच्या दंग्यात मारले गेले तर काही जण दंगा करणार्‍या जमावाला थोपविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस व लष्कराच्या गोळीबारात मारले गेले. दोन्ही प्रकारे मारले गेलेल्यांमध्ये जसे मुस्लिम होते तसेच हिंदू सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. हिंदू-मुस्लीम दंगली भारतात गेली अनेक शतके सुरू आहेत. १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीतील मृतांची संख्या २००२ मधील गुजरातमधील मृतांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त होती. त्यामुळे "निष्पाप मुस्लिमांचे शिरकाण का झाले" असा चुकीचा प्रश्न विचारण्याऐवजी निष्पाप नागरिकांचे शिरकाण का झाले असा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल. आणि मुख्य म्हणजे रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले हा प्रश्नच तुम्हाला पडलेला दिसत नाही. >>> नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे तुम्ही नाही का पॅरिसमधील निष्पाप नागरिकांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी व्यंगचित्राची पळवाट शोधली. आठवतंय ना? बादवे, व्यंगचित्र काढण्याच्या तुलनेत रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले जिवंत जाळण्याचे कृत्य खूपच जास्त भयंकर आहे ना? >>> म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय? असं कोण म्हणालं? म्हणजे तुम्हाला पॅरिसमधील अतिरेक्यांचा हल्ला हा न्यायसंमत वाटतोय, पण गुजरातमधील नागरिकांचा प्रक्षोभ मात्र बेकायदेशीर वाटतोय. >>> बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे? पेशावरमध्ये १३२ मुलांना मारण्याची जी प्रेरणा तीच ही प्रेरणा, पॅरिसमध्ये १७ निष्पाप नागरिकांना मारून टाकण्यामागे जी प्रेरणा होती तीच ही प्रेरणा आणि पेशावर, पॅरिस इ. ठिकाणच्या हत्याकांडाचे समर्थन करण्याची जी प्रेरणा होती ती ही प्रेरणा.

In reply to by श्रीगुरुजी

रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले
याचे कारण तर मी अजूनपर्यंत मिपावर वाचलेले नाहीये

In reply to by अर्धवटराव

"तरीच…" म्हणजे काय? गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही. माझ्यासाठी यात एकच गोष्ट सत्य आणि समान आहे ती म्हणजे एका कट्टरतेला दुसऱ्या कट्टरतेने उत्तर दिले. बाकी आदर्शांच्या आणि सुसंस्कृतपणाच्या गप्पा फक्त गप्पा असतात. वेळ आणि परिस्थितीप्रमाणे साळसूद नराधम होतात आणि नराधम साळसूदपणाचा आव आणतात. २००७ पासून मी ह्या पैगंबर चित्रप्रकरणाबद्दल वाचत आहे. हा हल्ला कधी ना कधी होणारच होता आणि हे त्या संपादकासह सगळ्यांनाच माहिती होते. इस्लामीच नाही तर इतरही कट्टर धर्मीय त्यांच्या जीवावर उठले होते. यात पेन्सिल विरुद्ध बंदूक असा संघर्ष दिसत असला तरी तो कट्टर विरुद्ध कट्टर असाच आहे. अश्या लढाईत कुणीच जिंकत नाही. हेच सत्य आहे आणि ती स्वीकारून प्राप्त परिस्थितीवर निश्चित आचरता येणारी आणि परिणाम देणारी कृती अपेक्षित असते. म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे. तुम्ही भलताच अर्थ काढला. अजून काही ठोस परिणामकारक मार्ग असेल तर सांगा.

In reply to by संदीप डांगे

म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे
म्हणजे 'गुजरात करणे' हा एक 'उपाय' आहे इथपर्यंत तुमचे विचार प्रगल्भ आहेत तर. व्हेरी गुड. देन आय एम नॉट सर्प्राइझ्ड मि. संदीप. तुम्ही ऑलरेडी ठोस आणि परिणामकारक मार्गावरुन चालत आहात. त्याची फळं तुम्ही आरामात सहन करु शकाल, किंबहुना एंजोय कराल याबद्दलही काहिच शंका नाहि.

In reply to by अर्धवटराव

आतापर्यंत झालेल्या चर्चेतून फक्त एवढेच कळले कि काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय, मी कसा सुडोसेकुलरवादी आहे असा ठाम निर्णय आपल्यावतीने घेऊन टाकला आहे. त्यामुळे त्यांना आपण कसे कायदेप्रिय, न्यायप्रिय, सुसंस्कृत नागरिक आहोत ह्याचा दंभ मिरवता आला असेल. असो. कुणाला कशात आनंद वाटेल सांगता येत नाही. "भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करतात" हा माझा नाही तर माझ्या मताच्या विरोधात मत मांडणाऱ्याचा दावा आहे. त्याच वेळेस "प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नाही" हा पण त्यांचा दावा आहे. एकाच बाजूने केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी विधानांमुळे गोंधळलो आहे त्यामुळेच मी आता नेमके कसे वागायचे हे विचारलं आहे. २ पर्याय समोर आले आहेत. एक म्हणजे श्रीगुरुजींनी दिलेला सल्ला कि त्यांच्या कालबाह्य व चुकीच्या चालीरीतींना विरोध करा. आता घटनेने त्यांना त्यांच्या चालीरीती व मला माझ्या चालीरीती पाळायची मुभा दिली आहे, त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा? तो त्यांच्या धार्मिक सुधारणेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे सुधारक बघतील काय करायचे ते. आमच्यातल्या सुधारणा करायला आम्ही काही आउटसोर्सिंग नव्हते केले. दुसरा उपाय म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ वैगेरे: त्यांच्याविरोधात मिळेल तेवढा राग, द्वेष गोळा करत जायचे. एखादी गोधरासारखी घटना घडली कि सगळा संताप मोकळा करून त्याचे गुजरात करायचे. माझ्यामते दोन्हीही पर्याय पूर्ण चुकीचे आहेत. तुमच्याकडे काही पर्याय असेल तर द्या. उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका.

