Skip to main content

जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/12/2014 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे. या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

वाचने 42453
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by पिंपातला उंदीर

तुमचे म्हणणे बरोबर आहे. आजच्या लेखामध्ये भयानक चुका आहेत. जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती. अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.

In reply to by सव्यसाची

जोगी यांच्या बाबतीतली चूक तर टाळण्याजोगीच होती.
+१. एक गोष्ट समजत नाही. "या राज्यात अजित जोगीसारख्या बनेल नेत्यास काँग्रेसने पुढे करून पाहिले" हे या अग्रलेखातील वाक्य आहे. समजा झारखंडमध्ये काँग्रेसचा कोणी मोठा नेता असता तर त्या नेत्याऐवजी अजित जोगी हे चुकून लिहिले आहे असा बेनेफिट ऑफ डाऊट गिरीश कुबेरांना देता आला असता.पण राज्यात काँग्रेसचा असा कोणी नेताही नाही. मग इतकी मोठी चूक कशी काय झाली हे समजत नाही.
अब्दुल्ला हरले नाहीत हे म्हणणे पण चुकीचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे.
समजा ओमर अब्दुल्लांचा २००२ च्या विधानसभा निवडणुकांमधला गंदरबालमधून झालेला पराभव कुबेर विसरले तरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अगदी सहा महिन्यांपूर्वीच श्रीनगरमधून फारूख अब्दुल्लांचाही पराभव झाला होता हे पण ते विसरले?

निवडणुका जिंकने येवढेच काम मोदी करत आहेत ,विकासाच्या बाबतीत मात्र मूग गिळुन गप्प. महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच ,उलट काँग्रेस सरकारच्या निर्णयांना पुढे चालू ठेवणे व त्यांच्या विकासकामांचे श्रेय लाटणे चालू आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

सोनिया आणि राहुल यांनी एकदा ' भाजपला फक्त सत्ता हवी आहे 'असे वेडगळ विधान केले होते. कुठल्याही राजकीय पक्षाचा हेतू हा सत्ता हाच असतो. मोदी फक्त निवडणुका जिंकण्याचं काम करत आहेत हे त्याच धर्तीचं विधान आहे. मोदींनी निवडणुका जिंकण्याचं काम केलेलं नाही, लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या पक्षाला मतं दिलेलेी आहेत. मेक इन इंडिया, जन धन योजना, किरकोळ विक्री क्षेत्रात परकीय गुंतवणूक न आणणे हे काँग्रेसचे निर्णय होते की काय? GST आणि विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक काँग्रेसच्या काळात जाहीर झाली होती पण अंमलबजावणी कोण करतो हे महत्वाचं आहेच. उद्या मी आयफोन ८ जाहीर केला आणि अॅपलने तो बाजारात आणल्यावर त्याचं श्रेय घेतलं तर चालेल काय?

In reply to by बोका-ए-आझम

ओ बोकेश्वर! कुणाला उत्तरे देऊन एनर्जी वाया घालवताय? त्यांचे कामच आहे ते. मोदी हे नाव दिसले की गरळ ओकणे हा यांचा विरंगुळा आहे. खरेतर गरज आहे, कारण नायतर यांना कोणी भाव देत नाही.

In reply to by बॅटमॅन

कसं आहे की उगाचच कुणीही उंदीर काहीही किचकिच करु लागला की फिसकारणं आणि नख्या काढणं हा बोक्याचा सहजस्वभाव आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

वेलकम बॅक नानासाहेब! पुनर्जन्माबद्दल अभिनंदन!! मस्त्य, कस्त्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, ... या उच्च अवतारी परंपरेप्रमाणेच "ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर, नानासाहेब नेफळे, माईसाहेब कुरसुंदीकर, ग्रेटथिंकर, ..." ही थोर डूआय परंपरा आहे.

In reply to by ग्रेटथिंकर

महागाई भ्रष्टाचार कमी करणे दूरच ?????? जरासे गूगलुन बघितले तर कळेल की महागाई कमीच होत चालली आहे: The inflation rate in India was recorded at 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India averaged 9.09 percent from 2012 until 2014, reaching an all time high of 11.16 percent in November of 2013 and a record low of 4.38 percent in November of 2014. Inflation Rate in India is reported by the Ministry of Statistics and Programme Implementation (MOSPI), India.

अरे, ग्रे.थिं. फिलौसोफर उत्तर दे.
निवडणुका जिंकने येवढेच काम
तुला, बाजारात जाउन तुझ्या वांगी-पावट्याच्या भाजीसाठी तांबाटु आणण्याइतके सोपे वाटले का ??

In reply to by विनोद१८

ग्रेटथिन्कर व मी ,आमच्यात फरक आहे. मी ग्रेटथिंकर आहे ,नामसाधर्म्याचा अर्थ असा नव्हे कि आम्ही एकच व्यक्ती आहोत. बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही. @कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.

In reply to by ग्रेटथिंकर

@कपिलमुनी, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत प्रचंड उतरल्याने मोदींने पेट्रोल डीझेलचे दर कमी केले ,त्यामुळे महागाई कमी झाल्याची आकडेवारी व प्रत्यक्ष किंमती यांच्यात भ्रामकता पैदा झाली आहे. एण्ड युजरला या आकड्यांचा फायदा होताना दिसत नाही.
म्या कुटं काय बोल्लो ?

In reply to by ग्रेटथिंकर

>>> बाकी ते नानासाहेब माईसाहेब टॉपगेअर्ड वगैरेची काहीच टोटल लागली नाही. तुम्हाला लागली नसेल एखादेवेळेस, पण आम्हाला लागली ना!

ही किंमत उतरल्यामुळे महागाई कमी झाली आहे, त्यात मोदी सरकारचं काही श्रेय नाही!बरोबर. याचा अर्थ उद्या हे दर वाढून महागाई भडकली तर त्यालाही मोदी सरकार जबाबदार नाही!

"मैं शुक्रगुजार हूँ श्रीनगर के लोगो का, हुर्रियत का, सभी अतंकवादियो का, जिन्होंने कश्मीर में उस समय कोई गलत घटना को अंजाम नहीं दिया, वरना वो चाहते तो कुछ भी कर सकते थे. पाकिस्तान ने भी माहौल को सहायक बनाने में मदद किया, मेरा ऐसा मानना है की अगर वो नहीं चाहते तो श्रीनगर में शांति से चुनाव नहीं हो सकता था." - मुफ्ती मोहम्मद सईद

माफ करा, वरील विधान शपथविधीनंतरचे आहे हे सांगायला विसरलो. आणि हो, अजून एक... ग्रेटेस्ट देशभक्त ऑफ ऑल टाईम, माननीय श्री. सज्जाद जी लोन यांनी J&K मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

इथले भाजप चे चिरपरिचित भक्त निवडणुकीपूर्वी असा दावा करत होते की काँग्रेस सत्तेसाठी कुणासोबत पण (ओमार अथवा मुफ्ती ) शय्यासोबत करेल . बिचाऱ्या भक्तांना मोदी देवानेच तोंडघशी पडले . ते जाऊ दे राष्ट्रगीत चालू असताना महबुबा मुफ्ती ची body language पाहिली का ? त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सरकार ने ३७० कलम मागे घेतले जाणार नाही अशी भाषा वापरली आहे . ते जाऊ दे इथले भक्त या गोष्टीचे समर्थन करतील . बघतच राहा . बाय द वे सीमेवर गेल्या काही दिवसात मारल्या गेलेले जवान त्यांच्यासाठी collateral damage असावेत बहुदा . एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल

In reply to by पिंपातला उंदीर

>>> एवढं दुतोंडी सरकार देशाने कधी पाहिलं नसेल There is no change in the BJP’s stand on repealing Article 370 of the constitution, which guarantees special status to Jammu and Kashmir, Parliamentary Affairs Minister M. Venkaiah Naidu said Sunday. He replied in the negative when asked if the BJP had compromised on the issue to form a coalition government with the People’s Democratic Party (PDP). “We stand where we were and we will be,” he said. “Why will they accept our stand and why will we accept their stand?” he said, when asked whether the PDP had agreed to the Bharatiya Janata Party’s stand on the issue. According to sources privy to the developments, the two sides have possibly agreed on formation of a Committee which will go into the Armed Forces Special Powers Act (AFSPA) and suggest areas from where it could be revoked. On Article 370, while BJP has given no written assurance as demanded by the PDP, the CMP is expected to say that both parties will respect the aspirations of the people of the state within the Constitution. सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.

