मी मागे जे म्हण्टले तेच परत म्हणतो. रामदास हे मिपाचं एक फार मोठ्ठं फाईंड आहे. त्यांचे लिखाण , त्यातील व्यक्तिरेखा , चार शब्दांच्या वाक्यावाक्यातून एक कालखंड उभा करण्याची क्षमता , "बीटवीन द लाईन्स" असणारी अर्थसंपृक्तता... हे सगळे मला फार वरच्या दर्जाचे वाटते. त्यांच्या लिखाणातून पानवलकर, मोकाशी (आणि लहान मुलाच्या पस्पेक्टीवने लिहिण्याच्या बाबतीत जी ए ) यांच्यासारख्या दिग्गज कथा लेखकांची याद येते.
त्यांचे प्रस्तुत लिखाण हे त्यांच्या खास शैलीतले. एका गरीब , जुनाट विचारसरणीच्या कुटुंबातील स्त्रीवर्गाचे शोषण, त्यांच्या दडपल्या गेलेल्या भावना , कोवळेपणाची झालेली राखरांगोळी हे सारे अस्सलपणे उभे केले आहे. गरीबी आणि जुनाट विचारसरणी यांच्या दुहेरी कात्रीमधे माणसाची माणूस म्हणून जगण्याची डीग्निटी कशी समूळ नाश पावते याचे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दर्शन घडते. वयात आलेल्या मुलींची कुचंबणा, न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा , कसलेही कोवळेपण नि खासगीपण नसणे याचे एक संवेदनशील असे चित्र इथे लेखक रंगवतो.
वेगळा प्रतिसाद देत नाही. म्हणजे देऊच शकणार नाही. मुक्तसुनीतनी जे काही लिहिले आहे त्याच्याशी १०१% सहमत. कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे.
काही काही वाक्यं आतून हलवून गेली.
बिपिन कार्यकर्ते
Haven't I said Bip after meeting Ramdas uncle that he is different, मनस्वी व्यक्तीमत्व
रामदास काका , you have a knack to touch the heart !!
Kudos to your writting !
~ वाहीदा
आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली.
सुंदर.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.
वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.
आजही आंबा खावासा वाट्त नाही. शेटाणी असलेल्या आत्याने सुटीत आणलेले १ पेटी आंबे नागासारखे डसतात अजुनही. खायला बसलेले असताना "खा, हो बरोबर पोट भरुन, नाहीतरी दादाला थोडेच परवडणार आहे हे"
तेच आतेभावाच्या जुन्या कपड्या बाबतीत.
त्याच छोट्या वाक्यांचे तीर, तसेच भावनांचे संधान, तेच कथेचं उलगडत जाणं, तीच पात्रांची फेर धरुन नाचायची पद्धत, तोच काळ उभा करण्याची क्षमता, तीच अंगावर लोंढ्यासारखी येणारी कथा आणि तेच कथेच्या शेवटी वाचकाला नि:शब्द करुन टाकणं!
नुसतंच अर्थगर्भ नाही तर आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनाला आडवा-उभा छेद देऊन जाणारं असं लिहिणं म्हणजे देवाचंच देणं!
रामदास हा मिपाच्या खाणीत निघालेला हिरा आहे! इतका संपन्न कथालेखक मिपाला लाभला हे आमचं भाग्य!! :)
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)
(नतमस्तक)
चतुरंग
रामदास - अप्रतिम लिहिले आहे तुम्ही...खरच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी. लिहित रहा......आम्हाला मेजवानी आहे!
- मनिष
(खुद के साथ बातां - पुढच्या ठाणे भेटीत रामदासजींना भेटलेच पाहिजे!!!)
अप्रतिम कथा!
खरंतर कथेतील वातावरण मी अनुभवलेलं नाही.. किंवा तो काळ- तेव्हाचे विचार यापासूनहि दुर आहे.. तरीही कथा वाचून एक अनामिक हुरहुर लागली.. डोळे कधी पाणावले कळलंच नाहि.. का कोण जाणे अचानक अक्षरं धुसर दिसायला लागली :(
केवळ अप्रतिम!
