मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंगाघाट ते रा. भवन (मार्गे राजघाट)

पगला गजोधर · · काथ्याकूट
महात्मा गांधीजींची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली, तेंव्हा राजघाट हे स्मृतीस्थळ उभारले गेले, अनेक वर्षे सरली तरीही आजतागायत (दि. २७ मे २०१४), जेव्हा कधीही नव प्रधान /मुख्य मंत्री कार्यभार स्वीकारण्या आधी , वा विदेशी पाहुणे भेटीवर आले असता, राजघाटावर येवून आदराने नतमस्तक होतातच, अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ? म्या पगाल्याच्यामते, कदाचित 'जीवनामध्ये सत्याला प्रमाण मानने', या त्यांच्या विचारसरणीत आहे का ? व पुढील अनेक वर्षे त्यांचे जीवन त्यांनी ऐक सत्याचा प्रयोग म्हणून व्यतीत करण्यामध्ये आहे का ? जीवनाच्या अंतापर्यंत, आपले विचार व कृती, सत्याच्या कसोटीवर घासून, जगण्याच्या त्यांच्या शैलीला आहे का ? असे अनेक प्रश्न येतीलच, मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ?

वाचने 21273 वाचनखूण प्रतिक्रिया 43

In reply to by जेपी

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:32
सध्याचे भारताचे परम राष्ट्रभक्त, मझदूर नं १, कि जे ३०-३५ वर्षे प्रचारक असून सुद्धा इथे येवून ज्याचा स्मृतीस्थलाठिकाणी नतमस्तक होतात, त्या गांधीबाबाच्या तुमच्या कहाण्या सांगताना, वरील फोटू ध्यानामध्ये ठेवून, जरूर सांगाव्यात.

विकास Tue, 05/27/2014 - 19:32
आज पंतप्रधान मोदींनी पंडीत नेहरूंच्या ५०व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी "I pay my tributes to our 1st Prime Minister Pandit Jawaharlal Nehru on his Punya Tithi." असे व्टिट केले! द्या टाळी!

In reply to by विकास

मुक्त विहारि Tue, 05/27/2014 - 19:44
गांधींनंतर लगेच नेहरू. (गांधी म्हटले की नेहरू येतातच.... धरम-वीर, जय-वीरू सारखीच ह्यांची जोडी ज्याम फेमस आहे.)

In reply to by मुक्त विहारि

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:45
व्हय व्हय तशी, जादुगार आणि मेणाचे लोहपुरूष (लोहपुरूष नं २), अशी जोडी पण फ़ेमस व्हती, पण लोहपुरूष गंजला, सारखा रुसूबाई म्हणून कोपर्यात जाऊ लागल्यावर, जादुगाराने त्याला स्क्र्याप मध्ये काढले हो, (थोडे पैसे सुटतात, घरातलं गचपण पण कमी होत, हा त्यामागचा जादुगाराचा उद्दात्त हेतू ), सध्या त्यांचे जोडीदार बदला फेम अमित आहे.

In reply to by विकास

प्रदीप Tue, 05/27/2014 - 19:44
इथे टवाळांना नको. ती कुमार केतकरांना द्या. तशी ती देतांना टी. व्हीवाले हजर असले (तसे ते असणारच) व त्यांच्या नाकाखाली माईक असला (तोही तसा असणारच), तर मग पुढील rambling ऐकायला मात्र तिथे थांबू नका.

In reply to by प्रदीप

विकास Tue, 05/27/2014 - 19:58
मला वाटते कुमार केतकर सध्या, "असे राम ते धाम सोडूनी द्यावे" असे म्हणत असावेत. :)

In reply to by lakhu risbud

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 14:57
लखुभाऊ, सं क्षि सरांचं त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो ! का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ?

In reply to by पगला गजोधर

lakhu risbud Wed, 05/28/2014 - 17:21
त्या वाक्या बरोबरचं, त्यांचे इतर विचारांना सुद्धा तुमचा निर्विवाद पाठींबा आहे, असे मी मानतो हा निष्कर्ष आपण कशावरून काढलात ? का फक्त त्याचं वाक्य, आपल्याला सुटेबल तेंव्हा, रुचेल तसं , आउट ऑफ context वापरत आहात ? या वाक्याचा त्यांनी कॉपीराईट घेतला आहे हे माहित नव्हते. By the way "हे" वाक्य तुम्हाला एवढे झोम्बायचे कारण काय ? …………………………… ही सही बऱ्याच आधीपासून आहे.

