Skip to main content

भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 20/10/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे. [[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ? यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे. भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल. "भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे. *अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील

वाचने 37289
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे हिंदूंची हजारो मंदिर पाडुन त्यावर अनेक ठिकाणी मशीदी उभारल्या गेल्या, हजारो स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि त्यांनी जनान खान्यांची शोभा वाढवली. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका असे सांगणारे "महात्मा" हिंदूच होते आणि एव्हढे होउन सुद्धा जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. या पेक्षा अधिक सहिष्णूतेचे ? उदा. मला तरी देता येणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

In reply to by बाबा पाटील

आपण इथे प्रकट होणार याची खात्रीच होती ! http://www.misalpav.com/comment/448681#comment-448681

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

तत्कालिन वृत्तपत्रे,इतर दृकश्राव्य माध्यमे अथवा तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही.

In reply to by बाबा पाटील

मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय मिपावर दोन्ही बाजूने बरेच चघळून झाले असणार त्या साठी दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी भरपूर धागे आहेत. हिंदू मुस्लीम या शिवाय सुद्धा पार्सी ज्यू इत्यादी इतरही धर्म विचार भारतात होते/आहेत त्यांचे काही चांगले अनुभव भारतात असणार. या धाग्यावर शक्यतो विवादात न अडकता केवळ सौहार्दाची इतर प्रमाण स्रोतांचे संदर्भ देऊन दखल घेण्यात सहकार्य हवे आहे.

In reply to by बाबा पाटील

@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती यांच्याकडचा थोडाफार जरी पुरावा समोर ठेवला तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही. >>> पुरावा म्हणताय ना?,मग मी पुरावा ठेवतो.फक्त परत गांधीबाबाच नाव घ्यायचं की नाही? ..ते तुमचं तुंम्ही ठरवा. (मला त्याच्याशी काहिही कर्तव्य नाही. :) ) संदर्भ :- आचार्य अत्रे यांचं, यंग मॅन्स हिंदू एसोसिएशनच्या, गणेशोस्तवातील दिनांकः-२३/९/१९४७ रोजीचं "मी मुळीच बदललो नाही" हे भाषण. (पुस्तकः- हशा आणि टाळ्या,पानः-२२४.) प्रसंगः- बंगाली स्त्रीयांनी गांधीना विचारलं:- गुंडांनी आमच्यावर हात टाकला,तर आंम्ही काय करायचं?. गांधींचे वक्तव्यः- श्वास रोखुन धरा म्हणजे तुमचे प्राण जातील,आणि अब्रू वाचेल. यावर (काहि) डॉक्टर लोकांनी असे सांगितले,की (अश्या वेळी) श्वास रोखुन धरल्यावर,प्राण न जाता शुद्ध हरपेल,आणि गुंडांचं दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येइल.(मरणार नाही.) यावर गांधिंचं वक्तव्यः- (स्त्रीयांनी) विषाची कुपी जवळ बाळगावी. (आपल्या समोरील जनसमुदायाला)सदर प्रसंग सांगून (ज्याला फाळणीच्या वेळचा हिंदू-मुस्लिम दंगलीचा संदर्भ आहे.) भाषणात आ.अत्रे अत्यंतीक त्वेषानी आणि तीव्र दुखा:नी जनसमुदायासमोर काय म्हणतात??? आ.अत्रे:- "अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. स्त्रीयांनी विष खाऊन मरावे,आणि (दंगलखोर मुस्लिम) गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये, हे जर का गांधिजिंच्या अहिंसेचे भयानक तत्वज्ञान असेल,तर आग लागो रे त्या गांधिजिंच्या अहिंसेला! (पुढे भावविवश झालेला जनसमुदाय या निर्भिड वक्तव्यावर काहि काळ टाळ्या वाजवत रहातो.) ============================================================= बाबा पाटील सदर भाषण हे फाळणी केल्यामुळे गांधींवर चिडलेल्या आणि काँग्रेसी व गांधी तत्वज्ञानाला सोडचिठ्ठी दिलेल्या (एकेकाळच्या कट्टर गांधी/काँग्रेससमर्थक) आत्र्यांचे आहे. आपण ज्या अनुषंगानी प्रश्न विचारला अगर मत व्यक्त केले आहे.ते पाहू जाता आपण सदर पुस्तकातील ते छापिल भाषण संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.(असे मला वाटते. :) )

