सरपंच,
मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे.
स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये.
पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते.
आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच!
तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.
आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो.
लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता.
जाऊ द्या !!!
उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल.
आपला.
प्रा.डॊ. दिलीप बिरुटे
(मिसळपावचा चाहता )
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे.
आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल.
शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये!
तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन.
आपला
गुंडोपंत
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल.
तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती.
आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली.
लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत.
कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे.
तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
मालक!!
काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत..
दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील..
चुकी चा की बरोबर ते येणार्या काळाला ठरवू दे..
ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती..
केशवसुमार..
सरपंचजी,
गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते.
कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल
सहमत आहे.
मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.
<<लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>>
सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते.
जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारी मना तूच शोधोनी पाहे||
जय जय रघुवीर समर्थ
प्रकाश घाटपांडे
अरे नाना,
इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये.
तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का?
तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना...
तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना?
त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे.
पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही!
मग अशा वेळी काय करायला हवे?
शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा.
बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही?
आपला
गुंडोपंत
मुक्कामपोष्ट भोकरवाडी
तात्या,
आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन!
गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन.
दिनेश
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे.
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे.
मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे.
- प्राजु.
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे.
मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही.
मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये.
मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी!
सरपंच.
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन!
ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!!
(शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश
ऋषिकेशराव,
कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे,
उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा.
तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!!
किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे !
पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.)
अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर !
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.)
- सर्किट
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.)
नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच!
आपला
गुंडोपंत
प्रतिक्रिया
फेज
निर्णयाचे स्वागत
तात्या
आणीबाणी...चे आम्ही समर्थन करतो.
अजून आणीबाणी
तात्या मुशर्रफ!
अभिनंदन!
आणीबाणी संपण्यासाठी शुभेच्छा
सहमत
अभिनंदन
अरे
सहमत आहे.
उत्तम!
आणिबाणी
योग्य निर्णय..
मिसळपाव सुरूच आहे..
सदिच्छा!
विनाअडथळा!
अभिनंदन
आणिबाणीचे पहिले कृत्य
नि
?
ह्यो धागा का वर आलाय??