In reply to by संदीप डांगे

काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय,
उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका
संस्थळावर काहि आठवड्यांची सदस्यसता असणार्‍या व वैयक्तीक रित्या कुणि ओळखण्याची शक्यता कमि असणार्‍या एका आयडीला इथे कुणि काहि मुद्दाम लेबलं लावायचा प्रयत्न करतोय असं वाटणं हे प्रचंड हास्यास्पद आहे. असो. तुमच्या या गैरसमजाला उगाळण्यात काहि पॉइण्ट नाहि.
२ पर्याय समोर आले आहेत.
कुणिही काहिही पर्याय वगैरे दिलेले नाहित. तुम्ही स्वतःला कलाकार म्हणवता. व त्या चश्म्यातुन मानवी हत्याकांडाबद्द्लचे आपले उदात्त विचार तुम्ही प्रकट केलेत. इतरांनी त्यावर आपली प्रतिक्रीया दिली फक्त. शिवाय ज्यापद्धतीने तुम्हाला गुजरात पॅटर्न वगैरे दिसतात त्यावरुन तुम्हाला उपाय वगैरेशी काहिही घेणं देणं दिसत नाहि. उपाय तुमच्या डोक्यात ठाम आहेत व त्याचे परिणाम तुम्ही नक्की एंजोय करु शकाल याची मला खात्री आहे.

In reply to by संदीप डांगे

>>> त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा? वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला? बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?

In reply to by श्रीगुरुजी

वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला?
तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू.
बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?
दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार? बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते. हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे. त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे.

In reply to by संदीप डांगे

>>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू. सतीची चाल हिंदू धर्मात सक्तीची नव्हती हो. फारच थोड्या भागातील थोड्या कुटुंबात सती गेल्याची उदाहरणे आहेत. तरीसुद्धा समाजसुधारकांनी स्वतःच्या घरात ही चाल नसताना आणि स्वतःला याचा त्रास होत नसताना यावर बंदी आणलीच कारण ही चाल समाजविघातक होती. दुसर्‍याच्या धर्मात आपण का लुडबूड करावी ही मानसिकता अत्यंत घातक आहे. दुसर्‍या धर्मात याऐवजी हळूहळू दुसर्‍या गावात, नंतर दुसर्‍या गल्लीत, नंतर दुसर्‍या घरात अशी कक्षा अरूंद होऊ शकते. दुसर्‍या धर्मात घातक गोष्टींची परंपरा असेल तर त्याला विरोध करायलाच हवा. दुर्दैवाने अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली मुस्लिमांच्या वाईट चालीरीतींकडे दुर्लक्ष करून या चालीरीतींना कायदेशीर पाठबळ देण्याचे काम काँग्रेसने केले व निधर्मांधांनी तीच तळी उचलली. >>> दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार? आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब! >>> बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते. बरं मग? >>> त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे. तुमचा पण तोच दृष्टीकोन आहे, पण जास्त तीव्र स्वरूपात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे.
हे वाक्य कुठे गेले? तुमचे हे कसलेल्या पत्रकारांसारखे सोयीस्कर शब्द काढणे-घालणे, वाक्य उडवणे, त्यावर असंबद्ध प्रतिक्रिया देणे, बिनामुद्द्यांची चर्चा करणे, नुसते लाजवाब. गुरुजी, मानलं बा तुमच्या चिकाटीला. लगे रहो. निखिलराव वागळ्यांच्या तोडीस तोड आहात

In reply to by श्रीगुरुजी

आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब!
मी हिंदुविरोधी आणि मुस्लिमप्रेमी आहे या श्रीगुरुजींनी लावलेल्या अप्रतिम शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. :-)

In reply to by संदीप डांगे

>>> गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही. किती साळसूदपणा हा. तुमच्या मूळ लेखात तर पॅरिस हत्याकांडाचं जोरदार समर्थन आहे. बादवे, गोध्रा हत्याकांड विसरलात वाटतं? गोध्रा हत्याकांड काय, गुजरात दंगल काय, पॅरिस हत्याकांड काय, पेशावर हत्याकांड काय ... सर्व हत्याकांडे निंदनीय आहेत. तुम्ही मात्र सेलेक्टिव्हली कोणती हत्याकांडे वाईट व कोणती चांगली हे ठरवत आहात.

In reply to by निनाद मुक्काम …

>>> आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे. >>> लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे भारतातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी व पाश्चिमात्य जगातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी यात जमीनअस्मानाचा फरक आहे. भारतात सेक्यूलॅरिझम म्हणजे सेक्यूलॅरिझमच्या नावाखाली मुस्लिमातल्या अत्यंत अन्यायकारक गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून अन्यायकारक गोष्टींना कायदेशीर संरक्षण देणे व आम्ही इतर धर्मात हस्तक्षेप करत नाही अशी पाठ थोपटून घेणे असा होतो. याउलट पाश्चिमात्य देशात सेक्यूलॅरिझम म्हणजे सर्वधर्मियांना सर्व समान कायदे असणे व कोणत्याही विशिष्ट धर्माला झुकते माप ने देणे असा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे.
लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दोन परिमाणे आहेत ह्या आपल्या तथाकथित स्वतंत्र फ्रांस मध्ये. the prosecution of Sinet for “anti-Semitism” is now a national embarrassment for the French government. Sinet wrote a cartoon associating Jewishness with success. The cartoon joked that Jean Sarkozy, the son of French president Nicolas Sarkozy, would be more successful in life if he formerly converted to Judaism. Jean Sarkozy was getting married to a wealthy Jewish heiress at the time. Sinet was accused of being “anti-Semitic.” He sued one of his critics for defamation. When the editor of Charlie Hebdo asked Sinet to apologize, Sinet replied “I’d rather cut my balls off.” Chairle Hebdo magazine fired Sinet.

