Skip to main content

हेल्मेटसक्ती

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 13/11/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

वाचने 137458
प्रतिक्रिया 360

प्रतिक्रिया

पुण्यातल्या लोकांना हेल्मेट घालण्याचे वावडे का आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो. देशातल्या बहुतेक शहरांत हेल्मेटसक्ती लागू आहे आणि तिथे असा ओरडा होत नाही असे दिसते.

In reply to by नितिन थत्ते

१०००% सहमत. सक्ती विरोधात आंदोलने वगैरे कैच्याकै वाटलं होतं मला तरी. अपघाताला कारणीभूत इतर बाबींकडे लक्ष द्या असे सरकारी लोकांना का सांगतात पुणेकर? इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. नुसता दम देऊन भागत नाही म्हटल्यावर चाबूकच काढावा लागतो.

In reply to by थॉर माणूस

इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.
पुण्यात वाहने चालवतांना शिस्त म्हणजे काय रे भाऊ?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

१) समोर लाल सिग्नल दिसत असतानाही आपले वाहन पुढे दामटणे. २) उजवीकडे वळण्याचा सिग्नल दिला असेल त्याला उजवीकडूनच ओव्हरटेक करणे. ३) दोन बाईकचालकांनी आपल्या गाड्या समांतर चालवत सारसबागेत चालत असल्या सारख्या चकाट्या पिटणे. ४) ऐन गर्दीच्या वेळी काकांच्या मागे बसलेल्या काकूंनी 'अहो हेच ते दुकान, हेच ते दुकान' बोंबलत आहे त्या क्षणी गाडी डावीकडे वळवायला लावून काकांचा आणि मागून येणार्‍या वाहनचालकांचा अंदाज चुकवणे. ५) सिग्नल सुटायला पाचेक सेकंद शिल्लक आहेत हे माहीत असूनही निवांत मोबिल्यावर बोलत बोलत रस्ता ओलांडणे आणि सिग्नल सुटला की जत्रेत चुकल्यासारखे इकडे पळू का तिकडे पळू असा आविर्भाव आणत स्वत:सोबत इतरांनाही गोंधळात टाकणे. आणखीही अनेक गोष्टी पुणेकर आपला वडिलोपार्जित हक्क असल्याप्रमाणे करत असतात. नसत्या सुक्या मिजाशी शिकाव्यात तर या लोकांकडून. आता पाण्यात राहून माशाशी वैर का करा म्हणून गप्प बसावं लागतं, पण वाहतुकीची बेशिस्त पाह्यली की देवाने केवळ शिक्षा करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर दहा छड्या मारुन एक मोजावे आणि अशा दहा छड्या माराव्या इतका राग येतो. :( म्हणजे पुन्हा गाडीवर बसताना छड्या आठवून तरी असले उपद्व्याप होणार नाहीत.

त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत
हेल्मेट सक्ती आणि वाहतुकीचे नियम हे म्युच्युअली एक्स्क्लुसिव असतात काय? दोहोंची अंमलबजावणी एकाच वेळेस करता येत नाही काय?

In reply to by सुनील

मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे. शिवाय धाग्यातील इतर मुद्द्यांचाही विचार केला पाहिजे नुसता शब्दच्छल करुन उपयोग नाही.

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. वैयक्तीक सुरक्षेचा आग्रह प्रथम धरा. तुम्ही अन्य लोकांच्या सुरक्षीततेचा विचार पहिला करत आहात जे योग्य आहे पण प्राधान्यक्रम चुकला आहे. जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. शेवटी स्वतःचे सिर सलामत तो डोक्यात विचार पचास.

In reply to by धर्मराजमुटके

जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते... जरा इस्काटून... पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+१ अगदी अगदी... सिग्नल हिरवा झाला तरी दोन्ही बाजूंना बघून मगच गाडी चौकातनं न्यावी हे योग्य!

