Skip to main content

मंत्रयोग - जपयोग

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 17/07/2014 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 71092
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

>>> तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव आहे! आणि म्हणून तर मी इतकं उघडपणे सांगतोयं. अनुभव असता तर अशा भ्रामक कल्पना सुचल्याच नसत्या. तुमचा अनुभव शून्य आहे हे केव्हाच सिद्ध झालंय आणि तरीही आपण या विषयात सर्वज्ञानी आहोत अशा गैरसमजातून तुम्ही त्याच जिलब्या वारंवार तळत आहात. >>> तेच तर म्हणतोयं, ग्रंथ आणि संत बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा! मी ही तेच म्हणतोय. माझा अनुभव तुम्हाला अजिबात समजणार नाही कारण तुमचा स्वतःला या विषयाची शून्य माहिती आहे. चित्रकलेतले ओ की ठो माहिती नसणार्‍याला व आयुष्यात कधीच चित्रे न काढलेल्याला चित्राचे रसग्रहण काय कप्पाळ कळणार! ते कळण्यासाठी निदान थोडीतरी चित्रकला माहिती हवी किंवा समजून घेण्याची उत्सुकता तरी हवी. चित्रकलेतली कणभरही माहिती नसताना वा अनुभव नसताना चित्रकला हे थोतांड आहे असे छातीठोकपणे सांगणारा जसा हास्यास्पद ठरतो, तसेच तुमचे झाले आहे. नामस्मरणाविषयी शून्य माहिती असायला हरकत नाही. परंतु माहिती करून घ्यायची किंवा अनुभव घ्यायची तुमची इच्छा नाही आणि अजिबात माहिती अथवा अनुभव नसताना नामस्मरणाविषयी स्वतःच्याच भ्रामक कल्पना हे अंतिम वैश्विक सत्य आहे या पोकळ आविर्भावात तुम्ही वावरत आहात. आधी अनुभव समजून घेण्यास पात्र व्हा आणि नंतर अनुभव सांगतो. >>> माझे प्रतिसाद कल्पनेच्या भरार्‍या असतील तर तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा आणि मग कशी मजा येते ते पाहा! तुमच्या भ्रामक कल्पनेच्या भरार्‍यांनी तुमचंच इथं हसं होतंय आणि इतरांना मजा येतेय. >>> तुम्ही फक्त तुमचा अनुभव सांगा (आणि खरंच हिंमत असेल तर नवा धागाच काढा). कोण भ्रमिष्ट आहे याचा निर्णय फक्त तीन किंवा चार प्रतिसादात होईल याची गॅरेंटी मी घेतो! परत तीच जिलबी! आधी अनुभव समजण्यास पात्र व्हा.

In reply to by श्रीगुरुजी

सगळी भंकस सोडून, तुम्ही फक्त तुमचा अनुभव लिहा! तुमची अवस्था आता हवाबाणांसारखी होत चालली आहे. काहीही अर्थ नसलेलं एकच दळण, पुन्हा पुन्हा दळतायं.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> सगळी भंकस सोडून, तुम्ही फक्त तुमचा अनुभव लिहा! तुमची अवस्था आता हवाबाणांसारखी होत चालली आहे. काहीही अर्थ नसलेलं एकच दळण, पुन्हा पुन्हा दळतायं. भंकस तुमचीच सुरवातीपासून चालली आहे. याच नव्हे तर इतर सर्व धाग्यांवर तुम्ही भंकस करता. वेळोवेळी इतरांनी तुमच्यावर कोरडे ओढलेले आहेत. तरीसुद्धा शून्य फरक आहे. तुम्ही एकच जिलबी वारंवार तळत आहात. तुमच्याकडे कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. म्हणून तर इतरांचा उल्लेख हवाबाण वगैरे करण्याची तुमच्यावर दुर्दैवी वेळ आलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. माझा अनुभव समजण्याची पात्रता सध्या तरी तुमच्याकडे नाही. ती पात्रता जेव्हा तुमच्याकडे येईल त्याक्षणी तुम्हाला अनुभव सांगेन. तुम्ही आपल्या बंदिस्त मनाची कवाडे उघडा, निदान किलकिली तरी करा. त्यानंतरच प्रकाश आत येऊ लागेल. स्वतः खोल, अंधार्‍या गुहेत दडून बसून मला इथे बसूनच प्रकाश दाखवा असा तुमचा मूढहट्ट सुरू आहे. प्रकाश पाहण्यासाठी आधी गुहेतून बाहेर या, म्हणजे आपोआप प्रकाश दिसेल.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिट चाचपलं की जसं रकमेबद्दल खात्री तसं नाम घेतलं की तत्त्वाबद्दल खात्री मानावी. अर्थात असं जोवर होत नाही तो वर नाम घेत रहावं. पुन्हा सांगतो, जगात वावरताना सातत्यानं नव्हे तर एक क्षण देखील शांतता शक्य नाही.
तत्त्व काय आहे याची न तुम्हाला माहिती, न तो प्रतिसाद देणार्‍याला. चाचपा पाकिट आणि करत राहा रुपकांचे निर्बुद्ध खेळ! ते म्हणतायंत `जगात वावरतांना सातत्यानं नव्हे तर एक क्षण देखील शांतता शक्य नाही'. आणि तुम्ही दाद देतायं. मस्त चालू आहे टाईमपास!