In reply to by संदीप डांगे

यातून नक्की काय सिद्ध होतंय आणि दहशतवाद्यांनी केलेल्या १७ लोकांच्या हत्या कशा समर्थनीय ठरतात?

In reply to by संदीप डांगे

वाट्टेल ती उदाहरणे देऊ नका. चार्ली हेब्दोने कुणाला नोकरीवरून काढून टाकले असेल तर एक उद्योग म्हणून त्यांना तो हक्क आहे. नोकरीवर ठेवताना काही अटींवर नोकर व नोकरीवर ठेवणारा सह्या करतात. त्यातल्या कुठल्या अटीचा भंग झाल्यास नोकरी जाऊ शकते. त्यावरून काही सिद्ध होत नाही. इथे सरकारने कुठेही बंदी घातली नाही. जे काही झाले ते कायद्याला धरून. कुणी कुणावर अंदाधुंद गोळ्या घालून लोकांना यमसदनाला घातलेले नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने गदा आणलेली नाही. तेव्हा म्हंमदाचे व्यंगचित्र आणि ह्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. ह्या उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही. मुस्लिम धर्म पिसाटांनी केलेल्या हल्ल्याचे दुरान्वयानेही समर्थन होत नाही.

In reply to by हुप्प्या

वाट्टेल ते… पासून सुरु होणारा प्रतिसाद बघितला कि तो तुमचाच असेल याची खात्री असते. वाट्टेल ते--- चे कॉपीराईट घेतलंय का? असो. वर उल्लेखित प्रकरणात काय वावगं आहे हे जर कुणी (फक्त मुस्लिमद्वेषातून) समजत नसेल किंवा समजूनच घ्यायचे नसेल तर अशा एकांगी आणि पूर्वग्रहदुषित हेकेखोरपणे वाद घालणाऱ्या दांभिक लोकांना का उत्तर द्यावं? जाउ द्या. कायदे, घटना आणि त्यातून मिळणारे न्याय किंवा संरक्षण हे सगळेच आभासी असते. त्याबद्दल नंतर कधीतरी. फ्रांस सरकार ज्यूंची टिंगल करणाऱ्यास कायदा वापरून वाकवू शकली. पण आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकावर मिरवणाऱ्या खोडसाळ पत्रकारांना पुरेसे संरक्षण देऊ नाही शकली... तुम्हाला बहुधा स्वत: काहीही संशोधन, वाचन करायचे नाही आहे, तरीसुद्धा हे वाचून घ्या एकदा.

In reply to by संदीप डांगे

2012 In September 2012, the newspaper published a series of satirical cartoons of Muhammad, some of which featured nude caricatures of him. Given that this issue came days after a series of attacks on U.S. embassies in the Middle East, purportedly in response to the anti-Islamic film Innocence of Muslims, the French government decided to increase security at certain French embassies, as well as to close the French embassies, consulates, cultural centers, and international schools in about 20 Muslim countries. In addition, riot police surrounded the offices of the magazine to protect it against possible attacks. Foreign Minister Laurent Fabius criticised the magazine's decision, saying, "In France, there is a principle of freedom of expression, which should not be undermined. In the present context, given this absurd video that has been aired, strong emotions have been awakened in many Muslim countries. Is it really sensible or intelligent to pour oil on the fire?" The U.S. White House stated "a French magazine published cartoons featuring a figure resembling the Prophet Muhammad, and obviously, we have questions about the judgment of publishing something like this." However, the newspaper's editor defended publication of the cartoons, saying, "We do caricatures of everyone, and above all every week, and when we do it with the Prophet, it's called provocation."

In reply to by संदीप डांगे

तुम्ही दिलेल्या इंग्रजी परिच्छेदात सरकारने कुठली कारवाई केल्याचे म्हटलेले नाही. त्या चार्ली हेब्दोच्या व्यवस्थापनाने त्या ज्यू विरोधी लिहिणार्‍याला नोकरीवरून काढून टाकले. आता ह्या घटनेमुळे महंमदाचे कार्टून आणि त्यानंतरची कत्तल हे योग्यच होते हे कसे ते जरा उलगडून सांगा. आम्हा अडाण्यांना ते कळत नाही. कारण संशोधन वा वाचन हे आपणच करत आहात असे दिसते आहे. असो.

In reply to by हुप्प्या

Siné sacking (2008) On 2 July 2008, a column by the cartoonist Siné (Maurice Sinet) appeared in Charlie Hebdo citing a news item that Jean Sarkozy, son of Nicolas Sarkozy, had announced his intention to convert to Judaism before marrying his fiancée, a Jewish heiress Jessica Sebaoun-Darty. Siné added, "he'll go far, this lad!" After this led to complaints of anti-Semitism, after journalist Claude Askolovitch described them as anti-Semitic. The magazine's editor, Philippe Val, ordered Siné to write a letter of apology or face termination. The cartoonist said he would rather "cut his own balls off," and was promptly fired. Both sides subsequently filed lawsuits, and in December 2010, Siné won a 40,000-euro court judgment against his former publisher for wrongful termination. Siné also reported a death threat posted on a site run by the Jewish Defense League. The text said "20 centimeters of stainless steel in the gut, that should teach the bastard to stop and think."