In reply to by श्रीगुरुजी

सत्तेसाठी आपली देशहिताची भूमिका न बदलता त्यावर ठाम राहणारे सरकार देशाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.
हम्म. सत्तेसाठी कायपण ही भाजपाची भूमिका कायमच ठाम राहिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुम्ही भाजपचे भक्त आहात हे मान्य. पण काय लेव्हलच्या चुकांचे तुम्ही समर्थन करत आहात? भाजपच्या मतदारांनी, पुढे भाजप पीडीपी शी लग्न करेल म्हणुन मते दिली होती का? इतकी सत्ता का हवी आहे भाजपला की कमरेचे पण सोडुन डोक्याला बांधावे. आणि तुमच्या सारख्या भाजप भक्तांना अजुन एक सल्ला. तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात. अश्या वेळी गप्प बसावे. नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.

In reply to by प्रसाद१९७१

तुम्ही ह्या चुकांचे समर्थन करुन आणि असले प्रतिसाद लिहुन भाजपचेच नुकसान करत आहात. अश्या वेळी गप्प बसावे. नाहीतर तुमचे असले समर्थन बघुन सामान्य मतदार भाजप पासुन कायमचे दूर जातील.
अगदी हेच होत आहे सध्या. माझ्या ज्या मित्रांनी ‘विकासासाठी’ म्हणून भाजपाला मत दिले होते, ते आता ‘आप’चा परफॉर्मन्स बघून आपले मत बदलत आहेत. अगदीच काही ‘आप’चे समर्थक वगैरे झाले नाहीत, पण आप हा पक्ष कॉंग्रेस-भाजपपेक्षा नक्कीच वेगळा आहे हे त्यांना कळून चुकले आहे. मी पूर्वी भाजपचा कट्टर विरोधक होतो (कॉंग्रेसचासुद्धा), पण भक्तांचे वागणे बघून मला आता भाजपवरच दया यायला लागली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

मग तिथे भाजपने काय करायला हवे होते? तिथे तीन पर्याय होते. (१) कोणीच सरकार स्थापन न केल्याने राज्यपाल राजवट लावणे, (२) पीडीपी + नॅकॉ किंवा पीडीपी + काँग्रेस अशी युती होऊन सरकार स्थापन करणे आणि भाजपने विरोधात बसणे, (३) पीडीपी + भाजप असे सरकार स्थापन करणे. भाजप वगळता काश्मिर राज्यातील सर्व पक्ष पाकिस्तानविषयी व अतिरेक्यांविषयी सहानुभूती बाळगणारे व काश्मिरमधील हिंदूंकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे आहेत. भाजप तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. भाजपने विरोधात बसणे म्हणजे या उरलेल्या पक्षांना पुन्हा एकदा मुक्तहस्त देण्यासारखे आहे. तिथे राज्यपाल राजवट चालविणे म्हणजे अनागोंदी माजविण्यासारखे आहे. या ज्वलंत सीमावर्ती राज्यात फार काळ अनागोंदी परवडण्यासारखी नाही. भाजपकडे आता निदान सत्तेचा निम्मा तरी वाटा असल्याने या पक्षांना पूर्वीइतके मोकळे रान मिळणार नाही आणि पीडीपीच्या कारवायांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण राहू शकेल. त्याचबरोबर भाजपला आपला पक्ष विस्तारण्यास संधी मिळेल. हुरियत सारख्या फुटीर संघटनांचे पूर्वीपेक्षा कमी लाड होतील. काश्मिरमध्ये श्रीनगर खोर्‍यात मुस्लिम बहुसंख्य आहेत, लडाखमध्ये बौद्ध व जम्मूमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपचे सर्व आमदार जम्मू विभागातील आहेत, तर पीडीपीचे सर्व आमदार श्रीनगर खोर्‍यातील आहेत. भाजपने गप्प बसून राहणे म्हणजे जम्मू विभागाला शून्य प्रतिनिधित्व मिळणे आणि पाकिस्तानवादी पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसला मुक्तद्वार देण्यासारखे आहे. भाजपच्या निमित्ताने सत्तेत प्रथमच जम्मूला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले. काश्मिरमधील लाखो पंडीत कुटुंबे गेली २०-२५ वर्षे निर्वासित म्हणून दिल्लीत राहत आहेत. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेसने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे (कारण उघड आहे). हीच मंडळी परत सत्तेत आली असती तर हे दुर्लक्ष कायम राहिले असते. परंतु आता भाजप सत्तेत आल्याने ही कुटुंबे परत आणण्याच्या हालचाली सुरू होतील. राहता राहिला प्रश्न मुफ्तीच्या प्रक्षोभक वक्तव्यांचा. अफझल गुरूच्या फाशीला पीडीपीचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे काल मुफ्ती जे बडबडला त्यात काहीच नवीन नव्हते. भाजपबरोबर सरकार स्थापन करताना पीडीपी व भाजप हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. निव्वळ पीडीपी नव्हे तर अरूंधती रॉय, ह्यूमन राईट्स वॉच अशा अनेकांनी अफझल गुरुच्या फाशीला विरोध केला होता. निवडणुक शांततेने पार पडल्याबद्दल पाकिस्तान व अतिरेक्यांचे आभार मानणे ही मुफ्तीची विचारपूर्वक केलेली चाल होती. भाजपबरोबर युती केल्याने नाराज झालेल्या या घटकांना चुचकारण्यासाठी व आपण आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत हा संदेश देण्यासाठी त्याने हे वक्तव्य केले. भाजपने तातडीने या वक्तव्याविरोधात आपली भूमिका मांडून आपण त्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. पुढे काय होईल याचा अजून अंदाज येत नाही. दोन्ही पक्ष अत्यंत परस्परविरोधी आहेत. मुफ्ती आपला फुटिरतावादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करेल आणि भाजप त्याला विरोध करेल. कदाचित ही युती अल्पकालीन ठरेल. परंतु भाजप विरोधात असता किंवा पीडीपीची इतर पक्षांबरोबर युती झाली असती तर पीडीपीला आपला अजेंडा नक्कीच पुढे रेटता आला असता. परंतु आता भाजप बरोबर असल्याने ते तितकेसे सोपे नाही. भविष्यात भाजपचे पूर्ण सरकार येण्याच्या दृष्टीने निदान भाजपचे पहिले पाऊल तरी पडले आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

खरंय. भक्तांनी लगेच समर्थनही सुरु केलेले दिसते. जम्मू-काश्मीरबाबत काहीतरी वादग्रस्त विधान करणाऱ्या आपच्या नेत्यांविरूद्ध देशद्रोही वगैरे भाषा वापरणारे नमोरुग्ण आता पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेक्यांचे आभार मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-पीडीपीच्या शय्यासोबतीबाबत काय करताहेत ते पाहायला जाम मजा येतेय!

जम्मू कश्मीर में भाजपा के साथ गठबंधन में सत्ता संभालने के एक दिन बाद सत्तारूढ़ पीडीपी ने सोमवार को केंद्र की राजग सरकार से मांग की कि संसद पर हमले के दोषी अफजल गुरू के अवशेष लौटाये जाएं। पीडीपी के आठ विधायकों ने इस संबंध में बयान जारी कर कहा कि पार्टी अवशेषों की वापसी के लिए पूरी ताकत से लगे रहने का वादा करती है। - झी न्यूज २ मार्च २०१५