In reply to by अत्रुप्त आत्मा

संघर्षकालीन लैंगिक हिंसा विषयावर उशिरा का होईना युनायटेड नेशन्सला जाग आलेली दिसते. UN Action Against Sexual Violence in Conflict हि संस्था या विषयावर काम करते आहे. पुरुष मंडळी धर्मग्रंथ स्वतःस सोईस्कर राहतील हे बघतातत आणि संधी मिळाली की पुरुष सुटतात. अयोग्य ते अयोग्यच यात उजवा डावा कसचं काय. अबकड समुदायाचे पुरुषच केवळ वाईट वागतात हळक्षज्ञचे पुरुष वाईट वागत नाहीत असे नसावे. Category:Wartime sexual violence हि इंग्रजी विकिपीडियावरील कॅटेगरीत सगळे एकाच तराजूत असतात हे दाखवणारे पुरेसे लेख आहेत. आपणही एखादा लेख त्या कॅटेगरीत जोडू शकलात तर संघर्षकालीन लैंगिक हिंसा या बद्दलचे दस्तएवजीकरणात मदतच होईल. या बद्दल अधिक चर्चा इतर धाग्यातून करता येईल. या धाग्याचा उद्देश मर्यादीत आहे त्या दृष्टीने धागालेखास अनुसारून प आपल्या सक्रीय सहभाचा अभिलाषी आहे.

In reply to by hitesh

तुम्ही पुर्वाश्रमीचे "उद्दाम" का?

In reply to by टवाळ कार्टा

त्याचं काही विशेष नसतं हो! हे अवतारी पुरुष ,वाल भिजत टाकावे , तसे डु आयडी काढून ठेवत असतात.

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. मला नक्की माहित नाही की आता पर्यंत आलेल्या प्रतिसादातील चर्चा "आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान" या धाग्यात अधिक सयुक्तीक असेल किंवा कसे.

धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात मी कुठे कमी पडलो असल्यास क्षमस्व. या धाग्याचा उद्देश कुठल्या लांगूलचालनाची दखल धार्मीक सहिष्णूता म्हणून घेणे असा नसावा. अहं... असे अजिबात नाही ! पण हा देश हिंदूस्थान आहे आणि एक हिंदू म्हणुनच मी माझे व्यक्त केले आहे.सहिष्णूतेच्या नोंदींची दखल ही हिंदूस्थानातील हिंदू लोकां पासुनच करायला हवी ! या हिंदूस्थानाने हिंदूं व्यतिरिक्त सर्व धर्मांना या हिंदूस्थानात त्यांच्या {इतर} धर्मावर कोणतीही बंधने न आणता सर्व स्तरांवर / पदांवर आणि जगण्यात मो़कळीक दिलेलीच आहे की. अहो इतके सहिष्णूता {?} भिनलेला हिंदू समाज जगात विरळाच बघा ! जाता जाता :- लांगूलचालन हा फारच सौम्य शब्दप्रयोग वाटतो. असो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

In reply to by मदनबाण

तुमचे वरील सगळे प्रतिसाद जबर आहेत. भावार्थी मी त्यातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे हे वे सां न ला. पण त्यातील उल्लेखिलेली पुस्तके आता वाचली पाहिजेत. ***!