In reply to by श्रीगुरुजी

सहमत म्हणजे "हुप्प्या" यांच्या प्रतिसादाशी सहमत. संदिप डांगेच्या प्रतिसादाशी नव्हे.

In reply to by निनाद मुक्काम …

>>> मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून? कुराणात त्यांचे वर्णन आहे (म्हणे). कर्मठ मुसलमान दाढी, आखूड पायजमा, फरकॅप इ. वेशभूषा केलेले आढळतात. त्यांच्यासारखेच दिसण्याचा या मुस्लिमांचा उद्देश असतो.

In reply to by श्रीगुरुजी

चित्र आहेच की. इराणी परंपरेत त्यांची चित्रे काढणे संमत आहे. जास्त लांब कशाला जा, "महम्मद" हे विकिपीडिया आर्टिकल वाचा. तिथेच काही चित्रे आहेत. मजा म्हणजे इथे इतका दंगा चालू असताना त्या लेखावरची चित्रे मात्र कोणीही बॅन केली नाहीत.

झुंडसंहिता जिंदाबाद हा लोकसत्तातला लेख वाचला का? धार्मिक मूर्खपणा वाढत चालला आहे आणि धर्माविरुद्ध बोलणारे, लिहिणारे अधिकाधिक कलाकार हवे आहेत.

डांगेसाहेब ग्राफिक डिझायनिंग, मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले काम, क्रिकेट मधे चालणारे बेटींग, बी.सी.सी. आय मधील एक वर्ष, मुसलमान मित्रमंडळी असे अत्यंत व्यापक विश्व फार कमी लोकांना अनुभवण्यास मिळत असेल यावर तुमचे अनुभव लिहाच

In reply to by संदीप डांगे

नाही हो. आज धाग्यावरचे प्रतिसाद वाचत होतो त्यात तुमचा हा प्रतिसाद दिसला
(हाय कंबख्त, तूने पीही नही!) असे म्हणाल तर काय आहे ना की ही तुमची दारू जिथे बनते ना तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे (हाय कंबख्त, तूझे पताही नही!) .

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

>>> ग्राफिक डिझायनिंग, मद्य उद्योग वरच्या स्तरात केलेले काम, क्रिकेट मधे चालणारे बेटींग, बी.सी.सी. आय मधील एक वर्ष, मुसलमान मित्रमंडळी असे अत्यंत व्यापक विश्व फार कमी लोकांना अनुभवण्यास मिळत असेल यावर तुमचे अनुभव लिहाच :YAHOO:

आठ दिवस झाले हा धागा सुरु आहे. बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. चर्चा पुढे जात नाही आहे. जे घडले ते आपण नाकारू शकत नाही, ज्यामुळे घडले तेही नाकारू शकत नाही. मी फक्त कार्यकारणभावाचे समर्थन केले, आदर्शवाद आणि नितीमत्ता ह्या स्थळकाळसापेक्ष असतात. गळ्यातले मंगळसूत्र हे कुणाला प्रेमाचं, सौभाग्याचं प्रतिक वाटू शकतं तर कुणाला गुलामगिरीचं. एकाचा दहशतवादी दुसऱ्याचा क्रांतिकारी असतो. एकाची विभाजनवादी चळवळ दुसऱ्याची स्वातंत्र्य चळवळ असू शकते. हुसैनची चित्रे व्यक्तिगत कलाकृती होती, शर्लीची चित्रे हि व्यावसायिक उद्देशाने छापून हजारोंच्या संख्येने वारंवार प्रसारित केलेली होती. शर्लीच्या चित्रांकडे दुर्लक्ष करा म्हणणारे हुसैनला तोच नियम लावू शकत नाहीत हे पण कळले. घटना, नियम, कायदे व न्यायालये यांच्यातून खरोखरच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे नियम आणि कायद्यात बसवून कुणी चुकीचे वर्तन करत असेल तर न्याय कसा होईल? शार्लीच्याच प्रकरणात हल्लेखोरांनी नंतर शांतपणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असते, न्यायालयात खटला चालवून त्यांच्या वकिलाने आपल्या हुशारीच्या बळावर ह्या हत्या रागाच्या भरात झाल्या किंवा तत्सम काही कारणे देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करवून घेतली असती तर ह्या हत्या योग्य झाल्या असत्या का हा एक प्रश्न आहेच. दोन समाजात पडणाऱ्या संशयाच्या खोल दरीचा एकूण मानवजातीला धोकाच आहे. त्यामुळे तारतम्य बाळगणे फार महत्वाचे. दुर्दैवाने ते फार दुर्मिळ आहे. ह्या वादात माझे सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. पण पुढे वागायचे कसे हा प्रश्न सुटल्याशिवाय ह्या चर्चेचा काही फायदा झाला असे म्हणता येणार नाही. आयुधजीवी आणि बुद्धीजीवी या दोन्ही समाजाने एकत्र कसे राहायचे हाच प्रश्न महत्वाचा आहे. काहीही असो, जातीय सलोखा टिकणे फार आवश्यक आहे. ह्या विषयावर इथेच थांबतो. सर्व प्रतिसादकर्त्या सदस्यांचे आभार. माझ्या प्रतिसादाने कुणाला त्रास झाला असेल तर त्याने सरळ दुर्लक्ष करावे. धन्यवाद! एक नम्र विनंती: माझ्या आकलनाप्रमाणे मिपा हे विविध विचारांच्या आदानप्रदान व प्रदर्शनाचे मुक्त माध्यम आहे. कोणत्याही सदस्याच्या व्यक्तिगत व नाजूक विषयांना कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारच्या सार्वत्रिक चर्चेत ओढून आणणे व त्यावर वाद प्रतिवाद करणे शिष्टसंमत वाटत नाही. त्यामुळे त्याबाबतीत तारतम्य बाळगावे.

