पुढिल वर्षी अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सद्य परिस्थितीत काँग्रेसला सत्तेतुन पाय -उतार होण्यावाचुन दुसरा पर्याय नसल्याचे लक्षात घेता आणि या अनुशंगाने विचार करता हिंदुत्ववादी संघटनां व मुख्यत्वे करुन अखिल भारतिय विद्यार्थि परिषदेचा संबंध प्रकरणाशी जोडला जाणे हे सगळे अतिशय संशयास्पद वाटते.
आणि त्याही पेक्षा काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हे प्रकरण उघडकीस येणे ,शिवाय ११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमधे झालेले बाँबस्फोट व त्यामधे आधी एटिएस ने पकडल्यालेल्या आरोपीं बद्दल निर्माण झालेला संशय या सगळ्या पार्श्वभुमीवर विचार करता हे जरा पचनी पडण कठिण आहे.
काही ही व कसेही करुन भाजपा आघाडिला सत्तेत येण्यापासुन रोखण्यासाठीचे हे कारस्थान नसेल कशावरुन?
ज्या देशात आय बी वर रॉ सारख्या गुप्तहेर संघटनांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेणारे राजकिय पक्ष असल्यावर काहीही होवु शकते.
शेवटि काय तर पोलिस देखिल हुकमाचे ताबेदार आहेत या देशात्?स्वतःच्या सदसदविवेक बुद्धिला स्मरुन काम करणार्या अधिकार्यांची संख्या नगण्य आहे.
चुकुन -माकुन जर यात तथ्य अढ्ळलेच तर त्यांना देखिल तोच न्याय द्यावा .कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे.आणि इस्लामच्या नावाखाली कत्तली करणारे आणि हिंदुत्ववादाचा प्रसार आणि प्रचार करणारे यात मुलभुत फरक हा असायलाच हवा.
"एकाने गाय मारली म्हणुन दुसर्याने वासरु" मारण्यात काय अर्थ आहे.
पण मला मनातुन वाट्ते आहे की हे सगळ हेतुपुरस्सर घडवुन आणण्यात येत असावे.
"सावरकरांचे हिंदुत्व मानणारी"
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
ही घटना कारस्थान आहे का हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे एक अत्यंत वाईट गोष्ट झाली आहे. यापुढे मुस्लिम अतिरेकी स्फोट घडवतच रहातील आणि आळ हिंदु संघटनांवर घालतील. आणि त्यांच्या या कांगाव्याला आपले 'समाजवादी, ढोंगी कांग्रेसी नेते, आणि ह्युमन राईटस् चे लोक अगदी गळा काढून साथ देतील.
अनामिका, स्वामी व हेरंब,
आपले प्रतिसाद पटले. सहमत.
चर्चा सुरु करताना लेखकाने ज्या प्रकारे विषय मांडला त्यावरुन असे वाटत होते की हे महाशय सुद्धा मिडीया प्रमाणे केवळ गरळच ओकणार. पण त्यांना अभाविपने नेटाने चालवलेल्या राष्ट्रकार्याची आठवण झाली हे पाहून फार हर्ष झाला.
कॉग्रेसी राज्यकर्यांनी हे मारुन मुटकुन काहीतरी कटकारस्थान उभे केले आहे यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. त्यांच्या या हलकट राजकारणाने मात्र मुसलमान अतिरेक्यांना हिंदूंच्या विरोधात बोंबलायला आयतेच कोलीत मिळाले आहे. आता सर्व राष्ट्रप्रेमी संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले गेले तरी नवल नको असे वाटायला लागले आहे.
आरे हो एक सांगायचे राहिलेच - मी विद्यार्थी असताना विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पूर्णवेळ कार्यकर्ता एक मुस्लिम होता. त्याने आम्हाला अभाविपची ओळख करुन दिली. तसेच अभाविप ही धार्मिक संघटना आहे असे आम्हाला तरी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून जाणवले नाही.
आपला,
(राष्ट्रप्रेमी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मी स्वतः सतत पाच वर्ष संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता होतो. याकाळात संघटनेने दिलेले संस्कार माझ्या वैयक्तीक आयुष्यात कामी आले आहेत. मी आज जे काही आहे. ते अभाविपमुळेच.
ही टॅक्ट बाकी आवडली म्हणा. म्हणजे कसे तर शिवसेनेतून फुटून निघणार्या कार्यकर्त्याप्रमाणे. शिवसेनेला यथेच्छ शिव्या द्यायच्या आणि म्हणायचे मी जुना शिवसैनिकच आहे. म्हणजे अशाना वाटते लोकाना आपलं म्हणणे पटेल. पण ही काही टॅक्ट जुनी नाही. आणि बिलकुल पुराव्या शिवाय लोक पकडायची ही काही आबांची पहीलीच वेळ नाही. मागे एक मुंबईचा मुलगा अल कायदाचा कार्यकर्ता म्हणून पकडला होता. पुढे काय झाले सुटलाच ना.
पण यात मला गम्मत वाटते ती तुमचीच. तुम्ही तुमच्या लोकाना इतके पण ओळखू शकत नाही काय?
पुण्याचे पेशवे
मी देखिल महाविद्यालयीन काळात अभाविप ची सदस्य होते.
विधायक कार्यात सहभाग अभाविप मार्फत घेतला असल्या कारणाने हि संघटना धार्मिक आहे ह्या बाजारगप्पांवर मुळिच विश्वास बसत नाही आणि बसणार नाही.
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
विकास आपण स्वतः पुर्वी अभाविपचे सभासद होतात असे नमुद केले असताना आपण "आक्रमक धर्मांधंता "
हे शिर्षक बदलुन "अभाविपची आक्रमक धर्मांधता " असे केलेत .
का त्याचे स्पष्टिकरण दिलेत तर उत्तम.
कि तुमचे संघटनेशी संबंधित असुनही मतपरिवर्तन झाले आहे?
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
प्रतिक्रिया
पटतय आम्हालाही
पुढिल
आता कळ्लं?
कारस्थान
अभाविप - धार्मिक संघटना???
मी स्वतः
हाहा...
विधायक कार्यात सहभाग
मी
विकास आपण