In reply to by संजय क्षीरसागर

>>> चाचपा पाकिट आणि करत राहा रुपकांचे निर्बुद्ध खेळ! आपल्या अल्प बुद्धीला जे जे कळत नाही ते ते निर्बुद्ध अशी साधी आणि सोपी व्याख्या आहे तुमची! तुमच्या दुर्दैवाने तुमच्या या अशा भ्रामक भूमिकेने तुमचं सगळ्या धाग्यांवर हसं होतंय.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या ज्या प्रतिसादावर, स्वतःचा अनुभव सांगणार्‍याला, काहीही प्रतिवाद करता आला नाही, तो तुम्ही उचलून धरला! आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला कळलं. इथे तुम्हाला स्वतःचं काहीही सांगता येत नाही. केवळ दुसर्‍याचं शेपूट धरुन चालतायं (आणि तो ही पांडुरंग, पांडुरंग करतोयं!). तिथे प्रतिसाद देणार्‍या विटेकरबुवांना निदान स्वतःची चूक तरी उमजलेली दिसते कारण त्यांनी, मी लेखकाला दिलेल्या प्रतिसादावर पुन्हा उपप्रतिसाद दिलायं. तुम्ही मात्र शेपूट धरुन, वाद जिंकल्याचा भ्रमात आहात.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> माझ्या ज्या प्रतिसादावर, स्वतःचा अनुभव सांगणार्‍याला, काहीही प्रतिवाद करता आला नाही, तो तुम्ही उचलून धरला! आणि तुम्हाला वाटतंय की तुम्हाला कळलं. जलेबीबाई, तुमचा भ्रमिष्टपणा ओळखून त्यांनी सूज्ञपणे प्रतिवाद करायचे टाळले कारण प्रतिवाद समजणे तुमच्या आकलनापलिकडचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. इथे तुम्हाला स्वतःचं काहीही सांगता येत नाही. केवळ दुसर्‍याचं शेपूट धरुन चालतायं (आणि तो ही पांडुरंग, पांडुरंग करतोयं!). तुमचा भ्रमिष्टपणा दूर झाला की मी सांगेन. आता सांगून काहीच उपयोग नाही, कारण तुमच्या सध्याच्या भ्रमिष्ट अवस्थेत ते तुम्हाला कळणारच नाही. मी कोणाचंच शेपूट धरलेलं नाही. उलट तुम्हीच स्वतःच शेपूट तोंडात धरून स्वतःभोवती गोलगोल फिरताय आणि त्याच त्याच जिलब्या पुन्हा पुन्हा पाडताय. >>> तिथे प्रतिसाद देणार्‍या विटेकरबुवांना निदान स्वतःची चूक तरी उमजलेली दिसते कारण त्यांनी, मी लेखकाला दिलेल्या प्रतिसादावर पुन्हा उपप्रतिसाद दिलायं. तुम्ही मात्र शेपूट धरुन, वाद जिंकल्याचा भ्रमात आहात. भ्रमिष्ट व्यक्तीच्या नादी लागल्याची चूक त्यांना उमजलेली दिसतेय. तुमचा पराभव केव्हाच झालाय कारण तुमच्याकडे एकही समर्पक मुद्दा नाही आणि जे आहे ते भ्रामक स्वप्नरंजन. आणि शून्य अनुभव असताना भ्रमिष्टासारखे एकच जिलबी वारंवार तळत आहात. असो.

In reply to by श्रीगुरुजी

वाद जिंकून काय मिळणार आहे गुरुजी? संक्षी सर, जिंकलात तुम्ही. नेहमीच जिंकता. ह्याप्पी? शांततेचं महत्त्व तासभर बडबड करुन सांगून वक्तृत्व स्पर्धा जिंकता येईल, शांतता नाही मिळायची. शांती तर नाहीच. 'शेवटचा प्रतिसाद माझा' कॅटेगरीतले लोक नेहमी दुसरेच असतात असं वाटून आपण प्रतिसाद देतो नि समोरचा प्रतिप्रतिसाद. शेवटी गोंधळच हाती लागायचा. शांततेतला 'श' सोडा वरचा अनुस्वार देखील पसार.

In reply to by प्यारे१

आणि तुमचं, आतली शांतता, बाहेरची शांतता, हळूहळू येणारी शांतता वगैरे काहीही चालू आहे. कसलीही रुपकं, (पगार काय आणि पाकिट काय!) जोडून तुम्ही तत्वाची भाषा करतायं! आणि त्याला तितकेच अज्ञानी माना डोलवतायंत! शांतता हेच तत्त्व आहे आणि जोपर्यंत मनाची सक्रियता आहे, तोपर्यंत ते लाभणं असंभव आहे. खरं तर, ते लाभलेलंच आहे हा उलगडा होणं अशक्य आहे, भले तुम्ही जन्मभर जप करत बसा! त्यात आता ही नवी भर! :
शांततेचं महत्त्व तासभर बडबड करुन सांगून वक्तृत्व स्पर्धा जिंकता येईल, शांतता नाही मिळायची. शांती तर नाहीच
शांतता आणि शांती यात पुन्हा फरक! एकतर काहीही कळलेलं नाही आणि वरती असले प्रतिसाद. आहो, शांतता आदिम आहे, भंकस नामस्मरण (मग ते कुणाचंही असो) करुन तिच्यात काही फरक पडत नाही. न नामस्मरण करणार्‍याला, न शांततेला. आणि शांतता हे आपण स्थितीला दिलेलं नांव आहे, तो निर्देश आहे. ती स्थितीच ईश्वर स्वरुप आहे त्यामुळे नाम-रुपानं अबाधित आहे. तुमचं आपलं पांडुरंग, पांडुरंग चालूये! काही कळावंस वाटत असेल तर मी लेखकाला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा. नाही तर चालू द्या तुमचं नामस्मरण!