In reply to by संदीप डांगे

>>> मी फक्त कार्यकारणभावाचे समर्थन केले, आदर्शवाद आणि नितीमत्ता ह्या स्थळकाळसापेक्ष असतात. गळ्यातले मंगळसूत्र हे कुणाला प्रेमाचं, सौभाग्याचं प्रतिक वाटू शकतं तर कुणाला गुलामगिरीचं. एकाचा दहशतवादी दुसऱ्याचा क्रांतिकारी असतो. एकाची विभाजनवादी चळवळ दुसऱ्याची स्वातंत्र्य चळवळ असू शकते. तसंच निष्पापांची, बालकांची आंधळ्या धर्मवेडातून केलेली हत्या ही काहीजणांसाठी दु:खदायक असू शकते तर काहीजणांसाठी ती अत्यानंदाची. बरोबर ना? ही भावना सापेक्षच आहे ना? >>> दोन समाजात पडणाऱ्या संशयाच्या खोल दरीचा एकूण मानवजातीला धोकाच आहे. त्यामुळे तारतम्य बाळगणे फार महत्वाचे. दुर्दैवाने ते फार दुर्मिळ आहे. तुमचा लेख आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यावर तर हे तारतम्य अतिदुर्मिळ आहे हे लक्षात आलं. >>> ह्या वादात माझे सगळे मुद्दे मांडून झाले आहेत. पण पुढे वागायचे कसे हा प्रश्न सुटल्याशिवाय ह्या चर्चेचा काही फायदा झाला असे म्हणता येणार नाही. तारतम्य बाळगा. मरणार्‍याचा व मारणार्‍याचा धर्म बघून मत बनवू नका. मरणार्‍याकडे माणूस म्हणून पहा. सगळे प्रश्न सुटतील.

In reply to by श्रीगुरुजी

हुसैनची चित्रे व्यक्तिगत कलाकृती होती, शर्लीची चित्रे हि व्यावसायिक उद्देशाने छापून हजारोंच्या संख्येने वारंवार प्रसारित केलेली होती. शर्लीच्या चित्रांकडे दुर्लक्ष करा म्हणणारे हुसैनला तोच नियम लावू शकत नाहीत हे पण कळले. घटना, नियम, कायदे व न्यायालये यांच्यातून खरोखरच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे नियम आणि कायद्यात बसवून कुणी चुकीचे वर्तन करत असेल तर न्याय कसा होईल? शार्लीच्याच प्रकरणात हल्लेखोरांनी नंतर शांतपणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले असते, न्यायालयात खटला चालवून त्यांच्या वकिलाने आपल्या हुशारीच्या बळावर ह्या हत्या रागाच्या भरात झाल्या किंवा तत्सम काही कारणे देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करवून घेतली असती तर ह्या हत्या योग्य झाल्या असत्या का हा एक प्रश्न आहेच.

In reply to by संदीप डांगे

अरेच्चा, हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे राहिलेच की. असो. या राहिलेल्या मुद्द्यांवर आमचे खालील उत्तर आहे. :YAHOO:

In reply to by संदीप डांगे

बरेच मुद्दे तेच तेच येत आहेत. चर्चा पुढे जात नाही आहे. .......
या धागालेखात आणि धाग्यातील चर्चेत जाणवलेल्या तार्कीक उणीवांची, आणि धागा चर्चेची समीक्षा करावायाची आहे, काळाच्या ओघात स्वतंत्र धाग्याच्या रुपाने करेन.

