Skip to main content

घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी बुधवार, 18/06/2014 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++ ४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते. शरीर नि मन दोन्ही अशक्त, ना याचे लक्ष केंद्रित ( Concentrate ) होऊ शकत किंवा सुसंगत विचार करू शकत”” वर्गात शिक्षक शिकवीत असले तरी त्याचे लक्ष लागत नाही, वाचनाचा मनस्वी कंटाळा, डोकंच दुखू लागतं, डोक्यात गोंधळच फार,अभ्यासात लक्षच नसतं, पण इतर उठाठेवी फार. पालक थंड मिजाजीचा असेल तर काहीतरी करायला हवे म्हणून खटपटीला लागेल, सणकू असेल तर पाल्याच्या पाठीचं धिरडे होऊल. डॉ. क्लार्क यांनी वारंवार नापास होणा-या पदवीधराला दिले; व तो विध्यार्थी पदवीधर झाला, प्रत्येक परीक्षेच्या वेळी तो विध्यार्थी डॉ. क्लार्क यांचे कडून औषध घेवून जाई. ५ ) Argentnum Nitricum ------ नावाचे दुसरे एक औषध आहे, त्या बद्धल म्हटलं आहे “” Does Foolish Things” त्यांच्या मस्तकात फार मोठा गडबड – घोटाळा झालेला असतो, समर्पक नि तर्कबुद्धीला धरून त्याचे विचार चाललेले नसतात, स्वतःला विचार करणं जमत नाही, फारकाय मन म्हणजे “what is maind,? its nathing but Bunch of Tho-ughtes “ असो, तर त्यात तर्क विसंगतीच जास्त असते, मनाचा कमकुवत, कितीही समजावलं, वाचलं, ऐकलं तरी त्यांच्या बुद्धीवर उमटत नाही, त्याचा कसलाही परिणाम होत नाही. बोलताना त्याला योग्य शब्द आठवत नाहीत त्यामुळे भांबावलेला, त्याला जेकाही वाटत असत ते बोलून दाखवणेही जमत नाही. धंदेवाईक रुग्ण असला तर त्याला धंद्यानिमित्त भेटण्याचे झालं तर दिव्य वाटत, भेटण्याची वेळ साधायची हीबाब सुद्धा भयभीत करते, माझ्या पाह्ण्यात असे आसामी आले आहे की अगदी बाहेर निघण्यावेळी सगळा जामानिमा उतरून शौचगृह गाठावं लागतं. शंकाच जास्त, विध्यार्थ्याबाबतीत असंच घडतं, यशाची खात्री नसते, आत्मविश्वासच नव्हे तर कसलीच महत्वाकांक्षा उरत नाही, हेटाळणी होण्याची खंत वाटते, त्याचा परिणाम दुस-याना फसविण्याच्या प्रवृत्तीत होतो, त्यात आपलीच फसगत आहे हे समजण्यापलीकडे ही वृत्ती गेलेली आढळते. आतून अभ्यासाच्या नावे शून्य, पण बाहेर मात्र फुशारक्या हवेत इमले बांधण्या सारख्या. ६ ) काली फॉसची आणखी मानसिक लक्षणे आपल्या संसारी जीवनात पदोपदी जाणवणारी, अल्पशा मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम, मामुली कामं ओझं वाटू लागतं, बोलताना लिहताना शब्द गाळतो किंवा सामगायचं असत एक पण बरळून जातो भलतंच परिणामी प्रमाद घडतात, नुकसानीचा भयगंड झोप लागत नाही, पैशाबध्दल अकारण भीती हेही एक कल्के फ्लुओर सारखे लक्षणं या क्षाराच आहे, या व्यवहारातील वागण्याच्या प्रमादामुळे सगेसोयरे, नातेवाईक, जोडलेली माणसं दुरावत आहेत, एकाकी पडल्याची भावना त्यामुळे भवितव्याची चिंता, त्यामुळे येणारा स्वभावातील चिरचीरेपणा, तापटपणा वाढीस लागतो झोप स्वस्थ न लागल्याने ( काली फॉस ३०—फेरम फॉस ३० किंवा २०० ) हा सकाळी उठतो तोच करवादलेला, कांहीही मनास भावत नाही, डोकं चढलेल स्त्रीयांच्या बाबतीत हे खूपच त्रासदायक असतं, अनेक कारणानी आलेला थकवा, चिडकी मनस्थिती, उघड बोलताही येत नाही, कामाचा रेटा सांभाळावा लागतो, त्यामुळे कुणाशी बोलणं नको की कुणी बोलायला आलेले चालत नाही, नको नकोसं वाटतं, मन एवढे हळूवार होतं की मुक्तपणे रडावंसं वाटतं, दुखीः जीवनात सुख-समाधान आनंदापेक्षा वैफल्यच जास्त आहे अशी भावना जोर धरते, नको जीव असं अंतरी वाटत पण धीर होत नाही, आपली कहाणी सांगताना घळाघळा अश्रू गाळते, वर्णन कधी राई पर्वता सारखं करून सांगते, संशयी वृत्ती याचा परिपाक भूतोन्माद ( HYSTERIA ) होण्यात होतो, अशी अवस्था कुण्या घरात थोडयाफार फरकाने असेल तर वेळीच आपल्या वृध्द मातेची आणि गृहिणीची काळजी घ्या, तिच्या भावनांची कदर करा सन्मान द्या तसं न केल तर विचार करा. साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो. मला एखाद्याला एखाद्या विषयावर बोलण्याचा अधिकार तेंव्हाच असतो जेंव्हा त्याचा त्या संबंधी अभ्यास नव्हे तर व्यासंग असेल तेंव्हा, काहीतरी ऐकून आपलं मत बनवणं हया औषधीच्या लक्षणात बसत नाही. आपल्या भारतभूमीत कणाद नावाचे मुनिवर्य होऊन गेले, त्यांनी पदार्थांच्या अणु विच्छेदना संबंधी सांगताना असं सांगितलं आहे की अणु विच्छेदनातून अंतिम छेदनातून अनर्थ ओढवेल, प्लेटीनम किंवा अन्य धातूच्या विभाजनातून अणु बॉम्ब सारखं विध्वंसक अस्त्र आपण वाचतोच, फारकाय थोड्याफार फरकाने रोजच्या भोजनात आपण जे अन्नाचं चर्वण करतो ते त्या पदार्थांच अण्विकरणच करत असतो, तेव्हा ते पचते, अण्विकरणाने पदार्थाची ताकद वाढते, आणि ते लिलया रसधातूत विलीन होते, जेवढे ते सूक्ष्म तेवढे पचन सुलभ होते, काली फॉसची खासियत हीच की त्याला एक शहाणा व्यासंगी भावतो किंवा ठारवेडा कारण त्या वेड्यावर उपचार करून सुधारता येतं पण मधले जे त्रिशंकु असतात त्यांची अवस्था केविलवाणी असते, “Empty Vessel Makes Noise” तसं, ते धड ना इसपार ना उसपार, शहाणा जो ज्याला समजतं पण समजल्याचा आव आणत नाही, समजून नव्हे उमजून घेतो, हाच ह्या औषधाचा स्थायी भाव आहे, अशा महान असामीना ख-या अर्थाने सुजाण बनवणं. प्रज्ञा - विशेष ज्ञान, प्रतिभा – विशेष आभा – ओज, तेज या ईश्वरदत्त किंवा जन्मजात देन असलेल्या, ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य हे सर्व आगोम आहे. दुसरी कडून सशक्त विचारधन, चांगले वाईट याचा चिंतन मनन करून ते पचनीय मधुकण आपल्या विचारांची भर घालून सोप्प करून सांगण्यात आपल्याला त्यात आपले विचार धालावेच लागतात, पण हे सारं ते समजून घेणा-यासाठी वायफळासाठी खास नव्हे, याशिवाय काली फॉसचे इतर औषधी गुण आहेतच पण मानसिकतेवर, बुद्धीमांद्यावर, मेंदू, ग्रे मेंटर, संवेदक मज्जातंतू, ज्ञानतंतू, कर्मतंतू,--( नाड्या ) आपल्या ऐच्छिक, – इच्छेनुरूप चालना-या, अनैच्छिक स्वयंसंवेद्य क्रिया, जसं श्वसन, र्हुदयाचं पंपिंग, अन्नपचन, पतंजली – पापण्यांची उघडझाप, या आणि अशाच सुप्त प्रक्रियां घडवून आणणा-या शरीरस्थ संगणकाला सुव्यवस्थित ठेवणारा हा बहुमोली क्षार. इति आलम !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21143
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by गवि