In reply to by नांदेडीअन

मुफ्ती काहीही बरळेल. किंबहुना तो असे बरळणार याची खात्रीच होती. मुफ्तीने निवडणुक यशस्वी पार पडल्याबद्दल जे विधान केले त्याबद्दल लगेचच भाजपने योग्य ते प्रत्युत्तर दिलेले आहे. मुफ्तीचा पक्ष किंवा अब्दुल्लाचा नॅशनल कॉन्फरन्स किंवा जम्मू-काश्मिरमधील काँग्रेस यांच्यात काहीही गुणात्मक फरक नाही. काँग्रेस मुफ्तीच्या बडबडीबद्दल त्याला चकार शब्दात जाब न विचारता भाजपने निवेदन करावे म्हणून मागे लागला आहे. वास्तविक मुफ्तीच्या मताशी असहमती दर्शवून मग भाजपला जाब विचारायला हवा होता. पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत. पीडीपी सर्वात मोठा पक्ष असल्याने व पॉडीपीला बहुमत नसल्याने त्यांना कोणत्यातरी पक्षाबरोबर युती करावीच लागली असती. पीडीपी, नॅकॉ आणि काँग्रेस हे एकाच विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांची आपापसात युती होणे चांगले नव्हते. भाजप व हे इतर पक्ष हे दोन टोके आहेत. पीडीपी व भाजप एकत्र आल्याने निदान निम्मे मंत्री तरी वेगळ्या विचारसरणीचे असतील व भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही. परंतु हुरियतशी चर्चा करणे, पाकिस्तानी निर्वासितांना सामावून घेणे, लष्कराला दिलेला विशेषाधिकार कायदा रद्द करून संवेदनाशील क्षेत्रातून लष्कर काढून घेणे, पाकिस्तानबद्दल व अतिरेक्यांबद्दल सहानुभूती बाळगणे इ. बाबतीत नॅकॉ व काँग्रेसने अजिबात विरोध केला नसता. पण भाजपचा या गोष्टींना विरोध राहील व त्यामुळे मुफ्तीला एककल्ली कारभार करता येणार नाही. अफझल गुरूबद्दल काश्मिरी पक्षांना पूर्वीपासूनच सहानुभूती होती. त्यामुळे मुफ्ती बडबडला त्याबद्दल नवीन काहीच नाही. फक्त मुफ्तीला कशाला दोष द्यायचा, भारतातील काही निधर्मांधांनी सुद्धा यापूर्वी अफझल गुरूबद्दल आपली सहानुभूती अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखविली आहे. (उदा. सुझन अरूंधती रॉय). मुफ्ती जे बडबडतो तेच भारतातील अनेक निधर्मांध अनेकवेळा बोललेले आहेत. जेव्हा भाजप सत्तेत नव्हता तेव्हा सुद्धा पाकिस्तानप्रेमी अनेकवेळा जाहीरपणे तसेच बोलायचे. त्यांचे तोंड बंद करता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हहपुवा *mosking*
त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत.
*clapping* मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं.
भाजपमुळे पीडीपी वर नियंत्रण राहील. मुफ्ती वाटेल ते बरळणारच आणि त्यावर कोणीच नियंत्रण आणू शकत नाही
*clapping* नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!! बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय.

In reply to by आजानुकर्ण

>>> मग काँग्रेसी विचारांच्या पक्षाबरोबर भाजपाने युती का केली म्हणे? एवढं सत्तेवाचून नक्की काय अडलं होतं. वर एका प्रतिसादात सविस्तर उत्तर दिलं आहे. >>> नियंत्रण राहील की राहणार नाही? भाजपामुळे अशा युतीतील घटकपक्षावर कितपत नियंत्रण राहते आहे ते महाराष्ट्रातही दिसतेच आहे!! बरळण्यावर कोणीच नियंत्रण आणू शकणार नाही. परंतु पाकिस्तानवादी, अतिरेक्यांना मदत देण्याची कृती, निर्वासित पंडितांकडे दुर्लक्ष इ. गोष्टी आता पीडीपीला अनिर्बंधपणे करणे शक्य होणार नाही. >>> बाकी प्रतिसाद आवडला आहे. राजनाथसिंग-मोदींसकट अनेक भाजपेयी देशभक्त मंत्र्यांसमोर मुफ्तींनी पाकिस्तानचे गुणगान गाऊनही खुर्चीसाठी युती टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहून फारच मनोरंजन होतंय. त्यात काहीच कसरत नाही. मुफ्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. त्यात नवे काहीच नाही. भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतही मुफ्ती हेच करत होता. दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका सोडलेल्या नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत
सईद यांच्या या वादग्रस्त वक्तव्याकडे काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले. काश्मीर निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देत त्यांनी मुख्यमंत्री सईद यांचा दावा खोडून काढला. काश्मिरातील जनता, सीमेवर अहोरात्र तैनात सैन्यदल आणि निवडणूक आयोगाला या निवडणुकीचे श्रेय जाते, असे सांगून, सभागृहाने सईद यांच्या विधानाचा निषेध करणारा प्रस्ताव करावा, अशी वेणुगोपल यांनी केली. पाकिस्तान आणि हुर्रियतच्या सहकार्यामुळे निवडणूक यशस्वी झाल्याचे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा मुख्यमंत्री सईद यांनी केला आहे. त्यामुळे सईद यांच्याशी काय बोलणे झाले हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मुलायमसिंह यादव यांच्यासह अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला, पण गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही मागणी फेटाळून लावली. (स्त्रोत - http://maharashtratimes.indiatimes.com/international/Afzal-guru/article…) असो...

In reply to by सुनील

याच बातमीतला खालील शेवटचा परिच्छेद द्यायचा विसरलात का मुद्दाम देण्याचे टाळले?
सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णपणे असहमत असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली. आपण हे विधान विचारपूर्वक आणि पंतप्रधान मोदी यांच्या सहमतीने करीत असून, त्याविषयी कोणताही वाद वा संभ्रम निर्माण होऊ नये. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीचे श्रेय निवडणूक आयोग, लष्कर आणि निमलष्कराचे जवान तसेच तेथील जनतेला जाते, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंग यांनी अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात काश्मिरमधील शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचे श्रेय काश्मिरमधील जनतेला, निवडणुक आयोगाला व लष्कराला दिले आहे. त्यामुळे यावर अजून काही वेगळे बोलण्याची गरज नाही. भारतात अनेकजण, अनेक ठिकाणी, अनेकवेळा प्रक्षोभक विधाने करत असतात. अशा प्रत्येक विधानाचा संसदेत निषेध व्हायचा असेल तर दरवर्षी फक्त निषेधासाठी संसदेचे एक वेगळे अधिवेशन बोलवावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

माझा प्रतिसाद तुमच्या खालील वाक्याबद्दल होता.
पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत
ते चुकीचे आहे, हेच सिद्ध करायचे होते, जे झाले आहे. असो.

In reply to by कपिलमुनी

मी प्रतिवाद करतोच. जेव्हा लॉगिन होईन तेव्हाच प्रतिवाद करणे शक्य असते. इतरांसारखा मी अहोरात्र मिपावर नसतो. तेव्हा सुतावरून स्वर्गाला जाण्याऐवजी जरा धीर धरा. खाली उत्तर दिलेले आहे.

In reply to by सुनील

काँग्रेस दुतोंडी आहे. एकीकडे लोकसभेत मुफ्तीच्या विधानाचा संसदेने निषेध करावा व थेट मोदींनी याबाबत निवेदन करावे अशी मागणी करताना दुसरीकडे काँग्रेसचा वरिष्ठ नेता असलेल्या मणिशंकरने "अफझल गुरूवर अन्याय झाला. त्याला फाशी देण्यासाठी पुरावा नव्हता. त्याचे शव नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला हवे." असे जाहिररित्या सांगितले आहे. मुफ्तीच्या विधानावर मोदींनी निवेदन करावे अशी मागणी करताना मण्याच्या विधानावर काँग्रेसच्या कोणी निवेदन करायचे? सोनिया गांधींनी का मनमोहन सिंगांनी? म्हणूनच मी लिहिले की मुफ्तीला जाब न विचारता काँग्रेस मोदींना जाब विचारत आहे आणि मण्याच्या विधानावर तर काँग्रेसची नेहमीप्रमाणे दातखीळ बसलेली आहे. काँग्रेसची संसदेतील भूमिका खरी का मण्याच्या तोंडातून येणारी मुक्ताफळे खरी? नेहमीप्रमाणे काँग्रेस दुतोंडी भूमिका बजावत आहे. एकीकडे मुफ्तीच्या विधानाचा निषेध करावा असा आग्रह धरून आपण राष्ट्रप्रेमी असण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे अफझल गुरूबद्दल सहानुभूती दाखवून आपले किळसवाणे व्होटबँक राजकारण सुरूच ठेवायचे. सुदैवाने अफझल गुरूबाबत भाजपमध्ये वरपासून खालपर्यंत सर्व नेत्यांची एकच भूमिका आहे. मोदींनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अत्यंत स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात मुफ्तीच्या विधानाविषयी असहमती दर्शविली. गृहमंत्रालयाने अफझल गुरूचे अवशेष ताब्यात द्यायची मागणी फेटाळून लावलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी मोदींनाच जाब विचारणार. ५६ इंचाची छाती घेऊन पाकिस्तानपासून भारताचे रक्षण करण्याचा दावा मोदींनी केला होता, मण्याने नाही. आता भाजपा-पीडीपी शय्यासोबत असलेल्या मंत्रीमंडळाच्या पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेकीप्रेमी मुख्यमंत्री मुफ्तीच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेच्या दाव्याबाबतचा जाब मोदींना विचारणार नाही तर काय मण्याला विचारणार का? तिकडे काश्मीरमध्ये पीडीपीशी व्याभिचार करायचा आणि दिल्लीत पतिव्रतेचा आव आणायचा याला दुतोंडीपणा म्हणतात. काँग्रेस जे करत आहे त्याला नाही. एवढं शिंपल तुम्हाला कळू नये याचं आश्चर्य वाटतं.