हत्याकांडाचे समर्थन मागे घेत आहे. खुलासा: काल हा लेख वाचला. लेखकाने संयत पद्धतीने सगळे मुद्दे मांडले आहेत. कितीही चुकीचा असला तरी आपलाच मुद्दा लावून धरणाऱ्यापैकी मी नाही. त्यामुळे फ्रेंच हत्याकांडाचे समर्थन मागे घेत आहे. तेवढे सोडून बाकीचा लेख वाचावा. मी हिंदुविरोधी आहे का मुस्लिमप्रेमी याची शंका असलेल्यांनी माझा हा हिंदीतला लेख वाचावा. त्यावर काथ्याकुट करण्याची इच्छा असल्यास मिपावर मराठीत भाषांतर करून टाकेन. पण आता लगेच नाही, महिनाभराने टाकेन. ("हुश्श…. वाचलो", इति समस्त मिपाकर) "शांतीप्रिय मुस्लिम" हा एका ठिकाणी आलेला उल्लेख म्हणजे सगळेच मुस्लिम शांतीप्रिय आहेत असा होत नाही. उदाहरणार्थ ह्या लेखात दिलेल्या काही बातम्या व घटना. माझ्यामते त्यांच्या धार्मिक चालीरीतींचा विरोध करण्यापेक्षा त्यांच्या स्वत:चे विचार इतरांवर लादण्याच्या बळजबरीचा सर्व मार्गाने प्रचंड प्रचंड विरोध केला पाहिजे. त्यासाठी हिंसा हा पर्याय नसून सक्षम दबावगट हा पर्याय आहे.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब, काही गोष्टी मला यात लिहाव्याशा वाटतात. १) भारत ते इस्राएल या मध्य आशियातील देशांमध्ये सर्वच्या सर्व देश मुस्लीम /मुस्लीमबहुल आहेत. यातील एकाही देशामध्ये लोकशाही नाही. कारणे भरपूर आहेत. आपण शोधा. २) यातील कोणत्याही देशात भारतातील मुसलमानांना मिळते ते स्वातंत्र्य मिळत नाही. हि वस्तुस्थिती आहे ३) हुसेन साहेबांनी महमदाचे नग्न चित्र काढले असते आणी त्यांना मारण्याचा फतवा पाकिस्तानातील /इराण किंवा सौदीतील इमामाने काढला असता तर त्याचे( कारण तो भारतीय नागरिक आहे) संरक्षण करण्याचा खर्च कोणी उचलायचा? कारण असा अवास्तव खर्च ब्रिटनने सलमान रश्दीनच्या बाबतीत उचलला होता/आहे. ४) मग या संरक्षणाची जबाबदारी जर भारतीय सरकारने उचलायला पाहिजे होती असे आपल्याला वाटत असेल तर त्याने कतारला पळून जाऊन देशद्रोह केला नाही असे आपल्याला वाटते काय? खटले बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे अगदी अबू आझमी विरुद्धही भरले पण त्यातील कोणीही पळून गेले नाहीत. मग आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य या नावाने बोंब मारणाऱ्या व्यक्ती हुसेनच्या पळून जाण्यावर चकार शब्द का काढत नाहीत. अबू आझमी खुल्या सभेत बोलू शकतात कि "मुल्क के कितने भी तुकडे हो जाये हम किसीको अपने मजहबसे खिलवाड करने नही देंगे"हे भाषण मी स्वतः ऐकलेले आहे. हा देश द्रोह नव्हे तर काय? अशा माणसाला काय शिक्षा द्यावी? यावर खटला भरलेला आहे त्यांना कोणी गोळी मारली नाही. या देशाचा जो कायदा आहे त्याप्रमाणेच चालले पाहिजे ५) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकराना विचारले कि आपण धर्म बदल केलात तर इस्लाम कडे का नाही जात. त्यावर त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे कि इस्लाम मध्ये धर्म भक्ती हि देशभक्ती पेक्षा आद्य मानलेली आहे जे मला कदापीही सहन होणार नाही. ६) common civil code नको कारण ते आमच्या धर्मात ढवळा ढवळ करते असे म्हणणारे मुसलमान पुढारी common criminal code(Cr PC) बद्दल काहीच का म्हणत नाहीत? मग मुसलमान माणसाना चार लग्ने करायची मुभा आहे आणि तीन वेळा तलाक म्हणून बायकोला हाकलून देण्याची मुभा आहे तर मुसलमान चोरांना चोरी केल्यावर हात तोडण्याची शिक्षा का देऊ नये? हा दुटप्पी पणा कशासाठी या सर्व धडधडीत दिसणाऱ्या गोष्टी असूनही सुडो सेक्युलर व्यक्ती मुस्लीम लागुल्चालन का करीत आहेत? मला त्यांच्या वैचरिक दिवाळखोरीची कीव करावीशी वाटते. लष्करात एक गोष्ट अतिशय चांगली आहे ती म्हणजे आपला धर्म आपल्या घरात असला पाहिजे. लष्कराच्या ठाण्यातील मशीदीवर जोरात बांग हि दिली जात नाही कि गणेशोत्सवात ठणाणा बोंबले ( लाउड स्पीकर) सुद्धा लावले जात नाहीत. सर्वाना एकच कायदा. लष्करातील मुसलमानांना दुसरे लग्न करायला परवानगी नाही.होय हि वस्तुस्थिती आहे. तसे करायचे असेल तर लष्कर सोडायला लागते. त्यामुळे लष्करात हिंदू मुसलमान अशी कोणतीही तेढ नाही. सर्वाना एकाच पातळीवर आणले तर राजकारण्यांची दुकाने चालणार नाहीत पण कोणतेच दुकान न चाल्वता सुडो सेक्युलर लोक कशासाठी मारुतीच्या बेंबीत हात घालतात?

In reply to by सुबोध खरे

हुसैन पळून जाण्याचे खरे कारण तो खूप घाबरला होता. त्याला काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. हे त्याने स्वत: कबूल केले आहे. तसेच खटले लढवत बसणे आपल्या देशात फार मोठी गोष्ट नाही. हुसैन कडे तेवढा पैसा आणि सपोर्ट होता. पण जीवाचे कधीही कुणीही बरेवाईट करू शकतो ह्या भीतीने तो पळाला. त्याच्या चित्रांबद्दल हिंदूंमध्ये भयंकर प्रक्षोभ होता, हे काही खोटे नाही. घटनेने प्रत्येकाला आपला धर्म पालन व प्रचार करण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. घटनेतले हे कलम इतर नागरी कायद्यांच्या आड येते. मूळ कलम बदलणे हाच त्यावर उपाय आहे. माझ्या मते राज्यघटनेने कुठल्याही प्रकारे कुठल्याही धर्माचे अस्तित्व मान्य करू नये कारण त्यामुळेच जो धोका निर्माण झाला आहे तो फार भयानक आहे. आमच्या धर्मात असंच चालतं म्हणून कुणीही काहीही नियम काढेल आणि नागरी कायद्यांतून सूट मागेल. मतपेटीवर डोळा ठेवून तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी ही गोची करून ठेवली आहे. समान नागरी कायदा हा सर्वोच्च असला पाहिजे. ज्यांना तो मान्य नाही त्यांनी देश त्वरित देश सोडला पाहिजे. मुस्लिम आपल्या फायद्यानुसार रंग बदलतात हे काही लपून राहिलेले नाही. सर्व मुस्लिम हे अलकायदाचे सदस्य आहेत हे माझ्याच एका मुस्लिम मित्राने मला सांगितले होते. सर्व मुस्लिम आपल्या कमाईतून अलकायदास दान करतात. तो त्यांच्या धार्मिक आचरणाचा भाग आहे. त्याच वेळेला अलकायदा किंवा तत्सम संघटनेने केलेल्या हत्यांचा तोंडदेखला निषेधही करतात. बाकी इतर मुद्दे मान्य. तरीही कुठल्याही धर्मावर टीका करणे वेगळे आणि निंदानालस्ती, खोचक अपमान करणे वेगळे. शर्ली एब्दोच्या वागणूकीवर जो आक्षेप आहे तो मागे घेऊ शकत नाही.