आत्मशून्य Tue, 05/27/2014 - 23:26
अश्या ह्या सध्या-सुध्या माणसामध्ये, असं काय महान होत ? त्यांच्या हत्येच्या इतक्या वर्षानंतरही एवढा प्रभाव कसा काय दिसून येतो बुआ ?
कंपुबाजी हो. आणखी काय ;)

In reply to by आत्मशून्य

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 09:36
आणि त्या सो कॉल्ड कंपूबाजी च्या चरणी ३०-३५ वर्षे नत्थूप्रचारक असलेले नतमस्तक होतात, हि खरंच ड्वोळे वलं करणारी गोष्ठ व्हय !

In reply to by पगला गजोधर

"दहावा माणूस" बनून ट्यार्पी गोळा करायचा हिरीरीचा प्रयत्न छान आहे (सावधगिरीचा इशारा: अती झाला की हा प्रकार केविलवाणा दिसू लागतो) ! मस्त मनोरंजन होत आहे. लगे रहो =))

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 09:58
भारतात काही चलनी नाणी राजकीय लोकानी निर्माण केलेली आहेत. ती काही प्रमाणात श्रेष्टही आहेत. चलनी नाणी म्हणून फार उपयुक्त ही आहेत. गांधी हे भारताचे डॉलर आहेत. या एका डॉलर बरोबर बाकी काही येन युरो ,पेसो ही इथे आहेत. अर्थात १९३१ पासून जगात ज्याप्रमाणे डॉलर हे भरवशाचे नाणे आहे तसेच अजून तरी गांधीजी भरवशाचे नाणे आहे.सत्तेच्या मार्गावर किंवा सत्ता टिकविण्यासाठी उद्या नथूराम जरी सत्तेवर आला तरी त्याला हे नाणे वापरावे लागेल. म्हणून तर त्याने गांधीजीना नमस्कार केला नसेल ना ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 12:14
याचा अर्थ, आज नत्थू-पेसो ला काडीचीही किंमत उरली नाही व ते अगदी सोमलिअन कंरसी सारखे झाले आहे (बा द वे , कोणी पहिली आहे का सोमलिअन कंरसी चलनात ? )

दाखल्या देवा दंडवत असा काहीसा प्रकार आहे , आणि मोदींना स्वतःची इमेज आता १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान अशी करायची आहे त्यामुळे जाणीवपूर्वक व नियोजनबध्द त्यांच्याकडून अशी कृती घडत आहे. राजकारण हे राजकारणासारखे करावे. हेच खरे

In reply to by निनाद मुक्काम …

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 13:57
'देखल्या देवा' म्हणजेच त्यांनी गांधीबाबाला देव मानलं तर, म्हणूनच दंडवत घातला असेल. १२५ कोटी जनतेचा पंतप्रधान म्हणजेच १२५ कोटी लोकांची (acceptability) मान्यता मिळू शकेल अशी विचारसरणी गांधीबाबाची होती, आणि १२५ कोटी लोकांना बरोबर घेऊन राज्यकारभार चालवायचा असेल तर गांधीजींच्या स्टायल ने जावे लागेल, ऐरेगैरे नत्थूखैरे स्टायल ने नाही, हे त्यांनी चाणाक्षपणे पहिल्यादिवशीच जाणले …. असेच म्हणायला हवे… नाही का !

In reply to by पगला गजोधर

प्यारे१ Wed, 05/28/2014 - 14:07
___/\___ आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशीच प्रणाम करुन कामाला लागलो तर काय म्हणाल???????? काही 'देणी' असतात ती द्यावी लागतात! बाकी थिअरी मानायची तर गांधीजींना नमन करणारे सगळेच 'महात्मा गांधी रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर लई वेळा 'मोठे व्हा!' दहाव्या माणसाची 'आणखी एक' गोष्ट आहे. बहुतेक 'को दशम' म्हणून. (बॅट्या सांग रे!) ती वाचली तर ह्या गोष्टी करायची वेळ यायची नाही.

In reply to by प्यारे१

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:18
बाकी आणखी थिअरी सांगायची तर सरदार पटेलांचा भव्यदिव्य पुतुळा उभारून नमन करणारे सगळेच 'सरदार पटेल रोड' वर चालतात असं म्हणायचंय काय? तसं असेल तर खुप्प खुप्प 'मोठे व्हा!'

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 15:02
प्रशांतभाऊ, सहमत, तुमचा तर्क आणखी पुढे चालवला तर, त्याचबरोबर मग, शिवाजीमहाराज, सावरकर, विवेकानंद यांचा नावाचा, फोटोचा स्वार्थासाठी वापर करणारे सुद्धा काही, त्यांच्या विचारांना मानून कामकाज करतीलच असे काही नहि.

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 15:55
बरोबर ! अगदी बरोबर ! मोठ्या नेत्यांचे फोटो लावलेले असतात व खाली तारीख पे तारीख चा खेळ चाललेला असतो. गणपतीच्या मिरवणुकीत 'देशी 'लावून ढोल लेझीमीचा खेळ चालतो. प्रजेत जर हे आहे तर राजात का नाही येणार ?