In reply to by माहितगार

काय बाते पाक माध्यामातून बदला बदला आवाज कशामुळे सर्व ठिक असेल अशी आशा करून, आणखी एक दुवा http://www.dawn.com/news/1138373

आपला काहितरी गैरसमज होत आहे. भारतातच काय किंबहूना अखंड जगातच धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा नावाची चीज अस्तीत्वात नाही. तसा समज होण्याची कारणे खालीलप्रमाणे. १. बहूसंख्य जनता ही कायद्याला घाबरते. २. बहूसंख्य जनतेकडे बाहूबल नसते. ३. बहूसंख्य जनतेला स्वतःचे डोके नसते. ४. बहूसंख्य जनतेला दुसर्‍याच्याच काय पण आपल्या धर्माविषयी पण पुर्णपणे माहिती नसते. योग्य संधी मिळाली, आपण पकडले जाणार नाही अशी यांची खात्री किंवा गैरसमज होतो तेव्हा हाच समाज धार्मिक सहिष्णूता आणी सलोख्याला हरताळ फासतो. वरील वक्तव्ये अतिरंजीत असली तरी तेच वास्तव आहे. अन्यथा दर १०-२० वर्षांनी जातीय दंगली झाल्या नसत्या. अवांतरः प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तो येथेही गृहीत धरलेलाच आहे.

In reply to by धर्मराजमुटके

मला वाटतं मी या धाग्यासाठी फार मोठा म्हणजे काही हजार वर्षांचा काळ लक्षात घेतो आहे आणि एवढा मोठा काळ म्हटल्यावर सहाजीकपणे पूर्ण भारतीय उपमहाद्वीपाबद्दलही. ब्रिटीशपुर्व काळात राज्यकर्त्यांच्या कडेलोट, हत्तीच्या पायी देणे, चौरंग करणे अशाही अघोरी सजा होत्या (ब्रिटीशांनी काळेपाणी आणि फाशी असे प्रकार केलेच नाही असे नाही) तरी सुद्धा ब्रिटीशपुर्वकाळात ग्राम व्यवस्थेत राज्यकर्त्यांची दैनंदीन ढवळा ढवळ होती असेही नसावे. किमानपक्षी धार्मीक सौहार्दात कमी पडला म्हणुन सजा झाल्याचे भारतीय प्राचीन इतिहासात वाचनात नाही. संघर्ष प्राचीन इतिहासातही झाले असतील नाही असे नाही. पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. इतरांबद्दल कशाला, माझ्या व्यक्तीगत बाबीतही, एखाद्या व्यक्तीशी माझे सौहार्दाचे संबंध आहेत जेव्हा संघर्ष होतो तेव्हा आधीचे चांगले मी सगळेच विसरतो, संघर्ष मला स्वतःला विसरण अवघड जात. शिवाजी महाराज धार्मीक सद्भभाव पाळतात हा आदर्शच इतरेजनांसाठी पुरेसा असु शकतो प्रत्येकवेळी कायद्याचा धाकच असेही नसावे. दंगलींची कारण वेगळीही असू शकतात. नरहर कुरुंदकरांनी डेमॉग्राफीक चेंजेसचा उल्लेख केला आहे तो विचारात घेण्या जोगा आहे साधारणतः अत्यल्प मायनॉरिटीज या मेजॉरिटीच समर्थन करतात. एखादी मायनॉरिटी डेमॉग्राफिकली वाढते तसा सुप्त संघर्ष आकारास येत जातो. मुंबईत दक्षीणेच्या लोकांनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्या बद्दल अस्वस्थता निर्माण होते, बिहारींनी डेमॉग्राफिक बदल आणला की त्यांच्याबद्दल अस्वस्थता निर्माण होते. अर्थात या धाग्याचा प्रमुख उद्देश हिंसेची चिकित्साकरणे नाही. तुमच्या मतानुसार शांतता अपवाद आहे तर अपवाद म्हणूनच ठिक पण त्या अपवादातील का असेना शांतता आणि सौहार्दाची नोंद घेणे असा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

स्वातंत्रोत्तर काळात भारतात लोकशाहि डेव्हलप व्हायला सर्व धर्मीयांनी अगदी मनापासुन हातभार लावला. हे सर्वात मोठं धार्मीक सहिष्णुतेचं उदाहरण. मनोरंजन क्षेत्रात, विशेषत: बॉलीवुडने धार्मीक असहिष्णुतेला अजीबात थारा दिला नाहि. लोकांनिही कला क्षेत्रात पंडीतजी आणि उस्तादजींना अगदी समान मान दिला.