ही सगळी होमिओपॅथीची थिअरी इतकी किचकट असल्याने औषधनिर्माते चक्क मूळ औषध देत असावेत .. म्हणूनच काही ठीकाणी गुण येत असावा.. जिथे औषधापेक्षा अल्कोहोल स्वस्त असेल तिथे फक्त अल्कोहोल दिल्याने गुण येत नसावा.. अशी माझी श्रद्धा आहे :-)

In reply to by गवि

१ लीटरसाठी १९७ लीटर हे थोडं चुकीचं गणित वाटतं. १०० पट डायल्यूशन करायचं असेल तर दर वेळी शंभर मिलिलीटर वापरून त्यातला एक मिलिलीटर काढला तर 'फुकट' जाणारं अल्कोहोल १९.७ लीटर व्हावं. शेवटून दुसऱ्या टप्प्याला जे शंभर मिलिलीटर येतात, त्यापासून दहा लीटर द्राव तयार होऊ शकतो. त्यामुळे एका लीटरसाठी दोन लीटर फुकट घालवणं, असा हिशोब होतो. आणि त्यासाठी प्रचंड जागा, खर्च वगैरे येत नाही. बरं, या एका लीटरमध्ये अक्षरशः लाखो गोळ्या बुडवून ठेवता येतात. आणि त्या गोळ्या दिवसाला अमुक इतक्या दिल्या जातात.

