भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?
लेखनविषय (Tags)
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो.
त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले. आम्ही गाडीतुन उतरुन जसजसे पहिल्या सुरक्षा कड्यापाशी जाण्यासाठी चालयला सुरवात केली तसतसे गर्दी वाढत चालल्याचे निदर्शनास आले. सर्व देशाभरातुन भारतीय पर्यटक नागरिक तिथे दु. ३.०० वाजल्या पासुन हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमा होत होते. संपुर्ण रस्त्यावर एकमेकांना धक्के देत जो तो पुढे जाण्याचा प्रयत्न करित होता.
या पहिल्या सुरक्षा कड्यापाशी महिलांना वेगेळे करुन त्यांची स्वतंत्र रांग केली व त्यांना अगोदर सोडले. त्यानंतर २ सुरक्षाकडे पार करुन माझा १० वर्षाचा मुलगा आणि मी मुख्य स्थळाजवळ पोहचलो. तर असे दिसुन आले की त्या स्टेडीयमसारख्या दिसणार्या जागेकडे जाणारे दोन्ही बाजुचे जिने गर्दीने फुलुन गेले होते. जिथे एका पायरीवर २ माणसे जेमेतेम उभी राहु शकत होती तिथे दाटीवाटीने ५ माणसे कशीबशी एकमेकांचा आधार घेत पुढे रेटा देत स्टेडीयमच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्या दोन जिन्यांच्या मधुन जो रस्ता जात होता तो एका ४ फुट उंचीच्या आडव्या लोखंडी खांबाने (पोल)बंद केला होता. याच रस्त्यावर ते ध्वज संचालन होणार होते पण त्या खांबाच्या पलिकडे. मग आता ज्यांना स्टेडीयमच्या आंत जागा मिळाली नाही ते सर्व आता खांबाला टेकुन गर्दी करत उभे राहिले. मी मुलाला घेवुन कशीबशी जागा काढत त्या आडव्या पोलला चिटकुन पहिल्या रांगेत उभा राहलो. त्या एवढ्याशा जागेत किमान १.५० लाख लोक जमा झाले होते. जसाजशी आमच्या मागे गर्दी वाढत होती तसतसा आम्ही पहिल्या रांगेतल्या सर्व लोकांचा त्या पोलवरचा दाब वाढत होता.
आता आम्ही मागे सुध्दा फिरु शकत नव्हतो.कसाबसा त्या पोलला दोन्ही हाताने रेटा देत मी मुलाला पोलच्या जाळीवर चिरडण्यापासुन वाचवु पहात होतो. पण रेटा जसा वाढला तसे मग त्याला उचलुन मी डाव्या हातावर घेतले आणि उजव्या हाताने गर्दीचा रेटा थोपविण्याचा व्यर्थ प्रयत्न करु लागलो. गर्दी मध्ये एकमेकांना खुप जोरात ढकलाढकली होत होती. पोलच्या पलिकडे काही जवान जमावाला शांत बसविण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते. पण त्यांचे कोणीच ऐकत नव्हते.
आम्ही पहिल्या रांगेतल्या सर्व लोकांनी आधारासाठी पोलला धरल्या मुळे तो मागे पुढे हेलकावे घेत होता. तो जर पुढे पडला तर आम्ही सर्व जण त्यावर पडुन आमच्या अंगावर मागे उभा असलेला १०००/१२०० लोकांचा जमाव कोसळणार की काय ही भिती वाटत होती. समोरील दृष्य असे होती की दोन्ही बाजुने उतरत्या क्रमाने असलेला स्टेडीयमही खुप भरुन गेला होता. खाली रस्त्यावर सुध्दा लहान मुले आणि बायकांना बसायला दिले होते.
समोरिल बाजुला अंदाजे ६०० मीटर अंतरावर पाकिस्तानचे गेट दिसत होते. उजवीकडील बाजुस सैनिकांसाठी एक हॉल बांधला होता. आणि तिथे एका डॉल्बी स्टिरियोवर " ये देश है वीर जवानोंका" पासुन ते आत्ताच्या बॉर्डर सिनेमा मधली सर्व गाणी अगदी कर्णकर्र्कश्य आवाजात(सु. १५० डेसिबल्सच्या पुढे) वाजत होती. ज्याने लहान मुले बिथरली होती. नंतर "ज्या कुणाला या देशभक्तीपर गाण्यावर नाचायचे आहे त्यांनी सहभागी व्हावे" असे सांगण्यात आले. तेव्हा परेडवाल्या रस्त्याच्या मध्यभागी सर्व बायका , मुली या नाचात सहभागी झाल्या.