-(धुसर) ऋषिकेश
रामदास काका...
जबरदस्त लिहिलय....अगदी आमच्या लहानपणीची आठवण झाली...चतुरंग म्हणतात तसं
(काटेकोरांटीची फुलं सुंदर असतात हे माहीत होतं, पण आता आयुष्यात कधीही पुन्हा ती फुलं बघेन तेव्हा त्या फुलांच्या जागी मला ही कथा दिसेल!)
अंतर्मुख केलत तुम्ही....
धन्यवाद...
मुकुल
"कोणत्याही दिवाळी अंकात अगदी सहज शोभावेत असले लेख मिपावर नेहमीच येत असतात, सबब मिपाला दिवाळी अंकाचे विशेष कवतिक नाही!" असे आम्ही नेहमीच म्हणत असतो हे यासारख्या लेखावरून सिद्ध होते..! :)
तात्या.
रामदास ब्रँडचा जवाब नाही.
मुक्तसुनीत, नंदन, मेघनातै यांना विनंती. वरील लेखाच्या तोडीचे किंवा वरचढ लेखन कुठे पाहीले असेल तर तो लेख /दिवाळी अंक कृपया सांगा. अन्यथा इतर जालीय दिवाळी अंकाबद्दल काही इंटरेस्ट नाही. ;-)
शब्द नाहीत व्यक्त करायला....
वाचता-वाचता अक्षर कधी धुसर झाली समजलच नाही....
(काळा गोम्या)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वातावरण, हळवेपणा समर्थपणे रेखाटला आहे.
लघुकथा म्हणून कथानकाचा आराखडा नीट समजला नाही मला, पण त्याचे सोडा - कदाचित लघुकथा म्हणून वाचायचा प्रयत्न मी करूच नये.
पुन्हा येऊन वाचण्यासारखे लेखन आहे. वाचनखूण साठवली आहे.
अतिशय ताकदवान लेखन. मुक्तसुनितयांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
कवितेचा प्रवास, शिंपिणीचे घरटे आणि हा लेख. एकापेक्षा एक सरस ललित लेखन.
>तूप जास्त झालं की बेसनाचे लाडू जागीच बसतात.तसं थोडसं झालं आहे.<
कमालच आहे. नमस्कार !
-- लिखाळ.
रामदास काकांच लिखाण म्हणजे क्लासच काय बोलु अजुन. :)
चतुरंग आणि मुक्तसुनीत यानी वर लिहिलेल्या प्रतिसादाशी सहमत.
हे रामदास काकांसाठी..................
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
>>> आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?
वा !
एकदम मस्त लेखन !
मनाला भिडणारं !
जिओ ! रामदास बाबू !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
प्रतिक्रिया
सुरेख...
मस्तच
प्रतिक्रिया
+१
पूर्ण सहमत...
>काही काही
सहमत
Do u remeber Bip
+++१
++++१
रामदास हे मिपाचं एक फार
सुरेख..
सुन्न झाले वाचून.
काय लिहू?
मस्त
केवळ अप्रतिम.
भुतकाळ
मस्त!
काका,
रामदासा, नको रे रडवत जाऊस!!
सहमत
सहमत!
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अप्रतिम!
वरच्या
रामदास काका...
सुरेख...!
बोलता येत नाही
अवांतर -
+१
अप्रतीम
सुंदर..
अप्रतीम
अप्रतिम........
उत्तम
प्रत्ययकारी
भावपूर्ण
अजोड लेखन
सुंदर लेखन
+१
मित-शब्दांत संवेदना
थोडसं
जोरदार
अप्रतीम कथा
रामदास
केवळ सुंदर !!!
झकास
>>> आता घरात
अप्रतिम
अप्रतिम