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 16:23
चौकटराजे, सहमत, बाकी तुम्ही नमूद केलेली ग्राउंड रियालिटी, येत्या ५ वर्षात, जादूची कांडी फिरवून नष्ट होईल, अशी ऐक भाबडी आशा असेल न प्रजेला ….

In reply to by पगला गजोधर

चौकटराजा Wed, 05/28/2014 - 16:32
महागाई कमी करणे व ३७० कलम या दोन गोष्टी अशक्य आहेत. बाकी एकवेळ राममंदीर जमेल. पहिल्या मुद्द्यात किमान ३० कोटी व्यावसायिक अडकलेयत. व दुसर्‍यात किमान १० कोटी. ( हे १० कोटी कोण तुम्हीच ओळखा ) . तेंव्हा भाबडी आशा वगैरे काही नाही. रामबिलास पासवान यानी सत्तेला " काटोंका ताज" अगोदरच म्हटले आहे.

पगला गजोधर Wed, 05/28/2014 - 17:27
चौकटराजे, परत सहमत,'सबका साथ सबका विकास', ग्रोथ, अछ्छे दिन वर आलेल्या सरकारला, राम मंदिर जमेल ? महागाईवर नियंत्रण न आणता, परत हे मंदिर मंदिर खेळत बसले, तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?

In reply to by पगला गजोधर

शिद Wed, 05/28/2014 - 18:05
तर जनता ह्यांना अगलीबारी माफ करेल का ?
अहो गजोधर साहेब, जनता त्यांचे काय करायचे बघून घेईल. तुम्ही कशाला आत्तापासूनच साप साप ओरडुन भुई धोपटणं चालू केलं आहे? जरा दमानं घ्या.

In reply to by शिद

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:19
शिदभाऊ हे बाकी बरुब्बर बोल्लासा तुमी, काय हाय, शेतकऱ्याला सावध राहावं लागत व साप असो नसो मधून मधून भुई थोपटावी लागतीया, भुई समतल राहते, व साप देखील बिचकत्यात. नंतर बैल गेला अन झोपा केला, अशी गत नको व्हायला, हि काळजी कस !

आनन्दा Wed, 05/28/2014 - 23:58
बाकी, मी संघात जेव्हा जात होतो, तेव्हापासून गांधींबद्दल चिखलफेक करणारे वक्तव्य कोण्या संघाच्या नेत्याने/ कार्यकर्त्याने केल्याचे ऐकिवात नाही. किंवा नथुरामच्या कृत्याचे समर्थन करताना गांधींना कोणी पायदळी तुडवल्याचे देखील पाहिलेले नाही. नथुरामने देखील त्याची अगतिकता व्यक्त केलेली आहे. (त्याचा गांधींना मारण्याचा निर्णय बरोबर होता की नाही हा वेगळा विषय आहे. तो इथे काढून धाग्याचा त्यार्पी उगाचच वाढवू नये अशी विनंती आहे.) बाकी नथुरामने देखील गांधींवर गोळी झाडण्यापूर्वी त्यांना नमस्कार केल्याचे ऐकीवात आहे. समोरासमोर गोळी झाडताना नमस्कार करायची त्याला काहीच गरज नव्हती, नाही का? पण असो. जाता जाता, तुम्ही आणि तुमचे नेते जसे आरोप करत आहात, तसे गांधींवर कोणी संघवाल्याने जाहीरपणे केल्याचे दाखवून द्यावेत हे माझे आव्हान आहे. नत्थुगुगग्गुळ घेण्यापूर्वी नीट पथ्य सांभाळले असते तर असे साईड-इफेक्ट दिसून आले नसते.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 10:13
आनंदाभाऊ, तुमच्या वरील प्रतिक्रियेनंतर, म्या पागल्याला एकच इचारावस वाटत, कि तुम्ही उल्लेखलेल्या खुनी व्यक्तीचं, प. पं. एखाद स्मृती स्थळ उभारतील का ? व त्या ठिकाणी जाहीरपणे असे वरील फोटू प्रमाणे नतमस्तक होतील का ? अवांतर: स्वातंत्र्यनंतरचा देशातील पहिला आतंकवादी ज्याने गांधी वर मुस्लिम व्यक्तीची वेशभूषा करून गोळ्या झाडल्या होत्या, लोकांनी त्याला पकडले नसते तर आज आपल्याला गांधी ची हत्या कुण्या मुस्लिमांनी केली असा सर्जरी केलेला इतिहास दिसला असता. (त्याला ओळखण्यात त्यावेळचे भा. रा. कॉ. चे कार्यकर्ते स्वतंत्रसैनिक नरहर विष्णु गाडगीळ (विठ्ठलराव गाडगीळ यांचे वडील ) यांनी, बहुमोल मदत केली, त्यामुळे सर्व समाजातील सुज्ञ लोकांना, अशी आतंकवादी विचारसरणी मान्य नाही, असे सिद्ध होते ) मुस्लिमांचा पोशाख करून एका वयोवृद्ध व्यक्तीवर गोळ्या झाडणाऱ्या, या कारस्थानी व्यक्तीबद्दल पद्धतशीरपणे नमस्कार केला वै. बातम्या पसरवण्यात आलेल्या आहे (असे ऐकिवात आहे, अशी वाक्याची सुरुवात करून )