इतर कट्टर देशांत प्रत्येक धर्म पाळायचा अन न पाळायचा एक खाका असतो , भारत त्या बाबतीत लिबरल आहे, धार्मिक सहिष्णुते ची उदहारण आपल्याला इतिहासात आदि मुग़ल काळात भरपूर सापडतील (हवीअसल्यास)कृपया "सतीशचंद्र भाग १,२ अन जे एल मेहता भाग ३" ही पुस्तके वाचावी संदर्भ म्हणून

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सतीश चंद्र यांचे हे एक पुस्तक गुगलबुक्सवर मिळाले, वाचतो आहे. माहितीपुर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

तू नळीवर तारिक फताह किंवा bilatakaluf विथ ताहिर गोरा सर्च करा...मुद्देसुद विवेचन ऐकायला मिळेल.

पण जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात
करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?

In reply to by असंका

करेक्ट...! मग सापडलं का काही मनासारखं?
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी (विद्यासागर राव) पुण्यातील ज्यू धर्मीयांच्या लाल देवळाच्या दीडशेव्या वर्धापनदिनी हजेरी लावून "देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊन ज्यू नागरिक राहात आहेत." असे तोंड भरून कौतूक केले. अशा नोंदी उपलब्ध होत असतात. कुणी याकडे शासकीय अथवा राजकीय भूमीका म्हणून पाहू शकेल. पण कस आहे तुमच्या माझ्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या जीवनात एखाद्या वेगळ्या धर्मीयांशी संबंध आल्यास सहसा सौहार्दपुर्ण वागतात हे वास्तव असूनही याची बातमी होऊन येत नाही म्हणून असे संदर्भ मिळण्यास वेळ लागतो. काही उपयूक्त संदर्भ याच धाग्यावर दिले गेले आहेत ते अभ्यासतो आहेच (अर्थात हे मी सवडीने, सावकाश करतो आहे). आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by असंका

"मुस्लीम कवींची मराठी कविता" हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरास सादर केलेला किशोरकुमार कांबळे यांच्या प्रबंधात प्राचीन मुस्लीम (मराठी) कवींची काव्यपरंपरा हे प्रकरण आत्ताच वाचले. या धागा विषयास अनुसरुन खूप चांगली माहिती आहे. आणि अमुक तमुक समाजात बदल होतच नसतात या धारणेस एक छोटासा धक्का आहे यात.

हे बघा कशी गळचेपी चालते ते आपल्या धर्माची. धर्माची; संस्कृतीची. आणि आपण आरक्षणं देतोय ! वा वा वा !

In reply to by वेल्लाभट

हे फक्त हिंदूंसाठीच झाले का त्या शाळेत??? उत्तर नाही असेल तर त्यांनी केलेले बरोबरच आहे उत्तर होय असेल तर त्याबद्दल त्या शाळेला एकदा लेखी निवेदन दिले पाहिजे (ते हिसका दाखवणे नंतरपण करु शकतो) उत्तर माहित नाही असे असेल तर....जौध्या...मीप मिपावर गळा काढणारे कोणी ना कोणी येईलच

In reply to by टवाळ कार्टा

मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक क्षेत्रातील अभिप्रेत शीस्त आणि मल्टीकल्चरीझमचा समतोल साधला जावयास हवा. सर्वच शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना ते व्यवस्थीत जमत असे नव्हे पण अशा ठिकाणी सुधारणा हा वेगळ्या चर्चेचा महत्वपूर्ण विषय आहे.

