गडीमाणस
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी . डोक्याला मुंडास अंगात बनियन आणि खाली पंचा असा त्याचा पोशाख असायचा . शेतीची आणि कलमाची सगळी काम बघणे तसाच गुरांकडे बघणे हे त्याचे मुख्य काम . खर तो आजच्या भाषेत सांगायचे तर manager होता . त्याच्या हाताखाली कमीतकमी २ ३ जन कामाला असायचे आणि त्यांच्याकडून सगळ काम व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करून घेण हि त्याची जबाबदारी आसायाची . अजिबात न शिकलेल्या या माणसाच डोक मात्र अजब चाले . शेती संदर्भात कोणतेही निर्णय घेण्याची त्याला मुभा असे . उलट कधी बाबा काका काही वेगळ म्हणाले तरी तो त्याचं ऐकत नसे . नांगरणी कधी कारायची , कोणती मानस सांगायची , कोणत खत आणायचं इथपासून कोणाला किती मजुरी द्यायची हे सगळ तोच ठरवी . या बदल्यात त्याची पगाराव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नव्हती . रोज सकाळ संध्याकाळ आमच्याकडे जेवायला असायचा . त्याची बायको सुद्धा सकाळी घरी कामाला येई . आंब्याच्या बाबतीत तो फारच काटेकोर असे . माझे बाबा आणि गुण्यादादानि मिळून आमची आमराई लावली , फुलवली होती . त्याच्या दृष्टीने ती आमराई हेच त्याच घर असे . एक मात्र होत त्याचा काकांपेक्षा माझ्या बाबांवर जीव जास्त होता . अर्थातच त्याला कारणही तसाच होत . बाबा सुद्धा त्याला मोठ्या भावाप्रमाणे वागवायचे . गणपती दिवाळी आणि शिमगा त्या सणांना त्याला महिण्याचा पगार जास्त द्यायचे . आपल्याप्रमाणे त्यांच्याही घरी आनंदाने सन साजरा होऊ दे असे त्यांचे म्हणणे असायचे . आजी आईसुद्धा सणासुदीला गोड धोड केले कि आमच्याप्रमाणे दुपारी त्यांच्याही ताटात वाढत . शिवाय मुलांसाठी न्यायला वेगळी पुडी बांधून देत . आई नेहमी म्हणायची आपण खाल्यानंतर आपली भांडी घासताना त्यांना आपण काय खाल्ले याचा अंदाज येणार आणि आपल्याला मिळाले नाही याच दुखः होणार . त्यापेक्षा देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही मग त्यानाही दिल तर उलट दिल्याच समाधान मिळेल . पगार हा आपण देतोच पण अशाप्रकारच देन घेण त्यांच्या जास्त लक्षात राहत .त्यांच्या कधी अडी अडचणीला लागले तर बाबा लगेच पैसे काढून देत . घरात चार चाकी गाडी असल्याने कधी लागली तरी त्यांच्यासाठी गाडी काढायला पण बाबाची ना नसे . आंब्यांच्या बाबतीतही हीच कथा . आंब्याची शेवटची काढणी झाली कि मग सगळ्यांना आमराईत एकदा जेवण . गरम मसाल्याची आमटी भात आणि भरपूर आमरस . अगदी सगळ्या गड्यांच्या मुलांसकट सगळ्यांना जेवण . शिवाय गुण्यादादाला दरवर्षी 50हापूस ani 50 इतर प्रकारचे आंबे बाबा देत असत . गुण्यादादा शेताला कुंपण घालीत असे ती बघण्यासारखी असे . माडाच्या झावळ्या आणि बाकी झाडाचा पाला मिळून तो सगळीकडून गच्च कुंपण उभारत असे . एकदा दादा आंब्यावर चढला असताना फांदी मोडून तो खाली पडला तर गुण्यादादाने त्याची चौकशी काराय ची सोडून आधी झाडाची फांदी मोडली म्हणून ओरडून घेतालन . इतका तो झाडांना जपायचा . कधी घरातल्याच लग्नकार्यासाठी सर्वाना घराबाहेर पडण आवश्यक असे तेव्हा गुण्यादादाला घरी राहायला बोलवत असत . घर त्याच्या ताब्यात देऊन सगळे निश्चिंत मने बाहेर पडत . (अर्थातच जाण्याआधी गुण्यादादासाठी जेवणखाण्याची व्यवस्था करूनच )
आज गुण्यादादाचा मुलगा आमची सगळी शेती बघतो . कृष्णा नाव त्याच . तो अगदी गुण्यादादाच्या पावलावर पाऊल ठेवून आमची आणि शेतीची कलजी घेतो . गुण्यादादा मला "बयो" म्हणून हाक मारायचा कृष्णासुद्धा मला "बयो" च म्हणतो . गेल्यावर हातात पैसे ठेवयला बघितले तर हात आखडून घेतो . मला म्हणतो आम्ही लेकीकडून नाही घेत . तुझा बाबा देतो तेव्हढ पुरत मला . मग काहीतरी निमित्त काढून मी तेच पैसे त्याच्या मुलांच्या हातावर ठेवते . त्याला अवघादाल्यासारख होत . पण यानेच त्याच्या लहानपणासून आमच्या बागेकडे शेतीकडे लक्ष दिले मग थोड तरी उतराई व्हायला हव ना ?
प्रतिक्रिया
स्वागत. पु.ले.शु.
मिपा वर स्वागत.
मालविका, आपन रेखाटलेले
आवडले.
क्लाsssस!!!
लेख आणि लेखातलं व्यक्तिचित्र आवडलं
आवडलं
+१
लेख आवडला. थोडा सविस्तर अजून
धन्यवाद
छान
व्यक्तीचित्रण आवडलं.
आई नेहमी म्हणायची आपण
मलादेखील हा मुद्दा फार आवडला.
मस्त लिहिलंय ... आवडलं .
मी पयला...
छान जमलय. थोडेंस छोटे जमलय
लेखन आवडले.