मी पुण्यातच रहातो आणि मला कॉलेजला मोटारसायकल घेऊन जाणारा मुलगा आहे. कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे या हेल्मेट सक्तिचे मी मनापासून स्वागत करतो , त्यातून एखाद्या कारखानादाराचा लक्षावधी - कोट्यावधी कोटी रुपयांचा फायदा झाला तरी मला आनंदच होईल. ( दुसर्‍याला मिळणार्‍या पैशाविषयी मला अजिबात असूया वाटत नाही ) एका मित्राचा हाता तोंडाशी आलेला तरुण मुलगा केवळ हेल्मेट नसल्याने जीव गमावून बसला , हे दु:ख मी आयुष्य भर विसरणार नाही. हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. कशाला विरोध करावा याचा काही सारासार विचार आहे की नाही ?

In reply to by विटेकर

>>हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. अहो विरोध हेल्मेटला नाहीच आहे. विरोध सक्तीला आहे. माझा धागा नीट वाचा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सरळ सांगून ऐकतील ते पुणेकर कुठले? प्रत्येक गोष्टीत स्वःताची मते असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणे.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

प्रत्येक गोष्टीत स्वतःचे विरोधी मत असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. - असे पुलं म्हणतात, आम्ही नाही. तेव्हा ज्यांना ही व्याख्या पसंत नाही त्यांनी अगोदर व्हाया ओंकारेश्वर स्वर्गात जाऊन भाईकाकांशी बोलून यावे.

In reply to by बॅटमॅन

उगाच कुठल्याही गोष्टीत पुणेकरांचे पुणेरीपण काढणे हे बेकारीचे दातकोरक लक्षण आहे. हेल्मेटसक्ती आणि वाहतुकीच्या सर्व नियमांच्या सक्तीला संपूर्ण पाठिंबा देणारा कट्टर पुणेकर.

In reply to by एस

आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर पुलंप्रणीत पुणेकरांच्या व्याख्येचा उल्लेख मात्र केला. ती व्याख्या अंमळ चुकीची सांगितली होती म्हणून तो मिसिंग एक शब्द सांगितला इतकेच. अन्यथा टीचभर पुण्यातील चिमूटभर पुणेकरांचे पुणेरीपण काढण्याइतका बोरिंग प्रकार आम्ही कशाला करू?

In reply to by बॅटमॅन

सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी? त्यामुळे सूर्याला दगड मारण्याचे कपाळमोक्षी प्रकार बाकीच्यांनी करू नयेत यासाठीच आम्हीही प्रतिसाद दिला होता. असो.

In reply to by एस

सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी?
पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते. =))

In reply to by बॅटमॅन

पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते.
काय माहीत ब्वॉ... पुणेकरांना पाताळात काय आहे हे खाली वाकून पाहण्याची सवय नाही.

In reply to by एस

बाकी प्रकाशमान स्वर्गातून, अंधकारमय पाताळात पाहिल्यावर काय दिसणार म्हणा, वटवाघळेच.

In reply to by विटेकर

तुमचा मुलगा हेल्मेट वापरत नाही ही त्याची चुकच आहे. मी स्वतः एकदा युन्वर्सीटी रोडवर बेक्कार आपटलो होतो, हेल्मेट असल्याने किरकोळ खरचटण्यावर निभावलं होतं. पण... सक्तीला माझा विरोध आहे. समजा तुमचा मुलगा अभ्यास सोडून दिवसभर गेम खेळत बसतो, तर तुम्ही गेमींगवर बंदी आणावी म्हणाल काय? जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा? हेल्मेट वापरल्याने काहींना व्यवस्थीत दिसत नसेल, काहींना मानेचे त्रास असतील, टक्कल पडेल अशी भिती असेल. ;) , कणेकर म्हणतात तसा आंबाड्याचा प्रॉब्लेम असेल, किंवा काहीही हळक्षज्ञ.

In reply to by यसवायजी

जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा?
त्या सगळे नियम पाळून गाडी हळू चालवणार्‍याला एखादा बेशिस्त पुणेकर कारवाला जाऊन धडकला तर मरेल कोण शिस्तित चालणारा का बेशिस्तित चालवणारा?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही. जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे. दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे. एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?

