अहो हो ना...
तीळपट्ट्या तर राहिल्याच पण 'गजक' पण राहिले लिहायचे. तसा माझा गोडाकडे जराकमीच कल. आणि काय काय लिहिणार हो... कितीही लिहिलं तरी कमीच आहे.
बिपिन.
लेख, अतिशय आवडला.
>>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.
-- क्या बात है!
लेख, अतिशय आवडला.
>>> जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.
-- क्या बात है!
बिपीन भाऊ मला एक शंका आहे. तुम्हे एवढ छान लिहिता तर आधीच का नाही सुरवात केली. :)
खाद्ययात्रा छान आहे.
तुम्ही लिहिलेला ओरखड्याने मन शहारल. खरच त्यावेळी मानसिकता कशी असेल जाळणार्याची?? :(
मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. :(
इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच>>>>>>>>>
अशा टपरीवर खाल्लेल्या पोह्यांची चव घरात केलेल्या पोह्यांपेक्षा किती तरी सरस का असते ह्याच उत्तर मला जुन देखील नाही मिळालेले.
अवांतर : एष्टी ष्टँडाजवळ अनेक टपर्या असतात. त्यातल्या कुठल्याही टपरीवर जावुन सकाळी सकाळी पोहे खाण्यात काय मजा असते राव. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
बिपीन भाऊ
अतिशय 'चविष्ट' लेख. तुम्ही पाहिलेलं त्या काळातलं इंदूर वाचून मजा आली. आता इंदूर खरोखरच बदललं आहे. ते इंदौर झालं आहे. इंदूरच्या खाद्ययात्रेबद्दल काय बोलायचं. (तो विषय बोलण्याचा नाही खायचा आहे:) माझ्या लेखाने तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला यातच लेख लिहिल्याचं समाधान. लेखाचं 'भरतवाक्य' तर खासच. बाकी त्यातल्या मनावर ओरखडा उमटवणार्या घटनांनी शहारा आणला. इंदूरमध्ये जातीय दंगलीचं प्रमाण अजूनही आहे. काही दिवसांपूर्वीच जोरदार दंगल झाली. त्यावेळी शहर पाच दिवस कर्फ्युने बंद होतं. बाहेर जाण्याचेही वांधे झाले होते.
बाकी इंदूरच्या खाद्ययात्रेवर लिहिलेला हा लेख कृपया जरूर पहा. काळ कितीही गेला तरी इंदूरची स्वादिष्ट ओळख आजही कायम आहे. याचा हा पुरावा:)
http://bhochak.mywebdunia.com/2008/09/24/1222237320000.html
अहो, मी शिकंजी नाही प्यायलो कधी. वर म्हणलं तसं गोडाकडे कल कमीच जरा. आणि राहूनच गेलं.
इंदौरला आभाळ भरून आलं की 'बद्दल पानी जैसे हो गये' म्हणतात. बोलीभाषेची सहजता, अतिशय श्रीमंत उपमाशब्द खूपच मस्त आहेत माळव्यातले.
आणि प्रकाशित करा वर टिचकी मारल्यावर ठ्ण ठ्ण गोपाळ..
बिपिनदा,
हा तुझा लेख म्हणजे आठवणींचं गाठोडं आहे. इतक्या सुंदर आठवणी, टोमॅटो स्वस्त.. मधुशाला, रबडी.. पोहे विथ शेव... खासच. हे पोहे विथ शेव.. हे तू म्हणतोस तस्म दूधीच्या थांब्यावर पहाटे पहाटे आम्हीही खाल्ल आहे हो. अफलातून इतकंच म्हणेन. आणि ती शेव... मीरे घातलेली आणि तिखटसर अशी मस्त लागते.
माझ्या जावेचे वडील... "कसे आहात काका?" असं विचारलं की, "एकदम बढीया" असं सांगतात. हा बढिया शब्द मी इंदौरमधे किती वेळा ऐकला त्याला काही मोजमाप नाही.
तुझा लेख खूप आवडला. लेखाचा शेवट मात्र उदास करून गेला रे. असं व्हायला नको होतं....
पुन्हा तुझ्या त्या बालमैत्रीणीबद्दल वाचूनही खूप वाईट वाटलं. असो...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खोबरागढ़चे बिपीनचंद्रराजे, लय भारी लिहिलं आहे, एकदम बढीया!