In reply to by आजानुकर्ण

>>> अहो गुरुजी मोदींनाच जाब विचारणार. ५६ इंचाची छाती घेऊन पाकिस्तानपासून भारताचे रक्षण करण्याचा दावा मोदींनी केला होता, मण्याने नाही. आता भाजपा-पीडीपी शय्यासोबत असलेल्या मंत्रीमंडळाच्या पाकिस्तान-हुर्रियत-अतिरेकीप्रेमी मुख्यमंत्री मुफ्तीच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेच्या दाव्याबाबतचा जाब मोदींना विचारणार नाही तर काय मण्याला विचारणार का? अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा? असो. मोदींनी त्यावर सविस्तर उत्तर दिलेले आहे. >>> तिकडे काश्मीरमध्ये पीडीपीशी व्याभिचार करायचा आणि दिल्लीत पतिव्रतेचा आव आणायचा याला दुतोंडीपणा म्हणतात. काँग्रेस जे करत आहे त्याला नाही. एवढं शिंपल तुम्हाला कळू नये याचं आश्चर्य वाटतं. काय व्यभिचार केला? काँग्रेस दोन तोंडांनी परस्परविरोधी देशहितविरोधी भूमिका मांडत आहे आणि तो तुम्हाला दुतोंडीपणा वाटत नाही! धन्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा?
अहो आधी तुम्हीच म्हणालात की मुफ्तीचं पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. जी गोष्ट जगजाहीर आहे त्याबाबत त्याच व्यक्तीला जाब कसाकाय विचारणार? नंतर ती व्यक्ती आपल्या देशप्रेमी ५६ इंच परिधानमंत्र्यांच्या चर्चेचा उल्लेख करते तेव्हा नमोजीशेठला विचारणे आवश्यकच आहे.
काय व्यभिचार केला?
व्यभिचार हाच की ज्या व्यक्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे त्याच्याच नेतृत्वाखाली सत्तेची पोळी लाटण्यासाठी शय्यासोबत करणे आणि नंतर दिल्लीत येऊन आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत हे सांगणे!

In reply to by आजानुकर्ण

>>> अहो आधी तुम्हीच म्हणालात की मुफ्तीचं पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे. जी गोष्ट जगजाहीर आहे त्याबाबत त्याच व्यक्तीला जाब कसाकाय विचारणार? नंतर ती व्यक्ती आपल्या देशप्रेमी ५६ इंच परिधानमंत्र्यांच्या चर्चेचा उल्लेख करते तेव्हा नमोजीशेठला विचारणे आवश्यकच आहे. मग फक्त मोदींना कशाला? ज्या व्यक्तीने मुक्ताफळे उधळली त्याला जाब विचारण्याची तुमची हिंमत नाही. उलट ज्यांनी हे वक्तव्य केले नाही त्यालाच जाब विचारताय? तर मग फक्त मोदी कशाला? पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, नवीन पटनाईकांना विचारा, गेलाबाजार सोनिया गांधींना विचारा. फक्त मोदींना कशाला? >>> व्यभिचार हाच की ज्या व्यक्तीचे पाकिस्तानप्रेम जगजाहीर आहे त्याच्याच नेतृत्वाखाली सत्तेची पोळी लाटण्यासाठी शय्यासोबत करणे आणि नंतर दिल्लीत येऊन आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत हे सांगणे! मुफ्तीने नॅकॉ किंवा/आणि काँग्रेसबरोबर युती केली असती तर या दोन पक्षांनी त्याच्या सुरात सुर मिसळला असता किंवा मौन पाळले असते. याउलट भाजपने स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलेले आहे. मुफ्तीसारख्यांना कह्यात ठेवण्यासाठी हा बडगा आवश्यक होताच. भाजप बरोबर असल्याने आता मुफ्ती कितीही बरळला तरी त्याला प्रत्यक्ष कृतीसाठी मोकळे रान मिळणार नाही कारण तसे करायचा प्रयत्न केला तर भाजपचा सोटा लगेच पाठीत बसेल. त्यामुळे हा व्यभिचार नसून मुफ्तीसारख्यांना ताब्यात ठेवण्यासाठी योग्य ते पाऊल उचललेले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अहो ज्याने हे विधान केले त्यालाच जाब विचारायला नको का? मोदी तुम्हाला आवडत नसेल, पण म्हणून इतर कोणी काहीही बरळलं तरी त्या व्यक्तीला न विचारता मोदींनाच जाब विचारायचा?
अहो ज्याने विधान केले आहे, तो तुमचा विधीवत पार्टनर आहे ( नवरा का बायको ते द्या सोडुन ). तो कोणीही नाहीये. उद्या कॉग्रेस चे कोणी काही बरळले तर मोदींना कोणी विचारणार नाहीये. आधी सरकार मधुन बाहेर पडा आणि मग मुफ्ती म्हणला ते चूक आहे वैगरे म्हणा. इथेही भाजपनी इतकी लाचारी दाखवली आहे. भाजपचे २५ आणि पीडीपी चे २८ असे आमदार असताना, अर्थ, गृह अशी महत्वाची खाती पीडीपी कडेच.

In reply to by प्रसाद१९७१

>>> अहो ज्याने विधान केले आहे, तो तुमचा विधीवत पार्टनर आहे ( नवरा का बायको ते द्या सोडुन ). तो कोणीही नाहीये. उद्या कॉग्रेस चे कोणी काही बरळले तर मोदींना कोणी विचारणार नाहीये. पार्टनर असला तरी त्याला जाब न विचारता मोदींना जाब विचारणे हास्यास्पद आहे. >>> आधी सरकार मधुन बाहेर पडा आणि मग मुफ्ती म्हणला ते चूक आहे वैगरे म्हणा. कशाला बाहेर पडायचं? मुफ्तीवर वचक ठेवण्यासाठी भाजपने बरोबर असणे गरजेचे आहे. आज भाजपची त्याला गरज आहे. त्याने इतर पक्षांबरोबर युती केली असती तर त्याला रान मोकळे मिळाले असते. आता तसे होणे नाही. >>> इथेही भाजपनी इतकी लाचारी दाखवली आहे. भाजपचे २५ आणि पीडीपी चे २८ असे आमदार असताना, अर्थ, गृह अशी महत्वाची खाती पीडीपी कडेच. त्याने काहीच फरक पडत नाही. काश्मिरमधील गृह व अर्थ खात्याला काहीच अर्थ नाही. काश्मिरची सुरक्षा सैन्याच्या ताब्यात आहे आणि सैन्य केंद्राच्या ताब्यात आहे. अ‍ॅफ्स्पामुळे सैन्याला विशेष अधिकार मिळालेले आहेत. प्रॅक्टीकली काश्मिरचे गृहखाते केंद्राकडेच आहे, काश्मिरचा गृहमंत्री नामधारी आहे. अर्थखात्याची तीच अवस्था आहे. काश्मिरची अर्थव्यवस्था केंद्राच्या मदतीवरच चालते. तिथला अर्थमंत्री नामधारी असतो. तुमचे वाचन आणि आकलन कमी असल्याने तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

>>> पडलो तरी नाक वरच असे तुमचे आहे:-) किंवा तुम्ही भाजप मधे नोकरी करता. मी पडलेलो नाही आणि पडल्यानंतर सुद्धा नाक वर करण्याची सवय मला नाही. त्याचप्रमाणे मी भाजपमध्ये नोकरी करत नाही. तुमचा वरील प्रतिसाद तुमच्या वैफल्याचे प्रतिबिंब आहे. तुमचे वाचन कमी आहे, तुमची माहिती अत्यल्प व चुकीची आहे व तुमच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीची मते ठासून भरलेली आहेत. त्यामुळेच राजकारण असो वा अर्थकारण, तुमचे आकलन कमी आहे. या धाग्यावरील तुमचे प्रतिसाद पाहिले तर हे सहज लक्षात येईल. खालील धाग्यावर तुमचा प्रतिसाद व त्याला मिळालेले यथायोग्य उत्तर यामुळे मी वर दिलेला अभिप्राय सिद्ध होते. असे माझे एकट्याचेच मत नाही, इतरांचेही आहे हे लक्षात आले असावे अशी आशा आहे. http://www.misalpav.com/comment/671362#comment-671362 http://www.misalpav.com/comment/671446#comment-671446 असे असले तरी वरील अभिप्रायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास तुम्हालाच फायदा होईल. वाचन वाढविलेत, अभ्यास वाढविलात, स्वयंप्रयत्नाने नवीन माहिती मिळविलीत, मनातले पूर्वग्रह काढून टाकलेत तर नक्कीच सुधारणा होऊ शकेल. असो.