In reply to by यसवायजी

हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही.
वा वा, हे विचार ऐकून पुणेकरांच्या संवेदनशीलतेचा अंदाज आला.
जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे.
इतके दिवस जागरुक करण्याचे प्रयत्न काय कमी झाले, तेव्हा झोपले होते कां? आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?
दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे.
चला हे तर मान्य आहे म्हणायचे नाहीतर वरच्याच विधानाचा आधार घेऊन हे ही म्हणाल मला दारु प्यायचीये, पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.
एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?
नीट वाचा इतरांबद्दल बोललोच नाहीये, हेल्मेट न वापरणार्‍याबद्दच्च बोलतोय, तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? जरा तर कॉमन सेन्स वापरा की.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या? पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो). पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने. हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या. तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच. जरा तर कॉमन सेन्स वापरा की. यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.

In reply to by यसवायजी

पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच?
सक्तीला विरोध हा दंड भरावा लागतोय म्हणूनच होत आहे नाहीतर इतकी आदळाआपट झाली असती अस वाटत नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो
चांगली गोष्ट आहे. वापरत जा चांगल असतं. :)
हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.
वाद मी घालतच नाहीये. तुमच्या त्या आधिच्या विधानचा आधार घेऊन मी ते म्हणालो होतो, प्रतिसाद पूर्ण वाचलात तर आपल्याला ते लक्षात येईल.
हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.
म्हणूनच ती सक्ती आहे. हेच म्हणायचे होते.
यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.
हेल्मेट सक्तीचा विरोध हाच मुळी कॉमन सेन्स च्या विरुद्ध आहे असे मला ध्वनित करावयाचे होते. त्यात तुम्हाला वैयक्तिकरित्या काहीही म्हणायचे नव्हते. तसा समज माझ्या विधानातून झाला असल्यास क्षमस्व.

In reply to by विटेकर

कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो.
मोटारसायकलचे पैसे जर तुम्ही भरलेले असतील तर सरळ चावी काढून घ्या आणि बस पकडून जा म्हणून सांगा... चार-आठ दिवस नखरा करेल पण नंतर गुमान तुमच्या डोळ्यासमोर तरी हेल्मेट घालून जाइल... आता तुमच्या डोळ्याआड काय करेल ते सांगता येणार नाही, पण ते त्याचं नशीब. तुमचा मनस्ताप तरी थांबेल...

ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.

चक्क प्रकाका लिहते झाले ! ;) माझे मत :- आत्ता पर्यंत माझे दुचाकी चालवताना अनेक अपघात झाले आहेत ! २ रिक्षांच्या मधे येउन हवेत सुपरमॅन जसा उडावा तसा उडुन अपघात, ट्रकला मागुन ठोकर देउन अपघात, टोलनाक्यावर दुसरा वायझेड दुचाकीस्वार अचानक तिरपा आल्यामुळे झालेला अपघात,वायझेड रिक्षावाल्याने वेगाने रिक्षा दामटवुन समोर अचानक खड्डा दिसल्याने करकचुन ब्रेक दाबल्याने रिक्षा ९० अंशात वळल्याने झालेला माझा अपघात आणि इतर... या सर्व अपघातात माझं टकुरं केवळ आणि केवळ हेल्मेट वापरल्यानेच अजुन फुटलेले नाही ! आणि आमचे हे अपघाती पराक्रम आमच्या तिर्थरुपांना माहित असल्याने चुकुन सुद्धा हेल्मेट शिवाय दुचाकी चालवण्यास सोडत नाहीत. निष्कर्ष :- हेल्मेट शिवाय दुचाकीचा प्रवास म्हणजे यमाच्या रेड्यावर लवकर बसण्याचा खुला परवाना आहे. प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असुन नये ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

न सांगून कळत नाही मग सक्ती होणारच. नियम आला की सक्ती अलिखित आलीच. हेल्मेट मुळे'च' अपघात टळत नसले तरी हेल्मेट मुळे जीव वाचतो. वाहतुकीचे इतर नियमही महत्वाचे आहेत व पाळायला हवेतच. उगाच विरोघाला अर्थ नाही. मदनबाण म्हणाले ते एक नंबर आहे.
प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असू नये ?
म्हणजे, उकडतं, की सुंदर चेहरा झाकला जातो, की दिसत नाही नीट, की कंटाळा येतो, की भार पेलवत नाही, की ट्रेन्डी हेलमेट मिळत नाहीत, की काय? प्रॉब्लेम काय आहे हेल्मेट घालायला? वरीलपैकी काहीही कारण असेल तरी ते सबळ नाही. असो. मी हेल्मेट सक्तीच्या समर्थनात.

हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट सक्ती पण योग्य आहे. तुम्ही जे बाकीच नियम म्हणत आहात.. ते हेल्मेट घालुन पण पाळता येतातच ना ? सर्वच नियम पाळले पाहिजेत वाहुतकीचे असे माझे म्हणणे आहे. पुण्यात असुनही मी ९९ % नियम पाळतोच पाळतो.. आणि १ % मागील वाहणांच्या हॉर्ण मुळे मला सिग्नल तोडावा लागतो. उद्या शिक्षण सक्ती केली म्हणुन का कोणी त्याविरोधात पण आंदोलन करणार आहे.
रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय
रस्त्यावर होणार्या अपघातामध्ये हेल्मेट मुळे डोक्याला मार लागु नये म्हणुन हेल्मेट असते, अपघात न होण्यासाठी हेल्मेट नसते.
हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
उत्पादक त्यांच्या माल खपवणारच असतात, त्यांचा फायदा होउ नये असेच जर आपल्याला वाटत असेन तर आपण बाईक उत्पादकांच्या विरोधात जावुन बाईकच घेतली नाही पाहिजे असे म्हणण्यासारखेपण आहे. होउद्या त्यांचा फायदा, आपला काही तोटा तर नाही ना . सुरक्षेसाठी विमा काढतो, यात त्या विमा कंपणीचा पण फायदा असतोच ना, फुकट का सुरक्षा मिळते. पोलिस हे सरकारी कामगार आहे, त्यांना सर्व गुन्हांवरच लक्ष दिले पाहिजे, ट्राफिक पोलीस वेगळे असतात. जागरुक मन .. सुरक्षित प्रत्येक क्षण.

In reply to by गणेशा

हो ना, आणि हितसंबंध जपायला हेलमेट?? अहो त्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत जमीन, सामाजिक बांधकाम, इत्यादी अनेक. हेमलेट इज टू चीप अ थिंग टू मेक एनिवन रिच.

इतर गुन्ह्यात आपल्या चुकीमुळे इतरांचा जीव जातो. हेल्मेट न घातल्याने इतरांचा जीव जात नाही. अर्थात हेल्मेट न घालणे हा गुन्हा तरी मानायचा का हा प्रश्नच आहे

हेल्मेट घालुन जर दुचाकी नी सुरक्षापट्टा लावुन चारचाकी चालवली तर त्यात चालवणार्‍याचीच सुरक्षा आहे. त्याचं काय आपल्यात मुडद्याला, हार घातलेल्या फोटोला हेल्मेट घालायची नी सुरक्षापट्टा लावायची सक्ती नाही.

शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ,संख्या,पादचारी पथ, पार्किंग या बाबी पण वाहतुक शास्त्राच्या नियमानुसार करा ना!. माझा मुळ मुद्दा हेल्मेटच्या सक्तीबाबत आहे उपयुक्ततेबाबत नाही. तसेच तो वाहतुक समस्येच्या निराकरण करण्यासाठी असलेल्या प्राधान्यक्रमाबाबत आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा? की म्हणजे बघा बाबा हेल्मेट चा पर्याय आहे... घातलात तर गुडबॉय, नाही तरी ठीक आहे इट्स युअर चॉइस नाही का आफ्टरऑल.... असं अपेक्षित आहे का तुम्हाला? हे प्लीज समजवलंत तर बरं होईल. पण सक्ती नाही हं.

In reply to by वेल्लाभट

नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा?
नाही ना असू शकत म्हणुन तर सक्तीला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने नियम रद्द करणे हा पर्याय आहे.ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांना कुणी ना म्हटले नाही. त्यांना ती मुभा आहेच की!