सहभागी झालेल्या नाचणार्यांची हुल्लडबाजी, मुलांची रडारड, मोठ्याचे ओरडणे, याने गदारोळात आणखी वाढ झाली. त्यात तिथे होणारी माशांची होणारी भुणभुण, आणि घामाच्या धारांनी सर्वजण त्रस्त झाले होते.
आता त्यात भर म्हणजे नंतर येणार्या ज्या स्त्रियांना आणि लहान मुलांना बसायला जागा मिळाली नाही त्यांना नेमके पोलच्या पलिकडील बाजुस खाली मुख्य परेडच्या रस्त्यावर बसावयास सागिंतले. पण १० मीनटातंच त्या उठुन उभ्या राहिल्या. आणि आमच्यामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे एवढ्या मिनतवारी करुन कशीबशी टिकवलेली जागा असुन सुध्दा काहीही न बघता परत जावे लागणार असे दिसले. "खाली बसा: असा सर्वांनी एकच जल्लोष केला, गस्त घालणार्या जवानाला सांगुन पाहिले. पण ऐकतो कोण? कोण काय बोलतंय ही हे ऐकुच येत नव्हते. मुलाला घेवुन माझा हात तर अगदि भरुन येत होता. शेवटी एकदाचे ५.५५ झाले ती गाणी बंद झाली आणि संचालनाच्या एका संयोजाकाने माईक हातात घेतला.
त्याने आल्या आल्या सुमारे ५ मिनीटभर भाराताच्या वेगवेगळ्या जयघोषणांनी ती जागा दुमदुमन टाकली मग सांगितले की आता संचालन चालु होईल आणि जेव्हा जेव्हा ते समोरचे गेट उघडेल तेव्हा मी "भारत माता की... किंवा अश्याच काही घोषणा दिल्या की तुम्ही "जय" वगैरे म्हणुन साद द्यायची म्हणजे पलिकडे बसलेल्या पाकिस्तानी जमावाला ते ऐकु गेले पाहिजे.
त्या पुढिल संचालन म्हणजे आपले सैनिकांची एक एक तुकडी उजवीकडील हॉल मधुन बाहेर पडुन गेटकडे रवाना होत होती, त्यात महिला सैनिकही होत्या. मग जेव्हा ते गेटचे दरवाजे दोन्ही बाजुने उघडण्यात आले तेव्हा सैनिकांचे जरुरी पेक्षा मोठ्याने पाय आपटत (होय नेहमीच्या २६ जानेवारीच्या सैनिकांच्या संचलानापेक्षा पाय जास्त जोरात आपटत होते) एकमेकांना दातओठ खात बघत, एकमेकांना चिडवत आपापल्या झेंड्याला मानवंदना देण्याचे प्रकार झाले. तेव्हा त्या संयोजकाने माईक हातात घेवुन वेगवेगळ्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणांचा पुढिल भाग पुर्ण करण्यासाठी जमावाकडे पाहुन "अजुन मोठ्याने तिकडे ऐकु गेले पाहिजे " असे काहीसे हाताने खुणावु लागला कि इकडे जमावाने चेकाळुन त्याही पुढिल पायरी गाठली आणि "पाकिस्तान मुर्दाबाद..." वगैरे घोषणा देवु लागला.
मध्येच स्टेडीयमच्या वरिल भागाकडुन काही उपद्रवी बघ्यांकडुन पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा जिथे महिला मुली बसल्या होत्या तिकडे मारा झाला. सैनिक फक्त बघ्याचे काम करु शकत होते. सगळीकडे सावळा गोंधळ चालु होता.
६.२० मिनिटांनी जेव्हा सर्व संपलं तेव्हा सुध्दा आमच्या पहिल्या ओळीतल्या लोकांना आमच्या मागे उभ्या असलेल्या दिड हजार जमावाला भेदुन जाणे शक्य नव्हते. काही जण अजुन हातातला मोबाइल उंचावुन कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. मी मुलाचा हात घट्ट पकडून ज्या दिशेने गर्दी कमी त्या जिन्याच्या दिशेने कशीबशी वाट काढत जिकडे आमच्या गाड्या उभ्या केल्या होत्या त्या दिशेला निघालो.