In reply to by श्रीगुरुजी

त्याने इतर पक्षांबरोबर युती केली असती तर त्याला रान मोकळे मिळाले असते.
काहिही. सईद आधी देखील कॉंग्रेस बरोबर सत्तेत होते. काय केलं मोकळ्या रानाचं? या सत्तेची गरज भाजपाला जास्तं आहे असं वाटतय.

In reply to by श्रीगुरुजी

पण मुफ्तीबद्दल चकार शब्द न उच्चारता काँग्रेस भाजपलाच जाब विचारत आहे. त्याचे कारण काँग्रेस व मुफ्तीचे विचार वेगळे नाहीत
हे तुमचे विधान निखालस चुकीचे होते हे सिद्ध झाले आहे. बाकी फाफटपसारा तुम्हालाच लखलाभ! इत्यलम.

In reply to by सुनील

नाही सिद्ध झालं. कारण एकीकडे मुफ्तीच्या विधानाचा स्वतः प्रत्यक्ष निषेध न करता किंवा मुफ्तीला जाब न विचारता, संसदेने मुफ्तीच्या निषेधाचा ठराव मंजूर करावा व त्याबाबत मोदींनी जाब द्यावा असा काँग्रेसने आग्रह धरला आहे आणि त्याचवेळी मण्याच्या तोंडातून मुफ्तीच्या बरळण्याशी काँग्रेसने संमती दर्शविली आहे. मी आधीच लिहिलं होतं की मुफ्तीचे विचार आणि काँग्रेसचे विचार वेगळे नाहीत. मण्याच्या बडबडण्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेस वायझेड आहे . दिग्गू , मण्या काहीही बरळतात . मुफ्ती तर पाकिस्तानी धार्जिना आने . केजरी आणि गँग देशाच्या एकात्मतेला धोका आहे. हे सगळ मान्य केला तरीही भाजपाने अजूनही मांडलेला संसार समर्थनीय ठरू शकत नाही. भाजपाची आणि पीडीपी ची भुमिका एक नसेल तर मग कोणत्या आधारावर राज्य चालू आहे ? केंद्र सरकार कारवाई का करत नाहिये ? जाता जाता भाजपची मंत्री यादी मधे पण फुटीरतावादी आहेत्च

In reply to by कपिलमुनी

>>> हे सगळ मान्य केला तरीही भाजपाने अजूनही मांडलेला संसार समर्थनीय ठरू शकत नाही. काही जणांच्या मते हा संसार समर्थनीय नसू शकतो. असे मत असण्यास काहीच चूक नाही. भारतात किंवा जगात कोणत्याही गोष्टीवर एकमत असणे अत्यंत अवघड आहे. >>> भाजपाची आणि पीडीपी ची भुमिका एक नसेल तर मग कोणत्या आधारावर राज्य चालू आहे ? किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर राज्य चालेल. >>> केंद्र सरकार कारवाई का करत नाहिये ? कोणावर आणि घटनेच्या कोणत्या कलमाखाली कारवाई करणार? मुफ्तीच्या बोलण्यामुळे कोणत्या कायद्याचे किंवा घटनेच्या कलमाचे उल्लंघन झाले आहे? >>> जाता जाता भाजपची मंत्री यादी मधे पण फुटीरतावादी आहेत्च कोण हा मंत्री?

In reply to by कपिलमुनी

सज्जाद गनी लोनचे वडील अब्दुल गनी लोन पूर्वी काँग्रेसमध्ये होते. १९६७ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. १९७८ मध्ये त्यांनी पीपल्स कॉन्फरन्स नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. १९९० च्या दशकात अनेक फुटिरतावादी संघटनांनी व पक्षांनी एकत्र येऊन ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्स नावाची संघटना स्थापन केली. हुरियतमध्ये अब्दुल गनी लोन च्या बरोबरीने मिरवैझ फारूक, यासीन मलिक, शाबीर शाह, अब्दुल गनी भट, गिलानी इ. मंडळी होती. यात तीन मतप्रवाह होते. गिलानी, भट इ. ना काश्मिरचे पाकिस्तानबरोबर विलिनीकरण हवे होते, इतरांना काश्मिर हा वेगळा देश म्हणून हवा होता. अब्दुल गनी लोन ला भारताच्या अंतर्गत काश्मिरला संपूर्ण स्वायत्तता हवी होती. अब्दुल गनी लोन हे त्यातला त्यात मवाळ व्यक्तिमत्व. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय ला काश्मिरचे पाकिस्तानमध्ये विलिनीकरण हवे होते. काश्मिर स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहणे किंवा काश्मिर अधिक स्वायत्ततेसह भारताचा भाग म्हणून राहणे हे आयएसआयच्या योजनेच्या विरोधात होते. अतिरेकी कारवाया करून आपल्याला हवे ते पदरात पाडून घ्यावे याला अब्दुल गनी लोनचा विरोध होता. त्यांना शांततापूर्ण तोडगा हवा होता. हुरियतमधील इतरांचा अतिरेक्यांना विरोध नव्हता. आपल्या योजनेच्या विरोधात अब्दुल गनी लोन जात आहे हे लक्षात आल्याने २००२ मध्ये आयएसआय ने भर सभेत त्यांची हत्या घडवून आणली. त्यावेळी जाहीरपणे सज्जाद लोन ने हत्येमागे आयएसआय असल्याचा आरोप केला होता. आपल्या वडीलांच्या हत्येनंतर सज्जाद लोन हळूहळू हुरियतपासून दूर जाउ लागला. कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत सहभागी होण्यास हुरियतचा प्रखर विरोध होता. सज्जाद लोन २००९ पर्यंत हुरियत बरोबर होता. परंतु २००९ मध्ये तो हुरियतपासून दूर गेला. हुरियतचा विरोध डावलून सज्जाद प्रथम २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिला, पण निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत सज्जाद लोन च्या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. त्यात तो स्वतः व अजून एक उमेदवार निवडून आला. भाजपने सज्जाद लोन विरूद्ध आपला उमेदवार दिलेला नव्हता. नरेंद्र मोदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याला टीका सहन करावी लागली होती. आता पीडीपी-भाजपच्या मंत्रीमंडळात भाजपच्या कोट्यातून सज्जाद लोन ला मंत्रीपद देण्यात आले आहे. Separatist leaders say Lone had moved away from separatism long ago. "The day he participated in the elections in 2009, he ceased to be a separatist. Calling him a former pro-freedom or separatist is wrong and it will not have any impact on the ideology of separatists," said a senior pro-independence Jammu and Kashmir Liberation Front (JKLF) leader. सज्जाद लोन हा २००९ पर्यंत फुटिरतावादी गटाबरोबर होता, परंतु आता फुटिरतावादी नाही. परंतु २००९ पासून तो फुटिरतावादी गटापासून दूर गेला आहे. तो हुरियतपासून दूर गेल्यामुळे फुटिरतावाद्यांमध्ये काही प्रमाणात तरी फूट पडलेली आहे. सज्जाद सारख्या इतरांना हुरियत कॉन्फरन्स किंवा त्यासारख्या फुटिरतावादी गटांपासून दूर करणे आवश्यक आहे. ही मंडळी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही यंत्रणेत सामील झाली तर फुटिरतावाद कमी होऊ शकेल. सज्जाद सारख्या इतरांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. फुटिरतावाद्यांची ताकद कमी करण्यासाठी त्यांच्यातील मवाळांना फोडणे ही जुनी युक्ती आहे. १९८० च्या दशकात खलिस्तानी चळवळीतील कट्टर भिंद्रनवालेचे महत्त्व कमी करण्यासाठी तुलनेने मवाळ अशा लोंगोवाल यांना तत्कालीन सरकारने पुढे आणले होते. आता तसेच होत आहे. बादवे, तुम्हाला "लाल डेंगा" माहिती असेल ना?