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला कळत नाही हे किमान कळतं हो. काहींना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही. आणि कळत नाही हे कळत नाही हे कळवून घ्यायला सुद्धा कबूल नसतात आणि त्यामुळं कधीच कळत नाही. नुस्ता घोळ होतो. कळ्ळं? -५०० करुन सोडणारच ;)

In reply to by संजय क्षीरसागर

माझा एक नानापेठेतल्या शाळेचा विद्यार्थी आठवला. लहानपणापासूनच मोठा हुशार, शिकवतील ते लग्गेच आत्मसात करणारा. आता मी असंबद्ध शिकवते हे सर्वांना माहितीच आहे, त्यामुळे तोच असंबद्धपणा त्यानेही उचलला. वार्षिक परीक्षेत तीन तास झाले तरी पेपर लिहीतच होता, सुपरव्हायजरनं पेपर काढून घेतला तर त्याच्याशी वाद घालू लागला, वेळ हा भ्रमच असतो म्हणून. वर माझा हवाला देत होता. मग काय करणार, हेडसर आले, मला रागावले आणि माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

In reply to by बॅटमॅन

पोद्दार पावसकर मॅडम, नमस्कार. कशा आहात??? तो विद्यार्थी ज्या विषयाचा पेपर होता त्याचीच उत्तरं देत नव्हता ना? मग वेळ कसा पुरणार? आणि पेपर काढून घेतल्यावर वाद कशाला घालायचा ? बेन्च वर लिहायचं. लिहीणं महत्त्वाचं ना? असं केलं असतं तर बदली नसती झाली!

In reply to by संजय क्षीरसागर

नका कातावू इतके संक्षी. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर नामजपाने वेड लागण्याच्या अवस्थेला पोहचलेला भक्त इथे प्रतिसाद टंकायला येणार नाही. साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातः १. पुस्तकी पंडीत - यांची सारी माहिती "ईंटलेक्च्युअल" पातळीवरची असते. स्वतःचा अनुभव शुन्य असतो. कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे यांना इतरांना दाखवायचे असते. २. प्रामाणिक देवभोळे: यांना ग्रंथ पुराणांमध्ये लिहिलेलं, संतांनी लिहून ठेवलेलं सारंच्या सारं खरं वाटतं. काही बाबींमध्ये तथ्य असलं तरी काळाच्या कसोटीवर काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी लिहिलेली यातली बरीचशी माहिती निव्वळ टाकावू ठरते हे त्यांना झेपतच नाही. अर्थात अशा व्यक्तीही स्वानुभवापासून दूर असतात. त्यांची मजल "अमक्या संतांनी तमक्या ग्रंथांत असं असं लिहिलं" असं चारचौघात म्हणण्याईतपतच असते. खरंच असा काही अनुभव घ्यायची वेळ आली तर यांना नजरेसमोर घराचा किंवा गाडीचा हप्ता दिसू लागतो. जाता जाता, या दोन्ही प्रकारच्या अनुभवांमधून मी स्वतः गेलेलो आहे. ;)

In reply to by धन्या

अशी प्रामाणिक इच्छा आहे. जरा आजूबाजूला पाहाल तर लाखो-करोडो लोक या निर्बुद्ध प्रणालीत अडकलेत.
तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर नामजपाने वेड लागण्याच्या अवस्थेला पोहचलेला भक्त इथे प्रतिसाद टंकायला येणार नाही.
खरंय, पण ज्यांची बुद्धी शाबूत आहेत ते तरी वेडे होऊ नयेत यासाठी प्रतिसाद देतोयं.
साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातः
येस.
१. पुस्तकी पंडीत - यांची सारी माहिती "ईंटलेक्च्युअल" पातळीवरची असते. स्वतःचा अनुभव शुन्य असतो. कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे यांना इतरांना दाखवायचे असते.
सदरची पोस्ट नेमकी या कॅटेगरीतली आहे. लेखक स्वतः गप्प आहे *smile*
२. प्रामाणिक देवभोळे: यांना ग्रंथ पुराणांमध्ये लिहिलेलं, संतांनी लिहून ठेवलेलं सारंच्या सारं खरं वाटतं. काही बाबींमध्ये तथ्य असलं तरी काळाच्या कसोटीवर काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी लिहिलेली यातली बरीचशी माहिती निव्वळ टाकावू ठरते हे त्यांना झेपतच नाही. अर्थात अशा व्यक्तीही स्वानुभवापासून दूर असतात. त्यांची मजल "अमक्या संतांनी तमक्या ग्रंथांत असं असं लिहिलं" असं चारचौघात म्हणण्याईतपतच असते. खरंच असा काही अनुभव घ्यायची वेळ आली तर यांना नजरेसमोर घराचा किंवा गाडीचा हप्ता दिसू लागतो.
इथले बहुसंख्य सदस्य या कॅटेगरीत आहेत आणि त्यांच्यासाठी लिहीतोयं! I hope they can save time, get into some productive activity & make a better use of this Life, which is too short but absolutely Lovely!

In reply to by संजय क्षीरसागर

संजयजी नमस्कार, १. पुस्तकी पंडीत - यांची सारी माहिती "ईंटलेक्च्युअल" पातळीवरची असते. स्वतःचा अनुभव शुन्य असतो. कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे यांना इतरांना दाखवायचे असते. सदरची पोस्ट नेमकी या कॅटेगरीतली आहे. लेखक स्वतः गप्प आहे. योग्य वेळ येताच तुमच्या सर्व उत्तरे देईन कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे यांना इतरांना दाखवायचे असते.सदर वाक्यातील मी ज्ञानी आहे हे तर या धाग्यातुन दाखवायचा माझा मुळीच उद्देश नाही मी अतिशय कमी शिकलेला एक शेती करणारा शेतकरी आहे त्यामुळे माझी जागा मी ओळखू शकतो. वाद विवाद करण्यासाठी मि तुमच्या पासंगालाही पुरणार नाही. आणि माझी तशी इच्छा देखील नाही. किंवा माझे विचारही इतरां वर लादायचे नाहीत भक्तीमार्ग आणि त्यातिल अनूभव हा विषय फार वैयक्तिक आहे. त्यातील आलेले अनुभव कुठलाही साधक सार्वजनिक रित्या सांगणार नाही असे मला वाटते. कारण खरा साधक कधीच स्वताला बाबा, स्वामी, महाराज म्हनवून घेणार नाही.तो समाजाच्या निंदा, स्तुती याकडे दुर्लक्षच करीत असतो. असो, माझ्या कडुन काही चुकीचे लिहीले गेले असल्यास क्षमस्व आपण सर्व अतिशय ज्ञानी आहात उदार मनाने माफ करसाल अशी आशा बाळ्गतो. तरीही मी माझ्या विचारांशी एकनिष्ठ आहे. आणि महत्वाचे माझ्याकडे स्वताचे नेट किंवा संगणक नाही संधी मिळाली की मी मिपा वर बसत असतो त्यामुळे आपल्या प्रतिसादाला वेळेत उत्तर देता येत नाही