In reply to by राजेश घासकडवी

डायरेक्ट डायल्यूशन चालत नाही ना. प्रत्येक स्टेप वेगळी होणे आवश्यक असते. नपेक्षा थेट कॅल्क्युलेशन करुन एकदाच द्रावण करता आले असते.

In reply to by गवि

डायरेक्ट डायल्युशन म्हणत नाहीये. फक्त दर वेळी शतांशाचं डायल्युशन करण्यासाठी एक लीटरमध्ये दहा मिली घालण्याऐवजी शंभर मिलीमध्ये एक मिली घातलं तर दहापट कमी वेस्ट होईल. शेवटचे शंभर मिली दहा लिटरमध्ये घालायचे.

In reply to by चित्रगुप्त

अल्कोहोल कधीच निरुपयोगी होत नसतं! ;) असो, बाकी चर्चेत (वाचनमात्र) सहभागी आहेच!

हे कोण डॉक्टर आहेत? एकाही तर्कशुद्ध प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले दिसले नाही. मंडळी, उगाच वेळ नी टंकन करून उर्जा का दवडताय?

एकुणच काय तर होमिऑपॅथी डॉक्टरांचा अ‍ॅटीट्युड हा ज्योतिषविशारदांसारखाच आहे असे परत एकदा जाणवले आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि होमिपदीसमर्थकांचा अ‍ॅटिट्यूड ज्योतिषसमर्थकांसारखाच =))

जगद्विख्यात जादूगार आनि स्केप्टीक (मराठी शब्द ???) जेम्स रँडी यांनी होमिओपाथी संदर्भात एक मिलियन डॉलरचे आव्हान दिले आहे.
In his message, Randi issued a one-million-dollar challenge to the manufacturers of homeopathic products to prove their claims, and challenged major drug retailers like CVS, Rite-Aid, and Walgreens to stop tricking consumers into paying real money for fake medicine.

गवि यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. अगदी सुरुवातीला समजा एक थेंब (म्हणजे किती मि.ली. असावे?) मूळ अर्क आणी नव्याण्णो थेंब अल्कोहोल अशी सुरुवात केली, तरी ३० वा २०० पोटन्सी पर्यंत हजारो लीटर निरुपयोगी अल्कोहोल (खरेतर होमियोपाथी औषध) शिल्लक राहील. त्याचे काय करतात? मला तेंव्हाही प्रश्न पडायचा, की फक्त ३०, २०० आणि १००० पोटन्सीच का वापरतात? २७, ४२, १३८ वगैरे का नाही? हे कश्यावरून ठरवले जाते ? धागाकर्त्याने या सर्व गोष्टींवर प्रकाश पाडावा. बाकी अमूक औषधाचा अमूक उपयोग वगैरे मटेरिया मेडिका वा अन्य लहान पुस्तकात दिलेले असतेच.

In reply to by चित्रगुप्त

मागणी तितकी तगडी असेल, तर शिल्लक रहायला नको. भारतातलं दरसाल अल्कोहोलचं मेडिकल कंझम्प्शन किती लिटर होतं हे कळलं, तर या पोटेन्स्या खर्‍या असतात की दुकानदार टोप्या लावतात हे कळेल.

सदर लेखमालेत असलेले वर्णन वाचून ही बारा क्षार वापरुन केली जाणारी योजना आहे असे वाटले. (मला वाटते हा होमिओपथीचा एक व्हेरियंट आहे.) धागाकर्त्याच्या लिखाणावरुन हे क्षार ब-यापैकी क्वांटिटीत दिले जातात असे वाटून त्या भागापुरते शंकासमाधान झाले. माझा पहिला प्रतिसाद हेच व्यक्त करणारा होता ( वा वा. औषध पोटात जातेय.. पण मग ही ही होमिओपथीच ना ?) ,,, पण त्यातही विरलीकरण आहेच हे रा.घा. यानी tithechस्पष्ट केल्याने पुढील रास्त शंका आल्या.

उर्फ MRI वाले डॉक्टर, पदार्पणानंतर फिरकलेच नाहीत. आणि आता हे दुसरे व्यासंगी, स्वच्छंद मकरंद! पीच सोडून भलतीकडेच बॅटींग करतायंत.

In reply to by संजय क्षीरसागर

मी असं कोठेतरी वाचलं होतं की केजरीवाल हे अ‍ॅलोपॅथी पेक्षा होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार, निसर्गोपचार इ. वर जास्त भर देतात. तुम्हाला याची कल्पना आहे का?