हेल्मेट सक्ती करावी लागते, त्याविरुद्ध आंदोलने होतात, 'हेल्मेट सक्ती अजिबात असता कामा नये' असे मुद्दे अगदी हिरीरीने मांडले जातात ह्याचेच सखेद आश्चर्य वाटते. दुचाकी चालकाची सुरक्षा ही प्राधान्याने महत्वाची आहे. सक्ती नसतान, कायदा नसतानाही हेल्मेटचा आग्रह स्वतः दुचाकीस्वारानेच धरला पाहिजे. मस्कतमध्ये ४८ ते ५२ डिग्री तापमानातही हेल्मेटचा नियम सर्वच जणं पाळतात. मी स्वतः वापरलेले आहे. कांही विशेष घाम येत नाही किंवा उकडत नाही. आणि जरी उकडले, घामाच्या धारा लागल्या आणि टक्कल पडले तरीही मी वापरलेच असते कारण माझी सुरक्षा अग्रक्रमाने आहे. माझा मुलगा गेली अनेक वर्षे हेल्मेट वापरतो आहे. (४ हरविली/चोरीला गेली तरी नविन घेऊन वापरतो). सर्वात साध्या अपघातात पडताना जर डोके जमिनीवर/दगडावर आपटले तर तात्काळ मृत्यू येऊ शकतो. गेल्याच आठवडयात माझ्या वहिनीचा, असाच दुचाकीवरून पडून (भाऊ दुचाकी चालवत होता) मृत्यू झाला. अर्थात ती सुद्धा हेल्मेट वापरत नसणारच. (भावाचा स्वभाव मला माहित आहे). पाऊस पडत होता आणि भावाच्या मागे छत्री धरून बसली होती. पाऊस पडत असल्याने दुचाकीचा वेगही जास्त नव्हता. छत्रीत वारा शिरल्याने तोल गेला आणि कांही कळायच्या आतच रस्त्यावर पडली. ती पडल्याचे भावाला कळलेही नाही. रस्त्यावरच्या इतरांनी त्याला सांगितले. तातडीने तिला हॉस्पिटलात पोहोचविले. पण मेंदूला दुखापत झाल्याने बिचारीचे निधन झाले. हेल्मेट असते तर नक्कीच वाचली असती.

In reply to by आशु जोग

होय. तिथेच घडला हा अपघात. कुठल्यातरी वर्तमानपत्रातही बातमी आहे.

पण मला मुळात हेच कळले नव्हते की आंदोलन, विरोध वगैरे कशासाठी करत आहेत ही मंडळी? वाहतुकीचे नियम पाळणे हा प्रकार तसाही यांना जमत नाही. मग त्यात अजून एक नियम वाढला तर काय फरक पडतो? यांच्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.

In reply to by थॉर माणूस

च्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.
याला पूर्ण अनुमोदन..!!

माझ्या चांगल्या मित्राचा सख्खा भाऊ नुसता हळू असलेल्या बाईक वरून पडला, हेलमेट अर्थातच नव्हतं. गेला. अशा गोष्टी प्रतिसादांमधे वाचतोय आणि खूप वाईट वाटतंय.

सहज कुतुहल. माझ्या फुटकळ माहितीनुसार तिथे जे बाईकर्स सगळे गियर वगैरे आवडीने (नियम आहेत का नाही मला ज्ञात नाही) घालतात. हे गार्ड ते गार्ड इत्यादी. आणि आपले तरुणेश त्याकडे स्टाईल म्हणून बघतात. काय व्वाटतं यार ते सगळं अस घालून.... इत्यादी संवाद ऐकलेले आहेत.

In reply to by वेल्लाभट

इथे अमेरिकेत (आणि कॅनडात) स्वयंचलित दुचाकी तर सोडाच पण साधी सायकल (ती सुद्धा अंगणात) चालवताना पण हेल्मेटची सक्ती आहे. त्याच बरोबर, 'ब्लेड स्कूटर, स्केट्बोर्ड' वगैरे वापरताना सुद्धा हेल्मेटची सक्ती आहे. दुचाकीवर मागे बसणार्‍याला सुद्ध्दा हेल्मेट घालावेच लागते आणि दुचाकिस्वार पोलिसही हेल्मेट घालूनच असतात.