In reply to by अनिल तापकीर

तुमच्या प्रतिसादातला प्रामाणिकपणा स्पर्शून गेला. तुम्ही शेतकरी आहात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला याची पूर्वकल्पना असती तर मी या लेखावर कोणताही प्रतिसाद दिला नसता. किंबहुना तुमच्या या प्रतिसादामुळे, या पोस्टवर माझा हा शेवटचा प्रतिसाद असेल. अनीलजी, तुम्हाला (आणि सर्वांना) उपयोग व्हावा म्हणून अंतिम वस्तुस्थिती विषद करुन सांगता करतो. शांतता ही प्रथम आणि अंतिम आहे. शांती, ईश्वराच्या स्वरुपाचा एक महत्तम पैलू आहे कारण ईश्वर अनुच्चारणीय आहे. त्याचं व्यापकत्त्व कोणत्याही मंत्रात, शब्दात किंवा ध्वनीत बसू शकत नाही. त्यामुळेच तर जगातल्या सर्व ग्रंथांची सांगता, `ॐ शांती: शांती: शांती:' अशी केली जाते. मन हा ध्वनी आहे आणि तो शांत झाल्याशिवाय आपण, त्या चिरस्थायी आणि आदिम शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. थोडक्यात, वैश्विक शांती आणि आपलं मूळ स्वरुप एकच आहे, हा आपला अनुभव होऊ शकत नाही. तस्मात जगातला कोणताही मंत्र कुणालाही शांततेप्रत नेऊ शकत नाही. वास्तविकात मंत्र किंवा मनाची अविरत बडबड हाच स्वरुपाचा उलगडा होण्यातला एकमेव अडथळा आहे. त्यामुळे एकीकडे मन संपूर्ण सक्रिय करत (वैखारी, मध्यमा, पश्यंती), ते सर्वस्वी नियंत्रणा बाहेर गेल्यावर (परा), शांत्योपलब्धी असंभव आहे. It is impossible to get connected to oneself. One can never be at peace. खरं तर कोणताही शब्द उमटण्यापूर्वी शांतता आहे. त्यामुळे संस्कृत काय की जगतली कोणतीही भाषा काय केवळ व्यक्तींमधल्या संभाषणाची सोय आहे. तुम्हाला संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, फ्रेंच कळण्याची काहीही गरज नाही. सर्व संस्कृत आणि तथाकथित धार्मिक पांडित्य व्यर्थ आहे आणि कोणताही ग्रंथ समजण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला, तुमच्या आप्तांशी संवाद साधता येणारी भाषा, पुरेशी आहे. शांतता हा अनिर्मित मंत्र आहे आणि तो तुम्हाला जन्मतःच उपलब्ध आहे. या आकलनासाठी, शहरी धकाधकीच्या जीवनात, सारं आयुष्य पणाला लावून, जगातल्या सर्व साधनांचा अभ्यास मला करावा लागलायं. तुम्ही निसर्गाच्या निकट आहात त्यामुळे नशीबावान आहात. भाषा आणि पांडित्याविषयी तुमचा सर्व न्यूनगंड झुगारुन द्या. अत्यंत थोडक्यात, आदिम वैश्विक शांतता, मनाच्या बिंदूवर प्रस्थपित होणं ही सिद्धत्वाची स्थिती आहे. अशा व्यक्तीची मनावर संपूर्ण हुकूमत असते. अशी व्यक्ती हवं तेव्हा मनाचा उपयोग करु शकते आणि इतर वेळी त्या आदिम शांततेशी एकरुपतेचा आनंद घेते. शांतता हीच ईश्वर आहे आणि तिच्याशी समरुपता तुम्हाला शांत करते, इतका सोपा मथितार्थ आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

केवळ खास संक्षी प्रतिसाद ! नेहमी प्रमाने शष्प देखील कळले नाही ! जुने संक्षी या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा फॉर्मात आले याचा मात्र आम्हाला खूप खूप आनंद वाटला ! इतक्या महान आत्म्याशी आपण किमान मिपावर चर्चा करु शकतो या अभिमानाने आमची क्षीण छाती भरुन पावली ( आमची कुठली ५६ इण्च.. एवढी फुगवून देखील पोटाच्या पुढे नाहीच ! ) हे महान आत्म्या , आता फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर देऊन अज्ञ बालकांना उपकृत करावे ( तुम्ही झुगरुन द्या म्ह्टले तरी आमचा न्यूनगन्ड कुट्टे कुट्टे जात नाय बघा ) .. मन्त्र - जप करावा की करु नये ? केला नाही तर दुसरे काय करावे ? बा , संजया , जरा सविस्तर उत्तर देऊन अज्ञान मूलक जनतेचे प्रबोधन करावे ही नम्र विनंती . भाषा : जरा मराठीतच लिहा ... संक्षीय भाषा नको प्लीज .

In reply to by संजय क्षीरसागर

जरा.. आमच्या पातळीवर म्हणजे अगदी अतिनिम्न स्तरावर येऊन समाजावून सान्गण्याचा प्रयत्न कराल का ? एक विनंती आहे आमची ! अतिसामान्य शिष्याला विषय समजावून सांगण्यातच गुरुचे असामान्यत्व सामावलेले आहे .. आम्ही तुमचा गंडा बाम्धायला तयार आहोत !