In reply to by श्रीगुरुजी

सईद यांच्या विधानाशी केंद्र सरकार आणि भाजप पूर्णपणे असहमत असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली.
कोणाला फसवताय गुरुजी. शिवसेनेनी विरोधी मत मांडले की लगेच विचारतात भाजपेयी की तुम्ही पण सत्तेत आहात ना, मग एक तर सत्ता सोडा नाहीतर गप्प बसा. मुख्यमंत्र्याचे मत हे त्या पूर्ण सरकारचे मत असते. काश्मीर च्या केस मधे ह्या सरकारमधे भाजप पण आहे. जर मत पटत नसेल तर सरकार मधुन बाहेर पडा. नाहीतर मत पटले आहे असे सांगा. सत्ते साठी कोलांट्याउड्या मारु नका. शामाप्रसाद मुखर्जींची थोडीतरी आठवण ठेवा. त्यांना तर नेहरु मंत्रीमंडळात मानाचे स्थान मिळत होते, पण ते गेले नाहीत. आणि ही लोक पीडीपी शी लग्न लावून बसली आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

>>> कोणाला फसवताय गुरुजी. शिवसेनेनी विरोधी मत मांडले की लगेच विचारतात भाजपेयी की तुम्ही पण सत्तेत आहात ना, मग एक तर सत्ता सोडा नाहीतर गप्प बसा. मग मुफ्ती तसं सांगू दे भाजपला. भाजपने स्पष्ट शब्दात विरोध करून का गप्प बसलाय तो? >>> मुख्यमंत्र्याचे मत हे त्या पूर्ण सरकारचे मत असते. असं नसतं. निर्णय पूर्ण सरकारचे असतात. प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. नरेंद्र मोदींचं मत म्हणजे शिवसेना, अकाली दल अशा पक्षांचं मत नाही. मात्र मोदी सरकारचे निर्णय हे पूर्ण सरकारचे असतात. >>> काश्मीर च्या केस मधे ह्या सरकारमधे भाजप पण आहे. जर मत पटत नसेल तर सरकार मधुन बाहेर पडा. नाहीतर मत पटले आहे असे सांगा. सत्ते साठी कोलांट्याउड्या मारु नका. मुफ्तीला ठणकावण्यासाठी भाजप हवाच. काँग्रेस किंवा नॅकॉ ते जमणार नाही. पीडीपीच्या सुरात सुर मिसळून काँग्रेसने अफझल गुरूच्या बाबतीत मुफ्तीचे जे मत होते त्याचेच समर्थन केले आहे. काश्मिरमध्ये इतर सर्व पक्ष देशहिताविरूद्ध भूमिका घेत असताना देशहिताची भूमिका घेणारा भाजपसारखा एक तरी पक्ष हवाच.

In reply to by श्रीगुरुजी

भारतात अनेकजण, अनेक ठिकाणी, अनेकवेळा प्रक्षोभक विधाने करत असतात. अशा प्रत्येक विधानाचा संसदेत निषेध व्हायचा असेल तर दरवर्षी फक्त निषेधासाठी संसदेचे एक वेगळे अधिवेशन बोलवावे लागेल.
गुरुजी हे मान्य आहे. त्यामुळेच ओवेसी किंवा भागवत यांच्या प्रत्येक विधानाचा निषेध करण्याची गरजही नसते. पण लोकनियुक्त सरकारचा प्रमुख जेव्हा असे विधान करतो तेव्हा त्याची विशेष दखल घ्यावीच लागते. माननीय मुख्यमंत्री मुफ्ती सईद म्हणजे असदु्द्दीन ओवेसी किंवा मोहन भागवत नाही की ज्यांच्या विधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.
राजनाथ सिंग यांनी अगदी स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात काश्मिरमधील शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचे श्रेय काश्मिरमधील जनतेला, निवडणुक आयोगाला व लष्कराला दिले आहे. त्यामुळे यावर अजून काही वेगळे बोलण्याची गरज नाही.
हो हे खरंय, पण ज्या मंत्रीमंडळाच्या प्रमुखपदी पाकिस्तानचे आभार मानणारी आणि अतिरेकी-हुर्रियतप्रती कृतज्ञ असणारी व्यक्ती आहे त्या मंत्रीमंडळात राहणे आणि पीडीपीसोबत शय्यासोबत करणे अनैतिक वाटत नाही का? अगदी काही दिवसांपूर्वी त्या प्रशांतभूषणने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून त्याच्या देशभक्तीबाबत शंका काढून आकाशपाताळ करणारी मंडळी आता मुफ्ती सईदच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि भक्तांकडून त्याचे समर्थनही केले जाते याचे आश्चर्य वाटते इतकेच. विरोधी मते असणाऱ्या पक्षासोबत युती करुन त्या पक्षावर नियंत्रण ठेवता येते हा राजकारणातला गुरुजी सिद्धांत म्हणावा काय? या सिद्धांतानुसार उद्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत आणि केरळात कम्युनिष्ट पक्षासोबत युती करण्यात काहीही हरकत दिसत नाही. नाहीतरी बारामतीला येऊन त्याची पायाभरणी झालीच आहे. बाकी उद्या त्या अफजलगुरुच्या पार्थिवावरुन भाजपाने सरकारमधून अंग काढून घेतले तर त्या निर्णयाचाही तुम्ही बचाव कसा कराल याची आता फक्त उत्सुकता आहे!

In reply to by आजानुकर्ण

>>> गुरुजी हे मान्य आहे. त्यामुळेच ओवेसी किंवा भागवत यांच्या प्रत्येक विधानाचा निषेध करण्याची गरजही नसते. पण लोकनियुक्त सरकारचा प्रमुख जेव्हा असे विधान करतो तेव्हा त्याची विशेष दखल घ्यावीच लागते. माननीय मुख्यमंत्री मुफ्ती सईद म्हणजे असदु्द्दीन ओवेसी किंवा मोहन भागवत नाही की ज्यांच्या विधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. मोदींनी अत्यंत स्पष्ट व निसंदिग्ध शब्दात मुफ्तीच्या विधानाला विरोध केलेला आहे. अर्थात याची गरज नव्हती कारण राजनाथ सिंगांनी कालच हे निवेदन केलेले होते. अशी वादग्रस्त विधाने करणार्‍या मुफ्तीसारख्यांच्या विधानाला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. >>> हो हे खरंय, पण ज्या मंत्रीमंडळाच्या प्रमुखपदी पाकिस्तानचे आभार मानणारी आणि अतिरेकी-हुर्रियतप्रती कृतज्ञ असणारी व्यक्ती आहे त्या मंत्रीमंडळात राहणे आणि पीडीपीसोबत शय्यासोबत करणे अनैतिक वाटत नाही का? अगदी काही दिवसांपूर्वी त्या प्रशांतभूषणने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून त्याच्या देशभक्तीबाबत शंका काढून आकाशपाताळ करणारी मंडळी आता मुफ्ती सईदच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि भक्तांकडून त्याचे समर्थनही केले जाते याचे आश्चर्य वाटते इतकेच. >>> विरोधी मते असणाऱ्या पक्षासोबत युती करुन त्या पक्षावर नियंत्रण ठेवता येते हा राजकारणातला गुरुजी सिद्धांत म्हणावा काय? या सिद्धांतानुसार उद्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत आणि केरळात कम्युनिष्ट पक्षासोबत युती करण्यात काहीही हरकत दिसत नाही. हे पक्ष एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी मतांचे आहेत हा गैरसमज आहे. बहुसंख्य बाबतीत जवळपास सर्वच पक्षांची सारखीच मते आहेत. काही थोड्या बाबतीत वेगळी मते असतात. नियंत्रणाचे एक उदाहरण देतो. १९९८-२००४ या काळात भाजपची नॅकॉ बरोबर युती होती. फारूक अब्दुल्ला काश्मिरचा मुख्यमंत्री होता व उमर अब्दुल्ला वाजपेयी मंत्रीमंडळात परराष्ट्र राज्यमंत्री होते. २०००/२००१ साली जम्मू-काश्मिर राज्याला १९५३ च्या पूर्वी जशी स्वायत्तता होती (संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इ. फक्त ४ विभाग केंद्राकडे आणि उर्वरीत सर्व राज्याकडे अशी १९५३ पूर्वी स्थिती होती) तशीच स्वायत्तता पुन्हा द्यावी असा ठराव विधानसभेत मंजूर करून घेतला. असा ठराव मांडू नका असे वाजपेयींनी सांगूनसुद्धा फारूक अब्दुल्लाने त्यांची सूचना धुडकावून हा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठविला. आपला सहकारी पक्ष असूनसुद्धा गृहमंत्रालयाने तातडीने बैठक घेऊन काही दिवसांच्या अवधीतच हा फुटिरतावादी ठराव फेटाळून लावला. त्यानंतर परत तसला ठराव आलेला नाही. सहकारी पक्ष फुटिरातवादी असूनसुद्धा त्यावर नियंत्रण ठेवता येते ते असे. >>> बाकी उद्या त्या अफजलगुरुच्या पार्थिवावरुन भाजपाने सरकारमधून अंग काढून घेतले तर त्या निर्णयाचाही तुम्ही बचाव कसा कराल याची आता फक्त उत्सुकता आहे! कोणत्या परिस्थितीत व कोणत्या मुद्द्यांवरून सरकारमधून बाहेर पडतील त्यावर माझा प्रतिसाद अवलंबून राहील.