भारतात सर्वाधिक अपघात रस्त्यावर पायी चालणार्‍या लोकांचे होतात. खरं तर पायी चालणार्‍यांना हेल्मेट सक्ती केली पाहिजे. ते सोडून बिचार्‍या दुचाकीचालकांना का सक्ती? रस्त्यांवरील असंख्य खड्डे, वरखाली असणारी गटारांची झाकणे, अशास्त्रीय गतिरोधक, वाहतुकीचे नियम तोडणारी मंडळी इ. अपघातांची मुख्य व मूळ कारणे आहेत. मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे. उद्या हेल्मेटसक्ती केली तरी वरील कारणांवर उपाय न केल्याने एकही अपघात कमी होणार नाही. हेल्मेटमुळे कदाचित काही जणांच्या डोक्याला इजा होणार नाही, परंतु शरीराच्या इतर अवयवांना इजा होणारच. अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे. हेल्मेटसक्ती सारखे जुजबी उपाय नंतर येतात. एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे. हेल्मेटसक्ती म्हणजे अशा मुलाच्या बाहेर खाण्यावर बंदी न आणता त्याला रोज पोटदुखीचे औषध सक्तीचे करण्यासारखे आहे. हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे. त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे, मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे हे तोटे आहेतच. हेल्मेट सांभाळणे हे अत्यंत त्रासदायक आहे. बहुसंख्य पुणेकर फार थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरतात. इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे. सरकारला जर जनतेची इतकी काळजी असेल तर हेल्मेटसक्तीपेक्षा अपघातांची मूळ कारणे नष्ट करण्यावर भर द्यायला हवा. आपल्याला हेल्मेट वापरायचे का नाही ते जनतेलाच ठरवू द्यात. विनाकारण सक्ती करू नका.

In reply to by श्रीगुरुजी

>>>इतक्या थोड्या अंतरासाठी हेल्मेट वापरणे हा एक न्यूसन्स आहे. इतक्या थोड्या अंतरासाठी दुचाकी वापरणे हा मुर्खपणा आहे. >>>मूळ कारणांवर अजिबात उपाय न करता थेट हेल्मेट सक्ती करणे अत्यंत अयोग्य आहे. बोला रेटून... तुमचं काय म्हणणं आहे? खड्यांची दुरूस्ती करणे, रस्त्यांची निगा राखणे वगैरे होतच नाही? ते जर नीट होत नसेल तर तुमच्या भागातल्या नगरसेवकांचे गळे धरा ना जाऊन. तिथे त्यांना बरे पैसे खाऊ देता? >>>अपघातांचे प्रमाण कमी करणे याला प्राधान्य असावयास हवे. त्यासाठी गाडी चालवणार्‍यांना मेंदू बरोबर घेऊन गाडी चालवण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळत गाडी चालवण्याची सक्ती करायला हवी. आता काय पुणेकरांबरोबर गाडीत वेगळा पोलिस बसवायचा का त्यांनी नियम पाळावेत म्हणून. तिथेही तुम्ही सिग्नल तोडल्यावर पोलिस काही बोलला की सुरू होणार... रस्त्यांची अवस्था, पार्कींग वगैरे वगैरे... >>>एखादा मुलगा सारखे बाहेरचे खाऊन आजारी पडत असेल तर त्याच्या बाहेर खाण्यावर प्रतिबंध आणण्याला प्राधान्य हवे. १००% सहमत. सरकारला विनंती करूयात की पुण्यात दुचाक्यांवर प्रतिबंध आणा. >>> विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे. गैरसमज. मार्केटमधे शेकड्याने प्रकार उपलब्ध आहेत, कित्येक नवी हेल्मेट कमी वजनाची असतात. माझ्या वडीलांना पाठदुखी आहे, पण हेल्मेट घातल्यामुळे जास्त त्रास होतो वगैरे पांचट कारणे त्यांनी कधी दिल्याचं आठवत नाही. >>>त्याव्यतिरिक्त केसात कोंडा होणे :D अवघड आहे... डोके फुटण्यापेक्षा कोंडा परवडला. तरीही कोंड्याचा इतका विचार करत असाल तर वेगा पासून ते रीबॉक पर्यंत अनेक कंपन्या हेल्मेटच्या आतून घालण्यासारखे बंडानाज विकतात. ४० रुपड्यांपासून पुढे मिळतात. पण काये ना, कारणं द्यायचीच म्हटलं की वाट्टेल ते स्पष्टीकरण चालते. >>>मागच्या वाहनांचे हॉर्न ऐकू न येणे कानात ते हेडफोनचे बोळे घालून येतात वाटतं हॉर्न ऐकू? शेकड्यानी गाडीस्वार बघतो असले रोज. म्हणे हॉर्न ऐकू येत नाहीत. गेल्या १०-१५ वर्षाच्या हेल्मेट वापरात आजवर एकदाही मागच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही असं झालेलं नाही माझ्याबाबतीत. आणि खरंच एखाद्याला नसतील ऐकू येत तर त्याला आधी श्रवणयंत्राची गरज आहे आणि मग हेल्मेटची. सक्ती आहे आणि रहाणार... तुम्ही नियम पाळत असाल तर तुम्ही आधीपासूनच हेल्मेट वापरताय. तुम्हाला सक्तीचा फारसा त्रास होणार नाही तुम्ही नियम पाळत नसाल तर तुम्हाला काय फरक पडतो सक्ती असली तरी आणि नसली तरी?