In reply to by संजय क्षीरसागर

>>> धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे. जरा आजूबाजूला पाहाल तर लाखो-करोडो लोक या निर्बुद्ध प्रणालीत अडकलेत. तुमच्यासारखे काही मोजकेच बुद्धीमान या निर्बुद्ध प्रणालीत अडकले नाहीत हे या जंबुद्विपाचं भाग्यच आहे. >>> खरंय, पण ज्यांची बुद्धी शाबूत आहेत ते तरी वेडे होऊ नयेत यासाठी प्रतिसाद देतोयं. आपली बुद्धी शाबूत आहे असा तुमचा गोड गैरसमज दिसतोय. >>> इथले बहुसंख्य सदस्य या कॅटेगरीत आहेत आणि त्यांच्यासाठी लिहीतोयं! इथल्या बहुसंख्य निर्बुद्ध, देवभोळ्या, वेड लागण्याच्या पातळीला पोहोचलेल्या सभासदांची इतकी काळजी घेत आहात हे पाहून डोळे पाणावले. >>> I hope they can save time, get into some productive प्रॉडक्टीव्ह म्हणजे थोडक्यात दिवसभर तुमच्यासारखे लांबलचक प्रतिसाद टंकायचे.

In reply to by संजय क्षीरसागर

नामसाधना करताना यांत्रिकता नि सकामता हे संभाव्य धोके आधीच श्रीगुरु सांगतात. अमुक एक जप केला असता अथवा नाम घेतलं असता अमुक अमुक होईल हे सांगणं हे आमिष असतं सुरुवातीचं. नाम हेसुद्धा एक साधन आहे पण त्या साधनानं साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं. यांत्रिकतेच्या धोक्याबाबत कल्पना नसेल तर संक्षी म्हणतात तसं भ्रम वगैरे होण्याची शक्यता असते. कुणीसं भांग पिणं वगैरेचे उल्लेख केलेत. साधना मार्गाला आत्यंतिक काळिमा फासणारे हे प्रकार अजिबातच निषेधार्ह आहेत. तळमळीनं घेतलेलं नाम असो, शुद्ध बुद्धीनं केलेलं कर्म असो अथवा सारासारविचार असो तिन्ही मार्ग शेवटी आत्मप्रचितीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतात. ती येण्यासाठी श्रीगुरुच आवश्यक असतात. ज्ञानमार्गी माणसाची सुरुवात ही सोन्याचा चमचा हाती असलेल्या व्यक्तीसारखी जिला भांडवल उभारणीसाठी कमी खटपट करावी लागेल अथवा अजिबातच खटपट करावी लागणार नाही. मात्र म्हणून इतर व्यावसायिकांना अजिबातच धडपड, खटपट करावी लागणार नाही असं नाही ना? संक्षींचा अनुभव कदाचित फार उच्चतम पातळीवरचा मात्र तो मिळवण्यासाठी काहींना दुसरा मार्ग मिळाला असेल नि तो त्या मार्गानं जात असेल तर त्याला नकार का? सर्वज्ञ असल्याची भूमिका अनाकलनीय आणि टिंगलणीय ;) मात्र जरुर आहे. एकदाच 'खिक्क' करुन रजा घेतो.

In reply to by प्यारे१

नाम हे सुद्धा एक साधन आहे पण त्या साधनानं साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं.
ही प्रक्रिया नक्की काय आहे हाच तर, या चर्चेचा विषय आहे. संपूर्ण चर्चेत, न तुम्ही त्याबद्दल बोलतांय, न हवाबाण, न फ्री फुर्फुरुजी! थोडक्यात, तुमच्या दृष्टीनं `साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं' म्हणजे नक्की कुठे पोहोचता येतं? आणि `नाम हे सुद्धा एक साधन आहे' तर तुम्ही स्वतः त्याचा (संयतपणे वगैरे) कसा अवलंब करतायं?