विटेकर गुरुवार, 05/29/2014 - 10:45
पग .. तुमचा कंड अजून शमला नाही तर ..! असो, चांगली करमणूक होते आहे ! रच्याकने , गांधी अट्ट्ल हिंदुत्ववादी होते ( मोअर ख्रिष्चन द्यान पोप अशा अर्थाने )! त्यांच्या इतका सर्व जगाला माहीती असलेला दुसरा हिंदुत्ववादी नाही ! अहिंसा , सत्य, अस्तेय , अपरिग्रह .... ही सारी तत्वे कोठून आली ? ( जैन उपासनापद्धती ही हिंदू धर्माचाच एक भाग आहे , त्याच्यावर पुन्हा वादंग नको ! मागे बरेच चर्वण झाले आहे ) गांधीजींच्या आणि संघाच्या विचारसरणीत कमालीचे साम्य आहे ! फक्त मुस्लीम अनुनय सोडून ! आणि म्हणूनच गांधीजी संघाला प्रातः स्मरणीय आहेत !!! (गांधीजींचा हा मुस्लिम अनुनय हा देखील पराकोटीच्या हिंदू सहिष्णुतेतूनच आला आहे .. त्याला प्राचार्य आठवले - स्वामी वरदानंद भारती यांनी "सदगुण विकृती" असा अर्थपूर्ण शब्द वापरला आहे !) आजच्या जगात संघाच्या प्रचारका इतका गांधीवादी पद्धतीने राहणारा दुसरा माणूस शोधून सापड्णार नाही ! आणि त्यामुळेच मोदीजी राजघाटावर नतमस्तक झाले याचे कुणाही संघवाल्याला आश्चर्य वाटले नाही अथवा कोणी आक्षेप ही घेतला नाही ! तुम्हालाच आक्षेप आहे .. चालू द्या . टीआरपी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत केल्याबद्द्ल व्य नि करुन आभार मानावेत आणि उतराई व्हावे !

In reply to by विटेकर

आनन्दा गुरुवार, 05/29/2014 - 14:34
धन्यवाद विटेकरसाहेब. समर्पक उत्तर दिल्याबद्दल. खरेतर हा टी आर पी चा प्रयत्न असल्यामुळे मी इथे येणारच नव्हतो, पण त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मलाच उद्देशून धागा काढला असल्यामुळे मला यावे लागले. असो.

पगला गजोधर गुरुवार, 05/29/2014 - 11:55
विटेकर, म्या पगला, पण इथे, तुमचा देखील प्रतिक्रिया देण्याचा कंड मिटला नाही म्हणूया का ? इथे मी, मला, नत्थूगुग्गुळाने व नामोसुतशेखराने उपचार घ्यायला सुचवणाऱ्या विद्वान बंधुनो, तुमचे यावरील मत काय ? असे नमूद करून देखील, आपण, स्वतःच ठेवायचं झाकून व दुसर्याच पहायचं वाकून , या उक्ती प्रमाणे कंडावर गाडी वळवली काय ?

संचित Fri, 05/30/2014 - 19:41
बाकी सोडा हो. जोपर्यंत गांधींचा फोटो नोटेवर आहे तोपर्यंत नमन करावाच लागणार.

In reply to by संचित

पैसा Fri, 05/30/2014 - 22:46
ज्यांना गांधीजी आवडत नाहीत त्यांनी त्यांच्याकडची गांधीजींची सगळी चित्रे मला पाठवून द्या. मला गांधीजी खूप आवडतात!

विटेकर Wed, 06/04/2014 - 14:39
गांधीजींना नोटेवर घेऊन आपण त्यांचा अपमानच केला आहे. ज्या गांधीजींनी आयुष्यभर साध्या वागणूकीवर भर दिला , इतका की कपडे देखील कमीतकमी वापरले, त्यांना आपण पैशाची उब देऊ केली !!! पाश्चिमात्य जगात पैशाला दैवत मानतात त्याचेच आपण अंधानुकरण केले. यामुळे गांधीजी किती नालायक लोकांच्या हातात गेले , त्याला सीमा नाही ! एका अस्सल भारतीय/ हिंदू महात्म्याचा आणखी अवमान काय असेल ? हे तर त्याच्या नश्वर देहावर गोळ्या झाडण्याइतकेच भयानक आहे !