In reply to by श्रीगुरुजी

अहो आता माती खाल्ली तर खाल्ली. मग त्यात काजू, बदाम आहेत वगैरे बाता कशाला. त्रिशंकू बद्दल येवढंच वाईट वाटंतय तर परत निवडणूका लावा. आणि या बहुमत घेऊन, हाकानाका. :)

१९ व्या शतकातील जर्मन पुढारी ओट्टो फोन बिस्मार्क यांनी छोट्या छोट्या जर्मन भाषी गणराज्याचे एकत्रीकरण करून सध्याचे जर्मन संघ राज्य निर्माण केले. त्यांनी असे म्हटले आहे की- “Politics is the art of the possible, the attainable — the art of the next best” सध्याचे जम्मू काश्मीरचे सरकार या तत्वाचेच उदाहरण आहे. एकदा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की आधीच्या सर्व वल्गना विसरून राजकीय पक्षांना तडजोड करावी लागते. मुफ्ती किंवा त्यांचे सहकारी काहीही बोलले तरी त्यांना सरकार चालवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात भाजपा वर अवलंबून रहावे लागणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेने काश्मीर हे राज्य आर्थिक दृष्ट्या केंद्रावर फार जास्त अवलंबून आहे हे सत्य ही मुफ्ती आणि त्यांच्या साथीदारांना माहिती आहे. काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत भागीदार आहे ही एकच फार मोठी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे

In reply to by रमेश आठवले

सगळेच स्टेक होल्डर्स एका नव्या डावाला सुरुवात करुन बसलेत. कुणी काय म्हटलं आणि कोणाची कशी जिरली वगैरे गॉसीप्सपेक्षा हे प्रकरण फार खोल आहे.

In reply to by रमेश आठवले

काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत भागीदार आहे ही एकच फार मोठी आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे
+१ अगदी बरोबर सांगितलंत.

अगदी शरम वाटते आहे भाजपला मत दिल्याबद्दल आणि हे माझे नाही माझ्या आसपासच्या अनेक लोकांचे मत आहे. आत्ता निवडणुक झाली तर हे मतदार मतदानाला बाहेर पडतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र सरकार नी तर कमाल केली आहे. गोहत्या बंदीच्या मागे लागले आहेत, पण सत्तेवर येण्यासाठी टोल बंदीचे आश्वासन दिले होते ते विसरलेत. तसेच म्हशी मारल्यातर चालतील पण गाई नाहीत, हे कसले मूर्ख लॉजिक आहे? १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली. आणि ती काय भिकार बजेट दिली मोदी सरकारनी, अगदी लाज आणली.

In reply to by प्रसाद१९७१

>>> अगदी शरम वाटते आहे भाजपला मत दिल्याबद्दल मग नका देऊ पुढच्या वेळी भाजपला मत. हाकानाका. >>> १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली. जरा वाचन वाढवा. >>> आणि ती काय भिकार बजेट दिली मोदी सरकारनी, अगदी लाज आणली. अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली हे जरा सविस्तर सांगाल का?

In reply to by श्रीगुरुजी

मग नका देऊ पुढच्या वेळी भाजपला मत. हाकानाका.
:)))) . :)))) हे बाकी आवडलं.. वाखू साठवता येत नसली तरी या प्रतिसादाचा भविष्यात रेफरन्स म्हणून भलताच उपयोग दिसतोय.

>>> १ महीन्यात भ्रष्टाचारी तुरुंगात जाणार होते, अजुन चौकशी पण नाही सुरु केली. जरा वाचन वाढवा.
कुठली चौकशी केली सुरु गुरुजी? ती भुजबळांची? आणि सत्तेवर येउन ४ महीने झाले, पाटबंधारे आणि PWD आणि सहकार खात्यातल्या कीती चौकश्या चालू झाल्या? आणि इतक्या उघड भ्रष्टाचारांच्या चौकशी ला इतका वेळ का लागावा? कीती अधिकार्‍यांवर FIR झाला? ४ महीने बक्कळ वेळ आहे ज्याला काही करायचे आहे त्याच्या साठी. तुम्हीच जरा नीट डोळे उघडे ठेवुन बघा. आत्ता पर्यंत स्पेशल कोर्ट सुरु करुन खटले उभे रहायला पाहीजे होते. आणि मोदींनी तर बारामतीला जाउन कळस केला आहे. टोल चे काय झाले? त्या बाबत निर्णय घ्यायला वेळ लागावा असे त्यात काय अवघड आहे? आणि मग प्रचारात धाधांत खोटे का सांगितले? केजरीवालांकडुन शिका काहीतरी.
अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली हे जरा सविस्तर सांगाल का?
काही तरतुदीच नव्हत्या हेच वाईट होते. फक्त यांव करु आणि त्यांव करु. ९ महीन्यात एक गोष्ट केली नाही. सर्विस टॅक्स मात्र वाढवुन ठेवला. क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कीतीतरी टॅक्स मधे सुधारणा करणे शक्य होते. तेलात वाचलेले काही लाख कोटी कुठे गेले ते कळतच नाही. २ IIM आणि ३ एम्स चालू करु हे सांगायला बजेट कशाला पाहीजे. ते तर BAU होयला पाहीजे. पुढच्या बजेट मधे १० संडास बांधणार आहोत असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही. कुठल्याच गोष्टीला टाइमलाइन नाही. समिती बसवू, बील आणु असली भाषा सगळी. ९ महीन्यात आणायची होती ना बिले. आणुन आणुन कुठले बील आणले तर वीमा आणि जमीन अधिकरणाचे. भारतात सरकार कडे लाखो एकर जमीन पडुन आहे. पुण्याच्या आसपासच्या MIDC मधे बघा, शेकडो एकर जमिन पडुन आहे, अगदी हिंजवडीत सुद्धा जमीन पडुन आहे. मग ह्यांना कशाला नविन जमीनी पाहीजेत. लोकांना प्रत्येक्षात दिसेल असे काहीतरी करुन दाखवा ना. पोलिस भरती साठी पैसे वापरा, न्यायालयांची संख्या वाढवा.