In reply to by संजय क्षीरसागर

सगळ्यात आधी: नामसाधना ही एक साधना आहे. तो एक अनेक मार्गांमधला मार्ग आहे. रस्ता, रेल्वे, पायवाट, विमान आणि अनेक इतर मार्गांनी ध्येयापर्यंत जाता येत असेल तर कधी एकाचा, कधी सगळ्यांचा अवलंब करावा. माझा मार्ग हा आहे. तोच बरोबर नि तसाच बरोबर हा आग्रह असू नये. नामाच्या आलंबनानं पांगलेलं मन आधी एकाग्र करायचं नि ज्याचं नाम घेतो ते उपास्य म्हणजेच अंतिम ध्येय (आत्मतत्त्व) मानून /श्रद्धापूर्वक समजून हळूहळू 'अनुभव' घ्यायचा. ह्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणतात. त्रिपुटीचा लय म्हणतात(उपास्य, उपासना आणि उपासक), ध्याता, ध्यान आणि ध्येय हे वेगवेगळे राहत नाहीत. अर्थात ह्यामागं विचार हवा. नामाशिवाय सुद्धा अनुभव येतो. आत्यंतिक शांतीचा अनुभव येतो, भूतकाळाबाबत अकारण हुरहूर नि भविष्याबाबतची चिंता राहत नाही. मार्गांमधला फरक आहे. पण म्हणून कुणाला कमी अधिक समजून चालत नाही. नाम नुस्तं यांत्रिकपणं घेऊन उपयोग ज्या पद्धतीनं व्हायला हवा तसा होत नाही. पण नाम घेत राहील्यानं कधीतरी त्या नामाचा विचार होईल अशी अपेक्षा करता येते. भारतीय तत्त्वज्ञान नि त्यामागचा पाया ह्याबाबत अतिशय सकारात्मक आहे किंबहुना धीर देणारा अशा प्रकारचा आहे. अर्थातच त्याबाबत ' न जाणता कोटीवरि कर्मे केली परोपरि तरी मोक्षास अधिकारी होणार नाही' (समर्थ रामदास, पुन्हा दासबोध) हा विचार जास्त फलदायी कधीही असतोच. थोडक्यात नाम घेताना त्या नामामागचं तत्त्व स्वीकारुन नाम घेतलं असता अत्यंत फलदायी ठरतं हा विचार. जगात वावरताना सातत्यानं 'शांतता' हे शक्य नाही. बाहेरची शांतता एक वेळ मिळेलही मात्र अंतरंगाची शांतता जवळपास अशक्य. हे जाणून जे जे भव्य उत्कट आणि चांगलं त्याला ईश्वरी अवतार मानावा नि त्याला आकर्षणारा म्हणून कृष्ण, रमणीय असा राम अथवा अत्यंत पवित्र म्हणून शिव म्हणा. भव्यतेला विभु तत्त्वाला विष्णू म्हणा आणि त्यामागचा चांगलाच विचार सांभाळा नि वाईट टाकून द्या असं आपल्याला सांगता येतं. इथं दाशरथी रामच अपेक्षित असेल, यादव कुळातल एक राजाच असेल असंही नाही पण तो तसा घेतल्यानं श्रद्धावंतांची श्रद्धा वाढते. तो तसाच असणं जास्त श्रेयस्कर ठरतं. पाकीटातून पगार आणला असेल तर 'पाकीट जपून ठेव' म्हणताना पाकिटाबरोबर त्यातली रक्कम जशी जास्त महत्त्वाची तसं नाम महत्त्वाचं आणि त्यामागचं तत्त्व त्याहून जास्त महत्त्वाचं. पाकिटातला प्रेयसीचा फोटो जितकं आठवण करुन देईल तितकीच तत्त्वाची आठवण दैवताची मूर्ती मला करुन देणारी असते. पाकिट चाचपलं की जसं रकमेबद्दल खात्री तसं नाम घेतलं की तत्त्वाबद्दल खात्री मानावी. अर्थात असं जोवर होत नाही तो वर नाम घेत रहावं. पुन्हा सांगतो, जगात वावरताना सात त्यानं नव्हे तर एक क्षण देखील शांतता शक्य नाही. पण जर जगात वावरता वावरताच आपल्याला शांत राहता येण्याची ट्रीक मिळाली तर ती अधिक श्रेयस्कर ठरते. शेवटी जोवर जगतो आहोत तोवर जगाशी संबंध आहेच. रानात गेलात तरी जगाचेच घटक. त्यामुळं मी वेगळा असेन नि जग वेगळं असेल असं न करता नाम घेत रहावं. अनुभव शब्दातीत असतात. ते तसेच राहतील. सगळ्यांना चिरंतन असा अनुभव येवो हीच शुभकामना. इत्यलम!

In reply to by प्यारे१

"शांतता" म्हणजे "शांती" नव्हे. ध्वनी म्हणजे अशांती नव्हे. अ‍ॅट पिन ड्रॉप सायलेन्स प्रचंड अशांती असु शकते आणि रॉक बॅण्डच्या प्रचंड कोलाहलात अभंग शांती नांदु शकते. सायलेन्स आणि पीस यातला फरक कळणं महत्वाचं आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

अंतरंगातली शांतता म्हणताना 'शांती/ पीस' अपेक्षित होतं. उदाहरणादाखलः रॉक बॅण्डच्या कोलाहलात वाजवणारा किती छान वाजवतोय असं म्हणून त्याचं, त्या गुणाचं 'निर्मत्सर' कौतुक केल्यास (हे स्वतःशी प्रामाणिक राहून) वेगळी साधना करण्याची फारशी गरज न उरावी. तो एक प्रकारे दैवी संपदेचा गौरव करण्याचा भाग मानायला हरकत नाही. (उदाहरण संपलं) ;)

In reply to by प्यारे१

जगात वावरताना सातत्यानं 'शांतता' हे शक्य नाही. बाहेरची शांतता एक वेळ मिळेलही मात्र अंतरंगाची शांतता जवळपास अशक्य.
शांतता अविभाज्य आणि एकच आहे. `आतली आणि बाहेरची' असा भेद, शांततेत कदापिही नाही.
नामाच्या आलंबनानं पांगलेलं मन आधी एकाग्र करायचं नि ज्याचं नाम घेतो ते उपास्य म्हणजेच अंतिम ध्येय (आत्मतत्त्व) मानून /श्रद्धापूर्वक समजून हळूहळू 'अनुभव' घ्यायचा. ह्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणतात. त्रिपुटीचा लय म्हणतात(उपास्य, उपासना आणि उपासक), ध्याता, ध्यान आणि ध्येय हे वेगवेगळे राहत नाहीत.
हे निव्वळ वाचून ठोकलं आहे कारण; मी, तू आणि त्या दोहोमधला संबंध लयाला जाणं म्हणजेच शांतीची अनुभूती आहे. अखिल विश्वाची शांतता एकच आहे. आणि ती या जगात राहूनच प्राप्त होणं याला अध्यात्म म्हणतात. निवर्तल्यावर मिळणार्‍या शांतीचा उपयोग काय? थोडक्यात, तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या या वाक्याला :
नाम हे सुद्धा एक साधन आहे पण त्या साधनानं साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं.
काहीही अर्थ नाही कारण तुम्ही उगीच इकडचं तिकडचं वाचून प्रतिसाद ठोकला आहे. `साध्याचा शेवट' म्हणजे: आतली आणि बाहेरची शांतता एक आहे, होती आणि सतत असणार आहे; हा स्वतःचा अनुभव होणं.... पण तुम्हाला याची सुतराम कल्पना नाही, त्यामुळे सुरुवातीला लोच्या झाला आहे!
नामाशिवाय सुद्धा अनुभव येतो. आत्यंतिक शांतीचा अनुभव येतो, भूतकाळाबाबत अकारण हुरहूर नि भविष्याबाबतची चिंता राहत नाही. मार्गांमधला फरक आहे. पण म्हणून कुणाला कमी अधिक समजून चालत नाही.
नामाशिवाय अनुभव येतो हे तुम्ही, पुन्हा अनुभव नसतांना लिहीलंय! तुम्ही नामावर कायम राहा कारण, चर्चाविषय तो आहे.
माझा मार्ग हा आहे. तोच बरोबर नि तसाच बरोबर हा आग्रह असू नये.
तुम्ही फक्त तुमचा अनुभव लिहा. अर्थात, तुम्हाला काहीही अनुभव नाही ते वर उघड झालंय. तस्मात, दुराग्रह वगैरे टाईपचे बालिश प्रतिसाद देऊन, उगीच टिआरपी खेचायचा प्रयत्न करु नका. तुम्ही काय किंवा इतर कुणीही काय, निरुत्तर झाल्यावरची पळवाट म्हणूनचे असले प्रकार बंद करा.

