Skip to main content

तू

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 15/04/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात
लेखनविषय:

वाचने 2523
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात
हे कडवे विशेषकरुन!

दिलखुष..... :)

कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना !