पूर्वपिठिका:
नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले...
नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा.
याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे.
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
२. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो.
सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते.
पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील.
३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही.
सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत.
वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही.
४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे.
जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.
वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील.
या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्याचा डबा दाखवणे आवश्यक आहे...
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१.
वाचने
55899
प्रतिक्रिया
218
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाग १:
In reply to इक्का, उपहास मुद्यांचा आभाव दर्शवतो by संजय क्षीरसागर
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...."हे मान्य नाही तर मग मी विटेकरांच्या पहिल्या प्रतिसादाच्या प्रतिसादात जो प्रश्न विचारला आहे त्याचे "प्रामाणिक, लॉजीकल, सरळ-सरळ, मुख्य मुद्द्याला बगल न देता आणि उगाच नको त्या प्रायव्हेट लॉजिक वापरलेल्या विधानांचा वापर करून विपूल लेखन न करता" उत्तर द्या... मग पुढे बोलू. अन्यथा तुम्ही केवळ आमची करमणूक करता आहात, असे समजले जाईल. बर्याचदा अडचणींचे वाटणारे मुद्दे तुम्हाला दिसेनासे होतात (याला "सोईस्कर अंधत्व" किंवा "कन्व्ह्नियंट ब्लाइंडनेस" असे म्हणतात) आणि नसलेले मुद्दे दिसतात (याला "दिशाभूल करणे" किंवा "डायव्हर्शनरी टॅक्टीक्स" असे म्हणतात). याला उपाय म्हणून ("प्रिव्हेन्शन इझ बेटर दॅन क्युअर") तो प्रश्न तुमच्या सोईकरिता खाली परत देत आहे...हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू...ज्याना हा प्रश्न विचारला होता त्यानी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळून निष्कारण धर्म / अध्यात्म / इ मध्ये आणून सरळ वस्तूस्थितीवर आधारलेल्या या मूळ प्रश्नालाच बगल दिली होती. तरीसुद्धा तुम्हाला त्यात बरेच काही दिसले आणि तुम्ही त्यांत सद्य लेखात अध्याहृत नसलेल्या अनेक गोष्टींची भर टाकून एक लेखवजा प्रतिसाद लिहीला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी "होप अगेन्स्ट होप" अपेक्षा आहे. ======================= भाग २: आता तुम्हाला याच विषयावर अजून एक खास प्रश्न... जर "सत्याचा नेहमीच आपोआप विजय होतो आणि त्यासाठी संघर्षाची गरज नाही" हे सत्य आहे, तर "तुम्ही नेहमी जी अनेक वैश्विक आणि अढळ सत्ये सांगत असता" त्यासंबधात... अ) तुमची सत्ये दुसर्यांना समजावून सांगायला; "ती सत्ये ठासून-ठासून सांगणारे, सर्वसामान्य लेखक/प्रतिसादक लिहीतात त्यापेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठे लेख/प्रतिसाद लिहायची" गरज तुम्हाला का वाटते * ? हा तुम्हाला पटलेल्या सत्याच्या बाजूने तुम्ही केलेला संघर्ष नाही का ? आणि इतके करून सुद्धा... आ) बहुतेक वेळेला ती सत्ये बहुसंख्य लोकांना अमान्य का असतात ? सत्याचा तर आपोआप विजय व्हायला पाहिजे नाही का ? या प्रश्नाचेही धर्म / अध्यात्म / इत्यादींना मध्ये न आणता "हे मी म्हणतो आहे म्हणून खरेच आहे" या धाटणीत नसलेले, सरळसरळ, वस्तूस्थितीवर आधारलेले लॉजिकल उत्तर अपेक्षित आहे, हेवेसांन. ...... * : इथे तुमच्या लेख/प्रतिसाद लिहीण्यावर काहीच आक्षेप नाही, तो तुमचा मानवी अधिकार आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण जी गोष्ट आपोआप होते त्याकरिता इतका आटापिटा करण्याचे जे कारण आहे ते अपेक्षित आहे.सर, माझा मुद्दा फार साधायं
In reply to भाग १: by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा
In reply to सर, आता तुम्ही प्रतिसाद न वाचता लिहायला लागलात! by संजय क्षीरसागर
गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न
In reply to तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा by डॉ सुहास म्हात्रे
अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे
In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
उत्तरांचा फॉर्मॅट
भाग १: येथे उत्तर लिहा.> भाग २: अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> सूचना: १. अँगल्ड ब्रॅकेट्सच्या जागी तुमची उत्तरे अपेक्षित आहेत. २. फक्त मुद्द्याना धरून लिहीणे अत्यंत महत्वाचे आहे... कठीण आहे पण प्रयत्नाने जमते. ३. फक्त संसदिय भाषा वापरा. काही शब्द केलेल्या वाद-प्रतिवादाचे वजन कमी करतात. ४. फक्त तुमचे स्वतःचे मत अपेक्षित आहे. इतरांची मते (यात माझेही मत आलेच) सांगण्यासाठी इतर समर्थ आहेत. ५. प्रश्न फार सरळ आणि सोपे आहेत. उत्तरेही सरळ आणि सोपी अशीच अपेक्षित आहेत... कारण आम्ही काही फार पोचलेले ज्ञानी नाही. तेव्हा सामान्य व्यवहारी लोकांना समजेल अशी उत्तरे अपेक्षित आहेत. ५. "आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही / आपले चुकले आहे" हे समजणे ही ज्ञानाची / चूक सुधारण्याची पहिली पायरी असते. या जगात सर्वज्ञानी असे कोणीच नाही (त्यांत मी आणि तुम्ही दोघेही आहोतच). तेव्हा ही पहिली पायरी प्रत्येकाला वारंवार चढावीच लागते. ही पायरी उघड्या डोळ्याने पाहून ती चढणे हे सर्व ज्ञानांचे मूलभूत ज्ञान आहे. ========= फॉर्मॅट जरा मोठा झाला. पण त्याचा हेतू उत्तरे सरळ, सोपी आणि प्रामाणिक करण्याचा आहे. उत्तरांची वाट पहात आहे.अरेच्च्या...
In reply to अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे by डॉ सुहास म्हात्रे
उत्तरांचा फॉर्मॅट (सुधारित)
भाग १: (उत्तर) भाग २: अ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) आ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) सूचना वर दिल्या आहेतच, फक्त त्यांत अँगल्ड ब्रॅकेट्सऐवजी साध्या साध्या ब्रॅकेट्स असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.अग्गाग्गा
In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं?
In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
येक विचारू का?
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
दिनेशश्री! चर्चा अत्यंत नेमक्या वळणावर आणल्याबद्दल आभार!
In reply to येक विचारू का? by दिनेश सायगल
ओके.
In reply to दिनेशश्री! चर्चा अत्यंत नेमक्या वळणावर आणल्याबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
माझ्या दोन साध्या प्रश्नांची
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
इकाश्री, आता मात्र हद्द झाली!
In reply to माझ्या दोन साध्या प्रश्नांची by डॉ सुहास म्हात्रे
बर मग मी माझे प्रश्न
In reply to इकाश्री, आता मात्र हद्द झाली! by संजय क्षीरसागर
इतिहास उगाळण्यात मला रस नाही
In reply to बर मग मी माझे प्रश्न by डॉ सुहास म्हात्रे
चला भाग १ वर कोणथी उत्तर देण
In reply to इतिहास उगाळण्यात मला रस नाही by संजय क्षीरसागर
@इस्पीक चा एक्का -
In reply to चला भाग १ वर कोणथी उत्तर देण by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
प्रतिसादातले सगळे निकष, स्वतःच्या पोस्टवर अप्रकाशित झालेल्या
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
स्वयंघोषित सर्वज्ञ व्यक्तींचे
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा
In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध नाही. २) सत्य (किंवा प्रामाणिकपणा) सदाविजयी आहे याचा अर्थ असत्य (अप्रामाणिकपणा), व्यक्तीच्या मनात अंतर्द्वंद्व निर्माण करतो. त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते आणि त्या अर्थानं ती पराभूत होते. थोडक्यात सत्याला असत्याशी सामना करायला लागत नाही कारण प्रामाणिक व्यक्ती अशा द्वंद्वापासून सदैव मुक्त असते.पुर्ण सहमत. अर्थातच बाकीच्या वादविवादात आपल्याला इंटरेस्ट नाही.थोडासा बदल.