माझ्या मनात विचार येतो कि
१)भारताला खरच या ध्वज संचालनाच्या प्रात्यक्षिकांची गरज आहे काय?
२)जी माणसे १० मिनिटांकरिता देशभक्तीपर गाण्यावर नाचतात (हुल्लडबाजी म्हणा) त्याने आपले देशप्रेम व्यक्त
होते का? किंवा तिथल्या सैनिकांचे मनोबल वाढते का?
३)जर त्या संयोजकाला जमावाचे पलिकडच्या पाकिस्तानी जमावाला ऐकु जायला पाहिजे असे वाटत होते तर
तो स्वःत माईकवर आमच्या बरोबर भारत माता की नंतर "जय " हे का म्हणत नव्हाता आणि असे अजुन
जोरात म्हणा असे खुणा करुन का सांगत होता. तो नक्की कोणाला घाबरत होता?
४)जर तिथे येणार्या पर्याटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर त्यांच्या सुरक्षेची कोणती हमी
(चेंगराचेंगरी, मुल हरविणे) पंजाब सरकार किवा भारत सरकार घेणार आहे?
५)भारताला पंजाब मधिल एक वाघा हे स्थळ सोडल्यास दुसर्या राज्यातील (राज्यस्थान, गुजरात, काश्मिर)
सीमा रेषेवरिल भागात असे संचालन का होत नाही? कारण तसे झाले म्हणजे एकाच ठिकाणी छोट्या जागेत
एवढा जमाव एकवटणार नाही.
५)पंजाब हा कार्यक्रम बंद होण्यास काही करेल असे वाटत नाही कारण येणार्या पर्यटकांच्यावतीने खुप चांगला
महसुल पंजाबला सरकारला मिळतो आहे. जसे कोणतेही खाद्य/पेय पदार्थ तिथे घेवुन जायचे नाही पण त्या/
स्टेडीयम मध्ये काही स्थानिक विक्रेते १४ रुपयांची बिस्लेरी बॉटल ६० रुपये किंमतीने विकत होते .
अमृतसरपासुन वाघा सीमारेषे पर्यंत जाण्या येणाच्या मार्गावर वाहनांच्या फेर्या वाढल्या आणि त्यांनी २.५०
कि.मी. अगोदर सोडल्यामुळे तिथुन पुढे पहिल्या सुरक्षाकड्यापर्यंत घेवुन जाणारे सायकल, रिक्षां आदी
स्थानिक वाहनांना मिळणारे वाढीव उत्त्पंन्न असा एकंदर मामला आहे.
पण सर्वांच्या मुळाशी प्रश्न असा की मुळात या दोन्ही बाजुंच्या माकडचेष्टांनी काय साध्य होते.
याला दोन्हीकडच्या सरकारने कशासाठी आणि कधीपासुन परवानगी दिली. जगात मला वाटते भारत आणि पाकिस्तान या दोन देशातच असा प्रकार चालत असावा.
प्रतिक्रिया
दोन्ही बाजुंच्या
"वाघा" समारंभ पाहिल्यानंतर
सांप्रतकालिन अनेक शासकीय,
तिथे पर्यटकांनी जाणे बंद करणे
हुम्म्म्म
माझाही हाच अनुभव!
गर्दीचे ठीकाण टाळणे
प्रत्येक पर्यटनस्थळी एक तरी
आभार.
भारतात अशा टाळता
गर्दीची ठीकाणे
याच चालीवर
माहितीबद्दल आभार .. गर्दी,
त मा शा
अहो हे कलियुग आहे. सगळे काहेी विकले जाते .
तुम्ही जावा की द्वापरयुगात,
त्यांना जिथे जायचे असेल तिथे
ते आम्ही दोघेही बघून घेऊ ना,
काय नाय
प्रमोदराव
सुबोध खरे - :- अगदी +१
विषयांतर
विषयांतर १-- मंदिरात सिगारेट
अवलक्षण
विषयांतर १: Whenever the
सूर्योदय/सूर्यास्त
अहो कंजुस साहेब अजुन अशी
+१००००
अरे बापरे!
खरं आहे .जाणारे लिहितात
उद्देश प्रेरणादायि, प्रात्यक्षिकरण अवाजवि
देशभक्ति एकत्र करून पूर्ण भारत-पाकिस्तान सीमेवर सारखि पेरावि.
धन्यवाद
प्रत्येकाचा वेगळा अनुभव.
माझा अनुभव मध्यम आहे. आम्ही