In reply to by थॉर माणूस

@थॉर माणूस क-ड-क प्रतिसाद ! ;) @श्रीगुरुजी काय हे हे गुरुजी ! अहो गुरुजी ना तुम्ही ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

In reply to by थॉर माणूस

तुम्हाला हेल्मेट कितीही सोयीचं आणि गरजेचं वाटत असलं तरी प्रत्येकाला ते वाटेलच असे नाही. ज्याला वापरायचे त्याने ते वापरावे. त्याची सक्ती नको. हेल्मेटसक्ती पेक्षा अपघात होण्यामागे जी प्रमुख कारणे आहेत त्यावर उपाय काढण्याला प्राधान्य हवे.

In reply to by थॉर माणूस

अगदी बरोबर. कारणं द्यायचीच असं ठरवलं की काय कुठलीही देता येतात. हेल्मेट वापरा रे बाबा सगळ्यांनी. माझ्या माहीतीत एक जण असा आहे की ९-१० वर्षांपुर्वी स्कुटर स्वत:च्या अंगणात वळवत असताना गाडी स्किड होऊन पडला. पडताना डाव्या बाजुच्या भिंतीवर डो़कं आपटलं. गाडी आणि भिंतीच्या मधे विचित्र अडकला होता. ५-१० किमी प्रतीतास वेगात त्याला ब्रेन हॅमरेज झाला. त्याची डावी बाजु पार्शली पॅरालाईझ झालीये. चालता वगैरे येतं पण व्यंग आलचं ना शेवटी? घरातल्या घरात एवढं झालं तर वेगात असणार्‍या गाडीवर काय होईल ह्याचा विचार करा. एक वेळ माणुस मेलेलं परवडतं पण एकदा अपंगत्व आलं ना तर ते अतिशय कठीण होऊन बसतं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ते बरोबरच आहे कारण बाइकस्वार आणि पिलियन रायडर हे दोघेही आणि किंबहुना पिलियन रायडर हे हेल्मेट न वापरून जास्तच धोका स्वीकारतात. माझी वाहिनी (पेठकरांनी उल्लेख केला आहेच) हि पिलियन रायडरच होती. माझा एक मित्र गेली ३ वर्ष कोमात आहे वडलांनी लाखो खर्च केले आहेत पण काही फरक नाही तोही पिलियन रायडरच होता. गोरेगाव हायवेवर आमच्या एका चुलत मित्राची मुलगी आणि तिचा मित्र (मुंबईच्या अतिशय व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि खड्डे विरहित रस्त्यावर) ट्रकने मागून धडक दिल्याने जागच्या जागी गेले केवळ डोके फुटून. त्या मुलीचे आई वडील आणि त्यांची मानसिक स्थिती ह्याचे वर्णन करावे का? मग पुणेकरांना हेल्मेटची सक्ती का नको ? अपघातांना अनेक गोष्टी, घटना कारणीभूत असतात त्यापैकी हेल्मेट हे एक आहे. ज्यांना सक्ती नको त्यांच्या घरात कदाचित गंभीर अपघात झाले नसावेत किंवा आजूबाजूला होणार्या अपघातांबद्दल फारसे सोयरसुतक नसावे. आणि चांगल्या अर्थाने सक्ती नकोच कारण ती जबाबदारी आहे प्रत्येकाची. मग पुणेकरांना जबाबदारीचे वावडे आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

अशा उथळ प्रतिसादाची श्रीगुरुजींकडून अपेक्षा नव्हती. असो. एकेकाचे मत असे म्हणून सोडून देतो. मी मात्र माझ्या आणि मुलाच्या सुरक्षिततेला अधिक महत्व देतो.

