१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hun…
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
वाचने
90938
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजप
भाजप पहिल्या क्रमांकावर व
In reply to भाजप by नानासाहेब नेफळे
गुर्जी, अंगठे धरा!!!
'सब भूमी गोपाल की, जय बोलो
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
आधीच्या परिच्छेदातील काही
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
ते जाणवलं होतं हो!
In reply to आधीच्या परिच्छेदातील काही by श्रीगुरुजी
>>तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
काल झी-२४ तास/तालिम चे
राज्यात काँग्रेसची प्रतिमा
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
अहो गुर्जी ज्या ठाम पणे
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
२०१३ मध्ये असे वातावरण होते
In reply to अहो गुर्जी ज्या ठाम पणे by माझीही शॅम्पेन
कॉलिंग क्लिंटन
मी त्यांच्याच लेखाची आतुरतेने
In reply to कॉलिंग क्लिंटन by सुनील
पृथ्वी
उत्तम माहिती
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद
सेना+ मनसे+ छोटे पक्ष
मोदींचा परिणाम
भाजपा व पूर्ण बहुमत ई
शिव(शाही) सेना
In reply to भाजपा व पूर्ण बहुमत ई by चौकटराजा
हा हा हा...!
In reply to शिव(शाही) सेना by रमेश आठवले
लिंक दुरूस्ती
In reply to हा हा हा...! by शिद
भाजपा राज्यात ११० ते १२०
घटस्फोटाचा परिणाम
शिवसेना हा पक्ष आजकाल
सहमत!
In reply to शिवसेना हा पक्ष आजकाल by वेताळ
अगदी
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला
महाराष्ट्रातले प्रकल्प
In reply to मोदी गुजरातमधून बाहेर पडायला by दुश्यन्त
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा
बादवे, या निवडणुकीत
अरविंद वी मिस यु
In reply to बादवे, या निवडणुकीत by श्रीगुरुजी
तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर
In reply to तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे by दुश्यन्त
1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस
In reply to 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद by नानासाहेब नेफळे
राम मनोहर लोहियांच्या
In reply to >>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस by श्रीगुरुजी
खिक्क
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
काँग्रेसविरोधी लाटेचा
In reply to खिक्क by llपुण्याचे पेशवेll
खिक्क्
In reply to काँग्रेसविरोधी लाटेचा by नानासाहेब नेफळे
व्वा!!
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
>>> राम मनोहर लोहियांच्या
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
माफ करा ,लोहिया नव्हे
In reply to >>> राम मनोहर लोहियांच्या by श्रीगुरुजी
http://jagatapahara.blogspot
सहमत
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
तुम्ही कधी हरियाणा (NCR नाही)
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य
>>> राज ठाकरे म्हणतात तसे
In reply to राज ठाकरे म्हणतात तसे राज्य by दुश्यन्त
राज ठाकरे म्हणजे काय
In reply to >>> राज ठाकरे म्हणतात तसे by श्रीगुरुजी
पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
पण...
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
असे कैच्या कै प्रश्न विचारु
In reply to पण... by अर्धवटराव
इंटरेस्टिंग!
In reply to पण... by अर्धवटराव
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात
In reply to पण... by अर्धवटराव
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?हे आवडले ! *OK*कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते
JNPT बंदर ,नवी मुंबईचा
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच
In reply to JNPT बंदर ,नवी मुंबईचा by नानासाहेब नेफळे
इंदिरा गांधींच्या काळात सर्व
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५
In reply to कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ by दुश्यन्त
तूलना व्यक्ति बघुन कराव्यात
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
वाटेल ते फेकू नका
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
कैच्याकै
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
मग काय
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
हा हा हा
In reply to मग काय by उदयन
५ वर्ष आहे. अजुन
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
:)
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
किती हास्यास्पद लिहितात
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
कैच्याकै
In reply to किती हास्यास्पद लिहितात by उदयन