In reply to by प्यारे१

सुण्दर प्रशांत , फारच सुरेख लिहिलयं . सगुणाचे आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे || आणखी लिहीण्यासारखे काहीही नाही ! @ संक्षी , तोडलस मित्रा , तुमच्यामुळे हे सगळे वाचायला मिळाले ,,,, धन्यवाद !

In reply to by विटेकर

सकळ करणे जगदीशाचे | आणि कवित्वचि काय मनुश्याचे| ऐशा अप्रमाण बोलण्याचे| काये घ्यावे|| :) पांडुरंग पांडुरंग. :)

In reply to by प्यारे१

प्रशांत, खूप सोप्या आणि सुंदर शब्दात नामस्मरणाचे महत्त्व सांगितलं. अर्थात मी म्हणतो तेच खरं आणि मीच सर्वज्ञ आणि बाकी सगळे अडाणी असे समजणार्‍यांच्या डोक्यात हे समजणं अशक्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> न तुम्हाला काही अनुभव, न लिहीण्याचं साहस जाउं द्या. वर प्रतिसाद दिला आहे. तुमचं म्हणणं अर्धसत्य आहे. मला अनुभव आहे व त्यामुळे "न तुम्हाला काही अनुभव" हे तुमचे अर्धे वाक्य असत्य आहे. परंतु तुमच्या वाक्याचा उर्वरीत भाग - "न लिहिण्याचे साहस", हा मात्र सत्य आहे. कारण तुमच्या सध्याच्या भ्रमिष्ट अवस्थेत माझे अनुभव तुम्हाला सांगण्याचे साहस माझ्यात नाही. आधी तुम्ही भ्रमिष्टपणातून दूर होऊन मन ताळ्यावर आणा आणि नंतर एक काय अनेक अनुभव सांगतो.

In reply to by धन्या

साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातः
यात एक कॅटॅगरी आणखी अ‍ॅड करता येईल... नाम(काया-वाचा-मनसा सच्चिदानंदाचा निर्देष) स्मरणाने(कृती-विचार-जाणिव सच्चिदानंदाशी समेवर येणे) जीवन कृतार्थ झालेले देखील नामजपाची भलावण करतात. (आनंदाचे डोही आनंद तरंग, विश्वाचे आर्त वगैरे मोठ्यांचे अनुभव बाजुला ठेवुन अगदी वैयक्तीक अनुभवाचे शब्द आहेत) असो. प्रस्तुत चर्चा त्याविषयी नाहि हे ठाऊक आहे. त्रिशतकीय काथ्याकुटात आपली एक पोचपावती असावी एव्हढ्या क्षुद्र उद्देशाने हा प्रतिसाद प्रपंच केला :)

In reply to by अर्धवटराव

जशी दृष्टी तशी सृष्टी या न्यायाने माझ्या निरिश्वरवादी विचारांमधून ही विचारधारा निसटली असली तरी अशा विचारसरणीचे लोक दुर्मिळ असले तरीही आहेत. या विचारसरणीचे लोक केवळ आपल्या अस्तित्वापोटी ईश्वराशी*/विराट शक्तीशी कृतज्ञ असतात. त्यांची त्या शक्तीकडे काही मागणं नसतं; काही अपेक्षा नसते. आयुष्य जे जे अंगावर फेकेल ते ते त्या शक्तीची ईच्छा म्हणून स्विकारलं जातं.
राधा** गौळण करीते मंथन | अविरत हरीचे मनात चिंतन ||
असा एकंदरीत मामला असतो. मात्र असे लोक विरळा. *(माझ्या दृष्टीने) ईश्वर ही संकल्पना. ** कवी जयदेव यांच्या गीतगोविंद या काव्यातील एक काल्पनिक पात्र.

In reply to by बाळ सप्रे

राधा तेरा जलवा,जीलेबीबाई,फेविकॉलसे हि असली गाणी एकदा प्रवासात जाताना आणि येताना ऐकली, भाड्याची गाडी असल्याने गाडीचालक त्याच्या आवडीची गाणी लावत असल्याने काही बोलता आले नाही.पण आल्यावर मी तीच गाणी नकळत गुणगुणू लागले. माझी सून माझ्याकडे ज्या नजरेने पाहत होती ती नजर मी विसरूच शकणार नाही.

In reply to by धन्या

देवगिरीला जाताना पण असंच एक गाणं आमच्या तोंडात बसलं होतं. ते सारखंच आम्ही बडबडत असल्याने आमचा एक सभ्य मित्र लै रागावला होता त्याची आठौण येऊन ड्वाळे पाणावले.