In reply to by प्रसाद१९७१

>>> कुठली चौकशी केली सुरु गुरुजी? ती भुजबळांची? आणि सत्तेवर येउन ४ महीने झाले, पाटबंधारे आणि PWD आणि सहकार खात्यातल्या कीती चौकश्या चालू झाल्या? आणि इतक्या उघड भ्रष्टाचारांच्या चौकशी ला इतका वेळ का लागावा? कीती अधिकार्‍यांवर FIR झाला? ४ महीने बक्कळ वेळ आहे ज्याला काही करायचे आहे त्याच्या साठी. तुम्हीच जरा नीट डोळे उघडे ठेवुन बघा. आत्ता पर्यंत स्पेशल कोर्ट सुरु करुन खटले उभे रहायला पाहीजे होते. मी आधीच सांगितलं होतं की जरा वाचन वाढवा, म्हणजे असे पोकळ प्रश्न पडणार नाहीत. तुम्हाला अजिबातच माहिती नसल्याने जरा सविस्तर सांगतो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याघेतल्या लगेचच फडणविसांनी भुजबळांची अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) मार्फत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते. ही चौकशी होऊ नये यासाठी त्याविरूद्ध भुजबळ उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने भुजबळ सर्वोच्च न्यायालयात गेले. १०-१२ दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने देखील चौकशीला हिरवा कंदील दाखविल्यावर लगेचच दुसर्‍या दिवशी समीर भुजबळची चौकशी सुरू झाली. त्यानंतर पंकज भुजबळला चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहे. सत्तेवर येऊन ४ महिने झाले, अजून चौकशी का नाही, विशेष न्यायालये स्थापन करा असे मिपावर लिहिणे सोपे असते. प्रत्यक्षात चौकशीची प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ असते व आरोपींकडे तगड्या वकिलांची फौज असल्याने कायद्यातील असंख्य पळवाटा शोधून ते चौकशीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांवर अजूनही कारवाई झालेली नाही किंवा त्यांची चौकशीही झालेली नाही त्याला हीच कारणे आहेत. तुम्ही जरा नीट वाचन केलेत तर असे प्रश्न पडणार नाहीत. >>> आणि मोदींनी तर बारामतीला जाउन कळस केला आहे. काय कळस केला? >>> टोल चे काय झाले? त्या बाबत निर्णय घ्यायला वेळ लागावा असे त्यात काय अवघड आहे? आणि मग प्रचारात धाधांत खोटे का सांगितले? केजरीवालांकडुन शिका काहीतरी. वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.
काही तरतुदीच नव्हत्या हेच वाईट होते. फक्त यांव करु आणि त्यांव करु. ९ महीन्यात एक गोष्ट केली नाही. सर्विस टॅक्स मात्र वाढवुन ठेवला. क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे कीतीतरी टॅक्स मधे सुधारणा करणे शक्य होते. तेलात वाचलेले काही लाख कोटी कुठे गेले ते कळतच नाही. २ IIM आणि ३ एम्स चालू करु हे सांगायला बजेट कशाला पाहीजे. ते तर BAU होयला पाहीजे. पुढच्या बजेट मधे १० संडास बांधणार आहोत असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही. कुठल्याच गोष्टीला टाइमलाइन नाही. समिती बसवू, बील आणु असली भाषा सगळी. ९ महीन्यात आणायची होती ना बिले. आणुन आणुन कुठले बील आणले तर वीमा आणि जमीन अधिकरणाचे. भारतात सरकार कडे लाखो एकर जमीन पडुन आहे. पुण्याच्या आसपासच्या MIDC मधे बघा, शेकडो एकर जमिन पडुन आहे, अगदी हिंजवडीत सुद्धा जमीन पडुन आहे. मग ह्यांना कशाला नविन जमीनी पाहीजेत. लोकांना प्रत्येक्षात दिसेल असे काहीतरी करुन दाखवा ना. पोलिस भरती साठी पैसे वापरा, न्यायालयांची संख्या वाढवा.
एवढं पाल्हाळ लावण्यापेक्षा अर्थसंकल्पातील नक्की कोणकोणत्या तरतुदींमुळे लाज आणली आणि का लाज आणली ते जरा सांगता का? जर ते जमत नसेल तर निदान हे तरी वाचा आणि मग उत्तर द्या. http://www.misalpav.com/node/30526

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्यक्षात चौकशीची प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ असते व आरोपींकडे तगड्या वकिलांची फौज असल्याने कायद्यातील असंख्य पळवाटा शोधून ते चौकशीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
काय सांगताय गुर्जी. ज्याला करायचे आहे त्याला ४ महीने खूप खूप झाले. कोर्टात केस तर उभी करा, काय पळवाटा काढायच्या त्या काढु द्या ना. आणि भुजबळ सोडुन बाकी काय? तटकरे, अजित पवारांचे काय?
वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.
मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण कशाला हो गुर्जी? कै च्या कै. आणि सगळेच टोल नाके बंद होणार होते. फक्त मुदत संपलेले नाही.
लाज आणली ते जरा सांगता का?
लाज ह्या साठी आली मला स्वताला की आपण कोणाला मत दिले, पार फसवले की ह्या लोकांनी. मला तरी कोणी मला फसवले की स्वताचीच लाज वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

दुर्दैवाने तुमचं वाचन अत्यंत कमी असून आकलनही अत्यंत कमी आहे हे अनेकवेळा दिसून आलं आहे. अर्थसंकल्पाच्या धाग्यावरही हेच सिद्ध झालं. वाचन कमी आणि मनात कमालीचे पूर्वग्रह अशी तुमची परिस्थिती आहे. मी सर्व आक्षेपांना पूर्वीच सविस्तर उत्तर दिले आहे. आता आपल्या बाजूने तुम्ही अधिक वाचन करावे, परिस्थिती समजून घ्यावी आणि मनातील पूर्वग्रह काढून स्वच्छ मनाने मत बनवावे एवढीच अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मोठे व्हा. तुमची रोजगार म्हणुन भाजपला डीफेंड करत असाल तर काही हरकत नाही. नाहीतर काळजी घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

वाचन वाढवा हो. मुदत संपलेल्या टोलनाक्यांचे लेखापरीक्षण केव्हाच सुरू झाले आहे.
गुर्जी बाकी इतर प्रतिसादाबद्दल काहीच म्हणणे आत्ता नोंदवत नाही परंतु टोलनाक्यासंदर्भात, सरकार आल्यापासून चार नवीन टोलनाके सुरु झालेत याची पण नोंद घ्यावी.

गुर्जींच्या प्रतिसादात भाजप तिथे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. आणि भविष्यात भाजपचे पूर्ण सरकार येण्याच्या दृष्टीने निदान भाजपचे पहिले पाऊल तरी पडले आहे. अशी परस्परविरोधी वाक्य आहेत . 'श्रीगुरुंजीचे भावविश्व ' अशी मालिका चालू करा रे कुणीतरी

बाकी कडवा फुटीरतावादी नेता आणि २००८ ते २०१० दरम्यान काश्मीरमध्ये चालेल्या दगडफेक आंदोलनाचा मुख्य सूत्रधार मसरत आलम याला जम्मू -काश्मीर सरकारने (यात भाजप पण आल ) याला तुरुंगातून सोडून दिल . वाजवा रे वाजवा http://www.ndtv.com/india-news/hurriyat-hardliner-masarat-alam-released…

In reply to by पिंपातला उंदीर

हा हा हा... भाजपासमर्थकांकडून तुम्हाला सविनय इग्नोर मारण्यात आले आहे. :))) . :)))) (अर्थात भाजपने निषेध नोंदवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे भाजपने युती ही असा विरोध करण्यासाठीच केली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे आणि संघानेपण तीव्र आक्षेप नोंदवलाय त्यामुळे तर तुम्हाला बोलायला जागाच उरली नाही आता.. ;) ) असो, त्याच्या डोक्यावर १० लाखाचे इनाम होते आणि आता ते पुढच्यावेळेस किमान ५० लाख असावे अशी त्याने मागणी केली आहे असे समजते. तसेच आता सरकार पडले तरी मुफ्तींना काळजी नसावी. सर्वत्र स्वतःचा अजेंडा ते तरी प्रामाणिकपणे राबवत आहेत त्यामुळे त्यांना मतांची चिंता नसावी. :) (हा, ते टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले वो ? नै म्हंजे मुफ्ती सायेबांचा झपाटा पाहून आठवन आली, बाकी कै नै. ) आमच्या सारख्या सामान्य मतदारांची लोकसभा आणि विधानसभेत घोर फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल असे किमान प्रयत्न व्हावेत हीच अपेक्षा.. असेही कोणत्याही पक्षाचे आंधळे समर्थक नाही (कधी होणारपण नाही) पण भाजपने जर फसवणूक केली तर ते मनातून मात्र उतरतील कायमचे (मग नोटाच).

अर्थात भाजपने निषेध नोंदवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे भाजपने युती ही असा विरोध करण्यासाठीच केली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे आणि संघानेपण तीव्र आक्षेप नोंदवलाय त्यामुळे तर तुम्हाला बोलायला जागाच उरली नाही आता.. Not fair . गुर्जींचा प्रतिसाद तुम्हीच दिलात . आता गुर्जी काय प्रतिसाद कसा देणार .