कॉम्रेड आता थोडे सेन्सीबल बोलू लागले आहेत ! श्रेय तुम्हाला द्यायला हवे . एक हाती चांगली खिंड लढवलीत की ! आम्ही मुद्दामच लांब राहीलो , अस्ल्या राळ उडवण्याने काही होत नाही असा वैयक्तिक अनुभव असल्याने !

In reply to by विटेकर

आपण बोलतो तोच सेन्स आहे असे मत असणारेच कट्टरवादी म्हटले जातात. इतरांनी आपले मुद्दे केवळ आपण बोललो म्हणून मान्य केले असे समजणे हा केवळ अहंकार आहे. ह्यापेक्षा वेगळे ह्या लेखातही काही नव्हते म्हणा.

In reply to by संदीप डांगे

काही गोष्टी वादातीत असतात. सूर्य पूर्वेकडे नव्हे तर पश्चिमेकडे उगवतो असे म्हणून वाद घालाणार्‍या मूर्खाला काय म्ह्णाल ? असो , अकारण वेळेचा आणि बाईटचा अपव्यय नको , तो पुरेसा झालाच आहे. कोंबडे झाकले म्ह्णजे सूर्योदय होणार नाही अशा मूर्खोत्तमांनी आपल्या मूर्खांच्या नंदनवनात आनंदाने नांदावे ! आमची अजिबात ना नाही. शुभेच्छा !! ( आणि मिपाच्या भाषेत - मोठे व्हा .. वाढदिवसाच्या शुभेच्छा !

In reply to by विटेकर

केवळ आपले मत मानत नाही म्हणून इतरांना मूर्ख ठरवणारे महानच म्हणायला पाहिजेत. दुसऱ्यांना मोठे व्हा चा सल्ला देणाऱ्यांना आपण खरच मोठे झालो आहोत असं वाटत असेल तर आमचीसुद्धा काही ना नाही. - अजून आपण अंड्यातच आहोत का बाहेर पडलो आहोत याचा शोध घेणारं एक कुरूप वेडं पिल्लू

In reply to by शिद

सहमत, संपादकांना नम्र निवेदन. धागा वाचनमात्र करावा अथवा धाग्याचे शीर्षक बदलावे. माझ्याकडून ह्यापुढे कुठल्याही धाग्याला त्रासदायक नाव देण्यात येणार नाही याची मी काळजी घेईन.

३०१ माझा धागा हैज्याक केलात...आता मी बीशीशीआयवर पुढचा हल्ला कर्नार - फ्रेंच कार्टूनिस्ट आणि त्याला मार्नारा

डांगेसाहेबांनी बहुदा मुविंच्या धाग्याशी स्पर्धा करायचे ठरवलेले दिसते. अर्धे पर्तिसाद त्यांचेच जणु.

In reply to by हाडक्या

बहुधा तसेच असावे ! संक्षींच हा डुआयडी आहे का हो ? तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या मतासाठी मुसंडी मारणे !!! त्यांच्या आठवणीने गळा दाटून आला अणि पुनर्जन्माच्या सिद्धांतावरील श्रद्धा अधिक दृढ झाली.

+१ >>> तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या मतासाठी मुसंडी मारणे !!! हे वाक्य असे हवे. तोच आग्रहीपणा तीच चिकाटी , आपल्या चुकीच्या मतासाठी मुसंडी मारणे !!!

आज सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय सार्वजनिक संस्था आहे असा निकाल दिला . सविस्तर निकाल आला कि धाग्याला फुंकर घालूच :)

In reply to by कपिलमुनी

चांगला निर्णय. लवकरच बीसीसीआयचा संघ हा खऱ्या अर्थाने भारताचा संघ होईल असे वाटते. (गुरुजी शेवटचा प्रतिसाद माझाच असणार आहे!)