In reply to by वेल्लाभट

वस्तुतः धाग्याच्या कक्षे बाहेरचे विषय इथे चर्चा करून मनातली भडास व्यक्त करणे आणि तू मला सांग मी तूला सांगतो पलिकडे फारसे काही होणार नाही. त्या पेक्षा इंग्रजी विकिपीडियावरील असे सुयोग्य लेख शोधणे आणि माहिती संदर्भा सहीत जोडणे अधिक उचीत होऊ शकेल. किंवा अगदी इनटॉलरन्स इन कॉन्व्हेंट स्कूल्स असा लेख अद्यापतरी इंग्रजी विकिपीडियावर नसावा पण संदर्भासहीत तो तसा काढण्यास हरकत नसावी. किमान पक्षी भारतीय भाषी विकिपीडियांवर आपण असा लेख करून नोंदींची संदर्भासहीत ज्ञानकोशीय दखल घेऊ शकताच. बादवे आपण दैनिक सकाळची बातमी दुवा जो दिला तो अनुवादीत होऊन येई पर्यंत शिळा झाला असावा असे दिसते. दैनिक सकाळ ची दुव्यावरील बातमी वेळ शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 - 10:56 AM IST अशी दिली आहे. पण तत्पुर्वीच By Paras Ramoutar Port-of-Spain, Oct 30 (IANS) 14:30 दुपारी Mehndi on hands, Indo-Trinidadian girl back in class अशी बातमी IANS ने दिली आणि दैनिक सकाळला शिळ्याबातमीचा अनुवाद देईपर्यंत आदल्या दिवशीच्या दुपारच्या बातमीची दखल घेऊन अद्ययावत कराविशी वाटलेली दिसत नाही. एनी वे या दुव्यावर हि बातमी विस्तृतपणे वाचण्यास उपलब्ध दिसते आहे. धन्य तो दैनिक सकाळ

बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण! हिंदूस्थानात राहुन हिंदूस्थानच्या पंतप्रधानांचा असा अपमान ! कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की

In reply to by मदनबाण

१९८४ साले इंदिराजीना जगन्नाथ पुरीच्या मंदिरात तिथल्या पुजार्‍याने प्रवेश नाकारला होता.. तेंव्हा तुमच्या पंतप्रधानाचा अपमान झाला नव्हता का ? बुखारीनी मोदीना नाही बोलावले तर इतका दंगा कशाला ? शाही इमामाचे पद जहांगिराने तयार केले होते. भारत मोघलाना 'आपला ' मानत नाही.. पाकिस्तान मात्र स्वतःला मोघलांचा फॉलोअर समजतो.. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही हे बुखारी ठरवतील.

In reply to by hitesh

इंदिरा गांधींना विरोध त्यांनी पारशी इसमाशी लग्न केल्यामुळे झाला होता. पारशी अग्यारींमध्ये इतर धर्मीयांना आजही प्रवेश नाही. हल्ली त्यांचे नियम बदलले असल्यास माहित नाही. बाकी धर्माचा मुद्दा सोडून दया. मोदींना बोलवणे अथवा न बोलावणे हा इमामांचा प्रश्न त्याला आक्षेप नाहीच. पण पाकिस्तानी पंतप्रधानांना बोलावणे हे भारताला मुद्दाम खिजवण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

In reply to by प्रचेतस

यात खिजवायचा संबंध कुठे आला ? मोदी चीनच्या प्रमुखाला भेटु शकतात.. इमाम पाकिस्तानच्या प्रमुखाला का भेट शकत नाहीत ? पाकिस्तानला होणारी निम्मी निर्यात मोदींच्या गुजरातमधुनच होते.

In reply to by hitesh

पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे की. बाकी ह्यात व्यापाराचा तसेच २ राष्ट्रप्रमुखांच्या भेटीचा बादरायण संबंध जोडलेला पाहून गंमत वाटली.

