'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद
लेखनविषय (Tags)
मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय. ईश्वराची काही गरज नाही.' असे प्रतिपादन केले.
'पराभव झाला तर मी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेईन!' असे मंडनमिश्र म्हणाले तर 'या शास्त्रार्थात पराजित झालो तर संन्यासाची भगवी वस्त्र टाकून गृहस्थाची शुभ्र वस्त्रे नेसेन असे आचार्यांनी म्हटले. आचार्यांच्या दृष्टीकोनातून ब्रह्मज्ञान महत्वाचे तर मंडनमिश्रांचे मते कर्मच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले गेले. त्या दोघांमधील शास्त्रार्थात मध्यस्थी करण्याचे (म्हणजे निर्णय देण्याचे) उत्तरदायित्व मिश्रांची पत्नी उभयभारतीने स्वीकारले. बराच रंगलेल्या वाद-विवादानंतर उभयभारती स्वयंपाक करायला उठत म्हणाल्या, 'ह्या पुष्पमाळा दोघांच्या गळ्यात घालते. त्यापैकी ज्यांच्या गळ्यातील हार कोमेजेल तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
...
त्या शास्त्रार्थात काय विचारधन मांडले गेले. हारजीत उभयभारतींनी स्वतः न ठरवता हार कोमेजायवर का सोपवली? आदि प्रश्नावर पुढील अंकातून प्रकाश टाकला गेला जाईल असे वाटते. (जाड ठशातील मत ओकांचे.)
....
या पार्श्वभूमीवर आता महत्वाचा प्रश्न असा की या शास्त्रार्थाला आज २०१४ साली माझ्या जीवनात काय स्थान आहे? मी हे का समजून घ्यावे?
ईश्वराचे अस्तित्व न मानणारा अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. मी देवाचे काहीही करीत नाही असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु ईश्वरी सत्ता किंवा अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे.
मित्रामित्रांमधे चर्चा होते. त्यावेळी लहान मुुलगा आपल्या वडिलांबाबत केवढा निरपेक्ष अभिमान व्यक्त करतो. आपले वडील आपल्यावर प्रसन्न व्हावेत असा विचार त्याच्या मनाला शिवतही नाही.
आजचा ३५ वर्षे वयाचा तरूण त्याच भावनेने 'त्वमेव पिता' चा अभिमान का बाळगत नाही? तथाकथित देवाबाबत विश्वास व्यक्त करायला का लाजतो? मंडनमिश्रांसारख्या ईश्वरी सत्ता न मानणाऱ्या एका श्रेष्ठ अभ्यासकाला आचार्य जर आपला सिद्धांत पटवून देऊ शकले, ईश्वरच सर्व नियामक आहे हे पटवून देऊ शकले तर त्याच आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करत नाही?
वडिलांची भूमिका बजावणाऱ्या आजच्या ४० व्या वयोगटातील मुलामुलींना शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाची काय माहिती आहे? ४५ व्या गटातील आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा दासबोधासारख्या ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचून का करत नाही? विज्ञानातील आध्यात्मिक सिद्धांत, अध्यात्मातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? अध्यात्म या विषयाचे तो इतके अवमूल्यन का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
तरुणांनी आपले मत, आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करावेत ही नम्र. "
वरील विचार त्या लेखकाचे (त्यांचे नाव छापलेले नाही) आहेत. ते फक्त विचारार्थ ओकांना सादर केले आहेत.
प्रतिक्रिया
कोणती दिव्य परंपरा??
अध्यात्मातील आचरण शास्त्र
छान लेख व योग्य मार्गदर्शन
आजचा तरूण का चिंतन करू इच्छित नाही?
हा वादसंवाद शतकानु शतके चालू
वा वा.. मस्तच. चेपुवर शेअर
शुअर
चेपु?
चेपु= चेहरा पुस्तक= फेसबुक.
प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला.
सुंदर प्रतिसाद काका.
प्रकाश घाटपांडेजी प्रतिसाद
परमेश्वराकडे माझी श्रद्धा आहे
हे सारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर
शास्त्रज्ञ आणि डॉक्टर
IQ जास्त असणार्यांना सार्
नकारात्मकता आपण पुरेशी शब्दबध्द केलेली आहे.
कोणाची मते स्विकारावीत?
खरं तर आपण मोठ्या तोंडी बराच लहान घास घेतलाय...
अद्वैत सिद्धात मान्य आहे त्यांच्यासाठी ही विचारणा आहे.
आजचा तरूण ज्ञानेश्वरी किंवा
समर्थांचे व्यवहार चातुर्य व
याशिवाय अद्वैत सिद्धांत
सकृत दर्शनी "होय" हेच उत्तर आहे.
बरे.
भाषा सौंदर्य
मलाही ज्ञानेश्वरी फार आवडते.
मुळातच देव ,कर्म आणि आत्मा
यालाच नास्तिकता म्हणायची का?
देव ही मुळात मानवनिर्मित संकल्पना
एक नंबर प्रतिसाद
.
आपल्या वरील लेखात असे आहे-
हाच प्रश्न मलाही पडला आहे.
अचिंत्य अशी एखादी नियामक शक्ती नाही असे त्यांचे मत का असावे?
भाग १
अगागागागागा
तरूण - पूर्वीचे आणि आताचे.
आजचा तरूण
जगण्याची समृद्ध अडगळ
माझा प्रतिसाद संपादकांनी
मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ
पोट थंड असले की सुचते अध्यात्म आणि शास्त्रार्थ
भावना पोचल्यात
सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठीच
धन्यवाद
देवावरील विश्वास कमी झालाय...
तात्काळ प्रचिती
पिंडी ते ब्रह्मांडी। असे ज्याचे मर्म।निसर्गाचा तो धर्म। साहजिक॥
राहुल आपटे म्हणजे मूकवाचक का?
Pagination