खरंच तुम्ही एवढे दिवस, आठवडे, महिने तुमची लेखणी, आपलं कीबोर्ड फक्त प्रतिसादांपुरताच मर्यादित का ठेवला होतात?
अगदी सहमत.. इतके दिवस कुठे होतात?? :-?
हल्ली मी नवे लेखन मधे फक्त नावं वाचते कुणी कुणी काय लिहीलंय... त्यात तुमचं नाव दिसलं की ते सगळ्यात आधी वाचायला घेते..
यावरून समजा काय ते! :)
बिपिनभाऊ,
मस्त लिहिलं आहे. मलाही इंदौरला नेहमी जावेसे वाटते. माझी वहिनी इंदौरची असल्याने तिच्याकडून वर्णन ऐकले आहे. कचोरी, पोहे व त्यावर शेव असं सगळं तिच्याकडून ऐकले आहे. इंदौरला जायचा योग अजून आला नाही.
मी हैदराबादला असताना, तिथेही भाजी घेतल्यावर कोथिंबीर व कढीपत्ता जास्तीचा द्यायचे. कढीपत्त्याचे झाड बर्याच लोकांच्या दारात असते तसे माझ्याकडेही होते (घरमालकांनी लावलेले). मला त्याचं इतकं अप्रुप होतं.
रेवती
इंदोरच्या खाद्य संस्कृतीचे वर्णन एकदम फक्कड आहे. लेख इतका खमंग खुसखुशीत रसरशीत चटकदार झालाय कि तो वाचला नाहि तर खाउन टाकला असे म्हणावे लागेल!
(इंदोरची चव चाखलेला) पांथस्थ...
बिपिनभौ, तोडलंत! एकदम झकास.
आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.
आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....
अहो शंकाच नको! हा लेख तुम्हाला स्फुरलेलाच आहे. आठवून वगैरे असं भन्नाट लिखाण होत नसतं. ते असं एकदमच येतं, दूध उतू गेल्यासारखं.
इंदौरची महती ऐकत आहे गेली कित्येक वर्ष पण आज मात्र ठरवून टाकले पुढच्या भारतभेटीत इंदौर नक्की!
चतुरंग
मानसिक यातना दिल्याबद्दल बिपिनभाऊंचा निषेध!
आमचे मूळ गांव देवास.
माझ्या बालपणची काही वर्षे उज्जैन मध्ये गेली.
इंदूर, धार, देवास, शाजापूर येथे नातेवाईक असल्या मुळे कधीमधी ह्या गावांनाही भेटी देत असू.
भल्या पहाटे उठून ढाब्या वरची गरमागरम जिलबी दुधात बुडवून खाणे ह्याचा आनंद काय वर्णावा!
एकंदर माळव्याची खाद्य संस्कृती हा एक संशोधनाचा विषय आहे.
त्या वरची चर्चा माळ्वी लोकही (खाता खाता ) करित असतात.
विविध चवींचे पदार्थ खाणे हया बाबत माळ्वी लोक
आताही माळव्यात गेलो की रोज विविध पदार्थांवर धाड टाकीत असतो.
बिपिनभाऊंचा लेख वाचून वाटले कि आता उठावे आणी इंदूरला जावे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
छान....वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....अहो, हा बैल रिकामा मूळचा इंदौरीच की हो भौ.....
आम्हाला इंदौर सोडून आता तिसावर वर्षं झाली....पण पुणं, मुंबई, दिल्ली वगैरेच्या मानानं अजुनहि इंदूर आणि इंदूरकर मस्तच आहे राव....म्हणजे ते म्याक्डोनाल्ड आणि पिझा हट वगैरे आलं, तरी खास इंदौरीपणा पण पदोपदी जाणवतोच....असो....
प्रतिक्रिया
खूप छान
सहमत
लिखते रहो....
वा भाई वा
अहो हो
लै भारी
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बिपीन भाऊ
अतिशय 'चविष्ट' लेख
शिकंजी
अहो, मी
सुरेख
लिखते रहेना
मस्त!
काल ३ वेळा प्रतिसाद लिहिला
मस्तच
अगदी सहमत..
अगदी असंच
लेखाची मांडणी अतीव सुंदर.
सफर घडवलीत.
झकास..
सुंदौर
मस्त..
इंदौर आवडले.
क्या बात है!!
बिपिनकाका,
जबरा !
बिपिनभाऊंचा निषेध!
तोडलंस मित्रा!!
अफलातुन वर्णन
इन्दौर इन्दूर
चित्रदर्श
छानच