In reply to by प्रचेतस

+१ . . . शिवाय मोगलांना आपले का म्हणावे? याबद्दल काहिच उत्तर आलेलं नाही. आणि गंमत म्हणजे मोगालच स्वत:ला परकीय समजत होते, त्याचं काय?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मोगल परकीय होते तर त्या मोघलानीच बसवलेल्या इमामाने मोदीना बोलावलेच पाहिजे हा हट्ट तरी कशाला हवा ?

In reply to by hitesh

हा इमाम बुखारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलावताना स्वत:ला समस्त भारतीय मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणवून घेतोय. कोणी दिले याला समस्त भारतीयांचे मुखत्यारपत्र? (म्हणे मोदी भारतीय मुसलमानांना जवळचे वाटत नाहीत) खालील लिंक बघा http://www.firstpost.com/india/who-said-you-represent-us-angry-muslims-… हेच जर पाकिस्तानातल्या एखाद्या पुजाऱ्याने (किती शिल्लक आहेत माहित नाही) तेथील राष्ट्रप्रमुखांना न बोलावता, मोदींना बोलावले तर चालेल?

In reply to by प्रचेतस

हायला गंमतच आहे. बाईने पारशी पुरुषाशी लग्न केले तर तिला पारशी बनुन अग्यारीत जाता येते. त्या हिंदु पुजार्‍याने त्यांच्या नवर्‍यालाही हिंदु मानुन देवळात घ्यायला हवे होते की ! इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?

In reply to by hitesh

इंटर रिलिजन लग्नात हिंदु लोक लबाडी का करतात ? स्त्री असो वा पुरुष , त्याला ( तिला ) दुसर्‍या धर्मात ढकलतात. त्या दुसर्‍या पार्टनरला हिंदु धर्मात का घेत नाहीत ?
कधि येणार हिंदुंना अक्कल...

In reply to by hitesh

बाईने पारशी पुरुषाशी लग्न केले तर तिला पारशी बनुन अग्यारीत जाता येते.
हे नक्की माहिती आहे का तुम्हाला?

In reply to by hitesh

पद कोणीही केलेले असो. भारताच्या पंतप्रधानांना निमंत्रण नाही आणि पाकिस्तानला निमंत्रण हा जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा आहे. इमामाची अक्कल जगन्नाथपुरीच्या पुजाऱ्यांइतकीच दिसते.

In reply to by hitesh

तपशीलात दुरुस्ती : शाही इमामाचे पद शाहजहानने निर्माण केले. सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा

In reply to by hitesh

सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा
मोहरम आणि गूडफ्रायडेच्या शुभेच्छा संदेश देण्याची काही विशेष पद्धत असते का ? - अनभिज्ञ माहितगार

In reply to by hitesh

कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही ! या बद्धल २ शब्द टंकण्याचे कष्ट आपण का टाळलेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

बाणराव जिथे मिपावर रा.रा."ओवेसी" बद्दल अवाक्षर न काढणारे भंपक विचारवंत आणि स्वघोषीत स्व(माज) सुधारक आहेत तिथे तुमच्या रोखठोक प्रश्नाची काय पत्रास??? नेहमीप्रमाणे "इस्लाम" खतरेमे अशी बांग द्यायला तयार व्हा बरे!!!

In reply to by नाखु

भारतातील धार्मीक असहिष्णूता आणि तणाव या स्वरुपाच्या चर्चा आधीच होऊन गेल्या असाव्यात म्हणून तसा धागा न काढताच पुढे गेलो. पण आवश्यकता असल्यास अजूनही तसा धागा काढता येईल. जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे. या धाग्यास कोणत्याही घाणीचे समर्थन करावयाचे नाही पण केवळ घाणच मोजत बसलो तर आपणही त्यातच बरबटले जाऊ असे वाटते. असो. या धाग्याचा उद्देश भारतातील जेनुआईन चांगल्या परंपरांची दखल घेणे एवढा मर्यादीत आहे. धागा लेखास अनुलक्षून प्रतिसादांचा अभिलाषी आहे. धन्यवाद.