हेल्मेट सक्ती योग्य आहे असे मला वाटते. मी कॉलेजला असताना माझ्या समोर माझ्या मित्राचा अपघात पहिला आहे. केवळ हेल्मेट असल्यामुळे किरकोळ जखम होऊन तो वाचू शकला. पाषात्य देशांमध्ये मोठ्या पॉवरच्या बाईक्स चालवताना हेल्मेत्बरोबर safety gear सुध्दा घालण्याची सक्ती असते. चारचाकी गाडी चालवताना बेल्टची सक्ती असते. आपल्याकडे केवळ दंड होतो. तिकडे परवाना रद्द पण होऊ शकतो. कायद्याचा वचक असल्याशिवाय काही लोकांना समजत नाही मग सक्ती ही करावीच लागणार. भले मग विक्रेत्याचा फायदा का होईना. स्वताची सुरक्षितता महत्वाची.

In reply to by मोहनराव

स्वताची सुरक्षितता महत्वाची.
मान्य आहे ना! पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?

In reply to by प्रकाश घाटपांडे

या हिशोबाने "आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल. म्हणजे असं बघा, माझा मी शहाणा आहे. आणि आत्महत्या करेनच किंवा नाही असेही काही ठरलेले नाही. बरं मी इतर कुण्णाला इजा वगैरे करत नाही फक्त माझा मीच मरतो. मग माझ्या सुरक्षीततेची सक्ती करणारे सरकार कोण? आत्महत्या न करण्याची शिफारस करा म्हणावं हवं तर... सक्ती कशाला?

In reply to by थॉर माणूस

आत्महत्या यशस्वी झाली तर तो गुन्हा नाही व अयशस्वी झाली तर तो गुन्हा आहे. जगण्याची तरी सक्ती का? हा एक वेगळा प्रश्न आहेच. त्याला अनेक पैलू आहे. इच्छामरण दयामरण ही त्याची काही उपांगे. पण तो वेगळा विषय आहे.

In reply to by थॉर माणूस

"आत्महत्या हा गुन्हा आहे" या नियमाविरुद्ध सुद्धा लढावे लागेल थॉर माणूस काका. जरा अपडेट रहा. आता हा गुन्हा मानला जाणार नाहिय्ये.सरकार आय पी सी ३०९ मधे बदल करणार आहे.

In reply to by विजुभाऊ

आत्ता गुन्हा आहे ना? त्यात भविष्यकाळात कधी बदल झाला की आपण सांगू सरकारला हेल्मेट सक्ती काढायला. हाकानाका ;)

In reply to by थॉर माणूस

आत्महत्येला गुन्हा ठरविणे हे चूक आहे. जैन धर्मात प्रायोपवेशन करून प्राणत्याग करतात. ती आत्महत्याच आहे. त्यावर मात्र गुन्हा दाखल होत नाही. विनोबा, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. नी अन्नत्याग करून प्राणत्याग केला. कायद्यानुसार ही देखील आत्महत्याच ठरते. अनेक देशात स्वेच्छामरणाची चळवळ सुरू आहे. स्वेच्छामरण ही एक प्रकारची आत्महत्याच आहे.

In reply to by थॉर माणूस

आत्महत्या हा गुन्हा ठरवण्या मागे वेगळा विचार आसवा . आस मला वाटतं आत्महत्या हा गुन्हा ठरवला त्या मुळे पोलिस complaint होवून मृत्यू ची चोकशी करावीच लागते . नाही तर खून करून आत्महत्या आहे आस दाखवलं आणि तो गुन्हा नसेल तर पोलिस चोकशी पण नाही सर्व कास आलबेल

In reply to by प्रकाश घाटपांडे

पण स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?
आत्मह्त्या हा सुध्दा गुन्हा आहे. तिथे असे म्हणणार का , "आमच्या जीवाची तुम्हाला का काळजी ?"