In reply to १) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा by विलासराव
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू,
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू,
In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by डॉ सुहास म्हात्रे
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.हे जरी खरे असले तरी त्याचा तुमच्या प्रामाणिक असण्याशी काय संबंध? म्हनजे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन मीही तसाच होणार असे का? उत्तर नको आहे. फक्त आपल्या अंतर्मनाचा जेंव्हा अभ्यास कराल तेंव्हा आनी तेंव्हाच हे लक्षात येईल. बाकी काहीही उपाय नाही.सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !असं ०.०००००००००००००००००००००००१ % या केसमधे नव्ह्तं एवढच नमुद करतो.हा खयाली पुलाव आहे तुमचा. बाकी चालु द्या.तुमचा माझ्या एकंदर
In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by विलासराव
तुमचा माझ्या एकंदर
In reply to तुमचा माझ्या एकंदर by डॉ सुहास म्हात्रे
प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
याचाच विरोध कायदे, नियम,
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
अपघाता नंतर उपरती.
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
मैं कहाँ हूँ
In reply to अरे, जिओ मेरे विटेकर बुवा! by संजय क्षीरसागर
बाबा सायगल,
In reply to मैं कहाँ हूँ by दिनेश सायगल
असं होय!
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
अरेच्या!
In reply to असं होय! by दिनेश सायगल
काय हो!
In reply to अरेच्या! by संजय क्षीरसागर
तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?
In reply to काय हो! by दिनेश सायगल
त्या दुसर्या लेखाचा संदर्भ
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
सर, मी परत लेख वाचण्यापेक्षा
In reply to त्या दुसर्या लेखाचा संदर्भ by डॉ सुहास म्हात्रे
खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना
In reply to सर, मी परत लेख वाचण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
माझं म्हणणं इतकंच आहे :
In reply to खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना by डॉ सुहास म्हात्रे
आता तुमचेच प्रतिसाद तुम्ही
In reply to माझं म्हणणं इतकंच आहे : by संजय क्षीरसागर
माणूस स्वत:शी खोट बोलू शकत
सरळ मुद्दा आहे!
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
तुमचं मत आध्यात्मिक वगैरे
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
इकाश्री, जाऊं द्या!
In reply to तुमचं मत आध्यात्मिक वगैरे by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्याकडून अधिक अपेक्षा
In reply to इकाश्री, जाऊं द्या! by संजय क्षीरसागर
विवेकपटाईतकाका, असत्य
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
विवेकसरांशी संपुर्ण सहमत.
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
अजून काही विचारवंताच्या सभेत
सितेला पळवून नेल्यावर
धन्यवाद ! या गोष्टीचा हा
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
.
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
कसब वाखाणण्याजोगे आहे तुमचे.
In reply to . by पोटे
+१. वाकबगार पोटे.
In reply to कसब वाखाणण्याजोगे आहे तुमचे. by विश्वनाथ मेहेंदळे
आमचाही एक ...
+११११
In reply to आमचाही एक ... by चौकटराजा
मी शंभरावा लिहिणार इतक्यात चौरांनी प्रतिसाद दिला
अर्रे हो
In reply to मी शंभरावा लिहिणार इतक्यात चौरांनी प्रतिसाद दिला by लंबूटांग
उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे
In reply to अर्रे हो by लंबूटांग
चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट by प्यारे१
बरं मग?
In reply to . by पोटे
.
In reply to बरं मग? by प्यारे१
.
In reply to . by पोटे
आता नवीन लबाड उदाहरण घेऊ. हाय
In reply to . by पोटे
गायीला मारायला निघालेल्या
In reply to . by पोटे
माणसाच्या जीवनाला गायीच्या
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
>>> समजा की तो कसाई हा ती गाय
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
+१
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
आयुश्यात ९०% लफडी कोण काय