In reply to by माहितगार

जिथ पर्यंत बुखारींचा संबंध आहे अवांतरात माझीच भर नको म्हणुन माझा प्रतिसाद दिला नव्हता पण तो आता खाली दिला आहे तो पुरेसा स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ विश्लेषण सेक्युलॅरीझमच्या नावाखाली केल्या जाणार्‍या दिखाऊ राजकारणावर टिकाही केली आहे. बुखारींचे उदा. मुद्दामुन दिले आहे, कारण हे शाही इमाम इथे हिंदूस्थानात राहुन असे वर्तन करु शकतात कारण तसे करण्याची "मोकळीक" त्यांना आहे, परंतु हे करत असतानाच ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवणे करुन ज्या हिंदूस्थानात राहतात त्याच देशातल्या पंतप्रधानांना मात्र मुद्धामुन आमंत्रण देत नाहीत हे निश्चितच अवमान करणारे आहे. त्यांचे हे उध्योग कोणत्याही कारणास्तव असोत, पण त्यांना असे वर्तन करण्यास मूभा आहेच ना ? सहिष्णुता असणे म्हणजे मोकाट सुटण्याचा परवाना असतो काय ? आणि म्हणुनच कोणत्याही अरब देशात असा उध्योग करण्यास कोणी धजावणार देखील नाही ! असे मी म्हंटले आहे. हा उध्योग याच शाही इमामाने अरब राष्ट्रात केला असता का ? अर्थात याचे उत्तर नाही असेच येइल. जर उत्तर नाही असे येणार असेल तर त्या मागचे कारण काय ? मुस्लिम राष्ट्र असुन सुद्धा भलतेच लाड तिथे खपवुन घेतले जाणार नाहीत ही खात्री, शिवाय अल्लाला प्यारे व्हायची भिती असते हे मुख्य कारण. इथे हिंदूस्थानात या दोन्ही गोष्टी नाहीत, त्यामुळे हे असले माज सहिष्णुतेच्या नावाखाली सहज सहन केले जातात. जाता जाता :- परवा कमला नेहरु पार्क मधे फोटो काढण्यासाठी गेलो असताना, तिथे अनेक मुस्लीम समुदायाचे लोक सुद्धा फिरायला आले होते, त्यात अनेक बुरखा परिधान करुन आलेल्या स्त्रीया देखील होत्या. थोडा वेळ फिरुन झाल्यावर आणि १-२ ठि़काणांचे फोटो काढुन झाल्यावर अचानक लक्षात आले की, बागेतल्या सगळ्या मुस्लीम स्त्रीया {१५-२० तरी असाव्यात} बागेतच नमाज पठण करु लागल्या ! ही मुभा सहिष्णुता आहे म्हणुनच मिळते नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

In reply to by मदनबाण

कुणाला बोलवायचे कुणाला नाही , हा बुखारींचा प्रश्न आहे.. पुन्हा पुन्हा यावर डिस्कशन करण्यासारखे काही नाही. अरबास्टानाट पाकिस्ताआनात असे चालते का वगैरे भोंगळ प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाही. जो या देशात रहातो , त्याने या देशाच्या कायद्यानुसार स्वातंत्र्य भोगले आहे का इतकेच पहावे. बागेत नमाज पठण करायला बंदी नाही.. हिंदु धर्मीय लोक मुंबै लोकलमध्ये सवाद्य भजने म्हणत जातात. रोजच आम्ही पहातो. मुस्लिम समुदायाने देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहुन उपबहोगलेले स्वातंत्र्यही तुम्हाला बघवत नाही का ?

In reply to by hitesh

बुखारींनी बोलवावे काहीच हरकत नाही.. मोदींना बोलवु नये हे ही ठीक.. पण ही सरकारी भेट नसल्याने शरीफ यांनी राष्ट्रप्रमुख असुनही रीतसर व्हिसा काढुन सरकारी परवानगीने यावे..