*biggrin* ह्याधाग्यावर बरेच दिवसांनी बर्‍याच खेळाडुंना मनसोक्त बॅटींग करण्याची संधी मिळाली हे पाहुन एक मिपाकर म्हणुन आनंद वाटला *i-m_so_happy*

In reply to by प्रसाद गोडबोले

मिसळ पाव हे संस्थळ फक्त अशाच धाग्यांसाठी उरलेले आहे चांगले साहित्य लिहिण्यास कोणाला सवड नाही.. हेच विषय सारखे सारखे चघळले जातात, कुठेतरी थांबायला हवं

In reply to by कवितानागेश

कुणी?????
तेच तर, अध्यात्म, आस्तिक, नास्तिक राहुन्द्या बाजूला.. स्वताचे इगो सांभाळता येत नाहीत साधे, तेवढ जमलं तरी खूप :)

हेहेहेहेहेहे!

मिसळपाव वर सदर विशाय्न्साठी एक वेगळा विभाग सुरु करायला हवा, मायबोलीच्या धर्तीवर , ज्याला इच्छा असेल तो त्या ग्रुप वर सामील होईल, आणि काय मळमळ ओकायची, काय तुंबलेले बोळे मोकळे करायचे ते करेल, निदान इतरांना तरी त्रास होणार नाही.. चायला दर चार दिवसांनी हेच हेच विषय, तेच तेच प्रतिसाद, तेच यशस्वी (न)कलाकार :)

In reply to by स्पा

@ ज्याला इच्छा असेल तो त्या ग्रुप वर सामील होईल, आणि काय मळमळ ओकायची, काय तुंबलेले बोळे मोकळे करायचे ते करेल>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif ++++++++१११११११११११ आता मी पां डुब्बा च्या गटात http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/smileys-shaking-hands-smiley-emoticon.jpg =))

अत्रुप्त आत्मा यांचा हा अति जबरदस्त प्रतिसाद, फार तिरका होऊ लागल्याने इथे पेष्टवत आहे. मूळ लिंकः http://misalpav.com/comment/597948#comment-597948 प्रतिसाद खालीलप्रमाणे. प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा. प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका. प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच) आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो! माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे. आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा... तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निरर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे. वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध. आता हे निरर्थक कसं होतं ते पहा... मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं? आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं? शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? Smile *@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा. ==================== प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

In reply to by प्रसाद गोडबोले

@प्रगो, तुम्ही ब्राम्हण-शुद्र असा भेदभाव (कोणत्याही स्वरुपात का होईना) इतक्या ठामपणे मांडताना पाहून आश्च्रर्य अन विषाद वाटला. @अ.आ. आणि बॅटमॅन - अतिशय उत्तम प्रतिसाद, आदर दुणावला.. *good* प्रगोंसारखे विचार मांडणारेच खरेतर ब्राम्ह्ण-ब्राम्हणेतर मांडणीला खतपाणी घालत असतात, या ना त्या मार्गाने.. हे थांबायला हवं. *stop*

In reply to by हाडक्या

आत्मुबुवा आणि बॅटमॅन यांचे प्रतिसाद आवडले. अगदी नेफळ्यांचेही या लेखातील काही प्रतिसाद विचार करायला लावण्यासारखे. मी http://www.misalpav.com/comment/597855#comment-597855 इथेही आणि यापूर्वीही खफवर जात्याधारित भेदभाव अथवा उच्चनीचसंकल्पना अजिबात समर्थनीय नाहीत असे म्हटले होते. प्रगोंची या धाग्यावरील मांडणी प्रतिगामी वाटली. कदाचित त्यात विडंबनाचा सूर असेल, पण तसे खरेच असेल तर जाणवले नाही. अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच शोधू. हाकानाका. :-)

In reply to by एस

हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच
पर्फेक्ट ! स्पॉट ऑन ! बुल्स आय ! मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो ... आपल्याला जे पटत्ट नाही ते करायचा अट्टहास हट्टाग्रह कशासाठी ... ते ज्याला जसे करायचे तसे ते करु दे ... आपण आपला वेगळा मार्ग निवडु ... "पण पटत नाही तेच करणार तेही आम्हाला वाट्टेल तसेच" हा असा अ‍ॅटीट्युड का आहे हे माहीत नाही :)

In reply to by एस

अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा!
जर चार लोकांनी चार ओळीचा एक मंत्र म्हटल्याने यांचा धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!

In reply to by बॅटमॅन

धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!
देअर यु आर ! मी हेच म्हणत होतो की ब्यॅटा ! बुदणारा धर्म बुडु दे की निवांतपणे त्याच्या ष्टाईल ने ... पण आम्हाला तोच हवा आहे आणि आम्ही तोच सुधारणा करुन तरंगवायचा प्रयत्न करणार हा अट्टहास का ? हेच तर विचारत होतो मी *pardon*

In reply to by प्रसाद गोडबोले

मुळात अमुक अमुक गोष्ट करण्याच्या इच्छेला अट्टाहास म्हणण्यामागचे लॉजिकच गंडलेले आहे तिथे बाकी बोलण्यात अर्थ काय? तुमची ती डिफॉल्ट पोझिशन, बाकीच्यांचा तो अट्टाहास हे समीकरण कुठवर ताणणार?

In reply to by बॅटमॅन

गायत्री मंत्रावर द्विजांची मक्तेदारी नाही. धर्मशास्त्रे जे सांगतात त्यातले सगळेच घ्यायचे नसते, तारतम्य ठेवावे लागते. पण तारतम्याला अट्टाहास आणि सिलेक्टिव्ह रीडिंग अशी लेबले लावली जात असतील तर इलाज नाही. पण सुदैवाने आज अशा पोझिशनवाल्यांची किरकिर एखाद्या कोपर्‍याबाहेर येत नाही ते बरेय.