In reply to by आजानुकर्ण

ह्याबाबतीत इतका काथ्याकूट करण्याची खरोखरीच आवश्यकता होती का? बीसीसीआयचा संघ कायदेशीररीत्या भारताचा नसेलही. पण तो भारताचा 'डी फॅक्टो' संघ आहे ना! टेस्ट्स्मधे अधिकृतरीत्या त्या संघाला 'भारत' असेच संबोधले जाते, बीसीसीआय नव्हे. पूर्वी (म्हणजे सुमारे १९६५ सालाअगोदर) इंग्लण्डचा 'अधिकृत संघ' (म्हणजे जो 'इंग्लंड हे नाव धारण करून खेळतो, तो) भारतात येत नसे. तेव्हा त्यांचा जो (दुय्यम दर्जाचा) संघ आपल्याशी खेळे, त्याला एम. सी. सी. (मेरिलेबॉन क्रिकेट क्लब) असे अधिकृत नाव होते. नंतर त्यांच्या मते भारताच्या टेस्ट संघास 'प्रथम दर्जा' प्राप्त झाला. त्यानंतर आपण त्यांच्या 'इंग्लंड' हे नाव धारण करणार्‍या संघाशी खेळत आलो आहोत. मुळात इथे प्रश्न असाही आहे की, जे कोणी सर्वसाधारण प्रेक्षक भारताची टेस्ट मॅच पाहून त्यातील भारताच्या यशापयाशाविषयी जल्लोष अथवा दु:ख प्रदर्शित करतात, ते वरील 'डी फॅक्टो स्टेटस' मुळे. आता हा संघ अगदी तांत्रिक दृष्ट्या अधिकूत राष्ट्रीय संघ नाही, तसेच (बहुधा) पाकिस्तानचा संघही त्यांचा अधिकृत संघ नाही, इत्यादी तपशिलात ते जातच नाहीत. मला वाटते श्रीगुरूजींची टिपण्णी ह्या सर्वसाधारण प्रेक्षकांविषयी होती. (आपल्या आयुष्यात अनेक बाबी अशाच 'डी फॅक्टो' असतात, अनेक विषयातील स्टँडर्ड्स सुरूवातीस डी फॅक्टो असतात, पुढे सर्व रीतसर कामकाज संपूर्ण झाल्यावर मग त्यांजवर संबंधित स्टँडर्ड करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे शिक्कामोर्तब होते. तसे होईपर्यंत कधीकधी वर्षे लोटतात).

In reply to by प्रदीप

तुमचा मुद्दा मान्य आहेच. मी वरही लिहिले होते ते पुन्हा लिहितो. मी स्वतः आवडीने क्रिकेट पाहायचो. आजकाल तितका रस राहिलेला नसला तरी संघाची प्रगती वगैरे पाहतोच. भारतासारख्या राष्ट्रीय स्तरावर कोणतीही एकच एक युनिक आयडेंटिटी नसलेल्या देशाला क्रिकेट-बॉलीवूड वगैरेंसारखे देशाला एकत्र आणण्यासाठी हा खेळ मोठ्या प्रमाणावर उपयुक्तही आहे. निव्वळ खेळातली हारजीत आणि सुखदुःखाच्या हलक्याफुलक्या बाबी असतील तर ठीकच आहे. पण जेव्हा या चर्चेने देशद्रोहाचे वळण घेतले तेव्हा ह्या सर्व मुद्यांना काहीही अर्थ राहत नाही. देशद्रोह हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. देशाच्या दृष्टीने कदाचित सर्वात गंभीर. शिवाय इंडियन पीनल कोडनुसार या गुन्ह्याची तांत्रिक व्याख्याही आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर देशद्रोहासारखा आरोप होतो तेव्हा तो कोणत्या बेसिसवर होतोय याची तपासणीही आवश्यक आहे. जी संघटना स्वतःला देशाचे अधिकृत प्रतिनिधी मानत नाही त्या संघटनेच्या पेरोलवर काम करणाऱ्या चाकरांनी केलेल्या भ्रष्टाचाराला 'देशाची गद्दारी' मानणे किती हास्यास्पद आहे हेच दाखवून द्यायचे आहे. उद्या असा दावा कोणी केलाच तर कोर्ट तो खटला दाखल तरी करुन घेईल काय? मग उगीच बेणारेबाईंची ट्रायल घेतली त्या स्टाईलने एखादा देशप्रेमी, दुसरा देशद्रोही असे लेबलिंग कशाला करत बसायचे.

In reply to by आजानुकर्ण

'देशद्रोह' हे अगदी टोकाचे विशेषण सोडून देऊया, फारतर. पण माझ्या अनुभवानुसार, कुठल्याही पातळीवरील, कुठल्याही खेळातील संघांच्या फॉलोअर्समधे, अ‍ॅलेजियन्सची अगदी तीव्र भावना असते. अगदी गल्लीतील क्रिकेट घ्या. आमच्या हिंदू कॉलनीतील प्रत्येक गल्लीची स्वतःची टीम असायची. आणी दरवर्षी नित्यनेमाने तिथे अंडरआर्म स्पर्धा व्हायच्या. तिथे जर दुसर्‍या गल्लीतील एखाद्या मुलाने, आपल्या विरूद्ध खेळत असलेल्या पहिल्या गल्लीच्या खेळाचे निरालस जाहीर कौतूक तिथल्यातिथे, तुम्ही म्हणता तशा अगदी खेळाचा आनंद घेण्याच्या भावनेतून केले असते, तर त्याचे काय झाले असते, असे वाटते? हे अगदी गल्ली खेळाचे उदाहरण दिले. अगदी इंग्लिश प्रीमियर लीगच्या टीम्सच्या चाहत्यांचेही तसेच असते. तिथेही बापल्या टीममधून कालपर्यंत खेळलेल्या खेळाडूवर त्याच्या जुन्या टीमच्या होमग्राउंडवर, त्याच्या आताच्या नव्या टीमकडून खेळण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याची होणारी हूर्यो आपण पाहतोच की! खेळ समजून घेऊन, समोरील टीममधील खेळाडूंच्या खेळाचे खाजगीत, व खेळ संपल्यानंतर, कौतूक करणे वेगळे, व तिथल्या तिथेच एका टीमच्या कंपूत बसून समोरील टीमचे गोल झाले की टाळ्या पिटणे वेगळे, नाही का? ज्या व्यक्ति भारताविरूद्धच्या मॅचमधे पाकिस्तान जिंकल्यावर जाहीरपणे फटाके फोडतात, जल्लोष साजरा करतात, त्यांना 'देशद्रोही' नका म्हणू हवे तर, पण त्या व्यक्ति तिथे खेळातील खुबी समजून पाकिस्तानच्या खेळाडूंचे कौतुक करत आहेत, असे तुम्ही नक्कीच मानत नसाल?